बुधवार, १७ एप्रिल, २०२४

लोकसभा निवडणूका २०२४ इस बार चारसौ पार बनाम हटाव मोदी सरकार (भाग-३, भाग-४)

पंडीत जवाहरलाल नेहरू नंतर पुढे लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. त्यांनी सुत्रे हातात घेतल्यावर पाकिस्तानने (अर्थातच अमेरिकेच्या मार्गदर्शनाखाली) भारतावर आक्रमण केले. पण पंतप्रधान शास्त्रीजींनी आपल्या सेनादलांना पूर्ण मोकळीक देऊन पाकिस्तानच्या आक्रमणाचा समाचार घ्या असा आदेश दिला. पाकिस्तानाचा संपूर्ण पराभव झाला. रशियातील ताश्कंद येथे भारत व पाकिस्तान मध्ये तह झाला. दुर्दैवाने पंतप्रधान शास्त्रीजींचा ताश्कंद येथेच मृत्यू (अर्थात संशयाच्या धूक्यात) झाला. पुढे पंडीत नेहरूच्या कन्या काँग्रेस मधील अनेक जेष्ठ नेत्यांऐवजी पंतप्रधान झाल्या. पण त्या कशा पंतप्रधान झाल्या हे  फक्त पंडीत नेहरूवर ज्यांचा प्रभाव पडला होता त्या रशियन साम्यवादी सत्ताधार्यांना आणि इंदिराजींनाच ठाऊक !

इंदिरा गांधीच्या काळात काँग्रेस पक्षात फूट पडली. इंदिराजींच्या सरकारला डाव्या म्हणजेच साम्यवादी पक्षांचा पाठींबा मिळाला. त्या बदल्यात साहित्य, संस्कृती, शिक्षण, मिडीया ही सगळी क्षेत्र साम्यवादी पक्षांना आंदण म्हणून दिल्या गेल्या. या प्रकारे इंग्रजांचा वारसा चालविणारी नोकरशाही आणि स्पाॅट पाॅवर च्या सगळ्या क्षेत्रावर कब्जा केलेले कम्युनिस्ट यांच्या युतीतून आज ज्यांना आपण ल्युटेन्स लाॅबी किंवा खान मार्केट गँग या नावांनी ओळखतो तो राज्यकर्ता वर्ग तयार झाला. 

भारताच्या इतिहासात आजवर झालेली दिशाभूल या वर्गाने दुप्पट उत्साहाने तशीच सुरू ठेवली किंबहूना अधिकच तीव्र केली. साम्यवादी विचारसरणीचे इतिहासकार जे धर्माला अफूची गोळी म्हणत होते त्यांनी इतिहासाची पाठ्यपुस्तकं लिहीतांना एकच निकष सर्वाधिक महत्वाचा मानला. ' हिंदू धर्माशी संबंधित कुठल्याही गोष्टीला महत्व देऊन इतिहास तथाकथित सांप्रदायिकतेकडे झूकू द्यायचा नाही.' या निकषचा अतिरेक करून त्यांनी हा ध्यास विकृतीच्या पातळीवर नेला. हिंदू धर्म, संस्कृती, ऐताहासिक घटना आणि व्यक्तिमत्व यांना इतिहासातून पुसून टाकण्याचा प्रयत्न झाला तो डाॅ. मनमोहनसिंगच्या काळापर्यंत अविरत सुरू राहिला."  तो संपूर्ण इतिहास आता बदलण्याचा आराखडा तयार होत असणार म्हणूनच ' इस बार चारसौ पार ' असे पंतप्रधान मोदी सांगत असावेत.

सन २०१४ ला नरेंद्र मोदीनीं प्रथम साम्यवादी रूपी अफूच्या नशेत असणार्या दिल्लीतली खान मार्केट गँगचे कंबरडे मोडले. पंतप्रधानासोबत देशाच्या तिजोरीतून विदेश वारी करणार्या तथाकथित लिबरल पत्रकार संपादक मंडळींच्या विदेश वारीला कायमची बंदी घातली. अनेक विदेशी एनजीओ ज्यांचा धंदा फक्त मुस्लीम आणि ख्रिस्ती लोकांनाच फायदा देऊन दोन्ही धर्माचा प्रसाराचा होत असे त्यावर हातोडा नव्हे नांगर फिरविला. कित्येक बेनामी कंपन्यांना टाळें लावली. अजुनही पुष्कळ गोष्टी करावयाच्या आहेत. त्यासंबंधीतले सोशल मिडीयावर  विडीओ आपण पाहत आहोतच.

सन २०१४ च्या लोकसभेच्या निवडणूकांत भाजपाचा विजय होऊन प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालील खर्याखुर्या राष्ट्रवादी विचाराचे सरकार अस्तित्वात आले. अनेक वर्षे काँग्रेस व लिबरल मंडळीचे राज्य होते. त्यांनी संघ-भाजपा-विश्व हिंदू परिषद एकूणच संघ परिवारा बद्दल द्वेष पसरविण्याचे काम विविध माध्यामां द्वारें हातात असलेल्या सर्वकष सत्तेतून केले. तीच केंद्रातील सत्ता आता भाजपाच्या हातात आहे, हा विचारच आताच्या विरोधी पक्षांना आणि त्यांची समर्थक असलेल्या लिबरल मंडळींला सहन होत नाही. तेव्हापासून आपल्या देशातील लिबरल मंडळींचा थयथयाट सुरू झाला आहे. तो आज अधिक उग्र रूपात दिसत आहे. तो कायमचा नष्ट व्हावा या हेतूने निवडणूकीच्या माध्यमातून भाजपा इतर पक्षातल्या नेत्यांना प्रवेश देत असावा.  

शेवटी निवडणूका रणांगणच आहे. अन् विशेषतः जेव्हा आजच्या प्रमाणे राष्ट्रवादी आणि विदेशी शक्तीशी हात मिळविणारी इंडी आघाडी एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा ते कुरूक्षेत्र दिसू लागते. ' प्रत्येक राष्ट्राचा एक धर्म असतो. तो कोणत्याही धर्मापेक्षा व न्यायापेक्षा श्रेष्ठ असतो. ' प्रत्यक्ष न्यायमूर्तीस लोकमान्यांनी हे सुनवले होते. 

आक्रमक बाबराचे नामोनिशाण उखडून तेथे राष्ट्रपुरूष श्रीरामाचे मंदिर बांधणे हा राष्ट्रधर्म असल्याने न्यायालय व स्वतःहाला सर्वधर्मसमभावी मानणारे पक्ष हे महनीय कार्य रोखू शकले नाहीत.  पंडीत नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, वि पी सिंग, चंद्रशेखर व नरसिंहराव इत्यादी पंतप्रधानांनी वेळकाडूपणा दाखविला. वस्तुतः या माजी पंतप्रधानांनी स्वमताची नशा केली आणि राष्ट्रधर्मास अव्हेरले. 

मातृभूमी स्वर्गापेक्षा प्रिय आहे  हे श्रीरामाचे वचन आहे व त्यानुसार सुवर्णमयी लंकेचाही त्याग ही श्रीरामांची कृती राष्ट्रभक्तीचा पहिला पाठ आहे. पण काॅग्रेस सकट इंडी आघाडीतले पक्ष, इतर प्रांतीय पक्ष आणि लिबरल अभ्यासक मंडळी, व संपादक महाशयांनी हा पाठ गिरवयाचाच नाही असे ठरविलेले दिसते. या संदर्भात अलिकडे सोशल मिडीयावर इंडी आघाडीतल्या घटक पक्षांवर टिका करणारी एक पोस्ट व्हायरल झाली आहे. ती आपल्या समोर ठेवतो आहे.

" Except Bjp no party is fighting for absolute majority. 273 seats are required for majority and Congress is contesting on 230 seats, SP on 37, BSP 37, Lalu 20, Mamata on 42, Uddhav Thackeray on 19. It means no one is contesting to form the government. They are contesting only to ensure that Bjp does not get majority. Please do not waste your votes. This election is for the post of Prime Minister, not providing MPs' funds to anyone's relatives. Must Vote in National Intrest."

 गेल्या पाच वर्षात विदेशातील शक्तीनी उघडपणे मोदी सरकारचा पराभव करण्याचा चंग बांधला आहे, हे ऐकून होतो. पण दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना न्यायालयीन कस्टडीत पाठविल्यानंतर त्यांच्यातला भ्रष्टाचार रूपी भस्मासूराचं दर्शन झाल्यामूळे केजरीवाल विदेशी शक्तीचे एजंट आहेत हा समज पक्का झाला आहे. अशांना फौजदारी कलम लावून जन्मठेपची शिक्षा द्यावयास हवी.

स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या विदेशी शक्ती कार्यरत होत्या त्या आज ही आपल्या देशात सांस्कृतिक राष्ट्रवादाची कल्पना मोडीत काढण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. त्या शक्ती आजही पदोपदी आपली दिशाभूल करीत आहेत. त्यातून त्यांना यश मिळणार नाही हे अनेक ओपिनियन पोल मधून दिसत आहे. याचे कारण -- 

आपल्या देशात देशहीत जपणारे अनेक  इतिहासकार, अनुवंशतज्ञ, संशोधक आणि पुरातत्व खात्यातील अधिकारी, आणि संघ परिवाराच्या संस्था, लिबरल लाॅबीला निष्प्रभ  करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. अशा विद्वान मंडळीच्या ज्ञानातून कष्टातून आणि त्यांच्या साहित्यातून आपल्याला खरा इतिहास काय आहे, हे कळू लागले आहे. 

अशा महनीय व्यक्तींच्या व संस्थाच्या या महान कार्याची महती त्यांच्या साहित्यातून आपण सदैव वाचत राहून जनसामान्यांना पर्यंत पोहचण्याचे कार्य करीत राहण्यानेच आपण त्या महनीय व्यक्ती व संस्थांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केल्यासारखे होईल असे मला वाटते.

                                क्रमशः--

(सोबत भाग- ४ जोडला आहे )          ---------------------------------------------

                  (भाग--४)

श्री अभिजित जोग आपल्या 'असत्यमेव जयते' या ग्रंथात आपल्या वैदिक संस्कृतीची पाळेमूळे संबंधित इतिहासाबद्दल मांडताना म्हणतात,  

" सुप्रसिद्ध विद्वान जेफ्री आर्मस्ट्राँग म्हणतात, Sankrit is so perfect that it is almost  mathamatics. वैदिक संस्कृती पासून लौकीक संस्कृतीची निर्मिती झाली. ऐताहासिक संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की ऋग्वेद ही पहिली साहित्य निर्मिती होय. नंतर भरताचे नाट्यशास्त्र, रामायण, महाभारत सारखी महाकाव्यें निर्माण झाली व ती लोकप्रिय झाली. त्यातूनच सर्वसामान्य लोकमध्ये संस्कृत शिकण्याची इच्छा झाली. मग सर्वसामान्यजन संस्कृतचा वापर सर्रास करू लागले. त्यातूनच शौरसेनी, गांधारी, अर्धमांगधी, कामरूपी या सारख्या प्राकृत भाषांची निर्मिती झाली. या भाषामधून हिन्दी, मराठी, बंगाली सारख्या आधुनिक भाषांची निर्मिती झाली. संस्कृतचा भारतातील इतर दोन भाषा समूह द्रविडीयन व ऑस्ट्रिक (म्हणजे ऑस्टेलिया व आग्नेय आशियायी) भाषांवर प्रभाव पडलेला आहे. दक्षिण भारतातील द्रविडीयन भाषांवरील संस्कृतचा प्रभाव आज ही आपल्याला सतत जाणवतो."

मी दक्षिणेकडील चित्रपट (अर्थातच हिन्दीत डब झालेले) अधुनमधून पाहतो. तसेच त्यांचा फिल्मफेयर अवार्डचा समारंभ पाहतो. तेव्हा विजेता नट- नटी माईकवरून आपआपल्या भाषेतून प्रेक्षका समोर प्रतिक्रीया देताना प्रथम संस्कृत शैलीत नमस्कारम् असे म्हणतात. राजकारणावर चर्चा करणार्या पी गुरू सारख्या इंग्लीश यु ट्युब वर सुत्रधार श्री अय्यर आणि राजकीय अभ्यासक श्री राम गोपालन, श्रीराम शेषाद्री, श्री शेखर अय्यर इत्यादी मंडळी संस्कृत शैलीत नमस्कारम् म्हणत प्रेक्षकांना अभिवादन करतात.

श्री अभिजित जोग, पुढे म्हणतात, "उत्तर आणि दक्षिण भारतातील संस्कृती एकच आहे आणि तिचा पाया वैदिक संस्कृती हाच आहे. दक्षिण भारतातील चोला, पांड्या या सारखी राजघराणी चंद्रवंशी किंवा सूर्यवंशी घराण्याचा वारसा सांगत असतात. याचा अर्थ दक्षिण भारतियांना आपण अखिल भारतीय संस्कृती व सभ्यतेचे घटक असल्याचा अभिमान होता व आज ही आहे. सुप्रसिद्ध इतिहासकार निलकंठ शास्त्री म्हणतात, ' None can miss the significance of the fact that early Tamil Literature, the earliest to which we have access, is already full of words, conceptions and institutions of Sanskritic origin.' देशातील उत्तर - दक्षिण वाद केवळ काल्पनिक आहे." 

" भारतीय संस्कृतीतील तत्वज्ञान विषयक चिंतन पूर्व उत्तर प्रदेश व बिहार या भागात झाले. उपनिषदे, सूत्रे, बौद्ध, जैन या सारखी दर्शने ही इथलीच. तांत्रीक परंपरा बंगालमध्ये विकसीत झाली तर मूर्तीपूजा ही संकल्पना दक्षिण भारतातून आली. विविध वनवासी जमाती मधील निसर्गपूजेच्या परंपरानी वैदिक संस्कृतीचा प्रवाह अधिक चैतन्यशील केला."

" यावरून हे स्पष्ट होते की आजची हिंदू संस्कृती आसेतू हिमाचल देशाच्या कानाकोपर्यातील सर्व भारतियांनी निर्माण केलेली संस्कृती आहे. पूर्व-पश्चीम, दक्षिण-उत्तर,आर्य-अनार्य, गोरे-काळे असल्या कुठल्याही भेदभावाला, वैरभावनेला, अशा संघर्षाला जागाच नाही. संघर्ष कोणी करू पाहात असेल तर तो त्याचा राजकीय स्वार्थ असेल, किंवा तो विदेशी शक्तीचा मांडलिक असू शकतो." दुर्दैवाने आज इंडी आघाडी मधील सार्या पक्षांचा राजकीय एजंडाच जागतिक लिबरल लाॅबीच्या सल्ल्यावरून होतो आहे याचा अनुभव आपण घेत आहोत. म्हणूनच  सलग दोन वेळा लोकसभेच्या निवडणूकात त्यांचा पराभव झाला.  

" आर्याची जेनेटिक ओळख म्हणून मान्य पावलेला हॅप्लोग्रुप M हा भारतातील सर्व उच्च-नीच मानलेल्या गेलेल्या जाती-जमाती मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. विख्यात संशोधक नोहा रोसेनबर्ग आणि संघमित्रा सेनगुप्ता, हार्वड मेडीकल स्कूल, ब्राॅन्ड इन्स्टिट्यूट ऑफ हार्वड ॲन्ड एमआयटी, डेक्कन काॅलेज ऑफ पूणे, तसेच जर्मन, कालिफोर्निया येथील संस्थाचे संशोधन सांगते की हरप्पन लोक व आजचे भारतीय लोक अनुवंशशास्त्रा- नुसार एकच आहेत. मधल्या काळात बाहेरून आलेल्या आक्रमणाचा पुरावा नाही आणि पुरातत्व खात्याच्या अहवालातून काही ही खूणा नाहीत."

आज उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत भारतातील सर्व जाती--जमाती तसेच आदिवासी मध्ये ही हरप्पन डीएनए सर्वाधिक प्रमाणात आढळून येतो. आपण सर्व भारतिय लोक आनुवंशिक दृष्ट्या एकच आहोत. हाच आपल्या सनातन संस्कृतीचा पाया आहे. उत्तर भारतीय उच्च आणि दलित-आदिवासी व दक्षिण भारतीय हे मूलनिवासी हा इंग्रजाळलेल्या दिडशहाणे व लिबरल मंडळींनी केलेला खोटा प्रचार आहे.

ब्रिटीश राजवटीने आर्याचा आक्रमण सिद्धान्त प्रमाणभूत करून दिडशें वर्षे भारतियांची मानसिकता गुलामी स्वरूपाची केली हे सत्य आता सर्वसामान्य मतदारांना ही कळू लागले आहे. म्हणूनच हिंदुत्व, राष्ट्रवाद, हिंदू संस्कृती- परंपरा जपणारा, आणि सर्वसमावेशकतेचं तत्व अवलंबून        'सबका साथ और सबका विकास, ना किसी एक सांप्रदाय पर मेहरबान ' असे म्हणत देशाला आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, सामरिक क्षेत्रात पुढे नेत आहे अशा मोदी सरकारवर सर्वसामान्य मतदार अधिक आकृष्ट होत आहे असे दिसते. थोडक्यात एवढेच म्हणतो,

'जाग उठा है आज देशका वह सोया अभिमान ! '

--------------------------------------------                                        

लोकसभा निवडणूका २०२४ इस बार चारसो पार बनाम हटाव मोदी सरकार (भाग-१ भाग-२)



१८ व्या लोकसभेच्या निवडणूक प्रचाराचा जोर वाढू लागला आहे. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप -प्रत्यारोपांचे क्षेपणास्त्र फेकत आहेत. अनेक आश्वासनांचे फूगे आकाशात उडत आहेत. तसे पाहता या निवडणूकाच्या प्रचाराचं स्वरूप मागील दोन लोकसभाच्या निवडणूकांच्या प्रचाराच्या स्वरूपा सारखंच आहे. असे असले तरी सन २०१४ पासून दहा वर्षे भाजपा आणि विरोधी पक्षांमधील वाद हा जितका सत्तेसाठी आहे तितकाचं तो दोन राजकीय विचारसरणीतला आहे हे ही स्पष्ट दिसत आहे. दोन राजकीय विचारसरणी म्हणजे एका बाजूला राष्ट्रवाद म्हणजेच हिंदुत्व, संघ, भाजपा व मोदी सरकार तर दुसर्या बाजूला काॅग्रेस म्हणजेच समाजवाद, साम्यवाद व सर्वधर्म समभाव. 

एनडीए आणि इंडी आघाडी चे नेते परस्परांवर जी काही चिखलफेक करीत आहेत, त्यावर चर्चा करण्यापेक्षा ज्याला आपण देशातले राजकारण मानतो, त्याचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करीत आपल्याशी संवाद करावा असे मला वाटले, म्हणून या लेख मालिकेचा प्रपंच.

विद्यमान भारतातील राकारणाचं मूळ शोधावयाचं म्हटले तर निदान अर्वाचीन भारताचा इतिहास विशेषतः ब्रिटीश राजवटीचा अंमल सुरू झाला तिथपर्यंत आपल्याला मागे जावे लागेल हे ओघाने आलेच. मला इतिहास विषय आवडतो पण मी इतिहास विषयाचा तज्ञ नाही. म्हणून  इतिहास व पुरातत्व या विषयाचे अभ्यासक व संशोधक, आणि धर्मशास्त्र इत्यादी विषयावरील पुस्तकांचा आधार घेऊन, ही लेखमालिका आकारास आली आहे हे मी  प्रांजळपणे कबूल करतो.

भारत हा जगाच्या पाठीवरील बहुधा एकमेव देश असेल ज्याच्या वैभवशाली इतिहासातील घटनांची नेहमीच मोड-तोड करून मोठ्या प्रमाणात दिशाभूल करून सादर करण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या विदेशी  शक्तींनी वेगवेगळ्या कारणास्तव हे केले असले तरी त्यांचे स्वार्थ एकमेकांचे जुळत असल्यामुळे गेली ३०० वर्षे हून अधिक काळ ही दिशाभूल अविरतपणे सुरू आहे.  

संपुर्ण असत्य आणि काल्पनिक गोष्टी कुठलाही पुरावा नसताना इतिहास म्हणून प्रस्थापित करण्यात आल्या आहेत. तसेच शेकडो पुरावे असलेल्या घटना घडल्याच नाहीत म्हणून बेदरकारपणें नाकारण्यात आल्या आहेत. इतकंच नव्हे तर या खोटेपणा विरूद्ध आवाज उठविणार्यांना आणि खरा इतिहास सांगू पाहणार्याला प्रतिगामी, धर्मांध ठरवून वैचारिक परिघा बाहेर ढकलून देण्यात आले आहे आणि त्याचं प्रतिपादन जगासमोर येणारच नाही अशा रितीने दडपून टाकण्यात आल्या आहेत." 

या सार्या विकृतीच पण आपल्या संस्कृतीचे रक्षण करण्याऐवजी देशी मेकाॅलें पुत्र, साम्यवादी व काही भाजपेतर पक्ष त्या विकृतीचे उदात्तीकरण करण्यात धन्यता मानू लागले. त्याचा फायदा त्यांना मिळत राहिला. पण सन २०१४ च्या लोकसभा निवडणूकांनंतर विरोधी पक्षांच्या राजकीय दुकानातला फायदा कमी होत आहे. म्हणून संविधान धोक्यात, अघोषित आणिबाणी इत्यादी आरोप विरोधी पक्ष करीत आहेत. त्यातून त्यांच्या हाती फारसे काही लागणार नाही. 

यंदाच्या लोकसभेच्या  निवडणूकीचा मुख्य मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा असा असला तरी सन २०१४ पासून प्रखर राष्ट्रवाद व आत्मनिर्भर भारत या कल्पना प्रत्यक्ष अनुभवास येत आहेत हे बहुतांश मतदार आपल्या मतदानातून व्यक्त करीत आहेत.

गेल्या काही वर्षात काही विद्वान, इतिहास तज्ञ, पुरातत्व अभ्यासक- संशोधक, अध्यात्मिक गुरू,  संघ परिवार सारख्या स्वयंसेवी संस्था इत्यादीनीं वैचारिक दडपशाही विरूद्ध हार न मानता भारताचा खरा इतिहास सप्रमाण जगासमोर आणणारं मौलिक कार्य  केले आहे. त्यापैकी एक विद्वान ज्यांचे नाव आहे अभिजित जोग ! त्यांनी लिहलेला  'असत्यमेव जयते ' हा ग्रंथ देशातील तथाकथीत पुरोगामी विचारवंत, सर्वधर्मसमभावी,  साम्यवादी, व समाजवादी इत्यादींनी खचाखच भरलेल्या जागतिक लिबरल लाॅबीच्या वैचारिक आक्रमणाचा सामना करण्यासाठी जितके उपयुक्त आहे तितकेच ते ब्रिटीश राजवटीतून आपल्या समाजाला जडलेल्या मानसिक गुलामीतून बाहेर काढण्यासाठी उपयोगी पडणारं आहे.

देशाच्या आजवरच्या इतिहासा बद्दल करण्यात आलेली दिशाभूल देशासाठी फारच हानिकारक ठरली आहे. कित्येक पिढ्या न्युनगंड आणि पराभूत मनोवृत्तीच्या बळी ठरल्या आहेत. वैदिक काळापासून ते स्वातंत्र्यलढ्यापर्यंतच्या इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर झालेली दिशाभूल अवाढव्य आहे. त्याचे निराकरण करून देशाचा खरा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सांघिक प्रयत्न करण्याची निरंतर गरज आहे. कारण -- 

शेवटची दिशाभूल दूर होईपर्यंत, नव्या दिशाभूलींची भर होत राहणार आहे. कारण जगातील एकेश्वरी पंथाचे म्हणजेच इस्लामी व ख्रिस्ती लोक जिथे राहतात तिथे साम्यवाद्यांचे सरकार असो वा राजेशाहीचे, लष्करशाहीचे असो वा हुकूमशाहीचे असो, किंवा अमेरिका- युरोप येथील लोकशाही सरकार असोत, हिंदू समाजाची मानहानी करण्याची संधी सोडत नाहीत.                                                                    क्रमशः--    (सोबत भाग--२ जोडला आहे.)         ------------------------------------------

भाग-२

श्री अभिजित जोग यांच्या असत्यमेव जयते या ग्रंथाची थोडीफार ओळख मी अलिकडील एका लेखात संक्षिप्त रित्या केली आहे. त्यांनी या ग्रंथात आर्यन इन्व्हेजन थेअरीचा फोलपणा पुर्णपणे पुराव्यासकट उघड केला आहे. त्यातील आर्यन इन्व्हेजन थेअरी थोडक्यात अशी आहे -- 

" आर्य लोक रशियाच्या दक्षिणेकडील प्रदेशातून भारतात आले; नंतर सिंधू नदीच्या काठी राहात असलेल्या अडाणी अशिक्षीत आदिवासीयांचा पराभव केला व त्यांना भारताच्या दक्षिणेकडील प्रदेशात पिटाळून लावले; अशा पिटाळून लावलेल्यांची संस्कृती द्रविडीयन आहे; भारत हा कधीही देश नव्हता; प्राचीन काळात पश्चिमी देशातून (म्हणजेच रशियाच्या दक्षिणेकडून) आलेल्या गोर्या आर्यांनीच तुम्हाला भाषा आणि संस्कृती दिली; आणि आज ही तुम्हांला सभ्यता आणि संस्कृती शिकविण्याचं काम ब्रिटीशानांच करावे लागत आहे;  तुमचा हिंदू धर्म जुनाट, मागासलेला व नैतिक अधःपतनामुळे रसातळाला गेलेला आहे. या सारख्या गोष्टी इतिहास म्हणून लादल्या गेल्या."

" भारताचा इतिहास  हडप्पा संस्कृती, आर्याचे आक्रमण, गौतम बुद्ध, सम्राट अशोक, मुघल साम्राज्य, अकबर बादशाह, इंग्रज, गांधी-नेहरू ' यांच्या पुरताच सिमीत ठेवला गेल्यामुळे हिंदू संस्कृतीची दैदीप्यमान परंपरा पूर्णपणे नाकारली गेली. आपल्या संस्कृतीने गणित, विज्ञान, साहित्य, संगीत, कला, भाषाशास्त्र, स्थापत्य शास्त्र यात गाठलेली शिखरं भाकड कथा म्हणून नाकारली गेली. इंग्रजी शिक्षण पद्धतीतून देशी इंग्रज बनलेल्या आपल्या लोकांनी हा समज जोपासणं हीच आधुनिकता असं मानलं."

ब्रिटीश राजवटीत आपल्या समाजला जे जे काही इंग्रजी दिसले ते ते सारे चांगले असे वाटू लागले. त्यातून इंग्रजी राजवटीला विरोध करण्याची आपली मानसिक शक्ती कमी होत गेली. अशी स्थिती निर्माण करण्यात कारणीभूत असलेला खलनायक ब्रिटीश विचारवंत थाॅमस मेकाॅले आणि त्यांच्या सोबत असलेले जर्मन विचारवंत मॅक्सम्युलर हे ही खलनायक होत. 

भारतात शिक्षण पद्धत कशी ठेवावी या विषयी  ब्रिटीश राज्यकर्त्यामध्ये झालेल्या चर्चेत दि.२ फेब्रुवारी १८३५ रोजी थाॅमस मेकाॅले याने खालील शब्दात आपली योजना मांडली होती.

" We must at present do our best to form a class who may be interpreters between us and millions whom we govern." मेकाॅलेच्या या सूचनाचा आशय हाच की  ' भारतियांना स्वधर्म, स्वसंस्कृती संबंधी न्यूनगंड उभा केला की आपण दिर्घकाळ भारतावर राज्य करू शकतो.'

" ब्रिटीश राजवटीने मेकाॅले योजनेप्रमाणे प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या सनातन संस्कृतीचे नामोनिशाण उध्वस्त केले, गुरूकूले व विद्यापीठ बंद केले. उपयुक्त ग्रंथ जाळले. इंग्रजी शिक्षण पद्धत सुरू केली. भारताचा संपूर्ण इतिहास बदलून नवीन अभ्यासक्रम शाळा-काॅलेजात अशा पद्धतीने शिकविला की आपले विद्यार्थी, युवक, नोकर ,कामगार, पोलीस इत्यादी महत्वाच्या घटकांमध्ये प्रचंड न्यूनगंड निर्माण केला. या शिवाय आर्य विरूद्ध द्रविड, उत्तर भारत विरूद्ध दक्षिण भारत, संस्कृत विरूद्ध तामिळ असे वाद ही निर्माण केले." 

ते वाद अधून मधून आपल्या सोयीनुसार विरोधी पक्ष आज ही उफाळून वर आणतात. त्याचा अनुभव आपण अलिकडे तामिळनाडूचे युवराज उदयनिधी स्टॅलीन यांच्या मुखांतून सनातन धर्मासंबंधीतली जहरी टिका ऐकली  आहे. काश्मीर पासून ते कन्याकुमारी, गुजरात पासून ते थेट ईशान्याच्या टोकापर्यंत एकजिनसी समाज निर्माण करीत ' समर्थ भारत विकसित भारत ' हे ध्येय मोदी सरकार समोर असावे. म्हणूनच पंतप्रधान मोदी 'अबके बार चारसौ पार ' ' बडे बदल और बडे निर्णय के लिए तैयार रहो ' अशी साद मतदारांना घालत असावेत.

" मेकाॅलेच्या या योजनेप्रमाणे निर्माण झालेल्या या मेकाॅलेपुत्रांमध्ये स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा प्रामुख्याने समावेश होता. ते आचार, विचार व शिक्षणाने पूर्णतः मेकाॅलेच्या स्वप्नातले ' देशी इंग्रज ' होते. त्यांच्याभोवती जमलेला राज्यकर्ता वर्ग याच पठडीतला इंग्रजीतून विचार करणारा, भारतीय संस्कृती आणि विशेषतः हिंदू परंपरांबद्दल उपाहासाची व तुच्छतेची भावना बाळगणराच होता. "

' मी शिक्षणाने इंग्रज, संस्कृतीने मुस्लीम, आणि अपघाताने हिंदू आहे.' असे पंडीत जवाहरलाल नेहरू म्हणाल्याचे माझ्या वाचनात आले आहे.  हे सत्य आहे की नाही या संबंधी इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. पण नेहरूवंर इंग्रजांचा मोठा प्रभाव होता हे नाकारता येत नाही. 

                                       क्रमशः-----------------------------------------------


                                    


लोकसभा निवडणूका २०२४ - राजकीय पक्षांच्या दिशा व दशा (भाग -७)

 


राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसची सुत्रें फक्त गांधी-नेहरू घराण्यापाशींच राहणार असे दिसू लागल्यामुळे काँग्रेसच्या काही नेत्यांना सन १९६६ पासून घुसमटल्या सारखे वाटू लागले होते. शेवटी १९६९ साली काॅग्रेसमध्ये उभी फूट पडली. पण १९७१ सालच्या लोकसभा निवडणूकात फूटीर गटाचा पराभव झाला. नंतर इंदिरा गांधीची काॅग्रेस हीच राष्ट्रीय काॅग्रेस मानली गेली. १९७४ पासून इंदिरा गांधीच्या सरकार विरोधात देशभर विद्यार्थ्यांची आंदोलने सुरू झाली. ६९ साली काॅग्रेसचा फूटलेला गट जनता पार्टीत विलीन झाला.  १९७७ झाली स्थापन झालेल्या जनता पार्टी व १९८९ चा जनता दल या दोन पक्षांमधील अधिकांश काॅग्रेस व समाजवादी पक्षांच्या प्रान्तीय नेत्यांनीं आपआपले प्रान्तीय पक्ष स्थापन केले. या सर्व प्रान्तीय पक्षांचे मूळ काँग्रेस असल्यामूळे या सर्व प्रान्तीय पक्षांच्या संस्थापकांची घराणेशाही निर्माण झालेली दिसते. पण नव्याने स्थापन झालेल्या भाजपातील घराणेशाही फक्त निवडणूकीचे तिकीट देण्यापुरता आहे. कुठल्याही एका घराण्याच्या ताब्यात पक्ष कधी जाणार नाही. इथे पक्ष परिवार असतो. परिवाराचा पक्ष नसतो. 

देशात दुर्दैवाने राजकीय पक्ष म्हणजे एका घराण्याची खाजगी मालमत्ता ठरू लागल्याने पक्षाच्या विचारसरणीपेक्षा मालमत्तेतील आपला वाटा/ हिस्सा व गॅल्मर म्हणजे मुख्यमंत्री पदाची झिंग हीच मूळ कारणे आहेत ज्यामूळे प्रान्तीय पक्ष विकंलाग होऊ लागले आहेत. महाराष्ट्रात पवार, ठाकरे यांचे पक्ष खर्या अर्थाने प्रान्तीय पक्ष पण स्वरूप घराणेशाहीचेच. दोन्ही पक्षात अंतर्गत कलह वाढले आणि शेवटी उभी फूट पडली. आज हे दोन पक्ष जात्यात गेले तर इतर पक्ष म्हणजे विशेषतः तृणमूल काँग्रेस डीएमके, तृणमूल काँग्रेस, अकाली दल, वायएसआर, केसीआर, आरजेडी व सपा फूटीच्या वेंटीग लिस्टवर आहेत. एडीएमकेला जयललीतांच्या निधनानंतर आता प्रभावी नेता उरला नाही. म्हणून त्या पक्षातील नेते भाजपाच्या वळचणीला लागलेले दिसतील.

महाराष्ट्रातील शिवसेनेचे तीन पक्ष झाले. याहून अधिक फूट होणार नाही. तसेच वर नमूद केलेल्या सार्या प्रान्तीय पक्षात फूट पडणार असे आपण म्हणत असलो तरी एकेक पक्षाचे तुकडे तरी किती पडणार ? तिथे ही सीमा आहेच. या सर्व प्रान्तीय पक्षाच्या प्रमुखाच्या कुटुंबातील चौथी पिढी राजकारण खेळण्याइतकी सक्षम राहणार नाही. ७००-८०० वर्षापूर्वीची राजेशाही नष्ट पावल्या. तशीच गत आपल्या येथील घराणेशाही पक्ष नष्ट होणार ही काळ्या दगडावर काळाने लिहिलेली पांढरी रेष आहे.

राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसला चांगला नेता मिळत नाही हीच मोठी विद्यमान समस्या आहे. नेहरू-गांधी परिवाराचं वलय वाळून गेले आहे. राहूल गांधी यांच्या शिवाय पर्याय नाही असे म्हणत राहूल यांच्या यात्रेचा जो शो मांडला आहे तो इंडीच्या घटक पक्षांना फारसा आवडलेला दिसत नाही. राहूल गांधीच्या पदयात्रेतून ते भारताचे पंतप्रधान पद भूषवू शकतील असे मूळी जनतेलाच वाटत नाही. तो पर्यंत काँग्रेस पक्षांच्या झोळीत वाढीव मते पडणार नाहीत.

याचा अर्थ असा आहे की आज आपण ज्याला भारतीय काँग्रेस पक्ष म्हणून समजतो त्याची उत्तर प्रदेश मध्ये जी स्थिती झाली आहे तशीच स्थिती उत्तरेतील राजस्थान, मध्यप्रदेश, आणि दक्षिणेतील कर्नाटक, आन्ध्र, व तेलंगणा मध्ये हळूहळू होताना दिसेल. हे भाकीत काँग्रेस समर्थकांना पटणारें नाही. कारण त्यांची भक्ती काँग्रेस पक्षावर नसून काँग्रेस पक्षांच्या श्रेष्ठीरूपी गांधी घराण्यावर आहे. हे स्वाभाविक आहे कारण त्या घराण्यातून तिघांनी पंतप्रधानपद भूषविले आहे हे काँग्रेस समर्थकांना भूषण वाटते. पण देशात घराणेशाही पक्षां- संबंधीत जी आस्था दिसते, तीला नवा युवा मतदार अंधश्रद्धा मानत आहे. त्यावर घराणेशाही पक्ष विचारमंथन कधी करणार?

आज काँग्रेसची स्थिती विकलांग का झाली आहे याचे एक आणखिन कारण आहे. ते म्हणजे काँग्रेसचे सतत समर्थन करणारे विचारवंत काँग्रेसला मार्गदर्शन करण्यासाठी पुढाकार घेताना दिसले नाहीत. त्यांनी फक्त मिडीयात चमकत राहून फक्त चमचेगिरी केली आणि राज्यसभेत खासदारकी उपभोगली. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर उभी फूट पडण्याइतकी काँग्रेसकडे शक्तीच राहिली नाही. वय वाढले की जसे शरीर हळू हळू गलितगात्र होत जाते आणि माणसाला नैसर्गिक मृत्यू येतो, तसाच काँग्रेसचा अंत होईल असे दिसते. असे व्हावयास नको आहे पण आपण तरी काय करणार हो?

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षांची स्थिती कुठल्यातरी राष्ट्रीय महामार्गावर एखादा ड्रायवर स्वतःहाच्या बेफिकीरपणा मुळे, वा मद्यपान केल्यामुळे, वा इतर गांड्यांना मागे ठेवण्याच्य्या जबरदस्त खुमखुमीतून ओव्हरटेक करण्याच्या नादात गाडीचा स्पीड वाढवीत जातो आणि शेवटी ब्रेकवर नियंत्रण न राहिल्याने गाडी उलटून भीषण अपघातात ड्रायवरचे शरीर विकलांग होते ' तशी झाली आहे.'

दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यात भाजपाने इतकी जोरदार मुसंडी मारली आहे की डीएमकेचे सर्वेसर्वा स्टॅलीन यांना घाम आलेला दिसतो आहे. सनातन धर्मावर नको तितकी जहरी भाषा त्यांचे पूत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी केल्यामूळे तामिळनाडूत पंतप्रधान मोदींच्या रोड शो मध्ये तुफान गर्दी झालेली आपण पाहिली.  या अगोदर अन्नामलईने आपल्या पदयात्रेने व सहज, सरल भाषेत आणि  सुंदर शैलीत तामिळी असल्याचा अभिमान व्यक्त करीत हिंदू जीवन पद्धत हाच तामिळनाडूच्या विकासाचा राजमार्ग आहे हे संन्यस्त वृत्तीने पटवून दिले. हे कार्य निश्चीतच एकविसाव्या शतकातील भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरले जाईल आहे.

या खेपेस लालू यादवांनी ' मोदींना परिवार आहे कुठे ? ' असे वादग्रस्त विधान करून भाजपावर उदयनिधी स्टॅलीनच्या पाठोपाठ दुसरा पूलटाॅस टाकला आहे. त्यावर भाजपाच्या प्रत्येक नेत्याने षटकार ठोकला आहे. उदयनिधी स्टॅलिनच्या पूलटाॅसवर देशभरातून मतदार जय श्रीराम म्हणत षटकार ठोकत आहेत. अनेकदा राहूल गांधींच्या अतार्कीक विधानाने भाजपाचा फायदा होत आला. आज ही होत आहे. याही निवडणूकात शक्ती देवता वर काही तरी बोलले आणि शेवटी गेला याॅर्कर टाकायला आणि पडला पूलटाॅस असे झाले. या खेपेस लालू यादव आणि उदयनिधी स्टॅलीन च्या विधानांमूळे भाजपाच्या फायद्यात भर होईल असे दिसते. उदयनिधी स्टॅलीन याने सनातन धर्मावर टिका केल्यानंतर मला एक प्रश्न पडला आहे. तो म्हणजे जे पक्ष भाजपाचा टोकाचा द्वेष करीत आहेत अशा घराणेशाही पक्षांचे वारस स्वपक्षासाठी ओझे (Liabality) का बनते? यावर राजकारणात तरी काही उपाय नाही. असलाच तर तो फक्त मानसशास्त्रज्ञाकडेच.

या संपुर्ण लेखमालिकेत काही भागाचा विस्तार वाढला आहे. हे मी प्रांजळपणें कबूल करतो. तसेच लेखांत भाजपा सोडून इतर पक्षांत कलह, फूट, पक्षांतर व गटबाजी इत्यादी समस्यांची लागण कमी अधिक प्रमाणात झालेली मी मांडली आहे. भाजपात कुरबुरी नाहीच असे मी मानत नाही. पण सद्यस्थितीत भाजपात फूट पडण्याची लक्षणें मला तरी दिसत नाहीत.

मी भाजपाचा समर्थक आहे हे मी मान्य केलेलं आहेच. पण काही मिडीया हाॅऊसेस तसेच प्रिन्ट मिडीयात इतर पक्षांतल्या कुरबुरीचे व फूटीचे खापर भाजपावर फोडले जाते त्यावर मला उत्तरें द्यावयास वाटली. ती मी इथे व्यक्त केली आहेत. ती आपल्यापैकी काहींना उचीत वाटतील तर काहीना अनुचीत वाटतील. त्यातच लोकशाही राज्यप्रणालीची सुंदरता आहे. शेवटी आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आपल्याला सामान्य मतदार म्हणून आपले विचार मांडता येतात यातूनच आपली लोकशाही शाबूत आहे आणि मजबूतही आहे हे सिद्ध होते. मग विरोधी पक्ष कितीही टिका करो त्याचा फायदा त्यांना मिळेल असे मला वाटत नाही. उलट भाजपाच्या फायद्यात वाढ होण्याची शक्यता दिसते.

          वन्दे मातरम् |

लोकसभा निवडणूका २०२४ - राजकीय पक्षांची दिशा व दशा (भाग ६)

 


आता आपण  दक्षिण भारतातील कर्नाटक, आन्ध्र व तेलंगणा या राज्याच्या राजकीय पक्षांच्या दिशा व दशावर चर्चा करू या. कर्नाटक मध्ये मुख्यमंत्री सिद्धरमिया यांचा एक गट व दुसरा डी शिवकुमार यांचा एक गट आहे. येथे ही गांधी घराणे नामधारी आहे. आज ना उद्या या पैकी एक गट प्रान्तीय पक्ष स्थापन करेल. या राज्यात काँग्रेस विधानसभेत विजयी झाली याचे कारण काॅग्रेस श्रेष्ठींनी तिथे उमेदवार निवडण्याचे हक्क तेथील लोकल बाॅडीला दिले होते. दुसरे असे आहे की कर्नाटक हे राज्य राजस्थान व मध्यप्रदेश प्रमाणे काँग्रेस व भाजपा या दोन पक्षातच लढाई होत असते. कर्नाटकात भाजपा सत्तेवर होता. त्याच्या विरूद्ध प्रचार करणे काँग्रेसला सोपे गेले. असे असले तरी भाजपाच्या मताची टक्केवारीत घट झाली नाही. तिथे देवेगौडांच्या पक्षाला मिळणारी मतें काँग्रेसला गेली. म्हणून काँग्रेस विजयी झाली. आता देवेगौडाच्या पक्षाने भाजपाशी युती केली आहे. विधानसभेच्या निवडणूकातला भाजपाला जो व्होट शेअर मिळाला तो लोकसभेच्या निवडणूकीत मिळेलच सोबत मोदींच्या करिश्माची मतें ही मिळतील. देवेगौडा पक्षाची मते भाजपाशी युती केली असल्यामुळे ती मतें काँग्रेसला जाणार नाहीत. म्हणून भाजपाला इथे अपेक्षित यश मिळेल असे वाटते.

आन्ध्र प्रदेशात अस्तीत्वात असलेले दोन्ही पक्ष एक प्रकारे प्रान्तीय पक्ष आहेत. एक टीडीपी व दुसरा वायसीआर काँग्रेस (जगन रेड्डीचा) म्हणजे मूळ काँग्रेसचाच. उत्तर प्रदेशात जेव्हा सतत सपा व बसपाला आलटून पालटून सत्ता मिळत गेली तशीच स्थिती काही काळ आन्ध्र प्रदेशात राहील असे दिसते. दुसरे महत्वाचे कारण असे आहे की जगन रेड्डीच्या सरकार विरूद्ध जनतेत प्रचंड असंतोष आहे. तसेच जगन रेड्डीच्या ख्रिस्ती धर्माचरणातून आन्ध्र प्रदेश मधील हिंदु समाजात असंतोष दिसतो आहे. तो आपण पदरात का घ्यावा असा विचार भाजपाने केला असावा. म्हणून जगन रेड्डीच्या पक्षासोबत भाजपाने युती केली नसावी. आज ना उद्या या राज्यात ही भाजपा आपला जम बसविण्यात तयारीत असावा. असे असले तरी संसदेत महत्वाच्या बिलांना जगन रेड्डीं सरकारने, मोदी सरकारच्या बाजूने मतदान केलेलं आहे. म्हणून भाजपाचे श्रेष्ठी आन्ध्र मधील राजकारणात सध्यातरी आक्रमक बनण्याचे टाळत असावेत. पण मूळ कारण हे की आन्ध्र प्रदेशातील शहरात व ग्रामीण भागात बूथ पातळीवर कार्यकर्ते तयार करण्याच्या कामात भाजपा कडून ढिलाई झालेली दिसते हे जमिनीवरील सत्य आहे.  तेलगू दसम हा प्रान्तीय पक्ष आन्ध्र प्रदेशात अजुनही शक्तीशाली आहे. म्हणून भाजपाच्या श्रेष्ठींनी टिडीपी शी युती केली आहे.


तेलंगणात काँग्रेस सत्ताधारी असली तरी पुढील विधासभेच्या निवडणूका येतील तेव्हा काँग्रेसला ॲन्टी इन्कबंन्सी फेस करावी लागेल. त्याची बीजे भाजपाचे सध्याचे विधायक पेरतील. तेलगंणात विधानसभाच्या निवडणूकात केसीआरचा पराभव झाला आहे. लोकसभा निवडणूकात मोदी सरकारच्या कार्यावर मतें द्यावीत अशी येथील मतदारांची एक मानसिकता राज्यात झालेली आहे, असे ऐकीवात आहे. विधानसभेच्या पुढील निवडणूका येण्याअगोदर तेलंगणात भाजपा आपले बस्तान भक्कम करेल असे वाटते. भाजपाने ज्या प्रकारे ईशान्य भारत, पश्चीम बंगाल, कर्नाटकात, आपले वर्चस्व निर्माण करू लागला आहे त्यावरून आन्ध्र, तामिळनाडू आणि केरळ मध्ये भाजपाच्या मताची टक्केवारी वाढलेली दिसेल.

                                      क्रमशः--

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...