गुरुवार, ३ मार्च, २०२२

पंजाब निवडणूक (भाग ३) अकाली दलाची घसरण की वाढ ?


पंजाबमधील निवडणूकीत प्रथमच पंचकोनी लढत होत आहे. पुर्वीपासून अकाल दल आणि काॅग्रेस या दोन पक्षातच लढत होत आलेली आहे. याचे कारण काय आहे यावर प्रथम चर्चा करावयास हवी. आपल्या देशातले सर्वात जूने पक्ष काॅग्रेस आणि अकाली दल हेच आहेत.  काॅग्रेसच्या खालोखाल नंबरचा म्हणजे दुसर्या नंबरचा  हा जूना पक्ष.  भारताच्या इतर प्रदेशात निवडणूक लढवत नसल्यामूळे तो बहुतांश धार्मिक अस्मिता जागवतो असा समज झाला आहे, यात तथ्य आहे.


शीख धर्माची स्थापना आणि प्रसार या संबधीची माहिती मी मागील लेखात दिलेली आहे. शीखांचे मोंगल राजवटीशी हाड वैर होते. मोंगलांनी सार्या भारतवासियांचा छळ केला. अनेक अत्याचार केले. शीखांना तर ते पाण्यात बघत असत. त्यामूळे शांतताप्रिय शीखांनी सहावे गुरू हर गोविंदच्या नेतृत्वाखाली धर्माचे रक्षण करण्यासाठी हत्यार हातात घेण्याचे ठरविले. त्यातून अकाल तख्त स्थापन झाले.  अकाल तख्त हे शीखांचे धार्मिक, तसेच सांसरिक न्याय निवाडचे सर्वोच्च स्थान बनले. या संस्थेच्या कारभारची सुत्रे जथ्थेदारांकडे असते.  मोगल राजवटीतले बादशाह सलीम जंहागिराच्या काळात शीखाचे पाचवे गुरू अर्जून देवाने गुरूग्रंथसाहिबचे लिखाण सुरूवात केले आणि तेव्हाच अमृतसर येथे सुवर्णमंदिर उभे केले. जंहागिरचा एक मुलगा खुसरोंने  पित्याविरूद्ध बंड केले, त्यावेळी गुरू अर्जून देव यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. म्हणून जहांगिरने त्यांची हत्या केली.  जहागिंरच्या काळातच शीख आणि मोंगल मध्ये शत्रुत्व वाढले. म्हणून नंतरचे गुरू हर देव यांनी शीखांना राजकीय लढतीसाठी हत्यार घ्यावयास लावले आणि अमृतसरच्या मंदिरात  शिरीन पुजा सुरू केली. अकाल याचा अर्थ जो काळाचा पराभव करू शकतो तो परमेश्वर. शिखांनी हत्यार हाती घेतले ते आत्मरक्षणासाठीच. औरंगजेंबच्या काळात शीख आणि मोंगलातील वैराचे स्वरूप द्वेषात झाले. धार्मिक शांतीने न्याय मिळणार नाही असे दहावे गुरू गोविंदसिंगानी स्पष्ट केले आणि शीखांना लढव्वये बनणे आवश्यक आहे असा संदेश दिला. त्यांनी खालसा पंथ स्थापन केला ज्यात त्यांनी सर्व शीखांच्या पुरूषांनी आपल्या नावाला सिंग हे नाव जोडावे आणि सर्वासाठी एक समान वेशभूषा पद्धत सुरू केली. त्यात केस, कंगवा, कच्छ ( सदरा ) आणि कमरेला कृपण हे हत्यार बाळगण्याचा आदेश दिला. शीखांची  लढवय्ये अशी ओळख झाली. 

भारतात ब्रिटीशांची सत्ता स्थिर झाली तेव्हा  बदलत्या भारतात व्यापार तसेच उद्योग धंदा करण्याकडे शीखांचा कल वळलेला दिसतो. ब्रिटीश राजवटीत सन १९२० साली (१४ जूलै) गुरूद्वाराचे व्यवस्थापन करण्यासाठी पंजाबमध्ये ( अर्थातच अखंड भारतातील शीखांची ) एक सभा आयोजित झाली. त्यात गुरूद्वारा प्रब॔ध समिती निर्माण झाली. तेच अकाली तख्त. याच वेळी राजकीय इच्छा आकांक्षा पुर्ण करण्यासाठी  सरदार सरमूख च्या नेतृत्वाखाली शिरोमणी अकाली दल हा राजकीय पक्ष निर्माण झाला.

पहील्या महायुद्धा नंतर ब्रिटनची आर्थिक स्थिती डळमळीत झाली होती. म्हणून त्यांना भारतातील सत्ता टिकविणे जरूरीचे होते. लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वामूळे काॅग्रेसवर जहाल मतवाद्यांची पकड होती. पण लोकमान्य टिळकांच्या निधना नंतर काॅग्रेस पक्ष नरम पडत गेला. ब्रिटीशांनी फोडा आणि झोडा ही नीती अवलंबवली. त्यातून मुस्लीम लीग हा राजकीय पक्ष निर्माण झाला होताच. ब्रिटीश सरकारने त्यांना प्रांतीय स्तरावर प्रतिनिधीत्व देण्यास सुरूवात केली. तशाच प्रकारची लालसा शीखांमध्ये निर्माण झाली. तो पर्यंत २४ जूनला १८८५ ला रावळपिंडीत जन्मलेला मास्टर तारासिंग विसाव्या शतकातील एक प्रबळ धार्मिक आणि राजकीय नेता  उदयास आला होता. त्यांनी ब्रिटीश सरकार कडून मुस्लीम समाजा सारखे स्वतंत्र प्रतिनिधीत्व मिळावे अशी मागणी केली. धूर्त ब्रिटिश सरकारने ती मान्य केली. मास्टर तारासिंगानी बॅरिस्टर महमंद जीनांशी जवळीक वाढविली होती. तसेच काॅग्रेसशी सूत बांधले. तेव्हा पासून पंजाब मध्यें अकाली दलाचा आतंकपुर्ण प्रभाव पडू लागला. नंतर सन १९३७ ते १९४७ पर्यंत अकाली दलाने प्रान्तीय विधी मंडळाच्या निवडणूका ही लढविल्या.

स्वातंत्र्या नंतर सरदार उज्वलसिंग मजीठियाने शीखांना लष्करात प्रतिनिधीत्व मिळाविण्याचे प्रयत्न सुरू केले. ते यशस्वी झाले. पुढे स्वतंत्र भारत देशात भाषावर प्रान्त निर्माण करताना शिखांनी गुरूमूखी  भाषा असलेल्या प्रांताची मागणी केली. त्यामूळे पंजाब हे स्वतंत्र राज्य आणि  हिंदी भाषिक हरियाणा एक स्वतंत्र राज्य स्थापन झाले. पण पंजाबात हिंदुची संख्या कमी राहिली. हरियाणा नावाचा हिंदी भाषिक राज्य निर्माण झाल्यामूळेच चंदिगड ही पंजाबची राजधीनी शहर  म्हणून आपणास  मिळावे अशी अकाली दलाची  मागणी काॅग्रेस सरकारने मान्य केली. अशा स्थितीत ही पंजाबातील हिंदूना काॅग्रेस शिवाय पर्याय उरला नव्हता. त्यामूळे भाजपाला पंजाब मध्ये शिरकाव करता आला नाही. काॅग्रेसला दलीतांचा पाठींबा मिळतच होता शिवाय स्वातंत्र्य पूर्व काळात जे शीख बांधव काॅग्रेस मध्ये होते त्यातील बहतांश नेते सत्तेसाठी काॅग्रेस मध्येच राहिले.  त्यामूळे आजतागायत अकाल दल आणि काॅग्रेस हेच  दोन पक्ष पंजाबात मजबूत  म्हणून आपण पाहात आलो आहोत. 

अकाली दलाला पहीले यश सन १९६९ साली मिळाले.  गुरूनामसिंग पंजाबचे मुख्यमंत्री झाले.  १९७८ सालच्या निवडणूकीच्या वेळी केंद्रातील सत्ताधारी जनता पक्षाचे सहकार्य घेत अकाली दलाचे प्रमूख  प्रकाशसिंग बादल मुख्यमंत्री झाले. तब्बल १९ वर्ष ते मुख्यमंत्री राहिले होते. आज नव्वदी पार केलेले प्रकाशसिंग बादल ही निवडणूक लढवित आहेत. त्यांचे पुत्र सुखबिरसिंग अकाली दलाचे अध्यक्ष तसेच माजी मुख्यमंत्री आहेत.  लोकसभेत अकाली दलाला सहा वेळा घवघवीत यश मिळाले तर सहा वेळा किरकोळ यश मिळाले आहे.

आज पंजाब विधान सभेत  त्याच अकाली दलाच्या आमदारांची संख्या १५ आहे तर आप चे संख्या- बळ २० आहे. आता तर शिरोमणी अकाली दलात फूट पडलेली आहे. अकाली दल अमृतसर( संस्थापक सिम्रांतसिंग )   शिरोमणी, अकाली दल (लोकशाही वादी) शिरोमणी अकाली दल ( तक्साली) .यातील लोकशाहीवादी आणि तक्साली गटाचा मिळून एक नवीन शिरोमणी अकाली दल (संयुक्त) असा पक्ष बनला आहे तो भाजपा सोबत आहे. आणखिन एक किसान मोर्चा म्हणून नवा  पक्ष निवडणूकीच्या रणागंणात आहे. त्या पक्षाला कुठल्या पक्षाने उभा केला आहे हे कळत नाही. परंतु भाजपा किंवा काॅग्रेसने हे काम केलं असेल असा अंदाज काढला जात असला तरी विदेशी पैशाची ताकद घेत, स्वतंत्र खलिस्तानच्या पंतप्रधानाचे स्वप्न पाहणार्या केजरीवालाचे हे काम असू शकते. हा नवीन पक्ष पंजाबमधील निकालावर फारसा परिणाम घडवू शकत नसला तरी दोन गोष्टी स्पष्ट दिसतात. एक ही आहे की हा पक्ष अकाली दल, काॅग्रेस आणि आप ची मतें खाऊ शकतो. भाजपाचे अस्तित्व शहरी भागात असल्यामूळे भाजपाची मतें खाऊ शकणार नाही.

अकाली दल कृषी बिलाच्या विरोधातून मोदी सरकार मधून बाहेर पडला असल्यामूळे ग्रामीण भागातील शेतकर्यांची मतें अकाली दलाला  मिळाली असतील. कारण ग्रामीण भागात या पक्षांचे संघटन चांगले आहे. तसेच काॅग्रेस सरकारच्या अनागोंदीचा फायदा मिळू शकतो. शिवाय बडे शेतकरी विशेषतः जाट शेतकरी या पक्षाशी नाळ बांधून असल्यामूळे या पक्षाची आणखिन घसरण होणार नाही. उलट कदाचित वाढ होऊ शकेल. परंतु हा पक्ष बादल घराण्याची प्रायव्हेट लिमीटेड राजकीय कंपनी झाली आहे हे मतदारांना पंसत पडले नसावे. त्यामूळे या पक्षाला वाढणार्या मताच्या टक्केवारीला ब्रेक लागू शकतो. या पक्षाने बसपाशी युती केली आहे. दलित वर्गाची लोकसंख्या ३० टक्के पर्यंत असली तरी बसपाला तीन टक्क्यापेक्षा अधिक मतें कधीच मिळाली नाहीत. याचे कारण या समाजात एकूण ३९ पोट जाती आहेत. 

अकाली दलाचे मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार माजी मुख्यमंत्री सुखदेवसिंग बादल आहेत. काॅग्रेस (गांधी घराणे) तसेच अकाली (बादल घराणे) या दोन्ही पक्षांनी पंजाबी लोकांचा भ्रमनिरास केला असल्यामूळे आम आदमी पक्षाला पहिल्याच चाचणीत सन २०१७ च्या निवडणूकीत २० जागा मिळाल्या होत्या. अर्थात यामध्यें शहरी विभागातील हिंदु मतांचा किती टक्का  आणि अकाली दलाच्या समर्थकांचा किती टक्के वाटा होता याबाबतचा खास आकडा उपलब्ध नाही. असे असले तरी शहरी भागात पंतप्रधान मोदींच्या सभामूळे भाजपाची हवा निर्माण झाल्याचे ऐकू येत आहे. त्यामूळेच केजरीवालांना एका प्रचार सभेत ' हिंदूचे रक्षण करण्यासाठी आम आदमी पक्षाला निवडून आणण्याची गरज आहे ' असे म्हणण्याची पाळी आली. नौटंकी करणार्या विरोधी पक्षांचे असे हे हिंदुत्व. याचा अर्थ आम आदमी पार्टी कडे जाणारी हिंदूंची मते भाजपा उचलणार हे स्पष्ट झाले आहे.  मतांचे धृवीकरण झाले तर अकाली दलाला शीखांची मतें अधिक मिळालेली असतील. पण शीखांची काही मतें कॅप्टन अरमिंदरसिंगाचा पक्षाला मिळाली असतील. शीखांच्या मतांची विभागणी झाली तर आम आदमी, आणि काॅग्रेसला फटका बसू शकतो. मात्र अकाली दलाला खोलवर फटका बसेल असे काही कारण दिसत नाही. कारण अकाली दल काही incubamant पक्ष नाही.  त्यातही मागील निवडणूकीत अकाली दलाला जो फटका बसला होता तो मोठाच होता. याहून पंजाबात अकाली दलाची अधिक घट संभवत नाही. उलट वाढ झालेली दिसू शकेल. कारण  काॅग्रेस सरकारचा तमाशा पाहून नाराज शीख अकाली दलाकडे वळाले असावेत. 

मोदींच्या प्रचार सभेमूळे अकाली दल आणि काॅग्रेसची मतें भाजपा खाईल असे म्हटले जाते. पण ते अर्ध सत्य आहे. अकाली दलाचे प्राबल्य ग्रामीण भागात अधिक आहे. भाजापाचे पंजाबच्या ग्रामीण भागात संघटन नाही. मग भाजपा अकाली दलाची मते कसे खाणार? भाजपाला हिंदुची मतें मिळतील ती ही शहरी भागातील असे मानले जाते. तसेच शहरी भागातील हिंदुची मते जी काॅग्रेसला जात होती ती आप पेक्षा भाजपाकडे गेलेली दिसतील. त्यामूळे आम आदमी पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून उभारेल असे ठासून भाकीत मांडणार्यांच्या पदरी निराशा येऊ शकेल असे मला वाटते.

(कृपया भाजपा आघाडीची पंजाबातील मजल यासाठी भाग ४ पाहा.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...