शुक्रवार, १७ मे, २०२४

लोकसभा निवडणूका- २०२४ इंडी आघाडीच्या प्रचाराच स्वरूप मुस्लीमांच तुष्टीकरण व हिंदू हिताकडे दुर्लक्ष (भाग- ५ व ६)

स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षांच्या काही नेत्यांनी राजकारण हा समाजसेवेचा मार्ग न मानता आपला स्वतःचा धंदा मानला. वाडवडिलांचा धंदा, व्यवसाय हे एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे, पुढे तिसर्या पिढीकडे चालत आलेले असतात. ही मानवाची स्वाभाविक प्रवृत्ती. त्यात अनेक प्रकार आहेत. मानवी जीवनाचा इतिहास पाहता सम व्यवसायी लोक समूहात राहणे पसंत करू लागले. या व्यवस्थेचं नाव वर्ण व्यवस्था. वर्णव्यवस्था म्हणजे जातीव्यवस्था नव्हे. या संबंधीत अधिक माहिती चातुर्वण्यम् मया सृष्टी गुणकर्मविभागशः या शिर्षकाचा माझ्या ब्लाॅग वरील लेखात आहे, ती आपण वाचू शकता.

मुद्दा हा आहे की वडील डॉक्टर असले की मुलगा डॉक्टर बनणे, वडील दुकान चालवत असतील तर पुढची पिढी दुकान चालविणे अशी जी स्वाभाविक वृत्ती असते तीला समाज मान्यता देत असतो. राजकारण हा धंदा किंवा व्यवसाय नव्हे. 

राजकारणातील घराणेशाहीला समाज मान्यता देतो पण आमदारकी, खासदारकी पूरता सिमीत असणे आवश्यक आहे. पक्षच एखाद्या परिवाराच्या मालकीचा होणे हे फार घातक ठरू शकते. राहूल गांधीचा पिंड राजकारणाचा नसावा. यावर मी एका लेखात सविस्तरपणे लिहले आहे. केवळ बापजाद्यांनी राजकारण केले म्हणून चौथ्या पिढीतील मुलांना राजकारणात पाठविणे अन्यायाचे ठरते. कारण त्यांच्या कडे राजकारण क्षेत्रात काम करण्यासाठी असलेली गती व मती पूर्णतः लोप झालेली असते. हा निसर्गाचा नियम आहे. 

राजकारणात घराणेशाहीचा उदय प्रथम काँग्रेस पक्षात झाला. स्वाभाविकतः काँग्रेस पक्षांची जी पिल्लावळ आहे अशा प्रान्तीय पक्षांत ही, ती शिरली यात नवल ते कसले ? राजकारणातील आपली घराणेशाही जिवंत ठेवावयाची असेल तर हिंदू समाजातील जाती-जमातीमध्ये भांडणे लावण्याची क्लुप्ती लढविणे क्रमप्राप्त ठरते. हा वारसा काँग्रेसला अर्थातच ब्रिटीश राजवटीकडून देणगी रूपात मिळालेला. तसेच प्रजेची हिंदू व अहिंदू अशी ओळख व विभागणी, ही आपल्या देशावर दिर्घकाळ राज्य करण्यासाठी ब्रिटीशांनी अवलंबलेली नीती. जिचे नाव ' फोडा आणि झोडा ' असे आहे.

तीच नीती स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षाने स्विकारली. मग ज्या हिंदू बांधवाचे जबरदस्तीने धर्मांतर झाले अशा मुस्लिम व ख्रिस्ती बांधवांना अल्पसंख्यांकाचा दर्जा देणे, सोयी व सवलती देणे, जगभरातील मुस्लीम व ख्रिस्ती देशातील स्वयंसेवी संस्थातून मुस्लीम व ख्रिस्ती संस्थांना मिळणार्या अपाम पैशाचा आकडा व त्या पैशाचा विनियोग कसा होतो यावर सोयिस्कर रित्या दुर्लक्ष करणे, त्या पैशातून अधिकाधिक हिंदू समाज बांधवांचे विविध प्रलोभने दाखवून धर्मातंर झाले, तरी त्यावर ही दुर्लक्ष करणे, इत्यादी क्लुप्त्या स्वातंत्र्यानंतर काॅग्रेसने ब्रिटीशांपेक्षा अधिक सराईतपणे वापरल्या. काॅग्रेसमधून बाहेर पडून ज्यांनी स्वतःचे पक्ष स्थापन केले अशा प्रांतीय पक्षांनी काॅग्रेसपेक्षा अधिक निर्लज्जपणे अल्पसंख्यांकाचे लाड करीत आहेत. 

इतकेच नव्हे हिंदूच्या मंदिरातील पैसा सरकार नैसर्गिक आपत्ती काळात उपयोग करते. त्यात ख्रिश्चन व मुस्लिम बांधवांना मदत देत असते. दोन भावांना सर्व बाजूने लाड करावयाचे व हिंदू भावाला सावत्र मुलासारखे वागविणे हे भारत मातेला तरी आवडेल का, याचा विचार सर्व राजकीय पक्षांनी करायला हवा. यातील विशेष बाब अशी आहे की साम्यवादी पक्ष देव धर्म मानत नाहीत तरी सुद्धा ख्रिस्ती व मुस्लीम समाजाचे लाड करतात पण हिंदू संस्कृतीचा द्वेष करीत असतात. ज्या राज्यात साम्यवादी पक्षांची सत्ता होती व आज आहे अशा केरळ राज्यात तसेच पुर्वीचा साम्यवाद्यांचा बालकिल्ला असलेल्या पश्चीम बंगालमध्ये तृणमूल काॅग्रेस हिंदू संघटनांवर, अध्यात्मिक गुरू व संस्था आणि संघ परिवाराचा पराकोटीचा छळ करीत आहेत. मोदी सरकार कुठल्याही अल्पसंख्याकांवर अन्याय करीत नाही आणि करणार ही नाही. पण हिंदू हिताकडे दुर्लक्ष व अन्याय करणारे पक्ष, विदेशी संस्था, नक्षलवादी, व दशहतवादी इत्यादी मंडळींवर कडक कारवाई मोदी सरकार करेल असे दिसते.

काँग्रेस असो वा प्रान्तीय पक्ष असोत भाजपाने अल्पसंख्याकांच्या लांगूनचालनावर आक्षेप घेतला की भाजपा सांप्रदायिक पक्ष आहे असे एकमूखाने टिका करीत राहिले. पण अती तिथे माती या न्यायानुसार हिंदू समाज जागरूक होत गेला आणि सन २०१४ ला केंद्रात भाजपाचे सरकार आले आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान पदी विराजमान झाले. स्वातंत्र्यानंतर राजकारणात धार्मिक, व जातीय धृवीकरण कोण करीत आले आहे हे गेल्या दोन लोकसभेच्या निवडणूकां च्या प्रचारातून व निवडणूकांच्या निकाला द्वारें स्पष्ट झाले आहे.

मुलतः सर्वधर्मसमभाव व समाजवाद या दोन्ही कल्पना विदेशी बनावटीच्या आहेत. भारतात प्राचीन काळापासून गुण्यागोंविदाने राहणे ही एक स्वाभाविक वृत्ती मानली जात होती. पारशी, ज्यू, तसेच युरोपातून व्यापार करणारे फ्रेंच, इंग्लीश, पोर्तुगिज, डच इत्यादींना व्यापारासाठी आपल्या समाजाने कधी विरोध केला नाही. उलट स्वागतच केले. यापैकी युरोपियन व मध्ययुगातील इस्लामी आक्रमकांनी आपल्या समाजाच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला. तसाच गैरफायदा स्वातंत्र्यानंतर सत्ताधारी काँग्रेस पक्षाने नवीन रूपात घेणे सुरू ठेवले आणि आज ही तीच वृत्ती काँग्रेस नेत्यांची अनुभवयास येत आहे. कारण काँग्रेसची सुत्रे नेहरू-गांधी घराण्याकडेच राहिली. शेवटी आधूनिक शरीर विज्ञान, तंत्रज्ञान व डीएनए थेअरी याहून अधिक वेगळे काही सांगत नाही आणि उपाय देत नाही. त्यामूळेच काॅग्रेस लयास गेली आहे.

दुर्दैवाने इंडी आघाडी घटक पक्षांची अल्पसंख्याकांना प्रलोभने दाखवित मतें मागण्याची जी खोड आहे ती काही केल्या जात नाही. त्यातून जे धृवीकरण होत आहे त्याला भाजपा जबाबदार आहे असा आरोप करणार्या लिबरल मिडीया हाऊसेस मूळे विरोधी पक्षांचा माज कमी होण्याऐवजी वाढतो आहे. त्यातूनच देशातील लोकसभा पासून ते ग्रामपंचायत स्तरावरील प्रत्येक निवडणूकीतल्या प्रचाराची पातळी घसरविण्याची सुरूवात विरोधी पक्षांचे नेतेच करताना दिसत आहेत. देशाच्या दुर्दैवाने त्यात अग्रणी स्थानावर राहूल गांधी आहेत, ज्यांचे गुरू सॅम पित्रोदा आहेत. आजच्या काँग्रेसच्या या नेत्याचे व त्यांच्या गुरूचे वागणे, बोलणे पाहता, ' सुनो गुरू ' या काव्यसंग्रहात श्री रमेश श्रीवास्तवांनी महात्मा गांधीजींना उद्देशून मांडलेल्या पंक्ती आठवल्या आहेत. त्या येथे मांडून या भागाची समाप्ती करतो.

" मेरा दावा है बापू

तू आज अगर जिंदा होता,

तो गोडसेकी गोलीसे मरता न मरता

आत्महत्या जरूर कर लेता

आत्महत्या जरूर कर लेता || "

                                     क्रमशः-

---------------------------------------------

   लोकसभा निवडणूका २०२४

 इंडी आघाडीच्या प्रचाराचं स्वरूप        मुस्लिम समाजाचं तुष्टीकरण व      हिंदू हिता कडे दुर्लक्ष (भाग-५ व ६)

            (भाग-५ व भाग-६)

आपल्या लेखात डॉ. शरदजी हेबाळकर, ट्राॅटस्की नावाच्या रशियन साम्यवादी नेत्याने जे काही म्हटले होते ते आपल्या समोर मांडतात. " Only in a socialist society can the average humanity rise to the level of Plato and Marxs."

(" केवळ समाजवादी रचनेतून प्लेटो आणि मार्क्स यांनी सांगितलेल्या आर्थिक पातळीवर सर्वसामान्य मानव पोहचेल ") यावर थोर समाजवादी विचारवंत लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी जे म्हटले, ते विचारप्रवृत्त करणारे आहे. असे सांगत डॉ. शरदजी हेबाळकर पुढे लिहतात, जयप्रकाश नारायण यांनी घोषित केले,

" However some years back, it became clear to me that socialism as we understand it today can not take mankind to the subline goal of freedom, equality, brotherhood and peace." 

( " काही वर्षापुर्वी माझ्या हे स्पष्टपणे लक्षात आले की, आम्ही समजतो तो समाजवाद मानवी जीवनात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, आणि शांती यांची प्रतिष्ठापना करू शकत नाही.")

डॉ. शरदजी म्हणतात, " ही काही समाजवाद आणि साम्यवाद याचींच केवळ शोकांतिका नाही. वैचारिक परिवर्तनाच्या दृष्टीकोनातून या घटनाचा वेध घेतला पाहिजे, असे म्हणत त्यांनी हा विचार अधिक स्पष्ट होण्यासाठी प्रख्यात विचारवंत एम एन राॅय, यांनी केलेला विचार मांडला आहे तो असा आहे.

'' Until the intellectual, cultural, spiritual autmospere of the country was changed, it was not possible to bring about a political and economical reconstruction of the country." (" जोपर्यंत वैचारिक, सांस्कृतिक व अध्यात्मिक वातावरणात परिवर्तन होत नाही, तो पर्यंत देशाची आर्थिक व राजकीय पूनर्रचना करणे शक्य नाही ")

" आर्थिक काय किंवा राजकीय काय, पुनर्रचनेचा पाया हा वैचारिक, सांस्कृतिक व अध्यात्मिकच राहणार. वैचारिक क्रान्तीच्या परिभाषेत सांगायचे तर स्वामी विवेकानंद कट्टर समाजसुधारक होते, पण " गर्वसे कहो, हम हिंदू है " हाच परिवर्तनाचा, समाज सुधारणेचा व राष्ट्रोन्नतीचा पाया आहे, याच्याशी त्यांनी तडजोड केली नाही. रूढ अर्थाने संन्याशाला धर्म नसतो, नाव नसते. स्वामी विवेकानंद हे संन्यासी होते."

पुढे डॉ.शरदजी, योगी अरविंदानी त्यांच्या सुप्रसिद्ध उत्तरपाडा भाषणात धर्म, राष्ट्र व राष्ट्रीयता यांची जी निःसंदिग्ध कल्पना मांडली होती ती आपल्या समोर ठेवतो.

" सनातन धर्मच आमच्याकरिता राष्ट्रयिता आहे. हिंदू राष्ट्र सनातन धर्माला घेऊनच निर्माण झाले आहे. त्याला घेऊनच चालले आहे आणि घेऊनच वाढत आहे. जेव्हा सनातन धर्माची हानी होते , तेव्हा या राष्ट्राचीही अवनती होते. सनातन धर्म हीच राष्ट्रीयता आहे."

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याहून वेगळे काही मांडले नाही. संघ परिवारातील ज्या संस्था आहेत, त्यातलाच एक सदस्य भाजपा आहे. लालू प्रसाद यादव, उदयनिधी स्टॅलीन, राहूल गांधी व त्यांचे गुरू सॅम पित्रोदा, शरद पवार इत्यादीं नेते मंडळी ज्या पद्धतीने हिंदुत्व, सनातन धर्म, पंतप्रधानावर, संघावर व भाजपावर टिका करीत आहेत त्यातून त्यांच्या पक्षांचेच नुकसान होणार आहे हे निश्चीत.

याच लेखात डॉ. शरदजींनी माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय प्रमोद महाजनांना आलेला अनुभव मांडला आहे. आणिबाणीच्या काळात भूमीगत असताना प्रमोद महाजन प्रख्यात विचारवंत कै नरहर कुरूंदकर यांना भेटावयास गेले होते. चर्चेच्या ओघात कुरूंदकर त्यांना म्हणाले, " संघावर बंदी घालून श्रीमती इंदिरा गांधी यांनी चूक केली." प्रमोद महाजन यांनी प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे पाहिले. कुरूंदकर पुढे म्हणाले, " त्यांच्या (इंदिराजींच्या) हे लक्षात आले नाही की संघावर बंदी घालणे, म्हणजे हवेवर बंदी घालण्यासारखे आहे. समुद्राच्या लाटांवर बंदी घालण्यासारखे आहे. "

डॉ. शरदजींनी प्रमोद महाजनांना आलेला अनुभव वाचल्यानंतर मला कुठेतरी माझ्या वाचनात आलेली काही माहिती आठवली. ती मी आपल्यापुढे ठेवतो आहे. ' आपल्या आयुष्याच्या अखेरीस विख्यात अष्टपैलू विचारवंत आचार्य अत्रेंजींना भारतीय जंनसंघांची (म्हणजे आताच्या भाजपाची ) राजकीय भूमिका देशाच्या हिताची वाटल्यामुळे ते जनसंघाच्या व्यासपिठावर प्रमूख अतिथी म्हणून उपस्थित होते. ' 

इतकेच नव्हे तर देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू जे पक्के समाजवादी व सर्वधर्मसमभाव विचारसरणीचे असुनही आयुष्याच्या अखेरीस सन १९६१ मदुराई येथील काँग्रेस अधिवेशनात त्यांनी हिंदु संस्कृती संबंधीत गौरवौद्गार काढत स्वतःची चूक मान्य केलेली आहे.

डॉ. शरदजी आपल्या लेखात लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी ३ नोव्हेंबर १९७७ ला पाटण्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्गात स्वयंसेवकां समोर जे भाषण दिले ते असे आहे --

" तुम्ही सर्वजण शीलसंपन्न आणि सदगुणसंपन्न असून निष्ठापुर्वक कार्य करण्यासाठी प्रतिज्ञाबध्द झाला आहात, याची मला जाणीव आहे. आपल्या देशाला तुम्ही नवा आकार द्यावा आणि नवभारताचे शिल्पकार बनावे अशी माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे. आपल्या प्राचीन सासंकृतिक वारसाचे सामर्थ्य तुमच्या पाठिशी आहे. आजच्या घडीला आपल्या देशात जे परिवर्तन घडत आहे त्याच्या आघाडीला तुम्हीच आहात. तुमच्या संघटनेशी तुलना करता येईल अशी अन्य कोणतेही संघटना नाही. हे मला ठाऊक आहे. "

वाचक मित्र हो, आपल्या देशात देश व राष्ट्र म्हणजे काय तसेच हिंदू, हिंदूत्व, सनातन संस्कृती यावर एक वाक्य लिहू न शकणारी,एक वाक्य बोलू न शकणारी घराणेशाही पक्षांचे अनेक वारस आज देशभरातील प्रत्येक राज्यातील राजकारणात प्रमूख म्हणून दिमाखाने वावरत आहेत. ही मंडळी वर नमूद केलेल्या थोर पुरूषांचे नातू नात शोभतील अशी आहेत. इतकेच नाही तर वर नमूद केलेल्या थोर साम्यवादी व समाजवादी महानुभवाचा वारसा घेऊनच इंदिराजी, शरद पवार, लालू प्रसाद यादव, मुलायमसिंग यादव, स्टॅलिन इत्यादींनी राजकारण केले. आज त्याच बापजाद्यांची राजकारणातली सद्दी का संपत आली आहे, याची कारणें शोधण्याचा प्रयत्न राहूल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, सुप्रिया सुळे, उदयनिधी स्टॅलीन इत्यादींनी केला असता तर बदलत्या काळाची पावले त्यांना थोडीफार तरी समजली असती. उठसूठ मोदी, भाजपा आणि संघावर टिका करून निवडणूका जिंकण्याचा काळ संपला आहे हे लक्षात ठेवावे.

लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी सन १९७७ ला पाटण्यातल्या शिबिरात ज्या युवक संघ स्वयंसेवकांचे कौतूक केले त्यातील काही स्वयंसेवक आज भाजपात उच्चपदावर तसेच केंद्र सरकार व भाजप शासीत राज्यात मंत्रीपदावर कार्यरत आहेत. म्हणूनच भारताची सर्वच क्षेत्रात जगातील महाशक्ती कडे लाटचाल होत आहे.

--------------------------------------------


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...