शनिवार, २२ जुलै, २०२३

राष्ट्रवादी काँग्रेस मधील फूट आणि घराणेशाही पक्षांची पडझड (भाग -४)



 

महाराष्ट्रातील व देशातील भाजपा विरोधी राजकीय अभ्यासक, पत्रकार, संपादक आणि साहित्यीक मंडळी महाराष्ट्रात एका वर्षात दोन मोठ्या पक्षांत फूट पडल्याबद्दल भाजपाला दोष देत आहेत. का तर भाजपा हिंदुत्वाचं कार्ड खेळते. गेली सात दशकं संघ-जनसंघ व पुढे भाजपावर आरोप करीत तथाकथीत सेक्युलर कार्ड जुनाट झाले आहे. यावर मिडीयातील तथाकथीत पुरोगामी मंडळी चिंतन करणार आहे की नाही? म्हणे, ' आमच्या पुरोगामी महाराष्ट्रात राजकारण इतके खालच्या पातळीवर कधी आले नव्हते.' असे म्हणणे हे निव्वळ चोराच्या उलट्या बोंबाच नव्हे काय !  घराणेशाही पक्षांचे समर्थन करणारी मंडळी पुरोगामी असू शकतच नाही. सन २०१९ ला  लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या भाजपा- शिवसेना युतीचे सरकार ज्यांनी महाराष्ट्रात येऊ दिले नाही अशा शरद पवार व उद्धव ठाकरें यांचा काही दोष नाही असे मानून भाजपाची जिरविली अशी भाषा करणारी हिच ती लिबरल लाॅबी ! मग अशांना पुरोगामी कसे मानता येईल ? ज्यांनी महाराष्ट्रात ब्राह्मण - ब्राह्मणेतर वाद पसरविला, मराठा - मागासवर्गीय असा वाद पसरविला अशी मंडळी समाजद्रोही आहे. आम्ही पुरोगामी, आम्ही शाहू, फुले आंबेडकरांचे वारसदार, आम्ही वंचीत आणि कष्टकरी वर्गाचं भले करीत असतो अशा थापा मारणार्यांनींच मुंबईतील गिरणगाव उद्धवस्त करून गिरणी कामगारांना देशोधडीस पाठविले. हे सत्य आहे. अशांना आपण सतत  निवडून देत राहीलो. पण ' नियती अपराध्यांना शिक्षा देण्याचे विसरत नाही.'  याचा अनुभव आपल्याला आलाच ना ! राजकारणातील शह-प्रतिशहात घराणेशाही- सरंजामशाही सारखी जुनाट, जळमळ वृत्ती जळून खाक होत राहणार आहेच. कुठल्याही व्यवस्थेत बदल होत असतो, तो टप्प्याटप्प्याने होतो. तो काळाचा महिमा होय. उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी जे शस्त्र भाजपावर फेकून महाराष्ट्र राज्याची गादी बळकाविली व देशातून भाजपाला संपविण्याची फुशारकी मारली शेवटी तेच शस्त्र अधिक धारधार व वेगाने परत येऊन त्यांच्यावर आदळले. दोघांचे पक्ष उध्वस्त झाले. जसे कर्म तसे फल ! 

महाराष्ट्रात जे काही होणार होते ते झाले. त्यावर अधिक काही सांगायचे उरले नाही. भाजपाने  बिहार, पंजाब, तामिळनाडू, राजस्थान व पश्चीम बंगालच्या सत्ताधार्यांना लक्ष्य करण्याचे ठरवित असल्याचे ऐकीवात आहे. अर्थात असे आरोप करीत राहण्याचे धोरण लिबरल पंथीय पत्रकार व संपादक मंडळी राबवित असतात. वस्तूस्थिती ही आहे की भाजपा धुरीणांना प्रत्येक प्रांतात आपल्या पक्षाचा जनाधार वाढवयाचा आहे. राजकारण, समाजकारण, शिक्षण, साहित्य- संगीत- कला, सेवा, कृषी, उद्योग जवळपास सर्वच क्षेत्रात ज्यांनी अलौकीक कामगिरी केली आहे, (यातील काही विस्मरणात गेली आहे) अशांच्या नावाने अनेक योजना केंद्र सरकार राबवित आहे. पद्मश्री सारखे बहुमान जे खर्या अर्थाने पात्र आहेत, अशा व्यक्तीनांच दिले जात आहेत. त्यात राज्य, भाषा, प्रान्त, राजकीय विचारसरणी असा भेदभाव केला जात नाही. संघराज्याची कल्पना जी आपल्या देशाच्या घटनाकरांना अभिप्रेत होती ती प्रत्यक्षात मोदी सरकार कृतीत उतरवित आहे. हे सत्य आहे. याचे दर्शन देशाच्या राष्ट्रपती पदी आज विराजमान आहेत यातून दिसले आहे. फक्त मोदी सरकार आणि संघावर टिका करण्यात विरोधी पक्ष आणि त्यांचे समर्थक मिडीया धन्यता मानत आहेत. देशभरात इडी, सिबीआय सारख्या एजन्सीचा गैरवापर होत आहे असा आरोप करीत असले तरी मोदी सरकार देशहीत जपत आहे अशीच धारणा सर्वसामान्य मतदारांची होत आहे. जर का ईडी, सिबीआय सारख्या एजन्सीज खोट्या केसेस दाखल करीत असतील तर विरोधी पक्षांच्या नेत्यांना घाबरण्याचे काही कारण नाही. केंद्र सरकारचे हे हत्यार आपोआप बोथट होईल. त्यातून विरोधी पक्षांच्या हातात केंद्र सरकार विरूद्ध प्रचार करण्याची सुवर्णसंधी लाभू शकते. पण वस्तुस्थिती तशी नाही. म्हणूनच प्रिन्ट सारख्या चॅनेल वरील डाव्या- पुरोगामी राजकीय अभ्यासकांना मोदी सरकारचा पराभव होण्याची शक्यता दिसत नाही. 

सन २०१९ पासून महाराष्ट्रातील राजकारणात जी उलथापालथ झाली. त्याला उद्धव ठाकरे व शरद पवार  कारणीभूत आहेत. त्यांनी जनादेशाचा अनादार केला. पंतप्रधान मोदी शरद पवारांचा आदर करतात, तितकाच आदर उद्धव ठाकरेंचा करीत होतेच. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपा सोबत सरकार बनविण्यासाठी उत्सूक होता आणि तसा दोनदा प्रयत्न केला. तरी आपल्या २५ वर्षाच्या मित्र असलेल्या शिवसेनेला वार्यावर सोडणार नाही असे भाजपाचे श्रेष्ठी म्हणाले होते. हे गुपीत अजित पवारांनी अलिकडे एका जाहीर सभेतून उघड केले आहे. यातून उद्धव ठाकरे एक्सपोज झाले आहेत. पण पवार- ठाकरे समर्थक मिडीया या बाबतीत मौनच पाळत राहणार. कारण अजित पवारांनी आपल्या भाषणातून जो काही गौप्यस्पोट केला आहे, त्यात तथ्य आहे. पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली, याच्या पाठीमागे दोन कारणें होती. त्यातील पहिले कारण अजित पवारांना मुख्यमंत्री पद मिळता कामा नये. दुसरे असे की उद्धव ठाकरेंवर स्वतःचा रिमोट ठेवणे सोपे होते. शरद पवारांनी भाजपाला महाराष्ट्रातील सत्तेपासून दुर ठेवल्याचा राग पंतप्रधान मोदीं आणि गृहमंत्री अमीत शहांना आला होताच. शेवटी संधी मिळताच शरद पवारांचा ही गेम केला.  उद्धव ठाकरें आणि शरद पवार यांच्या पक्षातले आमदार- खासदार इतक्या मोठ्या संख्येने  दूर का गेले असा आत्मपरीक्षण करू देणारा प्रश्न मिडीयांनी ना उद्धव ठाकरेंना विचारला ना शरद पवारांना विचारला. मिडीयातील मंडळींनी शिवसेनेतल्या फुटीर गटाला गद्दार अशी शिवी देण्यात आनंद मानला. तो आनंद राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुट आणि अजित पवारांच्या भाषणामुळे कायमचा गायब झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फूटी संबंधीत टाईम्स नाऊ वर जेष्ठ विधीतज्ञ हरिष साळवे यांनी  एका वाक्यात  विश्लेषण केले आहे ते वाक्य आहे, ' All over the world change in political leadership happens. It is a  natural process. But in India except  BJP and leftist parties, all other political parties are  dynastic. साम्यवादी पक्ष धर्म मानत नाही पण मुस्लीम आणि ख्रिस्ती धर्मियांना सतत झुकते माप देत असतात. तसेच ते पक्ष क्रान्तीची भाषा करतात. आपल्या देशात सार्वजनिक मालमत्तेची फोडतोड, निरपराधी लोकांची हत्या करीत अस्थिरता निर्माण करणे हा त्यांचा छुपा एजंडा समाजाला कळून चुकला आहे. आपल्या समाजाचा क्रान्तीवर विश्वास नाही, त्याची उत्क्रान्ती वर गाढ श्रद्धा आहे. त्यामूळे साम्यवादी पक्ष भारतात जम बसवू शकत नाही. हीच मंडळी राजकारणातली नेहरू-गांधीच्या घराणेशाहीला सतत पाठींबा देत असते. या पृथ्वीवर जगातल्या सर्व कामगारांचे राज्य येवो असे ध्येय उराशी बाळगणारी हे साम्यवादी पक्ष प्रत्यक्षात हुकूमशाही प्रवृत्तीचे असतात. हाच या पक्षांचा इतिहास आहे. ' जिथे घराणेशाही आहे, तिथे भूमी, सत्ता आणि संपत्ती साठी  भांडण अटळ असते.' त्यामूळे मतदार आणि इतर पक्षातील असंतुष्ट नेत्यांना भाजपा शिवाय दुसरा पर्याय राहीला नाही.  

मागे एका लेखात आपल्या देशातील राजकीय पक्षांत जी घराणेशाही आहे ती २०५० ला संपुष्टात येईल असे मी म्हटले होते.  उद्धव ठाकरे आणि शरद पवार इतक्या झटपट धोबीपछाड होतील असे मला वाटले नव्हते. आपल्या धर्मशास्त्रात  संघौ शक्ती कलियुगे | असे म्हटले आहे, त्यात तथ्य आहे. पण घराणेशाहीचं स्वरूप असलेल्या पक्षांच्या नेत्यांना हे कळतंय कुठे ?  एन टी रामरावांचा तेलगु दसम पक्ष त्यांचे जावई एन. चंद्राबाबू नायडू यांनी  ताब्यात घेतला. आज त्यांची काय स्थिती आहे ?  स्टॅलीन, ममता बॅनर्जी, लालू प्रसाद यादव, अखिलेश यादव इत्यादी नेत्यांच्या पक्षात आज ना उद्या अंतर्गत दुही माजणार आहेच.  इतकेच नव्हे, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी आपआपले पक्ष आपल्या  स्वतःच्या वारसांना मालकी हक्काने मिळविण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे पक्ष ही नामशेष होतील.  शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील दुफळीतुन देशातील सर्व घराणेशाही पक्षांसाठी हा इशारा आहे.

३ टिप्पण्या:

  1. अगदी योग्य शब्दात घराणेशाही पक्षाची लोकशाहीला मारक अशी वृत्ती आपण मांडली आहे....त्या पक्षांची अजाची अवस्था होण्याला तेच कारणीभूत आहेत पण स्वतः मधील दोष न बघता दुसऱ्याला दोष देत आहेत.

    उत्तर द्याहटवा
  2. विष्णुजी,🙏
    आपले चारीही लेख एका दमांत वाचले. महाराष्ट्रातील सद्यस्थितीचं ईतक स्पष्ट विश्लेषण, सरळ शब्दांत आपण केलं आहे की त्यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता उरत नाही. उशीरा का होईना सुंदर विश्लेषण लेखमाला वाचायला मिळाली, धन्यवाद.
    एकच शंका मनांत रहाते, मोठ्या पवारांची कोलांट्या उड्या मारण्याची सवय, पर्यायानं विश्वासार्हता व छोट्या पवारांच वैयक्तिक धोरण व महत्वाकांक्षा ही भाजपला पुरक ठरेल की मारक तसचं, सेना- शिंदे गटाचं भवितव्य या बाबींवर आणखी एक लेखमाला अपेक्षित आहे.

    उत्तर द्याहटवा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...