रविवार, ३१ मार्च, २०२४

लोकसभेच्या निवडणूका २०२४ राजकीय पक्षांच्या दिशा व दशा (भाग - ४)


राजकारण तसेच मिडीया आता कमर्शियल संस्था झाल्या आहेत. ज्याचें राजकीय प्रॉडक्ट (विचारसरणी) कालबाह्य होत जाते, तशी लोकांकडून मागणीत घट होते. मग त्यांचे प्रतिनिधी दुसरे स्पर्धक प्रॉडक्ट कंपनीचे एजंट बनतात. ममता बॅनर्जीचा तृणमूल काँग्रेस, स्टॅलीनचा डीएमके, अखिलेश यादवांचा समाजवादी, केजरीवालचा आप अकाली दल इत्यादी पक्षांचे स्टॉल्स सुद्धा काँग्रेस सारखे घराणेशाही स्वरूपाचेच असल्यामुळे आज ना उद्या हळुहळू त्यांचे ही दिवाळे वाजणार आहेच. मग ही लिबरल मंडळी किती वर्षे भाजपाला शिव्या देत बसणार आहे ? गेली दहा वर्षे या मंडळीच्या शिव्या, टिका सहन करीत भाजपा आपली शक्ती, व्याप्ती आणि सोबत वलय वाढवत आहे, तर विरोधी पक्ष क्षीण होत आहेत. हे असे का घडू लागले आहे ? हा लिबरल विचारसरणीचा पराभव नव्हे काय ?

काँग्रेस हा राष्ट्रीय स्तरावरील पक्ष. अनेक प्रान्तीय पक्षांचा जन्म काँग्रेस मुळेच झाला. त्याला भाजपा वा संघ परिवार जबाबदार नाही. प्रत्येक दशकातील काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च नेत्याचा अहंकार, भ्रष्टाचार, ऐषारामी जीवनशैली, व पारतंत्र्याच्या काळापासून वारस हक्काने प्राप्त आलेलेअल्पसंख्याकांचे तुष्टकरण इत्यादी कारणांमूळे काँग्रेसला उतरतीकळा लागली. या शिवाय हिंदुंची जातीय पातळीवर विभागणी, हिंदु हिताकडे दुर्लक्ष, सनातन धर्म, संस्कृती, देवदेवतांची व मंदिराची टवाळी, आणि मंदिराचे उत्पन्न मात्र सरकारच्या नावाखाली आपणच लुटायचे इत्यादी दुष्ट कृत्यें काँग्रेस व प्रान्तीय पक्ष करीत आले आहेत. अनेक वर्षे काँग्रेस व प्रांतीय पक्षांना या दृष्टतेतून फायदा मिळत राहिला. काँग्रेस व प्रान्तीय पक्षांच्या अशा प्रकारच्या दुष्कृत्यांमुळे देशाचा मूळ सनातनी पुरूष मात्र पोरका व दीन होत गेला.

सन १९२५ पासून ऊन, पाऊस, थंडीचा मारा सोसत निरंतर काबाडकष्ट करीत असलेल्या संघाने जनसंघ व आताचा भाजपा, विश्वहिंदु परिषद, बजरंग दल, शिक्षा भारती, भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ, वनवासी कल्याण आश्रम, हाॅस्पीटल्स, सहकारी बँका,व अनेक सेवा संस्था स्थापून एक परिवार निर्माण केला. त्या परिवाराचेच नाव आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवार. या परिवाराचे गोत्र 'भारतमाता' आहे. याच संघ परिवाराने देशातील मूळ पुरूषाला जिव्हाळा दिला; आधार दिला; आदर दिला ; संस्कार दिला; मानसिक व शारिरीक दृष्ट्या सशक्त बनविले; बंधुभाव व सेवाभाव दिला; सांघीक व स्वावलंबन धर्म दिला; स्वधर्म व स्वराज संबधी अभिमान दिला; राष्टधर्म दिला. आता तो सहस्त्रपुरूषाचं रूप घेऊन न डगमगता आत्मविश्वासाने, आत्मनिर्भरतेची कास धरून देशातल्या प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक प्रान्तात, आणि जगाच्या पाठीवर स्वाभिमानाने वावरू लागला आहे. यात कुठे आले राजकारण? हा माझा तमाम लिबरल लाॅबीला प्रश्न आहे.

आता एक धावती नजर मारू या लिबरल परिवार वर ! या परिवारात इंडी आघाडीतले सारे नेते आहेतच आणि अधिक साम्यवाद्यांनी पोसलेले नेते. हे कोण? ते नेते बाॅलीवूड चित्रपटात एखाद्या सर्व आधूनिक सोयी-सुविधा, यंत्र-तंत्र आणि शस्त्रे भरलेली केबीन, आपल्या मंडळींवर दाही दिशांकडून नजर ठेवून त्यांच्या हालचाली टिवी स्क्रीनने पाहात असलेला पण आपल्याला न दिसणारा बाॅस वा डाॅन हा मुखिया असतो. असे अनेक मुखिया जगभर आहेत. नंतर पोसलेले पत्रकार, संपादक, राजकीय अभ्यासक, विचारवंत, न्युज चॅनेल्स आणि त्यांच्या मार्गदर्शनातून तयार झालेले नक्षलवादी, ढोंगी पर्यावरणवादी, उठसूठ अंदोलन करणारे अंदोलनजीवी, दशहतवादी इत्यादी सारे याच लिबरल परिवाराचे सदस्य. या शिवाय बाॅलीवूड मधील काही कलाकार, ड्रग्ज माफीया, इस्टेट मार्केट, शेअर मार्केट, डायमंड मार्केट, अर्थतज्ञ पण ज्ञानाचा उपयोग आपल्या देशांतील राजकीय व सामाजिक व्यवस्था, उद्योग जगत, शिक्षण व्यवस्था इत्यादी संस्था अस्थिर करीत शेवटी कुठलेही मार्केट खाली आणणारी ही मंडळी.

हीच ती मंडळीं ज्यांनी सन २००४ ते सन २०१४ पर्यंत युपीए सरकार काळात भरपूर ऐषबाजी केली आहे. ती ऐषबाजी सन २०१४ ला मोदी सरकारमुळे संपली. पण खाल्ल्या अन्नाला जागे राहण्याची अट मान्य करावी लागते ना ! म्हणूनच ही लिबरल मंडळी संघ-भाजपाचा द्वेष करीत असतात. संघ त्यांच्या टिकेला व द्वेषाला भीत नाही. ज्यांची वैचारीक दिवाळखोरी झाली आहे अशांचा गेम नियतीच करीत असते. नियतीचा कायदा ' सत्कर्मासाठी दिक्षा ' तर
' दुष्कृत्यांसाठी शिक्षा ' असाच असतो. तिथे रीट पेटीशन वैगरे अशा काही भानगडी नसतात.

स्वातंत्र्यनंतर काँग्रेस सरकार समाजवादाचा आणि सर्वधर्म समभावाचा फक्त जयघोष करीत राहिली. पहिले पंतप्रधान पंडीत नेहरूंच्या ताफ्याच्या मागे लोक वेड्यासारखे धावत जाऊ लागल्याचे सर्वत्र दिसू लागले, अशा प्रकारच्या व्यक्ती पुजेचं दर्शन झाल्यावर डाॅ राम मनोहर लोहिया काँग्रेस मधून बाहेर पडले. नंतर पाठोपाठ अच्युतराव पटवर्धन, राजगोपाल चारी, जयप्रकाश नारायण इत्यादीं महात्मा गांधीजींच्या सच्च्या शिष्यांनी काँग्रेस सोडली. महात्मा गांधीजींनी ' काँग्रेस विसर्जीत करण्याचा ' जो सल्ला दिला होता तो याच कारणाने दिला असावा असे मला अधुन मधून वाटत असते. पण काँग्रेसने मॅक्समॅलूर व मेकाॅले जोडींने लिहलेला भारताचा खोटा इतिहास स्विकारल्यामूळे माझ्या शंकेचं निरसन झाले नाही.

राहूल गांधी महात्मा गांधींजींच्या हत्येचा विषय सतत उगाळीत असतात. पण हा विषय उगाळीत बसण्याचा सल्ला राहूल गांधींना त्यांचे सल्लागर देत असावेत असे गृहीत धरून त्या सल्लागाराचे कान उपाटून विचारावेसे वाटते की गांधीजींची हत्या झाली त्या वेळी देशाचे पंतप्रधान राहूल गांधीचे पणजोबा जवाहरलाल नेहरू होते हे राहूल गांधींना सांगितले आहे का?  त्यावेळी दिल्लीतच राहात असणार्या गांधीजींची हत्या झाली तेव्हा पंतप्रधान नेहरूंचे सरकार व सारी सुरक्षा यंत्रणा झोपा काढीत होते का? उठसूठ पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा अशी मागणी करणार्या राहूल गांधींना हे ही विचारवयास हवे होते की त्यावेळी (त्यांच्या पणजोबांजा) पंतप्रधानांचा राजीनामा विरोधी पक्षांनी मागितला होता का, की स्वतःहून राहूल गांधीच्या पणजोबांनी गांधीजींच्या सुरक्षेत आपल्या सरकारच्या हलगर्जीपणामूळे गांधीजींची हत्या झाली असे म्हणत राजीनामा दिला होता का ? 
त्यावेळी ----

काँग्रेसने काय केले ? गांधीजींची हत्या नथुराम गोंडसेंनी केली तेव्हा काँग्रेस नेते मंडळी व डाव्या विचारसरणीच्या मंडळींनी नथुरामाचे आडनाव गोडसे बघितले आणि दिसली ब्राह्मणाची घरें, दुकानें जाळा असा आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिला. शेवटी झाले ही तसेच. महाराष्ट्रात ब्राह्मणांची घरें जाळली, दुकानें जाळली, संपत्ती लुटली, हत्या केल्या. रक्तपिपासू काँग्रेस व समाजवादी व साम्यवादी मंडळींनी आपल्याच देश बांधवांच्या रक्ताचे पाट जोगोजागी वाहते केले, संघावर बंदी आणली, नेत्या-कार्यकर्त्यांना तुरूंगात डांबले. सात महिन्यानंतर निर्लज्जपणे स्वातंत्र्याच्या पहिला-वाहिला वाढदिवस अंहिसा व शांतीचा प्रतिक असलेला राष्टध्वज फडकावून साजरा केला. आज महाराष्ट्रात व देशात त्या काळात ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढविणार्या सार्या पक्षांची हालत काय आहे हे आपण पाहतो आहोत. ब्राह्मणांच्या विधवा माता-भगीनींचे शाप नडले. या पलिकडे माझी लेखणी इथून पुढे सरकत नाही.

वर विचारलेले प्रश्न अनुत्तरीत समजून आपण बाजुला ठेवू या. पण काँग्रेसचे मूळ काय हेच माहिती नाही, असे राहूल गांधी कुठल्या गुणवत्तेच्या वा कसोटीच्या आधारे पक्षांचे सर्वेसर्वा झाले या प्रश्नाचे उत्तर काँग्रेस व डावेपक्ष आणि आता इंडी आघाडीची आरती ओवाळणार्या लिबरल पत्रकार-संपादक मंडळी कडून मतदारांना हवं आहे. पण त्याचे उत्तर देण्याचे धाडस जगभराच्या मिडीयात चमकत राहणार्या भारतीय लिबरल मंडळीकडे नाही. अशाच मानसिकतेचं तामिळनाडूतील घराणेशाही पक्षाचं एक कार्ट सनातन धर्मावर सूड उगविण्याची भाषा करते. सनातन संस्कृतीचे संरक्षण करण्यासाठी ज्यांचा जन्म झाला आहे अशा परिवारावर कितीही आखडपाखड केली तरी विरोधी पक्षांची डाळ शिजणार नाही

क्रमशः


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...