गुरुवार, ३ मार्च, २०२२

पंजाब निवडणूक (भाग ४) भाजपा आघाडीची मजल



भाजपाला या निवडणूकीत गमाविण्यासारखे काही नाही. तरी भाजपाने आपल्या आघाडीतील घटक पक्षांपेक्षा अधिक जागेवर उमेदवार ठेवले होते. या बद्दल आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. तसेच केंद्रातील सत्ताधारी पक्ष आहे. त्याचे उद्दीष्ट भारतातल्या प्रत्येक प्रांतात अस्तित्व निर्माण करावयाचे आहे.  पंजाब लोग काॅग्रेस हा कॅप्टन अरमिंदरसिंगचा पक्ष आहे. काॅग्रेसने त्यांच्याकडून मुख्यमंत्रीपद काढून घेतले. या घटनेतून प्लस आणि मायनस असे दोन फॅक्टर निर्माण झाले आहेत. सत्तेवर असताना जी काही लोकांची नाराजी होती ती त्यांच्या सोबत अर्धी आलेली असावी. उरलेली अर्धी काॅग्रेस सोबत गेली आहे असे गृहीत धरू या. अशा वेळी कॅप्टन अरमिंदरसिंग सोबत भाजपा गेली आहे असा संदेश जाऊ नये, म्हणून कॅप्टन अरमिंदरसिंग भाजपा सोबत गेले असे समजले जात आहे. तसे पाहता कॅप्टनचे वय झाले आहे. अशा वेळी राजकारणात फक्त राज्यपाल पद मिळू शकते हे ते जाणून आहेत. भाजपा आघाडीतील जागा वाटपाचे स्वरूप असे आहे -  भाजपा =६५ , पंजाब लोग काॅग्रेस =३५  शिरोमणी अकाली दल संयुक्त =१३.

शिरोमणी अकाली दल संयुक्त हा पक्ष तीन छोट्या पक्षांचे एकत्रीकरण आहे. शिरोमणी अकाली दल (लोकशाही) या पक्षाची स्थापना २०२० साली झाली. तर अकाली दल तक्सली हा पक्ष २०१८ साली स्थापन झाला. आणखिन एक पक्ष त्याचे नाव पंजाब लोकहीत पक्ष ज्याचे संस्थापक मलकियतसिंग बिर्मी आहेत. यांच्या सोबत ३५ ओबीसी नेते आहेत असे म्हटले जाते. संयुक्त अकाली दलाचे संस्थापक सुखदेवसिंग धिंडसा आहेत. तर अकाली दल (तक्सली) चे संस्थापकाचे नाव आहे रणजीतसिंग ब्रह्मपुत्रा आहेत. या सर्वाच्या आघाडीचे नाव शिरोमणी अकाली दल संयुक्त असे आहे. या आघाडीतील नेत्यांची नावे हरसुखिंदर बब्बी-बादल, मनमोहनसिंग गुलशन हे सल्लागार , देसराज धुग्गा एससी नेता, हरजीत कौर तलवानी या महिला प्रमूख आहेत. या सर्वांची थोडीफार हक्काची मतें असू शकतात. त्याचा भाजपाला ही फायदा होऊ शकतो.

पंजाब लोग काॅग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री कॅप्टन अरमिंदरसिंग हे महाराजा घराण्यातले आहेत. ते काॅग्रेसचे वजनदार नेते होते. काॅग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाची सदस्य नोंदणी सुरू केली. त्यांनी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली होती. किसान आंदोलनात ज्यांचा मृत्यु झाला अशांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रूपये मदत दिली. तसेच सरकारी नोकरीचे आश्वासन दिले आहे. केंद्रीय कृषी मंत्री तोमरशी दोन वेळा भेट घेऊन एमएसपी ची हमी घेतली होती. इत्यादी माहिती त्यांनी ललन टाॅप चॅनेल्सला दिलेल्या मुलाखतीतली आहे. त्यांच्या पक्षाच्या वाटेला जागा कमी का आल्या या प्रश्नावर त्यांनी उत्तर असे दिले की ज्या जागेवर माझ्या पक्षाचे उमेदवार निवडून येतील तितक्याच जागा लढविणार हे जाहीर केले. कुठल्याही परिस्थितीत काॅग्रेसला सत्ता मिळता कामा नये म्हणूनच ३५ जागा लढवून जिंकायच्याच असा निर्धार त्यांनी व्यक्त केलेला आहे. या जागी काॅग्रेसचेच आमदार निवडून आलेले होते. यातील अर्ध्या जागा जिंकल्या तरी त्यांची बेरीज १७ होते. शिरोमणी अकाली दल (संयुक्त) या घटक पक्षांना प्रत्येकी एक सीट जिकली तरी ३ होतात. 

आता मुख्य घटक पक्ष भाजपाकडे वळू या. भाजपाने प्रथमच पंजाबमध्ये ६५ जागावर उमेदवार उभे केले आहेत. प्रश्न असा आहे की भाजपाने इतक्या जागा लढविण्याचे धाडस का केले असावे ? या प्रश्नाचे उत्तर हे आहे की सन १९८४ सालच्या दिल्लीत शिख बांधवांचे जे हत्याकांड झाले होते त्याची विशेष तपास पथकाद्वारें चौकशी करण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. भाजपाच्या विद्यमान केंद्र सरकारने आतापर्यंत केलेल्या घोषणा हवेत विरू दिल्या नाहीत असे जनसामान्यांचे मत झाले आहे. म्हणून तर पंतप्रधान मोदींची लोकप्रियता वाढती आहे. मोदींची लोकप्रियता, केंद्र सरकारचे सुशासन या जमेच्या बाजू आहेत. खलिस्तान चळवळ जी थोड्याफार प्रमाणात वाढलेली दिसते त्यावरून सार्या शीख बांधवांचा  त्या चळवळीला पाठींबा आहे असे समण्याचे काही कारण नाही.  तसेच सारेच शीख बांधव अकाली दलाचे समर्थक नसतात. असे असते तर काॅग्रेस पंजाब मध्ये अनेक वर्षे  सत्तेवर राहिलीच नसती. देशभर काॅग्रेसला पर्याय भाजपा ठरला आहे, तसाच तो पंजाब मध्ये होऊ शकतो. अशाच वेळी संघाच्या सेवा विभागाच्या कार्याचा भाजपाला फायदा होत असतो. पंजाबातही संघाचे कार्य चांगले आहे. त्यातही संघ-भाजपा शीखांच्या पराक्रमाचे मनापासून कौतूक करीत आलेले आहेत. शीखांना ही याची जाणीव आहे. पंजाबात काॅग्रेस मजबूत का राहिली याचे कारण भाषावार प्रांताच्या रचनेत आहे, ज्याबद्दल मी अगोदर वर उल्लेख  केला आहे. पण तसा फायदा काॅग्रेसला विद्यमान पंजाब काॅग्रेसमधील टोकाचा वाद पाहता  मिळणार नाही.  

जिथे आणि जेव्हा काॅग्रेस दुबळी बनत गेली तिथे भाजपा आपला जनाधार वाढवित आला आहे. कॅप्टन अरमिंदरसिंग हे पंजाबमधील एक मोठे प्रस्थ आहे. त्यांनी काॅग्रेस सोडली नाही तर त्यांची काॅग्रेसने बेइज्जती केली आहे. त्यामूळे त्यांना सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींच्या प्रचार सभेचं आयोजन, त्यांच्या भाषणातील मुद्दे, अलिकडे त्यांनी आपल्या निवासस्थानी  शीखांना दिलेले आंमत्रण आणि शीख नेत्यांशी झालेली बैठक, इत्यादीचा भाजपाला फायदा होईल. उत्तर प्रदेशातून विशेषतः पश्चीम उत्तर प्रदेशातून जिथे फाळणीच्या वेळी पाकिस्तान मधून आलेल्या निर्वासितांना वसविले आहे, त्यात पंजाबी सुद्धा आहेत. उत्तर प्रदेशातील  लोकांचा भाजपाला मिळणारा प्रतिसाद पंजाबी जनतेने टिवी तसेच यु ट्युब वरून पाहिला असेलच. त्याचा ही फायदा भाजपाला होऊ शकतो. पंजाबात पंतप्रधान मोदींच्या दोर्याच्या वेळी चन्नी सरकारने केलेले राजकारण सुजाण पंजाबी लोकांना आवडले असे आपण कसे मानू शकतो ? हे प्रकरण काॅग्रेसला जड जाऊ शकते. कारण शीखांना ही पंतप्रधान मोदी बद्दल सहानुभूती निर्माण झालेली असावी.

भाजपाने ड्रग्ज माफीयांचा खात्मा करण्याचे आश्वासन दिले आहे या बद्दल पंजाबी पालकांना आशेचा किरण दिसू लागला असावा. त्या शिवाय गरीब जनतेसाठी मोदी सरकारने राबविलेल्या अनेक योजनांतून मिळालेला दिलासा मतपेटीतून सन २०१९ व्यक्त होऊ लागला आहे. त्यामूळे भाजपा या निवडणूकात नगण्य आहे असे मानणे चूकीचे होऊ शकते.

इतर पक्षातून भाजपाकडे इनकमिंग पंजाबातही झाली आहे.  दोन आमदार, एक खासदार , माजी किक्रेटपटू  दिनेश मोगिंया ने भाजपात प्रवेश केलेला आहे. काॅग्रेसचे फतेहसिंग बाजवा, बलविंदरसिंग लाडी, अकाली दलाचे गुरतेजसिंग घुडियाना,जगदीपसिंग इत्यादी नेत्यांचा भाजपात प्रवेश केला आहे. इतर पक्षांचे छोटे-मोठे कार्यकर्त्यांचे तसेच नवीन कार्यकर्त्यांचा भरणा भाजपात झाला आहे. ह्या सर्व जमेच्या बाजू आहेत. भाजपाकडे गमाविण्यासारखे काहीच नाही. जो फायदा आप ला होत आहे असे न्यूज चॅनेल्स ठोसपणे दाखवित आहेत तसाच फायदा भाजपाला होणार नाही असे थोडंच आहे? केजरीवालांपेक्षा मोदी लोकप्रिय आहेत. भाजपा अकाली दलाचा जुना मित्र पक्ष. केंद्र सरकारात भाजपाने अकाली दलाला सामावून घेतलेलं होतं. तीन कृषी बिला संदर्भात केंद्र सरकारची मतभेद झाले म्हणून अकाल दल केंद्र सरकार मधून बाहेर पडला. या व्यतिरिक्त तीन तलाक, काश्मीर मधील कलम ३७० हटविण्याच्या निर्णयात हा पक्ष भाजपा सोबत होता. मोदी सरकारने कृषी बिलं रद्द केली आहेत. त्यामूळे भाजाला फक्त हिंदुचींच मते मिळतील असे काही नाही. अकाली दलाला बादल घराणेशाहीचे स्वरूप आल्यामूळे मतदारांच्या नाराजीचे फळे या निवडणूकीत भाजपाला भोगावी लागणार नाहीत. त्यामूळे भाजपाला दोन आकडी संख्या गाठता येईल असे दिसते. काही छोटी चॅनेल्स, पंजाबात भाजपाची सत्ता येणार असे अतिरंजीत चित्र रंगवित आहेत पण  तसेच चित्र काही चॅनेल्स काॅग्रेसबाबत उत्तर प्रदेशात रंगवित आहेत. या दोन्ही अंदाजा विषयी मतप्रदर्शन करावयास सांगितले तर मी इतकेच म्हणू शकतो की काॅग्रेस उत्तर प्रदेशात दोन आकडी संख्या गाठू शकली तरी ती जेमेतेम. पण भाजपाची पंजाबातील दोन आकडी संख्या कदाचित अनेकांना धक्का बसेल इतकी असू शकते.

1 टिप्पणी:

  1. विष्णुजी,
    दोनही लेख फारच छान !
    अकाली दलाचा पुर्वेतिहास आणी त्याची सद्य स्थिती यावर छान प्रकाश टाकलाय.
    तिथल्या जनमताचा इथुन फारसा अंदाज येत नसला तरी निकालाच आपण केलेल भाकीत, आशादायक वाटल तरी तर्काधिष्टीत आहे.
    कोणत्याही परीस्थितीत, वेगवेगळ्या चाचण्यांच्या पाहणी(?) नुसार दर्शवल्याप्रमाणे पंजाब आपच्या ताब्यांत जाऊ नये अस वाटत, मोदींसाठी, विशेषतः देशासाठी ते घातक ठरेल
    धन्यवाद व नमस्कार.

    उत्तर द्याहटवा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...