या भागात आपण अलिकडे विधानसभेच्या निवडणूका झाल्या अशा काही राज्यातील राजकीय पक्षांची दिशा व दशा यावर चर्चा करणार आहोत. प्रथम आपण मध्यप्रदेशावर चर्चा सुरू करू या.
मध्यप्रदेशात काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. भाजपाने लाटलेल्या सत्तेला एक प्रकारे तेथील जनतेने शिक्कामोर्तब केले असेच समजले गेले आहे. त्यावर काँग्रेस व विरोधी पक्षांनी टिका करण्यापेक्षा पराभवावर चिंतन करणें आवश्यक आहे. पण चिंतन करण्याची प्रथा फक्त भाजपा जपत आहे.
श्रीराम भक्तांनी बाबरी मशीद पाडल्यामूळे तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांनी उत्तर प्रदेशमधील भाजपाचे कल्याणसिंग च्या नेतृत्वातले सरकार बरखास्त केले होते. त्या नंतर तिथे झालेल्या निवडणूकात भाजपाचा पराभव झाला होता. पण भाजपाने त्यावर चिंतन केले असावेच. त्यावेळी एवी-तेवी बाबरी ढाचाचे अस्तित्व नष्ट झालेच आहे तर शांततेत न्यायालयीन लढाईत अधिक लक्ष घालू या असा संघ परिवाराने निर्णय घेतला असावा. शेवटी कुठल्याही कार्यात संयम व चिकाटी असली की फळ मिळते. झाले तसेच. न्यायालयाचा निकाल योग्य तो आला. श्रीरामजन्मभूमीवर मंदिर उभे राहीले आहे.
आता तेच श्रीरामजन्मभूमी मंदिर अयोध्याला जगातील अव्वल दर्जाचे पर्यटन स्थळाचे रूप देणार आहे. अनेक बेरोजगरांना नोकर्या व व्यवसायाची संधी देणार आहे. त्यातून राजकीय फायदा भाजपालाच होणार आहे. हे भाजपा व संघ परिवाराच्या श्रद्धेचं व श्रमाचं फळ आहे. यावर बाष्कळ आरोप करण्यांना श्रीराम मंदिराचा प्रश्न हातात घेण्यासाठी देशाच्या न्यायव्यवस्थेनं अटकाव केला होता का? बरं ते त्यांना जमले नाही हे समजू शकतो पण श्रीरामजन्मभूमी मंदिरात श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा समारोहाला आमंत्रण मिळूनही विरोधी पक्षांनी बाॅयकाॅट का केला ? ही विरोधी पक्षांची घोडचूक झाली असे जेष्ठ पत्रकार व अभ्यासक शेखर गुप्तांनी म्हटले आहे. ते शेखरजी भाजपाचे समर्थक नाहीत.
मध्यप्रदेशात विधानसभेच्या निवडणूकात कमलनाथांच्या राजकीय चलाखीचा टिकाव लागला नाही. कारण मध्यप्रदेश हे पहिले राज्य आहे की तेथे संघपरिवाराच्या प्रभावाची दखल घेण्याची सुरूवात झाली. त्यामूळे अयोध्येतील श्रीरामन्मभूमी मंदिराचा प्रभाव तेथील मतदारांवर पडलेला असणारच की ! कमलनाथ हे एक मुरब्बी राजकारणी आहेत. पण या वेळेच्या पराभवचा धक्का कमलनाथांसाठी निश्चीतपणे मोठा आहे. त्यांना ही आपला राजकीय वारसा स्वतःच्या मुलाकडे यशस्वी रित्या जावा असे वाटले असणारच. त्यातूनच ते भाजपाच्या वाटेवर आहेत अशी वावडी आली असावी. आता आपल्या मुलाची राजकीय कारकिर्द भक्कम करण्यासाठी त्यांना आणखिन ५ वर्षे मेहनत करावी लागणार आहे. माणूस नैराश्यात गेला की तो ज्या क्षेत्रात प्रभावी असतो ते क्षेत्रच त्याच्यासाठी पराभवायी ठरते. असाच धक्का राजस्थानातील काँग्रेस नेत्यांना ही बसला असावा.
राजस्थान मधील काँग्रेस मध्ये दोन गट आहेत. एक अशोक गेहलोत यांचा आणि दुसरा सचीन पायलटचा. हेच एक अलिकडील राजस्थान विधान सभेच्या निवडणूकात झालेला काॅग्रसच्या पराभवाचे महत्वाचं कारण आहे. राजस्थानात काँग्रेस श्रेष्ठीचे गांधी घराणे फक्त नामधारी आहे. कारण अशोक गेहलोतच्या हातात असलेल्या समर्थकांचे संख्याबळ आणि आतापर्यंत सरकारचे प्रमूखपद भुषविलेल्या कारकिर्ती मधून आलेली ताकद आणि तिसरे कारण सोशल मिडीयात व्हायरल झालेल म्हणजे काँग्रेस हायकमांडना ब्लॅकमेल करण्याइतकी काही गुपीते गेहलोत कडे असावीत असे सोशल मिडीयातून वाचल्याचे आठवते.
गांधी घराण्याची हुकूमशाही राजस्थानात संपुष्टात आली आहे हे दिसले आहे. म्हणून सचीन पायलटला न्याय देता आला नाही. राहूल गांधी देशाला न्याय देण्यासाठी पदयात्रा करीत आहेत. चांगले आहे, पण त्यांच्या पक्षात निष्ठवान नेत्यांवर होत असलेल्या अन्यायाचे काय? लोकासांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण यातलाच हा प्रकार नव्हे काय ?
आता राजस्थानची सत्ता काँग्रेसच्या हातून गेली आहे. त्यामूळे राजेश पायलट यांना न्याय कसा देता येणार? राजेश पायलट कि अशोक गेहलोत अशा द्वंदात काँग्रेसचे श्रेष्ठी सापडले आहेत. अशा स्थितीत गेहलोत किंवा पायलटने नवीन पक्ष स्थापन केला तर आश्चर्य वाटणार नाही. '' जिथे राजकीय पक्ष आपली स्वतःची इस्टेट झाली असे पक्ष प्रमुखाला वाटते, तिथे पक्षांतर्गत झगडे बहुतांशी टांगते ठेवले जातात. पण त्यावरील निवाडा अधिक काळ अधांतरीत ठेवला की, ज्याच्यावर अन्याय झाला आहे तो गट वेगळी चूल मांडतो. ही जगाची राहटी आहे. ती प्रत्येक क्षेत्रात असते." शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष फुटण्याचे कारण याहून निराळे नाही. काळ आपले काम चोख करत असतो. तिथे भूतलावरील न्याय व्यवस्थेला स्थानच नसते. राजस्थान मध्ये गांधी घराण्याचा करिश्मा संपला आहे असे दिसते. मध्यप्रदेशात काँग्रेसला चेहरा राहिला नाही. काँग्रेस श्रेष्ठींनी सर्व कार्यकर्त्यांना सामावून घेतले नाही तर काँग्रेसची जी स्थिती उत्तर प्रदेशमध्ये झाली तशीच स्थिती मध्य प्रदेशात व राजस्थानात झाली तर मला आश्चर्य वाटणार नाही.
क्रमशः---
विष्णुजी, नमस्कार.
उत्तर द्याहटवाआपल्या २०२४/दशा व दिशा लेखमालेचे सर्व भाग औसुक्याने वाचले.सार्वत्रिक
निवडणुका जाहिर होऊन प्रचारास सुरवात झालेली असताना, आपली ही लेखमाला, समयोचित, उद्बोधक व आतापर्यंतच्या राजकिय इतिहासावर प्रकाश टाकणारी आहे. यातून सामान्य वाचकाला (आता आवर्जून मतदाराला म्हणावयास हवे), पडणार्या बर्याच प्रश्नांची उत्तरे तुम्ही दिली आहेत.
ही लेखमाला निवडणुकिचा शेवटचा टप्पा तसेच निकाल लागेपर्यंत सुरु ठेवण्यासाठी आपणांस शुभेच्छा, धन्यवाद.