गेल्या ५ वर्षात महाराष्ट्रातील राजकारणावर मी ३८ लेख पब्लीश केले आहेत. या शिवाय 'केंद्र-राज्य संघर्ष - महाराष्ट्र ते दिल्ली व्हाया बंगाल' ' या लेखमालेतही महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा मांडली आहे. ' शिवसेनेतील फूट की काळाने शिवसेनेवर उगारलेला सूड ?' 'उद्धव ठाकरे खलनायक ठरत आहेत का?' ' शिवसेनाने गमाविलेल्या संधी, ' ' शरद पवार ना चाणक्य ना वारकरी फक्त संधीसाधू राजकारणी, 'राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट आणि घराणेशाही पक्षांची पडझड , सरकारचे डोके ठिकाणावर आहे का , इत्यादी शिर्षकाचे लेख त्या ३८ लेखात आहेत. तसेच ' राजकीय पक्षांच्या दिशा व दशा ' या शिर्षकाची राष्ट्रीय तसेच प्रान्तीय पक्षांची वर्तमान व भविष्याची स्थिती ती राज्यनिहाय एक लेखमाला ही पब्लीश केली आहे. त्यामूळे मागील दोन तीन महिन्यात राजकारणावर अधिक काही लिहावे असे मला वाटले नाही. म्हणून मी राजकीय लेख लिहणे थांबविले होते.
मविआचा धुव्वा का उडाला याची छोटी-मोठी अनेक कारणें आहेत ती माझ्या कुवतीनुसार आपल्या समोर ठेवावीत म्हणून मी लेखमालिका लिहावयास घेतली. त्यातील काही कारणें अशी आहेत की ते पुढील २० ते २५ वर्षे मविआ व इतर विरोधी पक्षांचा पिच्छा सोडणार नाहीत. ती महत्वाची अशी आहेत-
१) माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे नेते पी चिंदबरम यानी भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीवर खोट-नाटं व सर्वात गंभीर असे भगवा दशहतवादाचे नॅरेटिव्ह तयार करून युपीए सरकारच्या काळात सनातन साधु-संताचा केलेला छळ मतदार विसरले नाहीत.
२)युपीएच्या राजवटीत (सन २००४ ते २०१३ मध्ये) न भूतो न भविष्य असा झालेला प्रचंड भ्रष्टाचार मतदारांच्या स्मरणात आज ही आहे.
३) उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते वेळी पोलीस यंत्रणेचा उपयोग पत्रकार- संपादकांना फरफटत कस्टडीत ठेवणे, रहस्यमय हत्या घडविणे व अशा हत्या नैसर्गिक मृत्यु दाखविण्याचा सपाटा, भ्रष्टाचार, सर्वत्र १४४ कलम लावले असताना कोरोना च्या साथीत पालघरला जमावाने केलेल्या दोन साधुंच्या निर्घूण हत्या
४)कोरोनो काळात औषधोपचार मध्ये झालेला भ्रष्टाचार तसेच छोटे-मोठ्या घटनांवर पडदा घालणे इत्यादी पापकृत्यांनी भरलेला उद्धव ठाकरे सरकारचा कारभार हे एक गंभीर कारण लोकांच्या स्मरणात होते.
५) सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींवर भर सभेत 'मोतका सौदागर' असे म्हणत देशातील राजकारणाला दिलेले सुडाचे स्वरूप.
६) सोनिया गांधीचे युवराज राहूल गांधी, केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादींवर जाहीर सभेत फार जहरी भाषेत टिका करीत असतात. राहूल गांधी फक्त आपल्या देशात नव्हे तर इतर देशात जातात तेव्हा ही आपल्या देशाच्या प्रत्येक व्यवस्थेवर निरंतर टिका करीत असतात. हा शहाणपणा नाही आणि बालीशपणा ही नाही. त्यांचे मानसिक संतुलन वेळोवेळी ढासळते की काय अशी शंका येते.
सूड भावना ही एक प्रकारे अजगरासारखा विळखा घालून आपल्याला कमकुवत करत असते याचे भान राजकीय नेत्यांनी विशेषतः राहूल गांधी, उद्धव ठाकरे, नाना पाटोळे, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, स्टॅलीन, अरविंद केजरीवाल, आणि डाव्या पक्षांचे नेते व कार्यकर्ते (जे नक्षलवाद्यांना पाठींबा देतात) ठेवावयास हवे.अन्यथा राजकीय नेत्यांची आचार विचार आणि निर्णय घेण्याच्या ज्या शक्ती देहात विराजमान आहेत त्या सैरभैर होण्याची शक्यता असते. अशा स्थितीतून अराचजकतेचा जन्म होतो. असे जागतिक इतिहास सांगतो. काही इतिहास तज्ञ, राजकीय व सामाजिक अभ्यासक व चिंतनकार आपल्याला इशारावजा सल्ला देत असतात, ते चूकीचे नाही.
आपला महाराष्ट्र 'पुरोगामी विचाराचा, सर्वधर्मसमभाव बाळगणारा, शाहू फूले, आणि आंबेडकरांचा ' असा सततचा घोष करणारी मंडळीच महाराष्ट्रात जातीवादाचे व मुस्लीमाचे तुष्टीकरण करण्यात गुंतले आहेत. सापाला दुध दिले तरी तो विषच ओकतो. असा अनुभव देशाच्या फाळणीतून आपण घेतला आहे. सर्वसमावेशकता अंगी बाळगणे निश्चीतच चांगली गोष्ट आहे पण अल्पसंख्याकांचे लाड करून त्यांना डोक्यावर बसविण्याची हाव जी विरोधी पक्षांना लागली आहे, ती देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करेल असे बहुसंख्यांक हिंदु समाजाला आता वाटू लागले आहे. हेच कारण आहे ज्यामूळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकाचा निकाल अनाकलनीय आला असावा असे मला वाटते. असेच मत मी, ' त्रिपूरा येथे अफवा आणि धुडघूस महाराष्ट्रात कसा ? ' या शिर्षकाचे २१ नोव्हेंबर २०२१ला पब्लीश केलेल्या दोन लेखात वाचावयास मिळेल.
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील राजकारण खालच्या पातळीवर आणून ठेवले आहे. अखिल भारतीय स्तरावर सोनिया गांधी व राहूल गांधी या जोडीने काँग्रेसची स्थिती खिळखीळी करून ठेवली आहे. महाराष्ट्रात सन २०१४ ला केंद्रात भाजपा प्रणित एनडीए सरकार अस्तित्वात आल्यापासून विरोधी पक्ष सैरभैर झालेले दिसतात. त्यामूळे ॲक्सीस इंडीया या संस्थेने महायुतीला महाराष्ट्रात १७५ पर्यंत जागा मिळतील असे जे भाष्य केले होते त्यावर लिबरल मंडळीनी दुर्लक्ष केलेले दिसले. ॲक्सीस इंडीया संस्थेने एकूण ७५ ओपिनीयन पोल केले आहेत. त्यापैकी ७० पोल खरे ठरले आहेत. याकडे दुर्लक्ष करून मविआ आता आंदोलनजिवीच्या मार्गावरून जाऊ इच्छीते. काय म्हणावे ? कुत्र्याचं शेपुट नळीत घातले तरी शेवटी वाकडेच राहते.
महाराष्ट्रत प्रथमच एकतर्फी मतदान झालेले दिसले अशी सबब मांडून विरोधी पक्ष चुनाव आयोगाच्या विरोधात मोर्चा, धरणे इत्यादी नाटकं करण्याचे सत्र सुरू केले, तरीही हाती काही यश येणार नाही. उलट न्यायालय मविआवर ताशोरे ओढतील. सामान्य मतदारांना ही ठाऊक झाले आहे की विरोधी पक्षांचे मोर्चे विदेशी शक्तीच्या साह्याने देशात अस्थिरता निर्माण व्हावी हाच हेतू असतो. मराठा आरक्षण, संविधान बचाव, किसान आंदोलन, वल्फ बोर्ड च्या मोहीम, गणेश व नवरात्र या दोन महोत्सवात मुस्लीम समाजाची दादागिरीने अडथळे आणणे, लव जिहाद, आतंकवादी घटना यांच्या पाठीमागे देशविदेशी लिबरल लाॅबीच आहे.
मुस्लीम समाजाचे तुष्टीकरण कागोदपत्री स्वरूपात मौल्लवी कडे सुपूर्त करण्यापर्यंत मविआ ची मजल पोहचली. मग 'सजग रहो', सौ टक्का मतदान करो, बटोंगे तो कटोंगे, एक है तो सेफ है इत्यादी प्रतिक्रीया येणे हे स्वाभाविक आहे. सन १९८८-८९ च्या दरम्यान काँग्रेसचे वरीष्ठ व विद्वान नेते बॅ गाडगिळांनी काँग्रेसला हिंदू हिताकडे दुर्लक्ष करणे महाग पडेल असा इशारा दिला होता. पण काँग्रेसने दुर्लक्ष केले. काल-परवा माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सुद्धा भगवा दशहतवादाचे खोटे नॅरेटिव्ह काँग्रेसने करावयास नको होते असे स्पष्टपणे म्हटले आहे.
क्रमशः-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा