गुरुवार, २० ऑक्टोबर, २०२२

शक्ती देवता : भाग ५


प्रथम ढोंगी सर्वधर्मसमभावाचा जो बुरखा आपल्या डोळ्यावर आणि डोक्यावर पडला गेला आहे तो फाडून टाकयला हवा. लव्ह जिहादच्या विळख्यात फक्त हिंदु कुमारींच नव्हे तर जैन बौद्ध, ख्रिश्चन शीख, या धर्मांच्या मुली सुद्धा अडकत आहेत. या सार्या धर्माच्या समाजबांधवानी एकत्र येऊन घरोघरी जनजागरण करणे आवश्यक आहे. मुस्लीम युवकाने प्रेमात पाडायचं, आपली वासना शमवायची, मुल झालं की पत्नीला तलाक द्यावयाचा आणि त्या मुलाचं वा मुलीचे नाव मुस्लीम जनगणेनेत पण बेवारस अशी भर करावी. तसे केले की केंद्र तसेच राज्य सरकार कडून ती आपोआप पोसली जातील पण शिक्षण मात्र मदरेशात. का तर त्यांनी जिहादींच राहावे.

लव्ह जिहाद हा भारताला इस्लामी राष्ट्र बनविण्याच्या आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे. मोदी सरकारने पिएफआय चे जसे कंबरडे मोडायला सुरूवात केली, तशाच प्रकाराची धडक मोहीम लव जिहाद च्या विरूद्ध सुरू करावी. कारण आपल्या संस्कृतीत कुमारी म्हणजे साक्षात जगज्जननी पार्वतीच होय. अनेक उत्सवामध्ये तिची पूजा केली जाते. अनेक कुळधर्म, कुळा-चारांत कुमारी अत्यावश्यक असते.

परंतु फक्त लव्ह जिहाद वर चर्चा आणि उपाय झाले की ' अत्र नारी वसन्ते तंत्र रमन्ते देवताः ' ही स्थिती लागलीच देशभरात प्रत्ययास येईल असे नाही. कारण आपल्या दिव्याखाली अंधार आहे तो ही दूर करायला हवा.

आपल्या धार्मिक उत्सवांत कधी समानतेच्या नावाने तर कधी फॅशनच्या नावाखाली काही वाईट गोष्टीं तसेच अनिष्ट प्रथांनी शिरकाव केला आहे. फॅशनला विरोध असण्याचे कारण नाही. पण फॅशन आधुनितकतेचं प्रतिक आहे, असे मानणारा वर्ग जाती-पातीचं जोखड फेकून देत नाही ; राजकीय नेत्यांना देवतूल्य मानतो; नेत्याच्या सांगण्यावरून निवडणूकीत प्रचार करतो ; हमरीतुमरीवर येऊन स्पर्धक पक्षांच्या कार्यकर्त्यांशी मारामारी करतो ; सार्वजनिक मालमत्तेची फोडतोड करतो, तेव्हा माता- भगिनींची ही गय करीत नाहीत. राजकीय पक्षांची अशी कार्यकर्ते मंडळीची जवळपास एक समांतर राजकीय व्यवस्था शहरात वार्डा-वार्डात आणि ग्रामीण भागात वस्ती-वस्तीत ७० वर्षात उभी राहीली आहे. ज्यांना राजकीय आधार प्राप्त झाला आहे, अशी ही कार्यकर्ते मंडळी मद्यपानाच्या नशेत युवती-महिलांची छेड करणे, एकतर्फी प्रेम न स्विकारल्यामुळे तथाकथित प्रेयसीच्या अंगावर ॲसीड फेकणें, बलात्कार, हत्या इत्यादी घटनात अग्रणी राहिली आहे. यावर उपाय सापडत नाही तो पर्यंत ' यंत्र नारी वसन्ते तंत्र रमन्ते देवतः ' असे शंभर टक्के दृश्य मृगजळच ठरणार.

आपल्या देशातील बाॅलीवुड जगतात आपल्या हिंदू संस्कृतीची दाखविली जाणारी बेलगाम निर्भत्सना, हे ही कारण आहे ज्यामुळे युवक-युवती वर्ग दिशाहीन होतो. त्यांना आपली संस्कृती, आपले धर्मशास्त्र टाकाऊ वाटतात. बाॅलीवुड वर नियंत्रण नाही. कारण बाॅलीवुड डी गँगच्या हातात आहे ,आणि आमच्या काही राजकीय पक्षांचे सर्वोच्च नेते त्यांचे मिंधे बनले आहेत. आपल्या येथील बाॅलीवुड जगतावर बुलडोझर फिरवायला हवा असे आता वाटू लागले आहे.

शाळा आणि काॅलेज मधून शिकविला जाणार्या इतिहास विषयाचा अभ्यासक्रम इतक्या खोटारडेपणाने तयार केला आहे की आपली संस्कृती, आपला देश, व धर्म या संबंधी विद्यार्थ्यांमध्यें तिटकारा, न्यूनगंड शिरला आहे. विद्यमान केंद्र सरकार या संदर्भात पावले उचलते आहे. पण लोकमान्य टिळकांच्या निर्वाणा नंतर इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमात जो घाणीचा डोंगर झाला आहे तो उपसायला वेळ लागेल. म्हणून इतिहास विषयाचं शालेय पुस्तकातील खोटारपणा समजावून देण्यासाठी जे कार्यक्रम होतात त्यात जनसामान्यांची उपस्थिती वाढत गेली पाहिजे.

उत्सवातून संस्कृती जिवंत राहते, एकता वाढते, आणि उत्सवातून रोजगार ही उत्पन्न होतो या बद्दल दुमत नाही. पण उत्सवांत हिणकसपणा नसावा. आपल्या उत्सवापैकी दहीहंडी, गणेशोत्सव नवरात्रोत्सव आणि होळी यांना सार्वजनिक स्वरूप आहे. अशा उत्सवास प्रारंभ झाल्यानंतर प्रथम सामाजिक समस्यांबाबत थोडसं समाज प्रबोधन होणे गरजेचं आहे.

एक समाज म्हणून प्रत्येक वस्तीत युवकांचं दक्षता पथक तयार होणे आवश्यक आहे. रक्षाबंधन, भाऊबीज या सणांच्या पाठीमागील पावित्र्य समजावून देण्याचा उपक्रम माध्यमिक स्तरावर अभ्यासक्रमात ठेवण्याची वेळ आली आहे . सोशल मिडीया वर या संबंधीत अनेक पोस्टद्वारे जागृती निर्माण होत आहे. ती जागृती अधिक प्रमाणात झाली पाहिजे. स्वयंसेवी संस्थांनी लव्ह जिहादीला बळी पडलेल्या मुलींचं rehabilitation करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यातून जबरदस्तीने धर्मांतर झालेल्या मुलींना स्वधर्मात परत आणता येऊ शकेल. एकदा अशा शुद्धीकरणाचा प्रयोग सफल झाला की जनजागृती होईल. मग इतर प्रलोभनातून ज्यांच धर्मांतर झालं आहे अशा समाज बांधव व  भगिनींच्या शद्धीकरणास गती मिळेल.

वैदिक काळापासून आपल्या येथे शक्तीपुजा होत आहे. पण त्याचे महत्व पटवून देण्याची व्यवस्था होती ती मुस्लीम आणि ब्रिटीश राजवटीत कोसळली आहे. ती नव्याने उभी करावी लागेल. सर्वच कार्ये सरकारने करावीत ही भावना छाटून काढावी लागेल. आम्ही मर्द आहोत, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप, गुरू गोविंद सिंग राणी लक्ष्मीबाई सारख्या अनेक पराक्रमी आणि तेजस्वी योद्धाचे पाईक आहोत ही भावना आपल्या युवकांत वाढण्यासाठी अनेक ज्ञाती संस्था, सहकारी संस्थांनी प्रयत्न करायला हवे. त्यातून जी शक्ती निर्माण होईल तिचे रूप अजेया असेल. त्यावर चर्चा भाग ६ मध्ये करू या.

२ टिप्पण्या:

  1. समाजप्रबोधन करणारा लेख. या लेखात लिहिल्याप्रमाणे उत्सव साजरा करताना युवक दक्षता पथक असणे कामाची गरज आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. समाजप्रबोधन करणारा लेख. या लेखात लिहिल्याप्रमाणे उत्सव साजरा करताना युवक दक्षता पथक असणे काळाची गरज आहे.

    उत्तर द्याहटवा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...