मागील लेखमालिकेत आपल्या देशातील राजकारणाचे मूळ आपण शोधण्याचा प्रयत्न केला होता. निवडणूकांच्या प्रचाराची धामाधूम सुरू होती. म्हणून मी त्या मालिकेचे शिर्षक ' इस बार चारसौ पार ' बनाम मोदी सरकार हटाव ' असे ठेवले. यातील पहिला नारा भाजपाचा तर दुसरा नारा विरोधी पक्षांचा म्हणजे इंडी आघाडीचा होता. या शिर्षकातून अर्वाचीन भारताच्या राजकारणाचे मूळ शोधण्याची प्रेरणा मला मिळाली होती. याचे कारण आपल्या येथील राजकारणाचा केंद्रबिंदू स्वातंत्र्यापुर्वी ' देशाच्या इतिहासात केलेली दिशाभूल ' हाच होता व आजही तोच आहे. हे अलिकडे काॅग्रेसचे नेते राहूल गांधी यांचे गुरू सॅम पित्रोदाच्या वक्तव्यातून सिद्ध झाले आहे.
निवडणूकाचा प्रचार शिगेला पोहचत असताना आपला भारत देश कधी अस्तीत्वात नव्हता असे म्हणत भारतीय लोकांचे रूप, वर्ण, रंग, व भाषा यावर सॅम पित्रोदाने शेलक्या मारल्या आहेत. एक प्रकारे आपल्या देशात विविधतेतून असलेल्या एकतेवर सॅम पित्रोदाने हल्ला केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर सभेतून कठोर शब्दातून सॅम पित्रोदांचा समाचार घेतला हे बरे झाले. शेवटी पित्रोदानी आपल्या पदाचा राजीनामा दिला, तो काॅग्रेस अध्यक्ष खडगे यांनी स्विकारला. यात काय मोठे तीर काॅग्रेसने मारले? सॅम पित्रोदा हे राजीव गांधी चे मित्र. ते गांधी फॅमिली सोबत सतत असणारच.
मूळ प्रश्न असा आहे की राहूल गांधीना राजकारणाचे धडे गिरवायला भारतातील कोणी मार्गदर्शक दिसलाच नाही काय? हा प्रश्न लिबरल पत्रकार मंडळी आपल्या लाडक्या राहूलबाबू यांना लिबरल पत्रकार व संपादक महाशय विचारण्याचे धाडस करणार आहेत का? उत्तर ' नाही ' असेच असणार. म्हणूनच राहूल गांधीच्या ब्रिटीश नागरिकत्वा संबंधी जे ऐकू येते ते खरे असावे असे आता वाटू लागले आहे.
केंद्रातील मोदी सरकार उलथुन पाडावे किंवा २०२४ च्या निवडणूकांत पराभूत करावे असा कट आंतरराष्ट्रीय स्तरावर रचला आहे . हा कट जागतिक लिबरल मंडळीने(अधिकतर साम्यवादी) रचला आहे. त्यांना काही धर्मांध मुस्लीम लाॅबी आणि धर्मांध ख्रिस्ती लाॅबीचे सहाय्य असावे असे मला वाटते. म्हणूनच आपल्या शिष्याची डाळ काही शिजत नाही असे दिसल्यामूळे सॅम पित्रोदांनी जाणून बुजून भारत, भारताचा इतिहास आणि भारतियांचे रूप, रंग, भाषा इत्यादी सार्या गोष्टी आर्यन इन्वेशन थेअरीच्या साह्याने पुन्हा चर्चेत आणले आहे. पण त्यातून इंडी आघाडीला फायदा होणार नाही.
जगातील धर्मांध मुस्लीम लाॅबी व धर्मांध ख्रिस्ती लाॅबी तसेच देव-धर्म न मानणारे साम्यवादी विचारवंत मंडळी आपल्या सनातन संस्कृतीचा आणि वैभवशाली प्रचीन इतिहासाचा पराकोटीचा द्वेश करीत असतात. गेल्या दहा वर्षात मोदी सरकारच्या काळात भारताची होत असलेली प्रगती पाहून अस्थिर झालेल्या वरील तीन लाॅब्यांच्या बाॅस मंडळीचा थयथयाट व द्वेष सॅम पित्रोंदाच्या मुखातून बाहेर पडला आहे. उठसूठ मोदी सरकारवर टिका करताना आम्ही वाघ, आम्ही जाणता राजा, मोदी फक्त एक चायवाला, चौकीदार चोर हैं, सनातन संस्कृती म्हणजे डेंग्यू, भारत तेरे टुकडे करेंगे, अशा प्रतिज्ञा करणार्या इंडी आघाडीतील एक ही मायेचा लाल सॅम पित्रोदांचा साधा निषेध नोदण्यासाठी पुढे आला नाही? लिबरल मंडळीची लाडकी ती बंगालची वाघिण ममता बॅनर्जींनी सुद्धा सॅम पित्रोदाचा निषेध केला नाही ? हे काय देश सांभाळणार ? हे काय देशाला आत्मनिर्भर करणार? हे काय देशाचा विकास करणार? हे काय युनोमध्ये स्वाभिमाने व धाडसाने भारताची भूमिका मांडणार?
सॅम पित्रोदांनी नंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला व तो काॅग्रेस अध्यक्ष खडगेनी स्विकारल्याचे जाहीर केले. हे सारे नाटक असावे किंवा ओपिनियन पोलचे आकडे पाहून पुन्हा एकदा हिंदु समाजाची जाती-जमातीत विभागणी करण्याच्या स्ट्रॅटेजीचा भाग असावा. हा अंदाज मी मांडला आहे. याचे कारण राहूल गांधींनी अगोदरच ठरल्याप्रमाणे, अल्पसंख्याक विशेषतः मुस्लीम बांधवाना मालमत्ता तसेच धार्मीक सवलती चा वर्षाव जाहीर सभेतून केलेला होता. सोबत जाती-जमातींना गोंजरण्याचे काम इंडी आघाडीतले पक्ष करीतच आहेत.
काँग्रेस पक्षाने जाहीरनाम्यात आपल्या सवयी आणि सोयीनूसार अल्पसंख्यांक विशेषतः मुस्लीम समाजाला अनेक सवलतीं देण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसला साम्यवादी मंडळींनी इतकी भूरळ घातलेली दिसते की गेल्या दोन लोकसभा निवडणूकात काँग्रेसचा दारूण पराभव का झाला आहे यावर विचारमंथन करण्याची काँग्रेस श्रेष्ठींना तसदी घ्यावीसी वाटत नाही. आज त्याच साम्यवादी मंडळींनी केरळमध्ये राहूल गांधीच्या विरोधात उमेदवार उभा केला आहे. याचा अर्थ असा आहे की इंडी आघाडीतील घटक पक्ष संधीसाधू आहेत. महाराष्ट्रात मविआ मध्ये उबाठा शिवसेनाने मवीआ घटक पक्षांशी चर्चा न करता आपले उमेदवार घोषीत केले आहेत.
कुठल्या तरी एका चॅनेल्सवर विद्यमान इंडी आघाडी आणि सन १९७७ च्या लोकसभेच्या निवडणूकात विरोधी पक्षांनी केलेल्या आघाडी वर तौलानिक चर्चा ऐकली. या बाबतीत जे चॅनेल्स वरून सांगितले गेले नाही ते आपल्या समोर मांडतो आहे.
सन १९७७ ला तत्कालीन विरोधी पक्षांपैकी संघटना काॅग्रेस, भारतीय जनसंघ, लोकदल आणि समाजवादी पक्ष या पक्षांनी आपआपले पक्ष विसर्जीत करून जनता पक्ष स्थापन केला होता. जनता पक्षाला मार्गदर्शक म्हणून थोर समाजवादी नेते जयप्रकाश नारायण होते. म्हणून जनता पक्ष विजयी झाला होता. सध्याच्या इंडी आघाडीकडे नेतृत्व नाही, मार्गदर्शक नाही. काही ठिकाणी घटक पक्ष स्वतंत्र रित्या लढत आहेत. तर काही विरोधी पक्ष इंडी आघाडीत सामील झालेले नाहीत. मूळ फरक हा आहे की जनता पक्षाचे मार्गदर्शक देशी होते तर इंडी आघाडीचे मार्गदर्शक विदेशी.
(लेख मालिकेचा भाग -२ सोबत आहे)
क्रमशः-
--------------------------------------------
लोकसभा निवडणूका - २०२४ इंडी आघाडीच्या प्रचाराचं स्वरूप अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण आणि हिंदू हिताकडे दुर्लक्ष (भाग-२)
सन २०१४ पासून भाजपाच्या प्रगतीचा चढत्या आलेखाचे विश्लेषण केले तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक राज्यात मतदार जागृत होत आहेत. बहुतांश न्यूज चॅनेल्सचे ओपिनियन पोल हेच दाखवित आहेत. बंगाल, पंजाब, तामीळनाडू, केरळ, आणि तेलंगणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोंना मतदारांचा दिसणार्या प्रचंड प्रतिसादातून तेथील मतदार विरोधी पक्षांना सांगत आहेत, की 'आम्हांला आता एकजिनसी समाज म्हणून राहावयाचे आहे आणि विकास साधावयाचा आहे. तुमची फोडा आणि झोडा ही निती यापुढे चालणार नाही.'
देशात सर्वत्र साम्यवादी व समाजवादी पक्षांचे नामोनिशाण मिटण्याच्या मार्गावर आहे, तरी त्यांचा पीळ काही जात नाही. आता तर त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. याचे आश्चर्य ही वाटत नाही. कारण स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधीजींना ही काँग्रेस बाबत भ्रमनिरास होऊ लागला होता आणि त्यातूनच त्यांनी काँग्रेस विसर्जीत करण्याचा सल्ला दिला होता.
तसाच काहिसा भ्रमनिरास भूतपुर्व साम्यवादी आणि समाजवादी नेत्यांना ही आपआपल्या पक्षांबाबत स्वातंत्र्यानंतर झाला होता. त्यां नेत्यांनी आपले हातचे काही ही न राखता स्पष्टपणे झालेला भ्रमनिरास मांडलेला आहे. त्यातील काही नेत्यांचे म्हणणे साप्ताहीक विवेक (हिंदूस्थान प्रकाशन संस्था) च्या अमृतपथ या ग्रंथात डॉ. शरद हेबाळकरांनी लिहलेल्या ' संघ व सामाजिक परिवर्तन ' या शिर्षकाच्या लेखात मी वाचले आहे. ते आपल्या समोर ठेवतो आहे. प्रथम सी अच्यूत मेनन काय म्हणाले आहेत ते मी आपल्या समोर ठेवतो.
सी. अच्युत मेनन हे भारतीय साम्यवादी पक्षाचे नेते होते. काही वर्षे ते केरळचे मुख्यमंत्री होते. धर्म, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्र या संबंधी सन १९८४ च्या एका लेखात त्यांनी म्हटले आहे,
" It appears that one factor which helped this cultural unity was the Hindu faith. I do not say the Hindu religon. The reason for it is that Hindu religon is not a religion in it's ordinary meaning. Another reason is that i include Buddhist, and Jain faiths also within the bounds of Hindu faith." ("असे दिसते की, सांस्कृतिक एकता टिकविण्यात हिंदू जीवनश्रद्धा या घटकाची मदत झाली आहे. मी हिंदू धर्म या अर्थाने असे म्हणत नाही. कारण सर्वसामान्य रिलिजन या अर्थाने ' हिंदू धर्म ' हा रिलिजन नाही. दुसरे कारण असे की बौद्ध आणि जैन पंथाचा समावेश मी हिंदू जीवन-श्रद्धांच्या अंतर्गत करतो ")
या लेखात अच्युतजींनी आद्य शंकराचार्याच्या चार दिशांना चार पीठांची स्थापना करून केलेल्या दिग्विजय यात्रेचा गौरव केला आहे. त्यांच्या या कार्याला अच्युतजींनी भारताच्या ऐक्याचे प्रतिक म्हटले आहे. इतकेच नव्हे तर शेवटी ते लिहीतात, ' Indian Nationlism is a reality ' (भारतीय राष्ट्रीयत्व ही वास्तविकता आहे ')
भारत या नावाचा देश कधी अस्तित्वात नव्हता असे म्हणणार्या साम्यवादी व समाजवादी पक्षांच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना सी अच्यूत मेनन यांनी हा घरचा अहेर कधीच दिलेला आहे. तरी विद्यमान काँग्रेस, साम्यवादी व समाजवादी नेते मंडळी विदेशी लिबरल लाॅबीचा नाद सोडत नाहीत. मागे आपल्या देशातील एका ख्रिस्ती धर्मगुरूने नव्या वर्षाचे स्वागत करताना राष्ट्रवादी सरकाराचा पराभव करा असे जनतेला आवाहन केले होते. त्यावर ' ख्रिस्ती धर्मगुरू की विरोधी पक्षांचा दलाल? ' शिर्षकाचा लेख मी पब्लीश केला आहे.
मोदी सरकार पराभूत करण्यासाठी जागतिक लिबरल मंडळीने एक आंतरराष्ट्रीय कट रचला आहे. त्या जागतिक लिबरल मंडळी सोबत एक जिहादी लाॅबी आणि एक ख्रिस्ती लाॅबी ही असावी असे मला वाटते. त्या ख्रिस्ती लाॅबीतले सॅम पित्रोदा एक प्यादी असावेत.
जगातील दोन एकेश्वरी (मुस्लीम व ख्रिस्ती) धर्माची शिकवण, व प्रसार करण्याची पद्धती या संबंधीत एक स्वतंत्र लेख लिहण्याचे मी ठरविले आहे. त्यात आपल्या संविधानातले कलम २५ चा अर्थ काय आहे, याबाबत न्यायालयासमोर ख्रिस्ती संस्थेने दाखल केलेल्या याचिकांवर धर्मांतर, धर्म प्रचार व धर्माचे आचरण याची स्पष्ट माहिती विषद करून न्यायालयाने याचिकांकर्त्यावर ताशोरे मारत जो निकाल दिला आहे, त्याची ही माहिती त्या लेखात असेल. ही सारी माहिती प्राध्यापक जी सी असनानी (एम. एस. सी., पी एच डी) (राष्ट्रसंघ निवृत्त) यांनी लिहलेल्या 'अपील टु हिन्दु साधूज ' या शिर्षकाची छोट्या पुस्तिकाची मराठीतली आवृत्ती ' हिंदू जनतेला आवाहन ' या पुस्तिकात सविस्तर आहे.
प्राध्यापक असनानींनी अत्यंत आनंदाने त्यांच्या पुस्तिकेच्या भाषांतराचे व प्रकाशनाचे सर्व अधिकार विनामूल्य प्रकाशक श्री वसंत वि आपटे (सरोज प्रकाशन) यांना दिले. भाषांतरकार आहेत श्री स.सी.आपटे व श्री ना.रा. खंडकर. ही पुस्तिका सर्वांनी आवर्जून वाचण्यासारखी आहे. माझ्या लेखाला मर्यादा असणार म्हणून हिंदू संघटनेच्या तमाम कार्यकर्त्यांनी ही पुस्तिका खरेदी करून वाचून हिंदू समाज बांधवांत जागृती निर्माण करण्याची अंत्यत जरूरीचे आहे. कारण साम्यवादी मंडळी असो वा धर्मांध ख्रिस्ती व धर्मांध मुस्लीम असो यांचे ध्येय, धर्म, व कर्म हिंदू संस्कृतीचा बिमोड करण्याचा आहे.
क्रमशः -
---------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा