मंगळवार, ३ डिसेंबर, २०२४

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका निकाल - अनाकलनीय की आकलनीय ? (भाग- ६)

आपल्या देशाच्या लोकशाहीला खरा धोका घराणेशाहीच्या पक्षांचा आहे. जागतिक लिबरल लाॅबीला आपल्या देशातले फक्त मोदी सरकार उलथावयाचे नसून  केंद्रस्थानी काँग्रेस म्हणजे गांधी घराण्याची सत्ता व सर्व राज्यांत प्रान्तिय पक्षाचे सुभेदार अशी मध्ययुगीन सरंजमशाही, म्हणजेच चीनी साम्राज्याची वसाहत भारतात स्थापन करावयाची आहे. अशा सरंजमशाही- घराणेशाही च्या विरोधात मतदारात जागृती होत आहे. याची चुणूक उत्तर कोकणातील वसई, नालासोपारा व पालघर मतदार संघात पाहायला मिळाली आहे. मला विशेष आनंद झाला. कारण वरील तिन्ही मतदार संघातील भाजपाचा विजय हा आमच्या तालूक्यातला म्हणजे वसई चा. आमच्या गावाचा म्हणजे नालासोपाराचा विजय आणि तिसरा पालघर मतदार संघाचा म्हणजे आमच्या जिल्ह्याचा. 

या तिन्ही मतदारसंघातील विजय अपूर्व आहे. हा विभाग माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या परिवाराचा बालकिल्ला. यंदा प्रथमच ठाकूर परिवाराचा पराभव झाल्यामूळे महाराष्ट्रात या विभागातील भाजपाचा विजय अनेक राजकीय अभ्यासकांचा चर्चेचा विषय झाला आहे.

नालासोपारा मतदारसंघातून निवडणून आलेले भाजपा उमेदवार आमच्या गावातले. आमच्या नाळा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत पढई नावाची छोटी वाडी आहे. जागृत दत्तमंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मी प्राथमिक शाळेत असताना सन १९५८ ला तत्कालीन युवक कै भालचंद्र आप्पा म्हात्रे, कै वासुदेवदादा म्हात्रे, श्री बाळकृष्ण अण्णा नाईक  या त्रिमूतींने कै दामुआप्पा म्हात्रे, कै बबनतात्या म्हात्रे  श्री गजानन वामन म्हात्रे  इत्यादींच्या  सहकार्यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा सुरू केली. संघस्थान अर्थातच आमच्या गावातल्या पुर्वाश्रमींनी सन १९४९ ला बांधलेले प्रसिद्ध श्री दत्तमंदिर हेच आहे. तमाम गावकरी सध्या श्री दत्त जन्मोत्सव व  दत्तमंदिराच्या अमृत महोत्सवाच्या सोहळ्याच्या तयारीत आहेत. या आनंदाच्या सोहळ्यात राजन नाईक यांचा तसेच वसई व पालघर विधानसभा मतदारसंघातला भाजपाचा विजयाने आमचा आनंद द्विगुणीत केला आहे. 

राजन नाईक हे आमच्या गावातले. ज्यांनी शाखा सुरू केली अशा पाच-सहा युवकांपैकी श्री बाळकृष्ण नाईक हे राजन नाईक यांचे पिताश्री. राजन नाईक हे ही बालपणापासून संघ स्वयंसेवक आहेत. व्यवसाय निमित्ताने त्यांचा नालासोपारा येथील जनतेशी संपर्क झाला. ते यशस्वी व्यवसायिक व दिलदार समाजसेवक आहेत. त्यांचा नालासोपारात व्यवसाय असला तरी रात्री ते झोपायला पढई गावातल्या घरी येतात. 

सन १९६४ साली पंचक्रोशीतल्या समाजबांधवानी आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांची शोकसभा घेऊन पहिल्या पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहिली ती पढई वाडीतच. सन १९७७ च्या आणिबाणीच्या निषेधार्थ झालेल्या सत्याग्रहाचे नियोजन केंद्र आमचे गाव होते. श्री दत्तात्रेय म्हात्रे, श्री सदानंद म्हात्रे व अनंत म्हात्रे, या तिघानी सत्याग्रहात भाग घेतला होता. आजही ही पढई नावाची ही वाडी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मुंबई चे अधिवेशन, पंचक्रोशीतले रेल्वे कर्माचार्यांचे संपकाळातले केंद्र स्थान, वसई तालुका स्तरावरील जनता पार्टीचे पहिल्या अधिवेशनाचे स्थळ, उत्तर मुबंईतले खासदार माजी रेल्वमंत्री व उत्तर प्रदेशचे राज्यपाल श्रीराम नाईक यांचे प्रचार-दरम्यान निवासाचे स्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बोरीवली भाग सन १९९९ च्या वार्षिक नियोजन बैठकीचे स्थान, तसेच विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजनाचे यजमान म्हणून पढई ओळख ठेवून आहे.  

राजकारणातल्या घराणेशाहीवर मी लेखाद्वारें टिका करीत असतो. घराणेशाही पक्षांच्या कार्यकर्त्यांना भाजपात काय होत आहे याकडेच अधिक लक्ष असते. ती एक खोड आहे. लोकसभेच्या निवडणूकात चांगले यश प्राप्त झाल्यामूळे बोरीवलीत काही ठिकाणी ' इथे माज उतरवला जातो ' असे बॅनर्स रस्त्यावर लावलेले दिसले होते. अशी कृत्यें करणे ही मविआच्या कार्यकर्त्यांची खोड झाली आहे. मविआंच्या कार्यकर्त्यांची  प्रत्यक्ष बूथ, वार्ड, व  वस्तीत जाऊन पक्ष बळकट करण्याची सवयच मोडली आहे. यांच्या पक्षात पक्षप्रमुख म्हणजे मालक व कार्यकर्ते म्हणजे मजूर. त्यामूळे वरून जे काही आदेश येतात ते निमूटपणे स्विकारतात. सोनिया गांधी व राहूल गांधीनी काँग्रेस पक्ष चीन देशाच्या गोठयात बांधून ठेवला आहे. उद्धव ठाकरेने बाळासाहेबांच्या शिवसेनेला मौल्लवींच्या चरणीं ठेवले आहे. शरद पवारांना आपल्या पक्षाचं काय करावयाचे आहे हेच कळेनासे झाले आहे. शेवटी शरद पवार आपल्या पक्षाला काँग्रेसच्या गोठ्यात ठेवतील असे दिसते.

या तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते व समर्थक भाजपाच्या अंतर्गत काय चालत आहे यावर पोटतिडकीने हुज्जत घालत असतात. अर्थात स्वतःचा मेंदू गहाण ठेवलेल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांशी  हूज्जत घालण्याने दोघांचा वेळ वाया जातो. उगीच वादविवाद करून ब्लडप्रेशर नावाच्या रोगाला का आमंत्रण द्यावे ? आमच्याकडे आदेश नसतो. असते ती फक्त आज्ञा.  संघाच्या दिक्षेतून मिळालेल्या प्रेरणेतून स्वयंसेवक  समाजोन्नतीच्या अनेक क्षेत्रात संस्था उभारतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फक्त स्वयंसेवकांवर संस्कार करतो. स्वयंसेवकांचे कार्य हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख आहे. 

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका निमीत्ताने निवडणूक आयोग मतदारांसाठी अनेक सुविधा पुरवित आहे. हे प्रत्यक्ष पाहायला मिळाले. शंभर टक्के मतदानासाठी निव्वळ जाहिरात करून थांबत नाही. ज्यांना प्रकृती अस्वास्थ्याने मतदार केंद्रावर जाऊन मतदान करता येत नाही, त्यांच्यासाठी त्यांच्या घरी जाऊन गुप्तपणे मतदान करण्याची व्यवस्था निवडणूक आयोगाने केली आहे. टपाला मत पद्धतीत सुधारणामुळे मतदानाचा टक्का वाढत आहे. प्रत्येक पंचक्रोशीत मतदान केंद्राची संख्या, कर्मचारी, पोलीस दल, अधिकार्यांची संख्या वाढवित आहे. 

मतदान केंद्रावर जेष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोयी पुरवित आहे. त्यामुळे मतदान करण्यात अडचण येत नाही. उन्हाच्या तडाख्यात उभे राहावे लागू नये म्हणून मतदान केंद्र वाढवून केंद्रावर मंडप ही घातलेले दिसत आहेत. मतदान केंद्रांना शुभकार्याच्या मंडपाचे स्वरूप आलेले पाहावयास मिळत आहे. पाणी, व्हिलचेअरच्या खुर्च्या इत्यादी सुविधामूळे मतदान केंद्राना आधूनिकतेचं स्वरूप आले आहे. या सर्व गोष्टी प्रत्यक्ष पाहावयास मिळाल्या. प्रत्येक केंद्रावर झेपेल इतकेच मतदान संख्या ठेवली. त्यामूळे मतदान सुरळीत व जलद गतीने होत असल्याचा अनुभव मिळाला. पण--

पण मतदान जलद गतीने होत असल्यामूळे मतदान केंद्रावर गर्दी दिसत नव्हती. त्यामूळे राजकीय पक्षांच्या निरीक्षकांना ही मतदान कमी होत आहे असे वाटत होते. शेवटी मतदान केंद्रातील टक्केवारी पोलिंग एजंट कडून कळली तेव्हा राजकीय पक्षांच्या विशेषतः महायुतीच्या कार्यकर्त्याना हायसे वाटले. निवडणूक आयोगावर टिका करणार्यांनी प्रथम निवडणूक आयोग पुरवित असलेल्या सोयी पाहाव्यात. उगीच मोर्चा, घेराव करण्याच्या भानगडीत विरोधी पक्षांची स्थिती आणखिन खालावत जाईल असे मला वाटते. राहीला प्रश्न विरोधी पक्ष कमकुवत होत गेले तर देशाची लोकशाही संपुष्टात येईल अशी जी  भिती दाखवून विरोधी पक्ष व त्यांचे समर्थक मिडीया हाऊसेस मतें मागत आहेत, त्यावरील चर्चा निरर्थक आहे. कारण विरोधी पक्षांकडे भाजपा सरकारावर टिका करण्याचा राजकीय मुद्दाच राहीला नाही हे मतदारांना ठाऊक झाले आहे. या शिवाय या तथाकथित सेक्युलर व घराणेशाही पक्षांची दुकाने बंद झाली तरी अनेक आक्रमणें होऊन जी सनातन संस्कृती आज ही सुस्थितीत आहे, तीला जराही धक्का लागणार नाही. उलट आपला देश अधिकाधिक प्रगत व  सशक्त होत जाणार आहे अशी खात्री बहुतांश मतदारांना वाटत आहे.



महाराष्ट्र विधानसभा निवडणुका निकाल - अनाकलनीय की आकलनीय ? (भाग --५)

 इंडी आघाडी व मविआ चे राजकारण इतक्या सूड भावनेने प्रेरीत आहे की ही सूडभावना त्यांच्या कार्यकर्त्यात सुद्धा शिरली आहे. याचा अनुभव मला आला आहे. मी आनंदराव पवार सरस्वती विद्यालयाची (वझिरा बोरीवली(प)  सचीव पदाची जबाबदारी सांभाळतो आहे. या खेपेस प्रथमच आनंदराव पवार शाळा हे मतदान केंद्र झाले होते. त्यामुळे  आपल्या केंद्रात शंभर टक्के मतदान व्हावे ही इच्छा प्रबळ झाली. तसे पाहता मतदाता जागृती अभियानात मी पहिल्यादांचा भाग घेतो असे नाही. वझिरात जनजागरणाच्या कार्यक्रमात भाग घेण्याची ही चौथी खेप आहे.   या अभियानात माझ्या सोबत आणखिन तिघेजण होते. त्यापैकी एक कार्यकर्ता ज्या सहकारी सोसायटीत राहतो तिथे आम्ही दोघांनीच अभियानाची जबाबदारी स्विकारली. बाकी दोघांना दुसर्या सोसायटीत जावयास सांगितले.


आम्ही दोघजण सोसायटीच्या तळमजल्याच्या पॅसेज मध्ये होतो तेव्हा त्या सोसायटीचा एक सदस्य भेटला. त्या सदस्याशी सोबतच्या कार्यकर्त्याने माझी ओळख करून दिली. मतदाता जागृती अभियाना साठी आनंदराव पवार शाळेचा सेक्रेटरी म्हणून मी आलो आहे अशी ओळख झाली. त्यावरून मी संघाचा स्वयंसेवक आहे हे त्या गृहस्थाच्या लक्षात आले. त्यांनी मला विचारले, 'काय हो तुम्ही बोरीवली मतदार संघात बाहेरील उमेदवार का 
आणला ?'  मी उत्तर दिले  'मला याबाबतचे फारसे काही माहिती नाही.' त्या गृहस्थाने म्हटले, बोरीवलीतल्या कार्यकर्त्यावर नेहमी बाहेरचा उमेदवार लादला जातो हे चूकीचे आहे ना? असा प्रश्न विचारला. मी उत्तर दिले, ' तुमचं म्हणणं बरोबर आहे . पण राजकारण आपल्या हातात नसते.' त्यावर ते गृहस्थ म्हणाले  'सर्व बाबीत केंद्रातून आदेश येतो तो तुम्ही का स्विकारता?  मी उत्तर दिले  ' आपण बरे आपले काम बरे ! वादविवाद करण्यासाठी आम्ही आलेलो नाही '  असे म्हणून मी शेवटी त्यांना सौम्य भाषेत म्हटले, " मला एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे. तो प्रश्न असा आहे, उद्धव ठाकरे म्हणतात की बंद खोलीत अमित शहा यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यावयाचे कबूल केले होते. ते दिले नाही म्हणून आम्ही भाजपाला धडा दिला. पुरावा देण्याची जबाबदारी तक्रार करण्यार्ची असते. पुरावा नसताना काही तरी आरोप करणे हेच मूळी संघर्षाचे कारण असते. अमित शहा किमान मातोश्री वर आले होते. आघाडीच्या बैठकांसाठी जनाब ठाकरे स्वतः कसे गेले दिल्लीला? " यावर ते गृहस्थ हसले आणि म्हणाले मी श्रीराम जन्मभूमी श्रीराम मंदिर च्या निधी संकलनात भाग घेऊन सोसायटीतून पन्नास हजाराहून अधिक निधी गोळा करून दिला आहे. ते गृहस्थ माझ्या पेक्षा धाकटे असल्याने मी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. नंतर ते बाहेर गेले. 

आम्ही दोघे लिफ्टमधून शेवटच्या मजल्यावर गेलो. त्या सोसायटीतले अभियान संपवून नंतर आम्ही दुसरी कडे गेलो. ते गृहस्थ मविआ च्या घटक पक्षाचे कार्यकर्ते आहेत की नाही  आम्ही विचारपूस केली नाही. पण सोशल मिडीया असो वा सामाजिक समारंभात, अथवा बस व रेल्वे स्थानक, बागबगीचा, बाजार इत्यादी स्थानी राजकारणावर नको तितकी चर्चा होते आणि त्यातून वादविवाद विकोपाला जातात हे अलिकडे नित्याचे झाले आहे. यावर मी एका लेखात माझे मत सविस्तर मांडले आहे.

वरील अनुभव मी येथे शेअर केला याचे कारण मविआच्या घटक पक्षातल्या कार्यकर्त्यांना जागोजागी हुज्जत घालण्याची सवय जडली आहे. अशा हुल्लडबाजीचे जनकत्व राष्ट्रीय स्तरावर सोनिया गांधी व ममता बॅनर्जी व महाराष्ट्रातील मविआ त्यात ही विशेषतः उद्धव ठाकरे व जितेंद्र आव्हाड. थोडक्यात घराणेशाही पक्षच राजकारणाचा पोत खाली आणण्यास जबाबदार आहेत.  ' यथा राजा तथा प्रजा ' हा नियम घराणेशाही पक्षात आज ही अस्तित्वात आहे. आपल्या येथील घराणेशाही पक्षांतील युवराजांचे वर्तन राजेशाही व हुकूमशाही सारखे असते. मग त्या पक्षांचे कार्यकर्ते उर्मठच बनणार ना ! चीनशी काँग्रेस पक्षाने करार केला आहे खरा पण त्या चीन मध्ये लोकशाही नाहीच. मग घराणेशाही तरी कशी येणार चीन मध्ये ? विद्यमान राष्ट्राध्यक्षांच्या कुटुंबातील सदस्य राष्ट्राध्यक्ष होणारा नसतो. कारण साम्यवादी पक्षाच्या राजवटीत हूकुमशाही असते व तीच पक्षाचं सर्वोच्च कार्यकारिणी असते.

आपल्या येथील घराणेशाही पक्षांना मग ते उत्तरेतील असो वा दक्षिणेतील, पश्चीमेकडील असो वा पुर्वेकडील, त्यांच्या वारसांचा जम बसावा म्हणूनच संसदीय लोकशाही प्रणाली हवी असते. कारण त्यातूनच पक्षाचा ताबा मिळतो. एकदा की पक्षाचा ताबा मिळविला की संसद, विधानसभा आपोआप ताब्यात येतात. कारण बापजाद्यांनी लुटलेली प्रचंड माया असते ती वारस हक्काने मिळतेच ना ! ती माया एकप्रकारे आपल्या घराण्यातील पुढच्या पिढींना राजकीय क्षेत्रात करिअर साठी केलेली सुलभ सोय होय.  शेवटी राजकारण सुद्धा  जिथे ' दाम करी काम ! ' असेच एक क्षेत्र आहे.
                         
क्रमशः

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका निकाल - अनाकलनीय की आकलनीय ? (भाग --४)

गेल्या ५ वर्षात महाराष्ट्रातील राजकारणावर मी ३८ लेख पब्लीश केले आहेत. या शिवाय 'केंद्र-राज्य संघर्ष - महाराष्ट्र ते दिल्ली व्हाया बंगाल' ' या लेखमालेतही महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा मांडली आहे. ' शिवसेनेतील फूट की काळाने शिवसेनेवर उगारलेला सूड ?' 'उद्धव ठाकरे खलनायक ठरत आहेत का?' ' शिवसेनाने गमाविलेल्या संधी, ' ' शरद पवार ना चाणक्य ना वारकरी फक्त संधीसाधू राजकारणी, 'राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट आणि घराणेशाही पक्षांची पडझड , सरकारचे डोके ठिकाणावर आहे का , इत्यादी शिर्षकाचे लेख त्या ३८ लेखात आहेत. तसेच ' राजकीय पक्षांच्या दिशा व दशा ' या शिर्षकाची राष्ट्रीय तसेच प्रान्तीय पक्षांची वर्तमान व भविष्याची स्थिती ती राज्यनिहाय एक  लेखमाला ही पब्लीश केली आहे. त्यामूळे मागील दोन तीन महिन्यात राजकारणावर अधिक काही लिहावे असे मला वाटले नाही. म्हणून मी  राजकीय लेख लिहणे थांबविले होते. 

मविआचा धुव्वा का उडाला याची  छोटी-मोठी अनेक कारणें आहेत ती माझ्या कुवतीनुसार आपल्या समोर ठेवावीत म्हणून मी लेखमालिका लिहावयास घेतली. त्यातील काही कारणें अशी आहेत की ते पुढील    २० ते २५ वर्षे मविआ व इतर विरोधी पक्षांचा पिच्छा सोडणार नाहीत. ती महत्वाची अशी आहेत-

१) माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे नेते पी चिंदबरम यानी भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीवर खोट-नाटं व सर्वात गंभीर असे भगवा दशहतवादाचे नॅरेटिव्ह तयार करून युपीए सरकारच्या काळात सनातन साधु-संताचा केलेला छळ मतदार विसरले नाहीत. 

२)युपीएच्या राजवटीत (सन २००४ ते २०१३ मध्ये) न भूतो न भविष्य असा झालेला प्रचंड भ्रष्टाचार मतदारांच्या स्मरणात आज ही आहे. 

३) उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते वेळी पोलीस यंत्रणेचा उपयोग पत्रकार- संपादकांना फरफटत कस्टडीत ठेवणे, रहस्यमय हत्या घडविणे व अशा हत्या नैसर्गिक मृत्यु दाखविण्याचा सपाटा, भ्रष्टाचार,  सर्वत्र १४४ कलम लावले असताना कोरोना च्या साथीत पालघरला जमावाने केलेल्या दोन साधुंच्या निर्घूण हत्या 

४)कोरोनो काळात औषधोपचार मध्ये झालेला भ्रष्टाचार तसेच छोटे-मोठ्या घटनांवर पडदा घालणे इत्यादी  पापकृत्यांनी भरलेला उद्धव ठाकरे सरकारचा कारभार हे एक गंभीर कारण लोकांच्या स्मरणात होते. 

५) सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींवर भर सभेत  'मोतका सौदागर' असे म्हणत  देशातील राजकारणाला दिलेले सुडाचे स्वरूप.  

६) सोनिया गांधीचे युवराज राहूल गांधी, केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादींवर  जाहीर सभेत फार जहरी भाषेत टिका करीत असतात. राहूल गांधी फक्त आपल्या देशात नव्हे तर इतर देशात जातात तेव्हा ही आपल्या देशाच्या प्रत्येक व्यवस्थेवर निरंतर टिका करीत असतात. हा शहाणपणा नाही आणि बालीशपणा ही नाही. त्यांचे मानसिक संतुलन वेळोवेळी ढासळते की काय अशी शंका येते. 

सूड भावना ही एक प्रकारे अजगरासारखा विळखा घालून आपल्याला कमकुवत करत असते याचे भान राजकीय नेत्यांनी विशेषतः राहूल गांधी, उद्धव ठाकरे, नाना पाटोळे, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, स्टॅलीन, अरविंद केजरीवाल, आणि डाव्या पक्षांचे नेते व कार्यकर्ते (जे नक्षलवाद्यांना पाठींबा देतात)  ठेवावयास हवे.अन्यथा राजकीय नेत्यांची आचार विचार आणि निर्णय घेण्याच्या ज्या शक्ती देहात विराजमान आहेत त्या सैरभैर होण्याची शक्यता असते. अशा स्थितीतून अराचजकतेचा जन्म होतो. असे जागतिक इतिहास सांगतो. काही इतिहास तज्ञ, राजकीय व सामाजिक अभ्यासक व चिंतनकार आपल्याला इशारावजा सल्ला देत असतात,  ते चूकीचे नाही.

आपला महाराष्ट्र  'पुरोगामी विचाराचा, सर्वधर्मसमभाव बाळगणारा, शाहू फूले, आणि आंबेडकरांचा ' असा सततचा घोष करणारी मंडळीच महाराष्ट्रात जातीवादाचे  व मुस्लीमाचे तुष्टीकरण करण्यात गुंतले आहेत. सापाला दुध दिले तरी तो विषच ओकतो. असा अनुभव देशाच्या फाळणीतून आपण घेतला आहे. सर्वसमावेशकता अंगी बाळगणे निश्चीतच चांगली गोष्ट आहे पण अल्पसंख्याकांचे लाड करून त्यांना डोक्यावर बसविण्याची हाव जी विरोधी पक्षांना लागली आहे, ती देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करेल असे बहुसंख्यांक हिंदु समाजाला आता वाटू लागले आहे. हेच कारण आहे ज्यामूळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकाचा निकाल अनाकलनीय आला असावा असे मला वाटते. असेच मत मी, ' त्रिपूरा येथे अफवा आणि धुडघूस महाराष्ट्रात कसा ? ' या शिर्षकाचे २१ नोव्हेंबर २०२१ला पब्लीश केलेल्या दोन लेखात वाचावयास मिळेल. 

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी  महाराष्ट्रातील राजकारण खालच्या पातळीवर आणून ठेवले आहे. अखिल भारतीय स्तरावर सोनिया गांधी व राहूल गांधी या जोडीने काँग्रेसची स्थिती खिळखीळी करून ठेवली आहे. महाराष्ट्रात सन २०१४ ला केंद्रात भाजपा प्रणित एनडीए सरकार अस्तित्वात आल्यापासून विरोधी पक्ष सैरभैर झालेले दिसतात. त्यामूळे ॲक्सीस इंडीया या संस्थेने महायुतीला महाराष्ट्रात १७५ पर्यंत जागा मिळतील असे जे भाष्य केले होते त्यावर लिबरल मंडळीनी दुर्लक्ष केलेले दिसले. ॲक्सीस इंडीया संस्थेने एकूण ७५ ओपिनीयन पोल केले आहेत. त्यापैकी ७० पोल खरे ठरले आहेत. याकडे दुर्लक्ष करून मविआ आता आंदोलनजिवीच्या मार्गावरून जाऊ इच्छीते. काय म्हणावे ? कुत्र्याचं शेपुट नळीत घातले तरी शेवटी वाकडेच राहते. 

महाराष्ट्रत प्रथमच एकतर्फी मतदान झालेले दिसले अशी सबब मांडून विरोधी पक्ष चुनाव आयोगाच्या विरोधात मोर्चा, धरणे इत्यादी नाटकं करण्याचे सत्र सुरू केले, तरीही हाती काही यश येणार नाही. उलट न्यायालय मविआवर ताशोरे ओढतील. सामान्य मतदारांना ही ठाऊक झाले आहे की विरोधी पक्षांचे मोर्चे विदेशी शक्तीच्या साह्याने देशात अस्थिरता निर्माण व्हावी हाच हेतू असतो. मराठा आरक्षण, संविधान बचाव, किसान आंदोलन, वल्फ बोर्ड च्या मोहीम, गणेश व नवरात्र या दोन महोत्सवात मुस्लीम समाजाची दादागिरीने अडथळे आणणे, लव जिहाद, आतंकवादी घटना यांच्या पाठीमागे देशविदेशी लिबरल लाॅबीच आहे.

मुस्लीम समाजाचे तुष्टीकरण कागोदपत्री स्वरूपात मौल्लवी कडे सुपूर्त करण्यापर्यंत मविआ ची मजल पोहचली. मग 'सजग रहो', सौ टक्का मतदान करो, बटोंगे तो कटोंगे, एक है तो सेफ है इत्यादी प्रतिक्रीया येणे हे स्वाभाविक आहे. सन १९८८-८९ च्या दरम्यान काँग्रेसचे वरीष्ठ व विद्वान नेते बॅ गाडगिळांनी काँग्रेसला हिंदू हिताकडे दुर्लक्ष करणे महाग पडेल असा इशारा दिला होता. पण काँग्रेसने दुर्लक्ष केले. काल-परवा माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सुद्धा भगवा दशहतवादाचे खोटे नॅरेटिव्ह काँग्रेसने करावयास नको होते असे स्पष्टपणे म्हटले आहे.

क्रमशः-

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका निकाल - अनाकलनीय की आकलनीय ? (भाग -- ३)

संघ, भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी व निवडणूक आयोगावर दोष ठेवून काय साध्य होणार आहे ? सन २०१४ पासून लिबरल पत्रकार व राजकीय अभ्यासक सतत विदेशी धनशक्तीच्या साह्याने नेगेटिव्ह नॅरेशनाच्या आधारे विरोधी पक्षांना आधार देत आहेत.  असा आधार म्हणजे वजन वाढविण्यासाठी एखाद्या पेंशटला औषधें दिल्यासारखे आहे. त्यातून वजन वाढते पण त्यातून तो पेंशट  बलवान व शक्तीवान होतोच असे नाही ? पण मविआच्या नेतेमंडळींनी तो पेंशट वृद्ध होत नाही असा समज करून घेतला. ही एक प्रकारे राजकीय क्षेत्रातली अंधश्रद्धा ठरली. आश्चर्य असे की तथाकथित पुरोगामी, उदारमतवादी व अंधश्रद्धा निर्मुलनाचे शिल्पकारांची ही स्थिती  ! लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण !

गेल्या लोकसभेच्या निवडणूकाच्या प्रचारात ' संविधान बचाओ ' असे नेगेटिव्ह नॅरेशनचा वापर करून दलीत, पिडीत मतदारांत संभ्रम झाला पण तो तात्पुरता टिकला.भाजपाचे संसदेतील संख्याबळ कमी झाले पण तेच नॅरेटिव्ह राज्यातील विधानसभा निवडणूकात उपयोगी पडेल अशी भ्रामक समजूत मविआने करून घेतली. हे ही एक महत्वाचे कारण आहे की ज्यामूळे अनाकलनीय असा निकाल  लागला. महायुतीचा विजय व मविआचा पराभव होईल असे दिसत होतेच. मविआचा दारूण पराभव झाला एवढाच भाग काय तो आश्चर्यचा, नवलाचा व अनाकलनीय स्वरूपाचा आहे. 

या व्यतीरिक्त इथे आणखिन एक मुद्दा मी मांडतो आहे जो हरियाणात आणि महाराष्ट्रात काँग्रेस प्रणित आघाडी ला महाग पडला. राहूल गांधीनी लोकसभेच्या निवडणूक प्रचारात  संविधान नष्ट होईल म्हणून भाजपाला मत देऊ नका असे जे विधान केले होते , त्यात काही दम नव्हता. ते एक खोटं नॅरेटिव्ह होते हे लोकांना कळून आले. संसंदेच्या अधिवेशनात भाजपाचे तडफदार युवक खासदार अनुराग ठाकूर यांनी राहूल गांधीकडे नजर ठेवून ' भारतिय संविधान के कितने पृष्ठ है यह तो आप प्रथम बताये ?' असा प्रश्न भरगच्च खासदारांच्या उपस्थित संसंदेत विचारला तेव्हा राहूल गांधीना नानी आठवली असेल इतकी फजिती झालेली लोकांनी टिव्ही वरून पाहिलेली होती. म्हणे हे भारताचे भावी पंतप्रधान !

उबाठा च्या कार्यकर्त्यांना बोरीवली मतदार संघात भाजपाने बाहेरच्या उमेदवारांला का तिकीट दिले यावर हुज्जत घालावीसी वाटली पण  इटालीयन सोनीया गांधीना काँग्रेसचे अध्यक्षपद का दिले, राजकारणाची जरा ही जाण नसलेल्या राहूल गांधीना काँग्रेसचे सर्वसर्वा केल्याबद्दल जाब विचारतात का?  उबाठा सेनेचे प्रमूख उद्धव ठाकरे राहूल गांधी आणि सोनिया गांधीना वाकून नमस्कार करताना पाहतात तेव्हा ठाकरें चा राग का येत नाही ? स्व बाळासाहेब ठाकरे हिंदु हृदयसम्राट होते असे राहूल गांधी मानावयास तयार आहेत का असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदीनी जेव्हा जाहिरसभेत समोर ठेवला, त्यावर राहूल गांधीनी का उत्तर दिलेलं नाही. ते बाजूला ठेवू. पण उद्धव ठाकरेंचे भक्त काय करीत होते ? जे स्वतःला मर्द समजून घेत आहेत ते चूप का राहीले ? धिक्कार असो तुमच्या मर्दपणाचा व फुसक्या दादागिरीचा !

महाराष्ट्रातील मतदारांनी विधानसभा निवडणूका होण्याअगोदर संसंदेच्या अधिविशेनात भाजपाच्या अनुराग ठाकूर यांनी राहूल गांधीचा आवाज बंद केलेला पाहिला. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना खोलीतून बाहेर काढले होते, तेही विडीओतून पाहिले. आम्ही वाकणार नाही अशा फुसक्या गर्जना हवेतच विरल्या. अशा छोट्या छोट्या पण महत्वाच्या घटनातून ही मतदार कोणाला मत द्यावयाचे हे ठरवित असतो.

एकंदरीत जे अनाकालनीय घडले असे आपल्याला वाटते ते होणार होतेच. ते अटळ होते. ' करावे तसे भरावे ' हा निसर्गाचा नियम आहे. जेव्हा अनाकालनीयय घटना घडते व ती आपल्या विरोधात होते, तेव्हा त्यातील सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणे क्रमप्राप्त असते. पण मविआ चे नेते मंडळी एवीएम मशीनवर पर्यायाने केंद्र सरकार वर टिका करीत आहेत. म्हणे, भाजपा सरकार एवीएम मशीन मध्ये काहीतरी गडबड करून ठेवते आहे. हे विरोधी पक्षांचे रडगाणं न्यायालयाने या अगोदर फेटाळून लावलेले आहेच. अन्याय करणार्या, धातांत खोटे बोलण्यार्यांना सहानुभूती कधी मिळत नसते. उलट अशांचे पाय चिखलात आणखिन रूतत जातात व सर्वनाश होतो. मग ते क्षेत्र कुठलेही असो.

क्रमशः--

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांचा निकाल अनाकलनीय की आकलनीय ? (भाग--२)

आपल्या मतांचा एक टक्का घसरला तर तो वाढविण्यासाठी भाजपा जितकी मेहनत घेतो तितकी मेहनत इंडी आघाडीचे व मविआचे पक्ष घेत नाहीत. मला वाटतं विरोधी पक्षांचे नेते मंडळी विदेशातून मिळणार्या धनाच्या राशीवर व नेगेटिव्ह नॅरेशनवर अधिक विसंबून राहतात. विरोधी पक्ष जे वादे करतात, ज्या योजनेची कल्पना मांडून आश्वासन देतात, पण विजय झाला की ती आश्वासने पुरी करीत नाहीत. कर्नाटक व तेलंगणात सत्ता हाती मिळाल्यानंतर काँग्रेस कडून  जाहीरनाम्यातील एक ही योजना कार्यान्वित झालेली नाही. 

महाष्ट्रातील मविआचे नेते मंडळी निवडणूक निकाला संबंधीत निवडणूक आयोगा विरूध्द आंदोलन मोहीम सुरू करणार आहे, अशी बातमी कानीं आली आहे. त्यातून काय साध्य होणार आहे ? काही नाही. पण विदेशी शक्तीकडून धन मिळत असते त्यावर पाणी का म्हणून सोडावे असे हे एक व्यवहारी कारण मविआ पाशी आहे. दुसरे असे की मविआच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची  इतकी नामुष्की झाली आहे की त्यांना चेहरा लपवावासा वाटतो. त्यासाठी औषध हवे आहे. तेच ते निवडणूक आयोग वर मोर्चा आणि घेराव !  हे अपेक्षितच होते. मविआच्या दारूण पराभवा मुळे मविआ चे समर्थक असलेला मिडीया वर्ग तोंडघशी पडल्यामुळे निवडणूक निकाला संबंधीत चर्चा करताना तीच मंडळी  मविआ नेत्यांना धारेवर घेत असतांना दिसत आहे. 

एबीपीच्या खांडेकर उद्धव ठाकरेंना म्हणाले ''अहो, तुमचा पक्ष फोडला, बाप पळविला, तुमच्या पक्षाची निशाणी पळविली, आणि शिवसेनेतून फुटलेल्या आमदारांना  गद्दार- गद्दार असे किती दिवस हिणवित राहणार?, हा तुमचा पक्षांतर्गत मामला आहे. मतदारांसाठी हा मुद्दा जुना झाला आहे '' असे म्हणत आपली नाराजी स्पष्ट केली.  काल परवा कुमार केतकर यांनी मविआचे नेते मंडळी इविएम मॅनेजमेंटवर जे आरोप करतात तो ' एक रडीचा डाव आहे. ' असे स्पष्टपणे म्हणाले. काही हिंदी भाषिक अजय दुबे सारखी पुरोगामी  संपादक मंडळी सुद्धा मविआला विजयाची संधी असुनही पराभूत झाल्याबद्दल कडक शब्दात कानउघडणी केली आहे. त्यांनी सुद्धा एविएम मशीन मधील हेराफेरीचा आरोप  ' नाच ना आये अंगन तेडा ' या स्वरूपाचा आहे असे म्हटले आहे. एनडीटिव्हीचे संजय पुगालिया, ज्यांनी एके काळी काॅग्रेसच्या मिडीया सेल मध्ये काम केले आहे त्यांनी तर राहूल गांधी जोपर्यंत काॅग्रेसचे सर्वेसर्वा राहणार तोपर्यंत काॅग्रेस निवडणूका हरत राहणार. काॅग्रेसचे धोरण ॲन्टी डेवलपमेन्ट, ॲन्टी नेशन, ॲन्टी हिंदू, घराणेशाही व त्यातून चंचल वृत्तीने पक्ष चालविणे, प्रत्येक प्रदेश काॅग्रेस अतंर्गत असलेले तंट्यावर तोडगे न काढता मामला वार्यवर सोडून देण्याची श्रेष्ठींची सवय इत्यादी कारणांची यादी उदाहरणा सह मांडली आहे. जी काॅग्रेसची स्थिती तशीच मविआची, तशीच इंडी आघाडीची स्थिती आहे.

अशा हतबल स्थितीत असलेली मविआ व इंडीची नेते मंडळी  निवडणूक आयोगावर  पक्षपाताचा आरोप दाखवित मोर्चा व घेरावाचे कार्यक्रम करीत आहेत. या पाठीमागे उद्देश एकच आहे, तो म्हणजे  विदेशी मिडीया तून आपल्याला व आपल्या युवराजांना फूकट प्रसिद्धी मिळणार आहे, या शिवाय धन ही मिळणार मग त्यावर पाणी का सोडावे हा विचार ? विचार नव्हे  हा विकार आहे. कारण पैशाची हाव ! मोर्चा, धरणे, व घेराव इत्यादी कार्यक्रमासाठी साठी मविआचे नेते मंडळी, कार्यकर्त्यांनांच राबवतील आणि त्यांचे वारसदार मात्र या कालावधीत फाईव्ह स्टार हाॅटेल मध्ये वास्तव्य करतील. त्यांना कुठे घाम गाळावा लागणार आहे ?

 मोर्चा, धरणे, उपवास इत्यादी शस्त्रे मविआने उगारली तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण मविआचे सरकारच मूळी भाजपाच्या (अर्थात फडणवीसच्या) पाठीत खंजीर खुपसून अस्तित्वात आलेले होते. शरद पवार जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आरूढ झाले ते स्वपक्षातील बड्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसून झाले. तसेच आपल्या  स्वपक्षातील नेते मंडळींना दिलेल्या जबाबदारीची व मंत्रीपदाची रचना सतत बदलत ठेवून (म्हणजे लहरी तैमूर लंग स्टाईलने) त्यांनी स्वतः लोकशाही बुरखा पांघरत 'हम करेसो कायदा'  हीच पक्ष चालविण्याची रीत ठेवली.

सन २०१९ साली पाठीत खंजिर खुपसून राजकारण करणार्या यादीत उद्धव ठाकरे यांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात कोरले गेले आहे. आपल्या देशाच्या इतिहासात स्वजनांच्या पाठीत खंजीर खुपसून राजाच्या गादीवर बसण्याचे पेटेंट जुलमी, खुनशी वृत्तीचा मोगल राजा, ज्याने सत्तेसाठी आपल्या बांधवांची ही मुंडके उडीवली होती, त्या औरंगजेब कडे जाते. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकात औरंगजेबची औलाद  कोण आहेत हा एक मुद्दा अदृष्य स्वरूपात होता. महाराष्ट्रातील मतदारांनी कुठल्याही प्रकाराचा उताविळपणा न करता शांतपणे व दृढ निश्चयाने मविआ मधील औरंगजेबच्या औलादांना घरचा रस्ता दाखविला आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार,  संजय राऊत, राहूल गांधी आणि नाना पाटोळे यांना निवडणूकाच्या निकालाने त्यांची जागा दाखवून दिली. याची आणखिन काही कारणें खालील प्रमाणे आहेत --

१)आम्ही मतदाता जागृती अभियान  चे कार्य करताना घरोघर शंभर टक्के मतदान करा अशी आम्ही विनंती करीत होतो, त्या त्या वेळी प्रत्येक सोसायटीतल्या प्रत्येक फ्लॅट मधून  १०० टक्के  मतदान करणारच आहोत असे ठाम आश्वासन आम्हाला मतदारां तर्फे मिळत होते. 

२)भाजपाचे महाराष्ट्रातले चाणक्य देवेंद्र फडणवीस यांनी, ' हो, हे धर्मयुद्ध आहे ! ' असे ठणठणीत आवाजात जाहीर सभेतून उद्गार काढले  तेव्हाच ते वाक्य मतदारपर्यंत पोहचले असल्याची जाणीव आम्हांला प्रत्येक फ्लॅटमधील रहिवाशांच्या चेहर्यावरून स्पष्ट दिसत होती. याचा अर्थ विरोधी पक्षांची नियत अधर्माकडे वळाली आहे हे मतदारांना कळले आहे. त्यामुळेच मतदानाची टक्केवारी वाढली आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतें पडली. निवडणूकाचा निकाल आला तो मविआचा संपुर्ण निकाल लावून. 

३) विधानसभेच्या सन २०१९ च्या निवडणूकाचा जनादेश भाजपा व अखंड शिवसेनेच्या निवडणूक पुर्व युतीला होता. तसेच ५ वर्षे पुर्ण केलेल्या युती (फडणवीस) सरकारच्या कामगिरीचा  होता. शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरें यांना अवदासा आठवली आणि त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन मविआ आघाडी सरकारचे मुख्यमंत्री पद बळकाविले. वस्तुस्थिती अशी होती की उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनी सन २०१९ च्या मतदानाच्या अगोदरच काँग्रेस व भाजपा ला मिळणार्या मतात घट कशी होईल यावर युक्ती आखलेली होती. ती त्यांनी पार पाडली. मुख्यमंत्री पद मिळविण्यासाठी उद्धव ठाकरें यांनी आघाडी धर्म पाळला नाही. म्हणूनच सन २०१९ पासूनच महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळे वळण लागले. अडीच वर्षात सरकार पडल्यानंतर पुढील अडीच वर्षात  मविआने आपला सर्व वेळ महायुतीच्या नेत्यांवर टिका करण्यात खर्ची केला. महायुतीने सत्तेवर आल्यानंतर विकासाच्या प्रकल्पांना गती देण्यास सुरूवात केली.  

दुसर्या बाजूला मविआने जगभरच्या लिबरल लाॅबीने तयार केलेले नेगेटिव्ह नॅरेशन्स जादुच्या कांड्या समजत अत्यंत तिखट शब्दात मांडावयास सुरूवात केली. थोडा फार फायदा लोकसभेच्या निवडणूकात झाला. त्यातून हिंदु समाजात फूट पाडण्याच्या योजनेतून विधानसभेत इतका प्रचंड विजय मिळेल की केंद्र सरकार हादरलं जाईल अशी मविआच्या नेत्यांना आशा वाटू लागली. त्यामूळे मविआ नेते वाजवी पेक्षा अधिक शेफारले. परीणाम असा झाला की मविआच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी उघडपणे स्पर्धा सुरू झाली. त्यातून हिंदू समाज दुखावत गेला यावर मविआच्या नेत्यांचे दुर्लक्ष झाले. इथेच मविआच्या पराभवाची बी नियतीने धर्म रक्षणासाठी रोवली असावी.

४)उद्धव ठाकरे हे गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणातले खलनायक ठरले. उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. ते भाजपा, मोदी अमित शहा, फडणवीस यांचा पराकोटीचा द्वेष करतात. एका जाहीर सभेतील उद्धव ठाकरे यांचे देवेंद्र फडणवीसला उद्देशून केलेले वक्तव्य असे आहे ' एक तर मी राहीन नाही तर तू ' ! या संबंधीत एका पत्रकाराने देवेंद्र फडणवीस यांना  ' तुम्ही यावर काय प्रतिक्रीया द्याल ? ' असा प्रश्न विचारला, तेव्हा फडणविसांनी शांतपणे पण स्पष्ट उत्तर दिले, ' यावर कसली प्रतिक्रीया मागता हो ?' 

                                   क्रमाश:--

शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०२४

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका निकाल - अनाकलनीय की आकलनीय ? (भाग --१)



महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकाचा निकाल लागला. महायुतीचा प्रचंड विजय झाला. असा एकतर्फी निकाल महाराष्ट्रात आजपावेतो आला नव्हता  हे सत्य आहे ; अनेक संस्थाचे ओपिनियन पोल चूकले हे ही सत्य आहे ; राजकीय अभ्यासकांचे भाष्य खोटी ठरली हे ही सत्य आहे. 

या वर्षीच झालेल्या लोकसभेच्या निवडणूकात महाराष्ट्र राज्यातून मविआने महायुतीपेक्षा अधिक जागा पटकाविल्या हे ही सत्य. तेव्हा मविआच्या नेते मंडळीपासून ते गल्लीतल्या कार्यकर्त्यानी  महायुती च्या नेत्यापासून ते महायुतीच्या कार्यकर्त्याची भरपेट टर उडविली.  महायुतीला अपेक्षापेक्षा कमी जागा मिळाल्या.पण महायुतीने जो निकाल लागला तो खिलाडू वृत्तीने स्विकारला आणि आपण कुठे कमी पडलो यावर चिंतन करून पुढे येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणूकात चांगले यश मिळविण्याच्या कामाला लागली. पण मविआ यशाच्या नशेत डुबली. 

विधानसभेच्या निवडणूकांची घोषणा झाली ; एकामागून एक दिवस सरत चालला. उमेदवारांची यादी, फार्म भरण्याचे दिवस जवळ येऊ लागले. पण मविआच्या घटक पक्षात जागा वाटप आणि मुख्यमंत्रीपदावर दावा या संबंधीत शाब्दिक युद्ध सुरू झाले. तर महायुतीचे घटक पक्ष मतदारां समोर समन्वयाचं विलोभनिय दर्शन पेश करीत होते. 

निवडणूका झाल्या. महायुतीने मविआचा दारूण पराभव केला. दारूण पराभवाने गलीतगात्र झालेले मविआच्या घटक पक्षांचे नेते मंडळी, त्यांचे समर्थक मिडीया व राजकीय अभ्यासक 'महायुतीचा विजय ' ही  एविएम मशीनची करामत आहे असे म्हणत हा निकालच धुडकावित आहेत. 

जी गोष्ट प्रथमच घडते म्हणून ती खोटी आहे, त्यात दगाबाजी आहे, असे आरोप करणे म्हणजे आपली बुद्धी गहाण ठेवण्यासारखी आहे. दुसरे असे की महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणूकात एखाद्या  आघाडीचा दारूण पराभव होऊ नये असे देशाच्या संविधानात कलम ठेवले आहे का व त्यासाठी महाराष्ट्र राज्याला स्पेशल दर्जा मिळालेला आहे का? तसे काही ही नाही. महाराष्ट्रात भाजपाची ताकद कमी होती, पण ती भूतकाळाची गोष्ट आहे.  जगातला सर्वात अधिक सदस्य संख्या असलेला पक्ष भाजप आहे. माझे तर स्पष्ट मत असे आहे की विधानसभा निवडणूकातला महायुतीचा विजय हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार व राहूल गांधी यांच्यावर काळाने उगारलेला सूड आहे. काळाने उगारलेला सूड हा अनाकलनीयच असतो.

ब्रम्हांडात अनेक चमत्कारीक घटना दर दिवशी घडत असतात. त्यावर आधुनिक विज्ञानाच्या अत्याधूनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने संशोधन करून ही अशा चमत्कारी घटनांचे कारण लागलीच सापडत नसते. त्यावर वर्षानुवर्ष  संशोधन झाल्यावर चार ते पाच टक्के उत्तर हाती लागते. 

सारे पोल खोटे ठरले आहेत ही सबब निवडणूकीच्या निकालासंबंधीत संशय व्यक्त करून ना न्यायालयात केस उभी राहील, ना जनतेच्या दरबारात केस उभी राहील. कारण निवडणूक आयोग मविआची यासंबंधीतली तक्रार तडकाफडकी फेटाळून लावणार ! तसे पाहता मविआ व इंडी आघाडीची माता सोनिया गांधी, युवराज राहूल गांधी  इतर होयबा नेतमंडळी व कार्यकर्ते, लिबरल पत्रकार संपादक व अभ्यासक इत्यादी मंडळीने आत्मपरिक्षण करणे आवश्यक आहे. पण आत्मपरीक्षण हा शब्दच मुळी  घराणेशाही पक्षांच्या शब्दकोशातच नाही.            
             
काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून सोनिया गांधीने हिंदू समाजाच्या हिताकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत, भगवा आतंकवादाचे खोटे-नाटे नॅरेशन जगभरात पसरविण्याची मोहीम राबविली तर दुसर्या बाजूस धर्मांध मुस्लिमांच्या दिवसागणिक वाढत जाणार्या मागण्यांची पुर्तता करू असे काँग्रेस प्रणित राष्ट्रीय स्तरावरील इंडी आघाडी व महाराष्ट्रातील मविआ च्या लेखी आश्वासनामूळे हिंदू समाज हळूहळू जागा होत आहे. जागा होत असलेल्या हिंदूना कुठल्या तरी भितीने ग्रासून ठेवण्याच्या क्लुप्त्या विरोधी पक्ष व त्यांचे समर्थक मिडीया व विचारवंत लढवित असतात. हे नित्याचे होऊन बसले आहे. 

युक्रेन व रशिया मधील सुरू असलेल्या युद्धात भारताची भूमिका लंगडी पडत आहे, तसेच इजराईल व इराण देशामधील युद्धात ही भारताची भूमिका सावध आहे, भारत कचाट्यात सापडला आहे, जागतिक स्तरावर भारत एकाकी पडला आहे, इत्यादी खोटे-नाटे नॅरेटिव जे घुमते आहे, त्यातून जनसामान्याचा संभ्रम वाढवयाचा, मग मोदी सरकारची लोकप्रियता कमी होत भारतात अराजक माजले जाईल असा प्रचार विरोधी पक्षांचे चमचे असलेला मिडीया हाऊसेस करीत आहेत. पण--

वस्तुस्थिती भितीदायक नाही उलट आपल्याला अभिमान वाटेल अशी आहे. भारत आर्थिक, सामरिक, उद्योगिक, व परराष्ट्रीय संबंधात इतका सक्षम झालेला आहे की अमेरिका, रशिया व चीन सारखे देश भारताकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत करीत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात धाडसी तितके संयमी व लोकप्रिय नेते गणले जात आहेत.  हे जनसामान्यांना ठाऊक झाले आहे.  जगभरातील लिबरल विचारवंत, संपादक मंडळीं, सतत गोबेल्स तंत्राने  भारत सरकार, भाजपा, आणि हिंदु संस्कृतीच्या विरूद्ध नेगेटिव्ह नॅरेशन पसरवित असतात. हे जनसामान्यांना पक्के ठाऊक झाले आहे. पण बहुतांश हिंदु समाज बांधव आक्रमक किंवा रागाच्या भरात प्रतिक्रीया देत नाहीत. पण मतदान  'राष्ट्र प्रथम' याच भावनेने करीत असतो. त्यांमुळे लिबरल मंडळीच्या नेगेटिव्ह नॅरेशनस् दिवाळी संपल्यावर उरलेल्या फटाक्या सारखे फूसके बार ठरत आहेत.

आतापर्यंत मणीशंकर अय्यर, दिग्विजयसिंग व राहूल गांधीच्या वक्तव्याने भाजपाला प्रत्येक निवडणूकीत फायदा होत गेलेला आहे. बांगला देशात अराजक माजले व तेथील पंतप्रधानांना हद्दपार केले, तसेच काही तरी भारतात होईल असे काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांनी केलेले वक्तव्य  मविआ व इंडी आघाडीला अदृष्य स्वरूपात महाग पडले पण महायुतीला मोठी मदत देऊन गेले असे मला वाटते. कुठल्याही पक्षाच्या नेत्याने केलेलं वक्तव्य जर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या देशहिताला ठेंच पोहचणारे वाटते,  तेव्हा त्या नेत्याने देशद्रोह केला अशी सर्वसामान्यांची समजूत होते आणि ती खरी ही आहे. सलमान खुर्शिद यांना बांगला देशातल्या हिंदू समाजावर अत्याचार होत आहे या बद्दल   यत्किंचीत दया आली नाही. 

अमेरिका व पाक पुरस्कृत दशहतवाद्यांतर्फे मोदी सरकार उलथून पडावे अशी आशा सलमान खुर्शिद तसेच इंडीचे नेते मंडळी  मविआचे नेते - कार्यकर्ते, लिबरल पत्रकार-संपादक धरून बसतात. वर्षभर अभ्यास न करता काही विद्यार्थी IMP प्रश्नोत्तरांचा आधार घेतात तसेच मविआ व इंडी आणि प्रान्तीय पक्ष देशी-विदेशीच्या अभ्यासकांनी केलेले आयते नॅरेशन्सवर भर देतात. काही नॅरेशन्स ऑउट ऑफ डेट असतात. परीणाम  ' सपशेल नापास !'  शरद पवार, उद्धव ठाकरे व राहूल गांधी यांचा प्रवास मणीशंकर अय्यर यांच्या मार्गावर येऊन ठेपला आहे. म्हणूनच निवडणूकांचा निकाल एकतर्फी लागला. महाराष्ट्रातल्या मतदारांनी कसलाही गवगवा न करता, (गनिमी काव्याने म्हणा हवे तर) मविआला सपशेल झिडकारले. 

निवडणूकीतला अनाकलनिय निकाल म्हणजे सारासार विचार करून, दृढ निश्चयाने, शांत चित्ताने, राष्ट्रहीत सर्वोच्च मानून धर्माच्या रक्षणासाठी जनतेने केलेलं मतदान होय. संघ परिवाराचा ' सजग रहो ' या इशाराला मतदारांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद आहे. आपण एखादे काम मनःपुर्वक करतो तेव्हा त्यात अद्भूत यश मिळते. हा सृष्टीचा नियम व एक वैशिष्ट्य आहे. याची जाण असुनही मविआचे नेतेमंडळी आपल्या धोरणात व वागण्यात बदल करणार नसतील तर काय म्हणावे ? एकच उत्तर आहे ते म्हणजे ' विनाशकाले विपरीत बुद्धी ! '

एखादी गोष्ट घडते, ती अनाकलनीय का वाटते या संबंधीचं एक सामान्य उदाहरण आपल्या समोर मांडतो. गेल्या आठवड्यात मी एका लग्न समारंभा साठी गावी गेलो होतो. दुसर्या दिवशी संध्याकाळी नालासोपारा ते बोरीवली कडे येणार्या रेल्वे गाडीने आलो. बोरीवली स्टेशनवर डब्यातून उतरलो. तेव्हा फ्लॅटफार्मवर एक -दोन नव्हे तब्बल आठ तिकीट इन्स्पेक्टर उतरणार्या प्रवाशाकडून टिकेट टिकेट असे म्हणत तपासणी करू लागले. मी तिकीट दाखविले आणि गम्मत पाहावी या हेतूने बाजूला उभा राहून पाहू लागलो. उतारू प्रवाशांपैकी सहा-सात जणांना विना तिकीट प्रवास करणार्यांना नियमानुसार ताब्यात घेतले. उतारूंची संख्या फार होती. त्यामानाने टिकीट इन्स्पेक्टरांची संख्या फार कमी होती. मी ब्रिजवरून चढत असतांना पुढे चालत असलेले आमच्या डब्यातले दोन उतारू' देवाची कृपा आपण वाचलो ' असे म्हणत असल्याचे ऐकले. विना तिकीट प्रवास करणारे काही प्रवासी अडकले तर काही अनायासे सुटले. हे असे का व्हावे ? मी माझ्या मनाशी प्रश्न विचारला. विना तिकीट प्रवास करणारे काही उतारू अडकले तर काही सुटले. सारं तर्कशास्त्र धुंडाळून पाहिले. उत्तर मिळाले नाही. 

शेवटी   Law of averages व Law of probability यांचाच आधार घेत माझ्या मनाची घालमेल थांबविली. या विश्वात सर्वात गूढ असे काय या प्रश्नावर विख्यात शास्त्रज्ञ आईनस्टाईन यांनी उत्तर दिले आहे-- 
'हे विश्वच !' जे उतारू पकडले गेले. त्यापैकी काही जण नेहमीच विना तिकीट प्रवास करणारे असू शकतात. त्यांच्यापैकी जे पकडले गेले त्यांना जे घडले ते अनाकलनीय वाटू शकते. तर काहींनी पुन्हा विना तिकीट प्रवास करायचा नाही असे ठरविले असेल. काही जण विना तिकीट प्रवास करणे सुरू ठेवतील. जे सुटले ते देवाची कृपा, नियती नशीब असे समजत असतील. मी ही लेखमालिका लिहावयास बसलो त्याच्या आदल्या दिवशी हा मला आलेला अनुभव आहे. थोडक्यात हेच की महायुतीच्या विजया संबंधीचे आकलन संपुर्णतया होईल आणि तंतोतंती भाष्य वा भाकीत कोणी ही करू शकत नाही. कारण मतदान हे फक्त बुद्धी स्तरावरून होत नसते. तिथे ही मनाला पंसत पडते त्या उमेदवाराला ते दिले जाते. प्रत्येक  क्षेत्रात मतभिन्नता असतेच त्यात नवल ते काय ? मग अशावेळी  ' करावे तसे भरावे ' हेच आपण म्हणतो आणि ऐकतो.

एकंदरीत जे अनाकलनिय घडले असे आपल्याला वाटते ते होणार होतेच. तो निसर्गाचा एक नियम असतो. अनाकलनिय घटना घडते तेव्हा त्यातील सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणे क्रमप्राप्त असते. पण मविआचे नेते मंडळी एवीएम मशीनवर पर्यायाने निवडणूक आयोग, केंद्र सरकार वर टिका करीत आहे. विरोधी पक्षांचे असे रडगाणं न्यायालयात टिकले नव्हते. याचा अनुभव त्यांना आला आहेच. निवडणूक आयोगा समोर असलेली मविआ वा इंडी ची याचिका असो वा ठराव सपशेल धुडकावले जाणार हे निश्चीत. अन्याय करणारे, धातांत खोटे बोलणारे इत्यादींना सहानुभूती मिळत नसते. थोडीफार क्वचीत मिळेल पण सतत मिळत नसते. खोटे बोलणार्यांचे, अन्याय करणार्यांचे पाय सतत चिखलात रूतत जातात. नंतर सत्यानाश ओढवतो मग ते क्षेत्र कोणते ही असो. 
                              क्रमशः---

बुधवार, २७ नोव्हेंबर, २०२४

त्रिपुरात अफवा पण महाराष्ट्रात धुडघुस कसा ? (भाग-२)



वाचक हो, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार मध्ये जे दंद्व माजले आहे, त्याचे स्वरूप मला जसे दिसले, भासले त्यातून जे आकलन झाले, ते मी या लेखाच्या भाग १ मध्ये मांडले आहे. ही मांडणी म्हणजे मी दावा मांडला आहे असे नाही. ही घटना गंभीर स्वरूपाची आहे. या घटनेवरील राजकारण संपणार नाही. त्यामूळे या विषयावर चर्चा ही सुरू राहणार आहे. म्हणून या घटनेचा भौगोलिक तसेच निसर्ग नियम, मानसशास्त्र आणि सामान्य ज्ञानाच्या दृष्टीकोनातून पाहाता आपल्या हाती काय लागते यावर चर्चा करू या.

त्रिपुरात मशीदी जाळल्या, मुस्लीम बांधवांवर हल्ले झाले ही अफवा नसून सत्य घटना आहे असे  आपण मानले तरी फक्त महाराष्ट्रातच दंगली कशा झाल्या हा प्रश्न शिल्लकच राहातो. त्रिपुरा देशाच्या ईशान्या टोकाला आणि महाराष्ट्र देशाच्या पश्चीम टोकाला  म्हणजे जवळपास त्रिपुरा राज्याच्या अगदी विरूद्ध दिशेला.  त्सुनामी, अतिवृष्टी, भुकंप, इत्यादी नैसर्गिक आपत्तीत जी राज्यें एकमेकांच्या शेजारी आहेत, ती राज्यें कमी अधिक प्रमाणात सापडली जातात हा आपला अनुभव आहे. We are all governed by the Laws of Nature.  अग्नी, पाणी, प्रकाश, आणि वायु ही पंचमहाभूतापैकी चार. ही चार महाभूते प्रवाही आहेत आणि पाचवं आकाश नावाचं पंचमहाभूत हे एक माध्यम हे वैज्ञानिक आणि शाश्वत सत्य आणि आपण प्रत्यक्ष अनुभवतो. मानवी शरीर ही पंचमहाभूतांनी बनलेले असते. त्यामूळे मानवी मन जात्याच प्रवाही असते. मानव जेव्हा सुरक्षा तसे एकमेकांच्या अडचणीच्या काळात मदत होईल या कारणाने समुहात राहू लागला, तेव्हा त्या तशा समुहाला  समाजाचं स्वरूप मिळालं. सामन्यतः समाज प्रवाह पतीत असतो. कपड्याच्या दुकानात किंवा चप्पलाच्या दुकांनात ' सेल, ४० टक्के सूट ' अशी पाटी झळकली की त्या दुकानात लोकांची तुबंड गर्दी आपण पाहातो. दंगल करण्याचा किंवा अफवा पसरविण्याचा उगम आपल्या मनात होतो. त्यामूळे दंगली सारख्या घटना ज्या राज्यात प्रथम होतात तेथून त्या शेजारील दुसर्या राज्यात, पुढे दुसर्या राज्याच्या शेजारील राज्यात म्हणजे तिसर्या राज्यात पसरत जातात. यातुनच तर ' दंगलीचे लोण ' असा शब्दप्रयोग आपण व्यवहारात वापरत असतो.  याचा अर्थ त्रिपुरा येथे जर दंगल झाली असती तर त्याची झळ शेजारील राज्यांना पोहचली असती. म्हणजे दंगलीचे लोण प्रथम त्रिपुरा राज्याच्या शेजारील राज्यात पोहचायला हवे होते की नाही. तसे घडले नाही. म्हणजेच त्रिपुरात ना दंगली झाल्या ना मशीदी जाळल्या गेल्या हेच सत्य असावे.

आता सामान्य ज्ञान काय सांगते ते पाहू या.  सर्वसाधारणतः आपल्या नात्यातील वा परिचयातील एखाद्या युवकाच्या अकस्मात मृत्युची बातमी आली की आपण ती बातमी खरी आहे की नाही याची खातरजमा करून घेतो की नाही? त्रिपूरात खरोखरीच मशीदी पाडल्या आहेत का, मुस्लीम बांधवांवर हल्ले झाले आहेत का याची खातरजमा रजा ॲकॅडेमीने केली होती का? समजा तशी खातरजमा रजा ॲकेडेमीने केली असती तर सत्यस्थिती कळली असती. जर त्रिपुरात दंगल झाली असती तर रजा ॲकेडमी सारखी संस्था जिचे ऑफीस मुंबईत आहे आणि ती मुस्लीम समाजाच्या फतवा काढण्याइतकी सक्षम आणि सर्वोच्च संस्या नसताना ती दंगलीची सुरूवात कशी करेल ? आणि महाराष्ट्रात सुरूवात का म्हणून करेल? त्रिपुरात दंगल झाली असतीच तर  मुस्लीम समाजाच्या सर्वोच्च संस्थेने फतवा काढून या दंगलीची सुरूवात महाराष्ट्रात करण्याऐवजी, जिथे पुढील तीन महिन्यानंतर निवडणूका आहेत अशा उत्तर प्रदेश मध्ये केली असती की नाही ? वाचक हो आपल्या देशात झालेल्या धार्मिक दंगलीच्या इतिहासाच्या आधारे हे मी मांडले आहे.

आता आपण सामान्य ज्ञानाच्या दुसर्या कोनातून पाहू या. जर का रजा ॲकेडेमीने त्रिपुरात झालेल्या दंगलीची खातरजमा केली नसेल तर तिने आपली स्वाभाविक वृत्ती ठेचली असेल असे मानावे लागेल (कारण खातरजमा करणे ही सहज प्रवृत्ती.) पण तसे संभवत नाही. कारण स्वाभाविक वृत्ती वा प्रवृत्ती सहजा सहजी ठेचून काढता येत नाही. स्वाभाविक प्रवृत्ती वा विकृती म्हणा  इत्यादीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रचंड तपस्या लागते. ती शक्ती आपल्या येथील फक्त अध्यात्मिक गुरू आणि संत-महंतानी प्राप्त केलेली आहे. रजा ॲकेडेमी ही तशी सामान्य संस्था पण  शिक्षण आणि सेवा संस्था असल्यामूळे तिच्यात थोडा तरी चांगूलपणा टिकणारच. म्हणजे तिने थोडी फार का असेना, पण त्रिपुरात खरोखरीच दंगल झाली आहे का? खातलजमा केली असती आणि दंगल झाली असती तर दंगल करण्यासाठी रजा ॲकेडमी नसतीच, आणि दंगलीचं ठिकाण ही महाराष्ट्रीतील मुस्लीम बाहूल जिल्हे नसते. याचा अर्थ असा आहे की त्रिपुरात मशीदी नष्ट केल्या, मुस्लीम बांधवांवर हल्ले केले ही अफवाच होती.  त्यामूळे रजा ऑकेडेमीला अफवाची खातरजमा करून घेण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. त्यामूळे अगोदर ठरल्याप्रमाणे महाराष्ट्रात रजा ॲकेडेमी तर्फे मोर्चा, बंद, दगडफेक आणि हिंदु बांधवांवर हल्ले झाले आहेत. ते काम रजा ॲकेडेमीने पार पडले असावे. कारण त्या संस्थाने आपले नाक नाही त्या ठिकाणी खुपसून मोर्चा काढून जवळपास तीन वेळा महाराष्ट्रात  हिंसाचार आणि फोडतोड केली आहे. यावरून हे सारे प्रकरण भाजपा विरोधी पक्षांनी रचलेले एक कारस्थान आहे याबाबत दुमत नसावे असे मला वाटते.

या कारस्थानाच्या पाठीमागे  एकूण चार हेतू असावेत. ते खालील प्रमाणे आहेत --
१)  किसान आंदोलनातील हवा कधीच संपली आहे. त्यामूळे भाजपा शासीत एखादं राज्य बरखास्त करण्याची मागणी साठी कारस्थान करावे लागणार होते. त्यात त्रिपुरा राज्याची निवड केली आणि आगामी काळात जास्तीत जास्त विरोधी पक्षांना सामील करून बंद, मोर्चे इत्यादी नाटकांच्या संयुक्त कवायती करण्याची योजना तयार करणे.   

२) महाराष्ट्रातील मविआ सरकाराच्या  दुष्कृत्यांमूळे इभ्रतेचे जे धिंडवडे उडाले आहेत त्यावरून मराठी जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा हा प्रयत्न आहे. 

३) दोन विदेशी शक्तीच्या लाॅब्यांचा एकत्रित उपयोग करून घेण्याची एक छोटीसी लिटमस टेस्ट यशस्वी करणें.

४)महाराष्ट्रात सरकार स्थापन केल्याचा जो प्रयोग उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी केला आहे त्यात काॅग्रेस पक्षाला गौण स्थान दिल्याने काॅग्रेसजन अगदी राहूल गांधी पासून ते महाराष्ट्रातील गाव पातळी पर्यंत नाराज आहेत. त्यासाठी एखादी सांप्रादायिक घटना, भाजपाने घडविली आहे असे भासवून भाजपाशी लढत देण्यासाठी एकत्र राहीले पाहीजे  ही जाणीव काॅग्रेसला करून देणे.

वरील पैकी चौथ्या हेतू ची कल्पना काॅग्रेसला दिली नसली तरी त्या पाठीमागील कारस्थानाची कल्पना काॅग्रेसने हेरली नसेल इतके काॅग्रेसचे श्रेष्ठी खुळे नाहीत. शेवटी काॅग्रेसच भाजपा सोडून सर्व विरोधी पक्षांची आई आणि बाप आहे. यातील बाप हा शब्द काॅग्रेसच्या राजकारणाच्या दृष्टीने अधिक उचीत ठरतो. पण हे कारस्थान तर घडले आहेच त्यामूळे  काॅग्रेसला त्रिपुरा सरकार विरूद्धच्या लढ्यात सामील व्हावे लागणार आहे तसेच महाराष्ट्रात ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत भाजपा विरूद्ध आखलेल्या टिका सिरीज मध्ये भाग घ्यावा लागेल. कारण मामला आहे हिंदू-मुस्लीमाचा. वस्तुतः मुस्लीम मतपेटीचा. म्हणजे तथाकथित पुरोगामी विरोधी पक्षांतर्गत स्पर्धेचा.

एकंदरीत या चर्चेअंती  त्रिपूरा आणि महाराष्ट्रात जे कटकारस्थान रचले त्या पाठीमागील मास्टर माईन्ड शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅग्रेस हे पक्ष आहेत हा निष्कर्ष निघतो. याचे कारण असे आहे की त्रिपुरात दंगल पेटविण्याची यांच्यात धमक नाही. म्हणून तिथे ऑन लाईन वरून अफवा सोडून देण्याचे कार्य उरकले. आणि महाराष्ट्रात दंगल घडविली. कारण भारतातल्या सर्व विरोधी पक्षात  शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅग्रेसचे अस्तित्व पणाला लागले आहे. दंगलीचे स्वरूप  ही असे ठेवले होते की दंगलीची चौकशी आपल्या राज्याच्या गृहखात्यापर्यंत सिमीत राहील. या पाठीमागचे खरें कारण म्हणजे आगीशी खेळ करताना या दोन्ही पक्षांचे हात-पाय पोळून निघाले आहेत. त्यातच या दोन्ही पक्षांतील मंत्र्यांच्या भ्रष्टाचारांची प्रकरणे बाहेर आली आहेत.  विद्यमान मविआ सरकारच्या काळात काॅग्रेसच्या एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. म्हणून ज्या मराठी मतदारांना भाजपाला मते द्यावयाची नाहीत त्यांच्यासाठी काॅग्रेस हा ऑप्शन चांगला आणि पसंतीचा होऊ शकतो. याच भितीमूळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची झोप उडाली आहे. एकदा खोटे बोलले की पुढे शंभर वेळा खोटे बोलावे लागते. तसेच  एक कारस्थान केले की शंभर कारस्थान करावे लागतात. उद्धव ठाकरे आणि शरद पवार एकामागोमाग कारस्थाने करीत चालले आहेत. पण त्यासाठी शक्ती फक्त या दोन्ही पक्षांचीच खर्च होत आहे. म्हणून  विरोधी पक्षांची आघाडी व्हावी असे शरद पवार काल म्हणाले आहेत आणि त्यांचीच री संजय राऊत ओढत आहेत आता त्यांच्या कपाळी हीच पाळी आली आहे.  शरद पवारांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न नुसते भंगलेच नाही तर ते आता मोडून तुटून नवाब मलिकांच्या भंगारखान्यात जमा झाले आहे. तर उद्धव ठाकरेंना आपल्याच घरातील पितृस्वरूप वाघाची डरकाळी ऐकू येत नाही. कारण २०१९ च्या निवडणूका जाहीर झाल्यापासून त्यांच्या दोन्ही कानात सतत शरद पवार गुणगुणत आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे असे काही चक्रव्युहात अडकले आहेत की यांची अवस्था उत्तर प्रदेश मध्ये सपा आणि बसपाची झाली आहे तशीच होणार आहे, तर मविआ सरकारातील यांचा घटक पक्ष काॅग्रेसला महाराष्ट्रात उभारी मिळेल असे स्पष्ट दिसू लागले आहे.

बाकी महाराष्ट्रातील या दंगलीतील  दोषींचा तपास, आरोपींची निश्चिती करून एफआयआर नोंदणे नंतर न्यायालयात खटला उभा राहणे इत्यादी गोष्टीसाठी एक वर्षाहून अधिक काळ जाणार आहे ही बाब आपल्याला अंगवळणी पडली आहे. पण त्रिपुरा सरकार मात्र अफवा मागील सत्य शोधण्याचा कसून प्रयत्न करणार आणि त्यात विदेशी शक्तीचा हात सापडला तर महाराष्ट्रातील दंगलीचा तपास एनआयए या केंद्रीय एजन्सीकडे जाईल. तेव्हाच कदाचीत महाराष्ट्र सरकार बरखास्त झालेले दिसेल. कारण मोदी सरकारने  कृषी बिलें मागे घेऊन विरोधी पक्षांना निष्प्रभ केल्याची बातमी या लेखाची (भाग २) समाप्ती करतेवेळीच आली आहे. त्यावर चर्चा पुढच्या भेटीत करू या.

गुरुवार, ५ सप्टेंबर, २०२४

शिक्षक दिन - व्यापकता व महत्व (भाग २)

शिक्षक दिन हा एक प्रकारे शिक्षकांच्या जीवनातील एक मोठा सत्कार च आहे. आजच्या मानवाचा सारा विकास हा शिक्षण व्यवस्था व शिक्षकांनी विद्यार्थ्याना दिलेल्या शिकवणीतून झाला आहे. क्षेत्र कुठलेही असो, एका पिढीचा अनुभव हा दुसर्या पिढीला मिळत असतो त्यातूनच दुसर्या पिढीचा अनुभव तिसर्या पिढीला मिळत असतो. 

सामान्यतः डाॅक्टराचा पुत्र डाॅक्टर होत असतो. इजिनीयरचा मुलगा इंजिनियर बनतो. प्रत्येकाचा व्यवसाय हा त्या घराचा कर्ता पुरूष किंवा कर्ती स्त्री पासून दुसर्या पिढीला मिळत असतो. असे असले तरी विद्यार्थी वर्गाला शाळेचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी शाळेतील शिक्षकांचा आधार लागतोच. ब्रिटीश राजवटीत आपली पुर्वीची शिक्षण व्यवस्था म्हणजे गुरूकूल व्यवस्था संपुर्णतः मोडीत काढली गेली. त्यामूळे शिक्षण देण्यासाठी शाळा उघडण्यात आल्या; शिक्षण देण्यासाठी शिक्षक नावाचा वर्ग निर्माण करण्यात आला. असे  असले तरी गुरू-शिष्य परंपरा आज तागायात टिकून राहिली आहे. याचे श्रेय शिक्षक वर्गाला जाते. प्रश्न असा आहे की गुरू- शिष्य परंपरा अबाधित असतांना शिक्षक दिन साजरा करण्याची प्रथा सुरू का झाली, प्रत्थेक वर्षात ५ सप्टेंबर लाच शिक्षक दिन का पाळला जातो  याची कारणें काय आहेत? यावर चर्चा करू या.

काळानुसार मानवी जीवनातल्या  प्रत्येक व्यवस्थेत बदल होत असतो. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे. गती हा या युगाचा मंत्र आहे. विद्येचे स्वरूप ही बदलेलं आहे. विद्येचं बदलेल्या स्वरूपाचे प्रशिक्षण शिक्षक वर्गाला दिले जाते. असे असले तरी  वैदिक काळापासून सुरू झालेली प्राचीन शिक्षण व्यवस्था ब्रिटीश सरकारने मूळासकट उखडून काढल्यामूळे, तसेच नवीन इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्यामुळे देशात कारकून निर्माण होत गेले. तरीही ब्रिटीश राजवटीला खिळखिळी करण्यात अनेक देशभक्तांना यश मिळत गेले. कोणी अहिंसा व सत्याग्रह या शस्त्राच्या साह्याने ब्रिटीश राजवटीशी झूंज दिली तर कोणी हातात शस्त्रे घेऊन ब्रिटीश सरकारच्या अधिकारी वर्गाला यमसदनास पाठविले. 

एक तिसरा वर्ग असा होता की त्याने आपल्या बुद्धीच्या बळावर इंग्रज राजवटीला धक्के दिले. या तिसर्या वर्गात बहुतांशी शिक्षक वर्ग होता. या मार्गावर असलेल्या अनेक थोर पुरूषांनी आपल्या प्राचीन संस्कृतील साहित्य व ज्ञान भांडारचा अभ्यास करीत आपले धर्मग्रंथ व आपल्या संस्कृतीचा प्रसार जगभर केला.  या तिसर्या वर्गात अग्रणी स्थानावर स्वामी विवेकानंद होते. स्वामी विवेकानंद च्या पश्चात जगभरात आपल्या संस्कृतीचा प्रसार करण्याचे शिवधनुष्य लिलयाने पेलविले असे अध्यात्मिक गुरू म्हणजे डाॅ राधाकृष्णन. त्यांच्या व्यक्तीमत्वाचे वर्णन शब्दात मांडणे मला अशक्य होत आहे. मी इथे हिंदी पुस्तकात वाचलेले एक वाक्य मला आठवले ते असे आहे ' व्यक्तीत्वकी भी एक पहचान होती है , वह बिना शब्द और बिना भाषासे दुसरोंके अंतरमनको छू लेता है | 

शिक्षक दिवस हा शिक्षकांच्या कौतुकाचा एक विशेष दिवस आहे. शिक्षक दिवस साजरा करण्याची कल्पना एकोणीसाव्या शतकात अनेक देशांमध्ये रूजली. बहुतांशी स्थानिक शिक्षक किंवा शिक्षण क्षेत्रातील महत्वाचा टप्प्यावर योगदान दिले आहे अशा व्यक्तीचा सत्कार होतो. अनेक आंतरराष्ट्रीय दिवसापेक्षा हा दिवस अनेक देशात वेगवेगळ्या तारखेला होतो. आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन ५ ऑक्टोबरला साजरा होतो. तर आपल्या देशात डाॅ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवशी म्हणजे ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा होतो. 

डाॅ राधाकृष्णन यांचा जन्मदिवस कसा शिक्षक दिन साजरा होऊ लागला, याची एक छोटीसी कथा आहे. सन १९६२ ला डाॅ  राधाकृष्णन भारताचे राष्ट्रपती झाले, तेव्हा त्यांचे काही विद्यार्थी त्यांना भेटावयास गेले. त्यांनी ५ सप्टेंबरला डाॅ राधाकृष्णनचा दिमाखदार वाढदिवस साजरा करण्यासाठी परवानगी मागितली. तेव्हा डाॅक्टर राधाकृष्णन यांनी नम्रतेने नकार दिला. स्वतः शिक्षक असल्यामूळे देशातील तमाम शिक्षकांचा तसाच शिक्षण व्यवस्थेचं कौतूक व्हावे ही इच्छा प्रगट करून विद्यार्थ्यांना ५ सप्टेंबरला शिक्षक दिवस साजरा करण्यास सांगितले. त्यांच्या विद्यार्थ्यांचे समाधान झाले. तेव्हापासून ५ सप्टेंबरचा दिवस शिक्षक दिवस साजरा होऊ लागला. 

एक महान तत्वज्ञानी, सनातन संस्कृतीचे गाढे अभ्यासक, युनेस्कोचे माजी चेअरमन, बनारस हिंदु विद्यापिठाचे कुलगुरू, भारतीय संविधान समितीचे सदस्य, पहिल्या शिक्षण आयोगाचे अध्यक्ष, स्वामी विवेकानंद व स्वातंत्र्यवीर सावरकारांना आपले आदर्श मानणारे अलौकीक विद्वान, ऑक्सफोर्ड विद्यालयात प्राचार्य, तल्लक बुद्धी व स्मरणशक्ती दैवाजात प्राप्त झालेले महान विद्यार्थी व शिक्षक, फिलासाॅफी ऑफ रविंद्रनाथ टागोर, इथीक ऑफ वेंदात, दि रेगीन इन रिलीजन कन्टेमपररी अशा ग्रंथाचे महान लेखक, छोट्या छोट्या कथातून सनातन संस्कृतीचे दर्शन घडविणारे दशसहस्त्रेषू वक्ता, अमेरिका व युरोपमध्ये लोकप्रिय हिंदू नेता, पाश्चात्य व सनातन संस्कृतीचे खंदे समन्वयक आणि ----
        आचारः परम धर्मं |
        विद्या विनयेन शोभते |
        विद्या सर्वत्र पुज्यते |
        सा विद्या या विमुक्तये |
         वसुधैव कुटुम्बकम् |
इत्यादी सनातन संस्कृतीचे बोधवचने आपल्या आचरणात आणली अशा सनातनी अवतारी महापुरूषास माझे कोटी कोटी प्रणाम | 
        




 

बुधवार, ४ सप्टेंबर, २०२४

शिक्षक दिन - व्यापकता आणि महत्व (भाग-१ )

आज गुरूवार ५ सप्टेंबर २०२४ ! देशभरातील शाळांमध्ये तसेच काही स्वयंसेवी संस्थामध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो. संत तुकाराम साल्वेस्टर मिशन प्रणित, मालाड (प) व विद्याप्रतिष्ठान पुणे संचलीत  आनंदराव पवार सरस्वती विद्यामंदिर वझिरा, बोरीवली (प) या शाळेची कार्यवाह म्हणून जबाबदारी मी सांभाळतो. दर वर्षी एसटीएस मिशनच्या शाळांचा ' शिक्षक दिन ' संयुक्त रित्या साजरा होत असतो. परंतु या वर्षी एसटीएस मिशन मालाड च्या सहकार्यावाह जोग मॅडम यांनी फोनवरून कळविले की या वर्षी शिक्षक दिनाचा कार्यक्रम स्वतंत्र रित्या आपआपल्या शाळेत साजरा करावा.  त्यांच्याशी फोनवर झालेल्या संवादातून या विषयावर लेख लिहीण्याची प्रेरणा मिळाली. 

शिक्षक दिनाचे महत्व या विषयावर लेख लिहणे म्हणजे शिवधनुष्य पेलविण्या इतके महाकठीण कार्य आहे याची जाणिव मला आहे. पण ' प्रयत्नांती परमेश्वर ' हा समर्थबोध लक्षात ठेवून माझ्या कुवतीनुसार मी लेख लिहावयास घेतला आहे. वाचक हो , शिक्षक दिनाचे महत्व मांडताना वैदिक काळातील गुरू-शिष्य परंपरा व गुरूपौर्णिमेचा उत्सव यावर चर्चा केल्याशिवाय हा लेख परिपूर्ण होणार नाही असे मला वाटते. म्हणून या लेखाच्या पहिल्या भागात  गुरू-शिष्य परंपरावर चर्चा मांडत आहे. 

आपल्या देशात प्राचीन काळी म्हणजे वैदिक काळात गुरकूलं होती. त्यातूनच पुढे महर्षी व्यासांच्या 
महानिर्वाणा नंतर त्यांच्या भक्तांनी आषाढी पौर्णिमेचा दिवस हा गुरू पुजन व त्यांच्या प्रती समर्पणाचा भाव समाजात युगानयुगे राहावा म्हणून एक मंच स्थापन केला. त्या मंचावरून सांस्कृतिक कार्यक्रम व्हावेत ही भावना जोपासून गुरू पौर्णिमा उत्सव साजरा होऊ लागला. तेव्हापासून त्या मंचाचे नाव व्यासपीठ या नावाने ओळखले जाऊ लागले. व्यासपीठ म्हणजे निवडणूकांचा प्रचारासाठी वापरले जाणारे मंच नव्हेत. या व्यासपीठावरून फक्त सांस्कृतिक कार्यक्रम ते ही आपल्या संस्कृतीला सुसंगत असावेत अशी जाणीव आपण ठेवावयास हवी, तरच त्याचे पावित्र्य अबाधित राहू शकते.

स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पुजनीय पांडुरंगशास्त्री उर्फ दादा आठवले यांनी आपल्या संस्कृती पुजन या पुस्तकात महर्षी व्यासांच्या कार्याची महती एका वाक्यात मांडली आहे ती अशी आहे ---
" व्यक्तीचा मोक्ष आणि समाजाचा उद्धार या दोन्ही आदर्शाकडे अभेद दृष्टीने पाहणार्या, अभ्युदय व नि:श्रेयस या दोहोंचा समन्वय साधणार्या अध्यात्म पारायण अशा व्यासाइतका अधिक योग्यतेचा समाजशास्त्रज्ञ कोणी झाला नाही. त्यांचे वैदिक व लौकिक ज्ञान एवढे अमर्याद होते की सर्व लोकांनी कृतज्ञतापूर्वक म्हटले की व्यासोच्छिष्टं जगत सर्वम आणि व्यासवाणी (महाभारत) सारं विश्वस्य."
गुरू पौर्णिमेच्या उत्सवावर ब्लाॅगवर गुरूवार दिनांक २८ जुलै २०१९ ला मी लेख लिहीला आहे. तो ही आपण वाचावा कारण त्यावरूनच या विषयाची व्याप्ती लक्षात येईल. परंतु तो लेख हिंदी भाषेत आहे. म्हणून त्या लेखातील काही भाग संक्षिप्त रित्या मी मांडत आहे. 

विख्यात महाकवी कालिदासांनी म्हटले आहे की, उत्सव प्रियः खलू मनुष्यः| उत्सव साजरे करणे ही माणसाची स्वाभाविक वृत्ती आहे. जगातील सर्वच देशात आपआपल्या संस्कृती व धार्मिक श्रद्धा व परंपरा नुसार उत्सव साजरे होत असतात. अर्थात या उत्सवामध्यें स्वाभाविक रित्या विभिन्नता असते. परंतु गुरू-शिष्य परंपरा सर्वच देशात आढळते. आपल्या देशात जसे वसिष्ठ- श्रीराम, सांदिपनी-श्रीकृष्ण, शुक्राचार्य-जनक, रामानंद-कबीर, रामकृष्ण परमहंस- स्वामी विवेकानंद, समर्थ रामदास- शिवाजी इत्यादी गुरू-शिष्य जोड्या आहेत, तशाच जोड्या साॅक्रेटीस-प्लेटो, प्लेटो-ऑरिस्टोटल, मार्कस्- लेनीन, इन्सेन-शाॅ इत्यादी विदेशात आहेत. असे असले तरी गुरू-शिष्यांची परंपरा व गुरू पुजन उत्सावाचा जनक आपला भारत देश आहे. आपण म्हणाल ते कसे काय ? तशी कबूली अनेक पाश्चिमात्य विचारवंतानीच दिली आहे. जर्मन विचारवंत शाॅपेनहावर म्हणाले आहेत की ' उपनिषादासारखे उच्च व उदात्त तत्वज्ञान व मानवी जीवनाचे समग्र दर्शन जगाच्या पाठीवर कुठेच नाही.' 

आपल्या देशात ब्रिटीशांच्या राजवटीतले दोन खलनायकांनी आपल्या प्राचीन संस्कृतीचे कौतूक केले आहे. ज्याने बंगालच्या फाळणीचं बीज रोवले असे लार्ड कर्झन यांनी एका मेजवानीत ' आम्ही ब्रिटीश लोक जंगलात राहात होतो तेव्हा भारतात गुरूकुलं होती अशी कबुली दिली आहे. दुसरे खलनायक आहेत ते मेकाॅले ! मेकाॅले हे त्यावेळी ब्रिटीश पार्लमेंटचे सदस्य होते. त्यांच्या सल्ल्यानुसार ब्रिटीश सरकारने आपल्या संस्कृती व धर्मशास्त्राचे सारे ग्रंथ जाळून आपल्या देशाच्या इतिहासाचा अभ्यासक्रमच बदलून टाकला व आपल्याला वैचारीक (शैक्षणिक) व मानसिक दृष्ट्या इंग्रजी शिक्षणाचे गुलाम बनविले. मॅक्सम्युलर नावाचा जर्मन विचारवंत हा मेकाॅलेचा मित्र होता. त्याच्याच मार्गदर्शना खाली मेकाॅलेनी आपले सारे ज्ञानभाडांर मोडीत काढले. तेच मॅक्सम्युलर नंतर  म्हणाले आहेत की, ' मी माझ्या अनुभवाच्या जोरावर शाॅपेनहावरांनी हिंदू संस्कृती संबंधीत जे गौरवास्पद उद्गार काढले आहेत त्याच्याशी सहमत आहे.' अमेरिकन इतिहास तज्ञ व विचारवंत विल ड्युरांट म्हणतात,        ' मनाची विशुद्धता, परिपक्वता आणि व्यापकता या तीन मुल्यांचा अद्भूत संगम घडवून सहिष्णूताचे पालन कसे करावयाचे हे फक्त हिंदु संस्कृतीकडून शिकता येते. काही काळ भारतात ब्रिटीशांच्या राजवटीत काॅग्रेसच्या अध्यक्षा असलेल्या डाॅ ॲनी बेंझट यांची तर हिंदु संस्कृतीवर अपार निष्ठा होती. त्यांनी म्हटले आहे की  'जगातील सर्व देशांनी हिंदु संस्कृती ही आपली जननी मानली तर जगात सहिष्णूता व बंधुत्वाचे वातावरण निर्माण होऊ शकेल.'

गुरू-शिष्य परंपरेतूनच मानव जातीचा सास्कृतिक आणि लौकीक दृष्ट्या विकास झाला आहे. या विश्वाच्या जन्मापासून भूतलावरील पशू-पक्षी व इतर प्राणीमात्र आजही त्याच अवस्थेत आहेत. याचे कारण त्या विधात्याने मानवाला दिलेली बुद्धी प्राणिमात्रांना प्रदान केली नाही हेच होय. मानव हा सामाजिक प्राणी मानला जातो. तो समाजात राहतो. तर पशू-पक्षांचे जीवन सामुदायिक असते. आपल्याला काय हवं आहे याची जाणीव पशू-पक्ष्यांना ही आहे. पण ते मिळविण्यासाठी त्यांच्याकडे मानवा सारखी बुद्धी नाही. पक्षी आपल्या पिल्लांना आकाशात भरारी मारणे शिकवत नाहीत. तसेच सिंह वाघा सारखे हिस्त्र पशू आपल्या बछड्यांना शिकार कशी करावी हे शिकवत नाही. ते अन्न मिळवतात व खाऊन टाकतात. दुसर्या दिवसासाठी लागणारे अन्न साठवून ठेवण्यासाठी त्यांच्यापाशी रेफ्रीजेटर नाहीत. त्यांच्याकडे बुद्धी असती तर ते मानव जातीला डोईजड झाले असते. याचा अर्थ असा आहे की पशू-पक्ष्यांचे जीवन निसर्गाच्या नियमाच्या आधीन आहे. मानव जातीला आकाशातून प्रवास करण्याची प्रेरणा पक्ष्याकडून मिळाली; पाण्यात पोहण्याची कला माणसाला जलचर प्राण्यापासून प्राप्त झाली. समुद्रात दुरवर प्रवास करण्यासाठी बोटी निर्माण करण्याचे ज्ञान अवगत झाले. आपल्या चार पायावर भरधाव वेगाने धावण्यार्या पशूकडून मानवाने चार चाकांची वाहने निर्माण केली. जमिनीवरून सरपटणार्या प्राण्यामूळे माणसाला डोंगरावरून सरपटत जाणारी रेल्वेगाडीची प्रेरणा मिळाली. वृक्ष-वेली, छोटेमोठ्या किटकांपासून ते महाकाय पंचमहाभूतांच्या उदारतामूळे मानव पुष्कळ काही शिकला आहे. 

या उदारतेचं भान वैदिक काळातल्या ऋषीमुनींना होते. म्हणून ऋषीमुनींनी ऋतुनुसार आहार ठेवावा, जितकं पचेल तितकंच अन्न घ्यावे, महिन्यातून एक दिवस तरी उपवास करावा असे सांगत अनेक धार्मिक उत्सवाची निर्मिती केली. निसर्गातील चराचर सृष्टीत ईश्वर सामावलेला आहे. त्या सृष्टीतली उदारता अनुभवून ऋषीमुनींनी अनेक बोधवाक्यें आपल्या समोर ठेवली आहेत. त्यातील दोन मी इथे मांडतो आहे -   

ईशावास्यम इदं सर्वं यत्किच्च जगत्यां जगत | तेन त्यक्तेन भुज्जीथाः मा गृधः कस्यचित् धनम् || (अर्थ - या जगात जे जे काही आहे त्या सगळ्यात ईश्वराचा वास आहे. तेव्हा ते आपले नसून ईश्वराचे आहे असे समजून त्या सर्वाचा उपभोग घे. (पण कशाचाही लोभ धरू नको.) या बोधवाक्यातला उपदेश संपूर्ण मानव जातीसाठी आहे. संपूर्ण मानव जात हव्यास सोडून काटसरीत जीवन जगली तर हवा, पाणी, उर्जा, इंधन, जमीन इत्यादी महत्वाच्या घटकाची वानवा पडणार नाही आणि विश्वात शांतीचे राज्य येईल. 

दुसरे बोधवाक्य असे आहे--
'अयं बन्धुरयन्नेति गणना लघु चेतसाम् 
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ||
(अर्थ -- हा माझा बंधू आहे आणि तो नाही असा हिशोब संकुचित किंवा क्षुद्र बुद्धीचे लोक करतात. परंतु उदार-उच्च चारित्र्याचे लोक संपूर्ण पृथ्वी म्हणजेच वसुधा हेच एक कुटुंब आहे असे मानतात. आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी ही म्हटले आहे 
' हे विश्वची माझे घर | ऐसी मति जयाची स्थिर | किंबहुना चराचर | आपणची जाहला || 
 अनेक शिक्षण संस्थानी ' वसुधैव कुटुम्बकम् हे बोधवचन स्विकारले असले तरी त्यातील प्रमुख आणि महत्वाचे उदाहरण म्हणजे पुणे येथील सिम्बाॅयोसिस ( Symbiosis) या जगद्वविख्यात शिक्षण संस्थेचे होय. भारतिय विद्यार्थींबरोबरच बहुसंख्येने येणार्या परदेशी विद्यार्थ्यांनी आदराने स्विकारले आहे. दक्षिण मुंबईतील एस् एन् डी टी महिला विद्यापिठाच्या गीतात (प्रार्थनात)  ' विश्व है परिवार, भारत घर हमारा है सामावून घेतले आहे. वाचक हो अनेक शिक्षण संस्था तसेच सांस्कृतिक संस्थानी आपल्या संस्कृतील अनेक बोधवचने स्विकारली असली तरी ' विद्या ' या शब्दावर सर्वात अधिक बोधवचने वैदिक संस्कृतीत आढळलेली दिसून येतात. 

वाचक हो शिक्षक दिन हा उत्सव अलिकडचा आहे. एका परीने हा उत्सव गुरू-शिष्य परंपरेची पुढील आवृत्ती आहे. म्हणून या लेखाच्या भाग-१ चा विस्तार वाढला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून या लेखाची समाप्ती करतो. 



 










बुधवार, ५ जून, २०२४

निसर्ग आणि मानवामधील ऋणानुबंध भाग--३

खळखळणारे झरे, अजस्त्र डोंगर, उंच उंच कडेपर्वत पाहिले की आपल्या मनात पावित्र्य साकार होते. त्यातूनच अनेक तत्वचिंतक निर्माण झाले. निसर्गाच्या कुशीत राहूनच महाकाव्ये फूलली. मानवी जीवनाचे प्रयोजन आपणांस ज्ञात झाले. आदिमानवा पासून ते आजच्या अत्याधुनिक माहिती व तंत्रज्ञानाच्या युगापर्यंतच्या आपल्या उन्नतीचे रहस्य या निसर्गाच्या दयेतच जडले आहे. सहनशिलता हा अलंकार तर गती हा जिचा स्थायीभाव आहे अशी नदी आपल्याला दातृत्वाचा संदेश देत वाहात असते. कोणासाठी? आपल्याच भल्यासाठी ना ! बारामाही शेती कुणाच्या बळावर आपण करतो?

हे पाहा पशू ! मनुष्याच्या सेवेला आणि सुखाला हवे तसेच विविध, हवे तितकेच बुद्धीमान ! वाळवंटातील  वाहन म्हणून त्या उंटास महिनोगणती पाण्यावाचून चालण्याची युक्ती परमेश्वरानी दिली आहे. तो घोडा किती चपळ ! त्याच्यावर स्वारी करून माणसाला रणागंणात त्याने सांभाळले. आज ही अनेक ठिकाणी आपल्या पाठीवर घेऊन किंवा टांगा ओढत तो घोडा माणसास एका ठिकाणा वरून दुसर्या ठिकाणी सुखरूप घेऊन जात असतो. त्याच्यात ती शक्ती व तितकीच समज निसर्गानेच त्याला प्रदान केली आहे 
ना ! ती पाहा गाय ! एका बाजूला सूके गवत खाते व दुसर्या बाजूने जीवनप्रद असे दुध देते. ती गाय स्वतः दुध पिते का? नाही. आपल्या संस्कृतीत तिचे नावच गोमाता ठेवले आहे. तिचा महिमा आपल्या सर्वांना ठाऊक आहे.

एक आंबा ! रसाने, स्वादाने, सत्वाने किती भरलेले ते देवफळ. ते इतके सुपिक की खाऊन झाल्यावर त्याचा भाटा रूजविला की वृक्ष होऊन प्रतिवर्षी हजारो आंबे लागावे असा क्रम वर्षानुवर्षे चालला आहे. बरं सगळे आंबे भाट्यासकट खाऊन टाकले तरी झाडाच्या फांद्यांच्यी कलमे करून रूजविली की आंब्याच्या निर्मीतीत खंड पडणार नाही अशी ही आणखिन सोय व व्यवस्था दयाळू निसर्ग देवाने केलेली ! एक बी पेरली की एका पिढीस सहस्त्रावधी फळे देणारी ही फळझाडे ! हे फणस, पपनस, नारळ, द्राक्षे, डाळींबे ! डाळींबे फोडले की त्यातून परमेश्वराचे कसब प्रगट होते. डाळींबीचा रंग च मोहक ! त्यातील दाण्याची किती उत्तम आणि 
आकर्षक मांडणी ! चव काही औरच ! डांळीबं तयार करण्याचा कारखाना विज्ञानाला काढता येईल का ?

गवतासारख्या उगव म्हणताच, उगवणार्या रूचकर बहुगूणी, विविध रसाने भरलेल्या शाकभाज्या फळभाज्या, यांचा तोटाच पडू देणार नाही, अशी मायाळू आपली भूमाता. ज्याचा गाभाच गोड आहे तो साखरेच्या पाकाने ओतप्रोत भरलेला ऊस देखील इतका पिकतो की त्याच्या मळेचे मळे नकोसे झाले तर प्राण्यानांही खाण्यास हरकत ठेवली नाही. ' बोरी भाबळी उगाच जगती '  असे आपण म्हणतो परंतु त्या भाबळीच्या खाली पाण्याचा स्त्रोत असतो. बरं धान्य, फळे शाकभाज्या देऊन भूमाता थांबते का ? आपल्या गर्भातून अनेक धातू, खनिजे, रसायने, आपणांस प्राप्त करून मानवी जीवनाला एक वेगळं परिमाण ही तिनेच दिले आहे. वेगवेगळ्या हवामानानुसार त्या त्या भागात राहणार्या माणसांच्या शरीर रचनेला साजेशी अशी पिके कशी देते हे फक्त तो सृष्टीचा नियंताच जाणो !

नाना प्रकाराचे, नाना आकाराचे किटक पक्षी ही माणसास काहीतरी शिकवण देत असतात. ते ही जणू विद्या व कलेचे उपासक आहेत. भिंतीवर जाळे विणत असतांना अनेक वेळा अपयशी होऊन शेवटी टोकाला पोहचून यश मिळविणार्या कोळ्यापासून इंग्लंडचा पराभूत झालेल्या राजाला प्रेरणा मिळाली आणि आपल्या शत्रूचा त्याने पराभव करून गमाविलेले राज्य परत मिळविले. मुंग्या, मधमाश्या अशा किटकांडून दिर्घोद्योग व परस्पर समन्वय राखत जीवन कसे जगावयाचे याचा पाठ आपण शिकतो. अनेक पशू-पक्षी व किटकांच्या हालचाली, किंकाळ्यातून भूकंपाची पूर्व सूचना देत असतात. पण सर्वांभूती लीन व्हावे अशी संताची शिकवण आपण पाळतो कुठे ?

दुपारचे ऊन मी मी म्हणत असते तेव्हा आपल्याला मायेने सावली देणारे वृक्ष म्हणजे निसर्गातील जणू संत च ! दिवसा प्राणवायू सोडून रात्री कार्बनडाॅय ऑक्साईड शोषून घेणारे वृक्ष म्हणजे ईश्वराने याच्चवत प्राणीमात्रांचे जीवन जगण्यास जन्मास घातलेले परोपकारी महाॠषीच की ! कसलाच अंहकार नाही.
      वृक्ष फार लवती फलभरे |
      लोबंती जलद घेऊन नीरे ||
      थोर गर्व न करी वैभवाचा | 
      हा स्वभाव उपकाराचा || वृक्षवेलींचे नव्हे तर संपूर्ण सृष्टीतील याच्चवत घटकांचे औदार्याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच राहिले नाहीत. निसर्ग मानवाची भूक भागवितो, तहान शमवितो, वायूलहरींनी श्रमपरिहार करतो.अन्न वस्त्र आणि निवारा देतो. चौसष्ट विद्या व कला शिकवितो. कवी वडस्वर्थ म्हणतो, " Nature is greatest storehouse of wisdom apart from being source of etarnal happiness." (निसर्ग केवळ ऐहीक सुखाचा एक स्त्रोत नसून शहाणपणाचा एक खजिना आहे) पण----

आपणच ऐहीक सुखाच्या नादी लागून पर्यावरणाचा र्हास करीत आलो आहोत. महात्मा गांधीजींनी म्हटले आहे की " माणसांच्या गरजांची पूर्तता करण्याइतकी क्षमता निसर्गात निश्चीत आहै. पण लालसा पूर्ण करू शकणार नाही." आपण या सृष्टीचा एक छोटासा घटक आहोत. परंतु हे विश्व, ही सृष्टी आपली नव्हे. मानव नव्हता त्याच्या कितीतरी हजारों वर्ष सृष्टी होती व आपण नसणार तेव्हा ही असणारच. आपण विश्वाचे मालक नव्हतो व नाही. असलोच तर थोड्या अंशी विश्वस्त ! ही भावना सतत बाळगून आपले वर्तन ठेवणे म्हणजेच स्वतःपासून पर्यावरणाची जागृती सुरू करणे होय. अन्यथा " मानवाचा मूलभूत विकास झाल्याशिवाय वैज्ञानिक प्रगती मानवाच्या पचनी पडणार नाही "  असे जे भाकीत प्रख्यात विचारवंत बर्टाड रसेल यांनी केले आहे ते खरें ठरू शकते.
--------------------------------------------               
             पर्यावरण प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे. जगातील सारे वृक्ष माझे बांधव आहेत. त्या वृक्षांवर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या निसर्ग सौंदर्यांचा मला अभिमान आहे.
या निसर्गातील गोष्टींचा पाईक होणाच्या पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. माझ्या देशातील वृक्षांचा, नद्यांचा, भूमीतील सर्व घटकाचा मी मान ठेवीन व त्यांचा अपव्यय होणार नाही याची काळजी घेईन. माझा देश व त्यातील नैसर्गिक घटक यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्याची वृध्दी व  संरक्षण हे माझे आद्य कर्तव्य आहे.
---------------------------------------------
                  कविता
           निसर्ग आणि मानव 

बाळपणीचा काळ जणू निसर्गाची सकाळ | आप्तस्वकीयांचा प्रेमाने जीवनाला वळण लावण्याचा काळ ||
गृहस्थाश्रमीचा काळ जणू निसर्गाची दूपार | कष्टाने प्रपंच मांडून आनंद लुटावा अपार || वानप्रस्थाश्रमींचा काळ जणू निसर्गाची संध्याकाळ | प्रपंचाचा फेटा सोडून विरक्त जगण्याचा काळ ||
निसर्गात जशी रात्र तसाच जीवनाला अंत | निसर्गाच्या कूशीत पुन्हा विसावण्यात कसली खंत ||
--------------------------------------------
           पर्यावरण घोषवाक्ये

१) प्रदुषणाचा धोका 
    अणूयुध्दापेक्षा मोठा |
२) करा वृक्षावर माया
    मिळेल थंडगार वारा |
३) पाण्याविना नाही प्राण
    पाण्याचे महत्व तू जाण |
४) पाणी अडवा पाणी जिरवा
    जीवन बागेत हिरवळ फूलवा |
५) धरती मातेच ऋण 
     फेडू या करून वृक्षरोपण |
६) निसर्गाचा नाश 
     म्हणजे मानव जातीचा नाश |
 ७) नसेल वृक्ष
     तर जीवन रूक्ष |
 ८) वनीकरणाचा अविष्कार 
      अन् दुष्काळाचा बहिष्कार |
 ९) रक्षावया पर्यावरण
     हाती घ्या वनीकरण |
१०) पर्यावरण का रखे ध्यान
        तभी देश बनेगा महान |
११) हर औद्योगिक प्रतिष्ठान
       प्रदूषण की ओर दे ध्यान |
१२) वृक्षोंकी रक्षा
      मानवी सभ्यताकी रक्षा |
१३) अंगणी लावा एक तूळस
        प्राणवायूचा होईल कळस |
 १४) राखा पर्यवरणाचा समतोल
         जाणा वृक्षरोपणाचे मोल |
१५) हवे शुद्ध अन्न, पाणी व हवा 
      तर माती अडवा पाणी जिरवा |
१६) करू या चराई बंदी , कुर्हाड बंदी
     पर्यावरणासाठी ही शेवटची संधी |
---------------------------------------------



 

 

निसर्ग आणि मानव मधील ऋणानुबंध भाग - २

मनुष्याला सुख देण्यासाठीच कोण्या दयाळू देवाने ही सृष्टी निर्माण केली अशी प्रबळ निष्ठा मानवाच्या मनात उभी राहिली आणि ति ही निसर्गाच्या पाठिंब्यानेच.मानव आणि पशू मध्ये सर्वात महत्वाचा फरक म्हणजे माणसाला बुद्धीचे वरदान लाभले आहे. पशुपक्ष्यानांही मेंदू असतो. आपल्याला काय हवे आहे याची जाणीव पशूपक्ष्यांना असतेच पण ते मिळविण्यासाठी जाणीव पूर्वक प्रयत्न करणे हे फक्त माणसाचे वैशिष्ट्य आहे. सिंह वाघ इत्यादी पशू बलवान खरेच ! परंतू उद्या लागणारे अन्न ठेवण्यासाठी फ्रिजचा शोध लावला नाही. सृष्टीच्या निर्मितीपासून पशूपक्ष्यांची स्थिती जशी आहे तशीच आहे. वाघ व सिंह सारख्या पशूनीं आपल्या डावपेचात सुधारणा केलेली नाही. 

अनेक पशूपक्षी अतिशय सुंदर दिसतात. त्या सौदंर्यासाठी ते स्वतः कोणताही जाणीवपूर्वक प्रयत्न करीत नाहीत. चपळ खारीचे धावणे, थबकणे, वळून पाहणे, गोंडेदार शेपूट उभारणे इत्यादी सारं मोहक असते. हरिणाचे डोळे, सशाचे पांढरे शुभ्र, मऊ मखमली अंग, मोराचा विविध गडद रंगानी नटलेला पिसारा, वाघाचे पट्टेदार धिप्पाड शरीर, हत्तीचे पांढरे शुभ्र दात, लांब सोंड आणि डौलदार चाल या सर्व गोष्टी सुंदर असतात. पण कोणाला ? मनुष्याला. पशुपक्ष्यांच्या दृष्टीने त्यांचे ते फक्त अवयव आहेत. पशूपक्ष्यांना परमेश्वरांने ना दिली विकासाची दृष्टी, ना सौंदर्याची अभिरूची ! परंतु त्यांना तसेच ठेवण्यामागे विधात्याच्या योजना मधील प्रयोजन काय असावे ? याचा मानवाने अभ्यास करून आपली उन्नती निसर्गातील समतोल राखून सृष्टीला अधिक सुंदर बनविणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. ते पार पाडणे यालाच पर्यावरणाचा समतोल असे म्हणतात. पर्यावरण म्हणजे जमीन, पाणी, हवा, तसेच सर्व प्राणीमात्रांचा-सजीवांचा एकमेकांशी असलेला नैसर्गिक संबंध जपणे होय. 

मनुष्याच्या सुखसोयी साठी त्या दयाळू देवाने या सृष्टीची रचना किती ममताळूपणे केली आहे पाहा ! हा सूर्य, हा समुद्र, किती प्रचंड महाभूतें ! पण मनुष्याच्या सेवेस त्यांना देखील देवाने सज्ज ठेवले आहे. दुपारी तहान तहान करीत खेळून दमून मूले येतात आणि आई सकाळीच माठात ठेवलेले गार पाणी आपल्या बाळांना देते. तितक्याच मायेने हा सूर्य उन्हाळ्यात नद्या सुकून जाण्याआधिच समुद्रात असताना तोंडी धरवेना असे खारट पाणी आकाशाच्या विस्तीर्ण सरोवरात गोड आणि गार करून वर्षा ऋतूत आपणांस पोहचवितो. बरं समुद्राचे पाणी गोड करण्याच्या धाधंलीत सारा समूद्र गोड होऊन मनुष्यास मीठ मिळणे बंद करीत नाही. नाहीतर सारा संसार अळणी व्हावयाचा ! ज्याच्या तेजाने सारी जीवसृष्टी अस्तीत्वात आली, तो सूर्य किती नम्र आहे ! सकाळी तुम्ही उठा अगर उठू नका  तुमच्या आमच्या दाराशी, खिडक्यापाशी नम्र पणे उभा असतो. बरं तो ही वेळवर ! किती वक्तशीरपणा ! तुम्ही त्याला नमस्कार करो वा ना करो ! सर्वांना सारखाच प्रकाश देणार, सर्वांना सारख्याच वाटा दाखविणार ! अशा चैतन्यमय सूर्याला उगवतेवेळी आपण नमस्कार करणार नसू, तर चक्रीवादळात पावसाने थैमान घातलेल्या वेळी ईश्वराची याचना करण्याचा आपणांस काय तो अधिकार ! 

हा पाहा समूद्र ! आहे अथांग ! परंतू आपल्या मर्यादा ओलांडीत नाही. मर्यादा पाळणे हा गूण सागरकडून शिकावा ! व्यापकतेचा गर्व जसा त्याला नाही, तसाच आकाशाला ही नाही. आपण ज्या काही बर्या-वाईट कृती करतो त्या सगळ्या ते आपल्या उदरात सामावून घेते. आपले आजच्या नित्याचे मित्र रेडीओ, टिव्ही, संगणक, इन्टरनेट मोबाईल यांचा जन्मदाताच मूळी ते आकाश आहे. आकाशाची विशालता मोहक की चंद्राचे चांदणे मोहक, की लुकलुकणार्या तारकांचे सौंदर्य 
मोहक ? ते आकाश क्षणभर आपल्या  मनाची चलबिचल करते पण नंतर मान वर करून त्या आकाशाकडे पाहिले की क्षणभरात आपले मन असे काही स्थिर करते की त्यातून आपली बुद्धी आणि दृष्टी व्यापक होत जातात. मग आपोआप मन शांत होते. 

तो चंद्र पाहा ! श्रीमंताच्या महालावर प्रकाश देतो तसेच गरीबांच्या चंद्रमोळी झोपड्यांनाही चंदेरी मुलामा ठेवतो. गरीब श्रीमंत असा भेदभाव आहे का त्याच्याकडे ? चंद्राच्या उमळत्या कला पाहा, की प्रचंड ग्रहगोलांची परिभ्रमणे पाहा ; साधा रिमझीम पडणारा पाऊस असो;  की उकळता धातूरस फेकणारा ज्लालामुखीचा स्पोट असो; गवतावर फूल उगवणे असो की समुद्राची भरती ओहटी असो ही सर्वत्र प्रंचड कल्पनाशक्ती असलेल्या ईश्वराने तयार केलेली सुव्यवस्था आहे. सारे ग्रह एकाच आकाराचे नाहीत पण आपआपल्या कक्षातच नियम पाळून भ्रमण करत असतात. अनियमीत जीवन म्हणजे स्वतंत्रता नव्हे. स्वतःच्या मनाला अशी बंधने स्वतःच निर्माण करावीत व ती कसोशीने पाळायची हाच शाश्वत निसर्ग नियम आहे. त्यातच पर्यावरणातील समतोल राखण्याची शक्ती असते. 
                                       क्रमशः--

निसर्ग आणि मानवामधील ऋणानुबंध भाग - १

आज ५ जून जागतिक पर्यावरण दिन. शाळांना उन्हाळ्याची सुटी आहे. असे असले तरी शाळा सुरू झाल्यानंतर आमच्या शाळेत (स्वर्गीय आनंदराव पवार सरस्वती विद्यालय, वझिरा नाका, बोरीवली (प) मुंबई ) दरवर्षी पर्यावरण दिन साजरा होत असतो. त्या निमित्ताने या खेपेस पर्यावरण विषयांवर विद्यार्थ्यांसोबत प्रश्नोत्तर पद्धतीतून पारायण करण्याचे ठरविले आहे. ही प्रेरणा मला कोठून आली आणि पारायण हा शब्द या ठिकाणी वापरावा अशी बुद्धी कशी झाली हे ईश्वरालाच ठाऊक. पण त्यातूनच मला काही वर्षापुर्वीची एक गोष्ट आठवली. ती इथे प्रथम मांडतो.

माझ्या एका मित्राचे रेसाॅर्ट आहे. काही वर्षापुर्वी मे महिन्यातच एके दिवशी त्याचा फोन आला. त्याने फोनवरून त्याच्या रेसाॅर्टमध्ये पर्यावरण दिन साजरा करावयाचे ठरविले असल्याकारणाने चार-पाच दिवसात पर्यावरणावर एखादा लेख पाठविण्याची विनंती केली. मी पाचव्या दिवशीच माझा प्रदिर्घ लेख मित्राकडे पोहचता केला होता. ही गोष्ट आठवली तेव्हाच माझ्या लक्षात आले की मी मित्राला पाठविलेल्या  लेखाची झेराॅक्स काॅपी फाईलमध्ये आहे. पुष्कळदा आपण लिहीलेला लेख आठवला तरी तो तसाच पुन्हा लिहता येत नाही हे मी अनुभवत असतो. तो लेख पब्लीश झालेला नसल्यामूळे जागतिक पर्यावरण दिनोत्सवाच्या निमित्ताने ब्लाॅगवर पब्लीश करण्याची संधी मी साधून घेत आहे. संधी अशासाठी म्हणतो की विचार करून लेख लिहीण्यासाठी वेळ अपुरा पडणार हे जाणवले.  म्हणून पुर्वी लिहलेल्या लेखाची झेराॅक्स काॅपी समोर ठेवून सॅमसंग नोट्सवर उतारून घेत आहे. लेख मोठा असल्याकारणाने सॅमसन नोट्सवर उतारून घेण्यात, एडीट करण्यासाठी व पब्लीश करण्यासाठी  ही वेळ लागणार याची जाणीव ठेवून त्याचे तीन भाग करून पब्लीश केला एवढाच काय तो बदल केला आहे.

पर्यावरणाचे महत्व, पर्यावरणाची हानी व उपाय  या विषयाच्या जागृतीच्या दृष्टीने द्यावी लागणारी आकडेवारी,  स्वार्थ- सत्ता - संपत्ती बाबतचा  मानव्याचा हव्यास आणि त्यातून ऐषारामी जीवनाची लागलेली गोडी अशा सवयीमूळे अनेक प्रकारच्या गरजा वाढल्या व त्यासाठी अनेक यंत्राची सतत वाढत जाणारी निर्मितीत होत असलेली वाढ, वाढता साम्राज्यवाद, शस्त्रांत्रे निर्मितीची देशोदेशी सुरू असलेली स्पर्धा, वाढते औद्योगिकरण, टोलेजंग इमारती, वृक्षतोडी,  बेफिकीरपणे व बिनधास्त नैसर्गिक संपत्तीची सुरू असलेली उधळण इत्यादी संबंधीची माहिती व त्यातून वाढत चाललेले, वायू-जल-ध्वनीचे प्रदुषण इत्यादी गोष्टींचा उल्लेख या लेखात नसल्यामूळे हा लेख आपल्या पसंतीस पडेल असा नाही म्हणजेच Avarage आहे हे मी प्रांजळपणे कबूल करतो. 

या विषयावरील लेख, पुस्तके वाचली आहेत. या विषयावर स्वयंसेवी संस्थातर्फे आयोजित केले जाणार्या अभियानात मी अधून-मधून भाग घेतो. या विषयाचा मी तज्ञ वा अभ्यासक नाही. तरीही अलिकडे  गेल्या जानेवारी महिन्यात सेक्रेटरीयल कामासाठी आमच्या शाळेत उपस्थित असताना एका वर्गात माध्यमिक विद्यार्थ्यांचा पर्यावरणाचा तास सुरू असताना मला छोटसं भाषण देण्यासाठी एका शिक्षकाने आमंत्रीत केले. मी छोटसं भाषण केलं. एवढाच काय तो माझा पर्यावरण विषयाशी असलेला संबंध. याबाबत मला खंत आहे. म्हणून थोडाफार जाणीवपुर्वक प्रयत्न सुरू करावा अशी इच्छा झाली. म्हणून मागे लिहलेला पण पब्लीश न केलेला लेख तीन भागात विभागून आपल्यासमोर ठेवतो आहे.

पर्यावरण या विषयाची व्याप्ती विश्वाचे गूढ उलकण्यापर्यंत पोहचते. माहिती व तंत्रज्ञानाच्या क्रान्तीने जग जवळ आले आहे या बाबत दुमत नाही. पण भौतिक विज्ञानाच्या दृष्टीने हे जग दिवसें दिवस प्रसरण पावत आहे. त्यामूळे पर्यावरण या विषयाची व्याप्ती वाढतच राहणार आहे. 

विख्यात भौतिक वैज्ञानिक आईनस्टाईन यांनी म्हटले आहे की, 
' या विश्वात सर्वात अनाकालनीय गोष्ट कुठली असेल तर हे विश्वच होय.' पुढे एके ठिकाणी ते म्हणतात, Imagination is more important than knowldge. (ज्ञाना पेक्षा कल्पनाशक्ती अधिक महत्वाची असते)  मानवाला कल्पनाशक्ती व स्मरणशक्तीचे वरदान निसर्गाकडून झाले आहे. मानवाच्या ज्ञानाच्या शाखांत होणारी वाढ ही त्याला प्राप्त झालेल्या कल्पनाशक्ती तून होत असते.

मानव व प्राण्यांमध्ये असलेला महत्वाचा फरक म्हणजे माणसाला बुद्धी प्राप्त झाली आहे. फूल उमलण्याची क्रिया ही सहज असते. तसेच कल्पनाशक्ती व स्मरणशक्ती या निसर्गदत्त जाणिवा आहेत आणि त्या माणसांमध्ये परिपूर्ण आहेत. मूलतः आपली ज्ञानेंद्रियेच नव्हे तर आपलं सारं शिरीर पंचमहाभूतांचे बनलेले असते. या विश्वातील याच्चयावत वस्तूजात या पंचमहाभूतांतील कोणत्या तरी एक वा अधिक गुणाचेंच बनलेले असते. 

या विश्वाच्या उत्पत्ती सबंधित अनेक जणांनी संशोधन केले ते ही निसर्गाच्या सानिध्यात राहूनच.  मानवाने जी काही प्रगती केली त्या यशामागील खरे गमक मानव व निसर्ग मधील असलेला स्नेह म्हणा वा ऋणानुबंध हेच आहे. या संबंधित एक कथा सादर करतो.

एकदा चैतन्यरूपी ईश्वराला आपण अनेक व्हावे असे वाटले. त्यातूनच  एक शक्ती निर्माण केली. नंतर त्या शक्तीदेवीतून मिळालेल्या प्रेरणा तून महाकाय पंचमहाभूतें निर्माण केली. त्यांच्या चेहर्यावर आलेला आनंद व तेज पाहून शक्ती देवतेने विचारले, 'आज आपण फार खुषीत दिसत आहात, कारण सांगा की !  ईश्वराने उत्तर दिले. ' मी आज महाकाय अशी पंचमहाभूतें निर्माण केली आहेत.'  नंतर पंचमहाभूतांची वैशिष्टे व त्यांच्यी कार्ये व परस्पर समन्वय कसा असेल हे ही सांगितले आणि ईश्वर झोपी गेला.पण-

एका तासात त्याला जाग आली. तेव्हा शक्ती देवीने प्रश्न केला, ' आता कुठले काम काढले आहे ? ' त्यावर ईश्वर म्हणाला, केवळ पंचमहाभूतें निर्माण करून मला शांती मिळत नाही. माझे काम अपुरे आहे असे म्हणत घराबाहेर पडला. नंतर -- विविध वृक्ष, वेली ची निर्मिती करून आणि त्यावर विविध रंगी- बेरंगी फूले उमविली. त्या वृक्षांवर विविध आकार, व रंगाची अमृतमय फळे निर्माण केली. व्वा ! आता तर  सृष्टी चांगली सजवली आहे. असे स्वतःशीच बोलत  ईश्वर घरी परतला. शक्तीदेवतेने विचारले ' आज कुठली कामें केली ' असा प्रश्न विचारला. त्यावर ईश्वराने सृष्टी कशी सजवली आहे याचे उत्तर देऊन झोपी गेला.  आज ईश्वराला गाढ झोप लागली आहे असे शक्तीदेवीला वाटले खरे, पण लिगलीच ईश्वराला जाग आली. शक्ती देवीला अंतर्ज्ञानातून कळले की ईश्वराने हातात घेतलेल्याल्या कामात त्रुटी राहिल्या असाव्यात म्हणून त्या त्रुटीचे स्वरूप विचारले. त्यावर ईश्वर म्हणाला ' सृष्टी सजली आहे पण सृष्टीत हालचाल दिसत नाही.' ती निर्माण करण्यासाठी मी बाहेर जात आहे असे म्हणत ईश्वर बाहेर पडला. 
  
नंतर ईश्वराने विवाध आकाराचे, रंगाचे, जलाशयात राहणारे प्राणी, पाणी आणि जमिनीवर चालणारे प्राणी निर्माण केले. फक्त जमिनीवर राहणारे व चालणारे असे दोन पायाचे व चार पायाचे, विविध आकाराचे, रंगाचे,  विविध चाल असणारे, प्राणी निर्माण केले.  नंतर विविध आकाराचे जमिनीवरून  सरफटत चालणारे प्राणी निर्माण केले. नंतर रंगी-बेरंगी विविध आकाराचे,  विविध प्रकारचे आवाज, कुंजन करीत आकाशात स्वैरपणे विहार करणारे, आकर्षक व मोहक असे पक्षी निर्माण केले. आज ईश्वराने प्रचंड मेहनत घेतली. ईश्वराचा एक दिवस म्हणजे एक युग असते. ईश्वर आनंदाने घरी परतला. शक्ती देवीला आजच्या कामाचा तपशिल देताना ईश्वराचा आनंद ओसांडून वाहात होता. नंतर ईश्वर झोपी गेला. पण--- 

या खेपेस अर्ध्या तासातच जाग आली म्हणून शक्ती देवीने विचारले, 'आज झोपमोड लौकर कशी झाली ? यावर उत्तर देतांना ईश्वराच्या चेहर्यावर तणाव दिसत होता. तरी ही त्याने उत्तर दिले,  " देवी मी अतिशय सुंदर अशी सृष्टी निर्माण केली आहे हे खरेच; या सृष्टीत हालचाल करणारे  अनंत पशू पक्षी निर्माण करून सृष्टीत movment आणली. पण मला आता या सृष्टीची देखभाल करणारा, improvment करणारा प्राणी निर्माण करावयाचा आहे. हे काम महा कठीण आहे. जी सृजन होते ती सृष्टी. पण ती लागलीच सृजन होत नसते. तिला टप्याटप्यात अधिक सुंदर करणारा, तिचे सरंक्षण करणारा, व ज्याला सौंदर्याभिरूची असेल, असा बुद्धीवान प्राणी निर्माण करावा लागेल. तो प्राणी केवळ बुद्धीवान होऊन भागणार नाही. तो सृष्टी संबंधी सेन्सिटीव्ह असावयास हवा. सृष्टीची भक्ती करणारा असावा तसेच तो माझा शोध घेण्याचा (म्हणजे सतत माझे नामस्मरण करणारा) प्रयत्न करणारा असा जन्मास घालावयाचा आहे, असे  म्हणत ईश्वर घराच्या बाहेर पडला. प्रचंड मेहनत केल्यानंतर ईश्वराने सर्वात शक्तीमान, सर्वात बुद्धीमान, गुणी, असा प्राणी जन्मास घातला त्याचे नाव आहे मानव. 
  
वाघ, सिंह, हत्ती इत्यादी ताकदवान प्राणी असोत, वा आकाशात उडणारे पक्षी असोत, वा जलाशयात राहणारे जलचर प्राणी वा जमिनीवरून चालणारे व  सरपटणारे प्राणी असोत, वा जमिनीवरील सर्वात चपळ असे प्राणी असोत, माणूस आपली कार घेऊन चित्यापेक्षा अधिक वेगाने धावू शकतो. माणूस रेल्वे गाडीतून जमिनीवरून सरपटत प्रवास तो ही अधिक वेगाने करतो. माणूस जलाशयातून बोटीने प्रवास करतो. जलाशयात वा समुद्रात खोलवर असणार्या प्राण्यासोबत आपल्या पाणबूडीतून प्रवास करतो. आकाशात भरारी घेणार्या पक्षांप्रमाणे माणूस विमानातून प्रवास करतो. ताकदवान पशूपेक्षा यंत्राच्या साह्याने माणूस मोठाल्या इमारती बांधू शकतो, मोठाले वजनदार ब्रिज बांधू शकतो. सारांश मनुष्य ही ईश्वराची सर्वोत्तम निर्मिती आहे. माणसावर निसर्गाची कृपा आहे. 

वैदिक काळा पासून आपल्या संस्कृतीत ईशावास्यम इदं सर्वम् (चराचर सृष्टीत ईश्वर असतो) असे म्हटले जात आहे. वृक्षवेली आम्हां सोयरे असे तुकाराम महाराज म्हणाले आहेत. पर्यावरणासंबंधी आपल्या संतमहंतानी आपआपल्या साहित्यातून निसर्गाची निगा म्हणजेच चराचर सृष्टीला अधिकाधिक सृजन बनविण्याचे कार्य ईश्वराने मानवाकडे सोपविले आहे असा उपदेश केला आहे. निसर्ग सुद्धा ईश्वराचेच रूप. म्हणूनच आपण निसर्गाला ही देव समजून त्याची पूजा करतो. अवकाशातील ग्रह-तारे नक्षत्रांची ही आपण पुजा करतो. आप,तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी या पंचमहाभूतांची ही आपण पुजा करतो. आपल्या संस्कृतीत ऋतुमानानुसार उत्सवांची व सणांची मांडणी केली आहे. त्या पाठीमागचा हेतू हाच की त्यायोगे निसर्गातील प्रत्येक घटकात समन्वय व्हावा, सतत समतोल राहावा आणि कुठल्याही नैसर्गिक संपत्तीला ओरबडून काढण्याचे व्यसन न लागावे इतकीच किमान अपेक्षा ईश्वराला त्याच्या सर्वात लाडका अशा अपत्याकडून आहे. 
                                      क्रमशः--










शुक्रवार, १७ मे, २०२४

लोकसभा निवडणूका- २०२४ इंडी आघाडीच्या प्रचाराच स्वरूप मुस्लीमांच तुष्टीकरण व हिंदू हिताकडे दुर्लक्ष (भाग- ५ व ६)

स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षांच्या काही नेत्यांनी राजकारण हा समाजसेवेचा मार्ग न मानता आपला स्वतःचा धंदा मानला. वाडवडिलांचा धंदा, व्यवसाय हे एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे, पुढे तिसर्या पिढीकडे चालत आलेले असतात. ही मानवाची स्वाभाविक प्रवृत्ती. त्यात अनेक प्रकार आहेत. मानवी जीवनाचा इतिहास पाहता सम व्यवसायी लोक समूहात राहणे पसंत करू लागले. या व्यवस्थेचं नाव वर्ण व्यवस्था. वर्णव्यवस्था म्हणजे जातीव्यवस्था नव्हे. या संबंधीत अधिक माहिती चातुर्वण्यम् मया सृष्टी गुणकर्मविभागशः या शिर्षकाचा माझ्या ब्लाॅग वरील लेखात आहे, ती आपण वाचू शकता.

मुद्दा हा आहे की वडील डॉक्टर असले की मुलगा डॉक्टर बनणे, वडील दुकान चालवत असतील तर पुढची पिढी दुकान चालविणे अशी जी स्वाभाविक वृत्ती असते तीला समाज मान्यता देत असतो. राजकारण हा धंदा किंवा व्यवसाय नव्हे. 

राजकारणातील घराणेशाहीला समाज मान्यता देतो पण आमदारकी, खासदारकी पूरता सिमीत असणे आवश्यक आहे. पक्षच एखाद्या परिवाराच्या मालकीचा होणे हे फार घातक ठरू शकते. राहूल गांधीचा पिंड राजकारणाचा नसावा. यावर मी एका लेखात सविस्तरपणे लिहले आहे. केवळ बापजाद्यांनी राजकारण केले म्हणून चौथ्या पिढीतील मुलांना राजकारणात पाठविणे अन्यायाचे ठरते. कारण त्यांच्या कडे राजकारण क्षेत्रात काम करण्यासाठी असलेली गती व मती पूर्णतः लोप झालेली असते. हा निसर्गाचा नियम आहे. 

राजकारणात घराणेशाहीचा उदय प्रथम काँग्रेस पक्षात झाला. स्वाभाविकतः काँग्रेस पक्षांची जी पिल्लावळ आहे अशा प्रान्तीय पक्षांत ही, ती शिरली यात नवल ते कसले ? राजकारणातील आपली घराणेशाही जिवंत ठेवावयाची असेल तर हिंदू समाजातील जाती-जमातीमध्ये भांडणे लावण्याची क्लुप्ती लढविणे क्रमप्राप्त ठरते. हा वारसा काँग्रेसला अर्थातच ब्रिटीश राजवटीकडून देणगी रूपात मिळालेला. तसेच प्रजेची हिंदू व अहिंदू अशी ओळख व विभागणी, ही आपल्या देशावर दिर्घकाळ राज्य करण्यासाठी ब्रिटीशांनी अवलंबलेली नीती. जिचे नाव ' फोडा आणि झोडा ' असे आहे.

तीच नीती स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षाने स्विकारली. मग ज्या हिंदू बांधवाचे जबरदस्तीने धर्मांतर झाले अशा मुस्लिम व ख्रिस्ती बांधवांना अल्पसंख्यांकाचा दर्जा देणे, सोयी व सवलती देणे, जगभरातील मुस्लीम व ख्रिस्ती देशातील स्वयंसेवी संस्थातून मुस्लीम व ख्रिस्ती संस्थांना मिळणार्या अपाम पैशाचा आकडा व त्या पैशाचा विनियोग कसा होतो यावर सोयिस्कर रित्या दुर्लक्ष करणे, त्या पैशातून अधिकाधिक हिंदू समाज बांधवांचे विविध प्रलोभने दाखवून धर्मातंर झाले, तरी त्यावर ही दुर्लक्ष करणे, इत्यादी क्लुप्त्या स्वातंत्र्यानंतर काॅग्रेसने ब्रिटीशांपेक्षा अधिक सराईतपणे वापरल्या. काॅग्रेसमधून बाहेर पडून ज्यांनी स्वतःचे पक्ष स्थापन केले अशा प्रांतीय पक्षांनी काॅग्रेसपेक्षा अधिक निर्लज्जपणे अल्पसंख्यांकाचे लाड करीत आहेत. 

इतकेच नव्हे हिंदूच्या मंदिरातील पैसा सरकार नैसर्गिक आपत्ती काळात उपयोग करते. त्यात ख्रिश्चन व मुस्लिम बांधवांना मदत देत असते. दोन भावांना सर्व बाजूने लाड करावयाचे व हिंदू भावाला सावत्र मुलासारखे वागविणे हे भारत मातेला तरी आवडेल का, याचा विचार सर्व राजकीय पक्षांनी करायला हवा. यातील विशेष बाब अशी आहे की साम्यवादी पक्ष देव धर्म मानत नाहीत तरी सुद्धा ख्रिस्ती व मुस्लीम समाजाचे लाड करतात पण हिंदू संस्कृतीचा द्वेष करीत असतात. ज्या राज्यात साम्यवादी पक्षांची सत्ता होती व आज आहे अशा केरळ राज्यात तसेच पुर्वीचा साम्यवाद्यांचा बालकिल्ला असलेल्या पश्चीम बंगालमध्ये तृणमूल काॅग्रेस हिंदू संघटनांवर, अध्यात्मिक गुरू व संस्था आणि संघ परिवाराचा पराकोटीचा छळ करीत आहेत. मोदी सरकार कुठल्याही अल्पसंख्याकांवर अन्याय करीत नाही आणि करणार ही नाही. पण हिंदू हिताकडे दुर्लक्ष व अन्याय करणारे पक्ष, विदेशी संस्था, नक्षलवादी, व दशहतवादी इत्यादी मंडळींवर कडक कारवाई मोदी सरकार करेल असे दिसते.

काँग्रेस असो वा प्रान्तीय पक्ष असोत भाजपाने अल्पसंख्याकांच्या लांगूनचालनावर आक्षेप घेतला की भाजपा सांप्रदायिक पक्ष आहे असे एकमूखाने टिका करीत राहिले. पण अती तिथे माती या न्यायानुसार हिंदू समाज जागरूक होत गेला आणि सन २०१४ ला केंद्रात भाजपाचे सरकार आले आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान पदी विराजमान झाले. स्वातंत्र्यानंतर राजकारणात धार्मिक, व जातीय धृवीकरण कोण करीत आले आहे हे गेल्या दोन लोकसभेच्या निवडणूकां च्या प्रचारातून व निवडणूकांच्या निकाला द्वारें स्पष्ट झाले आहे.

मुलतः सर्वधर्मसमभाव व समाजवाद या दोन्ही कल्पना विदेशी बनावटीच्या आहेत. भारतात प्राचीन काळापासून गुण्यागोंविदाने राहणे ही एक स्वाभाविक वृत्ती मानली जात होती. पारशी, ज्यू, तसेच युरोपातून व्यापार करणारे फ्रेंच, इंग्लीश, पोर्तुगिज, डच इत्यादींना व्यापारासाठी आपल्या समाजाने कधी विरोध केला नाही. उलट स्वागतच केले. यापैकी युरोपियन व मध्ययुगातील इस्लामी आक्रमकांनी आपल्या समाजाच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला. तसाच गैरफायदा स्वातंत्र्यानंतर सत्ताधारी काँग्रेस पक्षाने नवीन रूपात घेणे सुरू ठेवले आणि आज ही तीच वृत्ती काँग्रेस नेत्यांची अनुभवयास येत आहे. कारण काँग्रेसची सुत्रे नेहरू-गांधी घराण्याकडेच राहिली. शेवटी आधूनिक शरीर विज्ञान, तंत्रज्ञान व डीएनए थेअरी याहून अधिक वेगळे काही सांगत नाही आणि उपाय देत नाही. त्यामूळेच काॅग्रेस लयास गेली आहे.

दुर्दैवाने इंडी आघाडी घटक पक्षांची अल्पसंख्याकांना प्रलोभने दाखवित मतें मागण्याची जी खोड आहे ती काही केल्या जात नाही. त्यातून जे धृवीकरण होत आहे त्याला भाजपा जबाबदार आहे असा आरोप करणार्या लिबरल मिडीया हाऊसेस मूळे विरोधी पक्षांचा माज कमी होण्याऐवजी वाढतो आहे. त्यातूनच देशातील लोकसभा पासून ते ग्रामपंचायत स्तरावरील प्रत्येक निवडणूकीतल्या प्रचाराची पातळी घसरविण्याची सुरूवात विरोधी पक्षांचे नेतेच करताना दिसत आहेत. देशाच्या दुर्दैवाने त्यात अग्रणी स्थानावर राहूल गांधी आहेत, ज्यांचे गुरू सॅम पित्रोदा आहेत. आजच्या काँग्रेसच्या या नेत्याचे व त्यांच्या गुरूचे वागणे, बोलणे पाहता, ' सुनो गुरू ' या काव्यसंग्रहात श्री रमेश श्रीवास्तवांनी महात्मा गांधीजींना उद्देशून मांडलेल्या पंक्ती आठवल्या आहेत. त्या येथे मांडून या भागाची समाप्ती करतो.

" मेरा दावा है बापू

तू आज अगर जिंदा होता,

तो गोडसेकी गोलीसे मरता न मरता

आत्महत्या जरूर कर लेता

आत्महत्या जरूर कर लेता || "

                                     क्रमशः-

---------------------------------------------

   लोकसभा निवडणूका २०२४

 इंडी आघाडीच्या प्रचाराचं स्वरूप        मुस्लिम समाजाचं तुष्टीकरण व      हिंदू हिता कडे दुर्लक्ष (भाग-५ व ६)

            (भाग-५ व भाग-६)

आपल्या लेखात डॉ. शरदजी हेबाळकर, ट्राॅटस्की नावाच्या रशियन साम्यवादी नेत्याने जे काही म्हटले होते ते आपल्या समोर मांडतात. " Only in a socialist society can the average humanity rise to the level of Plato and Marxs."

(" केवळ समाजवादी रचनेतून प्लेटो आणि मार्क्स यांनी सांगितलेल्या आर्थिक पातळीवर सर्वसामान्य मानव पोहचेल ") यावर थोर समाजवादी विचारवंत लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी जे म्हटले, ते विचारप्रवृत्त करणारे आहे. असे सांगत डॉ. शरदजी हेबाळकर पुढे लिहतात, जयप्रकाश नारायण यांनी घोषित केले,

" However some years back, it became clear to me that socialism as we understand it today can not take mankind to the subline goal of freedom, equality, brotherhood and peace." 

( " काही वर्षापुर्वी माझ्या हे स्पष्टपणे लक्षात आले की, आम्ही समजतो तो समाजवाद मानवी जीवनात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, आणि शांती यांची प्रतिष्ठापना करू शकत नाही.")

डॉ. शरदजी म्हणतात, " ही काही समाजवाद आणि साम्यवाद याचींच केवळ शोकांतिका नाही. वैचारिक परिवर्तनाच्या दृष्टीकोनातून या घटनाचा वेध घेतला पाहिजे, असे म्हणत त्यांनी हा विचार अधिक स्पष्ट होण्यासाठी प्रख्यात विचारवंत एम एन राॅय, यांनी केलेला विचार मांडला आहे तो असा आहे.

'' Until the intellectual, cultural, spiritual autmospere of the country was changed, it was not possible to bring about a political and economical reconstruction of the country." (" जोपर्यंत वैचारिक, सांस्कृतिक व अध्यात्मिक वातावरणात परिवर्तन होत नाही, तो पर्यंत देशाची आर्थिक व राजकीय पूनर्रचना करणे शक्य नाही ")

" आर्थिक काय किंवा राजकीय काय, पुनर्रचनेचा पाया हा वैचारिक, सांस्कृतिक व अध्यात्मिकच राहणार. वैचारिक क्रान्तीच्या परिभाषेत सांगायचे तर स्वामी विवेकानंद कट्टर समाजसुधारक होते, पण " गर्वसे कहो, हम हिंदू है " हाच परिवर्तनाचा, समाज सुधारणेचा व राष्ट्रोन्नतीचा पाया आहे, याच्याशी त्यांनी तडजोड केली नाही. रूढ अर्थाने संन्याशाला धर्म नसतो, नाव नसते. स्वामी विवेकानंद हे संन्यासी होते."

पुढे डॉ.शरदजी, योगी अरविंदानी त्यांच्या सुप्रसिद्ध उत्तरपाडा भाषणात धर्म, राष्ट्र व राष्ट्रीयता यांची जी निःसंदिग्ध कल्पना मांडली होती ती आपल्या समोर ठेवतो.

" सनातन धर्मच आमच्याकरिता राष्ट्रयिता आहे. हिंदू राष्ट्र सनातन धर्माला घेऊनच निर्माण झाले आहे. त्याला घेऊनच चालले आहे आणि घेऊनच वाढत आहे. जेव्हा सनातन धर्माची हानी होते , तेव्हा या राष्ट्राचीही अवनती होते. सनातन धर्म हीच राष्ट्रीयता आहे."

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याहून वेगळे काही मांडले नाही. संघ परिवारातील ज्या संस्था आहेत, त्यातलाच एक सदस्य भाजपा आहे. लालू प्रसाद यादव, उदयनिधी स्टॅलीन, राहूल गांधी व त्यांचे गुरू सॅम पित्रोदा, शरद पवार इत्यादीं नेते मंडळी ज्या पद्धतीने हिंदुत्व, सनातन धर्म, पंतप्रधानावर, संघावर व भाजपावर टिका करीत आहेत त्यातून त्यांच्या पक्षांचेच नुकसान होणार आहे हे निश्चीत.

याच लेखात डॉ. शरदजींनी माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय प्रमोद महाजनांना आलेला अनुभव मांडला आहे. आणिबाणीच्या काळात भूमीगत असताना प्रमोद महाजन प्रख्यात विचारवंत कै नरहर कुरूंदकर यांना भेटावयास गेले होते. चर्चेच्या ओघात कुरूंदकर त्यांना म्हणाले, " संघावर बंदी घालून श्रीमती इंदिरा गांधी यांनी चूक केली." प्रमोद महाजन यांनी प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे पाहिले. कुरूंदकर पुढे म्हणाले, " त्यांच्या (इंदिराजींच्या) हे लक्षात आले नाही की संघावर बंदी घालणे, म्हणजे हवेवर बंदी घालण्यासारखे आहे. समुद्राच्या लाटांवर बंदी घालण्यासारखे आहे. "

डॉ. शरदजींनी प्रमोद महाजनांना आलेला अनुभव वाचल्यानंतर मला कुठेतरी माझ्या वाचनात आलेली काही माहिती आठवली. ती मी आपल्यापुढे ठेवतो आहे. ' आपल्या आयुष्याच्या अखेरीस विख्यात अष्टपैलू विचारवंत आचार्य अत्रेंजींना भारतीय जंनसंघांची (म्हणजे आताच्या भाजपाची ) राजकीय भूमिका देशाच्या हिताची वाटल्यामुळे ते जनसंघाच्या व्यासपिठावर प्रमूख अतिथी म्हणून उपस्थित होते. ' 

इतकेच नव्हे तर देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू जे पक्के समाजवादी व सर्वधर्मसमभाव विचारसरणीचे असुनही आयुष्याच्या अखेरीस सन १९६१ मदुराई येथील काँग्रेस अधिवेशनात त्यांनी हिंदु संस्कृती संबंधीत गौरवौद्गार काढत स्वतःची चूक मान्य केलेली आहे.

डॉ. शरदजी आपल्या लेखात लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी ३ नोव्हेंबर १९७७ ला पाटण्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्गात स्वयंसेवकां समोर जे भाषण दिले ते असे आहे --

" तुम्ही सर्वजण शीलसंपन्न आणि सदगुणसंपन्न असून निष्ठापुर्वक कार्य करण्यासाठी प्रतिज्ञाबध्द झाला आहात, याची मला जाणीव आहे. आपल्या देशाला तुम्ही नवा आकार द्यावा आणि नवभारताचे शिल्पकार बनावे अशी माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे. आपल्या प्राचीन सासंकृतिक वारसाचे सामर्थ्य तुमच्या पाठिशी आहे. आजच्या घडीला आपल्या देशात जे परिवर्तन घडत आहे त्याच्या आघाडीला तुम्हीच आहात. तुमच्या संघटनेशी तुलना करता येईल अशी अन्य कोणतेही संघटना नाही. हे मला ठाऊक आहे. "

वाचक मित्र हो, आपल्या देशात देश व राष्ट्र म्हणजे काय तसेच हिंदू, हिंदूत्व, सनातन संस्कृती यावर एक वाक्य लिहू न शकणारी,एक वाक्य बोलू न शकणारी घराणेशाही पक्षांचे अनेक वारस आज देशभरातील प्रत्येक राज्यातील राजकारणात प्रमूख म्हणून दिमाखाने वावरत आहेत. ही मंडळी वर नमूद केलेल्या थोर पुरूषांचे नातू नात शोभतील अशी आहेत. इतकेच नाही तर वर नमूद केलेल्या थोर साम्यवादी व समाजवादी महानुभवाचा वारसा घेऊनच इंदिराजी, शरद पवार, लालू प्रसाद यादव, मुलायमसिंग यादव, स्टॅलिन इत्यादींनी राजकारण केले. आज त्याच बापजाद्यांची राजकारणातली सद्दी का संपत आली आहे, याची कारणें शोधण्याचा प्रयत्न राहूल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, सुप्रिया सुळे, उदयनिधी स्टॅलीन इत्यादींनी केला असता तर बदलत्या काळाची पावले त्यांना थोडीफार तरी समजली असती. उठसूठ मोदी, भाजपा आणि संघावर टिका करून निवडणूका जिंकण्याचा काळ संपला आहे हे लक्षात ठेवावे.

लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी सन १९७७ ला पाटण्यातल्या शिबिरात ज्या युवक संघ स्वयंसेवकांचे कौतूक केले त्यातील काही स्वयंसेवक आज भाजपात उच्चपदावर तसेच केंद्र सरकार व भाजप शासीत राज्यात मंत्रीपदावर कार्यरत आहेत. म्हणूनच भारताची सर्वच क्षेत्रात जगातील महाशक्ती कडे लाटचाल होत आहे.

--------------------------------------------


लोकसभा निवडणूका- २०२४ इंडी आघाडीच्या प्रचाराचं स्वरूप मुस्लीम समाजाचे तुष्टीकरण व हिंदू हिताकडे दुर्लक्ष (भाग-३ व ४ )

 

श्री अच्यूत मेनन यांनी आद्य शकंराचार्यानी चारी दिशांना स्थापन केलेल्या चार पिठाची स्थापना म्हणजे एक प्रकारे Indian Nationalism is reality यावर शिक्कामोर्तोब केले आहे. असे असूनही तथाकथित साम्यवादी व समाजवादी मंडळींनी अच्युत मेनन यांनी मांडलेला इंडीयन नॅशनलइझम स्विकारला का नाही ? याची कारणें सर्वश्रूत आहेत. विद्यमान समाजवादी व साम्यवादी मंडळींची मानसिकताच अशी झालेली आहे की, जो पर्यंत विदेशात बसलेल्या आपल्या बाॅस मंडळींनी इंडीयन नॅशलिझमची व्याख्या केली नाही, तो पर्यंत आपण ती मुळीच स्विकारायची नाही एवढेच काय ते त्यांना कळते. यालाच वैचारीक गुलामी म्हणतात. देश स्वतंत्र झाला पण ही मंडळी मानसिक दृष्ट्या पारतंत्र्यातच आहे.

भारतिय संस्कृतीस संमिश्र संस्कृती मानणार्या या महाभागांना संस्कृती (कल्चर) आणि सभ्यता अथवा नागर सुधारणा (सिविलायझेशन) या मधील फरक समजला आहे पण तसे मान्य करावयाचे नाही असा आदेश यांच्या विदेशी बाॅसचा असावा का? की विदेशी शक्ती कडून मिळणार्या पैशाचा याना असलेला हव्यास कारणीभूत ठरत आहे का? सोन्याच्या लंकेचाही हव्यास न ठेवणार्या श्रीरामाचा आदर्श ठेवण्यावर येथील संस्कृती व समाजाचा जीवंतपणा अवलंबून आहे. भारतावर आक्रमण करणार्या बाबर-अकबर आणि व्यापाराच्या नावाने आलेल्या इंग्रज, पोर्तूगीज, डच इत्यादी युरोपियन साम्राज्यवादींच्या तसेच लिबरल नावाचे पाघंरूण घेऊन आपल्याला आर्थिक गुलामीत टाकू इच्छिणार्या माओ, मार्क्स, लेनीन यांच्या वंशजावर वा शिष्यांवर आपली संस्कृती अवलंबून नाही.

सभ्यता किंवा नागर सुधारणा काही प्रमाणात संमिश्र आहे पण ती साधनमात्र आहे. इलेक्ट्रीक बल्ब आपण वापरतो पण घरातल्या देवघरात निरंजनच वापरतो की ! कारण निरंजनाच्या शीतल प्रकाशात देवाच्या मुर्तीचे दर्शन घेताना एक वेगळं वातावरण तयार झालेले असते. शेवटी देवघरातली निरांजन हे नैतिक मुल्यांवर आधारीत असलेल्या आपल्या सांस्कृतिक प्रतिकापैकी एक प्रतिक आहे. दिवा म्हणजे ज्योत तेल आणि वात यांचा समन्वय. म्हणजेच ज्ञानयोग, भक्तीयोग, आणि कर्मयोग यांच्या मधील समन्वयाचे स्वरूप आहे. नैतिक मूल्यें ढासळली की ऐहीक प्रगती ढासळते.

आपल्या देशाचा भौतिक विकास आपल्या नैतीक जीवनमुल्यां च्या आधाराने होऊ शकतो याची प्रचिती केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर आपल्यालाच नव्हे तर जगातील बहुतांश देशांना आली आहे. त्यातील काही देशांना पोटदुखी सुरू झाली आहे. म्हणूनच काही विदेशी शक्ती भारतात मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येऊ नये यासाठी कार्यरत झाल्या आहेत. परंतु पंतप्रधान मोदींच्या सभांना सर्व राज्यातील देशबांधवांचा जो प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे त्यातून मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येईल असे दिसत आहे.

डॉ. शरदजी पुढे म्हणतात " वैचारिक गोंधळ कसे होते, याचे उदाहरण द्यायचे तर ' इंडियन नॅशनॅलिझम ' या शब्दाचेच घेता येईल. इंडियन नॅशनॅलिझम या शब्दाचे व्याकरणशुद्ध सरळ भाषांतर हिंदू राष्ट्रवाद असे होते. इंडिया हा शब्द इंडस, सिंधू, हिंदू या शब्दांचे नाते दर्शवीतो. 'भारत' या विशेषनामाशी नाही.' हिंदु,' हा शब्द संकुचिततेचे प्रतीक, व ' भारत ' हा शब्द सर्वधर्मसमभावाचे प्रतीक अशी कल्पना रूढ झाली. आज ही ती काही प्रमाणात आहे."

अशाच प्रकारचे भाष्य व्यवहारीक उदाहरण देऊन अमृतपथ याच ग्रंथात पृष्ठ क्रमांक २७ वर ' संघकार्याचा समाजव्यापी परिणाम ' या शिर्षकाचं संघाचे जेष्ठ नेते रंगा हरीजींशी झालेल्या चर्चेच्या शब्दांकनात वाचावयास मिळते. रंगा हरीजींशी झालेल्या चर्चेचे शब्दांकन अमृतपथ या ग्रंथाचे संपादक पद्मश्री रमेश पंतगे यांनी केले आहे. रंगा हरीजी यांनी काय म्हटले हे आपण आता पाहू या.

" दिल्लीत वकिलांचे एकत्रीकरण झाले होते. एका वकिलांने मला प्रश्न विचारला," हिंदू या शब्दाबाबत आपण एवढे आग्रही का आहात ?" यावर रंगा हरीजी म्हणाले, " रामायणात सीता शब्दाऐवजी मैथिली व जानकी या शब्दाचा ही वापर झालेला आढळतो. तिन्ही शब्द तसे समानार्थी आहेत. पण आपण मैथिली नगरात सीता दर्शनासाठी गेलो तर आपल्याला आढळेल की मैथिली हे तेथील लोकांच्या दृष्टीने सामान्यनाम आहे. मैथिली नगरातील याच्चयावत स्त्रियांना' मैथिली ' असे संबोधिले जाते. आपण मैथिलीचे दर्शन हवे असे न म्हणता जानकीचे दर्शन हवे असे म्हटले तर लोक आपल्याला जनक राजाच्या राजवाड्यात घेऊन जातील. आपण जनक राजाच्या राजवाड्यात गेलो तर आढळते कि जनकाच्या चार ही कन्यांना ' जानकी ' या सामान्यनामाने संबोधिले जाते. त्यातील सीतेला पाहावयाचे असेल तर सीता याच नावाचा आधार घ्यावा लागतो. कारण तेच खरे विशेषनाम आहे. सीता ही Focussed Identiy आहे. त्याच प्रमाणे आपण केवळ भारतीय व भारत असे म्हटले तर आपली विशेष ओळख होत नाही. "

रंगा हरीजी पुढे म्हणतात, " भारत ही Geograhical Identity आहे. येथील विभिन्न समाजातील लोकांना सामावून घेऊन भारतिय ही संज्ञा बनलेली आहे, ज्यात हिंदू , मुस्लिम , ख्रिश्चन इत्यादी सर्वांचा समावेश होतो ; पण भारतीय संस्कृती ही मुस्लिम संस्कृती आहे का? ख्रिश्चन संस्कृती आहे का? नाही ; तर भारतीय संस्कृती म्हणजेच हिंदू संस्कृती होय. म्हणून हिंदू हा शब्द Focussed Identity आहे, आणि त्याची स्विकारार्हता वाढत जात आहे. म्हणूनच काँग्रेस पक्षाला पश्चातबुद्धी झाली आणि त्याने आम्ही हिंदुत्वाच्या विरोधी नाही असा ठराव केला.

                                      क्रमशः-

                                               (सोबत भाग-४ खाली जोडला आहे )

 -------------------------------------------  लोकसभा निवडणूका-२०२४        इंडी आघाडीच्या प्रचाराचं स्वरूप  मुस्लीम समाजाचं तुष्टीकरण आणि    हिंदू हिताकडे दुर्लक्ष (भाग-४)


आम्ही हिंदुत्वाच्या विरोधी नाही असा ठराव काँग्रेसने केला खरा, पण सोबत आमचे हिंदूत्व भाजपा पेक्षा वेगळे आहे असे म्हणत आम्ही ' भाजपा सारखे अल्पसंख्यांकाच्या विरोधी नाही ' अशी पिढीजात भूमिका घेऊन पुन्हा ही मंडळी आपल्या मूळ मार्गावरच गेली आहे. जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही हेच खरें ! उदयनिधी स्टॅलीन यांनी सनातन संस्कृती संबंधीत केलेल्या वक्तव्याचा निषेध इंडी आघाडीतील पक्षांच्या एका ही नेत्याने केला नाही. यावरून ही मंडळीं विदेशी शक्तीच्या किती आधीन झाली आहे हे कळते. धर्मांध मुस्लिमांच्या वा ख्रिस्ती मिशनर्यांच्या हिंदू विरोधी भुमिकांचे खंडन न करता आपला जूना लांगूनचालनाचा कार्यक्रम काँग्रेसप्रणित इंडी आघाडीतील सर्वच पक्ष राबवीत आहेत. बहुतांश भाजपेतर पक्षांची हिंदू हिताकडे दुर्लक्ष करण्याची सवय हाच निवडणूकातला मुख्य मुद्दा होऊ लागलेला दिसत आहे.

माझ्या माहिती प्रमाणे आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्यापैकी एखादा धार्मिक समूह ५ टक्या पेक्षा कमी असेल त्यालाच अल्पसंख्यांक मानले जाते. भारतातल्या मुस्लीम समाजाची एकूण संख्या पाहता तो समाज सेकंड मेजाॅरिटी ठरतो. इतकेच नव्हे तर आपल्या देशातील मुस्लीम व ख्रिस्ती राजवटीच्या अगोदर जे कोणी राहात आहेत ते एका परिने सर्व हिदूंच आहेत. कारण मुस्लीम व ख्रिस्ती आक्रमकांनी ज्या हिंदूचे जबरदस्तीने धर्मांतर केले, अशा सर्वांच्या अनेक पिढ्यां येथेच जन्मल्या आहेत आणि येथेच वाढल्या, आणि या पुढेही जन्मतील, आणि वाढत जाणार आहेत. त्यांची फक्त उपासना पद्धत बदलली हे सत्य आहे. त्याबद्दल कोणा ही हिंदूचा आक्षेप नाही. पण वख्त बोर्ड सारखी संस्था काय करतेय

दिसली सरकारी जमीन             रात्री-अपरात्री केली काबीज |      लावला फलक वख्त बोर्डचा     करतेय बिन भांडवलीचा धंदा ||

दुसर्या टोकाला ख्रिस्ती मिशनर्यांचा सेवेच्या नावाखाली गरीब आदिवासी हिंदूना फसवून त्यांचे धर्मांतर करण्याचा धंदा आज ही चालू आहे. असले प्रकार पाहून हिंदू समाज नाराज होणे हे ही स्वाभाविक आहे. हिंदु हिताकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण काँग्रेसला महाग पडेल असे काँग्रेसचे जेष्ठ नेते बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगिळांनी सन १९९७-९८ दरम्यान जाहीर रित्या सांगितले होते. त्यांचे ते वक्तव्य दैनिक म. टा. वृत्तपत्रात वाचल्याचे मला आठवते. याचे कारण बॅ विठ्ठलराव गाडगिळांच्या त्या वक्तव्यावर ' सर्वधर्म समभाव व राजकीय पक्षांचा व्यवहार ' या शिर्षकांचा माझा लेख दुसर्या आठवड्यात दैनिक लोकसत्ताने छापला होता. काँग्रेसच्या श्रेष्ठींना विशेषतः राजीव गांधीच्या कारकिर्दी पासून अभ्यासक व विचारवंत काँग्रेसी नेत्यांची ॲलर्जी सुरू झाली. पुढे ती सोनीया - राहूल गांधीच्या काळात भौमितिक गतीने वाढत गेली. त्यामूळेच काँग्रेस कमकूवत होत गेली.

आपल्या देशात जबरदस्तीने ज्यांचे धर्मांतर झाले आहे अशा मुस्लीम समाजातील वर्गाची आणि ख्रिस्ती समाजातील वर्गाची टक्केवारी जवळपास ९५ टक्के असावी. अशांना अल्पसंखाकांचा दर्जा देऊ नये असे मला वाटते. अशांना उगीच हिंदू समाजाची भिती दाखविण्याचे प्रकार केवळ आपली मतपेटी तयार करणे हा विरोधी पक्षांचा धंदा होऊन बसला आहे. आपल्या देशात आश्रयाला आलेली पारशी व ज्यू मंडळी सुखासमाधाने राहात आहे ना ! शक हूण असे आक्रमक लोक ही आपल्या भारतीय संस्कृतीत समरस झाले आहेत ना ! मग मुस्लीमांचे सरकार तर्फे खास लाड हवेत कशाला? देशविभाजन झाल्यावर जर धर्माच्या आधारावर एका भागास पाकिस्तान मांनण्यात आले तर दुसर्या भागास हिंदुस्थान का मानण्यात आले नाही, लोकसंख्येची अदलाबदल सर्वत्र का केली नाही असे प्रश्न असंख्य नवमतदार आज विचारत असतात. याकडे ना इंडी आघाडीतील पक्ष लक्ष देत आहेत ना लिबरल पत्रकार व संपादक मंडळी लक्ष देत आहेत. ही मंडळी आजही हटवादीपणाने मुस्लीम समाजाचे लांगूनचालन करीत असतात.

श्री रंगा हरीजींनी, आपल्या देशात      ' भारत व भारतीय ' हे शब्द सर्वधर्मसमभावी या अर्थाने मानण्याची जी वृत्ती जपली आहे, त्यावरील प्रतिक्रीया म्हणून ' जग आपल्याला हिंदू म्हणून ओळखते, हे सत्य मुलाखतीत मांडले आहे. ते त्यांच्यात शब्दात खाली मांडून या भागाच्या शेवट करतो आहे.

" भारतात असे वातावरण असले तरी जगात कूठेही असे वातावरण नाही. जागतिक स्तरावर 'भारत' 'भारतीयत्व' या संकल्पना स्पष्ट होत नाहीत. तिथे सर्वत्र ' हिंदू ' शब्दानेच आपली खरी ओळख (identity ) होते. त्यामूळे हिंदू कल्चर, हिंदू पिपल्स, हिंदू फिलाॅसाॅफी, हिंदू इथाॅस या शब्दानींच भारताची खरी ओळख विदेशातील लोकांना समजते. "

जगभर भारतियांची हिंदू अशी ओळख आहे, तशाच प्रकारची भारतातल्या मुस्लीम बांधवाची मुस्लीम जगतात ' इंडीयन मुस्लीम ' अशी ओळख आहे हे ही माझ्या वाचनात आले आहे. एकदा जागतिक मुस्लीम ब्रदरहूड ची एका मुस्लीम देशात परिषद होती. त्या परिषदेत उपस्थित होण्यासाठी इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये मंत्री असलेले काँग्रेसचे नेते फकरूद्दीन अली अहमद (जे पुढे आपल्या देशाचे राष्ट्रपती झाले) तिथे आमंत्रणा शिवाय त्या परिषदेत उपस्थित होण्यासाठी गेले होते. त्यांना तिथे भारतिय मुस्लीम असे संबोधून प्रवेश दिला नव्हता. अशी बातमी वर्तमानपत्रातून वाचल्याचे मला आज ही आठवते आहे.

मी वरील घटना नमूद केली याचे कारण आपल्या येथील अल्पसंख्यांक मग ते मुस्लीम असो वा ख्रिस्ती यांचा दर्जा त्या धर्मीय जगतात हवा तसा सन्मानकारक नसेल तर त्या समाजाने ही भारतभूमी आमची जन्मभूमी आहे हे लक्षात घेऊन आपल्याकडे मतपेटी म्हणून बघणार्या पक्षांच्या प्रलोभनाला भूलून जाऊ नये. हाच खरा राजकीय व्यवस्थेतील धृवीकरणावरला एकमेव उपाय आहे, असे मला वाटते. इथे मी हा उपाय कुठल्याही राजकीय पक्षाचा तोटा व्हावा म्हणून मांडलेला नाही तसेच देशातला सारा मुस्लीम समाज व सारा ख्रिस्ती समाज राजकीय प्रलोभनास बळी पडतो असे ही मी मानत नाही. आपल्या देशात काही ठिकाणी बहुसंख्याक हिंदू समाज आणि धर्मातंरीत झालेले मुस्लीम व ख्रिस्ती बांधव गुण्यागोविंदाने राहात आहेत, सुखदुःखात परस्पर मदत ही करीत असतात. हे मी अनुभवत आहे. पण त्या अनुभवात आता घट होत आहे. याचे कारण ढोंगी लिबरल पत्रकार व संपादक मंडळींचा हिंदू संघटनांवर गोबेल्स तंत्रानुसार जहरी टिका करण्याच्या हटवादीपणा हे आहे.                         क्रमशः --

(विशेष सुचना - या लेख मालिकेचे भाग ५ व ६ स्वतंत्र पणे खाली आहे.)

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...