वाचक हो, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार मध्ये जे दंद्व माजले आहे, त्याचे स्वरूप मला जसे दिसले, भासले त्यातून जे आकलन झाले, ते मी या लेखाच्या भाग १ मध्ये मांडले आहे. ही मांडणी म्हणजे मी दावा मांडला आहे असे नाही. ही घटना गंभीर स्वरूपाची आहे. या घटनेवरील राजकारण संपणार नाही. त्यामूळे या विषयावर चर्चा ही सुरू राहणार आहे. म्हणून या घटनेचा भौगोलिक तसेच निसर्ग नियम, मानसशास्त्र आणि सामान्य ज्ञानाच्या दृष्टीकोनातून पाहाता आपल्या हाती काय लागते यावर चर्चा करू या.
त्रिपुरात मशीदी जाळल्या, मुस्लीम बांधवांवर हल्ले झाले ही अफवा नसून सत्य घटना आहे असे आपण मानले तरी फक्त महाराष्ट्रातच दंगली कशा झाल्या हा प्रश्न शिल्लकच राहातो. त्रिपुरा देशाच्या ईशान्या टोकाला आणि महाराष्ट्र देशाच्या पश्चीम टोकाला म्हणजे जवळपास त्रिपुरा राज्याच्या अगदी विरूद्ध दिशेला. त्सुनामी, अतिवृष्टी, भुकंप, इत्यादी नैसर्गिक आपत्तीत जी राज्यें एकमेकांच्या शेजारी आहेत, ती राज्यें कमी अधिक प्रमाणात सापडली जातात हा आपला अनुभव आहे. We are all governed by the Laws of Nature. अग्नी, पाणी, प्रकाश, आणि वायु ही पंचमहाभूतापैकी चार. ही चार महाभूते प्रवाही आहेत आणि पाचवं आकाश नावाचं पंचमहाभूत हे एक माध्यम हे वैज्ञानिक आणि शाश्वत सत्य आणि आपण प्रत्यक्ष अनुभवतो. मानवी शरीर ही पंचमहाभूतांनी बनलेले असते. त्यामूळे मानवी मन जात्याच प्रवाही असते. मानव जेव्हा सुरक्षा तसे एकमेकांच्या अडचणीच्या काळात मदत होईल या कारणाने समुहात राहू लागला, तेव्हा त्या तशा समुहाला समाजाचं स्वरूप मिळालं. सामन्यतः समाज प्रवाह पतीत असतो. कपड्याच्या दुकानात किंवा चप्पलाच्या दुकांनात ' सेल, ४० टक्के सूट ' अशी पाटी झळकली की त्या दुकानात लोकांची तुबंड गर्दी आपण पाहातो. दंगल करण्याचा किंवा अफवा पसरविण्याचा उगम आपल्या मनात होतो. त्यामूळे दंगली सारख्या घटना ज्या राज्यात प्रथम होतात तेथून त्या शेजारील दुसर्या राज्यात, पुढे दुसर्या राज्याच्या शेजारील राज्यात म्हणजे तिसर्या राज्यात पसरत जातात. यातुनच तर ' दंगलीचे लोण ' असा शब्दप्रयोग आपण व्यवहारात वापरत असतो. याचा अर्थ त्रिपुरा येथे जर दंगल झाली असती तर त्याची झळ शेजारील राज्यांना पोहचली असती. म्हणजे दंगलीचे लोण प्रथम त्रिपुरा राज्याच्या शेजारील राज्यात पोहचायला हवे होते की नाही. तसे घडले नाही. म्हणजेच त्रिपुरात ना दंगली झाल्या ना मशीदी जाळल्या गेल्या हेच सत्य असावे.
आता सामान्य ज्ञान काय सांगते ते पाहू या. सर्वसाधारणतः आपल्या नात्यातील वा परिचयातील एखाद्या युवकाच्या अकस्मात मृत्युची बातमी आली की आपण ती बातमी खरी आहे की नाही याची खातरजमा करून घेतो की नाही? त्रिपूरात खरोखरीच मशीदी पाडल्या आहेत का, मुस्लीम बांधवांवर हल्ले झाले आहेत का याची खातरजमा रजा ॲकॅडेमीने केली होती का? समजा तशी खातरजमा रजा ॲकेडेमीने केली असती तर सत्यस्थिती कळली असती. जर त्रिपुरात दंगल झाली असती तर रजा ॲकेडमी सारखी संस्था जिचे ऑफीस मुंबईत आहे आणि ती मुस्लीम समाजाच्या फतवा काढण्याइतकी सक्षम आणि सर्वोच्च संस्या नसताना ती दंगलीची सुरूवात कशी करेल ? आणि महाराष्ट्रात सुरूवात का म्हणून करेल? त्रिपुरात दंगल झाली असतीच तर मुस्लीम समाजाच्या सर्वोच्च संस्थेने फतवा काढून या दंगलीची सुरूवात महाराष्ट्रात करण्याऐवजी, जिथे पुढील तीन महिन्यानंतर निवडणूका आहेत अशा उत्तर प्रदेश मध्ये केली असती की नाही ? वाचक हो आपल्या देशात झालेल्या धार्मिक दंगलीच्या इतिहासाच्या आधारे हे मी मांडले आहे.
आता आपण सामान्य ज्ञानाच्या दुसर्या कोनातून पाहू या. जर का रजा ॲकेडेमीने त्रिपुरात झालेल्या दंगलीची खातरजमा केली नसेल तर तिने आपली स्वाभाविक वृत्ती ठेचली असेल असे मानावे लागेल (कारण खातरजमा करणे ही सहज प्रवृत्ती.) पण तसे संभवत नाही. कारण स्वाभाविक वृत्ती वा प्रवृत्ती सहजा सहजी ठेचून काढता येत नाही. स्वाभाविक प्रवृत्ती वा विकृती म्हणा इत्यादीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रचंड तपस्या लागते. ती शक्ती आपल्या येथील फक्त अध्यात्मिक गुरू आणि संत-महंतानी प्राप्त केलेली आहे. रजा ॲकेडेमी ही तशी सामान्य संस्था पण शिक्षण आणि सेवा संस्था असल्यामूळे तिच्यात थोडा तरी चांगूलपणा टिकणारच. म्हणजे तिने थोडी फार का असेना, पण त्रिपुरात खरोखरीच दंगल झाली आहे का? खातलजमा केली असती आणि दंगल झाली असती तर दंगल करण्यासाठी रजा ॲकेडमी नसतीच, आणि दंगलीचं ठिकाण ही महाराष्ट्रीतील मुस्लीम बाहूल जिल्हे नसते. याचा अर्थ असा आहे की त्रिपुरात मशीदी नष्ट केल्या, मुस्लीम बांधवांवर हल्ले केले ही अफवाच होती. त्यामूळे रजा ऑकेडेमीला अफवाची खातरजमा करून घेण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. त्यामूळे अगोदर ठरल्याप्रमाणे महाराष्ट्रात रजा ॲकेडेमी तर्फे मोर्चा, बंद, दगडफेक आणि हिंदु बांधवांवर हल्ले झाले आहेत. ते काम रजा ॲकेडेमीने पार पडले असावे. कारण त्या संस्थाने आपले नाक नाही त्या ठिकाणी खुपसून मोर्चा काढून जवळपास तीन वेळा महाराष्ट्रात हिंसाचार आणि फोडतोड केली आहे. यावरून हे सारे प्रकरण भाजपा विरोधी पक्षांनी रचलेले एक कारस्थान आहे याबाबत दुमत नसावे असे मला वाटते.
या कारस्थानाच्या पाठीमागे एकूण चार हेतू असावेत. ते खालील प्रमाणे आहेत --
१) किसान आंदोलनातील हवा कधीच संपली आहे. त्यामूळे भाजपा शासीत एखादं राज्य बरखास्त करण्याची मागणी साठी कारस्थान करावे लागणार होते. त्यात त्रिपुरा राज्याची निवड केली आणि आगामी काळात जास्तीत जास्त विरोधी पक्षांना सामील करून बंद, मोर्चे इत्यादी नाटकांच्या संयुक्त कवायती करण्याची योजना तयार करणे.
२) महाराष्ट्रातील मविआ सरकाराच्या दुष्कृत्यांमूळे इभ्रतेचे जे धिंडवडे उडाले आहेत त्यावरून मराठी जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा हा प्रयत्न आहे.
३) दोन विदेशी शक्तीच्या लाॅब्यांचा एकत्रित उपयोग करून घेण्याची एक छोटीसी लिटमस टेस्ट यशस्वी करणें.
४)महाराष्ट्रात सरकार स्थापन केल्याचा जो प्रयोग उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी केला आहे त्यात काॅग्रेस पक्षाला गौण स्थान दिल्याने काॅग्रेसजन अगदी राहूल गांधी पासून ते महाराष्ट्रातील गाव पातळी पर्यंत नाराज आहेत. त्यासाठी एखादी सांप्रादायिक घटना, भाजपाने घडविली आहे असे भासवून भाजपाशी लढत देण्यासाठी एकत्र राहीले पाहीजे ही जाणीव काॅग्रेसला करून देणे.
वरील पैकी चौथ्या हेतू ची कल्पना काॅग्रेसला दिली नसली तरी त्या पाठीमागील कारस्थानाची कल्पना काॅग्रेसने हेरली नसेल इतके काॅग्रेसचे श्रेष्ठी खुळे नाहीत. शेवटी काॅग्रेसच भाजपा सोडून सर्व विरोधी पक्षांची आई आणि बाप आहे. यातील बाप हा शब्द काॅग्रेसच्या राजकारणाच्या दृष्टीने अधिक उचीत ठरतो. पण हे कारस्थान तर घडले आहेच त्यामूळे काॅग्रेसला त्रिपुरा सरकार विरूद्धच्या लढ्यात सामील व्हावे लागणार आहे तसेच महाराष्ट्रात ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत भाजपा विरूद्ध आखलेल्या टिका सिरीज मध्ये भाग घ्यावा लागेल. कारण मामला आहे हिंदू-मुस्लीमाचा. वस्तुतः मुस्लीम मतपेटीचा. म्हणजे तथाकथित पुरोगामी विरोधी पक्षांतर्गत स्पर्धेचा.
एकंदरीत या चर्चेअंती त्रिपूरा आणि महाराष्ट्रात जे कटकारस्थान रचले त्या पाठीमागील मास्टर माईन्ड शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅग्रेस हे पक्ष आहेत हा निष्कर्ष निघतो. याचे कारण असे आहे की त्रिपुरात दंगल पेटविण्याची यांच्यात धमक नाही. म्हणून तिथे ऑन लाईन वरून अफवा सोडून देण्याचे कार्य उरकले. आणि महाराष्ट्रात दंगल घडविली. कारण भारतातल्या सर्व विरोधी पक्षात शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅग्रेसचे अस्तित्व पणाला लागले आहे. दंगलीचे स्वरूप ही असे ठेवले होते की दंगलीची चौकशी आपल्या राज्याच्या गृहखात्यापर्यंत सिमीत राहील. या पाठीमागचे खरें कारण म्हणजे आगीशी खेळ करताना या दोन्ही पक्षांचे हात-पाय पोळून निघाले आहेत. त्यातच या दोन्ही पक्षांतील मंत्र्यांच्या भ्रष्टाचारांची प्रकरणे बाहेर आली आहेत. विद्यमान मविआ सरकारच्या काळात काॅग्रेसच्या एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. म्हणून ज्या मराठी मतदारांना भाजपाला मते द्यावयाची नाहीत त्यांच्यासाठी काॅग्रेस हा ऑप्शन चांगला आणि पसंतीचा होऊ शकतो. याच भितीमूळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची झोप उडाली आहे. एकदा खोटे बोलले की पुढे शंभर वेळा खोटे बोलावे लागते. तसेच एक कारस्थान केले की शंभर कारस्थान करावे लागतात. उद्धव ठाकरे आणि शरद पवार एकामागोमाग कारस्थाने करीत चालले आहेत. पण त्यासाठी शक्ती फक्त या दोन्ही पक्षांचीच खर्च होत आहे. म्हणून विरोधी पक्षांची आघाडी व्हावी असे शरद पवार काल म्हणाले आहेत आणि त्यांचीच री संजय राऊत ओढत आहेत आता त्यांच्या कपाळी हीच पाळी आली आहे. शरद पवारांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न नुसते भंगलेच नाही तर ते आता मोडून तुटून नवाब मलिकांच्या भंगारखान्यात जमा झाले आहे. तर उद्धव ठाकरेंना आपल्याच घरातील पितृस्वरूप वाघाची डरकाळी ऐकू येत नाही. कारण २०१९ च्या निवडणूका जाहीर झाल्यापासून त्यांच्या दोन्ही कानात सतत शरद पवार गुणगुणत आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे असे काही चक्रव्युहात अडकले आहेत की यांची अवस्था उत्तर प्रदेश मध्ये सपा आणि बसपाची झाली आहे तशीच होणार आहे, तर मविआ सरकारातील यांचा घटक पक्ष काॅग्रेसला महाराष्ट्रात उभारी मिळेल असे स्पष्ट दिसू लागले आहे.
बाकी महाराष्ट्रातील या दंगलीतील दोषींचा तपास, आरोपींची निश्चिती करून एफआयआर नोंदणे नंतर न्यायालयात खटला उभा राहणे इत्यादी गोष्टीसाठी एक वर्षाहून अधिक काळ जाणार आहे ही बाब आपल्याला अंगवळणी पडली आहे. पण त्रिपुरा सरकार मात्र अफवा मागील सत्य शोधण्याचा कसून प्रयत्न करणार आणि त्यात विदेशी शक्तीचा हात सापडला तर महाराष्ट्रातील दंगलीचा तपास एनआयए या केंद्रीय एजन्सीकडे जाईल. तेव्हाच कदाचीत महाराष्ट्र सरकार बरखास्त झालेले दिसेल. कारण मोदी सरकारने कृषी बिलें मागे घेऊन विरोधी पक्षांना निष्प्रभ केल्याची बातमी या लेखाची (भाग २) समाप्ती करतेवेळीच आली आहे. त्यावर चर्चा पुढच्या भेटीत करू या.
विष्णुजी,
उत्तर द्याहटवाआपले महाराष्ट्रांतील शुक्रवारी नमाज पठणानंतर झालेल्या हिंसक हल्ल्यांवरील दोन्ही लेख, त्यामागील सर्व पार्श्वभुमी व हकीगतींच सतर्क विश्लेषण करतांत. व त्या घडवण्यामागचे उद्देशही स्पष्ट करतात.
१ या मधे रझा आकादमीबरोबर पी एफ् आय्( आधीची बॕन् ड सिमी) सहभाग ही उघड झाला आहे
२ अशा प्रकारे हल्ले होण्याची ही तिसरी वेळ आहे, व तिनही वेळी राष्ट्रवादीचा गृहमंत्री असण हा निश्चितच योगायोग नाही.
३ पण या वेळी या मुस्लिम लांगुल चालनामधे शिवसेना, एकेकाळची हिंदुत्ववादी, छुपा पाठींबा देऊन सक्रिय असणं हे निंदनीय, लांछनास्पद व महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी आहे.
धन्यवाद व नमस्कार.
दत्ताजी, नमस्कार ! रजा ॲकॅमेडी ला पीएफआयचा सहभाग नमूद करायला विसरलो. कुठल्या तरी यु ट्युबवरील चॅनेलवर महाराष्ट्रातील दंगलीचा खरा मास्टरमाइन्ड पीएफआय असे हेडींग चॅनेल्स वर धावती नजर टाकताना फक्त पाहीले होते. रात्री सवडीने शोध घेतला पण सापडले नाही. तुमची शोधवृत्ती, वाचन, निश्चीतच कौतुकास्पद आहे. शुभ रात्री !
उत्तर द्याहटवाखारा मास्टरमा