शुक्रवार, १७ मे, २०२४

लोकसभा निवडणूका- २०२४ इंडी आघाडीच्या प्रचाराचं स्वरूप मुस्लीम समाजाचे तुष्टीकरण व हिंदू हिताकडे दुर्लक्ष (भाग-३ व ४ )

 

श्री अच्यूत मेनन यांनी आद्य शकंराचार्यानी चारी दिशांना स्थापन केलेल्या चार पिठाची स्थापना म्हणजे एक प्रकारे Indian Nationalism is reality यावर शिक्कामोर्तोब केले आहे. असे असूनही तथाकथित साम्यवादी व समाजवादी मंडळींनी अच्युत मेनन यांनी मांडलेला इंडीयन नॅशनलइझम स्विकारला का नाही ? याची कारणें सर्वश्रूत आहेत. विद्यमान समाजवादी व साम्यवादी मंडळींची मानसिकताच अशी झालेली आहे की, जो पर्यंत विदेशात बसलेल्या आपल्या बाॅस मंडळींनी इंडीयन नॅशलिझमची व्याख्या केली नाही, तो पर्यंत आपण ती मुळीच स्विकारायची नाही एवढेच काय ते त्यांना कळते. यालाच वैचारीक गुलामी म्हणतात. देश स्वतंत्र झाला पण ही मंडळी मानसिक दृष्ट्या पारतंत्र्यातच आहे.

भारतिय संस्कृतीस संमिश्र संस्कृती मानणार्या या महाभागांना संस्कृती (कल्चर) आणि सभ्यता अथवा नागर सुधारणा (सिविलायझेशन) या मधील फरक समजला आहे पण तसे मान्य करावयाचे नाही असा आदेश यांच्या विदेशी बाॅसचा असावा का? की विदेशी शक्ती कडून मिळणार्या पैशाचा याना असलेला हव्यास कारणीभूत ठरत आहे का? सोन्याच्या लंकेचाही हव्यास न ठेवणार्या श्रीरामाचा आदर्श ठेवण्यावर येथील संस्कृती व समाजाचा जीवंतपणा अवलंबून आहे. भारतावर आक्रमण करणार्या बाबर-अकबर आणि व्यापाराच्या नावाने आलेल्या इंग्रज, पोर्तूगीज, डच इत्यादी युरोपियन साम्राज्यवादींच्या तसेच लिबरल नावाचे पाघंरूण घेऊन आपल्याला आर्थिक गुलामीत टाकू इच्छिणार्या माओ, मार्क्स, लेनीन यांच्या वंशजावर वा शिष्यांवर आपली संस्कृती अवलंबून नाही.

सभ्यता किंवा नागर सुधारणा काही प्रमाणात संमिश्र आहे पण ती साधनमात्र आहे. इलेक्ट्रीक बल्ब आपण वापरतो पण घरातल्या देवघरात निरंजनच वापरतो की ! कारण निरंजनाच्या शीतल प्रकाशात देवाच्या मुर्तीचे दर्शन घेताना एक वेगळं वातावरण तयार झालेले असते. शेवटी देवघरातली निरांजन हे नैतिक मुल्यांवर आधारीत असलेल्या आपल्या सांस्कृतिक प्रतिकापैकी एक प्रतिक आहे. दिवा म्हणजे ज्योत तेल आणि वात यांचा समन्वय. म्हणजेच ज्ञानयोग, भक्तीयोग, आणि कर्मयोग यांच्या मधील समन्वयाचे स्वरूप आहे. नैतिक मूल्यें ढासळली की ऐहीक प्रगती ढासळते.

आपल्या देशाचा भौतिक विकास आपल्या नैतीक जीवनमुल्यां च्या आधाराने होऊ शकतो याची प्रचिती केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर आपल्यालाच नव्हे तर जगातील बहुतांश देशांना आली आहे. त्यातील काही देशांना पोटदुखी सुरू झाली आहे. म्हणूनच काही विदेशी शक्ती भारतात मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येऊ नये यासाठी कार्यरत झाल्या आहेत. परंतु पंतप्रधान मोदींच्या सभांना सर्व राज्यातील देशबांधवांचा जो प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे त्यातून मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येईल असे दिसत आहे.

डॉ. शरदजी पुढे म्हणतात " वैचारिक गोंधळ कसे होते, याचे उदाहरण द्यायचे तर ' इंडियन नॅशनॅलिझम ' या शब्दाचेच घेता येईल. इंडियन नॅशनॅलिझम या शब्दाचे व्याकरणशुद्ध सरळ भाषांतर हिंदू राष्ट्रवाद असे होते. इंडिया हा शब्द इंडस, सिंधू, हिंदू या शब्दांचे नाते दर्शवीतो. 'भारत' या विशेषनामाशी नाही.' हिंदु,' हा शब्द संकुचिततेचे प्रतीक, व ' भारत ' हा शब्द सर्वधर्मसमभावाचे प्रतीक अशी कल्पना रूढ झाली. आज ही ती काही प्रमाणात आहे."

अशाच प्रकारचे भाष्य व्यवहारीक उदाहरण देऊन अमृतपथ याच ग्रंथात पृष्ठ क्रमांक २७ वर ' संघकार्याचा समाजव्यापी परिणाम ' या शिर्षकाचं संघाचे जेष्ठ नेते रंगा हरीजींशी झालेल्या चर्चेच्या शब्दांकनात वाचावयास मिळते. रंगा हरीजींशी झालेल्या चर्चेचे शब्दांकन अमृतपथ या ग्रंथाचे संपादक पद्मश्री रमेश पंतगे यांनी केले आहे. रंगा हरीजी यांनी काय म्हटले हे आपण आता पाहू या.

" दिल्लीत वकिलांचे एकत्रीकरण झाले होते. एका वकिलांने मला प्रश्न विचारला," हिंदू या शब्दाबाबत आपण एवढे आग्रही का आहात ?" यावर रंगा हरीजी म्हणाले, " रामायणात सीता शब्दाऐवजी मैथिली व जानकी या शब्दाचा ही वापर झालेला आढळतो. तिन्ही शब्द तसे समानार्थी आहेत. पण आपण मैथिली नगरात सीता दर्शनासाठी गेलो तर आपल्याला आढळेल की मैथिली हे तेथील लोकांच्या दृष्टीने सामान्यनाम आहे. मैथिली नगरातील याच्चयावत स्त्रियांना' मैथिली ' असे संबोधिले जाते. आपण मैथिलीचे दर्शन हवे असे न म्हणता जानकीचे दर्शन हवे असे म्हटले तर लोक आपल्याला जनक राजाच्या राजवाड्यात घेऊन जातील. आपण जनक राजाच्या राजवाड्यात गेलो तर आढळते कि जनकाच्या चार ही कन्यांना ' जानकी ' या सामान्यनामाने संबोधिले जाते. त्यातील सीतेला पाहावयाचे असेल तर सीता याच नावाचा आधार घ्यावा लागतो. कारण तेच खरे विशेषनाम आहे. सीता ही Focussed Identiy आहे. त्याच प्रमाणे आपण केवळ भारतीय व भारत असे म्हटले तर आपली विशेष ओळख होत नाही. "

रंगा हरीजी पुढे म्हणतात, " भारत ही Geograhical Identity आहे. येथील विभिन्न समाजातील लोकांना सामावून घेऊन भारतिय ही संज्ञा बनलेली आहे, ज्यात हिंदू , मुस्लिम , ख्रिश्चन इत्यादी सर्वांचा समावेश होतो ; पण भारतीय संस्कृती ही मुस्लिम संस्कृती आहे का? ख्रिश्चन संस्कृती आहे का? नाही ; तर भारतीय संस्कृती म्हणजेच हिंदू संस्कृती होय. म्हणून हिंदू हा शब्द Focussed Identity आहे, आणि त्याची स्विकारार्हता वाढत जात आहे. म्हणूनच काँग्रेस पक्षाला पश्चातबुद्धी झाली आणि त्याने आम्ही हिंदुत्वाच्या विरोधी नाही असा ठराव केला.

                                      क्रमशः-

                                               (सोबत भाग-४ खाली जोडला आहे )

 -------------------------------------------  लोकसभा निवडणूका-२०२४        इंडी आघाडीच्या प्रचाराचं स्वरूप  मुस्लीम समाजाचं तुष्टीकरण आणि    हिंदू हिताकडे दुर्लक्ष (भाग-४)


आम्ही हिंदुत्वाच्या विरोधी नाही असा ठराव काँग्रेसने केला खरा, पण सोबत आमचे हिंदूत्व भाजपा पेक्षा वेगळे आहे असे म्हणत आम्ही ' भाजपा सारखे अल्पसंख्यांकाच्या विरोधी नाही ' अशी पिढीजात भूमिका घेऊन पुन्हा ही मंडळी आपल्या मूळ मार्गावरच गेली आहे. जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही हेच खरें ! उदयनिधी स्टॅलीन यांनी सनातन संस्कृती संबंधीत केलेल्या वक्तव्याचा निषेध इंडी आघाडीतील पक्षांच्या एका ही नेत्याने केला नाही. यावरून ही मंडळीं विदेशी शक्तीच्या किती आधीन झाली आहे हे कळते. धर्मांध मुस्लिमांच्या वा ख्रिस्ती मिशनर्यांच्या हिंदू विरोधी भुमिकांचे खंडन न करता आपला जूना लांगूनचालनाचा कार्यक्रम काँग्रेसप्रणित इंडी आघाडीतील सर्वच पक्ष राबवीत आहेत. बहुतांश भाजपेतर पक्षांची हिंदू हिताकडे दुर्लक्ष करण्याची सवय हाच निवडणूकातला मुख्य मुद्दा होऊ लागलेला दिसत आहे.

माझ्या माहिती प्रमाणे आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्यापैकी एखादा धार्मिक समूह ५ टक्या पेक्षा कमी असेल त्यालाच अल्पसंख्यांक मानले जाते. भारतातल्या मुस्लीम समाजाची एकूण संख्या पाहता तो समाज सेकंड मेजाॅरिटी ठरतो. इतकेच नव्हे तर आपल्या देशातील मुस्लीम व ख्रिस्ती राजवटीच्या अगोदर जे कोणी राहात आहेत ते एका परिने सर्व हिदूंच आहेत. कारण मुस्लीम व ख्रिस्ती आक्रमकांनी ज्या हिंदूचे जबरदस्तीने धर्मांतर केले, अशा सर्वांच्या अनेक पिढ्यां येथेच जन्मल्या आहेत आणि येथेच वाढल्या, आणि या पुढेही जन्मतील, आणि वाढत जाणार आहेत. त्यांची फक्त उपासना पद्धत बदलली हे सत्य आहे. त्याबद्दल कोणा ही हिंदूचा आक्षेप नाही. पण वख्त बोर्ड सारखी संस्था काय करतेय

दिसली सरकारी जमीन             रात्री-अपरात्री केली काबीज |      लावला फलक वख्त बोर्डचा     करतेय बिन भांडवलीचा धंदा ||

दुसर्या टोकाला ख्रिस्ती मिशनर्यांचा सेवेच्या नावाखाली गरीब आदिवासी हिंदूना फसवून त्यांचे धर्मांतर करण्याचा धंदा आज ही चालू आहे. असले प्रकार पाहून हिंदू समाज नाराज होणे हे ही स्वाभाविक आहे. हिंदु हिताकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण काँग्रेसला महाग पडेल असे काँग्रेसचे जेष्ठ नेते बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगिळांनी सन १९९७-९८ दरम्यान जाहीर रित्या सांगितले होते. त्यांचे ते वक्तव्य दैनिक म. टा. वृत्तपत्रात वाचल्याचे मला आठवते. याचे कारण बॅ विठ्ठलराव गाडगिळांच्या त्या वक्तव्यावर ' सर्वधर्म समभाव व राजकीय पक्षांचा व्यवहार ' या शिर्षकांचा माझा लेख दुसर्या आठवड्यात दैनिक लोकसत्ताने छापला होता. काँग्रेसच्या श्रेष्ठींना विशेषतः राजीव गांधीच्या कारकिर्दी पासून अभ्यासक व विचारवंत काँग्रेसी नेत्यांची ॲलर्जी सुरू झाली. पुढे ती सोनीया - राहूल गांधीच्या काळात भौमितिक गतीने वाढत गेली. त्यामूळेच काँग्रेस कमकूवत होत गेली.

आपल्या देशात जबरदस्तीने ज्यांचे धर्मांतर झाले आहे अशा मुस्लीम समाजातील वर्गाची आणि ख्रिस्ती समाजातील वर्गाची टक्केवारी जवळपास ९५ टक्के असावी. अशांना अल्पसंखाकांचा दर्जा देऊ नये असे मला वाटते. अशांना उगीच हिंदू समाजाची भिती दाखविण्याचे प्रकार केवळ आपली मतपेटी तयार करणे हा विरोधी पक्षांचा धंदा होऊन बसला आहे. आपल्या देशात आश्रयाला आलेली पारशी व ज्यू मंडळी सुखासमाधाने राहात आहे ना ! शक हूण असे आक्रमक लोक ही आपल्या भारतीय संस्कृतीत समरस झाले आहेत ना ! मग मुस्लीमांचे सरकार तर्फे खास लाड हवेत कशाला? देशविभाजन झाल्यावर जर धर्माच्या आधारावर एका भागास पाकिस्तान मांनण्यात आले तर दुसर्या भागास हिंदुस्थान का मानण्यात आले नाही, लोकसंख्येची अदलाबदल सर्वत्र का केली नाही असे प्रश्न असंख्य नवमतदार आज विचारत असतात. याकडे ना इंडी आघाडीतील पक्ष लक्ष देत आहेत ना लिबरल पत्रकार व संपादक मंडळी लक्ष देत आहेत. ही मंडळी आजही हटवादीपणाने मुस्लीम समाजाचे लांगूनचालन करीत असतात.

श्री रंगा हरीजींनी, आपल्या देशात      ' भारत व भारतीय ' हे शब्द सर्वधर्मसमभावी या अर्थाने मानण्याची जी वृत्ती जपली आहे, त्यावरील प्रतिक्रीया म्हणून ' जग आपल्याला हिंदू म्हणून ओळखते, हे सत्य मुलाखतीत मांडले आहे. ते त्यांच्यात शब्दात खाली मांडून या भागाच्या शेवट करतो आहे.

" भारतात असे वातावरण असले तरी जगात कूठेही असे वातावरण नाही. जागतिक स्तरावर 'भारत' 'भारतीयत्व' या संकल्पना स्पष्ट होत नाहीत. तिथे सर्वत्र ' हिंदू ' शब्दानेच आपली खरी ओळख (identity ) होते. त्यामूळे हिंदू कल्चर, हिंदू पिपल्स, हिंदू फिलाॅसाॅफी, हिंदू इथाॅस या शब्दानींच भारताची खरी ओळख विदेशातील लोकांना समजते. "

जगभर भारतियांची हिंदू अशी ओळख आहे, तशाच प्रकारची भारतातल्या मुस्लीम बांधवाची मुस्लीम जगतात ' इंडीयन मुस्लीम ' अशी ओळख आहे हे ही माझ्या वाचनात आले आहे. एकदा जागतिक मुस्लीम ब्रदरहूड ची एका मुस्लीम देशात परिषद होती. त्या परिषदेत उपस्थित होण्यासाठी इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये मंत्री असलेले काँग्रेसचे नेते फकरूद्दीन अली अहमद (जे पुढे आपल्या देशाचे राष्ट्रपती झाले) तिथे आमंत्रणा शिवाय त्या परिषदेत उपस्थित होण्यासाठी गेले होते. त्यांना तिथे भारतिय मुस्लीम असे संबोधून प्रवेश दिला नव्हता. अशी बातमी वर्तमानपत्रातून वाचल्याचे मला आज ही आठवते आहे.

मी वरील घटना नमूद केली याचे कारण आपल्या येथील अल्पसंख्यांक मग ते मुस्लीम असो वा ख्रिस्ती यांचा दर्जा त्या धर्मीय जगतात हवा तसा सन्मानकारक नसेल तर त्या समाजाने ही भारतभूमी आमची जन्मभूमी आहे हे लक्षात घेऊन आपल्याकडे मतपेटी म्हणून बघणार्या पक्षांच्या प्रलोभनाला भूलून जाऊ नये. हाच खरा राजकीय व्यवस्थेतील धृवीकरणावरला एकमेव उपाय आहे, असे मला वाटते. इथे मी हा उपाय कुठल्याही राजकीय पक्षाचा तोटा व्हावा म्हणून मांडलेला नाही तसेच देशातला सारा मुस्लीम समाज व सारा ख्रिस्ती समाज राजकीय प्रलोभनास बळी पडतो असे ही मी मानत नाही. आपल्या देशात काही ठिकाणी बहुसंख्याक हिंदू समाज आणि धर्मातंरीत झालेले मुस्लीम व ख्रिस्ती बांधव गुण्यागोविंदाने राहात आहेत, सुखदुःखात परस्पर मदत ही करीत असतात. हे मी अनुभवत आहे. पण त्या अनुभवात आता घट होत आहे. याचे कारण ढोंगी लिबरल पत्रकार व संपादक मंडळींचा हिंदू संघटनांवर गोबेल्स तंत्रानुसार जहरी टिका करण्याच्या हटवादीपणा हे आहे.                         क्रमशः --

(विशेष सुचना - या लेख मालिकेचे भाग ५ व ६ स्वतंत्र पणे खाली आहे.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...