गुरुवार, २० ऑक्टोबर, २०२२

शक्ती देवता : भाग ३

 


स्त्री कुठलिही असो, ती वंदनीय असते अशी आपली धारणा आहे. तरीही त्यात मातेचे स्थान सर्वात वरचे असते. यावर मागील लेखात चर्चा झाली आहे. आपल्या येथे गावा-गावात, आणि शहरात प्रत्येक  वार्डात अनेक देवींचे मंदिरे आहेत. त्यातील प्रत्येक देवीच्या नावाचा जयघोष करताना  'माता ' हे विशेषण चिकटलेले असते.

प्रत्येक देवी संबंधी स्थानिक भक्तगणांकडून आख्यायिका ऐकावयास मिळत असतात. हे सारं काही थोतांड आहे अशी टिका करणारे अनेक पत्रकार, संपादक मंडळी आहे. तरी ही देव-देवतांचे उत्सव होत असतात, आणि अशा उत्सवाचे लाईव चित्रण हीच मंडळी चॅनेल्स वरून दाखवित असतात. का तर टिआरपी वाढतो. टिआरपी वाढतो, म्हणून जाहिराती अधिक मिळतात. म्हणजे उत्पन्न ही वाढते. हे उत्पन रोख पैशात असते. म्हणजेच ते लाईव्ह चित्रण देण्याचं कार्य म्हणजे महालक्ष्मी माता, जी शक्ती देवता चं एक रूप आहे तिची उपासना होय. पण तशी कबुली तथाकथित डावे विचारवंत देत नाहीत.

या डाव्या विचारवंतानां ज्योतिषशास्त्राची ॲलर्जी आहे. परंतु सूर्यग्रहण वा चंद्रगहणासंबंधी माहिती देण्यासाठी अनेक ज्योतिषींना आदल्या दिवसापासून चॅनेल्सवर आणलेले असतात. ग्रहाचं भ्रमण, गुरूत्वाकर्षण ही शक्तीची रूपें. पण शाळेत ज्योतिषशास्त्र एक विषय म्हणून यांना नको असतो. अनादी काळापासून भारतात ज्ञानभंडार होते ते संस्कृत भाषेत. त्या संस्कृत भाषेला इंग्रजांनी शाळेतुन हद्दपार केले. स्वातंत्र्यानंतर संस्कृत हा विषय फक्त पाठातंरापुरता ठेवला. पुढे संस्कृत भाषेला प्रोत्साहन दिले गेले नाही. जर्मनी सारख्या पाश्चात्य देशात संस्कृत भाषा शिकविली जाते आणि त्यातील ज्ञानभंडाराचं जर्मनी भाषेत अनुवाद केला जातो.

पैसा हे विनिमयाचे साधन नव्हते तेव्हा पशुधन, गोमाता धन, कृषी धन, अन्नधन, सोनं , हिरे, रत्ने लाकूड, दगडधोंडे, कोळसा, इंधन इत्यादी सारी महालक्ष्मीची रूपे होत. तेव्हा एका वस्तु च्या बदल्यात दुसरी वस्तु दिली जात असे तो काळ बाॅर्टर एक्सेंन्जचा होता. पण व्यवहार तर सुरू होते. व्यवहारी, किंवा व्यापार युगात महालक्ष्मीचे महत्व भूतकाळात ही होते, आज ही आहे. म्हणून तिला  माता म्हटले जाते.

महासरस्वती शब्द, वाचा, वाणी, गायन, गीत, साहित्य वाद्य, संगीत, भजनं, आरती इत्यादी द्वारें दर्शन देत असते. जे मिडीया हाॅऊसेस् देव-देवतांच्या कल्पना थोतांड आहे असे बोलून दाखवतात. ती त्यांची 'वाणी ' महासरस्वतीचं एक रूप च आहे. इतकं काॅमन सेन्स या मंडळी कडे राहीलं नाही. जेव्हा लेखन, प्रिन्ट, इलेक्ट्रॉनीक्स मिडीया अस्तित्वात नव्हती तेव्हा या सृष्टीतल्या गुढेंची उकल करून ती एका पिढीतून दुसर्या पिढीला ज्ञात केली जात होती. ती कुठल्या माध्यमातून या संबंधीचा इतिहास फक्त भारतवर्षात होता आणि आहे. त्यावेळी आपल्या तपश्चर्याच्या बळावर ऋषीमुनींनी सृष्टीतली रहस्यांचा शोध लावला, आणि ते सारं ज्ञान आपली वाणी, श्रुती, स्मृती, उपनिषदे, ब्राह्मण्यके आरण्याकें मार्फतच पुढच्या पिढीला मिळत आले आहे.

ब्रह्मांडात अनेक रहस्यें भरलेली आहेत. ती रहस्यें शोधून काढणे म्हणजे विज्ञान आहे. विख्यात शास्त्रज्ञ आईन्स्टाईन यांनी म्हटले आहे की ' या जगात सर्वात मोठं गुढ हे विश्वच आहे.' उर्जा, इंधन, प्रकाश, हवा, ध्वनी, जल, वनस्पती, इत्यादी मानवी जीवनांचे आधारभूत घटक या विश्वात मानवाचा जन्म होण्या अगोदर पासून अस्तित्वात आहेत. आपण ज्यांना शोध म्हणतो, ते या विश्वात विश्वाच्या निर्मिती पासूनच अस्तित्वात आहेत. वैज्ञानिकांनी त्या गोष्टी निर्माण केलेल्या नाहीत.

मला वाटतं Creation निर्मिती म्हणजे शक्ती देवी आणि विज्ञान म्हणजे Discovery. आपले प्रवचनकार " ज्ञान हे पुर्ण असते तर विज्ञान अपूर्ण असते. " असे म्हणतात त्यात तथ्य आहे. ते सारं काही थोतांड नव्हे. Modern science has just discovered what has been in existence in this Universe.

वैज्ञानिकांनी शोध घेण्यासाठी साधने निर्माण केली. पण त्या साधनांची निर्मिती साठी जो कच्चा माल लागला तो सृष्टीतुनच मिळाला आहे. पण तरीही ते कौशल्य वैज्ञानिकांचेच. त्यांचे प्रयत्न ही तपश्चर्या. म्हणून ती सुद्धा एक निर्मिती आहे. म्हणजेच शक्ती देवी. परंतु जेव्हा विज्ञान अस्तित्वात नव्हते त्या काळात विश्वातील रहस्यांचा शोध भारतीय ऋषीमुनींनी केला होता, हे सत्य सिद्ध ही होत आहे. साने गुरुजींनी , ' आपली संस्कृती ' या पुस्तकात कबूल केले आहे. अमेरिकन इतिहासकार बिल ड्युरांड यांनी हे सत्य स्विकारले. अनेक पाश्चीमात्य विचारवंतानी मान्य केले आहे.

कालचे ऋषी-मुनी आजच्या काळाचे वैज्ञानिक आणि आजचे वैज्ञानिक भूतलावरील ऋषी-मुनी. ही मंडळी या वसुंधराचे सुपुत्र होत. वसुंधरेला ही आपण माताच मानतो. हा विचार आजच्या मानवाने मानला तर या जगात संघर्ष राहणार नाही असे मला वाटते.

आपल्या येथेच नव्हे तर जगभर उत्सव प्रथा सुरू होत आलेली आहेत. या उत्सवाचं आयोजना पासून ते समारोपा पर्यंत महालक्ष्मी कामी येते. महालक्ष्मीची शक्ती अपार आहे हे आपण या कलियुगात पदोपदी अनुभवत आहोत. मराठीत तर दाम करी काम असा चित्रपट होता. इथे मला भगवान विष्णु आणि नारदमुनी मधला संवाद आठवला. तो मी कथेच्या (अर्थातच विनोदी शैलीत) रूपात मांडून या भागाची समाप्ती करतो.

एकदा नारदमुनींचा पृथ्वी वरील वास्तव्य आणि भ्रमंतीचा कालावधी वाढला होता. भगवान विष्णूला चिंता वाटली. ते पृथ्वीवर असलेल्या नारदाला आपल्या मोबाईलवरून संपर्क करतात आणि विचारतात, 
"अरे नारदा तु आहेस कुठे? काय चाललंय तिथे, सर्वकाही ठिक आहे ना? तु या खेपेस पृथ्वीवर अधिक काळ आहेस म्हणून विचारतो आहे." नारदमुनी हे या भूतलावरील सर्वात पहिले वाहिले पत्रकार, संपादक आणि मिडीया मालक मानले जातात. ते उत्तर देतात, " भगवान, चिंता नसावी. तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येतो आहे."

नारदमुनी देवलोकात परतले आणि थेट 'नारायण - नारायण ' करीत वैकुंठात प्रवेश करतात. नंतर भगवान विष्णुकडे जातात. भगवान विष्णू म्हणाले, "नारदा छान ! तु आलास बरे झालं. तु नव्हतास म्हणून मला करमत नव्हते. प्रथम मला आनंदाची बातमी सांग पाहू." नारदमुनी म्हणाले," श्री हरी, काय सांगू तुम्हाला, तुमची किर्ती किती वाढली आहे. भुतलावर प्रत्येक कोपर्यात माणसें तुमचीच पुजा करीत आहेत. प्रत्येक मिनिटाला तुमच्या भक्त गणांची संख्या इतकी वाढत आहे की मला मोजता आली नाही. धन्य प्रभो ! "

भगवान विष्णु म्हणाले , अरे नारदा, तु फार काळ पृथ्वीवर थांबला. म्हणून मी इथून दिव्य दृष्टीचे बटण ऑन केले. त्यातून मी काय पाहिले आणि ऐकले ते सांगतो. " भक्तगण माझी पुजा करीत होते ते खरं आहे. भक्तांची संख्या वाढत जात आहे हे ही पाहिले . पण विनंती करीत होते की आमच्या घरात लक्ष्मी मातेचा सतत वास राहो. याचा अर्थ काय? त्यांची खरी भक्ती लक्ष्मीमाता वर आहे. नारदा हे कलियुग आहे. हे तु कसे काय विसरलास ? नारदमुनीने आपल्या कपाळावर हात मारत 'अरे रामा ! ' उद्गार काढले आणि नारायण नारायण असा घोष करीत वैकुंठातून पाय काढते झाले.

महासरस्वती आणि महालक्ष्मी या संबंधीत चर्चा झाली असली तरी या नंतरच्या भागातही विशेषतः शक्ती देवीच्या विश्वरूपावर चर्चा करते वेळी पुन्हा होणार आहे. म्हणून व्यासमुनींनी रचलेल्या मातृस्तुती मधील एक श्लोक मांडून हा भाग पुरा करतो.
नास्ती गंगासमं तिर्थ
नास्ती विष्णुसम: प्रभु |
नास्ती शंभुसमः पूज्यं
नास्ती मातृसम गुरुः | |

क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...