शनिवार, १२ मार्च, २०२२

उत्तर प्रदेशमधील भाजपाच्या यशाचे गमक


मागे १ फेब्रुवारीला  ' सर्वोच्च न्यायलयाचा मविआ सरकारला तडाखा ' या शिर्षकाच्या लेखाच्या शेवटी  सन २०२४ च्या लोकसभेच्या निवडणूकीत राजकीय पक्षांच्या संभाव्य ताकदी संबंधीचा अंदाज व्यक्त केला आहे. त्या लेखात होऊ घातलेल्या उत्तर प्रदेशाच्या विधानसभेच्या निवडणूकात भाजपा सत्ता राखू शकेल असा ओझरता अंदाज मांडला आहे. तो अंदाज खरा ठरला. पंजाब मध्ये भाजपा दोन आकडी संख्या गाठेल असे वाटले होते पण अकाली दल आणि काॅग्रेसला पंजाबी जनतेने अक्षरशः झिडकारून सन २०१७ च्या निवडणूकीत  आप पक्षाच्या रूपाने गवसलेल्या नव्या ऑप्शनला एक तर्फी मतें दिली. असे असले तरी इतर विरोधी पक्ष आणि किसानाच्या पक्षाला मतें न मिळता आप पक्षाला चमकदार यश मिळाले याचे क्रेडीट आप चे कार्यकर्ते आणि नेत्यांना जातेच. इतर चार राज्यात भाजपाने सत्ता राखली. आजचा मतदार चतुर झाला आहे. त्यामूळे सत्ता राखणे हे कठीण काम असते.  भाजपाने चार ही राज्यात आपली सत्ता राखली हे कौतुकास्पद आहे. त्यापैकी 
आज आपण उत्तर प्रदेश मधील निकालावर चर्चा करू या. 


देशातील सर्वात मोठं राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. केंद्रातील सत्तेचा मार्ग या राज्यातून जातो असे म्हटले जाते, ते खरें आहे. उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रचार तसेच मतदारांचा कल कसा होता, आणि निकाला संबंधीत ओपिनियन पोल इत्यादी गोष्टी आपण  विविध न्युज चॅनेल्स वरून पाहिले असणार. आधुनिक विज्ञानाच्या अत्याधुनिक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील अभूतपूर्व क्रान्तीमूळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रासंबंधीची तसेच तिथे चालू असलेल्या घडामोडीची माहिती आपल्याला सहजगत्या मिळत असते. असे असले तरी विज्ञानाचा उपयोग समंजसपणे न केला तर विज्ञान हे वरदान ठरण्याऐवजी शाप बनते. याचे प्रत्यतंर आपल्याला पदोपदी येते. अफगणिस्तानातली घटना, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धातून आपल्याला कसले दर्शन होत आहे ? उत्तर आहे.' अविश्वास आणि अशांतता व त्यातून पुढे संहार ! '  याचे मूळ कारण म्हणजे मानव जातीत असलेला सत्तेचा आणि ऐहिक समृध्दीचा हव्यास. त्याचेच नाव आहे राजकारण. म्हणजेच माणूसकीला लागलेले ग्रहण. राजेशाही असो, वा लष्करशाही, एक पक्षीय राजवट असो वा लोकशाही, सर्वच राज्यपद्धतीत असे ग्रहण लागल्याच्या घटना झाल्या आहेत, होत आहेत आणि होत राहतील असेच दिसते. त्यातल्या त्यात लोकशाही ही बरी .

आपल्या धर्मशास्त्राने मानवी समाजाच्या उच्चतम अवस्थेची नुसती कल्पना केली आहे असे नव्हे तर त्याचे बुद्धिगम्य चित्र मांडले आहे, ते असे आहे --
न राज्यं न च राजा ऽ ऽ सीत् न दण्डयो न च दाण्डिका |
धर्मेणेव प्रजाः सर्वा रक्षन्ति स्म परस्परम् ||
[ शासनयंत्रणा नाही, शासक नाही; कोणी अपराधी नाही, शिक्षा करणारा कोणी नाही. धर्मानेच सर्व लोक परस्परांचे रक्षण करतील ] अशा प्रकारची समाजव्यवस्था आपल्या देशात काही भागात सत्युगात असावी. पण या कलीयुगात अशी कल्पना मांडणे हेच मुर्खपणाचे ठरेल.

शालेय जीवनात एकदा आमच्या गावाच्या हमरस्त्यावरून तत्कालीन मुख्यमंत्री यंशवंतराव चव्हाण जाणार असे कळले.  तेव्हा त्यांना पाहण्याची उत्सुकता लागली होती. आम्ही विद्यार्थी मित्र उत्सुकतेपोटी हमरस्त्यावर गेलो होतो. काही वेळातच मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या मोटारींचा तो ताफा प्रत्यक्षात पाहायला मिळाला. पण मुख्यमंत्री कुठल्या मोटारीत होते ते काही कळले नाही. तरी सुद्धा तो लवाजामा पाहून आनंद वाटला. नंतर सन १९६२ साली आपल्या देशावर चीनने आक्रमण केले. तेव्हा पंतप्रधान  पंडीत जवाहरलाल नेहरूनीं यशवंतराव चव्हाणांना देशाचे संरक्षण मंत्री केले. त्यावेळी ' हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला ' असे वर्णन कानीं पडू लागले. ते ऐकून छाती गर्वाने फुलून गेली होती.

राजकारण म्हणजे देशभक्ती. राजकीय नेते म्हणजे थोर पुरूष हे शालेय जीवनात बालमनावर बिंबवले होते. म्हणून कॅलेन्डर वरील त्यांच्या प्रतिमा पाहणे, पंचक्रोशीतल्या जत्रांतून देव-देवतांच्या तसेच थोर पुरूषांच्या प्रतिमा विकत घेणे, त्यावरून पाटीवर खडूने त्यांची चित्रे काढणे असा छंदच लागला. इतिहास विषयाची आवड वाढली. माध्यमिक शाळेत गेल्यानंतर  ही राजकारणातले फारसे कळत नव्हते.  महाविद्यालयीन दशेत राजकारण कळू लागले. इ स १९७५ ला तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधीनी स्वतःची सत्ता टिकावी म्हणून देशात आणिबाणी लादली. तेव्हापासून सत्तेचे राजकारण कसे असते हे समजले. त्यामूळेच की काय राजकीय घटनांवर लेख लिहीण्याची बुद्धी झाली असे वाटते. ती सुबुद्धी की दुर्बुद्धी हे कळत नाही पण लिहू लागलो हे खरे.

उत्तर प्रदेशातील निवडणूकीचा निकाल बहुतांशी लोकांच्या अपेक्षे प्रमाणे लागला आहे. सपाची कामगिरी अर्थात निवडणूकीतील कामगिरी उंचावली आहे हे ही मान्य करावयास हवे. सपाचा विजय झाला असता तर भारतभर फटाके वाजले असते. महाराष्ट्रातले डाऊद गँगचे समर्थक बेहोष होऊन नाचले असते. मराठी मिडीयाने मोदी सरकारचा राजीनामा मागायला सुरूवात केली असती. पण शेवटी दुःख कोण्या एकाच्या  वाटेला येणार होतेच, ते भाजपा विरोधकांकडे यावे ही नियतीची इच्छा होती असे मानू या. म्हणून हार-जीत वर चर्चा करण्याचे सोडून  युपी मध्ये मतदान कसे झाले, याबाबत मी जे काही चॅनेल्सवरून ऐकले आहे पाहिले आहे, ते आपल्याशी शेअर करतो.

उत्तर प्रदेशातील पश्चीम विभागात जाट आणि शेतकर्यांची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून किसान आंदोलनाच्या पाश्वर्भूमीवर या वेळेच्या निवडणूकात उत्तर प्रदेशच्या पश्चीम विभागात समाजवादी पार्टी चे गठबंधन भाजपाला धोबी पछाड करेल असे म्हटले गेले होते. परंतु राजकीय अभ्यासिका आणि पत्रकार श्रीमती सबा नकवीनी मतदान सुरू होण्याअगोदर एका चॅनेलवरून म्हटले होते की, ' हवा सपा गठबंधनकी  है, लेकीन  ग्राऊंड रियालिटी भिन्न है | '  विशेष म्हणजे या श्रीमती सबा नकवी टाईम्स नाऊ चॅनेलवर हमखास असायच्या. त्या भाजपा समर्थक नाहीत. डाव्या विचारसरणीच्या पत्रकार आहेत. दिल्लीतल्या ल्युटिन्स मंडळाच्या सभासद. पण भाजपाच्या इतिहासावर Different Shades of Saffron 
( From Vajpayee to Modi) असे पुस्तक ही लिहले आहे.  गुगल्सवर या  पुस्तकांवर वाचकांच्या दोन प्रतिक्रीया आहेत. त्या प्रथम आपल्या समोर मांडतो. त्यातील एकाने लिहले आहे ------
' They ( म्हणजे ल्युटीन्स मंडळी ) are living in virtual world. Their main and only work is to do propoganda and run fake narrative in media.This book is part of that propoganda and waste of money. 
दुसरी प्रतिक्रीया अशी आहे--
I am a Muslim and hence i am supposed to like the book. But i can't ignore the book is really really baised and clearly spreading hatred against Hindus ' 

या दोन प्रतिक्रीया वाचल्या नंतर आपल्याला सहजपणे लक्षात येईल की धार्मिक धृवीकरण कोण करते आहे. बहुतांश ओपिनियन पोल संस्थांनी ' भाजपा पुन्हा उत्तर प्रदेशमध्यें सत्तेवर येईल ' असे का सांगितले होते याचे उत्तर  वरील प्रतिक्रीयातून  मिळते. जर केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशमधून जातो हे नॅरॅटिव मानले तर भाजपाने उत्तर प्रदेशमध्ये सलग दुसर्यांदा बाजी मारली असल्याने  देशातील राजकारणाची दिशा ही बदलेल हे नॅरेटिव सुद्धा मान्य करावे लागते. या संबंधी सविस्तर चर्चा आपण पुढे स्वतंत्र रित्या करू या. या क्षणाला देशाच्या राजकारणाची दिशा कशी बदलणार आहे, या संबंधीची थोडी झलक खाली देत आहे.

" नरेंद्र मोदी गुजरातचे तीन वेळा मुख्यमंत्री झाले. गुजरातचा विकास केला. गुजरात माॅडेल चा गवगवा झाला आणि ते पंतप्रधान झाले. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेश ही आपली कर्मभूमी मानली. हर प्रकारचे साहाय्य त्यांनी मुख्यमंत्री योगींना केले. पुढील पाच वर्षात उत्तर प्रदेश सर्वात विकसित राज्य म्हणून उदयास आणण्याचे मोदींनी स्वप्न पाहिले आहे. म्हणून शेवटी त्यांनी  युपीमधील प्रचाराची जबाबदारी आपल्या खांध्यावर घेतली. प्रत्यक्ष प्रचारातच डबल ईंजिनाच्या गाडीचे दर्शन मतदारांना घडविले. मग मतदार त्यांना पाठ दाखवून माघारी कसे परतणार? त्यांनी मोदी-योगी सोबत जाण्याचे ठरविले होतेच. तेच निकालातून स्पष्ट झाले. यापुढे देशभर  ' उत्तर प्रदेश विकास माॅडेल ' चा गवगवा सुरू राहील आणि भाजपा संपुर्ण भारत पादाक्रान्त करण्याच्या वाटेवर जाताना दिसेल." वाचक हो, हे मी म्हणत नाही. श्री श्री अय्यर यांचे  P Guruv नावाच्या चॅनल्सवर राजकीय अभ्यासक JVC Shriram यांनी म्हटले आहे.

पश्चीम उत्तर प्रदेशात जाट शेतकर्याची वस्ती अधिक आहे.  गेल्या शताब्दीच्या सत्तर- ऐशींच्या दशकात जाट किसान नेते चौधरी चरणसिंगचा दबदबा होता. त्यांचे पुत्र चौधरी अजितसिंगने राष्ट्रीय लोक दल स्थापन केला पण त्यांच्या पिताश्री इतका दबदबा निर्माण करू शकले नाहीत. खुद्द अजितसिंग आणि त्यांचे पुत्र जयंत चौधरी लोकसभेची निवडणूकीत हरले होते. जयंत चौधरीच्या पक्षाला ८ जागा मिळाल्या, त्या केवळ सपाशी आघाडी केली म्हणून. याचा अर्थ पक्षांच्या आघाडीचा फायदा होतो. शेती आणि शेतकर्यांच्या राजकीय भूमिके संबंधीत एक सार्वत्रिक सत्य किंवा अनुभव म्हणा असा आहे, की शेतकरी म्हणून शेतकरी नेता शोभू शकतो पण तुम्ही भल्या मोठ्या शेतकर्यांचे पुत्र असाल पण विदेशात जाऊन शिक्षण घेतले आणि शेतात न जाता थेट देशाच्या राजकारणात शेतकर्यांचे नेते म्हणून मिरवत असाल तर त्यात यश मिळण्याचे दिवस आता संपले आहेत. आपल्या महाराष्ट्रात राजकीय नेत्यांनी   सत्तेचा गैरवापर करीत आपल्या  मुला-मुलींच्या नावाने अनेक एकर सकस जमिनी मालकीच्या करून घेतल्या आहेत. तिथे शेती न करता नाॅन टॅक्सेबल शेती उत्पन्न दाखवीत आहेत. अशा नेत्यांनी शेतकर्यांचे कैवारी म्हणून बिल्ला लावण्याचे नाटकं आता थांबावीत. काही नेत्यांची बेनामी संपत्ती जप्त झाली आहे. ही तर सुरूवात आहे. सन २०२२ आणि २०२३ ही दोन वर्षे अनेक बेनामी संपत्तीवर केंद्र सरकारचा कब्जा होईल असे दिसत आहे.

खंडप्राय अशा आपल्या देशाच्या पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदीं विराजमान झाल्याने  सामान्य माणूस ही सुखावला आहे. उत्तर प्रदेशातही मुख्यमंत्री पदावर सामान्य जनांतील योगी आदित्यनाथ बसल्यामूळे, भाजपा बद्दल सर्व जाती-जमाती आणि सर्व धर्मातील गोर-गरीबजन सुखावले आहेत. प्रत्यक्ष देश आणि युपीचा  कारभार सामान्य कुंटूबातील व्यक्ती करत आहेत आणि तेही अतिशय परिश्रम,   प्रामाणिकपणे करून परिणामकारक होत असल्याचे दिसले आहे. म्हणून राजकारणातील परसेप्शन बदलत आहे. याचे प्रत्यंतर मणिपूर सारख्या ईशान्य भारतातील छोट्या राज्यात भाजपाकडे एका जागा साठी सहा-सात इच्छूक होते, यावरून दिसून आले आहेच आणि तेथील निकालाने शिक्कामोर्तब केले आहे.  

सपाने रालोदशी हात मिळवणी करण्यात यश मिळविलेले होते याचे ही कौतुक आहे. असे असले तरी सपाचा M and Y शी (मुस्लीम-यादव) सलगी पाहून जाट समाज किती प्रमाणात जमवून घेतील अशी शंका काही निवडक राजकीय अभ्यासकांनी व्यक्त केली होती. मला ती शंका अनाठायी वाटली नाही. याचे कारण  विभिन्न चॅनेल्सचे पत्रकार थेट चौका-चौकात मतदारांशी वार्तालाप करतात ते मी पाहिले आहे. The news चॅनेलच्या पत्रकाराने एका चौकात  ' जाटोंने नगाडा बजाकर अखिलेश को धोया ' अशा हेडींगच्या विडीओत अनेक युवक भला मोठा नगारा आळीपाळीने (खंड न पडता) वाजवत पत्रकाराच्या प्रश्नांना आत्मविश्वासाने उत्तरे देत होते. सपा-बसपा सरकार पेक्षा योगीचे सरकार कसे  चांगले आहे हे उदाहरण आणि आकडेवारी मांडून देत होते. पत्रकारांचा ना बाॅऊन्सर चालला ना गुगली चालली. आणखिन एका विडीओमध्ये तर जाट युवक रागांनी उत्तर देत असलेले पाहिले आहेत. एकाने तर चक्क म्हटले की,
' दिल्लीतील शेतकर्याचे आंदोलन बड्या शेतकर्यांचे होते. आमचे नव्हते व आमच्या साठी नव्हते. असे सांगत आम्ही आमच्या शेतात रोज जातो. नौटंकी करायला आमच्याकडे वेळ नसतो. आम्ही भाजपालाच मत देणार ! ' शेवटी जय श्रीरामाच्या घोषणा ही दिल्या. 

आश्चर्याची गोष्ट म्हणजे  'आपका अखबार ' चॅनेल्सचे अत्यंत सोज्वळ असे अभ्यासू संपादक  श्री प्रदीप कुमार यांनी पाचव्या चरणाचे मतदान होण्याच्या एक दिवस अगोदरच उत्तर प्रदेश मध्ये सपाला मोठा पराभव का चाखावा लागेल यासंबंधीची कारणें देऊन विडीओ प्रसारीत केला आहे. तर जेवीसी श्रीराम यांनी ही जाती-जमातीच्या मतांची टक्केवारी देऊन भाजपा मोठ्या फरकाने जिंकेल असे म्हटले होते. ॲक्सीसच्या प्रदीप गुप्ताने तर २७५ ते ३२६ जागेवर भाजपा विजय मिळवील असे ठाम पणे मांडले आहे. हा अंदाज सांगताना प्रदीप गुप्तानी एक वाक्य जोडले आहे की भाजपाने २७४ जागा जिंकल्या तरी मी माझा पराभव मानेन.' इतक्या आत्मविशावासाने ओपिनियन पोल सांगितले असेल तर युपी मध्ये भाजपा सरकार चे कार्य प्रदीप गुप्तांनी प्रत्यक्ष पाहिले असावे. उत्तर प्रदेश हा सर्वात मोठा प्रदेश आहे. म्हणून प्रत्येक विभागात मतदान कसे झाले आहे या संबधीची चर्चा करणे इथे अशक्य आहे. म्हणून उत्तर प्रदेशातील मतदानासंबंधी ओवरऑल मी जे काही ऐकले आहे, ते आपल्या समोर ठेवतो आहे. त्यातूनच सपा का हरली आणि भाजपा का जिंकली हे कळू शकेल.

१) सपा आणि बसपा अशी झुंज असती तर सपा किंवा बसपा जिंकते. बसपा विरूद्ध बीजेपी अशी लढत असती तरी ही भाजपाच जिंकली असती. यावेळी  भाजपा विरूद्ध सपा-आघाडी अशी बायपोलर लढत होती, तरी भाजपाच जिंकणार होती. कारण २०१७ साली भाजपा  मोठ्या संख्येने निवडून आली होती. सपा बसपाची तीस वर्षाची ॲन्टीइनकंबन्सी असताना भाजपा सत्तेवर बसल्यामूळे पाच वर्षाच्या सत्ता काळात भाजपाच्या समोर ॲन्टी इन्कंबन्सीचा अडथळा किती प्रमाणात होणार हो ! पण भाजपाने असा विचार करून आराम केला नाही. ॲन्टी इन्कंबन्सी थोपवयाचे प्रयत्न नियमित असले पाहीजेत. असा सल्ला पंतप्रधान भाजपाशासीत मुख्यमंत्र्यांना देत असतात. सरकारच्या लोककल्याण योजना लोकांपर्यंत पोहचत आहेत ना, इतर विकासाच्या कामाची गती कशी आहे, त्यासाठी भाजपाचे श्रेष्ठी नियमित आपल्या राज्यातील सरकारच्या कामगिरीची प्रगती पाहात असतात. गरज भासल्यास केंद्रीय स्तरावरील नेतेमंडळी सहाय्य करावयास जातात. उत्तराखंडात नीटसे काम न झाल्यामूळे दोन मुख्यमंत्री बदलले, कॅबीनेट मध्ये बदल केला, आणि तिथे राज्य सरकाराच्या सहाय्यसाठी केंद्रातून टीम गेली होती.  पोलरायझेशनचा आरोप करणार्या वृत्तपत्रें, मिडीयांनी प्रथम विरोधी पक्षांच्या नेतेमंडळीस भाजपाची काम करण्याची पद्धत दाखवावी. याबाबत फक्त शेखर गुप्ता भाजपाचे संघटन आणि कार्यपद्धती बद्दल प्रशंसा करताना दिसतात.

२) भाजपाची कोर मतें म्हणजे ७५ टक्के ब्राह्मण, ७०टक्के ठाकूर, ६० ते ६५ टक्के कुर्मी, ६८ टक्के ओबीसी, २० टक्के यादव, ८ टक्के मुस्लीम, ६० ते ६५ टक्के जाट या मतात घट होणार नव्हती. त्या संबंधी उलट सुलट बातम्या पेरल्या जात होत्या.

३) सपाची हवा डावे विचारवंत आणि भाजपा विरोधी मिडीयांनी फुगवून दाखविली जात असावी किंवा  ठिकठिकाणच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची रोजची गर्दी पाहून हवा भासली असावी. आपली सत्ता आलीच आहे आता फक्त अखिलेशभैयाचा शपथविली बाकी राहिला आहे असे म्हणत अनेक कार्यकर्तेच नेते बनले असावेत. एकाद्या पक्षाची हवा असण्याने दुसर्या प्रमुख पक्षाचा पराभव होत नसतो. असे असते तर शिवसेना महाराष्ट्रात सर्वात अधिक काळ सत्तेवर असती.

४) सपाची आघाडी ही आवळा-भोपळ्याची मोट होती. भाजपातून तसेच काॅग्रेसमधून आलेले नेते स्वतःच्या ज्ञातीवर प्रभाव टाकू शकणारे नव्हते. त्यातही भाजपने आपल्या बंडखोरा समोर त्यांच्याच जातीतले उमदे उमेदवार उभे केले होते. त्यामूळे सपा वासी झालेले भाजपाचे नेते आपआपल्या  मतदारसंघातच अडकले. त्यामूळे इतर मतदार संघात प्रचार करू शकले नाहीत.

५)  गठबंधनात अखिलेश यादव शिवाय  प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी नेते नव्हते आणि उद्याही नसतील.

६) मुस्लीम- यादव कार्यकर्त्यांची फळीचे स्वरूप एक टोळी सारखी वाटली. आक्रमकता तसेच रक्तात भिनलेला दशहतवाद, प्रचार मोहिमेत तसेच मतदानाच्या दिवशी मतदारांनी अनुभवला. याचा परीणाम  विशेषतः शोषित वर्गाने भाजपाला मतें देण्याच्या ठाम निर्णय केला होता, त्यात बदल केला नाही.

७) काही मुस्लीम मतदारांगना योगी सरकारचे कार्य आवडले होते पण जबरदस्ती मुळे त्यांना सपाच्या रॅलीत उतरावे लागले. अशांनी भाजपाला मतें दिली असावीत.

८) मुख्यमंत्री योगीच्या विरोधात खालच्या पातळीवर जाऊन सपाने जी टिका केली आहे ती मतदारांना पंसत पडली नाही. खुद्द अखिलेशच्या पत्नी  डिंपल यादव यांनी योगींची उडवलेली टर भोवणार होती. अनेक महिलांनी डिंपल यादवाचा खरपूस समाचार घेतल्याचे चॅनेल्सवरून दिसले होते.

९) बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना वाराणसीत आणल्याने फायदा होईल हा सपावाल्यांचा भ्रम होता. त्यांना वाराणसी पुरताच सिमीत केले ते बरे झाले. नाहीतर सपा च्या वाढणार्या जागा ही कमी झाल्या असत्या. कारण ममता बॅनर्जींवर सुद्धा युपीतील महिंला हातवारे करीत आपला राग व्यक्त करीत होत्या.

१०) काही ठिकाणी सकाळीच मुस्लीम मतदारांच्या मोठ्या रांगा पाहिल्या गेल्या.  दुपारी जात-पात विसरून मतदान केंद्रावर प्रचंड रांगा दिसू लागल्याने  हे पोलराझेशनच चित्र असावे, असे उपहासत्मक वर्णन आजतकचे संपादक प्रसून बाजपेयींनी शेवट्या चरणाचे मतदान संपल्यानंतर केलेले मी पाहिले आणि ऐकले. वस्तुतः काही दलीत वर्ग सपाच्या दरारामूळे सकाळी मतदानासाठी उतरले नाहीत. हे सत्य मुख्य मिडीयांनी दाखविलेच नाही. आजतक तसेच काही  चॅनेल्सनी सपाची हार होणार असे कळल्यामुळे असे चित्र दाखवून नेहमी प्रमाणे किंवा सवयीमूळे पोलरायझेनचे खापर भाजपावर फोडण्यासाठी सोयीचे जावे हा हेतू साध्य केला असावा. यात विरोधी पक्षांचेच नुकसान होणार हे एनडीटिवी आणि आजतक वाल्यांना कळणार कधी? धार्मिक पालरायझेशनचे बीज देशाच्या फाळणीतूनच उगवलेले आहे. काॅग्रेसचा पुर्ण इतिहास माहिती असणार्या एका राजकीय अभ्यासकाने ( मला आता नाव आठवत नाही )  म्हटले आहे की, काॅग्रेसने राष्ट्रीय विचारसरणीच्या मुस्लीम नेत्यांना दूर करून कम्युनियल मुस्लीम पुढार्यांना काॅग्रेसमध्ये मोठे स्यान दिल्यामूळे काॅग्रसला आहोटी लागली आहे. आणि तोच नकली सर्वधर्मसमभावाचा खेळ काॅग्रेस मधून फुटलेल्या नेत्यांनी (स्वतःहाचे नाव लावून प्रातीय पक्ष निर्माण करून) सुरू ठेवलेला आहे. जात-पात धर्म असा भेदभाव न करता केंद्र आणि योगी सरकारच्या योजना राबविण्यात आल्यामूळे भाजपा पुन्हा सत्तेवर आली आहे.

११) विनाकारण निर्माण केलेले हिजाब प्रकरण, नमाज पडताना लाॅऊड स्पीकरचा आवाज आणि वेळ वाढविल्या प्रकारणी न्यायालयाचा आलेला आदेश,  हिंदु देवस्थानाचा कारभार अल्पसंख्याकाडे देणे, देवस्थानाच्या पैशाचा विनियोग अल्मसंख्याकासाठी करू लागणे इत्यादी कारणांमूळे ही पोलराइझेशन होत आलेले आहे. यासंबंधी भाजपा वर ठपका ठेवण्याऐवजी विरोधी पक्षांनी तसेच त्यांच्या समर्थक मिडीयांनी आत्मपरिक्षण करावयास हवे. पण कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडेच राहते ना !

१२) प्रजासत्तिक दिनी लाल किल्ल्यावर किसान आंदोलकांनी घातलेला धुडगूस विरोधी पक्षांना भोवतो आहे.

१३) सपा गठबंधनांच्या कार्यकर्त्यांची मतदारांना घरातून बाहेर येण्यासाठी केलेली दमदाटी भोवली.

१४) मुख्यमंत्री योगी सरकारच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेत झालेला मोठा बदल तसेच शोचालय , घरे वाटपातून  सर्व जातीय व धर्मीय महिलांचा योगीजींना मतांद्वारे मिळणारा आशिर्वाद मदतगार ठरला.

१५) सोळा तास शेतकर्यांना मिळणारी वीज.

१६) कोरोना साथीशी योगी सरकारने दिलेली लढत तसेच रूग्णाना आर्थिक आणि औषधोपचाराची आणि भोजनाची तत्परतेने केलेली मदत. यात तत्परता महत्वाची ठरली आहे. यासंबंधी जेवीसी श्रीराम या राजकीय अभ्यासकांनी निवडणूक प्रचाराचा आढावा घेतानाच मांडलेले स्पष्टीकरण आपल्यासमोर ठेवतो. जेवीसी श्रीराम म्हणतात,
" तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमध्ये कोरोना रूग्णांची संख्या समान होती पण तामिळनाडूमध्ये  कोरोना अधिक काळ घर करून बसला होता. पण योगी सरकारने एका महिन्याच्या अवधीत कोरोनाशी लढाई जिंकली. म्हणून मतदारांनी योगी सरकारला मतें  दिली. "

१७) भाजपाने निवडणूका घोषित होण्याच्या एक वर्ष  अगोदरच रणनीती आणि पर्सेप्शन बाबत तयारी केली होती. सपा पक्षाने जाहिरनामा घोषीत केल्यानंतर प्रचार सभेत रोज काहितरी नवीन योजनेची भर टाकत गेली. मतदारांसमोर स्पष्टपणे मतें मागण्यातली उणीव नडली. नवीन मतदारांना पक्षाचा गबाळेपणा किंवा थातूर-मातूर गोष्टी सांगणे पसंत पडेनासे झाले आहे. 

१८) योगी सरकारतर्फे गरीब जनतेला मिळत असलेले रेशन, डायरेक्ट खात्यात जमा होणारे पैसे. त्यातही कोरोना रूग्णाला दोन वेळेचं रेशन दिले गेले हे कार्य मतदारांना फारच भावले.

१९) योगी सरकारने केलेले नवीन रस्ते, केंद्र सरकार तर्फे केलेले हायवेज तसेच इतर विकासाचे  प्रकल्प.

काही ठिकाणी मुस्लीम महिलांकडून ही मोदीजी आणि योगीजी संबंधी गौरवास्पद उद्गार ऐकावयास मिळाले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थे बद्दल भाजपा सरकार ची प्रशंसा उत्तर प्रदेशमध्यें सर्वत्र ऐकावयास मिळाली. महिलांनी तर याच विषयावर भाजपाला मतें दिल्याचे सांगितले होते. याचा अर्थ अखिलेश यादवांच्या कारकिर्दीत गुंडा-गर्दीचा झालेला त्रास तेथील माता-भगिनी  विसरलेल्या नाहीत. रामायण आणि महाभारत केवळ सीता आणि द्रौपदीवर झालेल्या अन्यायामूळे घडले. याचे स्मरण  विरोधी पक्षांना, आणि त्यांच्या समर्थक मिडीया आणि विचारवंताना कसे होणार? कारण त्यांच्या मेंदूत मोंगल व ब्रिटीश राजवटीचा अभिमान खचाखच भरलेला आहे ना !

अखिलेश यादवांच्या पाठीशी युवक असल्याचे ही दिसले. पण त्यात यादव -मुस्लीमांचाच भरणा होता.  बेकारी आणि महागाई संबंधी लोकात नाराजी दिसली आहे. पण ती नाराजी यादवांच्या मुखातून अधिक ऐकावयास मिळाली आहे. काही युवकांनी बेकारी आणि महागाई बद्दल नाराजी व्यक्त करून ही म्हटले आहे की, ' तीस वर्षाहून अधिक काळ सपा आणि बसपा ला सत्ता दिली होती त्यांनी का उद्योगधंदे आणले नाहीत. भाजपाचे सरकार प्रामाणिक दिसत आहे मग त्यांना पाच वर्षासाठी सत्ता पुन्हा का देऊ नये. ' असा प्रश्नच युवकांनी पत्रकारांच्या पुढ्यात ठेवतांना चॅनेल्स वरून दिसले होते.

भाजपा सोडून जे मंत्री आणि आमदार सपाला मिळाले त्यांच्या बद्दल मतदारांत प्रचंड राग ही दिसला. त्यांना अद्दल घडवयाची असा चंग मतदारांनी चक्क बोलून दाखविला होता. यासंबंधीत एक सत्य उठून दिसले, ते म्हणजे भाजपाचे नेते इतर पक्षात गेल्यामूळे भाजपाची फारशी शक्ती कमी होताना दिसत नाही. कारण भाजपात त्यांची उणीव भरून काढण्याची क्षमता असते. याचा अनुभव युपी मध्ये आणि गोव्यात ही दिसला. दुसरे कारण असे की भाजपातील एखादा नेता विरोधी पक्षात गेला की मिडीया भाजपाला खिंडार, भाजपाला धक्का अशी हेडलाईन बनवून बातमी देतात. त्यामूळे विरोधी पक्षांच्या नेत्यांत आणि कार्यकर्त्यांत बेफिकीरता आणि अहंकार वाढतो. पुष्कळदा विरोधी पक्षांचे कार्यकर्तेच नेता म्हणून मिरवित असतात. अशांना राजकीय परिभाषेत पोषाखी कार्यकर्ते अशी संज्ञा आहे. 

कुठल्याही राज्याची निवडणूक घोषित झाली की मिडीया लागलीच ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे असे मांडत असते. पण त्यातील काही चॅनेल्स आणि वृत्तपत्तें त्या निवडणूकीचे महत्व पटवून देताना भाजपाचे नाव न घेता देशात बेकारी आहे, महागाई आहे, अल्पसंख्याकांना असुरक्षित वाटत आहे, व्यक्ती स्वातंत्र्याची गळचापी होत आहे, सेंट्रल एजन्सीचे स्वायत्तता संपली आहे असे म्हणत विरोधी पक्षांच्या प्रचाराचा नारळ फोडत असतात. त्यामूळे भाजपा विरोधी हवा तयार होते पण ती लागलीच हवेत विरून जाते. 

काल परवाचीच गोष्ट आहे. रशिया आणि युक्रेन चे युद्ध सुरू झाले. युक्रेन मधील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केलेले असतानाही मिडीयाने केंद्र सरकारवर टिका करावयास सुरूवात केली. विरोधी पक्षांना धीर नसतोच. सर्वात अधिक अधीर राहूल गांधीनी टिका सुरू केली; पाठोपाठ सर्व विरोधी पक्षांनी, नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी टिका सुरू केली. त्यातील अनेक कार्यकर्त्यांना युक्रेन कुठे आहे हे माहीत नसते. केंद्र सरकारने युक्रेन मधून परत आलेल्या विद्यार्थ्यांचे फोटो सेशन सुरू केले. यात केंद्र सरकारचे काय चूकले? या संबधीच्या राजकारणरणास सुरूवात केली मिडीयांनी आणि विरोधी पक्षांनी. सत्ताधारी कोण ही असो त्यावर टिका करणे आवश्यक असते. पण प्रंसगाचे औचित्य पाळण्याचे भान भाजपा विरोधक मिडीया आणि पक्षांना राहिले नाही. त्यामूळे टिकाकरांचे हसें होतेच सोबत अराष्ट्रीय वृत्तीचा आरोप येतो.  

निवडणूक प्रत्येक राजकीय पक्षासाठी महत्वाची असते. पण काही मिडीया हाॅऊस  विरोधी पक्षांच्या प्रवक्त्यांपेक्षा धारदार अशी भाजपावर टिका करतात. विरोधी पक्ष कुठल्या मुद्यावर भाजपा शी लढायचे आहे त्यासंबंधी अभ्यास न करताच निवडणूकीच्या परीक्षेला बसतात. जशी बिहार मध्ये तेजस्वी यादवांची हवा निर्माण केली तशीच अखिलेष यादवांची हवा निर्माण केली. ती हवा सपा आणि सपाच्या मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात शिरली. भाजपा एखाद्या शाळेतील पहिल्या बाकावर बसून अभ्यास करणारा विद्यार्थी आहे तर विरोधी पक्ष मागच्या बाकावर बसून उनाडक्या करीत आहेत. भाजपा परिक्षेसाठी पुर्ण तयारी करूनच प्रश्न पत्रिका  सोडविणारा विद्यार्थी आहे, तो नापास कसा होईल हो ? काॅपी करून पास झालेल्या महाराष्ट्रातील मविआ सरकारची कामगिरी कशी चालली आहे हे आपण पाहातोच ना !  महाराष्ट्रातील तथाकथीत पुरोगामी बांधव- मित्र संपादक, विचारवंत  मविआ सरकारची बाजू घेत आहेत. जे उत्तर प्रदेशमध्ये घडले तशीच स्थिती २०२४ च्या विधानसभेत मविआ घटक पक्षांची होऊ शकेल. म्हणून  संघ - भाजपा, मोदी-शहा, योगी- फडणवीस यांचा द्वेष सोडून विरोधी पक्षांनी सकारात्मक भूमिका बजावली तर त्यांचे कार्यकर्ते आपआपल्या पक्षाचे नेटाने काम करू लागतील. तीच आपल्या लोकशाहीची आजची नितांत गरज आहे. 

२ टिप्पण्या:

  1. सुंदर, मुद्देसुद व सत्यदर्शी विश्लेषण विष्णुजी.
    योगीजी येणार ही अटकळ होतीच पण तथाकथित शेतकरी आंदोलन, ओवैसीची मुस्लीमांना भडकावणी, मिडीया निर्मित सपा लाट व अविश्वसनीय असा काठावरचा आम मतदार यामुळे भाजपच्या विजयाबद्दल थोडी शंकाही होती. पण योगींची दमदार कामगिरी, मोदींनी त्यांच्यावर दाखवलेला पुनर्विश्वास (यांत संघाची कथित भुमिका अत्यंत महत्वाची ठरली) व सर्वांत महत्वाच, उ.प्र. जनतेनं राष्ट्रहित समोर ठेऊन केलेलं मतदान हे कामी आल आणी भाजपला दैदिप्यमान यश मिळाल व पर्यायाने २०२४ चा पायाही मजबुत झाला.
    धन्यवाद व नमस्कार.

    उत्तर द्याहटवा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...