हे पाहा पशू ! मनुष्याच्या सेवेला आणि सुखाला हवे तसेच विविध, हवे तितकेच बुद्धीमान ! वाळवंटातील वाहन म्हणून त्या उंटास महिनोगणती पाण्यावाचून चालण्याची युक्ती परमेश्वरानी दिली आहे. तो घोडा किती चपळ ! त्याच्यावर स्वारी करून माणसाला रणागंणात त्याने सांभाळले. आज ही अनेक ठिकाणी आपल्या पाठीवर घेऊन किंवा टांगा ओढत तो घोडा माणसास एका ठिकाणा वरून दुसर्या ठिकाणी सुखरूप घेऊन जात असतो. त्याच्यात ती शक्ती व तितकीच समज निसर्गानेच त्याला प्रदान केली आहे
ना ! ती पाहा गाय ! एका बाजूला सूके गवत खाते व दुसर्या बाजूने जीवनप्रद असे दुध देते. ती गाय स्वतः दुध पिते का? नाही. आपल्या संस्कृतीत तिचे नावच गोमाता ठेवले आहे. तिचा महिमा आपल्या सर्वांना ठाऊक आहे.
एक आंबा ! रसाने, स्वादाने, सत्वाने किती भरलेले ते देवफळ. ते इतके सुपिक की खाऊन झाल्यावर त्याचा भाटा रूजविला की वृक्ष होऊन प्रतिवर्षी हजारो आंबे लागावे असा क्रम वर्षानुवर्षे चालला आहे. बरं सगळे आंबे भाट्यासकट खाऊन टाकले तरी झाडाच्या फांद्यांच्यी कलमे करून रूजविली की आंब्याच्या निर्मीतीत खंड पडणार नाही अशी ही आणखिन सोय व व्यवस्था दयाळू निसर्ग देवाने केलेली ! एक बी पेरली की एका पिढीस सहस्त्रावधी फळे देणारी ही फळझाडे ! हे फणस, पपनस, नारळ, द्राक्षे, डाळींबे ! डाळींबे फोडले की त्यातून परमेश्वराचे कसब प्रगट होते. डाळींबीचा रंग च मोहक ! त्यातील दाण्याची किती उत्तम आणि
आकर्षक मांडणी ! चव काही औरच ! डांळीबं तयार करण्याचा कारखाना विज्ञानाला काढता येईल का ?
गवतासारख्या उगव म्हणताच, उगवणार्या रूचकर बहुगूणी, विविध रसाने भरलेल्या शाकभाज्या फळभाज्या, यांचा तोटाच पडू देणार नाही, अशी मायाळू आपली भूमाता. ज्याचा गाभाच गोड आहे तो साखरेच्या पाकाने ओतप्रोत भरलेला ऊस देखील इतका पिकतो की त्याच्या मळेचे मळे नकोसे झाले तर प्राण्यानांही खाण्यास हरकत ठेवली नाही. ' बोरी भाबळी उगाच जगती ' असे आपण म्हणतो परंतु त्या भाबळीच्या खाली पाण्याचा स्त्रोत असतो. बरं धान्य, फळे शाकभाज्या देऊन भूमाता थांबते का ? आपल्या गर्भातून अनेक धातू, खनिजे, रसायने, आपणांस प्राप्त करून मानवी जीवनाला एक वेगळं परिमाण ही तिनेच दिले आहे. वेगवेगळ्या हवामानानुसार त्या त्या भागात राहणार्या माणसांच्या शरीर रचनेला साजेशी अशी पिके कशी देते हे फक्त तो सृष्टीचा नियंताच जाणो !
नाना प्रकाराचे, नाना आकाराचे किटक पक्षी ही माणसास काहीतरी शिकवण देत असतात. ते ही जणू विद्या व कलेचे उपासक आहेत. भिंतीवर जाळे विणत असतांना अनेक वेळा अपयशी होऊन शेवटी टोकाला पोहचून यश मिळविणार्या कोळ्यापासून इंग्लंडचा पराभूत झालेल्या राजाला प्रेरणा मिळाली आणि आपल्या शत्रूचा त्याने पराभव करून गमाविलेले राज्य परत मिळविले. मुंग्या, मधमाश्या अशा किटकांडून दिर्घोद्योग व परस्पर समन्वय राखत जीवन कसे जगावयाचे याचा पाठ आपण शिकतो. अनेक पशू-पक्षी व किटकांच्या हालचाली, किंकाळ्यातून भूकंपाची पूर्व सूचना देत असतात. पण सर्वांभूती लीन व्हावे अशी संताची शिकवण आपण पाळतो कुठे ?
दुपारचे ऊन मी मी म्हणत असते तेव्हा आपल्याला मायेने सावली देणारे वृक्ष म्हणजे निसर्गातील जणू संत च ! दिवसा प्राणवायू सोडून रात्री कार्बनडाॅय ऑक्साईड शोषून घेणारे वृक्ष म्हणजे ईश्वराने याच्चवत प्राणीमात्रांचे जीवन जगण्यास जन्मास घातलेले परोपकारी महाॠषीच की ! कसलाच अंहकार नाही.
वृक्ष फार लवती फलभरे |
लोबंती जलद घेऊन नीरे ||
थोर गर्व न करी वैभवाचा |
हा स्वभाव उपकाराचा || वृक्षवेलींचे नव्हे तर संपूर्ण सृष्टीतील याच्चवत घटकांचे औदार्याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच राहिले नाहीत. निसर्ग मानवाची भूक भागवितो, तहान शमवितो, वायूलहरींनी श्रमपरिहार करतो.अन्न वस्त्र आणि निवारा देतो. चौसष्ट विद्या व कला शिकवितो. कवी वडस्वर्थ म्हणतो, " Nature is greatest storehouse of wisdom apart from being source of etarnal happiness." (निसर्ग केवळ ऐहीक सुखाचा एक स्त्रोत नसून शहाणपणाचा एक खजिना आहे) पण----
आपणच ऐहीक सुखाच्या नादी लागून पर्यावरणाचा र्हास करीत आलो आहोत. महात्मा गांधीजींनी म्हटले आहे की " माणसांच्या गरजांची पूर्तता करण्याइतकी क्षमता निसर्गात निश्चीत आहै. पण लालसा पूर्ण करू शकणार नाही." आपण या सृष्टीचा एक छोटासा घटक आहोत. परंतु हे विश्व, ही सृष्टी आपली नव्हे. मानव नव्हता त्याच्या कितीतरी हजारों वर्ष सृष्टी होती व आपण नसणार तेव्हा ही असणारच. आपण विश्वाचे मालक नव्हतो व नाही. असलोच तर थोड्या अंशी विश्वस्त ! ही भावना सतत बाळगून आपले वर्तन ठेवणे म्हणजेच स्वतःपासून पर्यावरणाची जागृती सुरू करणे होय. अन्यथा " मानवाचा मूलभूत विकास झाल्याशिवाय वैज्ञानिक प्रगती मानवाच्या पचनी पडणार नाही " असे जे भाकीत प्रख्यात विचारवंत बर्टाड रसेल यांनी केले आहे ते खरें ठरू शकते.
--------------------------------------------
पर्यावरण प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे. जगातील सारे वृक्ष माझे बांधव आहेत. त्या वृक्षांवर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या निसर्ग सौंदर्यांचा मला अभिमान आहे.
या निसर्गातील गोष्टींचा पाईक होणाच्या पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. माझ्या देशातील वृक्षांचा, नद्यांचा, भूमीतील सर्व घटकाचा मी मान ठेवीन व त्यांचा अपव्यय होणार नाही याची काळजी घेईन. माझा देश व त्यातील नैसर्गिक घटक यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्याची वृध्दी व संरक्षण हे माझे आद्य कर्तव्य आहे.
---------------------------------------------
कविता
निसर्ग आणि मानव
बाळपणीचा काळ जणू निसर्गाची सकाळ | आप्तस्वकीयांचा प्रेमाने जीवनाला वळण लावण्याचा काळ ||
गृहस्थाश्रमीचा काळ जणू निसर्गाची दूपार | कष्टाने प्रपंच मांडून आनंद लुटावा अपार || वानप्रस्थाश्रमींचा काळ जणू निसर्गाची संध्याकाळ | प्रपंचाचा फेटा सोडून विरक्त जगण्याचा काळ ||
निसर्गात जशी रात्र तसाच जीवनाला अंत | निसर्गाच्या कूशीत पुन्हा विसावण्यात कसली खंत ||
--------------------------------------------
पर्यावरण घोषवाक्ये
१) प्रदुषणाचा धोका
अणूयुध्दापेक्षा मोठा |
२) करा वृक्षावर माया
मिळेल थंडगार वारा |
३) पाण्याविना नाही प्राण
पाण्याचे महत्व तू जाण |
४) पाणी अडवा पाणी जिरवा
जीवन बागेत हिरवळ फूलवा |
५) धरती मातेच ऋण
फेडू या करून वृक्षरोपण |
६) निसर्गाचा नाश
म्हणजे मानव जातीचा नाश |
७) नसेल वृक्ष
तर जीवन रूक्ष |
८) वनीकरणाचा अविष्कार
अन् दुष्काळाचा बहिष्कार |
९) रक्षावया पर्यावरण
हाती घ्या वनीकरण |
१०) पर्यावरण का रखे ध्यान
तभी देश बनेगा महान |
११) हर औद्योगिक प्रतिष्ठान
प्रदूषण की ओर दे ध्यान |
१२) वृक्षोंकी रक्षा
मानवी सभ्यताकी रक्षा |
१३) अंगणी लावा एक तूळस
प्राणवायूचा होईल कळस |
१४) राखा पर्यवरणाचा समतोल
जाणा वृक्षरोपणाचे मोल |
१५) हवे शुद्ध अन्न, पाणी व हवा
तर माती अडवा पाणी जिरवा |
१६) करू या चराई बंदी , कुर्हाड बंदी
पर्यावरणासाठी ही शेवटची संधी |
---------------------------------------------
निसर्ग आपल्याला शिकवत असतो.देत असतो.
उत्तर द्याहटवाविष्णुजी,
उत्तर द्याहटवाआपली पर्यावरण दिनानिमित्त लिहिलेली, लेखमाला उशिराने वाचनांत आली, क्षमस्व !
आता पर्यंत आपले सर्व लेख हे, बव्हंशी राजकारण समाजकारण यावर होते, परंतु, धर्म- संस्कार-अध्यात्म व निसर्ग यावर देखिल आपला व्यासंग व लेखन अतिशय मुद्देसूद, रंजक व माहितीपूर्ण आहे.
मानवी उत्क्रांती, भौतिक विकास व तत्परिणामी होणारी, अपरीहार्य, निसर्गहानी याचाही उहापोह वरील लेखमालेंत केला आहे तसेच यावर जागरूक राहुन निसर्ग हानीची भरपाई होणंही गरजेच आहे.
त्यानिमित्ताने, अधिक, नियोजन पुर्ण वृक्षारोपण, तथा पुज्य अटलजींच्या कल्पनेतील नदीजोड प्रकल्प यांची प्रकर्षाने आठवण येते, ज्यायोगे निसर्ग पर्यायी पर्यावरण समतोल राखण्याची अत्यावश्यक जबाबदारी पार पाडली जाईल.
धन्यवाद.