ज्यांना आपण सर्वसाधारणपणे पंतप्रधान पदाचे उमेदवार मानतो आहोत त्यांचा स्वभाव, व्यक्तीमत्व, कार्य आणि राजकारणाची जाण या चार कसोटीवर कोण सरस ठरेल ते आपणच ठरवावे. तसेच कुठला पक्ष संघटन व नेतृत्वात सरस आहे ते ही आपण ठरवावे. मला जे आकलन झाले आहे ते पुढे ठेवतो आहे.
एखाद्या तांत्रिक(यंत्राच्या साह्या ने तयार केलेला पक्षी) पक्षाला जसे शिकविले आहे, तसे तो बोलत असतो, तसेच काही तरी राहूल गांधींच होतंय हे आपणांस पदोपदी जाणवते. पंतप्रधान पदाचे हे विरोधी पक्षातले पहिले उमेदवार आहेत. पण करीत काय आहेत? राहूल गाधीं एक कलमी कार्यक्रम करीत आहेत तो म्हणजे मोदी आणि अदानीवर टिका करीत राहणे. अतिशय गंभीर बाब म्हणजे आपल्या देशाच्या लोकशाहीचा इंग्लंड मध्ये जाऊन राहूल गाधींनी अपमान केला. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा जिथे वैदिक काळात गणराज्य व्यवस्था होती अशा आपल्या देशाचा अपमान केला आहे. वैदिक काळात भारतवर्षात गुरूकुलं होती. त्यावेळी इंग्लंड मधील लोक जंगलात राहात होते, असे व्हाॅईसराय लार्ड कर्झनने म्हटलेलं आहे. ' राहूल गांधींके बारेंमें इंग्लंड स्थित मूल भारतवासियोंकें मन में नफरत पैदा करनेवालें स्वयं राहूल गांधी है | ऐसे आदमी क्या भारत जोडेंगे ? ' ही इंग्लंड मध्ये राहात असणार्या एका भारतीयाने सोशल मिडीया वर टाकलेली पोस्ट माझ्या वाचनात आली आहे. वस्तुतः जगभरातल्या देशात जिथे मोदी ssमोदी असे म्हणत पंतप्रधान मोदींचा सत्कार, स्वागत होते, तिथे हे युवराज राहूल गांधी कुठल्या बेस वर काय बरगळले आहेत ? चीन हा सर्वात शांतीप्रिय देश आहे असा हा राहूल गांधींचा शोध ! त्यात राहूल गांधींचा दोष नाही. त्यांच्या मागील पितरांकडून ते वाक्य pass on होत आलेले असावे. ज्यांना भारत ही आपली पितृ आणि मातृभूमी वाटत आहे असे लोक ' भारत हाच देश जगातला शांतप्रिय देश काल होता, आज आहे आणि उद्या ही राहील.' असेच म्हणत असतात.
आपणच सारासार विचार करून ठरवा की राहूल गांधी कुठे चुकले आहेत ? त्यांच्या बोलण्यात तारताम्य नसते. लोक त्यांची औकात काढतात. ''I am amazed at Rahul Gandhi's lack of intellect, forget his lack of integrity." This is what Suhail Seth a Successful Businessman, Columnist, Key-Note speaker has said about Rahul Gandhi. सुहेल सेट जे म्हणाले त्याचा मराठी भाषेतला संक्षिप्त व साधा अर्थ आढ्यात नाही तर पोहर्यात येणार कोठून? हाच होतो. खरं पाहता 'पप्पू ' हा शब्द गोड बालकाला लाडाने गोंजारून मारलेली हाक आहे. आपल्या देशातील पुढची पिढी आपल्या नातवाला पप्पू हे टोपण नाव ठेवतील की नाही अशी शंका वाटू लागली आहे.
माझे उत्तर आहे ' राहूल गांधींना जबरदस्तीने राजकारणात आणले गेले असावे. तो त्यांचा प्रांत नाही. त्यांना राजकारणात आणले, ठिक आहे. आपल्या देशात बाॅलीवुड आणि राजकारणात वारसशाही आजपावेतो गैर मानली नाही, म्हणून हा निर्णय स्वागतार्ह होता. पण थेट पंतप्रधान बनण्याची इच्छा कशी, काय आणि का लादली गेली ? मला तर राहूल गांथीं ची किंव येते. एका साधारण दुर्बिणीने आकाशातील चंद्र पाहणे वेगळं आणि अंतराळात जाऊन चंद्रावर पाऊल ठेवणे हे किती किती कठीण कार्य आहे हो ! विद्यार्थ्यीची ज्या विषयात गती आहे त्याच क्षेत्रात विद्यार्थ्याला पुढे विजश्रीदेवी हार घेऊन उभी असते. हे शाश्वत सत्य आहे. याचे भान नसलेल्या (हे भान येणार तरी कसे हो) आईने आपल्या बाळाचे मोठे नुकसान केले आहे. त्यामूळे पुष्कळदा राहूल गांधीचे वागणे विक्षिप्त असते.
कुत्रीम रित्या आधुनिक विज्ञानाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने कुत्रीम बुद्धी माणसाच्या मेंदूत देण्याचे प्रयोग अस्तित्वात आले आहेत की नाही हे मला ठाऊक नाही. पण पुढे-मागे आले तरी जन्मजात शरीर, रंग, नाक, कान डोळे, वजन, बुद्धी, श्रवणशक्ती, ग्रहणशक्ती स्मरणशक्ती इत्यादी बाबीत पुढे किती ही कुत्रिम उपाय केले तरी त्याचा उपयोग होईल असे वाटत नाही. तसे करणे हे ही अनैसर्गिक ठरेलच. या शिवाय तो छळवाद ठरतो. म्हणजेच फौजदारी गुन्हा ही ठरू शकेल. बस माझे उत्तर इथे संपले. कारण सन २०१७ साली गुजरात विधानसभा निवडणूकातील त्यांच्या यशाचे मी कौतूक केले होते.पण आता माझा भ्रमनिरास झाला. तो ही कायमचा ! '
पंतप्रधान पदाचे दुसरे उमेदवार केजरीवाल यांनी लाज-शरम काय म्हणतात, ती पुर्णपणे सोडली आहे. आपल्या दिल्लीतील सरकारचे दोन बडे मंत्री इडी च्या चौकशीतून जेलमध्ये गेले आहेत. तरी उसने आवसान आणत कट- कारस्थानं व थापा त्यांच्या सुरू आहेत. मागे मी केजरीवाल संबंधी म्हटले होते, की दिल्ली आणि पंजाब मधील निवडणूका विदेशी पैशाच्या ताकदीने जिंकल्याची पोल खोलली जाईल, जेव्हा या विदेशी शक्ती ची ओळख पटेल, तेव्हा केजरीवाल यांचा पक्ष भुईसपाट होईल. हा लेख लिहीताना केजरीवाल यांना कोर्ट द्वारे समन्स पाठविण्यात असल्याची बातमी आता हाती आली आहे. उत्तर प्रदेशाच्या समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना हाती घेऊन ममता बॅनर्जीच्या मोदी हटावाच्या गर्जना वाढत आहेत. पण त्या गर्जानांचा आवाज इतका मोठा झाला आहे की जणु काही त्या देशाच्या माजी पंतप्रधान असाव्यात.
आता आपण येथून थेट पश्चमेकडील राजस्थान मध्ये पोहोचलो तर तिथे दृश्य काय आहे ते पाहू या. मुख्यमंत्री गेहोलोत आणि सचीन पायलट याच्यांत सतत शाब्दिक चकमकी होत आहेत. मोदी हटाव या मोहिमेत दोघे नेते फारसे दिसले नाहीत. इथे काॅग्रेस विरूद्ध भाजपा असाच सामना असतो. काॅग्रेसला ॲन्टी इन्कबन्सी ला सामोरे जावे लागेल. त्यातच सचिन पायलट नवा पक्ष काढणार अशी बातमी आहे. मग मोदी विरोधी लाट कशी निर्माण होणार? इथे सत्ताथारी पक्षाला जनताच पाय उतार करते. राजस्थानचं महत्वाचं वैशिष्ट हे आहे की येथील कुठल्या ही नेत्याला पंतप्रधान पदाची लालसा निर्माण झालेली दिसत नाही. पण काॅग्रेस श्रेष्ठींचा ' हम करें सो कायदा ' या वृत्तीमुळे पंजाब प्रमाणे हा प्रान्त काँग्रेसच्या हातून कायमचा जाण्याची शक्यता आहे.
कर्नाटकाच्या निवडणूकांची घोषणा झाली आणि लागलीच काॅग्रेसेच भुतपुर्व मुख्यमंत्री सिद्धरमैय्या आणि डी के शीवकुमार मध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. तरी मोदी हटाव या मोहिमेत दोघे ही सामिल आहेत. इथे भाजपचं काही खरे नाही पण काॅग्रेस अंतर्गत असलेली स्पर्धा आणि परस्परातला द्वेष काॅग्रेसला महाग पडू शकतो की नाही ? त्यातच तिथे भुतपुर्व पंतप्रधान देवेगौडा यांचा पक्ष आपली शक्ती आहे तितकी सुरक्षित ठेवून आहे असे ऐकिवत आहे. या शिवाय मोदींचा करिष्मा कमी झालेला नाही आणि राहूल गांधींनी लंडन मध्ये पाजळलेले ज्ञान कर्नाटकातील नवयुवकांना किती पसंद पडले याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. झारखंड मध्ये मुख्यमंत्री आणि तीन उपमुख्यमंत्री मध्ये दुरावा दिवसेंदिवस वाढत आहे. मोदी हटाव ही मोहीम ते थोड्या फार प्रमाणात चालवित आहेत. पण ती चालविण्यात त्यांना स्वारस्य किती आहे हे त्यांनाच ठाऊक आहे. काॅग्रेस श्रेष्ठींना ही अचूक अंदाज घेता येईल असे मला वाटत नाही. छत्तीसगड चे मुख्यमंत्री भुपेश बघेल आणि प्रदेश काॅग्रेस चे अध्यक्ष मोहन मरकाम यांच्यातला तिढा सोडविण्यात काॅग्रेस श्रेष्ठी दुर्लक्ष करीत आहेत. तिथे तिची स्थिती पंजाब सारखी होईल.
तामिळनाडूत भाजपा चा पुढील लोकसभेत होऊ घातलेल्या प्रवेशाची मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी लौकरच धास्ती घेतलेली दिसते. कारण तामिळनाडू त संघाच्या कार्याचा प्रभाव वाढला आहे. या शिवाय या राज्यातील भाजपाला के अण्णामलाईच्या रूपाने एक कणखर नेतृत्व लाभले आहे. म्हणून स्टॅलिन यांना भाजपाची दखल घ्यावी लागली आहे. ईडी, सीबीआय,इत्यादी एजन्सींना न्यायालयीन निर्णायामुळे मिळालेल्या स्वातंत्र्य मुळे स्टॅलिन यांना ही समन्स येण्याची शक्यता वाढली आहे.
सन २०२४ च्या लोकसभेच्या निकालानंतर देवेगौडा प्रमाणे आपल्या माथ्यावर पंतप्रधान पदाचा मुकुट बसेल या आशेतून तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव हे ही मोदी यांच्यावरच टिका करीत आहेत. असे हे चौथे पंतप्रधान पदाचे उमेदवार सध्या स्वतःच्या राज्यातल्या कारभारा पेक्षा विरोधी पक्षांची आघाडी करण्यात फिरत आहेत. यश किती मिळेल फक्त तेच जाणो !
क्रमशः
(लेखाचा भाग -३ सोबत जोडला आहे तो कृपया वाचावा )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा