मागे मी राष्ट्रीय स्तरावरील राजकारण - (धावता आढावा) या शिर्षकाचा लेख लिहीला होता. त्यानंतर जवळपास दोन महिने लोटले आहेत. देश-विदेश मध्ये अनेक घटना घडल्या आहेत, होत आहेत त्याचे नावच राजकारण आहे. कोरोना नंतर एखादी नैसर्गिक घटना घडली तरी त्याच्या मागे कोणाची तरी राजकीय चाल आहे. असा अंदाज ही काढला जातो. तसे पाहता आजचा लेख मागील लेखाचाच पुढील भाग आहे. हा विषय न संपणारा असा आहे. त्यामुळे या लेखापासून एका लेख मालिकेची सुरूवात झाली असे हे गृहीत धरू या. राजकारण हा विषयच पुढे सरकत जाणारा आहे, नदीच्या प्रवाह सारखा !
पण जिथे खड्डा दिसला की तिथे नदीचे काही पाणी शिरते. तो खड्डा भरला की प्रवाह पुढे जात राहतो. त्या खड्डयातले पाणी लागलीच डबके बनते. नदी सागराला मिळे पर्यंत डबक्याची संख्या खुप वाढलेली असते. राजकारणाचा प्रवाह असाच असतो. पण नदीतले सारे पाणी डबक्यात जात नाही. पण डबक्याची संख्या वाढत जाते. राजकारणाचे ही तसेच काहीसें होत असते. नदी ही आपली आईच असते. म्हणून आपण गंगामैय्या, नर्मदामाता, गोदामाई असे संबोधितो . ती परोपकारी असते. ती सुद्धा धरणीमातेला आई मानत असावी. म्हणून ती त्या खड्डयात दिलदारपणे आपले जल ओतून पुढे जाते. पुढे ती पठारी मैदानात मानवासाठी ती हळूहळू थांबत थांबत आपला प्रवास करते. इतकेच नव्हे तर मानवाने शेतीसाठी, पिण्यासाठी तिचे पाणी अडविले तरी कां कूं करीत नाही. तिचे जे जल खड्डयात पडते त्याला डबक्याचे रूप आपणच देतो.
मुळात जमिनी वरील खड्डे एक तर मुसळधार पावसाने होतात वा माणसाने आपल्या ऐहिक सुख-सोयी साठी केलेले असतात. कवी आणि कवीयत्रींच्या दृष्टीतून ते खड्डे म्हणजे धरणीमाते वर झालेल्या जखमा होत. ते खड्डे आपल्यासाठी म्हणजे धरणी- पुत्रासाठी सुद्धा जीवघेणे असतात. त्या खड्डयावर पंचायत समिती व महापालिकेतील रस्ते सुधारक समिती लागलीच औषधोपचार करीत नाहीत. इथेच आपली म्हणजे जनसामान्यांची हतबलता असते.
इथे मला 'अनोखी रात' या हिन्दी सिनेमातील गीतकार इंदीवरांचे स्व मुकेश यांनी गायलेले गीत आठवले -
"ओह रे ताल मिले नदीके जलमें |
नदी मिले सागरमे
सागर मिले कौनके जलमे | कोई जाने
ना रे ||ओह रे ताल.. "
मागे महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आणि सुनावणी या लेखात River can go no reverse या सत्याचा ओझरता उल्लेख केला होता. त्याची सत्यता पटवून देणे राहीले होते. ते कार्य इथे पुरे करण्याचा प्रयत्न करीत आहे.
नदीचा प्रवाह म्हणा, वा पावसाच्या पाण्याचा प्रवाह हा एक धर्म आहे. तो प्रवाह उतरता असतो. का तर सार्या मानवाचं हित व्हावे म्हणून. राजकारणाचे मूलतः ' राजधर्म ' असे नाव आपल्या संस्कृतीत आहे. पण राजधर्माला उतरती कळा लागते तेव्हा त्याचे रूपांतर राजकारण असे होते. इंग्रजी मध्ये Politics असे म्हणतात. राजधर्मा ला जगातल्या कुठल्याच भाषेमध्ये नाव नाही.असो. कवी इंदिवर पुढे सागराचे पाणी कुठल्या जलात जाते हे माणसास माहीत नसते हे सांगून आपली हतबलता किंवा आपल्या शक्तीच्या मर्यादा दाखवून जातात.
सागाराच्या जलाचे सूर्य वाफेत रूपांतर करतो. नंतर ती वाफ आकाशात जाते. पुढे आकाश त्या खारट वाफेचे आपल्या मानवी तर्कांच्या पलिकडे जाऊन गोड जलात रूपांतर करून ढगांच्या रूपात साठवण करते. पुढे वायू ढगांची घुसळण करून पुन्हा धरणीमातेकडे पावसाच्या रूपात परत येते. परंतु ते पाणी गोड कसे होते याचे रहस्य मानवाला शोधता आलेले नाही. म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या विज्ञान निबंध पुस्तकात निसर्गाचा देव असे एक स्वतंत्र प्रकरण ठेवले आहे. या चर्चेचं सार हा एक
' निसर्गाचा धर्म ' आहे. तसेच समाजाला व्यवस्था, राज्याला व्यवस्था असते. अशा व्यवस्थेचे जनकत्व भारताकडे जाते असे अनेक पाश्चिमात्य व पौर्वात्य विचारवंत, आणि देशी-विदेशी इतिहास विभागाने उजेडात आणले आहे. माणूस राजधर्माला राजकारणाचं रूप देतो. राजकारण म्हणजे गजकर्ण ही व्याखा रूढ झाली याला आपणच जबाबदार आहोत. गजकर्ण म्हणजे खाज. खाज हा रोग म्हणजे आत्मनाश. राजकारणातून म्हणजे सत्तेच्या हव्यासातून युद्धाची खाज निर्माण होऊन महायुद्धे होतात. त्यातूनच सर्वानाश होतो. हा मानव जातीचा इतिहास आहे.
आपल्या येथीलच नव्हे तर जगातील सर्वच देशात कुठलाही राजकीय पक्ष धुतल्या तांदळ्या सारखा स्वच्छ नाही. आपण संसदीय पद्धत स्विकारली आहे. इथे विजयी झालेल्या पक्षांच्या संसद सदस्यांनेच आपला नेता निवडावयाचा असतो. पुढे तोच नेता देशाचा पंतप्रधान होतो. त्या पदाची शान संसदेतील सर्वच सदस्यांनी राखावी अशी अपेक्षा असते. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी पतंप्रधानपदाची शान राखावी वा ना राखावी हा वाद बाजूला सारू या. विरोधी पक्षांचे चुकतंय कुठे तर ते केंद्र सरकारवर टिका करीत नाहीत. ते फक्त मोदीजींना टार्गेट करीत आहेत. ते ही नीच पातळी गाठून. म्हणून आपल्या येथील विरोधी पक्ष डबक्यां सारखी झाली आहेत, असे मला वाटू लागले आहे. असे म्हणताना माझे मन कष्टी होते. पण विरोधी पक्षातील सर्वच मंडळी डबकी आहेत तसेच सत्ताधारी पक्षात डबकी नाहीत असे ही नाही हे सत्य मी स्विकारतो की !
पंतप्रधान मोदींना नऊ वर्ष सतत टारगेट करीत नीच पातळी गाठून टिका करणे हे लांचनास्पद नव्हे
काय ?आजचा सामान्यतला सामान्य मतदार ही विचार करतो आहे की आपल्या बापजाद्यांपासून कधी नव्हे ते सुख गेली आठ-नऊ वर्षे मिळू लागले आहे; ज्यांनी आपल्याला शौचालय दिले; घरें दिली; रेशन पुरविली ; बँकेत पैसे जमा केले ; वीज दिली ; गॅसच्या टाक्या दिल्या, अशा नरेंद्र मोदी व भाजपा वर विरोधी पक्ष इतकी टिका का करीत आहेत असा प्रश्न विचारत आहेत. ही ग्राऊन्ड रिॲलिटी बनली आहे. भाजपाचे समर्थक नसलेले प्रभू चावला आणि शेखर गुप्तासारखी जेष्ठ संपादक मंडळी प्रत्येक निवडणुकांचा सर्वे करताना हातचे काही न राखता हे सत्य मान्य करीत आहेत. मोदी वर सतत टिका करून नुकसान विरोधी पक्षांचेच होत आहे ना ? पण लक्षात कोण घेतोय ?
हे लक्षात घेण्यासारखे विरोधी पक्षात मोठे नेतेच राहिले नाहीत. पंडीत नेहरूंच्या कारकिर्दीत बॅ नाथ पै, डाॅ शामाप्रसाद मुखर्जी वैगरै तर इंदिरा गांधीच्या कारकिर्दीत डाॅ राम मनोहर लोहिया, पंडीत दिनदयाळ उपाध्याय अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, दंडवते इत्यादी अशी विद्वान आणि अभ्यासू संसदपटू विरोधी पक्षात होती. पुढे २०१३ पर्यंत चांगले संसदपटू विरोधी बेंच वर पहावयास मिळाले. सन २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपा सत्तेवर आला. त्यानंतर विरोधी बाकावरील सदस्यांच्या कुवतेची, अभ्यासू वृत्तीची घसरण होत गेली आहे. ही देशाच्या विद्यमान राजकीय स्थितीतली एक मोठी समस्या आहे.
क्रमशः
( लेखाचा भाग २ सोबत जोडला
आहे .कृपया तो वाचावा )
Chatrapati Shivaji Maharaj was and is permanently degraded by Hindu leaders during his time and even today. So people criticising Narendra Modi is a foregone conclusion and will remain so till the last breath of Modiji. This is Hindu society and Hindu leadership. Nothing surprising.
उत्तर द्याहटवाI do agree with you.
उत्तर द्याहटवा