आता आपण दक्षिण भारतातील कर्नाटक, आन्ध्र व तेलंगणा या राज्याच्या राजकीय पक्षांच्या दिशा व दशावर चर्चा करू या. कर्नाटक मध्ये मुख्यमंत्री सिद्धरमिया यांचा एक गट व दुसरा डी शिवकुमार यांचा एक गट आहे. येथे ही गांधी घराणे नामधारी आहे. आज ना उद्या या पैकी एक गट प्रान्तीय पक्ष स्थापन करेल. या राज्यात काँग्रेस विधानसभेत विजयी झाली याचे कारण काॅग्रेस श्रेष्ठींनी तिथे उमेदवार निवडण्याचे हक्क तेथील लोकल बाॅडीला दिले होते. दुसरे असे आहे की कर्नाटक हे राज्य राजस्थान व मध्यप्रदेश प्रमाणे काँग्रेस व भाजपा या दोन पक्षातच लढाई होत असते. कर्नाटकात भाजपा सत्तेवर होता. त्याच्या विरूद्ध प्रचार करणे काँग्रेसला सोपे गेले. असे असले तरी भाजपाच्या मताची टक्केवारीत घट झाली नाही. तिथे देवेगौडांच्या पक्षाला मिळणारी मतें काँग्रेसला गेली. म्हणून काँग्रेस विजयी झाली. आता देवेगौडाच्या पक्षाने भाजपाशी युती केली आहे. विधानसभेच्या निवडणूकातला भाजपाला जो व्होट शेअर मिळाला तो लोकसभेच्या निवडणूकीत मिळेलच सोबत मोदींच्या करिश्माची मतें ही मिळतील. देवेगौडा पक्षाची मते भाजपाशी युती केली असल्यामुळे ती मतें काँग्रेसला जाणार नाहीत. म्हणून भाजपाला इथे अपेक्षित यश मिळेल असे वाटते.
आन्ध्र प्रदेशात अस्तीत्वात असलेले दोन्ही पक्ष एक प्रकारे प्रान्तीय पक्ष आहेत. एक टीडीपी व दुसरा वायसीआर काँग्रेस (जगन रेड्डीचा) म्हणजे मूळ काँग्रेसचाच. उत्तर प्रदेशात जेव्हा सतत सपा व बसपाला आलटून पालटून सत्ता मिळत गेली तशीच स्थिती काही काळ आन्ध्र प्रदेशात राहील असे दिसते. दुसरे महत्वाचे कारण असे आहे की जगन रेड्डीच्या सरकार विरूद्ध जनतेत प्रचंड असंतोष आहे. तसेच जगन रेड्डीच्या ख्रिस्ती धर्माचरणातून आन्ध्र प्रदेश मधील हिंदु समाजात असंतोष दिसतो आहे. तो आपण पदरात का घ्यावा असा विचार भाजपाने केला असावा. म्हणून जगन रेड्डीच्या पक्षासोबत भाजपाने युती केली नसावी. आज ना उद्या या राज्यात ही भाजपा आपला जम बसविण्यात तयारीत असावा. असे असले तरी संसदेत महत्वाच्या बिलांना जगन रेड्डीं सरकारने, मोदी सरकारच्या बाजूने मतदान केलेलं आहे. म्हणून भाजपाचे श्रेष्ठी आन्ध्र मधील राजकारणात सध्यातरी आक्रमक बनण्याचे टाळत असावेत. पण मूळ कारण हे की आन्ध्र प्रदेशातील शहरात व ग्रामीण भागात बूथ पातळीवर कार्यकर्ते तयार करण्याच्या कामात भाजपा कडून ढिलाई झालेली दिसते हे जमिनीवरील सत्य आहे. तेलगू दसम हा प्रान्तीय पक्ष आन्ध्र प्रदेशात अजुनही शक्तीशाली आहे. म्हणून भाजपाच्या श्रेष्ठींनी टिडीपी शी युती केली आहे.
तेलंगणात काँग्रेस सत्ताधारी असली तरी पुढील विधासभेच्या निवडणूका येतील तेव्हा काँग्रेसला ॲन्टी इन्कबंन्सी फेस करावी लागेल. त्याची बीजे भाजपाचे सध्याचे विधायक पेरतील. तेलगंणात विधानसभाच्या निवडणूकात केसीआरचा पराभव झाला आहे. लोकसभा निवडणूकात मोदी सरकारच्या कार्यावर मतें द्यावीत अशी येथील मतदारांची एक मानसिकता राज्यात झालेली आहे, असे ऐकीवात आहे. विधानसभेच्या पुढील निवडणूका येण्याअगोदर तेलंगणात भाजपा आपले बस्तान भक्कम करेल असे वाटते. भाजपाने ज्या प्रकारे ईशान्य भारत, पश्चीम बंगाल, कर्नाटकात, आपले वर्चस्व निर्माण करू लागला आहे त्यावरून आन्ध्र, तामिळनाडू आणि केरळ मध्ये भाजपाच्या मताची टक्केवारी वाढलेली दिसेल.
क्रमशः--
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा