सुपरस्टार रजनीकांतने राजकारणात प्रवेश करून स्वतःहाचा पक्ष स्थापन करण्याची घोषणा काल २०१७ वर्षाच्या अंतिम दिवसाला करून नव्या वर्षात तामीळनाडूतील राजकारणाला चांगलं वळण देण्याची हमी आपल्या फॅन्सनां दिली.
तामीळनाडूतच नव्हे तर संपूर्ण दक्षिण भारतातल्या सर्व प्रान्तात दाक्षिणात्य नटांना अमाप लोकप्रियता मिळत असते. इंडिया टूडेच्या टिव्ही चॅनेल वर एका ब्रॅन्ड क्रियेटींग एक्सपर्टने म्हटले कि तामीळनाडूवासीयांना चित्रपटाचं इतकं वेड आहे, कि इथल्या लोकांना अन्न, वस्त्र, आणि निवारा ह्या मूलभूत गरजाइतकी गरज चित्रपटाची असते. ते पुढे म्हणाले,' People in Tamilnadu eat cinema, drink cinema, and sleep with cinema'. तामीळनाडूतील लोकांचा सर्वात लाडका सिनेस्टार म्हणजे रजनीकांत. त्यामुळे रजनीकांत राजकारणांत यशस्वी होतील'. ब्रॅन्ड क्रियेटींग एक्स्पर्टच्या म्हणण्यात तथ्य जरूर असेल, तरीही राजकारणातील यश हे जितकं नेत्याच्या लोकप्रियतेवर अवलंबून असते तितकंच ते पक्षाच्या संघटन शक्तीवर ही असते हे विसरता येत नाही.
तामीळनाडूत ह्या पुर्वी एम् जी रामचंद्रन हे लोकप्रिय सिनेस्टार, राजकारणात अण्णा डीएमके पक्षात सर्वेसर्वा बनुन यशस्वी झाले. त्यानंतर त्यांच्याच सहकलाकार सुश्री जयललीता ह्यांनी एडीएमके पक्षाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली. त्यांचे अलीकडेच देहवासन झाल्यानंतर एडीएमके पक्ष सैरभैर झाल्यासारखा आहे. त्या पक्षात कमालीची अंदाधूंदी माजली आहे आणि शकले होण्याच्या वाटेवर आहे. तामीळनाडूतील डीएमके पक्षाचे सर्वेसर्वा एम करूनानिधी वयोमानाने इतके थकले आहेत की सध्या ते व्हिलचेअरवरच असतात. त्यांच्या पक्षात ते हयात असतानाच वारस हक्कावरून त्यांची मुलगी आणि दोन्ही मुलगे ह्यांच्यात मोठी रस्सीखेच सुरू आहे. एकंदरीत तामीळनाडूत राजकीय रंगमंचावर नेत्याची पोकळी निर्माण झालेली दिसते. म्हणजे एक प्रकारे राजकीय रंगमंचावर अंधारच. म्हणजे रजनीचे राज्य. रजनीकांतांनी ह्याचा फायदा घेऊन परफेक्ट टायमींग साधलं आहे. वाचकांच्या हे ही लक्षातं आले असावे कि कमल हसन ह्यांच्या राजकारणतला प्रवेश झाल्यानंतर रजनीकांतनी काही काळ जाऊ दिला आणि मगच आपला राजकरणातला प्रवेश घोषित केला. एक प्रकारे त्यांनी कमल हसनच्या राजकीय महत्वाकांक्षाला पाठीमागून धक्काच दिला आहे किंवा एक प्रकारे कायमची वेसण घालूनच ठेवली आहे, असे म्हणायला हरकत नाही. ह्या बाबतीत रजनीकांतांना दाद द्यायलाच हवी. रजनीकांत भाजपसमवेत जाणार का, एडीएमके मध्ये प्रवेश करणार आहेत का ह्या चर्चेला स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची घोषणा करून त्यांनी पूर्णविराम दिलेला आहे. ह्यावरूनच आपल्या फॅन्सची म्हणजे एका परीने तामीळवासीयांची नस रजनीकांत पुरेपूर ओळखून आहेत , हे ही दिसून आले. तिसरा स्ट्रोक त्यांनी आपल्या फॅन्सच्या सभेत भाषणातून मारला आहे. त्यांनी प्रस्थापित राजकीय व्यवस्थेवर टिका करून जनतेची सत्ता आणण्याची भाषा केली. छोटसंच परंतु मार्मीक भाषणात स्पिरीच्युल राजनीतीचा आग्रह व्यक्त करून कमल हसनने व्यक्त केलेली तथाकथीत वाढत्या असहिष्णूतेच्या विषयातील निरर्थकता स्पष्ट करून त्यांनी फॅन्सची मनें जिंकली. त्याच बरोबर आपला पक्ष तामीळवासीयांसाठी केवळ पर्यायच नाही तर तामीळनाडूतील भविष्यातला सत्ताधारी पक्ष आहे असा विश्वास निर्माण केला आहे. असे एकंदरीत त्यांच्या भाषणातून दिसलं आहे.
तामीळनाडूतींल ब्रॅन्ड क्रियेटींग एक्स्पर्टप्रमाणे एका युवकाची प्रतिक्रिया बोलकी वाटली. इन्डीया टूडेच्या पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना तो युवक म्हणाला कि, 'दोन वर्षापासूनच रजनीकांतनी राजकिय प्रवेशाची तयारी केलेली आहे. बुथ पातळीवरील संघटनेची जय्यत तयारी पूर्ण केलीली आहे. आता तर फक्त सारं अधिकृतरित्या सुरू होत आहे एवढेच'. एकंदरीत रजनीकांतची पक्षसंघटना उभी करण्यासाठीची तयारी, काल फॅन्सच्या हातात फडकत असणारे पक्षाचे झेंडे, त्यांच भाषण, इत्यादी पाहता राजकारणात यशस्वी व्हायचंच असा चंग रजनीकांतनी केलेला दिसतोय. असे असूनही "राजकारणात यशस्वी होणे इतकं सोपं नाही. राजकारणाच्या मंचावर दिग्गज लोक आहेत हे विसरू नका. मला आपली साथ हवी. ही आपल्या सत्तेसाठी(people's power) म्हणजेच जनसत्तेसाठी ही लढाई आहे". असे भावनिक आवाहनही करायला रजनीकांत विसरले नाहीत. ह्यावरून त्यांना राजकीय गुरू असावा असा तर्क काढल्याशिवाय राहवत नाही. पंतप्रधान मोदींविषयी रजनीकांतांना आदर आहे हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींचा सल्ला त्यांनी घेतला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोदी युगातील भाजपाला डीएमके आणि एडीएमके पक्षासंबंधी फारशी आस्था दिसलेली नाही. त्यावरून तामीळनाडूतील राजकारणात उलथापालट होणार असा कयास होताच. रजनीकांतचा पक्ष एनडीएचा घटक पक्ष आताच होईल असे नाही. ह्याचंही कारण रजनीकांतला तामीळनाडूत आसन स्थिर करण्यासाठी स्वतंत्रता मिळावी हा उद्देश असावा. भाजपाला दक्षिणेत एक सशक्त मित्रपक्षाची गरज आहे. ती पुरी करण्याची मोदीजी आणि अमीत शहांची रणनिती आहे. ती सफल होते की नाही हे नजीकच्या काळातच कळेल. रजनीकांतच्या भाषणातला आत्मविश्वास पाहील्यानंतर दक्षिण भारतातील बुजूर्ग समाजशास्त्रज्ञ शीव विश्वनाथन ह्यांनी हिंदूस्थान टाईम्सच्या १जुलैच्या अंकातील लेखात दक्षिण भारतातील राजकीय स्थितीवर जे भाष्य केले आहे, त्याची मला आठवण झाली. शीव विश्वनाथनी एकूण दक्षिण भारतीय लोकांना विशेषतः युवकांना तेथील प्रस्थापित राजकीय पक्ष बुरसटलेल्या विचारांचे वाटू लागले आहेत. ते चांगला पर्याय शोधत आहेत. त्यांना पंतप्रधान मोदी आधूनिक विचारांचे वाटतात अशी पुष्टी ही शीव विश्वनाथननीं केली आहे. रजनीकांतच्या भाषणात नावीन्यावर भर दिसला आहे, त्यावरून तामीळवासीयांसाठी नवा पर्याय रजनीकांताच्या पक्षाच्या रूपाने मिळेल हे स्पष्ट दिसत आहे.
तामीळनाडूत भाजपा आणि काॅग्रेस ह्या राष्ट्रीय पक्षांना विशेष स्थान नसल्यामुळे तेथील डीएमके आणि एडीएमके पक्ष आलटून पालटून जेव्हा सत्तेत येतात तेव्हा तेथील सत्ताधारी पक्ष केंद्रातील सत्ताधारी पक्षांशी संधान बांधतो अशी पध्दत आजतागायत सुरू आहे. रजनीकांतच्या नव्या अवतारामुळे त्यात फरक पडेल एवढे निश्चित म्हणता येते. तसेच रजनीकांतांच्या पक्षाला लागलीच तामीळवासीयांचा जोशात पाठींबा मिळू लागला तर तामीळनाडूत रजनीकांतची लाट निर्माण व्हावयासही वेळ लागणार नाही. अशा स्थितीत सत्ताधारी परंतु अस्थिर अशा एडीएमके पक्षातील आमदार रजनीकांतच्या पक्षात सामील होतील. सरकार कोसळून तात्पुरती राष्टपती राजवटही येईल. रजनीकांतांना पुरेसा वेळ देऊन तामिळनाडूत विधानसभेची मध्याविधी निवडणूकही आली तरी आश्चर्य वाटणार नाही. कारण सत्य हे आहे की तामीळनाडूतील लोकांच्या हृदयांत सुपरस्टार विराजमान असतो. आणि त्याला पंतप्रधान मोदींचा वरदहस्त असणार हे ओघाने आलेच की.
अभ्यासपुर्ण समर्पक विश्लेषण!
उत्तर द्याहटवा