आजच्या दिवशी म्हणजे जेष्ठ शुध्द त्रयोदशीला सन १६६४ मध्ये रायगडावर आपल्या सार्यांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. भगवा ध्वज डौलाने फडकू लागला तो ह्याच दिवशी. आजच्या दिवसासारखा प्रेरणादायी दिवस आपल्यासाठी कुठला असू शकतो? ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीत समाजाच्या गळ्याला लागलेला परवशतेचा फास काढणारा एकमेव तेजस्वी, पराक्रमी राजा कोणता, ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावे लागते. ह्या प्रश्नाचे उत्तर देण्याअगोदरच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. असे का? उत्तर भलं मोठ्ठ होईल. आपण संक्षिप्तपणे मांडू या. शिवाजी महाराजांचा उदय होण्यापुर्वी आपल्या देशाच्या राजकीय स्थितीचा आढावा घेऊन.
सतराव्या शतकात आपल्या देशाच्या उत्तरेस मुघल पातशाही होती तर दक्षिणेस विजापुरची आदिलशाही होती. ह्या दोन्ही राजसत्ता आक्रमकांच्याच होत्या. ह्या आक्रमकांना विजय मिळवून देणारे सरदारही आपलेच लोक होते. आपली श्रध्दास्थाने नष्ट केली जात होती. आपल्या आया-बहीणींची अब्रु लुटली जात होती. मंदिरे पाडली जात होती. आपआपसांतील दुही, कलह, ऐषारामी, विलासी जीवन जगण्याची नशा, आणि स्वार्थाने अंध झालेला ज्ञान वर्ग व क्षात्र वर्ग ह्याचा फायदा आक्रमकांनी घेतला. आपल्या समाजाच्या वाट्याला छळ आणि गुलामगिरी आली. ज्यांनी समाजाचं नेतृत्व करावयाचे असे नेतेमंडळी पराक्रमी शूर असुनही आक्रमकांच्या पातशाहीची चाकरी करण्यात धन्यता मानू लागली. सारा समाज आत्मविस्मृतीत गेला. आपल्यातल्या सामर्थ्याची, शक्तीची जाणीवच उरली नव्हती. स्वराज्याचा उच्चार करण्याचं भानच हरपले होते.
काळ्या कुट्ट अंधारात, डोंगर-कपार्यातून, आपली दिशा ठरवून वाट काढायची, वेळ पडल्यास शत्रूनां गुंगारा द्यायचा त्यासाठी वाट बदलावयाची, संकटे आली असता डगमगून न जाता त्यावर मात करत पुढे जावयाचे, सहकार्यांना आवश्यक तो उत्साह, स्पूर्ती देत, बलाढ्या शत्रूंना एकामागोमाग चीत करीत महाराजांनी आपले स्वराज्य स्थापन केले. संत ज्ञानेश्वरांप्रमाणे शिवाजी महाराजांनाही प्रस्थापित वर्गाविरूध्द झुंजावे लागले. स्वराज्य स्थापन करावयांच्या त्यांच्या प्रयत्नाची कुचेष्टाही त्यांनी सोसली. पण ते आपल्या ध्येयापासून एक इंचही मागे ढळले नाहीत. तळागाळतल्या माणसात स्वराज्य, स्वधर्म ह्याबद्दल जागृती निर्माण करून प्रचंड साम्राज्यशाहीला हादरा देण्याचा पराक्रम त्यांनी केला. स्वराज्यासाठी प्राणार्पण करणारी हजारो माणसे उभी केली. मुरारबाजी, बाजीप्रभू, नागोजी जाधव, तानाजी मालसूरे सारख्यानी असा पराक्रम केला की आजही समाजाला ह्या सेनानींच्या शौर्यातून चिरंतर प्रेरणा मिळत आहे. अर्वाचीन भारताच्या इतिहासात सामान्यातील असामान्यत्व कसे शोधावे ह्या संघटनशास्त्राच्या मूलमंत्राचे जनकत्व निःसंदेह छत्रपती शिवाजी महाराजांकडेच जाते.
सतराव्या शतकात आपल्या देशाच्या उत्तरेस मुघल पातशाही होती तर दक्षिणेस विजापुरची आदिलशाही होती. ह्या दोन्ही राजसत्ता आक्रमकांच्याच होत्या. ह्या आक्रमकांना विजय मिळवून देणारे सरदारही आपलेच लोक होते. आपली श्रध्दास्थाने नष्ट केली जात होती. आपल्या आया-बहीणींची अब्रु लुटली जात होती. मंदिरे पाडली जात होती. आपआपसांतील दुही, कलह, ऐषारामी, विलासी जीवन जगण्याची नशा, आणि स्वार्थाने अंध झालेला ज्ञान वर्ग व क्षात्र वर्ग ह्याचा फायदा आक्रमकांनी घेतला. आपल्या समाजाच्या वाट्याला छळ आणि गुलामगिरी आली. ज्यांनी समाजाचं नेतृत्व करावयाचे असे नेतेमंडळी पराक्रमी शूर असुनही आक्रमकांच्या पातशाहीची चाकरी करण्यात धन्यता मानू लागली. सारा समाज आत्मविस्मृतीत गेला. आपल्यातल्या सामर्थ्याची, शक्तीची जाणीवच उरली नव्हती. स्वराज्याचा उच्चार करण्याचं भानच हरपले होते.
काळ्या कुट्ट अंधारात, डोंगर-कपार्यातून, आपली दिशा ठरवून वाट काढायची, वेळ पडल्यास शत्रूनां गुंगारा द्यायचा त्यासाठी वाट बदलावयाची, संकटे आली असता डगमगून न जाता त्यावर मात करत पुढे जावयाचे, सहकार्यांना आवश्यक तो उत्साह, स्पूर्ती देत, बलाढ्या शत्रूंना एकामागोमाग चीत करीत महाराजांनी आपले स्वराज्य स्थापन केले. संत ज्ञानेश्वरांप्रमाणे शिवाजी महाराजांनाही प्रस्थापित वर्गाविरूध्द झुंजावे लागले. स्वराज्य स्थापन करावयांच्या त्यांच्या प्रयत्नाची कुचेष्टाही त्यांनी सोसली. पण ते आपल्या ध्येयापासून एक इंचही मागे ढळले नाहीत. तळागाळतल्या माणसात स्वराज्य, स्वधर्म ह्याबद्दल जागृती निर्माण करून प्रचंड साम्राज्यशाहीला हादरा देण्याचा पराक्रम त्यांनी केला. स्वराज्यासाठी प्राणार्पण करणारी हजारो माणसे उभी केली. मुरारबाजी, बाजीप्रभू, नागोजी जाधव, तानाजी मालसूरे सारख्यानी असा पराक्रम केला की आजही समाजाला ह्या सेनानींच्या शौर्यातून चिरंतर प्रेरणा मिळत आहे. अर्वाचीन भारताच्या इतिहासात सामान्यातील असामान्यत्व कसे शोधावे ह्या संघटनशास्त्राच्या मूलमंत्राचे जनकत्व निःसंदेह छत्रपती शिवाजी महाराजांकडेच जाते.
एक पराक्रमी राजा म्हणून शिवाजी महाराजांची थोरवी मुलखावेगळी आहेच पण त्याचबरोबर राजधर्माचे आदर्श रित्या पालन करणारा राजा म्हणून शिवाजी महाराजांचं स्थान अग्रणी स्थानावरच राहते. स्वराज्य स्थापना म्हणजे केवळ सत्तांतर नसते ह्याचा धडा आधुनिक भारताच्या इतिहासात कोणी दिला असेल तर तो शिवाजी महाराजांनीच. राजा म्हणून मिरविणे, सन्मान प्राप्त करणे असे क्षुद्र ध्येय शिवाजी महाराजांचे नव्हतेच. कसे असणार हो? जीजामातांच्या संस्कारांनी ते घडले होते. त्यांच ध्येय होतं स्वराज्य स्थापन करण्याचे. कशासाठी? स्वजनांची होणारी मानहानी संपवावी, स्वधर्मावर वारंवार पडणारा घाला थाबंवयाचा, माता-भगिनीवर होणारे अत्याचार दूर करावयासाठी, समाजातील झोपलेल्या स्वाभिमानाला जागवयाचे. एक सुखी, संपन्न हिंदू राष्ट्र उभारयाचे.
गरीबांच्या भाजीच्या काडीला दाम दिल्याशिवाय हात लावाल तर खबरदार असे आपल्या अधिकार्यांना ठणकाविण्यास शिवाजी महाराज मागे पुढे पाहात नसत. गरीबांच्या गंजीस आग लागू नये म्हणून रात्रीच्या वेळी समया दिवे विझवून टाकण्याचे आदेश ते देत असत. खर्या अर्थाने रयतेचे राज्य म्हणजे शिवाजी महाराजांचे स्वराज्य. रयतेच्या मनात सरकारबद्दल एक आपूलकी निर्माण करण्यासाठी लागणारा त्याग राजाने आणि राज दरबारातल्या अधिकार्यांनीच करावा, हे राजधर्माचं सुत्र पुर्णतः पाळलं गेल्याचे अनेक दाखले शिवाजी महाराजाच्या कार्यपध्दतीत दिसलेले आहेत. म्हणूनच शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी जीवावर उदार होणारे सेनानी निर्माण होऊ शकले. एखादा अधिकारी वा सरदार आपल्या हातातील सत्तेच्या मदोन्मेशात समाजाची हानी करू शकणार नाही, ह्यासाठीच शिवाजी महाराजांनी सत्तेचे विकेंद्रीकरण केले. तेच शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ. एका परीने प्रजेने निवडून दिलेला ह्या भूतलावरील पहीला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असे मानण्यास काही प्रत्यावाव नसावा.
स्त्री विषयक आदर निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न आजकाल जगभरात दिसत असले, तरी आपल्या देशाच्या संस्कृतीत ते फार पुर्वीपासून होते. परंतू ते तत्व विस्मृतीत गेले हे ही तितकेच सत्य. ह्या बाबतीत समाजाला जागृत अवस्थेत आणण्याच्या प्रयत्नात शिवाजी महाराजानी काही कसूर केली नाही. कल्याणच्या लूटेत प्रत्यक्ष सुभेदाराच्या देखण्या बहीणीस सन्मानाने परत पाठविण्याचा शिवाजीं महाराजांचा निर्णय, जीजामातेच्या संस्काराचं फलीत असले तरी कुठल्याही संस्काराच पालन हे राजापासून झालं पाहीजे हे राजधर्माच्या सुत्राशी शंभर टक्के सुसंगत होते. महारांजचं हे औदार्य सामान्य नव्हतं, तर ते ह्या देशातील प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यां-कार्यकर्त्यांसाठी, तसेच प्रत्येक नागरिकासाठीही एक नीतीधर्मयुक्त दंडकच होय.
आपले स्वराज्य चिरंतर टिकावे ह्या हेतूने सागरी मार्गावरून पाश्चीमात्य देशाच्या आक्रमणाला समर्थपणे मुकाबला करण्यासाठी सागर किनारी किल्ले बांधले. लढाऊ नौकादल उभे केले. वरकरणी व्यापारासाठी येणारी परदेशी जमात केवळ व्यापारासाठी येत नसून ते आक्रमकच होत, हे ओळखण्याची शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आपल्या देशातील त्यानंतरच्या काळातील सत्ताधार्यांनी जपली असती तर आपल्या देशाचा इतिहास वेगळा असता. इंग्रजांचं राज्य आले ते ही आपल्यातील एकोपाच्या कमतरतेमुळेच. राष्ट्र म्हणून उभे राहण्याचा प्रयत्न जो छत्रपती शिवाजी महाराजांनी केला तसा पुन्हा देशाच्या इतिहासात झाला नाही. तरी अनेक स्वातंत्र्यवीरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमातून स्पूर्ती घेतली आणि देश स्वतंत्र झाला.
गरीबांच्या भाजीच्या काडीला दाम दिल्याशिवाय हात लावाल तर खबरदार असे आपल्या अधिकार्यांना ठणकाविण्यास शिवाजी महाराज मागे पुढे पाहात नसत. गरीबांच्या गंजीस आग लागू नये म्हणून रात्रीच्या वेळी समया दिवे विझवून टाकण्याचे आदेश ते देत असत. खर्या अर्थाने रयतेचे राज्य म्हणजे शिवाजी महाराजांचे स्वराज्य. रयतेच्या मनात सरकारबद्दल एक आपूलकी निर्माण करण्यासाठी लागणारा त्याग राजाने आणि राज दरबारातल्या अधिकार्यांनीच करावा, हे राजधर्माचं सुत्र पुर्णतः पाळलं गेल्याचे अनेक दाखले शिवाजी महाराजाच्या कार्यपध्दतीत दिसलेले आहेत. म्हणूनच शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी जीवावर उदार होणारे सेनानी निर्माण होऊ शकले. एखादा अधिकारी वा सरदार आपल्या हातातील सत्तेच्या मदोन्मेशात समाजाची हानी करू शकणार नाही, ह्यासाठीच शिवाजी महाराजांनी सत्तेचे विकेंद्रीकरण केले. तेच शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ. एका परीने प्रजेने निवडून दिलेला ह्या भूतलावरील पहीला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असे मानण्यास काही प्रत्यावाव नसावा.
स्त्री विषयक आदर निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न आजकाल जगभरात दिसत असले, तरी आपल्या देशाच्या संस्कृतीत ते फार पुर्वीपासून होते. परंतू ते तत्व विस्मृतीत गेले हे ही तितकेच सत्य. ह्या बाबतीत समाजाला जागृत अवस्थेत आणण्याच्या प्रयत्नात शिवाजी महाराजानी काही कसूर केली नाही. कल्याणच्या लूटेत प्रत्यक्ष सुभेदाराच्या देखण्या बहीणीस सन्मानाने परत पाठविण्याचा शिवाजीं महाराजांचा निर्णय, जीजामातेच्या संस्काराचं फलीत असले तरी कुठल्याही संस्काराच पालन हे राजापासून झालं पाहीजे हे राजधर्माच्या सुत्राशी शंभर टक्के सुसंगत होते. महारांजचं हे औदार्य सामान्य नव्हतं, तर ते ह्या देशातील प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यां-कार्यकर्त्यांसाठी, तसेच प्रत्येक नागरिकासाठीही एक नीतीधर्मयुक्त दंडकच होय.
आपले स्वराज्य चिरंतर टिकावे ह्या हेतूने सागरी मार्गावरून पाश्चीमात्य देशाच्या आक्रमणाला समर्थपणे मुकाबला करण्यासाठी सागर किनारी किल्ले बांधले. लढाऊ नौकादल उभे केले. वरकरणी व्यापारासाठी येणारी परदेशी जमात केवळ व्यापारासाठी येत नसून ते आक्रमकच होत, हे ओळखण्याची शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आपल्या देशातील त्यानंतरच्या काळातील सत्ताधार्यांनी जपली असती तर आपल्या देशाचा इतिहास वेगळा असता. इंग्रजांचं राज्य आले ते ही आपल्यातील एकोपाच्या कमतरतेमुळेच. राष्ट्र म्हणून उभे राहण्याचा प्रयत्न जो छत्रपती शिवाजी महाराजांनी केला तसा पुन्हा देशाच्या इतिहासात झाला नाही. तरी अनेक स्वातंत्र्यवीरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमातून स्पूर्ती घेतली आणि देश स्वतंत्र झाला.
आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरीत्रापासून आपल्याला स्पुर्ती मिळत असते. कारण छत्रपती शिवाजी महाराज कालातीत आहेत. तळपत्या सुर्यासारखे त्यांचे चरीत्रजीवन आहे. असा आदर्श आपल्या समोर असुनही आपण आजही बलशाली देश असे बिरूद वापरू शकत नाही. का? पाहु या कोणती कारणे आहेत.
शिवाजी महाराजांबद्दल सामान्य माणसाला अत्यंत आदर आहे. पण त्याचबरोबर आपल्या देशातील सर्वच राजकीय पक्षांना ते आपआपल्या राजकीय विचारसरणीच्या जवळचे वाटतात. शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येक राजकीय पक्षालाही आदर असल्यामूळे शिवरांयाचा जो एखादा पैलू त्यांच्या विचारसरणीस आवश्यक आहे त्याकडे ते आकर्षित झाले असावेत. शिवाजी महाराजांनी संरजामशाही नष्ट केली असे म्हणत साम्यवादी पक्षांना ते साम्यवादाचे आद्य प्रवर्तक वाटतात. काँग्रेस पक्षाला तसेच सध्याच्या सार्या विरोधी पक्षांना ते सर्वधर्म समभावाचे पुरस्कृते वाटतात. तर हिंदूत्ववादी पक्षांना ते हिंदुत्वाचे प्रतिक वाटतात. साम्यवाद आणि समाजवाद ह्या दोन्ही कल्पना आर्थिक रचनेशी जोडलेल्या आहेत. ह्या दोन्ही आर्थिक रचनेत शोषक वर्ग राहातच नाही असे सिध्द झालेले दिसत नाही. ह्याचं मुख्य कारण शिवरायांनी जो राजधर्म पाळला तो ना समाजवादी राज्यकर्त्यांनी पाळला ना साम्यवादी राज्यकर्त्यांनी पाळला. शेवटी अर्थनीती राबवयाची असते. ती पुस्तकात चांगली असते पण त्यामुळे देश समर्थ बनु शकत नाही. प्रत्येक देशाची संस्कृती, परंपरा, गरजा, सामाजिक आणि भौगोलीक स्थितीनुसारच अर्थनीती राबवयाची असते आणि त्यातही सत्ताधार्यांची प्रजेशी असलेली निष्ठा शिवरायांइतकी चोवीस कॅरेटच्या सोन्यासारखी असावी लागते. इथेच साम्यवादाचा आणि समाजवादाचा पराभव झाला.
शिवाजी महाराजांबद्दल सामान्य माणसाला अत्यंत आदर आहे. पण त्याचबरोबर आपल्या देशातील सर्वच राजकीय पक्षांना ते आपआपल्या राजकीय विचारसरणीच्या जवळचे वाटतात. शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येक राजकीय पक्षालाही आदर असल्यामूळे शिवरांयाचा जो एखादा पैलू त्यांच्या विचारसरणीस आवश्यक आहे त्याकडे ते आकर्षित झाले असावेत. शिवाजी महाराजांनी संरजामशाही नष्ट केली असे म्हणत साम्यवादी पक्षांना ते साम्यवादाचे आद्य प्रवर्तक वाटतात. काँग्रेस पक्षाला तसेच सध्याच्या सार्या विरोधी पक्षांना ते सर्वधर्म समभावाचे पुरस्कृते वाटतात. तर हिंदूत्ववादी पक्षांना ते हिंदुत्वाचे प्रतिक वाटतात. साम्यवाद आणि समाजवाद ह्या दोन्ही कल्पना आर्थिक रचनेशी जोडलेल्या आहेत. ह्या दोन्ही आर्थिक रचनेत शोषक वर्ग राहातच नाही असे सिध्द झालेले दिसत नाही. ह्याचं मुख्य कारण शिवरायांनी जो राजधर्म पाळला तो ना समाजवादी राज्यकर्त्यांनी पाळला ना साम्यवादी राज्यकर्त्यांनी पाळला. शेवटी अर्थनीती राबवयाची असते. ती पुस्तकात चांगली असते पण त्यामुळे देश समर्थ बनु शकत नाही. प्रत्येक देशाची संस्कृती, परंपरा, गरजा, सामाजिक आणि भौगोलीक स्थितीनुसारच अर्थनीती राबवयाची असते आणि त्यातही सत्ताधार्यांची प्रजेशी असलेली निष्ठा शिवरायांइतकी चोवीस कॅरेटच्या सोन्यासारखी असावी लागते. इथेच साम्यवादाचा आणि समाजवादाचा पराभव झाला.
काॅग्रेस सारख्या सर्वात जुन्या पक्षात खर्या अर्थाने समाजवाद रूजला होता का असा प्रश्न पडतो. काॅग्रेस पक्षाचं स्वरूप बदलत गेलं. मग त्यात घराणेशाही निर्माण झाली. ते घराणे शिवाजीसारखे प्रतापी आणि प्रजाहीतदक्ष असू शकत नव्हते. तसे पाहता आज भारतातील कुठल्याही पक्षात घराणेशाही आली तरी ते घराणे छत्रपती शिवाजी महाराजांच्याच्या तोडीचे होऊच शकत नाही. प्रजेच्या हिताकरीता सत्ता राबविण्यात शिवाजी महारांजाशी बरोबरी कुठला पक्ष करू शकतो? हा प्रश्न आपल्याला सतावीत राहणार असेच दिसते.
अर्थनिती कशी असावी ह्याबाबत राजकीय पक्षात सध्या फारसे मतभेद दिसत नाही ह्याचे कारण जागतिक स्थितीचा रेटा. अगदी समाजवादी, साम्यवादी समजल्या जाणार्या देशातही आर्थिक उदारीकरण आणि जागतीकरण राबविले जात आहेत. सध्याची राजकीय स्थिती बायपोलर बनत आहे. एका बाजूला भारतिय जनता पक्ष म्हणजे हिंदुत्ववादी आणि दुसर्या बाजूला इतर विरोधी पक्ष जे रूढार्थाने सेक्यूलरवादी असे मानले जातात.
शिवाजी महाराजांनी मशीदी पाडल्या नाहीत किंवा कुराण जाळले नाही ही बाब आजच्या लोकशाही व्यवस्थेत हिंदूत्ववादी पक्षांना झोडपण्यासाठी वापरली जात आहे. ह्या पाठीमागे अल्पसंख्याकांची एकगठ्ठा मते मिळाविणे हाच हेतू आहे. अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण जेव्हा होत असते, तेव्हा तो शिवरायांचा राजधर्म राहात नाही. राजासमोर म्हणजे कायद्या समोर सारी प्रजा समान हेच धोरण राज्य कारभारासाठी मानले जाते. बहुतांश विरोधी पक्ष हिंदू धर्मातील श्रीरामासारख्यां दैवतांना केवळ मोक्षदाता मानतात. त्यामूळे श्रीराम ह्या राष्ट्राचे मानबिंदू मानायचे हे ही मंडळी विसरून जातात. व्यक्तीगत उद्दिष्ट समोर ठेवून धार्मीक कृत्ये करणे हि हिंदूंची सहजप्रवृत्ती आहे.
शिवाजी महाराजांनी मशीदी पाडल्या नाहीत किंवा कुराण जाळले नाही ही बाब आजच्या लोकशाही व्यवस्थेत हिंदूत्ववादी पक्षांना झोडपण्यासाठी वापरली जात आहे. ह्या पाठीमागे अल्पसंख्याकांची एकगठ्ठा मते मिळाविणे हाच हेतू आहे. अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण जेव्हा होत असते, तेव्हा तो शिवरायांचा राजधर्म राहात नाही. राजासमोर म्हणजे कायद्या समोर सारी प्रजा समान हेच धोरण राज्य कारभारासाठी मानले जाते. बहुतांश विरोधी पक्ष हिंदू धर्मातील श्रीरामासारख्यां दैवतांना केवळ मोक्षदाता मानतात. त्यामूळे श्रीराम ह्या राष्ट्राचे मानबिंदू मानायचे हे ही मंडळी विसरून जातात. व्यक्तीगत उद्दिष्ट समोर ठेवून धार्मीक कृत्ये करणे हि हिंदूंची सहजप्रवृत्ती आहे.
शिवाजी महाराजांवर चाल करून येणारा जयसिंग हिंदू म्हणून धार्मीक कृत्ये पार पाडीत होताच की. ' हिंदू राज्य स्थापन करण्यासाठी येत असशील तर तुझ्या मार्गावर पायघड्या पसरून तुझे स्वागत करीन. पण मोंगलाचा सेनापती म्हणून येत असेल तर माझ्या तलवारीने युद्ध करण्यास तयार असेन. ' असे शिवाजी महाराजांनी जयसिंगास पत्राद्वारे कळविले होते. ह्या पत्रातून हिंदूत्ववाद्यांना शिवाजी महाराजांचा राष्ट्रवाद भावला असेल तर त्यात गैर काय आहे?
शिवाजी महाराजाकडे असलेली सहिष्णूता सध्याच्या हिंदुत्ववाद्यांनी स्विकारावी असे इतर सर्व पक्षांना वाटणे स्वाभाविक आहे. परंतु नेताजी पालकरांना पुन्हा स्वधर्मात घेण्याचे धैर्य तत्कालीन समाजव्यवस्थेत शिवाजी महाराजांनी दाखविले तसे धैर्य आजची तथाकथीत पुरोगामी मंडळी दाखवू शकतात का? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा, त्यातील मंत्रघोष, त्यांनी घेतलेल्या प्रतिज्ञा इत्यादी गोष्टी श्रीरामचंद्र, चंद्रगुप्त मौर्य, विक्रमादित्य, इत्यादींच्या राज्याभिषेकेच्या सोहळ्याच्या पंरपंरेशी सुसंगत होत्या.
हिंदू धर्माच्या पंरपरेतील भगव्या ध्वजास त्यांनी राष्ट्रध्वजाचे स्थान दिले. असे असुनही राष्ट्रद्रोही हिंदूच्या विरोधात लढण्यासाठी शिवाजी महाराजांनी मागे पुढे पाहीले नाही तसेच त्यांना अभिप्रेत असलेल्या राष्ट्रधर्मानुसार मुस्लीमांनाही आपल्या सेनेत दाखल करण्याचे थांबविले नाही. आपल्या समोर प्रश्न आहे तो हा, की छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेला राष्ट्रवाद कोणता? ह्याबाबत राजकीय पक्षामध्ये चर्चा होऊन एकमत होईल तेव्हाच आपण शिवरायांच्या चरीत्रातून काहीतरी शिकलो असे म्हणू शकतो.
शिवाजी महाराज ना कधी पराभवाने खचून गेले, ना विजयाने उन्मत्त झाले. त्यांच्या युध्दनितीतील गनीमी काव्याची प्रशंसा परदेशातील युध्दविषयक तज्ञ करीत आहेत. एक पराक्रमी, शूर राजा पण तितकाच विनम्र, थोरांमोठ्यांचा आदर करणारा असा राजा म्हणून शिवाजी महारांजाचा लौकीक आहे.' सज्जनांना राखावे, दुर्जनांना ठेचावे' हाच त्यांचा बाणा होता.
शिवाजी महाराज ना कधी पराभवाने खचून गेले, ना विजयाने उन्मत्त झाले. त्यांच्या युध्दनितीतील गनीमी काव्याची प्रशंसा परदेशातील युध्दविषयक तज्ञ करीत आहेत. एक पराक्रमी, शूर राजा पण तितकाच विनम्र, थोरांमोठ्यांचा आदर करणारा असा राजा म्हणून शिवाजी महारांजाचा लौकीक आहे.' सज्जनांना राखावे, दुर्जनांना ठेचावे' हाच त्यांचा बाणा होता.
साधूसंताबद्दल त्यांना वाटणारी आत्मियता उच्च पातळीवरची होती. अधूनमधून त्यांना वैराग्याची आस लागत असे. तुकाराम महाराज, रामदास स्वामी सारख्या संतानां ते गुरूस्थानी मानत असत. "सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे परंतू तेथे आधी अधिष्ठान असावे भगवंताचे" असा समर्थ रामदास स्वामींचा उपदेश पदोपदी त्यांनी पाळला. स्वराज्य टिकविण्यासाठी आपल्या संस्कृतीचा, आपल्या पंरपंरेचा, पाईक होण्याची सुरवात त्यांनी स्वतःपासून सुरू केली होती, ही बाब केवळ राजकीय क्षेत्रात काम करणार्यासाठीच नव्हे तर प्रत्येक नागरिकासाठी आदर्शवत आहे. शेवटी लोकशाहीत प्रजाच राजा असते ना! त्यामुळे प्रजेलाच प्रजाहितदक्ष रहावे लागते.
आदर्श पुत्र, सावध नेता, हिकमती लढवय्या, एक कुशल संघटक, सज्जनांचा कैवारी तर दुर्जनांचा कर्दनकाळ, कुशल प्रशासक, प्रजाहितदक्ष, गो ब्राह्मण प्रतिपालक, जाणता राजा इत्यादी ज्यांच्या व्यक्तीमत्वाचे तेजस्वी पैलु आहेत, अशा छत्रपती शिवाजी महाराजांना माझे कोटी कोटी प्रणाम!
जय शिवाजी ! जय भवानी!
भारत माता की जय!
आदर्श पुत्र, सावध नेता, हिकमती लढवय्या, एक कुशल संघटक, सज्जनांचा कैवारी तर दुर्जनांचा कर्दनकाळ, कुशल प्रशासक, प्रजाहितदक्ष, गो ब्राह्मण प्रतिपालक, जाणता राजा इत्यादी ज्यांच्या व्यक्तीमत्वाचे तेजस्वी पैलु आहेत, अशा छत्रपती शिवाजी महाराजांना माझे कोटी कोटी प्रणाम!
जय शिवाजी ! जय भवानी!
भारत माता की जय!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा