स्वामी विवेकानंद अमेरिकेत असताना दोन गोष्टी घडल्याचे सांगतात. त्यांच्या व्यक्तीमत्वाने प्रभावीत झालेली एक युवती म्हणाली, ' स्वामीजी, मला तुमच्याशी लग्न करता आले असते तर किती छान झाले असते ! मला तुमच्या सारखा सुंदर आणि बुद्धीमान पुत्र असावा असे वाटते.' त्यावर स्वामीजी हसून म्हणाले, '' माते, ही तर फार सोपी गोष्ट आहे. तु मलाच तुझा पुत्र मान." स्वामीचे हे उत्तर ऐकून तेथे जमलेली मंडळी चकित झाली. त्यांनी स्वामीजींना विचारले, '' तुमच्या देशात स्त्रियांना पुरूषांच्या बरोबरीने वागविण्यात येते का? '' स्वामीजींनी उत्तर दिले " नाही." लागलीच श्रोत्यामधून धिक्कार ! धिक्कार ! धिक्कार अशी ओरड सुरू झाली. ती काही वेळाने थांबली.
स्वामीजी धीर गंभीर मुद्रेने उभे राहिले आणि म्हणाले, आमच्या देशात स्त्रीला पुरूषांपेक्षा अधिक श्रेष्ठ मानले जाते. कारण ती अनंत काळाची माता असते. " मघाशी धिक्कार करणार्या मंडळींनी उभे राहून टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला !
प्राध्यापक प्र ग सहस्त्रबुद्दे म्हणतात, स्वामीजींच्या अधिकृत चरित्रात या गोष्टी वाचायला मिळत नाहीत. त्या अकल्पित अथवा अतिरंजित असू शकतील. त्या प्रत्यक्ष घडलेल्या असोत की नसतो, परंतु एवढे निश्चीत की त्यांनी जीवनविषयक एका महान सिद्धांताचे उद्घाटन केले आहे. स्त्रियांकडे पाहण्यचा भारतीय दृष्टीकोन त्यातून प्रगट झाला आहे. स्वस्थ, सुव्यवस्थित, आदर्श, आणि उन्नतीप्रवण समाजाची स्थिती-गती त्यातून चित्रित झाली आहे."
मनुस्मृतीवर काही टिका होत असली तरी त्यातच
' यत्र नार्यस्तु पूज्यते
तंत्र रमन्ते देवता: | '
असे शाश्वत सत्य मांडले गेले आहे. ?(ज्या घरात अबालवृद्धांकडून स्त्रियांचा सन्मान केला जातो, त्या घरात देवता वास करतात.)
तंत्र रमन्ते देवतः या आशयाची उदाहरणे रामायण, महाभारत, भागवत आदि ग्रंथांत विविध दृष्टांतद्वारे सांगितली आहेत. रामायण आणि महाभारत घडले ते ही दोन देवतांप्रती अनादर दाखविला गेला म्हणून.
मातेच्या श्रेष्ठत्वाची कल्पना देणार्या अनेक कथा, उदाहरणे आपल्या धार्मिक ग्रंथांतून वाचण्यात आल्या आहेत. त्यापैकी कार्तिकेय आणि गणपती यांच्यामध्ये पृथ्वीप्रदक्षिणा कोण लवकर करतो या स्पर्धेची कथा सर्वश्रुत आहे. गणपती पृथ्वीला प्रदक्षिणा न घालता आपल्या माता पार्वती भोवती एक फेरी मारून स्पर्धा जिंकतो. महाभारतल्या भीभासंबंधी म्हटले आहे की त्याचा आहार प्रचंड होता. परंतु भूक अनावर झाली असताना माता कुंतीच्या हातून मिळालेल्या अन्नाच्या एका घासात भीमाला तृप्ती मिळत असे.
जगद्गुरु श्रीशंकराचार्यांचे एक स्पष्ट विधान आहे ते म्हणजे,
" कुपुत्रो जायेत क्वचिदपि
कुमाता न भवती "
( या जगात कुपुत्रो निर्माण होत असतील, पण कुमाता कधीच असत नाही) साडेतीन शक्तिपीठ आहेत ती देवतांच्याच आहेत. यातच स्त्री ची महत्ता स्पष्ट होते.
छत्रपती शिवाजी महारांजाच्या यशात जी काही कारणें आहेत, त्यापैकी एक म्हणजे स्त्रियांविषयी त्यांच्या मनात असलेला नितांत आदर होय. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला पाहून महाराजांना आपल्या मातेची आठवण झाली. त्यांनी तिला लेकी प्रमाणे मोठ्या गौरवाने आपल्या सासरी पाठविले." आमच्या आईसाहेब अशा सुंदर असत्या तर आम्हीही असेच सुंदर निपजले असतो." शिवाजी महाराजांचे हे उद्गार महाराष्ट्राचे मोठे निदान आहे. मराठी भाषेचे ते लेणे आहे.
क्रमशः
आदिशक्ती, नारीशक्ती व मातृशक्ती या तीनही शक्तींचं, सोदाहरण गुणगान अतिशय कमी शब्दांमधे असुनही ठसा उमटवुन जातं
उत्तर द्याहटवातीनही शक्तींना शतशः नमन.
धन्यवाद.
माताशक्तीला शतशः वंदन
उत्तर द्याहटवा