बुधवार, ६ मार्च, २०२४

राज्यसभाची निवडणूक आणि महाराष्ट्रातील तीन काॅग्रेस नेत्यांचे पक्षांतर (भाग-२)

मिलिंद देवरा हे मूलतः काॅग्रेसचे असले तरी त्यांच्या प्रभावाची व्याप्ती त्यांचे पिताश्री मुरली देवरांच्या प्रभावा इतकी व्यापक नाही. मिलिंद देवरा यांची व्याप्ती फार तर दक्षिण मुंबई मतदार संघात एक दोन विधानसभा क्षेत्रापुरता मर्यादीत असावी. याचे कारण राष्ट्रीय स्तरावरील काॅग्रेसचे सर्वेसर्वा राहूल गांधी झाले तेव्हापासून ज्या काॅग्रेसच्या नेत्यांची मूले-मूली राहूल गांधीच्या वयाची असतील  त्यांचे खच्चीकरण सुरू झाले आहे. म्हणूनच आन्ध्र प्रदेशाचे लोकप्रिय मुख्यमंत्री के सी आर यांच्या अकस्मात अपघाती मृत्यू नंतर त्यांचे चिरंजीव जगन रेड्डी मुख्यमंत्री व्हावेत असे तेथील जनतेला वाटत होते. पण राहूल गांधीनी जगन रेड्डीला मुख्यमंत्री केले नाही. शेवटी काय झाले आन्ध्र प्रदेशात काॅग्रेसचे नामशेष झाली. ज्योतिराध्य सिधींया फुटले, सचीन पायलटची अवस्था तळ्यात की मळ्यात अशी करून ठेवली आहे. महाराष्ट्रात सुनिल दत्त यांची कन्या प्रिया दत्त, सुशीलकुमार यांची कन्या प्रणिती शिंदे, पंतगराव कदम यांचे पुत्र विश्वजीत कदम, विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित व धिरज इत्यादींची कुचंबणा होत असल्याचे ऐकिवात आहे. ही झाली महाराष्ट्रातील काॅग्रेस नेत्यांची अपत्यांची यादी. देशभरातील काॅग्रेसच्या जेष्ठ नेत्यांची व त्यांच्या राजकीय वारसांची अवस्था याहून अधिक केविलवाणी झालेली आहे.

मिलिंद देवरा हे ही राहूल गांधीच्या खडूस वृत्तीचे बळी ठरले आहेत. म्हणून त्यांनी काॅग्रेसचा राजीनामा दिला. भाजपाचा पर्याय त्यांच्या साठी सोपा नव्हता. याचे कारण मुंबई महापालिकेच्या मागील निवडणूकात भाजपाने शिवसेनेला आणलेला घाम त्यांनी पाहिला आहे. एकनाथ शिंदेच्या हाती शिवसेना आणि शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आले असले तरी एकनाथ शिंदेचा ठाणे व इतर मतदारसंघात मराठा म्हणून प्रभाव असेल पण मुंबईत नाही. त्यामूळे भले आता राज्यसभेचे तिकीट मिळाले असले तरी ही बाब महाराष्ट्रातील दक्षिण मुंबईतून विधानसभाचे तिकीट मिळण्यासाठी अडथळा ठरणार नाही इतकी जाण मिलिंद देवरांकडे असेलच. कारण विधानसभेची निवडणूक जिकण्या इतकी धमक मिलिंद देवरात आहे हे एकनाथ शिंदेंना ठाऊक आहे. याचा अर्थ ' मेरा भी भला दुसरोका भी भला ' हा व्यवहारच की ! महाराष्ट्रातील लिबरल मंडळी मिलिंद देवरांच्या पक्षांतरावर टिका करीत नाही. कारण मिलिंद देवरा भाजपात गेले नाहीत. शिवाय मुरली देवरा लिबरल मंडळींचे एक आश्रयदाते होते. लिबरल मंडळी ही जगातील सर्वात मोठी टोळी पण तितकीच ती ढोंगी ! 

आता आपण बाबा सिद्दिकी या काॅग्रेस नेत्यांच्या पक्षांतरावर चर्चा करू या. सिद्दिकी यांनी राष्ट्रवादी काॅग्रेस मध्ये प्रवेश केला. याचे कारण त्यांना मुंबईत कृपाशंकरांची गच्छन्ती झाल्यापासून काॅग्रेस कमकूवत होत गेली याची पुरी जाण आहे. तसेच अखिल भारतीय स्तरावरून काॅग्रेसचा प्रभाव संपतो आहे. त्यामूळे त्यांना  प्रान्तीय स्तरावरील राजकीय नेत्याचा आधार घ्यावा असे वाटणे स्वाभाविक होते. सिद्दिकींना भाजपा किंवा एकनाथ शिंदेच्या पक्षात जाण्याची इच्छाच मुळी झाली नसावी. याचे कारण हे दोन्ही पक्ष हिंदुत्ववादी आहेत. देशाच्या फाळणीनंतर काॅग्रेसचे सोकाॅल्ड सेक्यूलर धोरणातून मुस्लीम बांधवांमध्ये जी मानसिकता झाली आहे ती सिद्दिकी मध्ये वारस हक्काने प्राप्त झालेली आहे. आम्ही पिढ्यान पिढ्या काॅग्रेसचे आहोत असे मिरवून घेण्याची एक प्रथा मुस्लीम बांधवात झाली आहे. 

काॅग्रेस, साम्यवादी, व समाजवादी पक्ष आणि बहुतांश प्रान्तीय पक्षांनी अल्पसंख्यकीय बांधवात हिंदु समाजाची भिती दाखविण्याचे जे खूळ घातले ते इतके खोल गेले आहे की ते भूत त्यांच्या मानेवर सतत बसलेले आहे. ते तसेच राहावे या साठी ब्रिटीश राजवटीत लार्ड मेकाॅले आणि मॅक्झमेल्युर या जोडीने तोडून-  मोडून भारताच्या इतिहास विषयाचा जो अभ्यासक्रम सुरू केला होता तो अजूनही तसाच ठेवला आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून संघ-जनसंघ व आताचा भाजपावर बहुतांश विरोधी पक्ष आणि लिबरल मंडळी जहरी टिका करीत आहेत. त्यात त्यांना यश मिळावे यासाठी मुस्लिम बांधवासाठी जवळपास सर्वच क्षेत्रात अनेक सोयी सवलती देणे सुरू केले आहे. ते बंद करता येत नाही. कारण त्यासाठी मोदी सरकारला केंद्रात आणि बहुतांश राज्यात दोनतृतियांश बहुमत असणे गरजेचे आहे. त्यातूनच अल्पसंख्याक विशेषतः मुस्लीम बांधवात या स्पेशल दर्जाचे व्यसन जडले आहे. 

बाबा सिद्दिकी यांनी अजित पवारांचा पक्ष सोयिस्कर वाटण्याचे महत्वाचे कारण हे आहे की अखंडीत राष्ट्रवादी पक्षांची मुंबईत शक्ती कमी होतीच ती आणखिन कमी झाली असावी. मुंबई सारख्या काॅस्मोपोलिटीयन शहरात एखादा मुस्लीम चेहरा पक्षांत असावा असे अजित पवारांना ही वाटले असणारच. त्यातही बाबा सिद्दिकी यांची मतपेटी इनटॅक्ट आहे. 

पक्षांतर हा विषय आपल्या सारख्या सामान्यजनांना तसा फारसा आवडत नसला तरी आपण त्यावर चर्चा करीत असतो व आपले मतप्रदर्शन ही करतो. म्हणून मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दिकी या दोन नेत्यांचे पक्षांतर आणि नवीन पक्ष निवडीतील शहाणपणाला मला दाद द्यावीसी वाटते. स्वतःहाला फार मोठे राजकीय अभ्यासक म्हणून मिरवित आहेत या पेक्षा राजकीय नेते अधिक चतूर असतात. कुठल्याही काॅलेजमधून पोलिटीकल सायन्स या विषयाची पदवी न घेता त्यांना राजकीय वार्याची दिशा अचूक कळते.

बाबा सिद्दिकी आणि मिलिंद देवरांच्या पक्षांतरावर लिबरल मंडळींनी फारशी टिका केली नाही. याचे कारण हे दोन्ही नेते भाजपात गेले नाही. देशातल्या लिबरल मंडळींना गेली दहा वर्षे भाजपा, मोदी सरकार व संघ परिवारावर टिका करण्याचे इतके व्यसन जडले आहे की त्यांना कोण्या नेत्याने भाजपात वा एनडीएत प्रवेश केला तरी ते भाजपालाच दोष देत बसतात. संघ-भाजपाची ॲलर्जी हीच ओळख त्यांना ठेवायची असते. कारण तो त्यांचा व्यवसाय आहे. या व्यवसायात भरपूर पैसा मिळतोच सोबत आतंरराष्ट्रीय स्तरावर विचारवंत असा बिल्ला लावून चमकायला मिळत असते. 
                                     क्रमशः--

---------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...