बुधवार, १७ एप्रिल, २०२४

लोकसभा निवडणूका २०२४ इस बार चारसौ पार बनाम हटाव मोदी सरकार (भाग-३, भाग-४)

पंडीत जवाहरलाल नेहरू नंतर पुढे लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. त्यांनी सुत्रे हातात घेतल्यावर पाकिस्तानने (अर्थातच अमेरिकेच्या मार्गदर्शनाखाली) भारतावर आक्रमण केले. पण पंतप्रधान शास्त्रीजींनी आपल्या सेनादलांना पूर्ण मोकळीक देऊन पाकिस्तानच्या आक्रमणाचा समाचार घ्या असा आदेश दिला. पाकिस्तानाचा संपूर्ण पराभव झाला. रशियातील ताश्कंद येथे भारत व पाकिस्तान मध्ये तह झाला. दुर्दैवाने पंतप्रधान शास्त्रीजींचा ताश्कंद येथेच मृत्यू (अर्थात संशयाच्या धूक्यात) झाला. पुढे पंडीत नेहरूच्या कन्या काँग्रेस मधील अनेक जेष्ठ नेत्यांऐवजी पंतप्रधान झाल्या. पण त्या कशा पंतप्रधान झाल्या हे  फक्त पंडीत नेहरूवर ज्यांचा प्रभाव पडला होता त्या रशियन साम्यवादी सत्ताधार्यांना आणि इंदिराजींनाच ठाऊक !

इंदिरा गांधीच्या काळात काँग्रेस पक्षात फूट पडली. इंदिराजींच्या सरकारला डाव्या म्हणजेच साम्यवादी पक्षांचा पाठींबा मिळाला. त्या बदल्यात साहित्य, संस्कृती, शिक्षण, मिडीया ही सगळी क्षेत्र साम्यवादी पक्षांना आंदण म्हणून दिल्या गेल्या. या प्रकारे इंग्रजांचा वारसा चालविणारी नोकरशाही आणि स्पाॅट पाॅवर च्या सगळ्या क्षेत्रावर कब्जा केलेले कम्युनिस्ट यांच्या युतीतून आज ज्यांना आपण ल्युटेन्स लाॅबी किंवा खान मार्केट गँग या नावांनी ओळखतो तो राज्यकर्ता वर्ग तयार झाला. 

भारताच्या इतिहासात आजवर झालेली दिशाभूल या वर्गाने दुप्पट उत्साहाने तशीच सुरू ठेवली किंबहूना अधिकच तीव्र केली. साम्यवादी विचारसरणीचे इतिहासकार जे धर्माला अफूची गोळी म्हणत होते त्यांनी इतिहासाची पाठ्यपुस्तकं लिहीतांना एकच निकष सर्वाधिक महत्वाचा मानला. ' हिंदू धर्माशी संबंधित कुठल्याही गोष्टीला महत्व देऊन इतिहास तथाकथित सांप्रदायिकतेकडे झूकू द्यायचा नाही.' या निकषचा अतिरेक करून त्यांनी हा ध्यास विकृतीच्या पातळीवर नेला. हिंदू धर्म, संस्कृती, ऐताहासिक घटना आणि व्यक्तिमत्व यांना इतिहासातून पुसून टाकण्याचा प्रयत्न झाला तो डाॅ. मनमोहनसिंगच्या काळापर्यंत अविरत सुरू राहिला."  तो संपूर्ण इतिहास आता बदलण्याचा आराखडा तयार होत असणार म्हणूनच ' इस बार चारसौ पार ' असे पंतप्रधान मोदी सांगत असावेत.

सन २०१४ ला नरेंद्र मोदीनीं प्रथम साम्यवादी रूपी अफूच्या नशेत असणार्या दिल्लीतली खान मार्केट गँगचे कंबरडे मोडले. पंतप्रधानासोबत देशाच्या तिजोरीतून विदेश वारी करणार्या तथाकथित लिबरल पत्रकार संपादक मंडळींच्या विदेश वारीला कायमची बंदी घातली. अनेक विदेशी एनजीओ ज्यांचा धंदा फक्त मुस्लीम आणि ख्रिस्ती लोकांनाच फायदा देऊन दोन्ही धर्माचा प्रसाराचा होत असे त्यावर हातोडा नव्हे नांगर फिरविला. कित्येक बेनामी कंपन्यांना टाळें लावली. अजुनही पुष्कळ गोष्टी करावयाच्या आहेत. त्यासंबंधीतले सोशल मिडीयावर  विडीओ आपण पाहत आहोतच.

सन २०१४ च्या लोकसभेच्या निवडणूकांत भाजपाचा विजय होऊन प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालील खर्याखुर्या राष्ट्रवादी विचाराचे सरकार अस्तित्वात आले. अनेक वर्षे काँग्रेस व लिबरल मंडळीचे राज्य होते. त्यांनी संघ-भाजपा-विश्व हिंदू परिषद एकूणच संघ परिवारा बद्दल द्वेष पसरविण्याचे काम विविध माध्यामां द्वारें हातात असलेल्या सर्वकष सत्तेतून केले. तीच केंद्रातील सत्ता आता भाजपाच्या हातात आहे, हा विचारच आताच्या विरोधी पक्षांना आणि त्यांची समर्थक असलेल्या लिबरल मंडळींला सहन होत नाही. तेव्हापासून आपल्या देशातील लिबरल मंडळींचा थयथयाट सुरू झाला आहे. तो आज अधिक उग्र रूपात दिसत आहे. तो कायमचा नष्ट व्हावा या हेतूने निवडणूकीच्या माध्यमातून भाजपा इतर पक्षातल्या नेत्यांना प्रवेश देत असावा.  

शेवटी निवडणूका रणांगणच आहे. अन् विशेषतः जेव्हा आजच्या प्रमाणे राष्ट्रवादी आणि विदेशी शक्तीशी हात मिळविणारी इंडी आघाडी एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा ते कुरूक्षेत्र दिसू लागते. ' प्रत्येक राष्ट्राचा एक धर्म असतो. तो कोणत्याही धर्मापेक्षा व न्यायापेक्षा श्रेष्ठ असतो. ' प्रत्यक्ष न्यायमूर्तीस लोकमान्यांनी हे सुनवले होते. 

आक्रमक बाबराचे नामोनिशाण उखडून तेथे राष्ट्रपुरूष श्रीरामाचे मंदिर बांधणे हा राष्ट्रधर्म असल्याने न्यायालय व स्वतःहाला सर्वधर्मसमभावी मानणारे पक्ष हे महनीय कार्य रोखू शकले नाहीत.  पंडीत नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, वि पी सिंग, चंद्रशेखर व नरसिंहराव इत्यादी पंतप्रधानांनी वेळकाडूपणा दाखविला. वस्तुतः या माजी पंतप्रधानांनी स्वमताची नशा केली आणि राष्ट्रधर्मास अव्हेरले. 

मातृभूमी स्वर्गापेक्षा प्रिय आहे  हे श्रीरामाचे वचन आहे व त्यानुसार सुवर्णमयी लंकेचाही त्याग ही श्रीरामांची कृती राष्ट्रभक्तीचा पहिला पाठ आहे. पण काॅग्रेस सकट इंडी आघाडीतले पक्ष, इतर प्रांतीय पक्ष आणि लिबरल अभ्यासक मंडळी, व संपादक महाशयांनी हा पाठ गिरवयाचाच नाही असे ठरविलेले दिसते. या संदर्भात अलिकडे सोशल मिडीयावर इंडी आघाडीतल्या घटक पक्षांवर टिका करणारी एक पोस्ट व्हायरल झाली आहे. ती आपल्या समोर ठेवतो आहे.

" Except Bjp no party is fighting for absolute majority. 273 seats are required for majority and Congress is contesting on 230 seats, SP on 37, BSP 37, Lalu 20, Mamata on 42, Uddhav Thackeray on 19. It means no one is contesting to form the government. They are contesting only to ensure that Bjp does not get majority. Please do not waste your votes. This election is for the post of Prime Minister, not providing MPs' funds to anyone's relatives. Must Vote in National Intrest."

 गेल्या पाच वर्षात विदेशातील शक्तीनी उघडपणे मोदी सरकारचा पराभव करण्याचा चंग बांधला आहे, हे ऐकून होतो. पण दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना न्यायालयीन कस्टडीत पाठविल्यानंतर त्यांच्यातला भ्रष्टाचार रूपी भस्मासूराचं दर्शन झाल्यामूळे केजरीवाल विदेशी शक्तीचे एजंट आहेत हा समज पक्का झाला आहे. अशांना फौजदारी कलम लावून जन्मठेपची शिक्षा द्यावयास हवी.

स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या विदेशी शक्ती कार्यरत होत्या त्या आज ही आपल्या देशात सांस्कृतिक राष्ट्रवादाची कल्पना मोडीत काढण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. त्या शक्ती आजही पदोपदी आपली दिशाभूल करीत आहेत. त्यातून त्यांना यश मिळणार नाही हे अनेक ओपिनियन पोल मधून दिसत आहे. याचे कारण -- 

आपल्या देशात देशहीत जपणारे अनेक  इतिहासकार, अनुवंशतज्ञ, संशोधक आणि पुरातत्व खात्यातील अधिकारी, आणि संघ परिवाराच्या संस्था, लिबरल लाॅबीला निष्प्रभ  करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. अशा विद्वान मंडळीच्या ज्ञानातून कष्टातून आणि त्यांच्या साहित्यातून आपल्याला खरा इतिहास काय आहे, हे कळू लागले आहे. 

अशा महनीय व्यक्तींच्या व संस्थाच्या या महान कार्याची महती त्यांच्या साहित्यातून आपण सदैव वाचत राहून जनसामान्यांना पर्यंत पोहचण्याचे कार्य करीत राहण्यानेच आपण त्या महनीय व्यक्ती व संस्थांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केल्यासारखे होईल असे मला वाटते.

                                क्रमशः--

(सोबत भाग- ४ जोडला आहे )          ---------------------------------------------

                  (भाग--४)

श्री अभिजित जोग आपल्या 'असत्यमेव जयते' या ग्रंथात आपल्या वैदिक संस्कृतीची पाळेमूळे संबंधित इतिहासाबद्दल मांडताना म्हणतात,  

" सुप्रसिद्ध विद्वान जेफ्री आर्मस्ट्राँग म्हणतात, Sankrit is so perfect that it is almost  mathamatics. वैदिक संस्कृती पासून लौकीक संस्कृतीची निर्मिती झाली. ऐताहासिक संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की ऋग्वेद ही पहिली साहित्य निर्मिती होय. नंतर भरताचे नाट्यशास्त्र, रामायण, महाभारत सारखी महाकाव्यें निर्माण झाली व ती लोकप्रिय झाली. त्यातूनच सर्वसामान्य लोकमध्ये संस्कृत शिकण्याची इच्छा झाली. मग सर्वसामान्यजन संस्कृतचा वापर सर्रास करू लागले. त्यातूनच शौरसेनी, गांधारी, अर्धमांगधी, कामरूपी या सारख्या प्राकृत भाषांची निर्मिती झाली. या भाषामधून हिन्दी, मराठी, बंगाली सारख्या आधुनिक भाषांची निर्मिती झाली. संस्कृतचा भारतातील इतर दोन भाषा समूह द्रविडीयन व ऑस्ट्रिक (म्हणजे ऑस्टेलिया व आग्नेय आशियायी) भाषांवर प्रभाव पडलेला आहे. दक्षिण भारतातील द्रविडीयन भाषांवरील संस्कृतचा प्रभाव आज ही आपल्याला सतत जाणवतो."

मी दक्षिणेकडील चित्रपट (अर्थातच हिन्दीत डब झालेले) अधुनमधून पाहतो. तसेच त्यांचा फिल्मफेयर अवार्डचा समारंभ पाहतो. तेव्हा विजेता नट- नटी माईकवरून आपआपल्या भाषेतून प्रेक्षका समोर प्रतिक्रीया देताना प्रथम संस्कृत शैलीत नमस्कारम् असे म्हणतात. राजकारणावर चर्चा करणार्या पी गुरू सारख्या इंग्लीश यु ट्युब वर सुत्रधार श्री अय्यर आणि राजकीय अभ्यासक श्री राम गोपालन, श्रीराम शेषाद्री, श्री शेखर अय्यर इत्यादी मंडळी संस्कृत शैलीत नमस्कारम् म्हणत प्रेक्षकांना अभिवादन करतात.

श्री अभिजित जोग, पुढे म्हणतात, "उत्तर आणि दक्षिण भारतातील संस्कृती एकच आहे आणि तिचा पाया वैदिक संस्कृती हाच आहे. दक्षिण भारतातील चोला, पांड्या या सारखी राजघराणी चंद्रवंशी किंवा सूर्यवंशी घराण्याचा वारसा सांगत असतात. याचा अर्थ दक्षिण भारतियांना आपण अखिल भारतीय संस्कृती व सभ्यतेचे घटक असल्याचा अभिमान होता व आज ही आहे. सुप्रसिद्ध इतिहासकार निलकंठ शास्त्री म्हणतात, ' None can miss the significance of the fact that early Tamil Literature, the earliest to which we have access, is already full of words, conceptions and institutions of Sanskritic origin.' देशातील उत्तर - दक्षिण वाद केवळ काल्पनिक आहे." 

" भारतीय संस्कृतीतील तत्वज्ञान विषयक चिंतन पूर्व उत्तर प्रदेश व बिहार या भागात झाले. उपनिषदे, सूत्रे, बौद्ध, जैन या सारखी दर्शने ही इथलीच. तांत्रीक परंपरा बंगालमध्ये विकसीत झाली तर मूर्तीपूजा ही संकल्पना दक्षिण भारतातून आली. विविध वनवासी जमाती मधील निसर्गपूजेच्या परंपरानी वैदिक संस्कृतीचा प्रवाह अधिक चैतन्यशील केला."

" यावरून हे स्पष्ट होते की आजची हिंदू संस्कृती आसेतू हिमाचल देशाच्या कानाकोपर्यातील सर्व भारतियांनी निर्माण केलेली संस्कृती आहे. पूर्व-पश्चीम, दक्षिण-उत्तर,आर्य-अनार्य, गोरे-काळे असल्या कुठल्याही भेदभावाला, वैरभावनेला, अशा संघर्षाला जागाच नाही. संघर्ष कोणी करू पाहात असेल तर तो त्याचा राजकीय स्वार्थ असेल, किंवा तो विदेशी शक्तीचा मांडलिक असू शकतो." दुर्दैवाने आज इंडी आघाडी मधील सार्या पक्षांचा राजकीय एजंडाच जागतिक लिबरल लाॅबीच्या सल्ल्यावरून होतो आहे याचा अनुभव आपण घेत आहोत. म्हणूनच  सलग दोन वेळा लोकसभेच्या निवडणूकात त्यांचा पराभव झाला.  

" आर्याची जेनेटिक ओळख म्हणून मान्य पावलेला हॅप्लोग्रुप M हा भारतातील सर्व उच्च-नीच मानलेल्या गेलेल्या जाती-जमाती मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. विख्यात संशोधक नोहा रोसेनबर्ग आणि संघमित्रा सेनगुप्ता, हार्वड मेडीकल स्कूल, ब्राॅन्ड इन्स्टिट्यूट ऑफ हार्वड ॲन्ड एमआयटी, डेक्कन काॅलेज ऑफ पूणे, तसेच जर्मन, कालिफोर्निया येथील संस्थाचे संशोधन सांगते की हरप्पन लोक व आजचे भारतीय लोक अनुवंशशास्त्रा- नुसार एकच आहेत. मधल्या काळात बाहेरून आलेल्या आक्रमणाचा पुरावा नाही आणि पुरातत्व खात्याच्या अहवालातून काही ही खूणा नाहीत."

आज उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत भारतातील सर्व जाती--जमाती तसेच आदिवासी मध्ये ही हरप्पन डीएनए सर्वाधिक प्रमाणात आढळून येतो. आपण सर्व भारतिय लोक आनुवंशिक दृष्ट्या एकच आहोत. हाच आपल्या सनातन संस्कृतीचा पाया आहे. उत्तर भारतीय उच्च आणि दलित-आदिवासी व दक्षिण भारतीय हे मूलनिवासी हा इंग्रजाळलेल्या दिडशहाणे व लिबरल मंडळींनी केलेला खोटा प्रचार आहे.

ब्रिटीश राजवटीने आर्याचा आक्रमण सिद्धान्त प्रमाणभूत करून दिडशें वर्षे भारतियांची मानसिकता गुलामी स्वरूपाची केली हे सत्य आता सर्वसामान्य मतदारांना ही कळू लागले आहे. म्हणूनच हिंदुत्व, राष्ट्रवाद, हिंदू संस्कृती- परंपरा जपणारा, आणि सर्वसमावेशकतेचं तत्व अवलंबून        'सबका साथ और सबका विकास, ना किसी एक सांप्रदाय पर मेहरबान ' असे म्हणत देशाला आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, सामरिक क्षेत्रात पुढे नेत आहे अशा मोदी सरकारवर सर्वसामान्य मतदार अधिक आकृष्ट होत आहे असे दिसते. थोडक्यात एवढेच म्हणतो,

'जाग उठा है आज देशका वह सोया अभिमान ! '

--------------------------------------------                                        

२ टिप्पण्या:

  1. विष्णुजी नमस्कार,
    आपले २०२४ निवडणुका - चारही भाग वाचले. आपल २०१४ पासुनच दोन्ही विचारधारांवरील, सखोल, अभ्यासपुर्ण भाष्य यथोचित व मार्गदर्शक आहे. निवडणुकांचे अजुनही पांच टप्पे बाकी आहेत, त्यामुळे अशा लेखांची आवश्यकता आहेच, पण पहिल्या दोन टप्प्यांची मतदानाची टक्केवारी पाहता, राष्ट्रवादी मतदार अजूनही सुस्त दिसतो आहे व ही परिस्थिती चिंताजनक आहे
    धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...