शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२६

आपण व आपले उत्सव - रक्षाबंधन

आपण व आपले उत्सव--- रक्षाबंधन 


नमस्कार  मंडळीं,

  
वयोमानानुसार  तब्येतीच्या कुरबुरी  सुरू होणे हे स्वाभाविक आहे. It is law of nature. त्यामुळे  जवळपास एक वर्ष मी  ब्लॉगवर आपल्या भेटीस आलो नाही.  ब्लॉगवर राजकीय घडामोडींवरील लेखांची संख्या थोड्या प्रमाणात अधिक असली तरी 'आपण व आपली दैवते',  'आपण व आपले उत्सव ', 'तस्मात उत्तीष्ठं कौन्तेय  युद्धाय कृतीनिश्चय:।'  'कर्मण्ये वाधिकारणास्तू | ' पर्यावरण,  ' चित्रपट व समाजमन '  सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील विषयांवर ही लेख लिहले आहेत. आपणांस हे केवळ ठाउकच नव्हे तर अशा लेखांवर ही आपण माझे कौतुक  केले आहे. वस्तुत: मी लेखक नाही. मला आपल्या उत्सवातूनच तसेच आपल्या सारख्या वाचकांच्या प्रतिसादांतून लेख  लिहण्याची प्रेरणा मिळत आली आहे.  

रक्षाबंधन हा उत्सव अनादि  काळापासून  आपल्या देशात साजरा होत आहे. म्हणून  या उत्सवावर आपल्याशी संवाद करावा अशी प्रबळ इच्छा निर्माण झाली. म्हणून मी लेखणी हातात घेतली. सन २०१७ ला हिंदू नववर्ष प्रतिपदा 
गुढीपाडव्याच्या दिनी  ' विचारमंथन '  ब्लॉग ची मुहूर्तमेढ रोवली. सन २०२४ पर्यंत दर वर्षाला सरासरी लेखांची संख्या तीस ते पस्तीस होती. आता तितकी संख्या मी पार पाडू शकेन असे मला वाटत नाही. लेख लिहीण्यासाठी लागणाऱ्या विषयाचे विशेषत: राजकीय क्षेत्रात जगभर भरघोस पीक उगवत आहे. त्यासंबंधी आश्चर्य वाटत नाही. पण राजकारण एक असे क्षेत्र आहे की सकाळी ज्या जमिनीत जे पीक उगवले त्या जमिनीत दुपारी दूसरेच पीक उगवते. कारण Politics has became a matter of perception and narrative only. अशा स्थितीमुळे राजकीय क्षेत्रात  लेख लिहण्याची गती वाढत आहे. उलट माझी गती  मंद होत आहे  . आपणांस याची जाणीव आहे या बाबत माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. पण आपल्या पासून दूर  राहिल्याची खंत आहे, ती कमी करण्याचा प्रयत्न या  लेखापासून सुरु करीत आहे.

आपल्या संस्कृती मधील उत्सवांवर चर्चा, संवाद किंवा लेख इत्यादी उपचार उत्सवाच्या समाप्ती नंतर  करू नयेत असे बंधन नाही. हीच आपल्या संस्कृती ची महत्ता आहे.  मागे  नवरात्रोत्सव व विजयादशमी उत्सवा च्या समाप्ती नंतर मी  
' शक्ती उपासना ' या शिर्षकाचे  नऊ लेख ब्लॉगवर पब्लिश केले आहेत. आपल्या उत्सवातूनच आपल्याला उत्साह तसेच  बळ प्राप्त होत असते. ते बळ आणि उत्सव सतत वाढत जावे जेणेकरून आपल्या संस्कृतीचे व आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी समाजात एकोपा वाढला पाहीजे हीच विविध उत्सावातून शिकवण मिळत असते.

रक्षा बंथनाच्या उत्सावा संबंधित अधिकाधिक अभ्यास होऊ लागल्यानंतर रक्षाबंधनाचा उत्सव भाऊ-बहिणी पुरता मर्यादीत नसून, विद्यमान जागतिक राजकारण तसेच विदेशी शक्तीच्या आहारी गेलेल्या काही विरोधी पक्षांच्या नेत्यांना जडलेल्या अवदासा मुळे रक्षाबंधन उत्सवाची व्यापकता वाढविण्याचा प्रयत्न  देशाच्या कानाकोपऱ्यातून होणे आवश्यक झाले आहे.  सीमेवरून  होऊ शकणार्या धोक्यापासून  एक नागरिक म्हणून प्रत्येकाला सजग राहावे  लागेल. रक्षाबंधन उत्सव हा केवळ उत्सव नसून  जन्मोजन्मी चे एक बंधन आहे. आपला देश सुरक्षित राहीला तरच आपली संस्कृती टिकेल. संस्कृती टिकली तरच आपले उत्सव टिकतील.  

वाचकहो , रक्षाबंधन उत्सवाच्या एक दिवस अगोदर X वर भाजपाचे प्रकांड पंडीत श्रद्धेय डाॅ. सुधांशु त्रिवेदी यांनी संस्कृत श्लोकाने सुरवात करीत रक्षाबंधनाच्या दिलेल्या हार्दिक शुभेच्छा    वाचल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला. तसे पाहता सामान्यात: हार्दिक शुभेच्छाचं स्वरूपच गोड असते. असे असले तरी  X वरील डॉक्टर सुधांशु त्रिवेदी यांच्या हार्दिक शुभेच्छा वाचल्यानंतर आपल्या रक्षाबंधन उत्सवाची सुंदरता व व्यापकताचं विलोभनिय दर्शन झाले. म्हणून Xवरील त्यांच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या समोर ठेवतो. 

" येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः।
तेन त्वाम् अभिबध्नामि रक्षे मा चल मा चल॥"
(अर्थात जिस रक्षा सूत्र से महान शक्तिशाली दानवेन्द्र राजा बलि को बांधा गया था, उसी सूत्र मैं तुम्हें बांधती हूं, जो तुम्हारी रक्षा करेगा, हे रक्षा तुम स्थिर रहना, स्थिर रहना।)
रक्षाबंधनके अवसरपर, रक्षासुत्र  बांधते समय बोला जानेवाला यह श्लोक याद दिलाता  है की भारतिय  संस्कृतीमे असुर माने जानेवाले  राजा बलिमे यदि कोई गुण है तो उसका भी सन्मान और रक्षाबंधन किया जाता है | मुझे लगता है की इससे अधिक  उदार और  उदात्त  विचार पुरे विश्वमे देखनेको नही मिल सकता | If any so called self proclamaid liberal can find it in any other  culture ?  अत: हम सब आजके  इस पावन पर्व पर इस महान संस्कृती पर होनेवाले प्रत्यक्ष और वैचारिक दुष्प्राप्य के आकमण से रक्षा का संकल्प भी देना चाहिये | " डॉक्टर सुशांधु यांनी दिलेली माहिती आपल्या सर्वांना पसंत पडली  असावी या बाबत माझ्या मनात  किंचीत ही शंका नाही. 

रक्षाबंधन  या उत्सवाची सुरवात  भगवान श्रीविष्णू च्या वामन अवतारात झाली.  बळी राजा दानशूर  होता. पण इंद्रपद जिंकल्या नंतर असुरांनी थैमान घालण्याची सुरवात केल्यामुळे बळी राजाचै आजोबा भक्त प्रल्हाद नाराज झाले होतेच.  वामन देवाने बटूचे रूप घेऊन  बली राजाकडून तीन पावलांची भूमी मागितली.  बटूच्या दोन पावलात बळी राजाचे साम्राज्य संपले. बटूचे तिसरे पाऊल ठेवावयास जागा शिल्लक  राहिली नाही. बळी राजाने वामन देवास तिसरे पाऊल स्वताच्या माथ्यावर ठेवण्याची विनंती केली. वामनाच्या तिसऱ्या  पावलाने बळी राजा पातळात गेला.  बळी राजाने वामनाकडून एक वचन मागितले होते. ते म्हणजे पाताळात वामनाने आपल्या दारात तिष्ठत  राहावे.  वामनाने ते मान्य करुन पाताळात बळीच्या दारात तिष्ठत राहिले.  इथे वैकुंठात आपले पती परत आले नाही म्हणून माता लक्ष्मीदेवीने नारद मुनींना  विचारले तेव्हा त्यांनी हकिकत सांगितली. नंतर महालक्ष्मी बळी राजाच्या घरी जाऊन बळीच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून आपल्या पतीला वैकुंठात घेऊन जाण्याची विनंती केली. ती बळीने मान्य केली. रक्षाबंधन उत्सवात पावित्र्य  किती अमर्याद आहे या कथेतून उमजते.  

आपल्या ॠषीमुनींनी प्रत्येक उत्सावाचे   प्रयोजन अशा प्रकारे केले आहे की आपला समाज प्रगतीपथावर राहावा, आपल्या जीवन मूल्यांचा  जगभर  प्रसार व्हावा आणि आपला देश विश्वगुरू राहावा. उत्सवांची रचना ऋतुनुसार आखली आहे. ऋतुनुसार आहार - विहाराची  भलीमोठी पोथी, अनेक मोठ्या आजारावर उपाय म्हणून आयुर्वेद निर्माण  करुन ठेवला आहे.

स्वाध्याय  परिवाराचे प्रणेते पुजनीय पांडुरंगशास्त्री आठवलेजींनी  संस्कृति - पुजन या ग्रंथात ' श्रावणी  पौर्णिमा ' वर केलेल्या व्याख्यान द्वारे रक्षाबंधन उत्सवाची महत्ता व पावित्र्य मांडले आहे ते आपल्या समोर सारांश रुपात ठेवतो आहे. 

" रक्षाबंधन म्हणजे प्रेम-बंधन. आजच्या दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते आणि त्याच बरोबर त्याला ह्रदयाच्या प्रेमाने बांधते आणि त्याच्या रक्षणाची कामना करते. हा उत्सव म्हणजे पराक्रम, प्रेम, संयम आणि भक्ती यांचा संगम होय. रक्षाबंधनाचा  उत्सव म्हणजे दृष्टि परिवर्तनाचा सण. बहिणीने हातात राखी बांधताच भावाची दृष्टिकोन बदलून जाते.  बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी तो स्वत:वर घेतो. त्यामुळे बहीण समाजात निर्भय बनून फिरुन शकते. राखी बांधण्यापुर्वी  बहिण भावाच्या कपाळाला टिळा लावते, तो टिळा म्हणजे  म्हणजे दोन डोळ्यां शिवाय भोगाला विसरुन  भाव-दृष्टिने जगाला पाहण्यासाठी  जणू तिसरा एक पवित्र डोळा होय. भावाच्या हातात रक्षा बांधून बहीण त्याच्या पासून केवळ स्वत:चे रक्षण इच्छिते असे नाही तर समस्त स्त्री जातीला स्वत:च्या भावाचे रक्षण मिळावे अशी करते.  त्याच बरोबर बाह्य शत्रूवर  व आंतरविकारांवर भावाने विजय मिळवावा णि भावाचे ही रक्षण व्हावे ही भावना देखील त्यात सावरलेली आहे. "

स्त्रीकडे विकृत नजरेने न पाहता पवित्र दृष्टी  हा महान  संदेश देणाऱ्या रक्षाबंधन उत्सव कुटुंबा पुरता मर्यादीत न राहता  त्याचे सामाजीकरण होणे आवश्यक आहे. शक्ती उपासना या लेख मालिकेत जिहादी वृत्तीची टोळी  प्रेमाचे नाटक करीत शालेय व महाविद्यालयीन मुलींना कसे आपल्या पाशात घेतात यावर  सविस्तर  माहिती मी मांडली आहे.  कुटुंब प्रमुखांनी आपआपल्या गावात, चाळीत, गृहसंस्थात सामुहिक रित्या जागरूक  राहून जिहादी वृत्तीच्या टोळीचा वावर दिसला तर लागलीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा उपयोग करून त्या टोळीचा नायनाट करावा.








































































सोमवार, १० फेब्रुवारी, २०२५

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भाजपाच्या विजया संबंधीत भाजपाच्या समर्थकांना फारसे आश्चर्य वाटले नसावे. कारण असे आहे की लोकसभेच्या निवडणूकांच्या निकालातून घटलेल्या संसद सदस्यांच्या संख्यातून भारतीय जनता पक्षाला अतिआत्मविश्वासामूळे पराभव होऊ शकतो असा धडा मिळाला होता. त्यातून भाजप बरेच काही शिकला आहे. हरियाणा व महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूकात ज्या पद्धतीने यश प्राप्त केले तशीच पद्धत दिल्ली विधानसभेच्या निवडणूकांच्या प्रचारात वापरली. राजकारणातील डावपेंच आखून ते पुर्णात्वास पोहचण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते विश्रांती न घेता अधिकाधिक मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क व संवाद साधत असतात. सोबत मतदारांच्या समस्यांची कशी उकल करणार आहोत, याची अभ्यासपूर्ण  माहिती मतदारांकडे पोहचण्यासाठी केंद्र-राज्य स्तरावरील मंत्री, खासदार-आमदार व संघटन मंत्री सुद्धा थेट बूथ लेवलचे कार्यकर्त्यांना मदत करीत  असतात. यालाच संघपरिवार मध्ये जनजागरण म्हटले जाते. हरियाणा व महाराष्ट्र या दोन राज्यांतील विधानसभा निवडणूकात भाजपाला मिळालेल्या यशाचे गमक हेच होते. हे आपण बहुतांश न्यूज चॅनेल्सवरून ऐकले आहे. पण---

काही न्यूज चॅनेल्स जे इंडी नावाच्या आघाडीच्या नेत्यांची तसेच जागतिक लिबरल मंडळीची गुलामी स्विकारली आहे अशा चॅनेल्सवरून दिल्लीत भाजपाचा विजय होईल असे भाकीत ऐकावयास मिळाले नाही. उलटपक्षी भाजपाला निवडणूक आयोगाचा पाठींबा आहे, भाजपा विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना अमिष दाखवून त्यांचे पक्ष फोडतात, एवीएम मशीनची करामत, इत्यादी कारणें प्रचार काळातच म्हणजे मतदान दिवसाच्या अगोदरच मांडत असताना दिसले. आपला पराभव होणार असे स्पष्ट दिसत असताना भाजपाच्या संभाव्य विजयाबद्दल मतदारांची फसवणूक करण्यातच विरोधी पक्षांची नेते मंडळी व त्यांचे समर्थक मिडीया मंडळी रमत असते. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर  वानखेडे, प्रसून वाजपेयी, रवीशकुमार इत्यादी संपादक मंडळीं 'आम आदमी पक्षच जिंकणार होता, भाजपाचा विजय काॅग्रेस मूळे झाला, एव्हीम मशीनची करामत ' इत्यादी मुद्दे विश्लेषणात मांडत आहेत. भाजपाचा विजय झाला की काॅग्रेसचा नैतिक विजय झाला अशी बडबड करण्याची टूम ही लिबरल लाॅबीने काढली आहे.  अशी टिका आता मतदारांच्या अंगवळणी झाली आहे. यावर उगीच चर्चा का करावी?

निकाल कुठल्याही निवडणूकातला असो, भारतिय जनता पार्टी केंद्रातील सत्तेचा गैरवापर कसे करते यासाठी खोट्या पुराव्यांची यादी सुद्धा विरोधी पक्षांकडे तयार असतेच. विरोधी पक्षांकडे भाजपा, संघ परिवार व सनातन संस्थावर सतत खालच्या पातळीवर टिका करीत राहणे ही एकच स्ट्रॅटेजी शिल्लक आहे. याच स्ट्रॅटेजीचा सततचा वापर लिबरल संपादक मंडळी, इंडी पक्षांची नेतेमंडळी, व विरोधी पक्षांचे समर्थक व कार्यकर्ते मिडीयातून करीत राहणार असेल तर देशातील प्रत्येक प्रान्तात भाजपाचे  प्रभूत्व वाढत राहील हेच आपल्या देशांतील निवडणूक निकालांच्या विश्लेषणातला केंद्र बिंदू राहील असे मला वाटते. 

विविध भाषा, विविध वेष, विविध आहार-विहार, विविध भौगोलिक वैशिष्ट्यांनी नटलेल्या या भारतभूमी चे हिंदू संस्कृतीमूळे एकतेचे जे विलोभनीय दर्शन होत असते त्याचा लाभ विरोधी पक्षांना ही होऊ शकतो. पण विरोधी पक्षांना भाजपा वर टिका करीत सनातन संस्कृतीवर हल्ला होत असतो याचे भान राहत नाही.  कदाचीत सनातन संस्कृतीच मोडीस निघावी हाच या मंडळीचा उद्देश असावा. या संबंधीत अलिकडील ताजे उदाहरण मी आपल्या समोर ठेवून या लेखाच्या समाप्तीकडे वळतो. 

प्रयाग येथील महाकुंभातून सनातन संस्कृतीतील एकात्मतेचे जे विलोभनीय दर्शन झाले त्या संबंधीत  विरोधी पक्षांनी व त्यांच्या समर्थक संपादक मंडळींनी फारसे कौतूक केले नाही. अंतःकरणात ओतप्रोत वाहात असलेल्या भक्तीभावाने महाकूंभात भक्तांची प्रचंड गर्दी झाली. ती गर्दी आटोक्यात न आल्यामूळे काही भाविक आपल्या प्राणास मूकले ही दुखःद घटना आहे. त्यासंबंधीत मी येथे प्रशासनाची पाठराखण करीत नाही. अशा प्रकाराच्या दुर्घटनेला जे कोणी प्रशासकीय अधिकारी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत अशी खबरदारी प्रशासनाने सतत घ्यावी असे माझे ठाम मत आहे. 

आजपावेतो वारकर्यांच्या दिंडीत,  प्रख्यात मंदिरातल्या महायात्रेत,  इतकेच नव्हे तर सिझन प्रमाणे होणार्या पर्यटन यात्रेत ही सामील न होणार्यांची संख्या ही मोठी असते. या पाठिमागील कारणें बहुतांशी व्यक्तीगत स्वरूपातली असतात. असे असले तरी यातील बहुतांश लोक यात्रा, दिंडी, वा महाकुंभासारखे नैमित्तिक उत्सवाचे लाईव प्रसारण हटकून पाहात असतात. दुसर्या बाजूला यात्रा, महोत्सव, दिंडी, या सार्या गोष्टी फाजील आहेत, त्यावर बंधने असावीत अशी धारणा व्यक्त करणार्यांची संख्या ही मोठी आहे. ही मंडळी मूलतः मेकाॅलेच्या शिक्षण पद्धतीतून तयार झालेल्या गुलामी मानसिकतेचे रूग्ण असावेत. यांचाच भरणा लिबरल नावाच्या मंडळीत असतो.

देव-देवतांच्या पालख्या, पदयात्रा, विख्यात मंदिरातील महोत्सवातून अनेक छोट्या-मोठ्या लोकांना रोजगार मिळत असतो, सरकारचा महसूल वाढतो. उद्योगजगताला गती प्राप्त होते हे सत्य प्रत्येकांने स्विकारावयास हवे. कारण One man's expenditure is another man's income हे अर्थशास्त्रातील मूळ तत्व आहे. शेवटी Economics is a science of human behaviour between scare means and unlimited wants.  ही विदेशी व्याख्या तरी लिबरल मंडळींनी ध्यानात ठेवावयास हवी की नाही ? मानवाचा व्यवहार हा मनाच्या चंचलता नावाच्या वैशिष्ट्यावर अवलंबून असतो. अर्थव्यवस्थेचा जन्मच या वैशिष्ट्यातून अस्तित्वात आला आहे. मानवी मनाची चंचलता अध्यात्मिक अनुष्ठानातून नियंत्रित राहते असे आधूनिक विज्ञानाने ही मान्य केले आहे. ही सनातन संस्कृतिची मानव जातीला मिळालेली देणगी आहे.

महाकुभांच्या महोत्सवात ज्या काही चूका घडल्या त्यावर मोदी व योगी सरकारवर विरोधी पक्षांनी टिका केली. त्याबाबत आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण इंदिरा गांधीच्या हत्यानंतर दिल्लीत निर्दोष शीख बांधवांची काॅग्रेस कार्यकर्त्यांनी  निर्घूण हत्या केली होती, त्यावर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधीनी दिलेली प्रतिक्रीया काय होती याचे स्मरण विरोधी पक्षांच्या नेत्यांनी करावे. राजीव गांधीची प्रतिक्रिया 
' मोठा वृक्ष पडला तर त्याखालील छोटी मोठी झाडे मोडणारच ' ही होती. हा तर निर्लज्जपणाचा कळस होता. माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीची हत्या झाली तेव्हा त्यांच्या सरकारतले गृहखाते झोपले होते का,  हत्या व यात्रेत भगदड होऊन निष्पापाचे प्राण जाणे यात मूलभूत फरक आहे की नाही ? अशा प्रश्नांवर लिबरल मंडळी मौन पाळते. विरोधी पक्षांची मोदी सरकारवरील टिका ही विरोधी पक्षांची खोड आहे व तीचे स्वरूप सूंभ जळला तरी पीळ जात नाही असेच आहे. त्यामूळे त्यावर अधिक चर्चा करण्याची इथे गरज नाही. 

महाकूंभात जे भाविक सामिल झाले ते सारे भाविक स्वतःच्या खिशातील पैशातून. महाकुंभात स्नान करून घरी परतलेल्या अनेक भाविकांनी प्रयाग येथील सोयी-सुविधांची भरभरून स्तुती केली आहे. या उलट दर वर्षी साजरा होणार्या हज यात्रेत आपल्या देशातील मुस्लिम बांधव  केंद्र सरकारकडून आर्थिक मदत घेऊनच जात होते ना ! त्या हज यात्रेत ही प्रचंड गर्दीत मुस्लीम बांधवांनी प्राण गमाविले नव्हेत का ? यावर आपल्या येथील लिबरल मंडळींनी हज यात्राच्या आयोजकांवर टिका कधी केली आहे का? उत्तर नाही हेच होय. याबाबत धर्म न मानणार्या लिबरल मंडळींनी तरी आवाज उठवयाला हवा होता की नाही ? पण तसे ते करीत नाहीत. याचा अर्थ असा आहे की या मंडळींच्या दरबारात ख्रिस्ती व इस्लाम सारख्या एकेश्वरी धर्मातील लोकांच्या भावना पवित्र मानल्या जातात पण सनातन संस्कृतीत सारे काही अतार्किक व अंधश्रद्धां मानले जाते. कारण यांना सातासमुद्राच्या पलिकडील देशांकडून भरपूर पैसे मिळत असतात.

असा विषारी प्रचार जितक्या त्वेषाने जागतिक लिबरल मंडळी करीत असते त्याहून अधिक त्वेषाने आपले येथील विरोधी पक्ष व त्यांचे गल्लीबोळातील कार्यकर्ते करीत असतात. या लिबरल मंडळीत सर्वात मोठ्या शक्तीमध्ये चीन सरकारची मिडीया व अमेराकेतील जार्ज सोराॅस आणि तेथील एनजीओज् आहेत. अशा एनजीओज् मध्ये तेथील मिडीयाचा ही समावेश आहे. त्यांच्याच मदतीने जम्मू- काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत, कच्छ ते ईशान्य भारताच्या टोकापर्यंत पर्यंत विरोधी पक्षांचे नेते-कार्यकर्ते सनातन संस्कृतीवर टिका करीत असतात. विरोधी पक्ष सनातन संस्कृतीवर जितकी अधिक टिका करेल तितकी त्यांची शक्ती क्षीण होत राहील असे मला वाटते.

वाचक मित्र हो, दिल्लीतील निवडणूकांच्या निकालाचे विश्लेषण करीत असताना महाकुंभातील घडलेली घटना व त्यासंबंधीत विरोधी पक्षांचे वर्तन व त्यांची वक्तव्ये यावर जी चर्चा मी केली ती औचीत्याला धरून नाही असे वाटू शकते पण तसे काही नाही. महाकुंभाचे छायाचित्रे, तसेच लाईव्ह प्रसारण, बातम्या व माहिती  इलेक्ट्रानिक्स मिडीया व वर्तमानपत्रासारखे प्रिन्ट मिडीया, युट्यब, वाॅट्सॲप सारख्या सोशल मिडीयावर ही घरी बसून आपण जशी पाहिली तशी दिल्लीतल्या मतदारांनी पाहिली आहे. दिल्लीत देशातल्या सर्व प्रान्तातले नागरिक राहतात. त्यांचे दूर वर असलेले नातेवाईक महाकुंभात सामिल झालेले असणारच. त्यांच्या द्वारें आयोजकांची स्तुती दिल्लीतील मतदारांनी ऐकली असणारच. महाकुंभाच्या पर्वावर दिल्लीतील बहुतांश मतदारांना उत्तर प्रदेश सरकार व केंद्र सरकार मधील उच्च श्रेणीच्या समन्वयाचे दर्शन घडले असणारच. त्यातून भले मिडीयात  याबाबत वाच्चता झाली नसली तरी भाजपाच्या पारड्यात थोडी-फार मते पडली असावीत असा माझा कयास आहे.

वाचक मित्र हो,  दिल्ली हे छोटे राज्य आहे. त्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळालेला नाही हे आपणास ठाऊक आहे. असे असले तरी दिल्लीतील विजयाने भाजपाचा देशभराच्या राजकारणावर तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणावर प्रभाव वाढत जाणार असे मला वाटते. मी लेखाच्या  शिर्षकाच्या जोडीला ' केजरीवाल भस्मसात ' हे  पोटशिर्षक ठेवले. याचे कारण केजरीवाल हे जागतिक लिबरल लाॅबीने भारताच्या राजकारणात रूजविलेले भलं मोठं काटेरी झुडूपं आहे. त्यावरील चर्चा मोघम नसेल. कारण केजरीवाल हे नाव प्रातिनिधीक आहे. राहूल गांधी, कन्हैयाकुमार, स्टॅलीन, नक्षलवादी, दशहतवादी,  सारखी अनेक काटेरी झुडपें देशाच्या राजकीय पंटागंणावर विदेशी धनशक्तीच्या पांठीब्यातून रूजली आहेत. त्यावरील चर्चा वाढत जाणार आहे. त्यासंबंधीत वेळोवेळी चर्चा स्वतंत्र रित्या होत राहणार आहे. दिल्ली राज्यातील आप चा पराभव कसा झाला यावरील अनेक राजकीय अभ्यासकांनी मांडलेले विश्लेषण माध्यमाद्वारें आपण ऐकले आहे. त्यावर अधिक काही लिहण्यापेक्षा  या लेखाच्या भाग- २ मध्ये देशाच्या राजकीय पटांगणावर विदेशी शक्तीच्या साह्याने केजरीवाल नावाचे प्रचंड काटेरी झुडूपं कसे झटपट रूजले याचा शोध घेण्याचा प्रयत्न मी करू इच्छीतो. पण त्यासाठी त्या बाळाची (काटेरी झूडपाची) कुंडली  पाहावी लागेल. त्यातूनच त्याची वाढ आणि लयाची चिन्हे शोधता येतील असे मला वाटते. त्यावरील चर्चा  लेखाचा भाग-२ आपण करणार आहोत. म्हणून मी इथे थांबतो.                          धन्यवाद !
                                क्रमशः --

मंगळवार, ३ डिसेंबर, २०२४

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका निकाल - अनाकलनीय की आकलनीय ? (भाग- ६)

आपल्या देशाच्या लोकशाहीला खरा धोका घराणेशाहीच्या पक्षांचा आहे. जागतिक लिबरल लाॅबीला आपल्या देशातले फक्त मोदी सरकार उलथावयाचे नसून  केंद्रस्थानी काँग्रेस म्हणजे गांधी घराण्याची सत्ता व सर्व राज्यांत प्रान्तिय पक्षाचे सुभेदार अशी मध्ययुगीन सरंजमशाही, म्हणजेच चीनी साम्राज्याची वसाहत भारतात स्थापन करावयाची आहे. अशा सरंजमशाही- घराणेशाही च्या विरोधात मतदारात जागृती होत आहे. याची चुणूक उत्तर कोकणातील वसई, नालासोपारा व पालघर मतदार संघात पाहायला मिळाली आहे. मला विशेष आनंद झाला. कारण वरील तिन्ही मतदार संघातील भाजपाचा विजय हा आमच्या तालूक्यातला म्हणजे वसई चा. आमच्या गावाचा म्हणजे नालासोपाराचा विजय आणि तिसरा पालघर मतदार संघाचा म्हणजे आमच्या जिल्ह्याचा. 

या तिन्ही मतदारसंघातील विजय अपूर्व आहे. हा विभाग माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या परिवाराचा बालकिल्ला. यंदा प्रथमच ठाकूर परिवाराचा पराभव झाल्यामूळे महाराष्ट्रात या विभागातील भाजपाचा विजय अनेक राजकीय अभ्यासकांचा चर्चेचा विषय झाला आहे.

नालासोपारा मतदारसंघातून निवडणून आलेले भाजपा उमेदवार आमच्या गावातले. आमच्या नाळा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत पढई नावाची छोटी वाडी आहे. जागृत दत्तमंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मी प्राथमिक शाळेत असताना सन १९५८ ला तत्कालीन युवक कै भालचंद्र आप्पा म्हात्रे, कै वासुदेवदादा म्हात्रे, श्री बाळकृष्ण अण्णा नाईक  या त्रिमूतींने कै दामुआप्पा म्हात्रे, कै बबनतात्या म्हात्रे  श्री गजानन वामन म्हात्रे  इत्यादींच्या  सहकार्यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा सुरू केली. संघस्थान अर्थातच आमच्या गावातल्या पुर्वाश्रमींनी सन १९४९ ला बांधलेले प्रसिद्ध श्री दत्तमंदिर हेच आहे. तमाम गावकरी सध्या श्री दत्त जन्मोत्सव व  दत्तमंदिराच्या अमृत महोत्सवाच्या सोहळ्याच्या तयारीत आहेत. या आनंदाच्या सोहळ्यात राजन नाईक यांचा तसेच वसई व पालघर विधानसभा मतदारसंघातला भाजपाचा विजयाने आमचा आनंद द्विगुणीत केला आहे. 

राजन नाईक हे आमच्या गावातले. ज्यांनी शाखा सुरू केली अशा पाच-सहा युवकांपैकी श्री बाळकृष्ण नाईक हे राजन नाईक यांचे पिताश्री. राजन नाईक हे ही बालपणापासून संघ स्वयंसेवक आहेत. व्यवसाय निमित्ताने त्यांचा नालासोपारा येथील जनतेशी संपर्क झाला. ते यशस्वी व्यवसायिक व दिलदार समाजसेवक आहेत. त्यांचा नालासोपारात व्यवसाय असला तरी रात्री ते झोपायला पढई गावातल्या घरी येतात. 

सन १९६४ साली पंचक्रोशीतल्या समाजबांधवानी आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांची शोकसभा घेऊन पहिल्या पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहिली ती पढई वाडीतच. सन १९७७ च्या आणिबाणीच्या निषेधार्थ झालेल्या सत्याग्रहाचे नियोजन केंद्र आमचे गाव होते. श्री दत्तात्रेय म्हात्रे, श्री सदानंद म्हात्रे व अनंत म्हात्रे, या तिघानी सत्याग्रहात भाग घेतला होता. आजही ही पढई नावाची ही वाडी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मुंबई चे अधिवेशन, पंचक्रोशीतले रेल्वे कर्माचार्यांचे संपकाळातले केंद्र स्थान, वसई तालुका स्तरावरील जनता पार्टीचे पहिल्या अधिवेशनाचे स्थळ, उत्तर मुबंईतले खासदार माजी रेल्वमंत्री व उत्तर प्रदेशचे राज्यपाल श्रीराम नाईक यांचे प्रचार-दरम्यान निवासाचे स्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बोरीवली भाग सन १९९९ च्या वार्षिक नियोजन बैठकीचे स्थान, तसेच विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजनाचे यजमान म्हणून पढई ओळख ठेवून आहे.  

राजकारणातल्या घराणेशाहीवर मी लेखाद्वारें टिका करीत असतो. घराणेशाही पक्षांच्या कार्यकर्त्यांना भाजपात काय होत आहे याकडेच अधिक लक्ष असते. ती एक खोड आहे. लोकसभेच्या निवडणूकात चांगले यश प्राप्त झाल्यामूळे बोरीवलीत काही ठिकाणी ' इथे माज उतरवला जातो ' असे बॅनर्स रस्त्यावर लावलेले दिसले होते. अशी कृत्यें करणे ही मविआच्या कार्यकर्त्यांची खोड झाली आहे. मविआंच्या कार्यकर्त्यांची  प्रत्यक्ष बूथ, वार्ड, व  वस्तीत जाऊन पक्ष बळकट करण्याची सवयच मोडली आहे. यांच्या पक्षात पक्षप्रमुख म्हणजे मालक व कार्यकर्ते म्हणजे मजूर. त्यामूळे वरून जे काही आदेश येतात ते निमूटपणे स्विकारतात. सोनिया गांधी व राहूल गांधीनी काँग्रेस पक्ष चीन देशाच्या गोठयात बांधून ठेवला आहे. उद्धव ठाकरेने बाळासाहेबांच्या शिवसेनेला मौल्लवींच्या चरणीं ठेवले आहे. शरद पवारांना आपल्या पक्षाचं काय करावयाचे आहे हेच कळेनासे झाले आहे. शेवटी शरद पवार आपल्या पक्षाला काँग्रेसच्या गोठ्यात ठेवतील असे दिसते.

या तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते व समर्थक भाजपाच्या अंतर्गत काय चालत आहे यावर पोटतिडकीने हुज्जत घालत असतात. अर्थात स्वतःचा मेंदू गहाण ठेवलेल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांशी  हूज्जत घालण्याने दोघांचा वेळ वाया जातो. उगीच वादविवाद करून ब्लडप्रेशर नावाच्या रोगाला का आमंत्रण द्यावे ? आमच्याकडे आदेश नसतो. असते ती फक्त आज्ञा.  संघाच्या दिक्षेतून मिळालेल्या प्रेरणेतून स्वयंसेवक  समाजोन्नतीच्या अनेक क्षेत्रात संस्था उभारतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फक्त स्वयंसेवकांवर संस्कार करतो. स्वयंसेवकांचे कार्य हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख आहे. 

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका निमीत्ताने निवडणूक आयोग मतदारांसाठी अनेक सुविधा पुरवित आहे. हे प्रत्यक्ष पाहायला मिळाले. शंभर टक्के मतदानासाठी निव्वळ जाहिरात करून थांबत नाही. ज्यांना प्रकृती अस्वास्थ्याने मतदार केंद्रावर जाऊन मतदान करता येत नाही, त्यांच्यासाठी त्यांच्या घरी जाऊन गुप्तपणे मतदान करण्याची व्यवस्था निवडणूक आयोगाने केली आहे. टपाला मत पद्धतीत सुधारणामुळे मतदानाचा टक्का वाढत आहे. प्रत्येक पंचक्रोशीत मतदान केंद्राची संख्या, कर्मचारी, पोलीस दल, अधिकार्यांची संख्या वाढवित आहे. 

मतदान केंद्रावर जेष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोयी पुरवित आहे. त्यामुळे मतदान करण्यात अडचण येत नाही. उन्हाच्या तडाख्यात उभे राहावे लागू नये म्हणून मतदान केंद्र वाढवून केंद्रावर मंडप ही घातलेले दिसत आहेत. मतदान केंद्रांना शुभकार्याच्या मंडपाचे स्वरूप आलेले पाहावयास मिळत आहे. पाणी, व्हिलचेअरच्या खुर्च्या इत्यादी सुविधामूळे मतदान केंद्राना आधूनिकतेचं स्वरूप आले आहे. या सर्व गोष्टी प्रत्यक्ष पाहावयास मिळाल्या. प्रत्येक केंद्रावर झेपेल इतकेच मतदान संख्या ठेवली. त्यामूळे मतदान सुरळीत व जलद गतीने होत असल्याचा अनुभव मिळाला. पण--

पण मतदान जलद गतीने होत असल्यामूळे मतदान केंद्रावर गर्दी दिसत नव्हती. त्यामूळे राजकीय पक्षांच्या निरीक्षकांना ही मतदान कमी होत आहे असे वाटत होते. शेवटी मतदान केंद्रातील टक्केवारी पोलिंग एजंट कडून कळली तेव्हा राजकीय पक्षांच्या विशेषतः महायुतीच्या कार्यकर्त्याना हायसे वाटले. निवडणूक आयोगावर टिका करणार्यांनी प्रथम निवडणूक आयोग पुरवित असलेल्या सोयी पाहाव्यात. उगीच मोर्चा, घेराव करण्याच्या भानगडीत विरोधी पक्षांची स्थिती आणखिन खालावत जाईल असे मला वाटते. राहीला प्रश्न विरोधी पक्ष कमकुवत होत गेले तर देशाची लोकशाही संपुष्टात येईल अशी जी  भिती दाखवून विरोधी पक्ष व त्यांचे समर्थक मिडीया हाऊसेस मतें मागत आहेत, त्यावरील चर्चा निरर्थक आहे. कारण विरोधी पक्षांकडे भाजपा सरकारावर टिका करण्याचा राजकीय मुद्दाच राहीला नाही हे मतदारांना ठाऊक झाले आहे. या शिवाय या तथाकथित सेक्युलर व घराणेशाही पक्षांची दुकाने बंद झाली तरी अनेक आक्रमणें होऊन जी सनातन संस्कृती आज ही सुस्थितीत आहे, तीला जराही धक्का लागणार नाही. उलट आपला देश अधिकाधिक प्रगत व  सशक्त होत जाणार आहे अशी खात्री बहुतांश मतदारांना वाटत आहे.



महाराष्ट्र विधानसभा निवडणुका निकाल - अनाकलनीय की आकलनीय ? (भाग --५)

 इंडी आघाडी व मविआ चे राजकारण इतक्या सूड भावनेने प्रेरीत आहे की ही सूडभावना त्यांच्या कार्यकर्त्यात सुद्धा शिरली आहे. याचा अनुभव मला आला आहे. मी आनंदराव पवार सरस्वती विद्यालयाची (वझिरा बोरीवली(प)  सचीव पदाची जबाबदारी सांभाळतो आहे. या खेपेस प्रथमच आनंदराव पवार शाळा हे मतदान केंद्र झाले होते. त्यामुळे  आपल्या केंद्रात शंभर टक्के मतदान व्हावे ही इच्छा प्रबळ झाली. तसे पाहता मतदाता जागृती अभियानात मी पहिल्यादांचा भाग घेतो असे नाही. वझिरात जनजागरणाच्या कार्यक्रमात भाग घेण्याची ही चौथी खेप आहे.   या अभियानात माझ्या सोबत आणखिन तिघेजण होते. त्यापैकी एक कार्यकर्ता ज्या सहकारी सोसायटीत राहतो तिथे आम्ही दोघांनीच अभियानाची जबाबदारी स्विकारली. बाकी दोघांना दुसर्या सोसायटीत जावयास सांगितले.


आम्ही दोघजण सोसायटीच्या तळमजल्याच्या पॅसेज मध्ये होतो तेव्हा त्या सोसायटीचा एक सदस्य भेटला. त्या सदस्याशी सोबतच्या कार्यकर्त्याने माझी ओळख करून दिली. मतदाता जागृती अभियाना साठी आनंदराव पवार शाळेचा सेक्रेटरी म्हणून मी आलो आहे अशी ओळख झाली. त्यावरून मी संघाचा स्वयंसेवक आहे हे त्या गृहस्थाच्या लक्षात आले. त्यांनी मला विचारले, 'काय हो तुम्ही बोरीवली मतदार संघात बाहेरील उमेदवार का 
आणला ?'  मी उत्तर दिले  'मला याबाबतचे फारसे काही माहिती नाही.' त्या गृहस्थाने म्हटले, बोरीवलीतल्या कार्यकर्त्यावर नेहमी बाहेरचा उमेदवार लादला जातो हे चूकीचे आहे ना? असा प्रश्न विचारला. मी उत्तर दिले, ' तुमचं म्हणणं बरोबर आहे . पण राजकारण आपल्या हातात नसते.' त्यावर ते गृहस्थ म्हणाले  'सर्व बाबीत केंद्रातून आदेश येतो तो तुम्ही का स्विकारता?  मी उत्तर दिले  ' आपण बरे आपले काम बरे ! वादविवाद करण्यासाठी आम्ही आलेलो नाही '  असे म्हणून मी शेवटी त्यांना सौम्य भाषेत म्हटले, " मला एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे. तो प्रश्न असा आहे, उद्धव ठाकरे म्हणतात की बंद खोलीत अमित शहा यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यावयाचे कबूल केले होते. ते दिले नाही म्हणून आम्ही भाजपाला धडा दिला. पुरावा देण्याची जबाबदारी तक्रार करण्यार्ची असते. पुरावा नसताना काही तरी आरोप करणे हेच मूळी संघर्षाचे कारण असते. अमित शहा किमान मातोश्री वर आले होते. आघाडीच्या बैठकांसाठी जनाब ठाकरे स्वतः कसे गेले दिल्लीला? " यावर ते गृहस्थ हसले आणि म्हणाले मी श्रीराम जन्मभूमी श्रीराम मंदिर च्या निधी संकलनात भाग घेऊन सोसायटीतून पन्नास हजाराहून अधिक निधी गोळा करून दिला आहे. ते गृहस्थ माझ्या पेक्षा धाकटे असल्याने मी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. नंतर ते बाहेर गेले. 

आम्ही दोघे लिफ्टमधून शेवटच्या मजल्यावर गेलो. त्या सोसायटीतले अभियान संपवून नंतर आम्ही दुसरी कडे गेलो. ते गृहस्थ मविआ च्या घटक पक्षाचे कार्यकर्ते आहेत की नाही  आम्ही विचारपूस केली नाही. पण सोशल मिडीया असो वा सामाजिक समारंभात, अथवा बस व रेल्वे स्थानक, बागबगीचा, बाजार इत्यादी स्थानी राजकारणावर नको तितकी चर्चा होते आणि त्यातून वादविवाद विकोपाला जातात हे अलिकडे नित्याचे झाले आहे. यावर मी एका लेखात माझे मत सविस्तर मांडले आहे.

वरील अनुभव मी येथे शेअर केला याचे कारण मविआच्या घटक पक्षातल्या कार्यकर्त्यांना जागोजागी हुज्जत घालण्याची सवय जडली आहे. अशा हुल्लडबाजीचे जनकत्व राष्ट्रीय स्तरावर सोनिया गांधी व ममता बॅनर्जी व महाराष्ट्रातील मविआ त्यात ही विशेषतः उद्धव ठाकरे व जितेंद्र आव्हाड. थोडक्यात घराणेशाही पक्षच राजकारणाचा पोत खाली आणण्यास जबाबदार आहेत.  ' यथा राजा तथा प्रजा ' हा नियम घराणेशाही पक्षात आज ही अस्तित्वात आहे. आपल्या येथील घराणेशाही पक्षांतील युवराजांचे वर्तन राजेशाही व हुकूमशाही सारखे असते. मग त्या पक्षांचे कार्यकर्ते उर्मठच बनणार ना ! चीनशी काँग्रेस पक्षाने करार केला आहे खरा पण त्या चीन मध्ये लोकशाही नाहीच. मग घराणेशाही तरी कशी येणार चीन मध्ये ? विद्यमान राष्ट्राध्यक्षांच्या कुटुंबातील सदस्य राष्ट्राध्यक्ष होणारा नसतो. कारण साम्यवादी पक्षाच्या राजवटीत हूकुमशाही असते व तीच पक्षाचं सर्वोच्च कार्यकारिणी असते.

आपल्या येथील घराणेशाही पक्षांना मग ते उत्तरेतील असो वा दक्षिणेतील, पश्चीमेकडील असो वा पुर्वेकडील, त्यांच्या वारसांचा जम बसावा म्हणूनच संसदीय लोकशाही प्रणाली हवी असते. कारण त्यातूनच पक्षाचा ताबा मिळतो. एकदा की पक्षाचा ताबा मिळविला की संसद, विधानसभा आपोआप ताब्यात येतात. कारण बापजाद्यांनी लुटलेली प्रचंड माया असते ती वारस हक्काने मिळतेच ना ! ती माया एकप्रकारे आपल्या घराण्यातील पुढच्या पिढींना राजकीय क्षेत्रात करिअर साठी केलेली सुलभ सोय होय.  शेवटी राजकारण सुद्धा  जिथे ' दाम करी काम ! ' असेच एक क्षेत्र आहे.
                         
क्रमशः

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका निकाल - अनाकलनीय की आकलनीय ? (भाग --४)

गेल्या ५ वर्षात महाराष्ट्रातील राजकारणावर मी ३८ लेख पब्लीश केले आहेत. या शिवाय 'केंद्र-राज्य संघर्ष - महाराष्ट्र ते दिल्ली व्हाया बंगाल' ' या लेखमालेतही महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा मांडली आहे. ' शिवसेनेतील फूट की काळाने शिवसेनेवर उगारलेला सूड ?' 'उद्धव ठाकरे खलनायक ठरत आहेत का?' ' शिवसेनाने गमाविलेल्या संधी, ' ' शरद पवार ना चाणक्य ना वारकरी फक्त संधीसाधू राजकारणी, 'राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट आणि घराणेशाही पक्षांची पडझड , सरकारचे डोके ठिकाणावर आहे का , इत्यादी शिर्षकाचे लेख त्या ३८ लेखात आहेत. तसेच ' राजकीय पक्षांच्या दिशा व दशा ' या शिर्षकाची राष्ट्रीय तसेच प्रान्तीय पक्षांची वर्तमान व भविष्याची स्थिती ती राज्यनिहाय एक  लेखमाला ही पब्लीश केली आहे. त्यामूळे मागील दोन तीन महिन्यात राजकारणावर अधिक काही लिहावे असे मला वाटले नाही. म्हणून मी  राजकीय लेख लिहणे थांबविले होते. 

मविआचा धुव्वा का उडाला याची  छोटी-मोठी अनेक कारणें आहेत ती माझ्या कुवतीनुसार आपल्या समोर ठेवावीत म्हणून मी लेखमालिका लिहावयास घेतली. त्यातील काही कारणें अशी आहेत की ते पुढील    २० ते २५ वर्षे मविआ व इतर विरोधी पक्षांचा पिच्छा सोडणार नाहीत. ती महत्वाची अशी आहेत-

१) माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे नेते पी चिंदबरम यानी भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीवर खोट-नाटं व सर्वात गंभीर असे भगवा दशहतवादाचे नॅरेटिव्ह तयार करून युपीए सरकारच्या काळात सनातन साधु-संताचा केलेला छळ मतदार विसरले नाहीत. 

२)युपीएच्या राजवटीत (सन २००४ ते २०१३ मध्ये) न भूतो न भविष्य असा झालेला प्रचंड भ्रष्टाचार मतदारांच्या स्मरणात आज ही आहे. 

३) उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते वेळी पोलीस यंत्रणेचा उपयोग पत्रकार- संपादकांना फरफटत कस्टडीत ठेवणे, रहस्यमय हत्या घडविणे व अशा हत्या नैसर्गिक मृत्यु दाखविण्याचा सपाटा, भ्रष्टाचार,  सर्वत्र १४४ कलम लावले असताना कोरोना च्या साथीत पालघरला जमावाने केलेल्या दोन साधुंच्या निर्घूण हत्या 

४)कोरोनो काळात औषधोपचार मध्ये झालेला भ्रष्टाचार तसेच छोटे-मोठ्या घटनांवर पडदा घालणे इत्यादी  पापकृत्यांनी भरलेला उद्धव ठाकरे सरकारचा कारभार हे एक गंभीर कारण लोकांच्या स्मरणात होते. 

५) सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींवर भर सभेत  'मोतका सौदागर' असे म्हणत  देशातील राजकारणाला दिलेले सुडाचे स्वरूप.  

६) सोनिया गांधीचे युवराज राहूल गांधी, केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादींवर  जाहीर सभेत फार जहरी भाषेत टिका करीत असतात. राहूल गांधी फक्त आपल्या देशात नव्हे तर इतर देशात जातात तेव्हा ही आपल्या देशाच्या प्रत्येक व्यवस्थेवर निरंतर टिका करीत असतात. हा शहाणपणा नाही आणि बालीशपणा ही नाही. त्यांचे मानसिक संतुलन वेळोवेळी ढासळते की काय अशी शंका येते. 

सूड भावना ही एक प्रकारे अजगरासारखा विळखा घालून आपल्याला कमकुवत करत असते याचे भान राजकीय नेत्यांनी विशेषतः राहूल गांधी, उद्धव ठाकरे, नाना पाटोळे, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, स्टॅलीन, अरविंद केजरीवाल, आणि डाव्या पक्षांचे नेते व कार्यकर्ते (जे नक्षलवाद्यांना पाठींबा देतात)  ठेवावयास हवे.अन्यथा राजकीय नेत्यांची आचार विचार आणि निर्णय घेण्याच्या ज्या शक्ती देहात विराजमान आहेत त्या सैरभैर होण्याची शक्यता असते. अशा स्थितीतून अराचजकतेचा जन्म होतो. असे जागतिक इतिहास सांगतो. काही इतिहास तज्ञ, राजकीय व सामाजिक अभ्यासक व चिंतनकार आपल्याला इशारावजा सल्ला देत असतात,  ते चूकीचे नाही.

आपला महाराष्ट्र  'पुरोगामी विचाराचा, सर्वधर्मसमभाव बाळगणारा, शाहू फूले, आणि आंबेडकरांचा ' असा सततचा घोष करणारी मंडळीच महाराष्ट्रात जातीवादाचे  व मुस्लीमाचे तुष्टीकरण करण्यात गुंतले आहेत. सापाला दुध दिले तरी तो विषच ओकतो. असा अनुभव देशाच्या फाळणीतून आपण घेतला आहे. सर्वसमावेशकता अंगी बाळगणे निश्चीतच चांगली गोष्ट आहे पण अल्पसंख्याकांचे लाड करून त्यांना डोक्यावर बसविण्याची हाव जी विरोधी पक्षांना लागली आहे, ती देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करेल असे बहुसंख्यांक हिंदु समाजाला आता वाटू लागले आहे. हेच कारण आहे ज्यामूळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकाचा निकाल अनाकलनीय आला असावा असे मला वाटते. असेच मत मी, ' त्रिपूरा येथे अफवा आणि धुडघूस महाराष्ट्रात कसा ? ' या शिर्षकाचे २१ नोव्हेंबर २०२१ला पब्लीश केलेल्या दोन लेखात वाचावयास मिळेल. 

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी  महाराष्ट्रातील राजकारण खालच्या पातळीवर आणून ठेवले आहे. अखिल भारतीय स्तरावर सोनिया गांधी व राहूल गांधी या जोडीने काँग्रेसची स्थिती खिळखीळी करून ठेवली आहे. महाराष्ट्रात सन २०१४ ला केंद्रात भाजपा प्रणित एनडीए सरकार अस्तित्वात आल्यापासून विरोधी पक्ष सैरभैर झालेले दिसतात. त्यामूळे ॲक्सीस इंडीया या संस्थेने महायुतीला महाराष्ट्रात १७५ पर्यंत जागा मिळतील असे जे भाष्य केले होते त्यावर लिबरल मंडळीनी दुर्लक्ष केलेले दिसले. ॲक्सीस इंडीया संस्थेने एकूण ७५ ओपिनीयन पोल केले आहेत. त्यापैकी ७० पोल खरे ठरले आहेत. याकडे दुर्लक्ष करून मविआ आता आंदोलनजिवीच्या मार्गावरून जाऊ इच्छीते. काय म्हणावे ? कुत्र्याचं शेपुट नळीत घातले तरी शेवटी वाकडेच राहते. 

महाराष्ट्रत प्रथमच एकतर्फी मतदान झालेले दिसले अशी सबब मांडून विरोधी पक्ष चुनाव आयोगाच्या विरोधात मोर्चा, धरणे इत्यादी नाटकं करण्याचे सत्र सुरू केले, तरीही हाती काही यश येणार नाही. उलट न्यायालय मविआवर ताशोरे ओढतील. सामान्य मतदारांना ही ठाऊक झाले आहे की विरोधी पक्षांचे मोर्चे विदेशी शक्तीच्या साह्याने देशात अस्थिरता निर्माण व्हावी हाच हेतू असतो. मराठा आरक्षण, संविधान बचाव, किसान आंदोलन, वल्फ बोर्ड च्या मोहीम, गणेश व नवरात्र या दोन महोत्सवात मुस्लीम समाजाची दादागिरीने अडथळे आणणे, लव जिहाद, आतंकवादी घटना यांच्या पाठीमागे देशविदेशी लिबरल लाॅबीच आहे.

मुस्लीम समाजाचे तुष्टीकरण कागोदपत्री स्वरूपात मौल्लवी कडे सुपूर्त करण्यापर्यंत मविआ ची मजल पोहचली. मग 'सजग रहो', सौ टक्का मतदान करो, बटोंगे तो कटोंगे, एक है तो सेफ है इत्यादी प्रतिक्रीया येणे हे स्वाभाविक आहे. सन १९८८-८९ च्या दरम्यान काँग्रेसचे वरीष्ठ व विद्वान नेते बॅ गाडगिळांनी काँग्रेसला हिंदू हिताकडे दुर्लक्ष करणे महाग पडेल असा इशारा दिला होता. पण काँग्रेसने दुर्लक्ष केले. काल-परवा माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सुद्धा भगवा दशहतवादाचे खोटे नॅरेटिव्ह काँग्रेसने करावयास नको होते असे स्पष्टपणे म्हटले आहे.

क्रमशः-

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका निकाल - अनाकलनीय की आकलनीय ? (भाग -- ३)

संघ, भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी व निवडणूक आयोगावर दोष ठेवून काय साध्य होणार आहे ? सन २०१४ पासून लिबरल पत्रकार व राजकीय अभ्यासक सतत विदेशी धनशक्तीच्या साह्याने नेगेटिव्ह नॅरेशनाच्या आधारे विरोधी पक्षांना आधार देत आहेत.  असा आधार म्हणजे वजन वाढविण्यासाठी एखाद्या पेंशटला औषधें दिल्यासारखे आहे. त्यातून वजन वाढते पण त्यातून तो पेंशट  बलवान व शक्तीवान होतोच असे नाही ? पण मविआच्या नेतेमंडळींनी तो पेंशट वृद्ध होत नाही असा समज करून घेतला. ही एक प्रकारे राजकीय क्षेत्रातली अंधश्रद्धा ठरली. आश्चर्य असे की तथाकथित पुरोगामी, उदारमतवादी व अंधश्रद्धा निर्मुलनाचे शिल्पकारांची ही स्थिती  ! लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण !

गेल्या लोकसभेच्या निवडणूकाच्या प्रचारात ' संविधान बचाओ ' असे नेगेटिव्ह नॅरेशनचा वापर करून दलीत, पिडीत मतदारांत संभ्रम झाला पण तो तात्पुरता टिकला.भाजपाचे संसदेतील संख्याबळ कमी झाले पण तेच नॅरेटिव्ह राज्यातील विधानसभा निवडणूकात उपयोगी पडेल अशी भ्रामक समजूत मविआने करून घेतली. हे ही एक महत्वाचे कारण आहे की ज्यामूळे अनाकलनीय असा निकाल  लागला. महायुतीचा विजय व मविआचा पराभव होईल असे दिसत होतेच. मविआचा दारूण पराभव झाला एवढाच भाग काय तो आश्चर्यचा, नवलाचा व अनाकलनीय स्वरूपाचा आहे. 

या व्यतीरिक्त इथे आणखिन एक मुद्दा मी मांडतो आहे जो हरियाणात आणि महाराष्ट्रात काँग्रेस प्रणित आघाडी ला महाग पडला. राहूल गांधीनी लोकसभेच्या निवडणूक प्रचारात  संविधान नष्ट होईल म्हणून भाजपाला मत देऊ नका असे जे विधान केले होते , त्यात काही दम नव्हता. ते एक खोटं नॅरेटिव्ह होते हे लोकांना कळून आले. संसंदेच्या अधिवेशनात भाजपाचे तडफदार युवक खासदार अनुराग ठाकूर यांनी राहूल गांधीकडे नजर ठेवून ' भारतिय संविधान के कितने पृष्ठ है यह तो आप प्रथम बताये ?' असा प्रश्न भरगच्च खासदारांच्या उपस्थित संसंदेत विचारला तेव्हा राहूल गांधीना नानी आठवली असेल इतकी फजिती झालेली लोकांनी टिव्ही वरून पाहिलेली होती. म्हणे हे भारताचे भावी पंतप्रधान !

उबाठा च्या कार्यकर्त्यांना बोरीवली मतदार संघात भाजपाने बाहेरच्या उमेदवारांला का तिकीट दिले यावर हुज्जत घालावीसी वाटली पण  इटालीयन सोनीया गांधीना काँग्रेसचे अध्यक्षपद का दिले, राजकारणाची जरा ही जाण नसलेल्या राहूल गांधीना काँग्रेसचे सर्वसर्वा केल्याबद्दल जाब विचारतात का?  उबाठा सेनेचे प्रमूख उद्धव ठाकरे राहूल गांधी आणि सोनिया गांधीना वाकून नमस्कार करताना पाहतात तेव्हा ठाकरें चा राग का येत नाही ? स्व बाळासाहेब ठाकरे हिंदु हृदयसम्राट होते असे राहूल गांधी मानावयास तयार आहेत का असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदीनी जेव्हा जाहिरसभेत समोर ठेवला, त्यावर राहूल गांधीनी का उत्तर दिलेलं नाही. ते बाजूला ठेवू. पण उद्धव ठाकरेंचे भक्त काय करीत होते ? जे स्वतःला मर्द समजून घेत आहेत ते चूप का राहीले ? धिक्कार असो तुमच्या मर्दपणाचा व फुसक्या दादागिरीचा !

महाराष्ट्रातील मतदारांनी विधानसभा निवडणूका होण्याअगोदर संसंदेच्या अधिविशेनात भाजपाच्या अनुराग ठाकूर यांनी राहूल गांधीचा आवाज बंद केलेला पाहिला. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना खोलीतून बाहेर काढले होते, तेही विडीओतून पाहिले. आम्ही वाकणार नाही अशा फुसक्या गर्जना हवेतच विरल्या. अशा छोट्या छोट्या पण महत्वाच्या घटनातून ही मतदार कोणाला मत द्यावयाचे हे ठरवित असतो.

एकंदरीत जे अनाकालनीय घडले असे आपल्याला वाटते ते होणार होतेच. ते अटळ होते. ' करावे तसे भरावे ' हा निसर्गाचा नियम आहे. जेव्हा अनाकालनीयय घटना घडते व ती आपल्या विरोधात होते, तेव्हा त्यातील सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणे क्रमप्राप्त असते. पण मविआ चे नेते मंडळी एवीएम मशीनवर पर्यायाने केंद्र सरकार वर टिका करीत आहेत. म्हणे, भाजपा सरकार एवीएम मशीन मध्ये काहीतरी गडबड करून ठेवते आहे. हे विरोधी पक्षांचे रडगाणं न्यायालयाने या अगोदर फेटाळून लावलेले आहेच. अन्याय करणार्या, धातांत खोटे बोलण्यार्यांना सहानुभूती कधी मिळत नसते. उलट अशांचे पाय चिखलात आणखिन रूतत जातात व सर्वनाश होतो. मग ते क्षेत्र कुठलेही असो.

क्रमशः--

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांचा निकाल अनाकलनीय की आकलनीय ? (भाग--२)

आपल्या मतांचा एक टक्का घसरला तर तो वाढविण्यासाठी भाजपा जितकी मेहनत घेतो तितकी मेहनत इंडी आघाडीचे व मविआचे पक्ष घेत नाहीत. मला वाटतं विरोधी पक्षांचे नेते मंडळी विदेशातून मिळणार्या धनाच्या राशीवर व नेगेटिव्ह नॅरेशनवर अधिक विसंबून राहतात. विरोधी पक्ष जे वादे करतात, ज्या योजनेची कल्पना मांडून आश्वासन देतात, पण विजय झाला की ती आश्वासने पुरी करीत नाहीत. कर्नाटक व तेलंगणात सत्ता हाती मिळाल्यानंतर काँग्रेस कडून  जाहीरनाम्यातील एक ही योजना कार्यान्वित झालेली नाही. 

महाष्ट्रातील मविआचे नेते मंडळी निवडणूक निकाला संबंधीत निवडणूक आयोगा विरूध्द आंदोलन मोहीम सुरू करणार आहे, अशी बातमी कानीं आली आहे. त्यातून काय साध्य होणार आहे ? काही नाही. पण विदेशी शक्तीकडून धन मिळत असते त्यावर पाणी का म्हणून सोडावे असे हे एक व्यवहारी कारण मविआ पाशी आहे. दुसरे असे की मविआच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची  इतकी नामुष्की झाली आहे की त्यांना चेहरा लपवावासा वाटतो. त्यासाठी औषध हवे आहे. तेच ते निवडणूक आयोग वर मोर्चा आणि घेराव !  हे अपेक्षितच होते. मविआच्या दारूण पराभवा मुळे मविआ चे समर्थक असलेला मिडीया वर्ग तोंडघशी पडल्यामुळे निवडणूक निकाला संबंधीत चर्चा करताना तीच मंडळी  मविआ नेत्यांना धारेवर घेत असतांना दिसत आहे. 

एबीपीच्या खांडेकर उद्धव ठाकरेंना म्हणाले ''अहो, तुमचा पक्ष फोडला, बाप पळविला, तुमच्या पक्षाची निशाणी पळविली, आणि शिवसेनेतून फुटलेल्या आमदारांना  गद्दार- गद्दार असे किती दिवस हिणवित राहणार?, हा तुमचा पक्षांतर्गत मामला आहे. मतदारांसाठी हा मुद्दा जुना झाला आहे '' असे म्हणत आपली नाराजी स्पष्ट केली.  काल परवा कुमार केतकर यांनी मविआचे नेते मंडळी इविएम मॅनेजमेंटवर जे आरोप करतात तो ' एक रडीचा डाव आहे. ' असे स्पष्टपणे म्हणाले. काही हिंदी भाषिक अजय दुबे सारखी पुरोगामी  संपादक मंडळी सुद्धा मविआला विजयाची संधी असुनही पराभूत झाल्याबद्दल कडक शब्दात कानउघडणी केली आहे. त्यांनी सुद्धा एविएम मशीन मधील हेराफेरीचा आरोप  ' नाच ना आये अंगन तेडा ' या स्वरूपाचा आहे असे म्हटले आहे. एनडीटिव्हीचे संजय पुगालिया, ज्यांनी एके काळी काॅग्रेसच्या मिडीया सेल मध्ये काम केले आहे त्यांनी तर राहूल गांधी जोपर्यंत काॅग्रेसचे सर्वेसर्वा राहणार तोपर्यंत काॅग्रेस निवडणूका हरत राहणार. काॅग्रेसचे धोरण ॲन्टी डेवलपमेन्ट, ॲन्टी नेशन, ॲन्टी हिंदू, घराणेशाही व त्यातून चंचल वृत्तीने पक्ष चालविणे, प्रत्येक प्रदेश काॅग्रेस अतंर्गत असलेले तंट्यावर तोडगे न काढता मामला वार्यवर सोडून देण्याची श्रेष्ठींची सवय इत्यादी कारणांची यादी उदाहरणा सह मांडली आहे. जी काॅग्रेसची स्थिती तशीच मविआची, तशीच इंडी आघाडीची स्थिती आहे.

अशा हतबल स्थितीत असलेली मविआ व इंडीची नेते मंडळी  निवडणूक आयोगावर  पक्षपाताचा आरोप दाखवित मोर्चा व घेरावाचे कार्यक्रम करीत आहेत. या पाठीमागे उद्देश एकच आहे, तो म्हणजे  विदेशी मिडीया तून आपल्याला व आपल्या युवराजांना फूकट प्रसिद्धी मिळणार आहे, या शिवाय धन ही मिळणार मग त्यावर पाणी का सोडावे हा विचार ? विचार नव्हे  हा विकार आहे. कारण पैशाची हाव ! मोर्चा, धरणे, व घेराव इत्यादी कार्यक्रमासाठी साठी मविआचे नेते मंडळी, कार्यकर्त्यांनांच राबवतील आणि त्यांचे वारसदार मात्र या कालावधीत फाईव्ह स्टार हाॅटेल मध्ये वास्तव्य करतील. त्यांना कुठे घाम गाळावा लागणार आहे ?

 मोर्चा, धरणे, उपवास इत्यादी शस्त्रे मविआने उगारली तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण मविआचे सरकारच मूळी भाजपाच्या (अर्थात फडणवीसच्या) पाठीत खंजीर खुपसून अस्तित्वात आलेले होते. शरद पवार जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आरूढ झाले ते स्वपक्षातील बड्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसून झाले. तसेच आपल्या  स्वपक्षातील नेते मंडळींना दिलेल्या जबाबदारीची व मंत्रीपदाची रचना सतत बदलत ठेवून (म्हणजे लहरी तैमूर लंग स्टाईलने) त्यांनी स्वतः लोकशाही बुरखा पांघरत 'हम करेसो कायदा'  हीच पक्ष चालविण्याची रीत ठेवली.

सन २०१९ साली पाठीत खंजिर खुपसून राजकारण करणार्या यादीत उद्धव ठाकरे यांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात कोरले गेले आहे. आपल्या देशाच्या इतिहासात स्वजनांच्या पाठीत खंजीर खुपसून राजाच्या गादीवर बसण्याचे पेटेंट जुलमी, खुनशी वृत्तीचा मोगल राजा, ज्याने सत्तेसाठी आपल्या बांधवांची ही मुंडके उडीवली होती, त्या औरंगजेब कडे जाते. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकात औरंगजेबची औलाद  कोण आहेत हा एक मुद्दा अदृष्य स्वरूपात होता. महाराष्ट्रातील मतदारांनी कुठल्याही प्रकाराचा उताविळपणा न करता शांतपणे व दृढ निश्चयाने मविआ मधील औरंगजेबच्या औलादांना घरचा रस्ता दाखविला आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार,  संजय राऊत, राहूल गांधी आणि नाना पाटोळे यांना निवडणूकाच्या निकालाने त्यांची जागा दाखवून दिली. याची आणखिन काही कारणें खालील प्रमाणे आहेत --

१)आम्ही मतदाता जागृती अभियान  चे कार्य करताना घरोघर शंभर टक्के मतदान करा अशी आम्ही विनंती करीत होतो, त्या त्या वेळी प्रत्येक सोसायटीतल्या प्रत्येक फ्लॅट मधून  १०० टक्के  मतदान करणारच आहोत असे ठाम आश्वासन आम्हाला मतदारां तर्फे मिळत होते. 

२)भाजपाचे महाराष्ट्रातले चाणक्य देवेंद्र फडणवीस यांनी, ' हो, हे धर्मयुद्ध आहे ! ' असे ठणठणीत आवाजात जाहीर सभेतून उद्गार काढले  तेव्हाच ते वाक्य मतदारपर्यंत पोहचले असल्याची जाणीव आम्हांला प्रत्येक फ्लॅटमधील रहिवाशांच्या चेहर्यावरून स्पष्ट दिसत होती. याचा अर्थ विरोधी पक्षांची नियत अधर्माकडे वळाली आहे हे मतदारांना कळले आहे. त्यामुळेच मतदानाची टक्केवारी वाढली आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतें पडली. निवडणूकाचा निकाल आला तो मविआचा संपुर्ण निकाल लावून. 

३) विधानसभेच्या सन २०१९ च्या निवडणूकाचा जनादेश भाजपा व अखंड शिवसेनेच्या निवडणूक पुर्व युतीला होता. तसेच ५ वर्षे पुर्ण केलेल्या युती (फडणवीस) सरकारच्या कामगिरीचा  होता. शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरें यांना अवदासा आठवली आणि त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन मविआ आघाडी सरकारचे मुख्यमंत्री पद बळकाविले. वस्तुस्थिती अशी होती की उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनी सन २०१९ च्या मतदानाच्या अगोदरच काँग्रेस व भाजपा ला मिळणार्या मतात घट कशी होईल यावर युक्ती आखलेली होती. ती त्यांनी पार पाडली. मुख्यमंत्री पद मिळविण्यासाठी उद्धव ठाकरें यांनी आघाडी धर्म पाळला नाही. म्हणूनच सन २०१९ पासूनच महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळे वळण लागले. अडीच वर्षात सरकार पडल्यानंतर पुढील अडीच वर्षात  मविआने आपला सर्व वेळ महायुतीच्या नेत्यांवर टिका करण्यात खर्ची केला. महायुतीने सत्तेवर आल्यानंतर विकासाच्या प्रकल्पांना गती देण्यास सुरूवात केली.  

दुसर्या बाजूला मविआने जगभरच्या लिबरल लाॅबीने तयार केलेले नेगेटिव्ह नॅरेशन्स जादुच्या कांड्या समजत अत्यंत तिखट शब्दात मांडावयास सुरूवात केली. थोडा फार फायदा लोकसभेच्या निवडणूकात झाला. त्यातून हिंदु समाजात फूट पाडण्याच्या योजनेतून विधानसभेत इतका प्रचंड विजय मिळेल की केंद्र सरकार हादरलं जाईल अशी मविआच्या नेत्यांना आशा वाटू लागली. त्यामूळे मविआ नेते वाजवी पेक्षा अधिक शेफारले. परीणाम असा झाला की मविआच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी उघडपणे स्पर्धा सुरू झाली. त्यातून हिंदू समाज दुखावत गेला यावर मविआच्या नेत्यांचे दुर्लक्ष झाले. इथेच मविआच्या पराभवाची बी नियतीने धर्म रक्षणासाठी रोवली असावी.

४)उद्धव ठाकरे हे गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणातले खलनायक ठरले. उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. ते भाजपा, मोदी अमित शहा, फडणवीस यांचा पराकोटीचा द्वेष करतात. एका जाहीर सभेतील उद्धव ठाकरे यांचे देवेंद्र फडणवीसला उद्देशून केलेले वक्तव्य असे आहे ' एक तर मी राहीन नाही तर तू ' ! या संबंधीत एका पत्रकाराने देवेंद्र फडणवीस यांना  ' तुम्ही यावर काय प्रतिक्रीया द्याल ? ' असा प्रश्न विचारला, तेव्हा फडणविसांनी शांतपणे पण स्पष्ट उत्तर दिले, ' यावर कसली प्रतिक्रीया मागता हो ?' 

                                   क्रमाश:--

आपण व आपले उत्सव - रक्षाबंधन

आपण व आपले उत्सव--- रक्षाबंधन  नमस्कार  मंडळीं,    वयोमानानुसार  तब्येतीच्या कुरबुरी  सुरू होणे हे स्वाभाविक आहे. It is law of nature. त्य...