बुधवार, ५ जून, २०२४

निसर्ग आणि मानवामधील ऋणानुबंध भाग - १

आज ५ जून जागतिक पर्यावरण दिन. शाळांना उन्हाळ्याची सुटी आहे. असे असले तरी शाळा सुरू झाल्यानंतर आमच्या शाळेत (स्वर्गीय आनंदराव पवार सरस्वती विद्यालय, वझिरा नाका, बोरीवली (प) मुंबई ) दरवर्षी पर्यावरण दिन साजरा होत असतो. त्या निमित्ताने या खेपेस पर्यावरण विषयांवर विद्यार्थ्यांसोबत प्रश्नोत्तर पद्धतीतून पारायण करण्याचे ठरविले आहे. ही प्रेरणा मला कोठून आली आणि पारायण हा शब्द या ठिकाणी वापरावा अशी बुद्धी कशी झाली हे ईश्वरालाच ठाऊक. पण त्यातूनच मला काही वर्षापुर्वीची एक गोष्ट आठवली. ती इथे प्रथम मांडतो.

माझ्या एका मित्राचे रेसाॅर्ट आहे. काही वर्षापुर्वी मे महिन्यातच एके दिवशी त्याचा फोन आला. त्याने फोनवरून त्याच्या रेसाॅर्टमध्ये पर्यावरण दिन साजरा करावयाचे ठरविले असल्याकारणाने चार-पाच दिवसात पर्यावरणावर एखादा लेख पाठविण्याची विनंती केली. मी पाचव्या दिवशीच माझा प्रदिर्घ लेख मित्राकडे पोहचता केला होता. ही गोष्ट आठवली तेव्हाच माझ्या लक्षात आले की मी मित्राला पाठविलेल्या  लेखाची झेराॅक्स काॅपी फाईलमध्ये आहे. पुष्कळदा आपण लिहीलेला लेख आठवला तरी तो तसाच पुन्हा लिहता येत नाही हे मी अनुभवत असतो. तो लेख पब्लीश झालेला नसल्यामूळे जागतिक पर्यावरण दिनोत्सवाच्या निमित्ताने ब्लाॅगवर पब्लीश करण्याची संधी मी साधून घेत आहे. संधी अशासाठी म्हणतो की विचार करून लेख लिहीण्यासाठी वेळ अपुरा पडणार हे जाणवले.  म्हणून पुर्वी लिहलेल्या लेखाची झेराॅक्स काॅपी समोर ठेवून सॅमसंग नोट्सवर उतारून घेत आहे. लेख मोठा असल्याकारणाने सॅमसन नोट्सवर उतारून घेण्यात, एडीट करण्यासाठी व पब्लीश करण्यासाठी  ही वेळ लागणार याची जाणीव ठेवून त्याचे तीन भाग करून पब्लीश केला एवढाच काय तो बदल केला आहे.

पर्यावरणाचे महत्व, पर्यावरणाची हानी व उपाय  या विषयाच्या जागृतीच्या दृष्टीने द्यावी लागणारी आकडेवारी,  स्वार्थ- सत्ता - संपत्ती बाबतचा  मानव्याचा हव्यास आणि त्यातून ऐषारामी जीवनाची लागलेली गोडी अशा सवयीमूळे अनेक प्रकारच्या गरजा वाढल्या व त्यासाठी अनेक यंत्राची सतत वाढत जाणारी निर्मितीत होत असलेली वाढ, वाढता साम्राज्यवाद, शस्त्रांत्रे निर्मितीची देशोदेशी सुरू असलेली स्पर्धा, वाढते औद्योगिकरण, टोलेजंग इमारती, वृक्षतोडी,  बेफिकीरपणे व बिनधास्त नैसर्गिक संपत्तीची सुरू असलेली उधळण इत्यादी संबंधीची माहिती व त्यातून वाढत चाललेले, वायू-जल-ध्वनीचे प्रदुषण इत्यादी गोष्टींचा उल्लेख या लेखात नसल्यामूळे हा लेख आपल्या पसंतीस पडेल असा नाही म्हणजेच Avarage आहे हे मी प्रांजळपणे कबूल करतो. 

या विषयावरील लेख, पुस्तके वाचली आहेत. या विषयावर स्वयंसेवी संस्थातर्फे आयोजित केले जाणार्या अभियानात मी अधून-मधून भाग घेतो. या विषयाचा मी तज्ञ वा अभ्यासक नाही. तरीही अलिकडे  गेल्या जानेवारी महिन्यात सेक्रेटरीयल कामासाठी आमच्या शाळेत उपस्थित असताना एका वर्गात माध्यमिक विद्यार्थ्यांचा पर्यावरणाचा तास सुरू असताना मला छोटसं भाषण देण्यासाठी एका शिक्षकाने आमंत्रीत केले. मी छोटसं भाषण केलं. एवढाच काय तो माझा पर्यावरण विषयाशी असलेला संबंध. याबाबत मला खंत आहे. म्हणून थोडाफार जाणीवपुर्वक प्रयत्न सुरू करावा अशी इच्छा झाली. म्हणून मागे लिहलेला पण पब्लीश न केलेला लेख तीन भागात विभागून आपल्यासमोर ठेवतो आहे.

पर्यावरण या विषयाची व्याप्ती विश्वाचे गूढ उलकण्यापर्यंत पोहचते. माहिती व तंत्रज्ञानाच्या क्रान्तीने जग जवळ आले आहे या बाबत दुमत नाही. पण भौतिक विज्ञानाच्या दृष्टीने हे जग दिवसें दिवस प्रसरण पावत आहे. त्यामूळे पर्यावरण या विषयाची व्याप्ती वाढतच राहणार आहे. 

विख्यात भौतिक वैज्ञानिक आईनस्टाईन यांनी म्हटले आहे की, 
' या विश्वात सर्वात अनाकालनीय गोष्ट कुठली असेल तर हे विश्वच होय.' पुढे एके ठिकाणी ते म्हणतात, Imagination is more important than knowldge. (ज्ञाना पेक्षा कल्पनाशक्ती अधिक महत्वाची असते)  मानवाला कल्पनाशक्ती व स्मरणशक्तीचे वरदान निसर्गाकडून झाले आहे. मानवाच्या ज्ञानाच्या शाखांत होणारी वाढ ही त्याला प्राप्त झालेल्या कल्पनाशक्ती तून होत असते.

मानव व प्राण्यांमध्ये असलेला महत्वाचा फरक म्हणजे माणसाला बुद्धी प्राप्त झाली आहे. फूल उमलण्याची क्रिया ही सहज असते. तसेच कल्पनाशक्ती व स्मरणशक्ती या निसर्गदत्त जाणिवा आहेत आणि त्या माणसांमध्ये परिपूर्ण आहेत. मूलतः आपली ज्ञानेंद्रियेच नव्हे तर आपलं सारं शिरीर पंचमहाभूतांचे बनलेले असते. या विश्वातील याच्चयावत वस्तूजात या पंचमहाभूतांतील कोणत्या तरी एक वा अधिक गुणाचेंच बनलेले असते. 

या विश्वाच्या उत्पत्ती सबंधित अनेक जणांनी संशोधन केले ते ही निसर्गाच्या सानिध्यात राहूनच.  मानवाने जी काही प्रगती केली त्या यशामागील खरे गमक मानव व निसर्ग मधील असलेला स्नेह म्हणा वा ऋणानुबंध हेच आहे. या संबंधित एक कथा सादर करतो.

एकदा चैतन्यरूपी ईश्वराला आपण अनेक व्हावे असे वाटले. त्यातूनच  एक शक्ती निर्माण केली. नंतर त्या शक्तीदेवीतून मिळालेल्या प्रेरणा तून महाकाय पंचमहाभूतें निर्माण केली. त्यांच्या चेहर्यावर आलेला आनंद व तेज पाहून शक्ती देवतेने विचारले, 'आज आपण फार खुषीत दिसत आहात, कारण सांगा की !  ईश्वराने उत्तर दिले. ' मी आज महाकाय अशी पंचमहाभूतें निर्माण केली आहेत.'  नंतर पंचमहाभूतांची वैशिष्टे व त्यांच्यी कार्ये व परस्पर समन्वय कसा असेल हे ही सांगितले आणि ईश्वर झोपी गेला.पण-

एका तासात त्याला जाग आली. तेव्हा शक्ती देवीने प्रश्न केला, ' आता कुठले काम काढले आहे ? ' त्यावर ईश्वर म्हणाला, केवळ पंचमहाभूतें निर्माण करून मला शांती मिळत नाही. माझे काम अपुरे आहे असे म्हणत घराबाहेर पडला. नंतर -- विविध वृक्ष, वेली ची निर्मिती करून आणि त्यावर विविध रंगी- बेरंगी फूले उमविली. त्या वृक्षांवर विविध आकार, व रंगाची अमृतमय फळे निर्माण केली. व्वा ! आता तर  सृष्टी चांगली सजवली आहे. असे स्वतःशीच बोलत  ईश्वर घरी परतला. शक्तीदेवतेने विचारले ' आज कुठली कामें केली ' असा प्रश्न विचारला. त्यावर ईश्वराने सृष्टी कशी सजवली आहे याचे उत्तर देऊन झोपी गेला.  आज ईश्वराला गाढ झोप लागली आहे असे शक्तीदेवीला वाटले खरे, पण लिगलीच ईश्वराला जाग आली. शक्ती देवीला अंतर्ज्ञानातून कळले की ईश्वराने हातात घेतलेल्याल्या कामात त्रुटी राहिल्या असाव्यात म्हणून त्या त्रुटीचे स्वरूप विचारले. त्यावर ईश्वर म्हणाला ' सृष्टी सजली आहे पण सृष्टीत हालचाल दिसत नाही.' ती निर्माण करण्यासाठी मी बाहेर जात आहे असे म्हणत ईश्वर बाहेर पडला. 
  
नंतर ईश्वराने विवाध आकाराचे, रंगाचे, जलाशयात राहणारे प्राणी, पाणी आणि जमिनीवर चालणारे प्राणी निर्माण केले. फक्त जमिनीवर राहणारे व चालणारे असे दोन पायाचे व चार पायाचे, विविध आकाराचे, रंगाचे,  विविध चाल असणारे, प्राणी निर्माण केले.  नंतर विविध आकाराचे जमिनीवरून  सरफटत चालणारे प्राणी निर्माण केले. नंतर रंगी-बेरंगी विविध आकाराचे,  विविध प्रकारचे आवाज, कुंजन करीत आकाशात स्वैरपणे विहार करणारे, आकर्षक व मोहक असे पक्षी निर्माण केले. आज ईश्वराने प्रचंड मेहनत घेतली. ईश्वराचा एक दिवस म्हणजे एक युग असते. ईश्वर आनंदाने घरी परतला. शक्ती देवीला आजच्या कामाचा तपशिल देताना ईश्वराचा आनंद ओसांडून वाहात होता. नंतर ईश्वर झोपी गेला. पण--- 

या खेपेस अर्ध्या तासातच जाग आली म्हणून शक्ती देवीने विचारले, 'आज झोपमोड लौकर कशी झाली ? यावर उत्तर देतांना ईश्वराच्या चेहर्यावर तणाव दिसत होता. तरी ही त्याने उत्तर दिले,  " देवी मी अतिशय सुंदर अशी सृष्टी निर्माण केली आहे हे खरेच; या सृष्टीत हालचाल करणारे  अनंत पशू पक्षी निर्माण करून सृष्टीत movment आणली. पण मला आता या सृष्टीची देखभाल करणारा, improvment करणारा प्राणी निर्माण करावयाचा आहे. हे काम महा कठीण आहे. जी सृजन होते ती सृष्टी. पण ती लागलीच सृजन होत नसते. तिला टप्याटप्यात अधिक सुंदर करणारा, तिचे सरंक्षण करणारा, व ज्याला सौंदर्याभिरूची असेल, असा बुद्धीवान प्राणी निर्माण करावा लागेल. तो प्राणी केवळ बुद्धीवान होऊन भागणार नाही. तो सृष्टी संबंधी सेन्सिटीव्ह असावयास हवा. सृष्टीची भक्ती करणारा असावा तसेच तो माझा शोध घेण्याचा (म्हणजे सतत माझे नामस्मरण करणारा) प्रयत्न करणारा असा जन्मास घालावयाचा आहे, असे  म्हणत ईश्वर घराच्या बाहेर पडला. प्रचंड मेहनत केल्यानंतर ईश्वराने सर्वात शक्तीमान, सर्वात बुद्धीमान, गुणी, असा प्राणी जन्मास घातला त्याचे नाव आहे मानव. 
  
वाघ, सिंह, हत्ती इत्यादी ताकदवान प्राणी असोत, वा आकाशात उडणारे पक्षी असोत, वा जलाशयात राहणारे जलचर प्राणी वा जमिनीवरून चालणारे व  सरपटणारे प्राणी असोत, वा जमिनीवरील सर्वात चपळ असे प्राणी असोत, माणूस आपली कार घेऊन चित्यापेक्षा अधिक वेगाने धावू शकतो. माणूस रेल्वे गाडीतून जमिनीवरून सरपटत प्रवास तो ही अधिक वेगाने करतो. माणूस जलाशयातून बोटीने प्रवास करतो. जलाशयात वा समुद्रात खोलवर असणार्या प्राण्यासोबत आपल्या पाणबूडीतून प्रवास करतो. आकाशात भरारी घेणार्या पक्षांप्रमाणे माणूस विमानातून प्रवास करतो. ताकदवान पशूपेक्षा यंत्राच्या साह्याने माणूस मोठाल्या इमारती बांधू शकतो, मोठाले वजनदार ब्रिज बांधू शकतो. सारांश मनुष्य ही ईश्वराची सर्वोत्तम निर्मिती आहे. माणसावर निसर्गाची कृपा आहे. 

वैदिक काळा पासून आपल्या संस्कृतीत ईशावास्यम इदं सर्वम् (चराचर सृष्टीत ईश्वर असतो) असे म्हटले जात आहे. वृक्षवेली आम्हां सोयरे असे तुकाराम महाराज म्हणाले आहेत. पर्यावरणासंबंधी आपल्या संतमहंतानी आपआपल्या साहित्यातून निसर्गाची निगा म्हणजेच चराचर सृष्टीला अधिकाधिक सृजन बनविण्याचे कार्य ईश्वराने मानवाकडे सोपविले आहे असा उपदेश केला आहे. निसर्ग सुद्धा ईश्वराचेच रूप. म्हणूनच आपण निसर्गाला ही देव समजून त्याची पूजा करतो. अवकाशातील ग्रह-तारे नक्षत्रांची ही आपण पुजा करतो. आप,तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी या पंचमहाभूतांची ही आपण पुजा करतो. आपल्या संस्कृतीत ऋतुमानानुसार उत्सवांची व सणांची मांडणी केली आहे. त्या पाठीमागचा हेतू हाच की त्यायोगे निसर्गातील प्रत्येक घटकात समन्वय व्हावा, सतत समतोल राहावा आणि कुठल्याही नैसर्गिक संपत्तीला ओरबडून काढण्याचे व्यसन न लागावे इतकीच किमान अपेक्षा ईश्वराला त्याच्या सर्वात लाडका अशा अपत्याकडून आहे. 
                                      क्रमशः--










२ टिप्पण्या:

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...