शनिवारी दिनांक १६ मार्च २०२४ ला लोकसभेच्या निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्या. प्रचाराची धामधूम निदान भाजपाची आठवडाभर अगोदरच सुरू झाली होती. भाजपा नेहमीच निवडणूकांच्या मुड मध्ये असतो असे सर्वच मिडीया हाऊसेस म्हणत असतात. भाजपाला हे एक आगळे-वेगळे वैशिष्ट्य जनसंघाच्या (आताचा भाजपा) स्थापनेपासून राष्ट्रीय व सनातनी मूल्याधिष्ठीत विचारसरणीच्या निरंतर उपासनेतून प्राप्त झाले आहे. विरोधी पक्ष व प्रान्तीय स्तरावरील पक्षांची विचारसरणी ही इतर देशातून आयात झालेली आहे, पण जेथून आयात झाली तिथेच तिचा पराभव झाला आहे. या सत्यावर डोळेझाक करीत विरोधी पक्ष आपल्या विचाराची व प्रचाराची दिशा व पद्धत आहे तशीच ठेवत आहे. त्यामूळे त्यांची स्थिती आहे तशीच राहात आहे.
आता होऊ घातलेल्या निवडणकांच्या प्रचारात विरोधी पक्ष आणि मोदी सरकार मधील जी काही आरोंप-प्रत्यारोंपाची लढाई होईल, त्याचे स्वरूप मागील दोन निवडणूक प्रचाराचं ॲक्शन रिप्ले सारखेच राहील असे दिसते.' फिर एक बार मोदी सरकार ' असा नारा देत भाजपा मोदी सरकारने केलेल्या लोककल्याणांच्या योजनांची भली मोठी यादी प्रचारसभेत देत राहणार तर दुसर्या बाजूला विरोधी पक्ष अघोषीत आणिबाणी, संघाचा सांप्रदायिक एजंडा, लोकशाही धोक्यात, संविधान धोक्यात, ईडी, सिबीआय, आयटी इत्यादी संस्थेच्या धाडी असे आरोप करताना दिसतील. इंडी आघाडीतले काही नेते असे आहेत की ते मोदी सरकार विरूद्ध असे काही टिप्पणी करतात की त्यातून भाजपालाच फायदा होत आला आहे.
सोनिया गांधी आणि राहूल गांधी काँग्रेसचे सर्वेसर्वा झाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या कारभारात विदेशी शक्तीचा हस्तक्षेप वाढला. तसाच प्रकार बहुतांश इतर सर्व विरोधी पक्षांत घडू लागला. वेळोवेळी शेतकरी मोर्चा व धरणे, दिल्लीत मुस्लीम बांधव भगिनींचा ठिय्या, केरळ, पश्चीम बंगाल, तामिळनाडू, आन्ध्र इत्यादी राज्यात हिंदुच्या मंदिरांच्या विश्वस्त पदावर अल्पसंख्यांकांना बसविणे, खलिस्तान चळवळीला देत असलेले प्रोत्साहन, विरोधी पक्षांची दशहतवादी व नक्षलवादी बाबत असलेली सहानुभूती, महाराष्ट्रात मविआ सरकार असताना ते ही लाॅकडाऊन काळात झालेल्या सनातनी संन्याशाच्या हत्या, अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यास विरोधी पक्षांनी टाकलेला बहिष्कार, हिंदूत्व, राष्ट्रवाद इत्यादी शब्दांची विरोधी पक्षांना असलेली ॲलर्जी, विरोधी पक्षांचा नारा Minority First या विरोधात भाजपाचा नारा Nation First, सबका साथ सबका विकास, सन २००४ ते २०१४ युपीए काळात झालेला प्रचंड भ्रष्टाचाराचे मतदारांना असलेले स्मरण इत्यादी सर्व गोष्टी भाजपाच्या पथ्यावर पडत आले आहेत. तसेच या निवडणूकात ही पडणार आहेत, असे दिसत आहे. मोदी सरकारकडून सर्जिकल स्ट्राईकच्या पुरावाची मागणीतून विरोधी पक्षांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला होता. म्हणूनच मतदारांची खात्री झाली आहे की मोदी सरकार व भाजपाला देशात सध्यातरी पर्याय नाही.
मागील लेख मालिकेत राज्यसभा व लोकसभेच्या निवडणूकांमधील फरक, पक्षांतराची लागण, पुढील काळात देशातील विविध राजकीय पक्षांचे स्वरूप कसे राहील, काही राज्यातील विशेषतः जिथे अलिकडे विधानसभेच्या निवडणूका झाल्या आहेत तिथे लोकसभेच्या निवडणूकात कोणता पक्ष सरस ठरेल इत्यादीवर चर्चा करू या असे म्हटले होते. त्यावर आपण चर्चा करणार आहोतच. या शिवाय दक्षिण भारतात भाजपाने प्रचारात घेतलेली आघाडी यावर ही चर्चा होईल.
विदेशी आणि देशी लिबरल मंडळीना हिंदू, हिंदू संस्कृती, हिंदूत्वा बद्दल द्वेष आहे. पण असा द्वेष त्यांच्यात आला, याचे एकमेव कारण हे आहे की ब्रिटीश राजवटीत आपल्या देशाचा प्राचीन काळापासून चालत आलेली संस्कृती, दैवते, इत्यादी संबंधीत आपल्याला न्युनगंड वाटावा म्हणून आपला इतिहास पद्धतशीरपणे बदलून टाकला. या विषयाचा आवाका फार मोठा आहे. असे असले तरी हा विषय स्वातंत्र्यानंतरच्या प्रत्येक निवडणूकात संघ व भाजपाला झोडपण्यासाठी विरोधी पक्ष व त्यांची समर्थक लिबरल मंडळी व मिडीया हटकून निवडणूकाचा मुद्दा म्हणून वापर करीत आले आहेत. म्हणून त्यावरील एक स्वतंत्र लेखमालिका तयार करीत आहे. लौकरच ती पब्लीश होईल अशी हमी देऊन मी या लेखमालिकेच्या विषयाकडे वळतो.
प्रथम आपण पक्षांतराची लागण, व पक्षांमधील फूट यावर चर्चा करू या. राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसचे २३ जेष्ठ व अनुभवी असे नेते अगोदरच बाहेर पडले आहेत. पण त्यांनी नवीन पक्ष स्थापन केला नाही. याचा अर्थ असा नाही की त्या २३ जणांत नवा पक्ष स्थापन करण्याची धमक नाही. पण स्थिती अशी झाली आहे की गेल्या दहा वर्षातील मोदी सरकारच्या कामगिरीमुळे देशांतर्गत व आतंरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाची पत व दबदबा यात इतकी वाढ झाली आहे की ' काँग्रेस ' हा शब्द नव्या पक्षाचे सरनेम म्हणून घेतले तरी मोदी सरकारचा आपण पराभव करू शकेन अशी जिद्द त्या जेष्ठ नेत्यात राहिली नसावी. याचे एकमेव कारण म्हणजे राहूल गांधींच्या नेतृत्वातील विद्यमान काँग्रेस पक्ष दिशाहीन झालेला आहे.
प्रत्येक राज्यात काँग्रेसचे काही नेते काँग्रेस श्रेष्ठीच्या कार्यपद्धतीमुळे नाराज आहेत. काँग्रेस पक्षाला राष्ट्रवादी नेत्याचा चेहरा नाही. पंतप्रधान मोदींना टक्कर देऊ शकेल असा नेता काँग्रेस मध्ये नाहीच आणि काँग्रेस प्रणित इंडी नावाच्या आघाडीत ही नाही. देशातील विद्यमान राजकीय स्थितीत काँग्रेस मध्ये निदान नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांना सांभाळून घेईल असा नेता असता तर ती २३ जेष्ठ नेते मंडळी काँग्रेस पक्षातून बाहेर पडली नसती. या मंडळीपैकी एक ही नेता आजपावेतो ना भाजपात गेला ना समविचारी पक्षांत. याचा अर्थ असा आहे की ही मंडळी काँग्रेस चे हरवलेले रूप शोधत असावेत किंवा काँग्रेस मध्ये राम राहिला नाही अशी खात्री त्यांना झाली असावी. पक्षांतर करावे तर कुठल्या पक्षात हा पेंच त्यांच्या समोर आहे. विद्यमान काँग्रेस पक्ष चीन देशाला आंदण म्हणून दिला असल्याने पेचात पडलेल्या या नेत्यांची आपण चीनच्या साह्याने गळचेपी करू असे काँग्रेस श्रेष्ठींना वाटत असावे. त्यातूनच राहूल गांधींना उठसूठ काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांचे खच्चीकरण करण्याची घातकी सवय लागली आहे.
मागे कुठल्या तरी एका लेखात मी एक शंका व्यक्त केली आहे की ' लहान बालकांच्या एखाद्या खेळण्या मध्ये जसे बडबड करणारे यंत्र बोलते तसेच काहीतरी राहूल गांधीचे झाले असावे? ' नफरत नही आणि प्यारकी दुकान ' हे वाक्य म्हणतांना ते फक्त आपली नफरत ओकत असतात. कुठल्यातरी इतिहासाच्या पुस्तकात वाचलेले वाक्य मला आठवले आहे ते असे आहे ' शाही घराणेशाही मध्यें तिसर्या वा चौथ्य्या पिढीतले वंशज सर्वनाशास कारणीभूत ठरतात.'
काही प्रान्तातले काँग्रेसचे नेते व प्रान्तीय पक्षांचे नेते एक तर भाजपात जाऊ इच्छीतात किंवा भाजपाच्या एनडीए त येऊ इच्छीतात. इतकेच नव्हे तर देशांतर्गत राजकारणावर भाजपाचा प्रभाव इतका वाढला आहे की प्रान्तीय पक्षांना फूटीची लागण झाली आहेच, हळुहळू दक्षिणेतील प्रान्तीय पक्षांतही नजिकच्या काळात फूटीचा रोग जडलेला दिसेल.
अकाली दल, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस मधील काही नेते पक्षांतर करून भाजापात जाण्याची शक्यता आहे. पक्षांतराची कृती फार सोपी आहे. पक्षांतराचा निर्णय घेण्यासाठी ज्या नेत्याला भाजपात प्रवेश घ्यावयाचा आहे, त्याला भाजपाच्या प्रान्तींय नेत्याशी चर्चा करावी लागते. नंतर राष्ट्रीय स्तरावर बैठक होऊन प्रवेशा संबंधीत अटी,करार इत्यादी वर समझोता होऊन निर्णय होतो. म्हणून पक्षांतराला उशीर होतो. पक्षांतर करणारे विरोधी पक्षांच्या नेत्यांचे शुद्धीकरण होते असे म्हणत भाजपा ही वाॅशिंग मशीन आहे असा टोमणा ऐकू येत असतो. तसे टोमणे विरोधी पक्षांकडून होणे हे मी स्वाभाविक मानतो. पण वाॅशिंग मशीन मध्ये Quick असे ऑप्शन असते. ते बटन दाबले की वेगाने कपडे धूतले जातात. म्हणून मशीन मध्यें टाकलेल्या कपड्यातील जीर्ण कपडे फाटण्याची शक्यता असते. हे सत्य विरोधकांना ठाऊक नसावे. असो. यावर अधिक टोमणेबाजी मला जमणार नाही.
काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असला तरी अनेक राज्यात प्रान्तीय पक्ष काँग्रेस पेक्षा अधिक शक्तीशाली आहेत. म्हणून काँग्रेस पक्षांचे नेते पक्षांतर करताना शक्यतो ते ज्या प्रान्तांतून प्रतिनिधीत्व करत असतात तेथील प्रान्तीय पक्षां पेक्षा भाजपाचा पर्याय स्विकारतील असेच दिसते . कारण देशात भाजपा इतका शक्तीशाली झाला आहे की केंद्रातील सत्तेवरून भाजपाला पायउतार करण्याची ताकद कुठल्याही पक्षात राहिली नाही. खासदार असो वा आमदार यांना केंद्राकडून विविध योजना राबविण्यासाठी निधी मिळत असतो. त्यातून काही विकासाची कामें केली की लोकनेता किंवा समाजसेवक अशी पदवी प्राप्त होते. आपलं कौतूक वाढावे, किर्ती मिळावी असे कोणाला वाटत नाही ? म्हणून भाजपेतर पक्षांतील नेत्यांना भाजपाचा पर्याय किफायतशीर वाटत असेल तर त्यात नवल ते कसले?
अनेक वर्षे काँग्रेसने सत्ता राबविली ती विरोधकांवर मेहरबानी करून नव्हे तर फोडा आणि झोडा या ब्रिटीश राजवटीतील कुटील नीतीचा उपयोग केला होताच की ! म्हणून विरोधी पक्षांतील नेते भाजपात प्रवेश करत असतील तर भाजपावर टिका करण्यात काही अर्थ नाही. काॅग्रसने मॅक्सम्युलर आणि मेकाॅलेने लिहलेल्या भारताच्या खोट्या इतिहास अभ्यासक्रमाच्या आधाराने सत्ता राबविली हे सर्वश्रूत आहे.
सन १९९० पासून ज्या राज्यात प्रान्तीय पक्ष नव्हते तिथे काँग्रेस मधील नाराज नेतागणांचा कल प्रान्तीय पक्ष स्थापन करण्याकडे होऊ लागला. या अगोदर काँग्रेसमध्ये सन १९९५२, १९५६, १९६९, १९७७-७८ या काळात फूट पडलेल्या आहेत. पण त्याकाळात फुटलेल्या गटाचे स्वरूप प्रान्तीय नव्हते. सन १९९० पासून प्रान्तीय पक्षांची संख्या वाढू लागल्यामुळे सन १९९६ ला देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली. त्यामुळे काँग्रेस व इतर भाजपेतर पक्षांच्या पाठींब्यातून काँग्रेस प्रणित आघाडी नावाचे सरकार केंद्रात अस्तित्वात आले आणि कर्नाटक मधील प्रादेशिक नेते देवेगौडा हे देशाचे पंतप्रधान झाले.
इथूनच प्रान्तीय पक्षांच्या नेत्यांना पंतप्रधानपदाची खुर्चीचे स्वप्ने पडू लागली. तशीच स्वप्ने आजच्या इंडी तील नेत्यांना ही पडत आहेत. हे एक महत्वाचे कारण आहे ज्यामुळे विरोधी पक्षांची एकजूट होत नाही. मग ही मंडळी भाजपाचा पराभव तरी कसा करणार? असा प्रश्न पडलेल्या मतदारांचा वर्ग मोठा आहे. पण विरोधी पक्षांची तळी उचलणार्या मिडीयातील लिबरल मंडळींना त्याचे काही सोयर-सूतक नाही. भाजपावर मात्र फेक न्यूज आणि फेक विडीओज् रिलीज करून ही मंडळी टिका करीत असते. पण दिवाळीच्या सणातील काही फटाके जसे फूस होतात तसेच विपक्षांच्या आरोपी रूपी फटाके निकामी ठरतात. खोट्या आरोपांतून भाजपाचे कसलेही नुकसान होणार नाही कारण मतदारांचा असा एक मोठा वर्ग आहे जो अशा नेहमीच्या आरोपांकडे ढुंकूनही लक्ष देत नाही.
क्रमशः