दर वर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाचे न चुकता आगमन होत असते. श्री गणपती बाप्पा जसे येतात तसे परत ही जातात ; वर्षानुवर्षे ही परंपरा सुरू आहे ; कुठे खंड पडत नाही ; कुठे गौरीसोबत परत जातात तर कुठे अनंत चतुर्दशीला जातात. अनंत चतुर्दशीला विराट जनसमुदायाच्या उत्साहाच्या उधाणात सार्या सार्वजनिक मंडळांच्या गणपतीचे विसर्जन होत असते. गणपतीच्या विसर्जन यात्रेत 'गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लौकर या' अशी आर्त विनवणी आपण करतो. कारण काय तर त्या मंगलमुर्तीच्या सहवासाला आपण पारखे होत आहोत अशी उचंबळून येणारी जाणीव. गणपतीचे विसर्जन झाले की आपल्या घरातील लाडकी व्यक्ती परगावी गेल्यावर जी स्थिती आपल्या मनाची होते तशी स्थिती होत असते. गणपतीच्या विसर्जनानंतर एक दोन दिवस मनाला रितेपणं आल्यासारखं वाटतं. पण एक दोन दिवसानंतर ते बुद्धीचे दैवत आपल्या मनाला अलगद आपल्या कर्माच्या वाटेवर आणून सोडते आणि आपलं दैनंदिन जीवन सुरू होते.
रविवार, १५ सप्टेंबर, २०१९
आपण व आपली दैवते (बुद्धी देवता) भाग १
दर वर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाचे न चुकता आगमन होत असते. श्री गणपती बाप्पा जसे येतात तसे परत ही जातात ; वर्षानुवर्षे ही परंपरा सुरू आहे ; कुठे खंड पडत नाही ; कुठे गौरीसोबत परत जातात तर कुठे अनंत चतुर्दशीला जातात. अनंत चतुर्दशीला विराट जनसमुदायाच्या उत्साहाच्या उधाणात सार्या सार्वजनिक मंडळांच्या गणपतीचे विसर्जन होत असते. गणपतीच्या विसर्जन यात्रेत 'गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लौकर या' अशी आर्त विनवणी आपण करतो. कारण काय तर त्या मंगलमुर्तीच्या सहवासाला आपण पारखे होत आहोत अशी उचंबळून येणारी जाणीव. गणपतीचे विसर्जन झाले की आपल्या घरातील लाडकी व्यक्ती परगावी गेल्यावर जी स्थिती आपल्या मनाची होते तशी स्थिती होत असते. गणपतीच्या विसर्जनानंतर एक दोन दिवस मनाला रितेपणं आल्यासारखं वाटतं. पण एक दोन दिवसानंतर ते बुद्धीचे दैवत आपल्या मनाला अलगद आपल्या कर्माच्या वाटेवर आणून सोडते आणि आपलं दैनंदिन जीवन सुरू होते.
रविवार, १ सप्टेंबर, २०१९
इम्रानखान व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
शनिवार, २४ ऑगस्ट, २०१९
आता लक्ष ३७० कलम वरून ४२० वर
मंगळवार, ६ ऑगस्ट, २०१९
जम्मू काश्मीर संबंधीत केंद्र सरकारचा मोठा निर्णय
देशातील घाऊक पक्षांतराबाबतचा लेख पब्लीश करीत असतानाच जम्मू-काश्मीर संबंधीत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतल्याची बातमी न्यूज चॅनेल वर झळकली. ह्यातील लडाख हा विधीमंडळ नसलेला केंद्र शासित प्रदेश झाला आहे तर जम्मू-काश्मीर हा सुद्धा केंद्रशासीत प्रदेश राहील पण तिथे विधीमंडळ राहणार आहे. ह्या निर्णयामूळे जम्मू-काश्मीर ह्या राज्याला लागू असणारे कलम ३७० आणि ३५ अ आपोआप निकाली ठरले आहेत. या दोन कलमामूळे जम्मू -काश्मीर राज्यात अलगावादी आणि दशहतवादी सत्तेचे दलाल तर तेथील स्थानिक पक्ष राज्याचे सुलतान झालेले आपण पाहीले. देशभर काॅग्रेस पक्षाचे स्वरूप 'सत्तेतील वाटेकरींचा समूह ' जसे झाले तसेच जम्मू काश्मीर राज्यातील स्थानिक पक्षांचेही स्वरूप आपण पाहात आलो आहे. कारण सत्तेची नशा.
स्वातंत्र्यानंतर लागलीच पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला केला. तेव्हा काश्मीरच्या महाराजाने काश्मीर संस्थान भारतात विलिनी करणाच्या करारावर सही केली. मग भारताने काश्मीरला आपले लष्कर पाठविले. लष्कर पाठविण्यासाठी अंहिसेचा पुजारी, आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी ही संमती दिली होती. अशी माहीती भारताचे माजी परराष्ट्र सचीव श्री पार्थसारथी शर्मानीं एका चॅनेल वरील चर्चेत भाग घेताना दिल्याचे मला आठवते. आपले लष्कर पाक पुरस्कृत हल्ल्याला सडेतोड उत्तर देत काश्मीर मध्ये घुसले. लष्कर संपूर्ण काश्मीर वर आपले वर्चस्व प्रस्थापित करीत असताना देशाचे पहीले पंतप्रधान पंडीत नेहरूनीं काश्मीर प्रश्न युनोत नेला व युद्ध थांबले. त्यामूळे एक तृतीयांश काश्मीरचा भाग आजही पाकीस्तानाकडे राहिला. ज्याला आपण पाक व्याप्त काश्मीर (POK) म्हणतो. तोच भाग पाकिस्तानने दशहतवाद्यांचा अड्डा बनविला व आपली कायमची डोकेदुखी ठरली. पण दोन तृतीयांश भाग जो स्वतंत्र भारताच्या हाती आहे, तिथेही आपले हक्क गहाण ठेवल्यासारखी स्थिती झाली. ३७० कलमन्वाये व नंतर ३५ अ ह्या कलमान्वये जम्मू काश्मीर हे राज्य भारताच्या इतर राज्याहून भिन्न राहीले. ही कलम तशी तात्पुरता होती. पण ह्याच कलमाच्या आधारे काश्मीर खोर्यातील मुस्लीम नेते काश्मीर ही आपली जहागिरी समजून राजेशाही सारखे ऐषारामी जीवन जगू लागले. सामान्य काश्मीरी जनता आजही मागासलेली राहीली. लोकसंख्याच्या आधारावर मुस्लीम बांधवांनी पाकिस्तान मिळविले. हिंदूच्या कत्तली करून, जे वाचले त्यांना फाटक्या वस्त्रात, तर महीलांच्या अब्रू लुटून निर्वासित करून भारतात पाठविले आणि येथून मुस्लीम बांधव जे स्वखुषीने गेले ते सन्मानाने पाठविले. वर आपण ५१ कोटी रूपये पाकला दिले. हा इतिहास वाचताना, लिहीताना ज्ञानपीठ विजेते वि स खांडेकर ह्यांनी एके ठिकाणी काय म्हणाले होते ते इथे मांडावेसे वाटते. " व्यक्ती व्यक्तींशी जितक्या सहृदयतेने वागते, तितका सदभाव एका धर्माचा, एका राष्ट्राचा किंवा एका वर्गाचा घटक या नात्याने दुसर्या धर्मातल्या, राष्ट्रातल्या अथवा वर्गातल्या घटकांशी व्यवहार करताना ती प्रगट करू शकत नाही. व्यक्तीमनात कविमनाचा थोडाफार अंश असू शकतो. पण समुदायाचे मन हे मुख्यतः टीकाकाराचे मन असते. समूहाचे प्रेम जागृत करणे हे मोठे अवघड काम आहे, पण त्याच्या द्वेषाला किंवा सूडबंध्दीला सहज आवाहन करता येते, अहिंसा हे सुसंस्कृत मानवी जीवनातले एक महत्त्वाचे मूल्य असले तरी व्यक्तीमन व समाजमन यांतल्या अंतराकडे दुर्लक्ष करून त्याचा पुरस्कार करणार्याच्या वाटेला शेवटी अपयश आल्यावाचून राहात नाही. " शेवटी पाकिस्तानात लोकशाही रूजली नाही, तिथे कधी लष्करशाही येईल याचा नेम नसतो. तिथे नेहमीच उमरावांचेच राज्य राहीले आहे. तिथे सामान्य जनता भिकेला लागलेली आहे. दुसर्या बाजूला काश्मीर धगधगते राहिले. इथल्या काही मुस्लीम बाहूल भागात पाकिस्थान जिंदाबाद करीत पाकचा ध्वज हातात घेतलेले युवक पाहिले, इसिस , लष्कर, तत्सम दशहतवादी संघटनात सामील झालेले युवक ही दिसले. द्विराष्ट्राच्या सिध्दांताचे दुहेरी अपयश आपल्या हाती आले. भारत लोकशाहीवादी देश आहे. इथे सर्वसामान्यांचे राज्य हवे की अशीच सुलतानशाही असावी ह्या प्रश्नांचा विचार काॅग्रेसने कधी केला नाही. भारतातील इतर प्रदेशात लोकशाहीच्या मार्गाने हळूहळू भाजपाचे वर्चस्व वाढत गेले. भारत बदलत आहे असे म्हटले जाते ते ह्याच बाबी मूळे.
आता आपण म्हणाल, काश्मीरमध्ये विधानसभा होतीच की ! मग तेथे सुलतानशाहीच्या विरूद्ध मतें देऊन भाजपाची सत्ता का येत नाही? ह्या प्रश्नाचे उत्तर असे आहे की जम्मू, काश्मीर व लडाख अशा तीन विभागाचे हे राज्य. जम्मू व लडाख या विभागांचे क्षेत्रफळ ही मोठे, लोकसंख्या ही अधिक आहे, असे असूनही त्या राज्याच्या विधानसभेतील लोकप्रतिनिधींची संख्या जम्मू व लडाख साठी कमी ठेवून काश्मीर खोर्यातील जनतेसाठी अधिक जागा ठेवल्या गेल्या, का व कुणामूळे ? त्याचे उत्तर म्हणजे हेच ते ३७० कलम. एकाच राज्यात दोन विभागातील लोकावर अन्याय होत असेल तर आपण लोकशाहीचा जप का करतोय ? ३७० कलम व ३५अ कलम ह्याबाबत सोशल मिडीयावर भरपूर माहीती आलेली आहे त्या संबंधी अधिक माहीती देण्याची आवशक्यता नाही. मी जो मुद्दा मांडतोय तो लोकशाही मुल्यें व जनसामान्यांच्या भावनेशी निगडीत आहे. आजही भारताततल्या बहतांश नागरिकांना संपूर्ण जम्मू-काश्मीर राज्य हे मुस्लीमबाहूल आहे असे वाटत आले आहे. का तर जेव्हा बघावं तेव्हा वर्तमानपत्रात व न्यूज चॅनेलवर काश्मीर खोर्यातील वार्ता व फोटो आणि त्या पण कुठल्या तर आज दशहतवाद्यांनी अमक्या ठिकाणी हल्ला केला, निष्पाप नागरिक मेले, आपले जवान शहिद झाले या पलिकडे दुसरे काहीच नाही. दशहतवाद्यांना मदत करणारे आपले मुस्लीम बांधव आपल्या सेनादलाकडे शरण आले, अशी बातमी ना ऐकावयास मिळाली, ना वाचावयास मिळाली ! त्यामूळे काश्मीर जणू मुस्लीमबाहूल राज्य आहे, असेच भारतीयांना वाटत आले आहे. तिथे कधीही हिंदू बांधव मुख्यमंत्री झालेला दिसला नाही. एकाच आई च्या तीन मुलांपैकी दोन मुलांना सापत्न वागणूक दिली गेल्यामूळे ज्याचे लाड केले गेले त्याचीच नांतवडे, मुख्यमंत्री होणार ना ! हिंदू बांधव मुख्यमंत्री झाला नाही आणि कधीही होऊ शकणार नव्हता. प्रश्न हिंदू मुख्यमंत्री होण्याचा नाही. ह्याहून खरा व मोठा प्रश्न म्हणजे काश्मीर खोर्यीतील नेत्यांनी इतकी वर्षे सत्ता उपभोगून राज्यातील जनतेला काय दिले आहे ? काश्मीर खोर्यातील युवकांची माथी भडकावून त्यांना पोलीसावर, जवानांवर दगड मारण्यासाठी वापरले. ना शिक्षणाची सोय ना रूग्णालयाची सोय, ना रोजगार ! काश्मीर खोरेच जणू पाक पुरस्कृत दशहतवाद्यांना आदंण दिले असेच वाटत राहिले. जम्मू - काश्मीर राज्य हे शेख अब्दूल्ला, मुप्ती मोहमंद, सोझ, लोन, हूरीयत, इत्यादी घराण्याची मालमत्ता होऊन बसली. कोणाच्या जोरावर ? ३७० कलमाच्या, ३५अ कलमाच्या, पाक पुरस्कृत दशहतवाद्यांच्या ! असे होत असूनही जम्मू काश्मीर राज्यासाठी केंद्र सरकार निधी देते ते कोणाच्या खिशातून ? देशातल्या सर्व नागरिकांच्या आयकरातून जमा केलेल्या रकमेतूनच की ! मौज कोण करणार तर शेख अब्दूल्ला , मुप्ती मोहमंद, सोझ, हुरियत इत्यादींचे कुटूंबिय ! किती वर्षे ह्या घराण्यांची मौज चालणार ? इथे हिंदू-मुस्लीम भेद करण्याचा प्रश्नच नाही. लोकशाहीत प्रत्येक राज्यात संविधानाने दिलेले हक्क आणि सवलती राज्यातील जनतेला मिळायला हव्यात. तिथे विभागीय भेद नसावा, जाती भेद नसावा. तसेच देशातील प्रत्येक राज्याचा कारभार भारतीय संविधाननुसार चालावा त्यातही राज्या-राज्यात भेदभाव नसावा, इतका साधा हा लोकशाहीचा अर्थ आहे. त्यामूळे जम्मू-काश्मीर राज्यासंबंधी केंद्र सरकारने घेतलेला निर्णय हा लोकशाही राज्यप्रणालीच्या मूलभूत तत्वाशी सुसंगत आहे. ह्या बाबत दुमत असू नये.
दुसरा प्रश्न असा आहे की भाजपा प्रणीत आघाडी सरकारला असा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का? विरोधी पक्षांशी सल्ला मसलत करण्याची गरज होती का? भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात जम्मू काश्मीर मधील ३७० वे कलम तसेच ३५ अ कलम काढून टाकण्याचे वचन दिले होते. जनतेला फसवून हा निर्णय घेतलेला नाही. भाजपाला पुन्हा केंद्रातली सत्ता जनतेने दिली त्यात ह्या वचनाचा ही वाटा होताच. त्यामूळे पंडीत जवाहरलाल नेहरूनीं काश्मीर प्रश्न आतंरराष्ट्रीय समुदायाकडे सोपविला होता तो आपोआप निकाली निघाला. केद्र सरकारच्या ह्या निर्णयाबाबत जगभरातील कुठल्याही देशाला हस्तक्षेप करता येणार नाही. कारण हा निर्णय लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकार आणि राष्ट्रपती महोदयातर्फे घेतलेला आहे. विरोधी पक्षांशी फक्त आंतरराष्ट्रीय बाबी संबंधीत सल्ला-मसलत घेण्याची प्रथा आहे, ती ही फक्त प्रथा, कायदेशीर दायित्व वा बंधन नव्हे. आजच्या विरोधी पक्षांचे वर्तन पाहता त्यांना अंधारात ठेवून हा निर्णय घेण्याचे टाळले असावे. तसे पाहता स्वातंत्र्यानंतर लागलीच पाकिस्तानने आक्रमण केले होते आणि आपले लष्कर आगेकूच करीत असतांना पंतप्रधान पंडीत नेहरूनी काश्मीरचा प्रश्न यूनोत पाठविला तेव्हा विरोधी पक्षांशी सल्ला-मसलत केली होती का? त्याहून या संबंधीं गुप्तता पाळण्याचे एक म्हत्त्वाचे कारण आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे असावे असा अंदाज आहे. ते कारण मी ह्या लेखाच्या शेवटी देत आहे.
तिसरा महत्वाचा प्रश्न. काश्मीर कायमचे धगधगते राहीले आहे मग तिथे जनक्षोभ झाला तर काय करावे? जनक्षोभ केव्हा होतो आणि का होतो ? संविधाना नुसार केंद्र सरकारने निर्णय घेतला नसेल तेव्हा जनक्षोभ होतो. केंद्र सरकाच्या ह्या निर्णयाबाबत जनक्षोभ होईल असे दिसत नाही. काही हितशत्रूनीं तसा प्रयत्न केल्यास तो अनूचीत ठरेल. तसा प्रयत्न देशाविरूध्द बंड समजले जाईल. त्यावर सरकार कठोर उपाय करू शकते. श्रीलंकेच्या सरकारने एलटीटीच्या प्रभाकरन ने केलेल्या बंडाचा निप्पात केला की नाही? काटेरी झुडपांना कलम करता येत नाही, ३७० व ३५ अ ही काटेरी झुडपांना केलेली कलमं होती. त्यांचा झुडपा सकट नायनाट होणे गरजेचं होते. बाकी सरकारने आश्वासनांची पूर्ती केली नसेल, किंवा एखाद्या निर्णयाने व्यवस्थेत गोंधळ झाला तर जो जनक्षोभ होतो, तो समर्थनीय ठरतो व त्यासाठी जनतेला शांततापूर्ण आंदोलनाचा मार्ग खूला असतो. शिवाय पुढील निवडणूकीत ह्या सरकारचा पराभव करण्याचे हत्यार जनतेपाशी असतेच.
चौथा प्रश्न देशातील अल्पसंख्याकाच्या भावना दुखावतील का? हा प्रश्न काल्पनिक आहे. कारण अल्पसंख्याक ह्या देशात जितके सुखी आहेत तितके जगाच्या पाठीवर कुठेच नाही. आणि अल्पसंख्याक तरी कोणाला समजावे ? संविधाननुसार किती टक्के लोकसंख्या असावी म्हणजे त्याला अल्पसंख्याक म्हणून मान्यता मिळते ह्याचे उत्तर ज्यांना माहीत आहे, त्यांनी हा प्रश्न उपस्थित करू नये. संविधानात एखाद्या समाजाला अल्पसंख्याक मानण्यासाठी निर्धारीत लोकसंख्याचे जे प्रमाण आहे, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक लोकसंख्या मुस्लीम बांधवाची ह्या देशात आहे. काश्मीरमध्ये जे समाज अल्पसंख्याक आहेत त्याबाबत इतकी वर्षे अन्याय झाला आहे त्याचा कैवार घेण्यासाठी विरोधी पक्ष पुढे आले होते का ? काश्मीरी पंडीत निर्वासितासारखे इतर राज्यात स्थिर झाले. विरोधी पक्षांचा पराभव ज्या कारणांमूळे झाला त्याबाबत ते पुन्हा पुन्हा आपला आग्रह मांडत राहीले तर त्यांची राजकीय दृष्ट्या दिवाळखोरी झाली आहे असेच मतदार मानतील. विरोधी पक्षांना मिळेलेली मतें तरी आपल्या पेटीत यावी असे वाटत असेल तर त्यांनी ह्याबाबत उगीच प्रश्न निर्माण न करणे हे राजकीय शहाणपणाचे ठरेल.
पाचवा प्रश्न आंतराष्ट्रीय समूदाय काय म्हणेल? मी अनेकवेळा मांडत आलो आहे की विसाव्या शतकाच्या पुर्वार्धात जगभरात उदयास आलेली राष्ट्रवादाची कल्पना संपणारं नाही. आपल्या देशातील महापुरोगामी विचारवंत राष्ट्रवादाला व्यसन मानून आक्रमक राष्ट्रवाद म्हणत हिणवतात पण त्याला आधार काही नाही. त्यांच्या वैयक्तीक जीवनातील ऐषरामी सोयीसवलतीचा प्रश्न असतो. असे ऐकीवात आहे, की अमेरिका इराणला जेरीस आणण्याच्या तयारीत आहे. इजरायल व सौदी अरेबियाची अमेरिकेला साथ आहे. इजरायलच्या चारी बाजूने अरेबियन देशाचा विळखा आहे त्यामूळे इजरायला अरेबियन राज्ये आपआपसात भांडत असतील तर ते हवेच. एक दुसर्याचे भांडण लाभ तिसर्याचा हा व्यवहारीक दृष्टीकोन इजरायलचा असू शकतो. सौदी अरेबियाला इराण सुफी पंथीय मुस्लीमाचा देश असल्यामूळे तो सामर्थ्यवान बनू नये ही तगडी इच्छा. ह्या त्रिकूटाला इराणला जेरीस आणण्यासाठी पाकिस्तानच्या भूमीची तसेच तालीबानची ताकद हवी आहे. त्याबदल्यात अमेरिका काश्मीर प्रश्नात त्रयस्त पक्षाची मदत भारत-पाकने घ्यावी असा प्रस्ताव ठेवणार आहे. पाकिस्तानची तयारी न असायला कारण काहीच नाही. Beggars do not have choice. ज्यांनी स्वातंत्र्यानंतर दास्यच स्विकारले आहे त्या देशाबद्दल आपल्या येथील विचारवंतांना पुळका असेल तर तो पुळका नसून ही विचारवंत मडळी व राजकीय पक्षांचे नेते दास्य वृत्तीचेच असावेत. आपण कितीही राजकीय रित्या विरोधात असलो तरी आपण एक आहोत ही भावना सदैव मनात ठेवणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकारण आपल्या घराच्या अंगणात चर्चेला आणता येणारा सोपा विषय नाही. पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा, भाजपा, संघ ह्या संबंधी आपल्या मनात अडी असली तरी एक गोष्ट निश्चीतपणे स्विकारावी लागते ती म्हणजे जनमताचा कौल त्यांना मिळालेला आहे. आतापर्यंत आतंरराष्ट्रीय स्तरावरील राजकारणात आपल्या देशाला महत्वाचे स्थान ह्या मंडळीने मिळवून दिले आहे. काश्मीर संबंधी प्रश्न युनोत पुन्हा उभा करण्याची अमेरिकेची संभाव्य शक्यता जाणून तसा प्रयत्न अमेरिकेला करू द्यावयाची संधीच मिळू नये , ह्या हेतूने ३७० व ३५ अ ही कलमं गुप्तता पाळून तडकाफडकी रद्द करून टाकली असावीत. आता काश्मीर हा भारताचा केवळ वाचेने नव्हे तर कागदावर लेखी स्वरूपात अविभाज्य भाग झाला आहे. ह्या संबधीत कुठल्याही देशाला हस्ततक्षेप करण्याचा अधिकार युनो देऊ शकत नाही. राष्ट्रहिताच्या तसेच आतंरराष्ट्रीय पातळीवरील सामररिक दृष्ट्या संवेदनशील विषयासंबंधीचे निर्णय गुप्त रित्या घेणे हे आवश्यक असते. ते प्रत्येक देशाचे नैसर्गिक स्वातंत्र्य असते. देश स्वतंत्र राहीला तरच लोकशाही जिवंत राहते हे सामान्यज्ञान आहे.
ह्या निर्णयाने आतंरराष्ट्रीय समीकरणे बदलतील का असाही एक उपप्रश्न आहे. मी काही त्या विषयाबाबतचा तज्ञ नव्हे पण एकंदरीत जे वाटते ते असे आहे की आजही जगात साम्राज्यवादाची लालसा असणारे देश आहेत. प्रत्यक्षात युध्द आजच्या आर्थिक जगतात कोणाला ही परवडणारे नसले तरी सुध्दा आर्थिक दृष्ट्या महाशक्ती बनण्याचे स्वप्न कुठल्याही देशाला पडू शकते. म्हणून तर बडी राष्ट्रे शस्त्रात्रे विकण्याचा धंदा करीत आहेत. पण शस्त्रात्रे बनविण्याचे कसब इतर मित्र देश जे दुबळे आहेत त्यांना देतील का ? नाही. आपला देश शस्त्रात्रे बनण्यात स्वावलंबी होणे किती गरजेचे आहे हे आपल्याला समजू लागले ह्याचे श्रेय भाजपाला द्यावे लागते. विश्वशांतीच्या स्वप्नाळू अवस्थेतून आपण जागे झालो ह्याबाबतचे श्रेय माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनाही निश्चीत जाते. भाजपा व संघानेही इंदिरा गांधीच्या काही निर्णयाचे कौतूक केले आहे. म्हणून भाजपा सरकारच्या काही निर्णयाबाबत भाजपाला श्रेय देण्याचे औदार्य विरोधी पक्षांनी दाखवयास हवे. इराणला जेरीस आणण्याच्या प्रयत्नात इजरायल व सौदी अरेबिया अमेरिकेच्या सोबत असले तरी भारताशी असलेले संबंध ते मोडणार नाहीत. त्या त्रिकूटातही एकवाक्यता असेलच असेही नाही. अमेरिका भारताच्या विरोधी गेली तर युरोप, रशिया, जपान आस्ट्रेलिया, इराण आपल्या सोबत राहतील. इजरायल सुध्दा काश्मीर प्रश्नात भारतासोबत राहील. चीनला आजच्या घडीला पाकिस्तानात केलेली गुंतवणूकीची काळजी आहे. तिथे अस्थिरता निर्माण होणे चीनलाच जाचक ठरू शकते. फार तर आपल्या गुतूंवणूकीचे नुकसान होऊ नये इतपर्यंत चीन कार्यरत होईल बाकी बाबतीत चीन तटस्थ राहील.
शेवटचा प्रश्न आपल्या देशात ह्या संबंधीच्या प्रतिक्रीया कशा असतील ? देशभरातून सामान्यजनांकडून सरकार वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संघ परिवार सरकारच्या साहसाचे कौतूक निश्चीत करेल पण संयम बाळगा असा सल्ला ही देणार. आणिबाणी नंतरच्या निवडणूकीत काॅग्रेसचा पराभव झाल्यानंतर तत्कालीन सरसंघचालक पुजनीय बाळासाहेब देवरसांनी आणिबाणीतील कृत्याबाबत काॅग्रेसला क्षमा करा आणि देश हिताच्या कार्याला लागा असे जाहिररीत्या म्हटल्याचे मला आठवते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रहिताला प्राधान्य प्रथम देतो. काॅग्रेस सरकारने असा निर्णय घेतला असता तरी काॅग्रेसचे ही कौतूक केले असते. मला वाटतं पंतप्रधान मोदी ह्याबाबत देशाला उद्देशून भाषण देणार असतील तर ते ही संयम राखा असे आवाहन करीत जम्मू काश्मीर आणि लडाखच्या देशबांधवाचे राहणीमान उंचाविण्याचे आश्वासन देतील आणि त्या संबंधी विरोधकांचेही सहकार्य मागतील. विरोधकांनी आपल्याला विश्वासात घेतले नाही ह्याबाबत फार ताणून धरण्याची भाषा करू नये. सरकारचा हा निर्णय देशबांधवाच्या हिताचा समजून हा भाजपाने विजय मानू नये. आपण काही दुसर्या देशाचा प्रदेश जिंकलेला नाही हे सत्य जाणावे आणि ' सबका साथ सबका विकास, सबका विश्वास ' ह्या ध्येयाकडे लक्ष देत रहावे. ह्यातच सत्ताधारी पक्षाचे शहाणपण असते हे लक्षात ठेवले तर ते अधिक प्रशंसनीय ठरेल.
सोमवार, ५ ऑगस्ट, २०१९
घाऊक पक्षातंर व काॅग्रेस मुक्त भारत
बुधवार, ३१ जुलै, २०१९
31जूलै - एक क्रांतीवीरके बलिदानकी अनोखी कथा
भारत एक प्राचीन देश है | हमारी संस्कृती भी सबसे प्राचीन है | दुनियाके मशहूर इतिहास तज्ञ विली ड्युरांट कहते है, " मनकी विशुध्दता, परिपक्वता और व्यापकता सिखनेका है तो, दुनियामें सिर्फ एक ही देश है, और वह है भारत ! " लार्ड कर्झन, डाॅ ॲनी बेंझट और अनेक पश्चीमी तथा पौर्वात्य नेता और विचारवंतोने भारतकी गुरूकुल व्यवस्था तथा संस्कृतीका गौरव किया है | भारतकी एक असामान्य विशेषता यह थी और आजही कायम है, वह है, भारत शांतीप्रिय, सहिष्णू देश है और इसे किसी अन्य देशकी एक इंच भूमीकी भी लालच नही है | लेकीन मध्य युगके अंतिम चरणमें भारतकी अपार सहिष्णूताका अनैतिक लाभ विदेशी आक्रमकोंने लिया और भारतको एक हजार से अधिक वर्षतक गुलामी झेलनी पडी | ऐसा कहा जाता है की, 'युध्दमें जिता हुआ देश ही इतिहास लिखता है और पराजीत हुआ देशके वीरोंने किया हुआ पराक्रमकी गाथा को नजरअंदाज किया जाता है |' यही अनुभव अपने देशके अर्वाचीन (आधूनिक) इतिहास पढते है तो बार बार आता है | लेकीन सच यह है, की अनेक राजा-महाराजा, स्वातंत्र्यवीर, तथा क्रान्तीकारोंने देशके स्वतंत्रताके लिए संघर्ष किया है | किसीके हातमे सत्याग्रह और असहकार ऐसे शस्त्र थे तो किसीके हातमे समशेर तथा पिस्तोल जैसे शस्त्र थे | अपने समाजबांधवोंपर जिन ब्रिटीश अधिकारीयोंने अत्याचार किया, उनको कई क्रांतीकारकोंने चून चून करके रिव्हाॅल्वरसे मौतके घाट उतारा और भारत माता की जय करके फाँसी पर चढ गयें | उनमेसें एक अनोखा युवक क्रांतीकारका आज बलिदान दिन है | उसके साहस, पराक्रम तथा बलिदानकी यह कहानी है |
गरीब परिवारमे जन्म लिया एक बालक, अपनी उम्र तीन थी तब माताको खो बैठता है ; उम्र आठमे पिताको खो बैठता है ; वह बालक और उससे सिर्फ दो साल बडे भाईको एक संन्यासी उठाता है और अमृतसरके अनाथलयमे दाखिल करता है | अनाथालयमे दोनों भाईकी परवरीश अच्छी हो रही थी | पर एक दिन वह बालकमेसे बडा बालका भगवानको प्यारा हो जाता है | नियतीका खेल भी अजीब होता है |आपत्ती आयी तो चारों तरफसे आने लगती है | अब वह बालकके कोई रिश्तेतार जिवीत नही रहे थे | भगवान एक हातसे लेता है, तो दुसरे हातसे देता भी है, ऐसा ही कहा जाता है | अनाथोंका नाथ भगवान होता है | जल्दमे वह बालक जिंदगीका अर्थ समझता है | अनाथालयमें रहकर अनाथालयपर बोझ न बने इस भावनासे अनाथालयमें काम करना छुरू करता है | धिरे धिरे वह अनाथालयके व्यवस्थापनका एक आधार बन गया |
एक दिन उस अनाथालयके नजदिकी बागमे(वैसे तो बागसे ज्यादातर मैदान ही था) एक जनसभा हो जा रही थी | लोगोंकी भीड हुई थी | वह दिन बैसाखी उत्सवका भी था | इसिलीए वहाँ आम जनता भी अपने परिवारके साथ नजदिकके मंदिरमे भगवानका दर्शन लेकर बागमे इकठ्ठा होते रहे | जनसभा छुरू भी नही हुई थी | स्पुर्ती गायनका कार्यक्रम चल रहा था | वह युवक अनाथालयाके तरफसे लोगोंको पानी देनेका काम ऐसे इमानदारीसे कर रहा था की मानों सभी इकठ्ठा हो रहे समाजबांधव अनाथालयके अतिथी है | तब अकस्मात बागके चारों तरफसे फायरिंगकी आवाज आने लगी| लगभग सौ-सव्वासौ सिपाईके बंदूकसे एक ही सेंकद पर सौं से उपर गोलीयाँ बागमे बैठे जमावपर छूट रही थी | बच्चे-माता-बहने रो रहे, तो कोई पानी की पुकार करने लगे | तब नजदिकके अनाथालयका वह युवक बडी बालटी लेकर बागमे गया | पर वह पानी भी किसको दे ? चारों तरफसे गोलीयाँ बरसती थी | लोग इधर-उधर भागते अपनी जान बचानेकी कोशीश कर रहे थे | बागको सिर्फ एक गेट था, वहाॅसे भागनेकी कोशीश सभी कर रहे थे; वहाँ भी भिड हुई ; बडी अफरातफर मच गयी | सभामें तथा बैसाखी उत्सवमें शामील हुये जनसामान्योंको गोलीयोंसे कुचलना चालू था | बालबच्चे, माता-भगिनी, बुजूर्ग किसीको छोडा नही; लोग भागने लगे; पर रास्ता नही था ; कोई कुएमे कुद पडे, पर उनकी भी बचनेकी आकंक्षा नही थी | कोई अपराध नही, कोई चेतावनी नही, फिर भी तत्कालीन ब्रिटीश सरकार निष्पाप तथा निशस्त्र देशवासीयोंकीं बंदुकोंसे खुले आम कत्ल कर रही थी | अनाथालयके उस युवको भी गोली लगी | लेकीन हिम्मतसे जान बचानेकी कोशीश करता रहा, बाहें पाँवमेंसे खून बहता था , दाहें पाँवपर जोर लगाकर सभास्थानसे बाहर पडता है और दौडते दौडते बहूत दूरतक आता है | एक पेडके नीचे ठहरता है | जमीन पर बैठता है , हाथसे मिट्टी उठाता है , अपने ललाटपर तिलक लगाता है और प्रतिज्ञा करता है, ' मै इसका बदला लूंगा | मै जरूर बदला लूंगा | माँ मुझे साहस दे, माँ मुझे शक्ती दे, माँ अब मुझे आशिर्वाद दे |'
देवी और सज्जनों, उस युवकने देखा हुआ अमानुष नरसंहारका दृष्य कहाॅका था ? मैने बचपनमे जागृती नामका एक चित्रपट देखा था | उसमे कवी प्रदीपने रचा हुआ और खुदने गाया हूआ, गीतके स्वर,सूर धून आज भी कानोमे गूंजती है | उस गीतकी वह पंक्तीयाँ ऐसी है --
जालीनवाला बाग देखो यहाँ चली थी गोलीयाँ, ये मत पुछो किसने खेली यहाँ खूनकी होलीयाँ, एक तरफ बंदूकोंकी दनदन एक तरफसे डोलीयाँ, मरनेवाले बोल रहे थे इन्कलाबकी बोलियाँ | यहाँ लगा दी बहनोंने भी, बाजी अपनी जानकी, इस मिट्टीसे तिलक लगाओ धरती है बलिदानकी | वन्दे मातरम्, वन्दे मातरम्, वन्दे मातरम् ||
देवी और सज्जनों यह घटना १३ एप्रील १९१९ की है | जो सभा स्थान पंजाब प्रांतके अमृतसर शहरका था | उस बागकी मालकी एक जली नामके सद्गृस्थी की थी | इसिलीए उस बाग की पहचान जलीयनवाला बाग हुई | बागको सिर्फ एक प्रवेशद्वार था और वह भी चौडाईमे बहुत कम याने लगभग चार फीटका होगा | बागके चारो तरफसे दस फीट के उचीं दिवारे थी | इससे ही हम अंदाज लगा सकते है की कितने अमानूष नरसंहार ब्रिटीश सरकारने किया था | लगभग पधरासौ से अधिक लोग जख्मी हुये, 331 प्रौढ तथा 41 बालककी मृत्यु हुई थी | दुनियासे हर कोनेंसे ब्रिटीश सरकारकी अलोचना हुई | यह घटना दुनियाके इतिहासके काले पन्नेपर लिखा गया था | वैसे तो अंग्रेजके ऐसे काले कारनामें दुनियाके हर कोनेंमे लिखे हुये है | खुदको सभ्य, न्यायी, सुसंस्कृत ऐसे विशेषतायें चिपकाकर हमारे देशबांधवोंका इस तरह अमानुषतासे संहार करेनेका अंग्रेज अधिकारीयोंको हक कहाँसे आया ? हक, साफ झूठ ! वह तो इंग्लडकी साम्राज्यवादी लालसाकी प्यास बुजानेकी जंगली मनिषा तथा पहले महायुद्धमें हुई जीतकी घमेंडी थी | हिम्मत इतनी थी तो अंग्रेज सरकार और अधिकारी स्वराज हमारा जन्मसिद्ध हक है ऐसी पुकार करनेवाले लोकमान्य तिलकजीसें इतने डरतें क्यों थे ? क्यों बार बार लोकमान्य तिलक, स्वातंत्र्यवीर सावरकर तथा अन्या भारतीय क्रान्ताकारोंको जबरन सजा देनेपर इतने उतावले होते थे? सच यह है की अंग्रेजको अपना 1857 का पहला स्वतंत्रताका संग्रामका इतना भय था की फिर कहीं इससे बडा तुफान भारतीयोंमे न आये, इसिलीए खुद अंग्रेज सरकारने 1885 राष्ट्रीय सभा (काॅग्रेसकी) स्थापना कियी | बादमें बस मिठी मिठी बातें मुहपर रखकर भारतीय समाजको विभाजीत करनेकी चाल छुरू कियी | 1857 का स्वतंत्रताका युद्ध हम हार गये लेकीन उस संग्रामसे और लोकमान्य तिलक, लाला लजपतराय, तथा बिपीनचंद्र पाल की जहाल भूमिकासे संस्कार और प्रेरणा लेकर भारी संख्योमे भारतीय वीरोंने अंग्रेज सरकारके खिलाफ सशस्त्र मुकाबला किया है | उनमे वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, सावरकर बंधू, भगतसिंह, चंद्रशेखर आझाद, सुखदेव, राजगुरू, बटूकेश्वर दत्त, भगवानदासचरण वोहरा, मदनलाल डींग्रा ऐसे ज्ञात और कई अनेक अज्ञात क्रांतीकारकोओं ने अपना क्षात्रतेज, साहस और पराक्रमका परिचय दिखाकर अंग्रेज सरकरके नाकमे पानी लाया था | ऐसे क्रांतीकारकोंके बलिदान का स्मरण करना यह हमारा फर्ज है | देवी और सज्जनहो, जालीयानवाला बागके हत्याकांडको गये १३ एप्रिलको सौ साल पुरे हुये है | इसी हत्याकांडका बदला लेनेवाले भारत माताका एक सुपुत्र, युवक क्रातीकारक सन 1940 में आजके दिन ही फाँसीपर चढ गया था | उसके पराक्रमको अभिवादन करनेके लिए आजके जैसा उचीत दिन कौनसा हो सकता है ?
वह युवक का नाम है क्रान्तीवीर शहीदे आजम उधमसिंह | उसका जन्म २६ डिसेंबर १८९९ पंजाबके संग्रुर जिल्हाके सुनाम गावमे हुआ था | माता- पिता गरीब थे | एक बडा भाई था | नाम था साधूसिंग | उस दोनो अनाथ बालकोंको चंद्रसिंह नामके एक संन्यासीने उठाया और अमृतसरके अनाथालयमे दाखिल किया | बडे भाईका भी आधार टूट जानेके बाद उधमसिंहने अपनी हिम्मत नही खोयी और धिरे धिरे उसी अनाथालयकी सेवाको ही अपनी गृहस्थी मानी और अनाथालयका एक सच्चा कार्यकर्ता बन गया | जलीयनवाला बागमें अंग्रेज सरकारने अपने देशवासीयोंका किया हुआ संहारके प्रतिशोधकी आग उधमसिंहको चैनसे बैठनै नही देती थी | उसने अनाथालयमे वापस न जानेका फैसला लिया | रोटी और कपडाकी जरूरतके लिए मजदूरी करने लगा, साथमे रातको वाॅचमनकी नौकरी लियी | दिन-रात मेहनत करने लगा | वह पक्का जानता था कि खाली थैली खडी नही रहती है | अपार कष्ट करके पैसा जमाकर, उसने किरायापर एक गाला लिया | वस्तू भांडारका दूकान डाला | अब पैसेकी भी आवक बढी | आसपासके परिसरमे उसे आदर मिलना छुरू हुआ, अब हिम्मत बढी | जालीयनवाला बागके हत्यांकाडका प्रतिशोध की बात वह खुले आम करने लगा | प्रायव्हेट क्लासमे जाकर प्राथमिक शिक्षा भी पुरी कियी | अपने देशमे सिर्फ व्यापारके हेतूके लिये आये , अग्रेंजके एक हजार सैनिकके सामने अपना समाज प्लासीके युद्धमे हार गया, इस इतिहासको अब उधमसिंह अच्छी तरहसे जान चूका था | समाजके सिर्फ एक वर्गको (क्षत्रिय) हत्यार रखनेकी प्रथा, अपने राजा-महाराजके ऐष वृत्ती और आपसमे वैर, जात-पातमे बटा हुआ समाज, प्रशासन, पोलीस और सेनादल मे अंग्रेजोकी चाकरी कर रहे अपने समाज बांधव, अंग्रेजकी संस्कृतीको अच्छा समझकर अपने संस्कृतीके बारेमे हीन भावना रखनेवाली नयी पिढी, पोलीसको क्रांतीकारकोकी गतीविधीयाँकी वार्ता देनेवाले जासूद भी अपनेही बांधव, जलीयानवाला बागमे नरसंहार करनेवाला पुलीस दलमें अपने ही लोग, यह सारी बातें उधमसिंहके मनको उद्विग्न करती रही |
उधमसिंहकी शिक्षा तो प्राथमिक स्तरके थी, पर कम उम्रमे नियतीके खिलाफ खेली हुई लम्बी लढाईसे मिला काफी अनुभवसे तथा व्यापारी बननेके बाद मिली हुई चतुराईसे उसे मालूम हुआ की, उसपर भी पुलीसने नजर रखी है | अब उसने दुकानपर एक भरोंसेमंद नोकर रखा | दोपहरको खाना खानेके बहाने वह दुकानसे बाहर पडता था, पर मिलने जाता था क्रांतीकारोंको | राष्ट्रीय वाःडमय तथा वृत्तपत्रे पढना छुरू किया | छुपके, छुपके भगतसिंगसे भी मिलना छुरू हुआ | भगतसिंगके कहनेपर आफ्रिखा मे जानेकी योजना बनायी | अपना अच्छा खासा दुकान बेच दिया | दुकान और उससे मिलनेवाली आमदनीकी उधमसिंहको किधर आसक्ती थी ? उसने पैसा कमाया पर खुदको भौतिक सुख मिलानेके लिए थोडी कमायी थी ? इतना साधा और सामान्य ध्येय ऊधमसिंहका नही था | मनमे जलती हुई प्रतिशोधकी आग और उच्च प्रतीकी राष्ट्रभक्तीकी ज्योत के आधारपर उधमसिंहने फेक पासपोर्ट बनाया और आफ्रीखा चला गया | भारतीय क्रान्तीकारोंकी एक गदर नामकी संघटना थी जिससे उसने खुदको जोडा था | आफ्रिखामें जाकर भगतसिंगने जैसा कहा था वैसे ही गदर संघटनाके प्रमूखको मिला | दुनियाके सामरिक शक्ती तथा आर्थिक शक्तीके रूपमे उस समय इंग्लड एक सुपर पाॅवर थी | आफ्रिकामे जाकर गदर संघटनाके प्रमूखको छुपछुपकर मिलना यह एक तरह जीवन ही दाँवपे लगाना जैसा था | हर पलपर हर कदम पर मृत्युकी छाया पडती थी | लेकीन कहा जाता है ना, God help those who help themselves. आखिर भगतसिंगने जैसा बताया था, वहाॅसे शस्त्रात्रे लेकर उधमसिंह आफ्रीखासे वापस देशमे लौटकर आया ; लेकीन अपना नाम बदलकर ; अब वह बन गया था ' बाप्या ' |
देवीयों और सज्जनों , उधमसिंह आफ्रीकामे कैसा गया, गदर नामकी भारतीय क्रांतीकारकी संघटना कैसी थी, किसने बनायी थी, भारतीय क्रांतीकारकोंका नेटवर्क, इन सब बातोंकी जानकारी स्वातंत्र्यवीर सावरकरके 'स्पूट लेख ' नामके एक मराठी किताबमे रखी है, आप जरूर इसे पढे | दुनियाके सभी देशमे भारतीय क्रांतीकारोंका एक अच्छा खासा नेटवर्क था | इस इतिहासको हमें ना कभी पढाया गया, ना पढनेके लिए साहित्यकी उपलब्धी की गयी | इंग्लड एक सुपर पाॅवर थी, पर इंग्लडके साम्राज्यवादी नीतीयाँके विरोधमें कई देश थे | वैसे तो मानवके साम्राजवादकी लालच का इतिहास सदियों पुराना है | समय समयपर बडे देशके अंदर टकराव और सुपर पाॅवरकी स्पर्धा चलती रही है | इसिका फायदा लेकर भारतीय क्रांतीकारकोंने कई देशोंके प्रमुखओंसे रिश्ता बनाके रखा था | भारतीय स्वतंत्रताकी लढाई सिर्फ देशके भीतर अंग्रेजके खिलाफ राष्ट्रीय सभाके कार्यक्रम, आंदोलन, असहकार तक सिमीत नही थी | क्रांतीकारोंकी चतुराई, उनका साहस, पराक्रम, देशको आझाद करनेमे खासा अच्छा योगदान रहा है |
उधमसिंह आफ्रिखासे बाप्या नाम लेकर वापस तो आया पर पुलीसके जासूदने (जो भारतीय ही था) उधमसिंहकी गतीविधीयाँकी जानकारी सरकारके पास पहूँचायीं | ३० ऑगस्ट १९२७ मे बाप्या याने उधमसिंहको आखिर पुलीसने हिरासतमे लिया | उधमसिंहको पाच सालकी कारावास सजा हुई | पाच सालके बाद उधमसिंह जेलसे बाहर आया | देशके स्वतंत्रताके लिए संघर्ष करनेवाले और कारावासमे जाकर बाहर आये हुये उधमसिंह पर भारतीय समाज गर्व महसूस करने लगा | अब लोग उन्हे उधभसिंहजी ऐसे संबोधन करने लगे | जैसे ही उधमसिंहजी जेलसे वापस आये तो उन्हें पता चला की भगतसिंहको फाँसी दि गयी थी | इस बातसे उधमसिंहजींके क्रोधकी आग मस्तकमें गयी | लेकीन दिलमे राष्ट्रभक्तीकी ज्योत मस्तकको शीतल बनाती थी, और ध्येयपर अटल रहनेकी ताकद भी दे रही थी | उधमसिंहको जेलसे रिहा होनेके बाद एक दुसरे घटनाकी खबर मिली, वह थी, जलीयानवाला बागमे अपने समाजबांधव, माता- बहनों, बाल-बच्चोंका नरसंहार करनेवाले जनरल डायर मर चूका था |
जनरल डायरको आंतरराष्ट्रीय दबावके वजहसे अंग्रेज सरकारने सेवासे बरखास्त किया था | उसे ब्रिटनमें वापस बुलाया गया था | उसके कृत्यपर एक इन्क्वायरी समिती गठीत हुई | पर वह इन्क्वायरी समितीने जनरल डायरको बाइज्जत रिहा किया था | लेकीन जिस तरह जनरल डायरकी मौत हुई उसकी जानकारी मिलनेके बाद ' नियती की भी अपनी स्वतंत्र न्यायव्यवस्था है ' इस बात पर उधमसिंहजीका विश्वास हुआ | जनरल डायर अपने कर्मोंसे ही मर गया | गावमें जैसे ही निवृत्तीका जीवन बिताना छुरू करता है, जनरल डायरको एक के बाद एक बडी बिमारीयोंने पकड ही लिया | ऐसी बिमारीयाँ मानो जलीयानवाला बागके नरसंहारके दृष्कृत्यका नियती उससे हिसाब चूकाती
थी | बिमारियाँ भी इस तरह उसे त्रस्त करती रही जैसे वह नरक की जिंदगी जी रहा था | पहले जाॅन्डीसकी बीमारी, बादमे हार्टकी, उसके बाद पॅरालायझेस ! लगभग पाँच साल बिमारीसे परेशान होकर 10 जुलै 1926 मे वह अपने बहूसे बोला, " बहूँ ,अब प्रभू मुझपर दया करें तो अच्छा होगा, मैंने भारतके जालीयनवाला बागमे हत्याकांडका पाप किया, अब मुझे मेरा तिरस्कार हो रहा है, मैंने वह पाप किया अच्छा नही किया | " उस दिनसे तेरह दिनके बाद जनरल डायरने दम तोडा | जनरल डायरकी बिमारीयाँ और परेशानीवाली मौतकी वार्तासे उधमसिंहके मनको थोडीसी क्यों न हो शान्ती मिली | वैसे तो उधमसिंहको जनरल डायरसे अधिक गुस्सा गव्हर्नर मायकेल ओडावायर पर ज्यादा था | क्यों की, उन्होंने जालियनवाला बागमे उपस्थित देशवासियोंपर गोलीयाँ उडानेका आदेश दिया था | उधमसिंहजीका पहला लक्ष्य मायकेल ओडवायरको ही उडानेका था | इसिलीए वह बेचैन था |
भगतसिंगके बलिदानके बाद ब्रिटीश सत्ताके हीट लिस्टपर अब उधमसिहंजी का नाम था | फिर वेष, नाम बदलकर उधमसिंहजीने देशसे पलायन किया और इजिप्त गये | अब वह गव्हर्नर ओडवायरको खत्म करनेकी प्रतिज्ञा करके ही देशके बाहर निकल पडे थे, और ओडवायरको खत्म करनेके बाद ही देशमे वापस जाना तय किया था | क्योंकी ओडवायर पर जालियानवाला बागके हत्याकांडका ना इल्जाम था, ना कोई उन्हे हत्यारा मानता था | ओडवायर रिटायर्ड होकर इंगलंडमे शौकसे जिंदगी गुजारता था | उधमसिंहजीने इजिप्तके बाद ॲबेसिनीया, रशिया, फ्रान्स, जर्मन ऐसे एक के बाद देशोमे स्थित भारतीय क्रांतीवीरोंओंसे सलाह-मशहुरा लेनेकी कवायत छुरू कियी | वैसे तो दुनियाके कई देश ऐसे थे जो इंग्लडके साम्राज्यको कमजोर करनेकी मनिषा रखते थे | और उसी देशमें भारतीय क्रान्तीवीरोंका नेटवर्क मजबूत था | १९३६ से१९३९ तक उधमसिंहजीने नाम बदलकर तीन बार युरोप का प्रवास किया था | जर्मन रेडीओ के अधिकारी अब्दूल रहिमान से मिले, रशियाके ताश्कंद, तथा जिनिव्हा निर्वासित देशभक्त सरदार अजितसिंगसे भी मिलकर आये थे | १९३७ मे ईस्ट लंडनके गरीब वस्तीके १५, आर्टीलरी पॅसेजमे एक ८० उमरके अजितसिंहके साथ रहने लगे | जिन देशोंमें जाकर उधमसिंहजीने सैनिकी अधिकारीयोंसे और भारतीय क्रांतीकारोंसे वार्तालाप किया था ,उन्हीसें बहूत नये ढंगके पिस्तूल भी लाये थे | लेकीन ८० उमरके अजितसिंह को भारी गुस्सा आया था लेकीन उसने उधमसिंहजीको अपना गुस्सा दिखाया नही | जब उधमसिंहजी कुछ कामके लिए बाहर गये थे, तो उसने उधमसिंहजीकी शस्त्रोंसे भरी हुई बॅगको टेम्स नदीमें फेंक दी और उधमसिंहजींको घर छोडनेको मजबूर किया |
फिर भी उधमसिंह विचलीत नही हुये | वह जगह उसने छोडी और दुसरे जगह रहने गये | वहाॅ महाराष्ट्रके पुने शहरसे प्रकाशित होनेवाले केसरीके वार्ताहार दत्तोपंत ताम्हणकरसे मिलना छुरू किया | कुछ दिनके बाद उधमसिंहजीने जिसको मारना था उस गव्हर्नसे भी दोस्ती की | कितना बडा साहस और कितनी बडी चलाखी ! जब जब उधमसिंहजी ओडवायरको मिलते थे, तब वह जरूर मनही मनमे बोलते रहे होगे, गव्हर्नर साहब, अब मैं तुम्हें खत्म करूंगा, तब जमीन तुम्हारी होगी और सुरक्षा दल भी तुम्हारा होगा लेकीन इस बार पिस्तोल मेरा होगा और निशाना भी मेरा रहेगा | अब उधमसिंहजींने उँची कपडे परिधान करना छुरू किया | शिक्षा, पढाई करनेके उम्रमें नियतीद्वारा वंचीत रहे उधमसिंहजीने अबतक सफाईसे अंग्रेजी भी बोलना सिख लिया था | अपने ध्येयको साकार करनेके लिए उधमसिंहजींने अपने ध्येयको ही गुरू बनाया था | उधमसिंहजी हर रोज ओडवायरके घर चायपान करने लगे | ओडवायरने बातों बातोंमे जलीयानवाला बागके हत्यांकाडके समर्थनपर बातें भी कियी | ओडवायरको शक भी नही आया की वह उसके मौतके साथ दोस्ती करके बैठा था |
एक दिन ईस्ट इंडीया असोशियन ॲन्ड राॅयल एशिया सोसायटी द्वारा कॅक्सटन हाॅलमे एक सभाका आयोजन था | उस सभामें प्रमूख अतिथी लार्ड झेंटलंड और गव्हर्नर मायकल ओडवायर इन दोनोंको भाषण था | अब ओडवायरके खास दोस्त बने उधमसिंहजीको उस सभामे स्पेशल पास मिलना तो मामूली बात बनी थी | दिन था १३ मार्च १९४० | बस वही दिन मायकल ओडवायरका खात्मा करनेका उधमसिंहजीने अपना मन बनाया | दोपहरको ही उधमसिंहजीने एक नया सुट खरेदी किया, सिर पर फेल्ट हॅट, नया सुटमे रिव्हाल्वर, चार मॅगेझिनमें पचीस काडसूतें और यदि यह काममें न आये तो बडा चाकू पॅन्टमे डालके शामको चार बजे उधमसिंहजी उस कॅक्सटन हाॅलमे पहूचते है | मुख्य अतिथी लार्ड झेंटलंडका, लार्ड लॅमींग्टनके साथ सभागृहमे आगमन हुआ | तालीयोंसे उनका स्वागत हुआ और दोनो नेता मंचपर बैठ गये | गव्हर्नर ओडवायर सभागृहके पहले रोके बाहे कोनेसे आखिर आसनपर बैठे थे | उधमसिंहजी ओडवायरसे थोडी दूरी पर थे | सभा छुरू हुई | सभा समाप्त हुई | लार्ड झेंटलंड, लार्ड लॅमींग्टन, मंचसे उतरे और पहले रो मे बैठें गव्हर्नर ओडवायरके पास आकर हस्तालांदोन करने लगे तब उधमसिह॔जीने पिस्तूल चलाया | एक के बाद एक ऐसे छ गोलीयाॅ ओडवायरपर चलायी | हाॅलमे अफरातफर हुई | श्रोता लोग हाॅलके बार निकलनेकी जल्दबाजी कर रहे थे | तब उधमसिंहके पिस्टोलसे निकली दो गोली गव्हर्नर ओडवायरके पीठमे घुसके सिधे बाहर निकली | वह जमीनपर गिरा और तात्काल नरकमे पहुच गया | दो गोलीयाँ लार्ड झेंटलंडको लगी वे भी जमीनपर गिरे, एक गोलीसे लार्ड लॅमीन्गटनको और एक गोली सर लूई डेनको लगी, दोनों एक हातसे अंपग बने | लार्ड झेटलंटको अस्पतालमे दाखिल कराया | क्या हो रहा है इस बातको, हाॅलसे बाहर निकलनेवाले श्रोताओंको समझनसे पहले उधमसिंहजी अपना काम पुरा करके हाॅलसे निकल पडे थे | सन 1909 मे स्वातंत्र्यवीर सावरकरके शिष्य मदनलाल डिंग्राजीने सर वायलीको जिस हाॅलमे मौतके घाट उतारा था, उसी हाॅलमे उधमसिंहजीने गव्हर्नर ओडवायरको खत्म करकर ब्रिटन जैसे महशक्तीको हिला दिया |
उधमसिंहजी हाॅलसे पर बाहर निकले और भागते रहे लेकीन चारों तरफसे पुलीसकी यंत्रणा काममे लगी थी | आखिर वह गिरफ्तार हो गये | दुसरे दिन दुनियाभरमके सभी वृत्तपत्रमें उधमसिंहजीका साहस और पराक्रमकी वार्ता फ्रंट पेज पर छपी गयी | अमेरिकन लेखक अपने बर्लीन डायरीमे लिखते है की गांधीको छोडकर सभी हिंदी लोग ओडवायरका वध यह एक दैवी प्रतीशोध मानते होगे | ' जर्मन वृत्तपत्रने हेडलाईन दि ' हिंदी लोगोंपर अत्याचार करनेवाले नराधम सत्ताधीशका खात्मा |"
बादमे इस घटनाका पुलीस पंचनामा तथा इन्क्वायरी हुई | सबूत एकठ्ठ होकर न्यायालयामे उधमसिहजीके खिलाफ दावा पेश हुआ और सुनावणी हो गयी | न्यायालयमने उधमसिंहजीको उनका निवेदन करनेको कहा तब उधमसिंहजीने न्यायालयमे कहा, " मै मौतसे कभी डर नही गया | जल्द ही मेरा फाँसीसे ब्याह होगा | इसका मुझे दुःख नही है , क्यों की मै मेरे मातृभूमीका एक सिपाई हूँ | ब्रिटीश सरकारने हमारे समाजबांधवोपर अमानुष अत्याचार किये है | अमृतसरमे जनरल डायरने निष्पाप बाल-बच्चे, माता-भगिनी, युवा बुजूर्गोंकी खुले आम कत्ल की है ,इसे मैंने मेरे आँखोंसे देखा है | जनरल डायरने गव्हर्नर ओडवायरके निर्देशसे यह हत्याकांड किया है | एकीस साल मेरे मनमे उस हत्याकांडसे प्रतिशोधकी आग लगी हुई थी | इसिलीए मैने ओडवायरका खात्मा किया | रौलट जैसे काला कानूनके खिलाफ आंदोलन करनेवालोंको उसने घसीटकर मारा, पिटा, जेलमें बंद करके खुले आम दशहत बिठानेकी कोशीश की थी | वह खूनका प्यासा था , एक शैतान था | इसी तरहसे उसको मौत आना जरूरी था | वह मेरा परम कर्तव्य था | यदि मै ओडवायरको खत्म न करता तो हिंदुस्थानपर एक दाग रह जाता | मेरे मातृभूमीके हितके लिए मुझे फाँसी होना इससे बडा आनंद किसमे मिल सकता है | "
न्यायालयने उधमसिंहजीपर लगे आरोपोंसंबंधी ब्रिटीश सरकारके तरफसे दिये हुये सबूतको स्विकार करके उधमसिंहजीको फाँसी की शिक्षा सुनाई | ' यह निर्णय सुनकर उधमसिंहजी थोडेसे भी विचलीत नही हुये | उल्टा उनके मुखपर एक समाधान की चमक दिखी | न्यायालयके निकाल के पुर्व उधमसिंहजीने 42 दिनका फास्टिंग किया था ' ऐसी जानकारी केसरी वृत्तपत्रके लंडनके वार्ताहार दत्तोपंत ताम्हाणेंने दियी | जहाँ मदनलाल डिंग्राजीको फाँसी दिया था उसी कारागृहमे उधमसिंहजीको 31 जूलै 1940 को फाँसी दिया गया | क्रान्तीवीर उधमसिंहजीको मेरे कोटी कोटी प्रणाम |
हर क्रान्तीकारके बलिदानके दिनपर हम उनके बलिदानका स्मरण करें तथा उनके जीवनगाथाका पारायण करे तो हमें सदाकाल प्रेरणा मिलती रहेगी, ऐसा विश्वास व्यक्त कर मै इस दिर्घ कथा-कथनको यहाँ विराम देता हूँ |
गुरुवार, २५ जुलै, २०१९
कर्नाटकातील सत्तेचा खेळ
दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)
गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...
-
मंडळी, मागील लेखात आपण असुरक्षिततेच्या भावनेपोटी, मनुष्य समूहात राहू लागला आणि नंतर समाज व्यवस्था उभी राहीली, हे पाहिलं. त्याच लेखात स...
-
आज जेष्ठ शु१३ शके १९४२ शिवराज शक ३४७ गुरूवार दिनांक ४जून २०२०. आजच्या दिवशी म्हणजे जेष्ठ शु१३ शके १५९६ अर्थात ६ जून १६७४ रोजी शिवाजी महार...
-
अलीकडे Whats App वर एक पोस्ट आली. ती अशी आहे, "Desires dictates our priorities, priorities shape our choices, and choices determi...




