संघ, भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी व निवडणूक आयोगावर दोष ठेवून काय साध्य होणार आहे ? सन २०१४ पासून लिबरल पत्रकार व राजकीय अभ्यासक सतत विदेशी धनशक्तीच्या साह्याने नेगेटिव्ह नॅरेशनाच्या आधारे विरोधी पक्षांना आधार देत आहेत. असा आधार म्हणजे वजन वाढविण्यासाठी एखाद्या पेंशटला औषधें दिल्यासारखे आहे. त्यातून वजन वाढते पण त्यातून तो पेंशट बलवान व शक्तीवान होतोच असे नाही ? पण मविआच्या नेतेमंडळींनी तो पेंशट वृद्ध होत नाही असा समज करून घेतला. ही एक प्रकारे राजकीय क्षेत्रातली अंधश्रद्धा ठरली. आश्चर्य असे की तथाकथित पुरोगामी, उदारमतवादी व अंधश्रद्धा निर्मुलनाचे शिल्पकारांची ही स्थिती ! लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण !
गेल्या लोकसभेच्या निवडणूकाच्या प्रचारात ' संविधान बचाओ ' असे नेगेटिव्ह नॅरेशनचा वापर करून दलीत, पिडीत मतदारांत संभ्रम झाला पण तो तात्पुरता टिकला.भाजपाचे संसदेतील संख्याबळ कमी झाले पण तेच नॅरेटिव्ह राज्यातील विधानसभा निवडणूकात उपयोगी पडेल अशी भ्रामक समजूत मविआने करून घेतली. हे ही एक महत्वाचे कारण आहे की ज्यामूळे अनाकलनीय असा निकाल लागला. महायुतीचा विजय व मविआचा पराभव होईल असे दिसत होतेच. मविआचा दारूण पराभव झाला एवढाच भाग काय तो आश्चर्यचा, नवलाचा व अनाकलनीय स्वरूपाचा आहे.
या व्यतीरिक्त इथे आणखिन एक मुद्दा मी मांडतो आहे जो हरियाणात आणि महाराष्ट्रात काँग्रेस प्रणित आघाडी ला महाग पडला. राहूल गांधीनी लोकसभेच्या निवडणूक प्रचारात संविधान नष्ट होईल म्हणून भाजपाला मत देऊ नका असे जे विधान केले होते , त्यात काही दम नव्हता. ते एक खोटं नॅरेटिव्ह होते हे लोकांना कळून आले. संसंदेच्या अधिवेशनात भाजपाचे तडफदार युवक खासदार अनुराग ठाकूर यांनी राहूल गांधीकडे नजर ठेवून ' भारतिय संविधान के कितने पृष्ठ है यह तो आप प्रथम बताये ?' असा प्रश्न भरगच्च खासदारांच्या उपस्थित संसंदेत विचारला तेव्हा राहूल गांधीना नानी आठवली असेल इतकी फजिती झालेली लोकांनी टिव्ही वरून पाहिलेली होती. म्हणे हे भारताचे भावी पंतप्रधान !
उबाठा च्या कार्यकर्त्यांना बोरीवली मतदार संघात भाजपाने बाहेरच्या उमेदवारांला का तिकीट दिले यावर हुज्जत घालावीसी वाटली पण इटालीयन सोनीया गांधीना काँग्रेसचे अध्यक्षपद का दिले, राजकारणाची जरा ही जाण नसलेल्या राहूल गांधीना काँग्रेसचे सर्वसर्वा केल्याबद्दल जाब विचारतात का? उबाठा सेनेचे प्रमूख उद्धव ठाकरे राहूल गांधी आणि सोनिया गांधीना वाकून नमस्कार करताना पाहतात तेव्हा ठाकरें चा राग का येत नाही ? स्व बाळासाहेब ठाकरे हिंदु हृदयसम्राट होते असे राहूल गांधी मानावयास तयार आहेत का असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदीनी जेव्हा जाहिरसभेत समोर ठेवला, त्यावर राहूल गांधीनी का उत्तर दिलेलं नाही. ते बाजूला ठेवू. पण उद्धव ठाकरेंचे भक्त काय करीत होते ? जे स्वतःला मर्द समजून घेत आहेत ते चूप का राहीले ? धिक्कार असो तुमच्या मर्दपणाचा व फुसक्या दादागिरीचा !
महाराष्ट्रातील मतदारांनी विधानसभा निवडणूका होण्याअगोदर संसंदेच्या अधिविशेनात भाजपाच्या अनुराग ठाकूर यांनी राहूल गांधीचा आवाज बंद केलेला पाहिला. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना खोलीतून बाहेर काढले होते, तेही विडीओतून पाहिले. आम्ही वाकणार नाही अशा फुसक्या गर्जना हवेतच विरल्या. अशा छोट्या छोट्या पण महत्वाच्या घटनातून ही मतदार कोणाला मत द्यावयाचे हे ठरवित असतो.
एकंदरीत जे अनाकालनीय घडले असे आपल्याला वाटते ते होणार होतेच. ते अटळ होते. ' करावे तसे भरावे ' हा निसर्गाचा नियम आहे. जेव्हा अनाकालनीयय घटना घडते व ती आपल्या विरोधात होते, तेव्हा त्यातील सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणे क्रमप्राप्त असते. पण मविआ चे नेते मंडळी एवीएम मशीनवर पर्यायाने केंद्र सरकार वर टिका करीत आहेत. म्हणे, भाजपा सरकार एवीएम मशीन मध्ये काहीतरी गडबड करून ठेवते आहे. हे विरोधी पक्षांचे रडगाणं न्यायालयाने या अगोदर फेटाळून लावलेले आहेच. अन्याय करणार्या, धातांत खोटे बोलण्यार्यांना सहानुभूती कधी मिळत नसते. उलट अशांचे पाय चिखलात आणखिन रूतत जातात व सर्वनाश होतो. मग ते क्षेत्र कुठलेही असो.
क्रमशः--
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा