पंतप्रधान पदाचे पाचवे उमेदवार नितिशकुमार यांना तेजस्वी यादव सोबत रहावे की माघारी फिरून मोदी सोबत जावे या द्वंदात अडकले आहेत. त्यातच निवडणूक तज्ञ पी के बिहारमध्ये पदयात्रा काढीत आहेत. ते निश्चितच नितिशकुमार यांच्या पक्षाची जागा घेऊ शकतात. तेजस्वी यादवांवर ईडीचा हातोडा हाणला जाणार आहे असे कळताच नितिशकुमार पुन्हा भाजपाशी युती करावी अशा मनःस्थितीत असावेत. पण मोदीजी त्यांना लटकवून ठेवतिल. संपुर्ण शरणागती पत्करली तर 'आम्ही देतोय तितक्या जागा घेऊन चुपचाप कामाला लागा ' असे भाजपाचे बजरंगबली अमित शहा त्यांना ठणकावून तसे ते स्विकारायला लावतील. पंतप्रधान पदाच्या या पाचव्या उमेदवाराची राजकीय कारकिर्द संपेल अशी शक्यता आहे.
पंतप्रधान पदाचे सहावे उमेदवार शरद पवार आहेत. त्यांनी उद्योगपती अदानी यांच्यावर होणारी टिका रास्त नसल्याची जाहिर करून सन २०२४ च्या निवडणुका येण्यापूर्वी एक वर्ष अगोदरच भाजपाचे काम सोपे करून टाकले आहे. यावरून त्यांची पंतप्रधान पदाची इच्छा संपली आहे असे वाटते. स्वतःचे मविआ सरकार नावाचे गोंडस बाळाचा मोदी-शहा जोडीने एनकाॅन्टर केल्यामुळे शरद पवारांना आपल्या कन्याचं भवितव्य शहा-मोदीच्या छायेतच सुरक्षित राहील असा अंदाज आला असावा. म्हणून शरद पवारांनी अदानी संबंधितचं ते विधान केले असावे. कदाचीत अदानी किंवा मोटाभाय अमित शहाने नाटकाच्या प्रयोगाची शेवटची घंटी पवारांना फोन वरून ऐकवली असावी. कारण काही ही असो पण राहूल गांधीच्या काॅग्रेस पक्षासकट इतर विरोधी पक्षांचं ही पवारांच्या त्या विधानाने नुकसान होण्याची शक्यता आहे.
भाजपा केंद्रीय सत्तेतून पायउतार होण्याचे एक ही चिन्ह दिसत नसल्यामुळे काल परवा पर्यंत द्विधा मनःस्थितीत असलेले एनडीए तील घटक पक्ष आता भाजपाच्या वळचणीला लागतील तेही भाजपाच्या अटी स्विकारून. शिवसेनेने दिलेल्या दगा पाहता भाजपा पक्षांतर कायद्यात काही सुधारणा आताच करण्याच्या मनःस्थितीत असावी ज्यात निवडणूक पुर्व युती-आघाडीला पक्षांतर कायद्याच्या कक्षेत आणून काही अशी कडक कलमे असतील, की चिंगु-मिंगू पक्षांची राजकारणातील दादागिरी संपेल.
प्रान्तीय पक्ष जे त्यांच्या प्रान्तात सत्तेवर आहेत त्यांची एक खोड आहे ती म्हणजे त्यांच्या स्वतःच्या कारभारातून तेथील जनतेत नाराजी दिसली की, त्याचे खापर ते मोदी सरकारवर फोडत असतात. प्रान्तीय अस्मिता ही प्रान्तीय सरकार मधील नेत्यांसाठी एक ढाल आहे तर त्यांनी केलेले अपराध, भ्रष्टाचार तसेच कारभारात केलेली बेपर्वाई व शिथिलता लपविण्यासाठी एक सुरक्षा कवच ठरले आहे. सीबीआय इडी, व एनआयए सारख्या एजन्सीज् चा वापर विरोधी पक्षांच्या नेत्यांवर केंद्र सरकार जाणूण-बुजून करते असा आरोप विरोधी पक्ष करीत आहेत. काल- परवा विरोधी पक्षांनी या संदर्भात केंद्र सरकार विरोधात केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने सपशेल फेटाळून लावली आहे. त्यामूळे आता प्रान्तीय पक्षांचं प्रान्तीय अस्मिता नावाचं शस्त्र बोथट ठरेल असे दिसते. ते शस्त्र सन २०२४ च्या लोकसभेच्या निवडणूकात पुर्णतः निष्प्रभ होईल .
या वर्षी जिथे विधानसभेच्या निवडणुका आहेत तिथल्या प्रचारात भाजपा तर्फे 'डबल इंजीन' हे नेहेमीचं शस्त्र वापरलं जाणार आहेच. भाजपाच्या स्टार नेत्यांच्या तोफखान्या समोर विरोधी पक्षांचा फारसा टिकाव लागणार नाही. भाजपा चा विजय का होतो यावर विरोधी पक्ष चिंतन करीत नाहीत तो पर्यंत भाजपाला पराभूत करता येणार नाही. सर्वात महत्वाचं कारण असे आहे की विरोधी पक्षांची शिर्षस्थ नेते मंडळी निवडणुक प्रचारात एक जुगार खेळत आली आहेत. ते म्हणजे नरेंद्र मोदींना मीच खरा स्पर्धक आहे हे मतदारांना पटविण्यासाठी अथक प्रयत्न करीत असतात. त्यामूळे विरोधी पक्षांची आघाडी झाली तरी परस्परांत विश्वासाचा अभाव राहणार आहे.
असे असले तरी प्रिन्ट आणि इलेक्ट्रॉनीक्स मिडीयांतील विरोधी पक्षांची समर्थक संपादक मंडळीं, पत्रकार, समर्थक लिबरल विचारवंत आणि कार्यकर्ते, ही बाब मुळीच स्वीकारणार नाहीत. कारण राजा पेक्षा राजाचे भाटच हुषारीच्या तोरात वावरत असतात.
विद्यमान राजकीय स्थितीत भाजपा इतर सर्व पक्षापेंक्षा सरस ठरतो आहे. विरोधी पक्षांना विदेशी मदत मिळाल्याची घोषणा जगातील अब्जोपती जाॅर्ज सोरस यांनी केली आहे. पाश्चिमात्य देशांनाही भारत विरोधी कारस्थानं झाल्यास आवडणार आहेत. खलिस्थान नावाचं भूत पंजाब राज्याच्या आकाशावर घिरट्या घालत आहेत. आपल्या देशातील फितुराम लोकांमूळेच जिहादी आणि लिबरल लाॅब्यांची शक्ती वाढली आहे. विदेशी चॅनल्स, विदेशी वर्तमान पत्रॆं, पैसा,आणि बल इतकं हाताशी आल्यामुळे विरोधी पक्षांना पुढील वर्षी होणार्या लोकसभा निवडणूकांचे वेध नव्हे तर त्यांच्या मेंदूत धुमाकूळ नावाचे वादळ घुसले आहे.
ते वादळ मोदी सरकार मुंबई वरून गुजरात मार्गे पुढे पाकिस्तानवरच पाडण्याची शक्यता आहे. भारताचं काही ही नुकसान होणार नाही. म्हणजे भाजपचं ही नुकसान झालेलं नसणार. भाजपाला हर प्रकारे अडचणीत आणण्याचे प्रयत्न अमेरिकन व चीन सरकार करतील. पण भाजपा प्रत्येक अडचणीवर मात करेल. हे युद्ध आहे. वैचारिक पातळीवर होईल. आर्थिक पातळीवर लढले जाईल., सर्व पातळीवरून भाजपाच बाजी जिंकेल. कारण भारतीय मतदार सावध व जागृत झाला आहे. विदेशी शक्तींची कारस्थानें व त्यांना सहकार्य करणारे देशबंधुना ठेचले जाईल. या लेखात पंतप्रधान पदाचे सहा उमेदवार संबंधी माहिती आणि त्यांच्या आणि त्यांच्या पक्षांच्या जिंकण्याच्या शक्यता वर्तवून मी तीन लेख लिहीले. याचे कारण विरोधी पक्षांनीच सतत मोदींना लक्ष्य केल्यामुळे भारतातील संसदिय प्रणालीचं स्वरूप निवडणूका पुरता अध्यक्षीय प्रणालीत रूपांतर केले आहे. सारा दोष विरोधी पक्षांनाच द्यावा लागेल.
मोदी सरकार चे धोरण अगदी स्पष्ट आहे. राष्ट्रहित सर्वोच्च, मोदींची लोकप्रियतेचा व्यवस्थित फायदा उठवून विदेशी शक्तींना डिप्लोमासीच्या आधारें तोंड देण्यासाठी मोदी- एस जयशंकर आणि अजित डोवल, यांचे त्रिकूट. गरज पडल्यास संरक्षण मंत्री राजनाथसिंह आणि सीडीएफ असा एक गट तर मोदी- शहा, नड्डा, हेमंत बिस्वास, योगीजी व फडणवीस हा दुसरा गट निवडणूक संबंधींतले धोरण, उमेदवार निवड हे काम पाहिल. तर तिसरा गट असेल नितीन गडकरी, सितारामन, अश्विनी, आणि चॅनेल वरील भाजपाचे प्रवक्ते. अर्थात हा मी कयास बांधला आहे. पण एक गोष्ट मात्र मी इथे ठामपणे सांगु इच्छितो की भाजपा देशान्तर्गत विरोधी राजकीय शक्तींना व बाह्य शक्तींना ही पुरून उरेल. पण हे कसे शक्य होईल या संबंधित आपली चर्चा होत राहील.
धन्यवाद !
वन्दे मातरम !
विष्णुजी,
उत्तर द्याहटवाआपले विचार मंथन मधे काल प्रसिद्ध झालेले, राष्ट्रीय राजकारणावरील तीनही लेख वाचले. लेख आपली वैचारीक प्रगल्भता स्पष्ट करणारे आहेत.
पहिल्या लेखात, राजकारणाच मुल स्वरुप राज धर्म व प्राचीन भारतीय परंपरा, तसचं मातृभुमी, जीवन पोषण करणार्या मातृवत्, गंगा माता, नर्मदा माता ई. नद्यांचा उल्लेख व वाहत्या पाणी, डबकी व पाण्याचे सागरास मिळुन परत जलस्वरुपात पृथ्वीवर अवतरणे, हे वर्णन, तसेच, त्यांच अलीकडील राजकारणाशी काही अंशी असलेलं साम्यदर्शन, हे लेखाला उच्च अध्यात्मिक पातळी वर नेणारं आहे.
दुसर्या व तीसर्या लेखांत, आपण राजकारणांतील सद्य घटनांचा, राहुल यांच्या राजकारणावरील घडामोडींची सखोल समिक्षेसह, घेतलेला आढावा, इतर विपक्षी नेत्यांचे, स्वता:ला, भावी पंतप्रधान म्हणून पुढे रेटण्याचे केविलवाणे व विफल प्रयत्न व त्याला मिळणार्या मोदी विरोधी लाॅबीची साथ, या सर्व बाबींचा विस्तृत आढावा घेतला आहे.
लेखाचा सारांशही, वस्तुस्थिती निगडीत, व येत्या, २०२४ च्या, निवडणुकीत भाजप/ राष्ट्रवादी शक्तिंना आशादायी आहे.
सुंदर लेखमालेसाठी आपले अभिनंदन.
धन्यवाद व नमस्कार.
बिवलकरजी नमस्कार !
उत्तर द्याहटवामाझ्या लेखांवर आपण नियमित प्रतिक्रिया देत असतात. त्या केवळ प्रतिक्रीया नसून उच्च श्रेणीचे सर्वांगाने केलेलं विश्लेषण असते.. आपला मिळत असलेला लोभ हेच माझ्या लेखांच खरं भांडवल आहे. ते भांडवल वृदिंगत होते म्हणूनच माझी लेखणी थकत नाही. धन्यवाद !