गुरुवार, २० ऑक्टोबर, २०२२

शक्ती देवता : भाग ९





तसे पाहता आता माझ्याकडे फारसे काही लिहिण्यासारखे राहिले नाही. जितकी कुवत होती तितकं वेडवाकडं मांडले.  या ब्रह्मांडाचं स्वरूप उत्पत्ती, स्थिती, आणि लय असे आहे. असे असले तरी शक्ती देवता अजरामर आहे. तिचे प्रत्यक्ष दर्शन तर या युगात किती ही जन्म घेतले तरी अशक्य आहे. तरी या लेखमालिकेच्या शेवटा कडे जावे लागणार आहे. कारण आपण देहरूपाने किती काळ जगणार हो ?  दिवस-रात्र असे चक्र आहे. ते प्रत्येक क्षेत्राला लागू आहे. मृत्यु हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे. ते स्विकारून या लेख मलिकेच्या  समारोप करू या.

ब्रह्मांडात तेजोमय सूर्यदेव सामावलेला आहे तो जीवाची उत्पतीकारक तर त्यातला चंद्र हा मातेत असलेली शितलता होय. कुठल्याही वस्तु निर्मितीत जी शक्ती लागते तिचं आधुनिक नाव 'ऊर्जा '  आहे. ऊर्जाचे प्रकार दोन आहेत. एक धन, दुसरा ऋण. म्हणजे पुरूष आणि प्रकृती नव्हे काय ? प्रत्येक वस्तुची निर्मिती, ती मानवाच्या हातांनी तयार झालेली असो वा यंत्राच्या साहाय्याने ! तिचे मूळ स्वरूप ती ऊर्जा देवी. असे असले तरी निर्माण केलेली वा झालेली वस्तु तेजोमय तसेच शितल ही असते.
ज्यांना आपण अनेक कला मानतो त्या सार्या शक्तीदेवीची रूपे आहेत. हे विश्व नादब्रह्म आहे. साहित्य-संगीत- कला मग त्या लेखणीतील असो, वा गायक-गायिकेच्या कंठातील सुरवटींने सजलेले गीत -कविता असो, किंवा मानवाच्या हातातल्या शक्तीतून तसेच यंत्रशक्तीतून निर्माण झालेला विविध वाद्यांतुन येणारा तो 'ताल ' असो. या सार्या गोष्टी ब्रह्मांडात मानवाच्या जन्माच्या अनेक शतकाआधी पासून  विराजमान आहेत.

एके ठिकाणी मी संगीताची व्याख्या वाचली होती. बस जे सुचलं होतं ते त्या व्याख्येत भर टाकून थोडीशी मोठी केली आहे --
" कळकाच्या बेटांतून वारा वाहू लागला, समुद्राच्या लाटांचा चौघडा वाजू लागला, धबधब्याच्या एक सुरी आवाजाने ताल निर्माण झाला, आंब्याच्या झाडावरून कोकीळेच्या कंठातून सनई वाजू लागली, उंच उंच ताडा-माडाच्या माना डोलू लागल्या, होता होता मानवाच्या कंठातील सुरावटींनी अंती त्या नादब्रह्माला आकार, उकार दिले ! हाच तो त्रिवेणी संगम जिथे साहित्य, संगीत व कला या तिन्ही देवता आपल्याला त्यांचे विलोभनीय दर्शन देतात. 

संगीतात असलेले राग पट्टीच्या गायकाच्या कंठातून बाहेर पडले तर पाऊस पडतो, अग्नी निर्माण होतो. इत्यादी गोष्टी अंधश्रद्धा नसाव्यात. संगीताच्या सानिध्यात भात गहू ज्वारी सारखी पिकें, मुग, मसूर तुळ या डाळी, वाल, वटाणा, राजमा, इत्यादी, कडधान्यें, आंबा, फणस, सफरचंद, मोसंबी, पेरू, इत्यादी फळं, टोमेटो, कोबी, दुधी, भेंडी पडवळ, इत्यादी भाजीपाला १०० टक्के शुद्ध तसेच अधिक उत्पन्न निघते हे आधुनिक विज्ञानाच्या अत्याधुनिक प्रयोगशाळेत सिद्ध झाले आहे. विज्ञान आणि खगोलशास्त्राचे अभ्यासक श्री मोहन आगाशेंच्या ' मला उत्तर हवे आहे '  या शिर्षका च्या तीन पुस्तकांवरून या संबंधीची पुष्टी मिळते. 

म्हणून संगीत,गायन,कला, आणि  शब्दब्रह्म जे साहित्य निर्माण करते, ही सारी शक्ती देवतेचे विविध रूपे ठरतात. एखाद पुस्तक आपण वाचावयास बसलो की त्यात गर्क होऊन जातो ही शब्दांची शक्ती. एखाद्या गायकांच्या कार्यक्रमात आपण तल्लीन होतो ही गायक आणि साथीदारांची सांघिक शक्ती होय. विविध कला आपल्याला मोहक वाटतात याचे कारण कलाकारांत असलेली शक्ती देवी होय.
 
पंचमहाभूते ही सुद्धा शक्ती ची रूपें आहेत. मानवाच्या शरीरात ही पंचमहाभूते अस्तित्वात आहेत. दररोज आपण अन्न घेतो. त्या अन्नाची चव ही एक पाककला तर अन्नातून मिळते ती शक्ती म्हणजे अन्नपुर्णा देवी होय. मुळात अन्न आपल्याला जमिनी पासून मिळते. प्रथम बीजरोपण होते. सुर्य सागराच्या जलाची वाफ करतो. आकाश जल घेते आणि त्या खारट जलाचं रूपांतर गोड पाण्यात करून ढगात ठेवते. वायू ढगांची अशी काही घुसळण करतो की ते पाणी पावसाच्या रूपात धरतीवर पडते (ढगांच्या गडगडातून वीज चमकते. ते पाहून पाण्यातून आणि वायूतून ही ऊर्जा निर्माण होते याचं माणसास ज्ञान झाले आणि सूर्य तर सौर उर्जा च.) धरती ते पाणी घेते आणि अन्न देते. म्हणून ती जमीन भुमाता होते. शेवटी निर्मिती शक्ती म्हणजेच शक्ती देवीची विविध रूपें आहेत. ही रूपे अवतरली ती मानवात असलेल्या विविध शक्ती च्या संगमातून. त्या आहेत बौद्धिक शक्ती, मानसिक शक्ती आणि शारिरीक शक्ती. म्हणजेच जगदंबेचं दर्शन होय. पण पहिला जल, थल, वा खग असा जीव निर्माण झाला तो प्रकृती आणि पुरूषाच्या मिलनातूनच होय.

ब्रह्मांडात असलेल्या त्या देव-देवता फुलाला सांगतात," तु सुगंध दरवळत राहा, कोकीळेला सांगतात तु कुंजन करीत राहा, मानवाला म्हणतो, तु निसर्गात असलेला स्वर सुर आणि ताल पकड म्हणजे तुझे मन आणि कर्म शुद्ध राहील. कारण हे विश्व नादब्रम्ह आहे.

आता देवी माणसाला सांगते," तुला दोन कर दिले आहेत, त्याला तु सहस्त्र कर ; म्हणजे विविध प्रकारच्या कला, साधने, यंत्रे आणि वस्तु च्या निर्मितीतुन तु स्वतः अनेक देवतांना जन्म देशील ;

" तुला दोन डोळे दिले आहेत त्याला सहस्त्र 'डोळे' जोड म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे जाशील ; तुला डोकं दिलं आहे, तुला बुद्धी दिली आहे, तुला मन दिलं आहे, आणि शरीर दिलं आहे, आता तु सहस्त्र शरीर धारण कर ;
म्हणजेच सांघिकतेला साद घालत जा. त्यातूनच ' जियो और जिने दो ' असा मंत्र ऐकू येईल. मग बघ तुझी शक्ती इतकी वाढेल की तुच ही सृष्टी खर्या अर्थाने सृजन करशील.' हाच तो संदेश सार्या मानवजातीला ईश्वर पार्वती देत आहेत असे मला वाटते.

जय अंबे !

३ टिप्पण्या:

  1. विष्णुजी,
    शक्ती देवता सर्व भाग वाचले. आपल विवेचन अध्यात्मिक तसंच प्रचलीत जीवनाशी सांगड घालत शक्ती देवतेला महा शक्ती रुपात अधोरेखित करत.
    त्या शक्तीला त्रीवार नमन
    🙏🙏🙏.

    उत्तर द्याहटवा
  2. निसर्गातील विविध शक्ती आहेत. त्यांची सविस्तर माहिती आपण या लेखांद्वारे दिलीत त्याबद्दल धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...