" सामान्यतः प्राचीन काल से सभ्यताओंका विकास नदियोंके किनारे हुआ | अतः हम देखते है कि सरस्वती, सिन्धु , गंगा, दजला ( ट्रायग्रीस) फरात ( युक्रेटिस) नील, हवांग-हो, आमुदरिया आदि के किनारे सभ्यताएँ विकसित हुई | इन विकसित सभ्यताओं का गहराई से अध्ययन करें तो इनके दार्शनिक विचार, सृष्टि-कथाएँ, देवता, मान्यताएँ, भाषासाम्य, पुरातत्व सामग्री आदिमे साम्यता का सुत्र दिखाई देता है | तो इस साम्य का कारण क्या है?
इस प्रश्न का उत्तर देते हुए प्रख्यात मार्क्सवादी समालोचक डाँ राम विलास शर्मा कहते है , " दुनिया की किसी कथा, देवता और भाषाँओंका साम्य के मूल को खोजते जाएँगे, तो अंत मे ऋग्वेद की शरण मे आना पडेगा | उदाहरण के लिएँ नासदिय सूक्त मे सृष्टी के पूर्व की स्थिती, सृष्टी के प्रारंभ का जो वर्णन है, उसकी छाया दुनिया की अन्य सभ्यताओं में दिखाई देती
है | ऋग्वेद मे कहा है --
" तब न सत था न असत था
न दिन था न रात थी
न पृथ्वी थी न अन्तरिक्ष
न मृत्यु न अमरत्व
जब अन्धकार से अन्धकार ढाक था,
तब वह एकमेव स्पन्दन रहित तत्व
था, उसके मन मे बहुत होने की इच्छा हुई और सृष्टी का प्रारंभ हो गया | "
श्री सोनीजीनी पुढे युरोप मधील स्कॅडिनेविया मध्ये बाराव्या शतकात प्राचीन गद्य आणि पद्य साहित्यात अशाच प्रकारची रचना आढळली चा दाखला दिला आहे.
पुढे श्री सोनीजी कोलम्बसचा तथाकथित अमेरिकेच्या शोधापुर्वी तिथे विशाल इन्का साम्राज्य होते अशी सत्य माहिती देतात आणि तेथेही ऋग्वेद च्या वरील सुक्ताच्या समानार्थी पद्य पंक्ती आढळल्या असे सांगत त्यांनी पंक्ती मांडल्या आहेत. त्या खाली दिल्या आहेत-
" अनन्य अवकाश के उच्छवास मे उसका निवान्त था | विश्व तमोमय था, सब ओर जल ही जल था,
न उषा काल की आभार थी,
न प्रकाश था | उसने सोचा--
इस प्रकार मै अस्तित्व हीन हो जाऊंगा, मै अनंत हो जाऊंग
वह तेजोमय हुआ
सब ओर प्रकाश ही प्रकाश फैला ! "
या चर्चेचा अर्थ हाच की जे चैतन्य होते, त्याला वाटले मी आता अनंत होईन . मग ते तेजोमय झाले. मग सर्वत्र प्रकाश, प्रकाश आणि प्रकाश पसरला. विज्ञान ही असेच म्हणते.
आता पर्यंतच्या चर्चेतून या विश्वाच्या उत्पत्ती पाठीमागे कुठली तरी शक्ती आहे या बाबत आपली सहमती झाली असावी असे मी गृहीत धरतो आहे. म्हणून या लेखमालिकेच्या भाग १ मध्ये भगवद् गीताला गीताई असे संबोधले जाते म्हणून ती सुद्धा शक्ती देवताचं एक रूप आहे असा जो ओझरता उल्लेख केला आहे, त्या संबंधी थोडासा विस्तार करण्याची हीच योग्य जागा आहे असे मला वाटत आहे.
बंगलोर मधील Mental Institute चे संस्थापक डाॅ गोविंद स्वामी म्हणतात, " Mahabharat is the greatest work on Phycho Pathalogy." महाभारतात ' व्यक्ती तितक्या प्रकृती' या शाश्वत सिद्धांताचं दर्शन पदोपदी होते. युधिष्ठीर सारखा सज्जन तिथे आहे तसा शकुनी सारखा कपटी ही तिथे आहे. डाॅ गोविंद स्वामी भगवद् गीता संबंधीत म्हणतात की Bhagvad Gita is the greatest work on Psycho Therapy. मनुष्याच्या जीवनात खरं-खोटं, पाप-पुण्य, आसक्ती-विरक्तीत, यश-अपयश इत्यादी संबंधीत मनात जे सदैव दंद्व सुरू असतात. त्यांच निराकरण करण्यासाठी प्रेरणा माणसाला मिळत असते. भगवद् गीताचा प्रभाव संबंधीत डाॅ गोविंद स्वामी एक उदाहरण आपल्या समोर मांडतात ते खाली देत आहे.
दुसर्या महायुद्धात अमेरिकेने १६ जुलै १९४५ आधुनिक परमाणू बाॅबचा स्पोट घडवून आणला. तेव्हा त्या बाॅम्बचे जनक ओपन हायमरांनी त्या
उर्जा शक्तीचे मापन करण्यासाठी ठेवलेल्या सर्व यंत्रांच्या अनंत ठीकर्या उडाल्या. त्यांचं ओपन हाईमर यांनी वर्णन असे केले आहे ---
If the radians of a thousand suns. Were to burst into sky. That would be like,
the splendor of the mighty one.
वरील वर्णन भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला नऊ हजार वर्षापुर्वी कुरूक्षेत्रावर आपल्या प्रमुख विभूती चं दर्शन दिले आहे त्यांच्याशी तंतोतंत जुळते आहे ते पाहा-
" दिविसूर्य सहस्त्रस्य भवेत् युगपत् उत्थिता |" ( अर्थात एक हजार सूर्य एकाच वेळी आकाशात तळपत असलेल्या शक्ती इतकं प्रखर तेजासमान असते. "
जगातल्या अनेक विचारवंतानी भारतातील हिंदु संस्कृती हीच सर्व संस्कृतीची जनक आहे असे मानले आहे. सृष्टी म्हणजे प्रकृती म्हणजे उमा आणि शिव म्हणजे पुरूष असेच आपले धर्मशास्त्र सांगते. स्त्रीपुरूषाचं केवळ साम्य नव्हे तर एकत्व निदर्शित करणारे अर्धनारीनटेश्वर भारतिय जनजीवनाचे आधार आहेत. आचार्य विनोबा यांनी ओम म्हणजे फक्त शिव नसुन त्यातील शब्द अ उ म हे शब्द उलट्या क्रमाने लिहले तर उ म अ असे होते. म्हणजे शिव च्या सोबत उमा होय. या संबंधीत अधिक माहिती ब्लाॅग वरील ९आक्टोबर २०१८
' ईषावास्यम इदं सर्वम् ' या लेखात वाचावयास मिळेल.
आपल्या येथे देव आणि देवता अशा जोडया आहेत. देवीचेच नाव प्रथम जोडले जाते. जसे की उमा-महेश्वरं, लक्ष्मी-नारायण, राधा-दामोदराय. महिलांना आदराने वागविणारी आपली संस्कृती आहे. असे आपण म्हणतो. पण असा अभिमान पोकळ ठरतो. आपल्या पंतप्रधानांनी सुरू केलेली बेटी बचाव मोहीम फक्त स्त्रीभृण हत्या थांबविण्यापुरता मर्यादित नाही. कुमारीकांना लव्ह जिहाद पासून तसेच स्वजनातील गुंडा कडून होणारे छळ, भेदभाव, बलात्कार, इ अत्याचारापासून संरक्षण देणे, ही बाब ही अंतर्भूत आहे. महिलां वरील अत्याचार थांबविण्यासाठी कायदा कडक करावयास हवा असे मला वाटते. पण महिला वर अत्याचार करण्यार्यांना पोलीस खात्यात वा राज्य प्रशासनात एखादा गाॅड फादर भेटतो आणि प्रकरण मिटते. अशा प्रकारे मिटलेल्या अनेक प्रकरणावर न्याय मिळवण्याचा पिच्छा सर्व सामान्यांनी संघटीत शक्तीच्या बळावर सुरू ठेवावयास हवा.
क्रमशः
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा