आता आपण लेट्स-अप युट्युब चॅनेलवर ४ डिसेंबर रोजी राजकीय अभ्यासक हेंमत देसाई यांच्या मुलाखती वर चर्चा करणार आहोत. हेमंत देसाई हे मराठी माध्यमातील चॅनेल्सवर राजकीय अभ्यासक म्हणून अवतरत असतात. त्यांचे राजकीय घडामोडी वरील विश्लेषण लिबरल मंडळी सारखेच असते. अलिकडील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालासंबंधी हेमंत दैसाई यांनी केलेलं विश्लेषण थोडक्यात आपल्या समोर ठेवतो.
गुरुवार, २८ डिसेंबर, २०२३
लिबरल मंडळीचा प्रचार आणि विरोधी पक्षांचा व्यवहार (भाग -२)
आता आपण लेट्स-अप युट्युब चॅनेलवर ४ डिसेंबर रोजी राजकीय अभ्यासक हेंमत देसाई यांच्या मुलाखती वर चर्चा करणार आहोत. हेमंत देसाई हे मराठी माध्यमातील चॅनेल्सवर राजकीय अभ्यासक म्हणून अवतरत असतात. त्यांचे राजकीय घडामोडी वरील विश्लेषण लिबरल मंडळी सारखेच असते. अलिकडील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालासंबंधी हेमंत दैसाई यांनी केलेलं विश्लेषण थोडक्यात आपल्या समोर ठेवतो.
बुधवार, २७ डिसेंबर, २०२३
लिबरल मंडळींचा प्रचार आणि विरोधी पक्षांचा व्यवहार (भाग १ )
बुधवार, ६ डिसेंबर, २०२३
देशाच्या राजकीय पटांगणावरील सेमीफायनल सामन्याचा निकाल
गेल्या ऑगस्ट २३ तारखेनंतर आज मी प्रथमच ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या समोर संवाद करण्यासाठी आलो. तो लेख अराजकीय होता. मात्र २० जुलैचा लेख राष्ट्रवादी काॅग्रेसमध्ये उभी फूट पडली त्या संबंधित होता. त्या नंतर देशाच्या आणि जगाच्या राजकीय पटंगणावर अनेक घटना घडल्या आणि घडत ही आहेत. तरी ही मी लेख लिहले नाहीत. याचा अर्थ मी अन्य क्षेत्रात व्यग्र होतो असे नाही. आपल्या देशातील राजकारणाचं स्वरूप सन २०१४ पासून 'जैसे थे' असेच राहिले आहे. म्हणून विरोधी पक्षांवर टिका करण्यातही फारसा अर्थ राहीला नाही अशी माझी समजुत झाली आहे. ती चार राज्याच्या विधानसभा निवडणूकीच्या निकालातून खरी ठरली आहे. विरोधी पक्ष सततच्या चुकांची दुरूस्ती करू इच्छीत नाहीत हे पुन्हा स्पष्ट झाले. जुलै पासून मला जी सवड मिळत होती तिचा उपयोग मी जागतिक राजकारणाचा अभ्यास करण्यासाठी करू लागलो आहे. चार राज्यांच्या निवडणूकाच्या प्रचाराची धामाधूम मी पाहिली नाही. मोदी सरकार उलथून पाडण्याची किंवा भाजपाला पर्ययाने मोदींना पुन्हा सत्तेवर येऊ द्यावयाचे नाही असा चंग जगातील सर्वात श्रीमंत असे जाॅर्ज सोरास महाशय व शक्तीवान पण दृष्कृत्यें करणार्या लिबरल लाॅबीनी बांधला आहे. त्यामुळे चार राज्यातील विधानसभा निवडणूका २०२४ च्या लोकसभेच्या निवडणूकाची सेमी फायनल मॅच असे मानले गेले. त्या चार राज्यातील निवडणूकापैकी तीन राज्यात भाजपाने प्रचंड विजय मिळविला. त्यामुळे लिबरल लाॅबीची फजिती झाली. त्या फजिती संबंधित चर्चा करावी असे मला वाटले म्हणून हा लेख प्रपंच.
काळ कसा बदलतो ते पहा. सन १९९८ ला दैनिक लोकसत्तेत माझा 'सर्वधर्म समभाव व राजकीय पक्षांचा व्यवहार ' या शिर्षकाचा लेख संपादकीय म्हणून प्रकाशित झाला होता. त्या काळात केंद्रात राजकीय अस्थिरता होती. म्हणून देशाच्या आर्थिक स्थिरते साठी राजकीय पक्षात मतैक्य व्हावे या शिर्षकाचा मी लिहलेला एक छोटा लेख दै लोकसत्तेत पब्लीश झाला होता. नंतर लोकप्रभात या साप्ताहीकात 'अल्पसंख्यांक कोणाला म्हणावे ' या शिर्षकाचा माझा लेख प्रकाशित झाला. सन १९९१-९२ साली 'आयुर्विमा क्षेत्रात स्वदेशीचं महत्व ' हा १५०० शब्दाचा लिहलेला माझा लेख अर्थ वृत्तान्त पुरवणीत छापून आला होता. अर्थात हे सर्व लेख माझे परम मित्र, आर्थिक गुंतवणूक सल्लागार व अष्टपैलू व्यक्तीमत्वाचे श्री विनायक कुळकर्णी यांच्या सहाय्याने छापून आले होते. दै लोकसत्तेचे संपादक बदलले गेले आणि माझ्या लेखांना स्थान मिळेनासे झाले. सन १९७५ ला देशात आणिबाणी लावून वैचारीक स्वातंत्र्य छाटले गेले होते त्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी सरकारच्या विरोधात लढा उभारला गेला त्यात अग्रणी स्थानावर राहीलेले दै लोकसत्ता आज लिबरल अभ्यासकांचे हातचे बाहूले झाले आहे. माझे वृत्तपत्रात लेख छापून येण्याचा मार्ग बंद झाला तरी मी लेखन चालू ठेवले होते. त्यात राजकीय, सामाजिक तसेच अध्यात्मिक विषयावर ही लेख आहेत. त्यातील तत्कालीन राजकीय घटनावरील लेख ऑउट ऑफ डेट झाले आहेत असे नाही. कारण त्या घटनांना ऐताहासिक महत्व कायम असते. म्हणून सामाजिक विषयाच्या लेखांसोबत ते लेख ही मी जपून ठेवले आहेत. योग्य त्या वेळी ते ब्लाॅगवर प्रकाशित करीत राहणार आहे. आजच्या Digital युगात आपल्या सर्वसामान्यांना ही व्यक्त होण्यासाठी (ज्याला सोशल मिडीया मानतो अशी) blog, whatsapp,Twiter इत्यादी माध्यमें अस्तित्वात आल्यामुळे जगभरातील कुठल्या ही देशातील कुठल्याही घटनां किंवा राजनैतिक विषयांवर नेगेटिव नॅरेटिव मांडून तेथील सरकार उलथुन पाडण्याची प्रचंड शक्ती असलेल्या लिबरल लाॅबीचा भारतीय खेळपट्टीवर पराभव होत आहे. जेव्हा सोशल मिडीया शक्तीशाली नव्हती अशा काळात अटल बिहारी वाजपेयींचे सरकार लिबरल लाॅबीने दोन वेळा पाडले होते. तिसर्यांदा निवडणूका झाल्यानंतर वाजपेयी सरकार विजयी झाले आणि पाच वर्षाचा काळ ते सरकार टिकले. पण २००४ च्या लोकसभा निवडणूकीच्या वेळी लिबरल लाॅबीने मिडीया द्वारे नेगेटिव्ह नॅरेटीव मांडून वाजपेयी सरकारला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश आले. पण नरेंद्र मोदी यांचे सरकार दोन टर्म पुर्ण केलेलं युपीए नावाचं काॅग्रेस प्रणित आघाडी सरकारचा गलथान, मुस्लीम धर्जिणा, प्रचंड भ्रष्टाचाराने माखलेला असा कारभार आणि खोटा-नाटा भगव्या दशहतवादाचे भूत उभे करण्याचे महापाप केल्यामुळे जनतेच्या मनात प्रचंड असंतोषातून उदयास आलेलं आहे. याचं स्मरण जनतेला आज ही आहे. ही बाब लिबरल लाॅबीच्या ध्यानांत येत नाही. बरं दोन-तीन राज्यात काॅग्रेस सत्तेवर आली तरी त्या राज्यातील जनता लोकसभेच्या निवडणूकीत मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना व विकासाचे प्रकल्प पूर्ण करण्याची धमक पाहून भाजपाला मतें देते. या शिवाय मोदी सरकारच्या कार्याची स्तुती करणारी सोशल मिडीयावरील यु ट्युब चॅनेल्स, ब्लाॅग्ज सोबत मेन मिडीयातील चॅनेल्स आणि वृत्तपत्रांची संख्या वाढत आहे. कोरोना नंतर आर्थिक मंदीच्या तडाख्याची झळ लागू नये म्हणून ज्यांचा व्यवसाय शस्त्रास्त्रे विकण्याचा आहे अशी बडी राष्ट्रे जगात काही तरी कुरापती काढून युद्ध खेळतील वा खेळवतील असा अंदाज मी रशिया आणि युक्रेन मधील युद्ध सुरू होण्याच्या अगोदर एका लेखात मांडला होता. तसेच सांप्रत काळात महायुद्धापेक्षा आर्थिक महासत्तेची प्रचंड लालसा व त्यातूनच विकसनशील व अविकेसित देशात आपली हुकमत व आपल्या विचारसरणीचा प्रसार वाढावा म्हणून तेथील सरकार उलथुन पाडण्याचा उद्योग बडी राष्ट्रे करू लागली आहेत हे सत्य मी सतत मांडत आलो आहे. सन २०२४ च्या निवडणूकीत मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येऊ नये असा चंगच काही बड्या राष्ट्रांनी बांधला आहे हे ही आपण जाणत आहात. नेमक्या अशा वेळी रशिया आणि युक्रेन मध्ये सुरू असलेल्या युद्धात मोदी सरकार रशियाच्या समर्थनासाठी पुढे आले. त्यानंतर इजरायल आणि हमास मध्ये युद्ध सुरू झाले. तेव्हा भारताने इजरायलला समर्थन दिले. रशिया- युक्रेन युद्धात अमेरिका व नाटो देशांना आपण दुखाविले. इजरायलचे समर्थन करून आपण मुस्लीम देशांना दुखविल्यामुळे आपल्या देशातील लिबरल लाॅबीचे चमचेगिरी करणारे पत्रकार व संपादक मंडळीं मोदी सरकारवर टिका करू लागले. आपला देश जगात एकाकी पडला आहे अशी अफवा पसरविण्यासाठी गल्ली-बोळातील डाव्या विचारसरणीच्या टपोरी मुलांनी सुद्धा आपल्या ज्ञानाची (वस्तुतः अज्ञानाची) तलवार पाजळयला सुरूवात केली. नेमक्या याच वेळी चार विधानसभा निवडणूकाचा प्रचार सुरू झाल्यामुळे, राहूल गांधीच्या भारत जोडो यात्रेमुळे संघ व भाजपाचे नफरतीचे राजकारण आता उघडे पडणार आणि चार ही राज्यात भाजपाचा दारूण पराभव होणार अशी आशा काॅग्रेस व तिचे समर्थक मिडीयातील मंडळींना लागली. आपल्या देशातील लिबरल लाॅबी चालवित असलेल्या पत्रकार व संपादक मंडळीकडून होणार्या टिकेवर सडेतोड आणि सत्य ती उत्तरे देण्याची अद्यावत यंत्रणा भाजपाने ही उभी केली आहे. तसेच काही यु ट्युबवरील इंग्लीश हिन्दी आणि मराठी चॅनेल्स तटस्थेने माहिती देत आहेत. या सर्वांचा उपयोग मी गेल्या एप्रिल पासून करू लागलो आहे. त्यामुळे मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येईल या संबंधित मी निंश्चीत आहे. इजरायल आणि हमास मधील युद्ध तात्पुरता का असेना पण थांबलेले दिसते. तसे पाहता ते दोन देशातील युद्ध बिलकूल नाही. हमास या दशहतवादी संघटनेने इजरायलवर हल्ला केल्यानंतर स्वरक्षणासाठी इजरायलने केलेला तो प्रतिकार आहे. इजरायलने हमासाचा खात्मा केला तरी तिसरे महायुद्ध होईल असे संभवत नाही. याचे कारण कुरापत काढणारा इराण स्वतः इजरायल समोर आलेला नाही. आपली हत्यारें कितपत उच्च दर्जाची आहेत या संबंधीची चाचणी इराणला करावयाची होती असे मला वाटते. दुसरे कारण असे आहे की अरबियन देश उघडरित्या हमासच्या पाठीमागे असली तरी त्यातील काही देश खाजगीत अमेरिका आणि काही देश चीनला हे युद्ध थांबवावे अशी विनंती करीत आहेत. अमेरिका आणि चीन या देशांची ' सांगता येत नाही आणि सहन होत नाही ' अशी अवस्था झाली असावी असा माझा अंदाज आहे. तथापी या युद्धा संबंधीत लष्कर व जागतिक राजकारणातील, अनेक देशाच्या परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक हे युद्ध थांबेल असे ठामपणे मांडत नाहीत. इस्लामी दशहतवादी संघटनांना अमाप पैशाचा वाटप करून जगभर अशांतता निर्माण करण्याची खाज लिबरल मंडळीला जडली आहे. ही खाज फक्त काही इस्लामी देशांनाच जडली आहे असे नाही. अमेरिका, चीन, रशिया व कॅनडा इत्यादी देशाच्या नेत्यांना आणि तेथील पत्रकार मंडळीला ही जडली आहे. इस्लामी दशहतवादी संघटनांचा दशहत हा धंदा झाला आहे. त्या संघटनांचे नेते आणि त्यांची मुलें पॅलेस्टाईन मध्ये राहात नाहीत. ती मंडळी ऐषारामाचे जीवन जगत आहेत. पाकिस्तान व कतार सारखे देश हे दलालीचे काम करीत आहेत. या दोन्ही देशातील राजकीय नेते ही करोडपती आहेत. पैशाची लालच आणि धार्मिक गुरूच्या शिकवणीतून इस्लामी दशहतवादी रक्तपिपासू झाले आहेत. त्यांच्यावर युनोचा धाक काल ही नव्हता व आज ही नाही. स्वतः इराण आर्थिक बंधनात अडकला आहे त्यामुळे तो आणखिन बंधने वाढवून घेईल असे वाटत नाही. कारण तेथील नेत्यांना ऐषारामी जीवन जगण्याची नशा आहे. ते स्वतः व आपल्या कुंटुबियांना रस्त्यावर कधीच आणणार नाहीत.
जगभरातील लिबरल पत्रकार मंडळींना माध्यमांद्वारें राजकीय घटनांवर मग त्या घटना कुठल्याही देशातील असो, त्यासंबंधी केवळ नेगेटिव्ह नॅरेटिव्ह मांडण्यासाठी लाखो - करोडो रूपये मिळत असतात. त्यांतूनच ते ऐषारामी जीवन जगत आहेत. ऐषारामात जगण्याची इच्छा झाली की मग आपल्या मालकांनी जसे लिहावयास सांगितले तसे लिहीले किंवा म्हटले की काम फत्ते. मग सर्वत्र प्रकाशझोतात राहण्याचा आटापाटा सुरू होतो. त्यानंतर ऐषारामाची सवय जडते. सवयीच्या पुढली पायरी म्हणजे नशा. आपल्या देशातील लिबरल मंडळी ही याच गोत्रातील आहेत. जगभरातील शोषण नष्ट करावयाचे आहे अशी भाषा करणारी हीच ती मंडळी. पण मुलतः ती जगातील सर्वात नराधम जमात.
ऑगस्ट महिन्यात इजरायल व हमास मधील सुरू झालेल्या लढाई बाबतचे दैनिक वृतान्त आणि त्यासंबंधीत जगभरातील विशेषतः अमेरिका, रशिया, चीन, भारत , युरोपियन देश आणि अरेबियन देशातील राजकीय नेते, राजकीय अभ्यासक, लष्करी तज्ञ आणि मिडीया काय म्हणत आहेत हे मी ऐकतो आहे. त्यातून जे काही मला उमजले ते सत्य मी वरती मांडले आहे. लेखाचं शिर्षक आपल्या देशातील चार राज्याच्या निवडणूकां संबंधित आहे, पण तरी ही इजरायल व हमास मधील युद्धाचा विषय मी इथे मांडला. याचे कारण असे आहे की आपल्या देशातील विरोधी पक्ष आणि त्यांची समर्थक मिडीया सन २०१४ पासून स्वतःला लिबरल म्हणवत भाजपा, मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर खोटे-नाटे आरोप करीत जनतेला भडकाविण्याचा प्रयत्न करीत आहेत. भाजपा, पंतप्रधान मोदी, व संघाच्या पाठिशी बहुतांश मतदार ठामपणे उभा आहे. चार पैकी तीन राज्यात भाजपाला यश मिळाले आहे याचे मला बिलकूल आश्चर्य वाटले नाही. कारण जगात जी अशांतता आहे त्याला कारणीभूत असलेली वर नमुद केली आहे त्या नराधम जमातीचे साहाय्य आपल्या देशातील विरोधी पक्ष उघडपणे घेत आहेत. त्याबद्दल ही जनतेत असंतोष आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या सांप्रत जगात आपल्या देशातील बहुतांश मतदार देशाचे संरक्षण आणि परराष्ट्र धोरण कसे आहे या मुद्यावर ही मतदान करू लागला आहे. यावर विरोधी पक्षांचे लक्ष जात नाही. पंतप्रधान मोदींनी इजरायलच्या प्रतिकाराचे समर्थन केले. कारण दशहतवाद्यांची झळ जगात भारता इतकी दुसर्या कुठल्या ही देशाला पोहचली नाही. पण चार राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात आपल्या येथील विरोधी पक्षांनी पंतप्रधान मोदींवर टिका करावयास सुरूवात केली. पंतप्रधान मोदींनी पॅलेस्टाईनच्या हक्काचे ही समर्थन केले आहे. मुळात पॅलेस्टाईन अस्तित्वात नव्हतेच पण इजरायल अस्तित्वात होते. जगातल्या पाशवी वृत्तीच्या राक्षसांनी इजरायल व भारतीय जनतेला सर्वात अधिक त्रास दिलेला आहे. यावर विरोधी पक्षांची नेते मंडळी सतत मौन पाळतात. पण हिटलर वर टिका करतात कारण त्यांना चर्चील आणि स्टॅलीन यांची शांततेचे दूत म्हणून जगाच्या इतिहास कोरून ठेवायाचे होते. तसे त्यांनी केले. पण काळ बदलला आणि या लिबरल मंडळीच्या घराचे वासे ही फिरू लागले आहेत.
दरम्यान पंतप्रधान मोदींनी कतार ला सरळ केले आणि चीन, अमेरिका, तुर्की देशांची फिकीर बाळगली नाही. पाकिस्तानला त्यांनीच तयार केलेल्या विषाचे डोस पाजायला सुरूवात केले असल्याचे ऐकीवात आहे. ते खरे आहे की नाही यावर विचार करण्याची गरज नाही. कारण जिथे चीन सारख्या देशाला चूपचाप बसविले आहे तिथे पाकिस्तान ' किस पेड की मूलीं !' तरीही विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या जिभेवर मुस्लीम समाजाच्या मताच्या चवीची हाव काही केल्या सुटत नाही. मुलतः जगभरातील लिबरल मंडळी लिबरल नाहीच. ती एक extrimist टोळी आहे. काँग्रेस पक्ष त्या extremist टोळीच्या चरणी लोंटागण घालीत आहे. सन २०१४ पासून सुरू झालेला हा सिलसिला आजही कायम आहे. मोदी सरकारचा सर्व क्षेत्रातातला कारभार जनहिताचा व राष्ट्र हिताचा आहे हे बहुतांश मतदारांना वाटत आहे. हे सत्य मी ब्लॉगवर सतत मांडत आलो आहे.
भाजपाने सन २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषीत केले, तेव्हा केंद्रात युपीएचे सरकार होते. निवडणूक संपल्यानंतर मी दै मुबंई सकाळ मध्ये पाठविलेला ' लोकसभा निवडणूक २०१४ शोध व बोध ' हा संपादकीय लेख प्रकाशित झाला होता. त्या बद्दल दै मुंबई सकाळच्या संपादकांचे जीमेल वरून आभार ही मानले. त्या निवडणूकीच्या प्रचाराच्या धुलवडीत महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रताप आसबेंचा ' मोदी नावाचा जाहिरतीचा चेहरा ' असा लेख आला होता. त्यावर प्रत्युत्तर म्हणून मी मटाकडे लेख पाठविला होता पण छापून आला नाही. तो ही वेगळ्या शिर्षकाने योग्य वेळी प्रकाशित करीन. सन २०१४ च्या निवडणूकीत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंगचा चेहरा कमकुवत ठरला. त्यात ही ते नामधारी पंतप्रधान होते. प्रत्यक्ष सरकार काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी सरकार चालवत होत्या. त्यावेळी कधी नव्हता इतका प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. त्याचे स्मरण जनतेला आज ही आहे. मोदींनी पंतप्रधान या नात्याने देशातील बहुतांश राज्यात विकासाचे प्रकल्प सुरू केले आहेत. त्यातील बहुतांश प्रकल्प जलद गतीने पुर्ण करून दाखविले आहेत. म्हणून ' मोदी म्हणजे गॅरेन्टी ' ही टॅग लाईन तीन राज्यातल्या लोकांना चांगलीच भावली असे दिसते.
ज्यावेळी देशातील इतर राज्यातील मुख्यमंत्री झोपा काढत होते तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदींनी वायब्रन्ट गुजरात असा नारा देत, अहो रात्र मेहनत करून गुजरातला उद्योगाची हब बनविले. गुजरात राज्याला देशातील सर्वात विकसीत राज्य म्हणून असा दर्जा मिळवून दिला. विकासाचे गुजरात मॉडेलवर सतत टिका करणे, त्यांना मौतका सौदागर, एक चायवाला, चौकीदार चोर आहे, पाकवर केलेला सर्जिकल स्ट्राईक खोटा आहे, रॅफेल घोटाळा आणि अलिकडे पनौती अशी लेबलं राहून पंतप्रधान मोदीं हुकूमशहा आहेत असा अपप्रचार करण्यात विरोधी पक्ष आणि त्यांचा समर्थक मिडीया गुंतला आहे. केवळ गुंतला असता तर चालले असते पण त्यातच विरोधी पक्ष रमत आहेत. विरोधी पक्षांनी राजकारणाचं रूपांतर चिखलात केले आहे. त्या चिखलात विरोधी पक्षांचे नेते मंडळी अधिकाधिक रूतून जात आहेत. त्यांच्या सोबत त्यांचे कार्यकर्ते, आणि समर्थक पत्रकार व संपादक मंडळी सुद्धा रूतत आहे. मी या खेपेस निवडणूक प्रचाराच्या ना सभा पाहिल्या, ना इलेट्रॉनिक्स मिडीया तर्फे रस्त्यावर, चौकात, व मतदारांच्या वस्तीत जाऊन घेत असलेल्या मुलाखती पाहील्या. निवडणूक प्रचार काळात आणि निवडणूकीनंतर सुद्धा मी ना ओपिनियन पोल पाहिले, ना राजकीय अभ्यासकांची चर्चा पाहिली. कारण निवडणूका हा लोकशाहीच्या गळ्यातील दागिना राहीला नाही. त्याला प्रत्येक प्रान्तात निर्माण झालेले घराणेशाही पक्ष, डावे पक्ष, राजकारणात घराणेशाहीला जन्म देणारा काँग्रेस पक्ष आणि देशातील अनादी काळापासून चालत आलेल्या सनातन संस्कृतीची हेटाळणी करणारे विरोधी पक्षांचे नेते मंडळी व लिबरल नावाची भुतें जबाबदार आहेत. चार राज्यातील निवडणूका च्या निकालाने सन २०२४ च्या लोकसभेच्या निवडणूकात भाजपाला व मोदी सरकारला विजय मिळणार आहे हे अधोरिखीत झाले आहे. प्रश्न भाजपाला किती सहजपणे आणि किती मोठ्या प्रमाणात विजय मिळेल हाच उरला आहे. यापेक्षा इथे अधिक काही लिहीण्याचे उरले नाही. म्हणून मी इथे थांबतो.
रविवार, २० ऑगस्ट, २०२३
ओम् स्वतंत्रते भगवती नमः |
शुक्रवार ११ऑगस्ट २०२३ ला विश्व संवाद केंद्र, कोकण प्रान्त तर्फे आयोजित समान नागरी संहीता या विषयावर ॲडव्होकेट अंजलीताई हेळेकर यांचे ऑनलाईन व्याखान ऐकले. हा विषय तसा क्लिष्ट. पण सध्या जनसामान्यांची उत्सुकता आणि रूची वाढती आहे. अंजलीताईने हा विषय आपल्या ओघवत्या शैलीत सोपा करून मांडला. या शिवाय व्याख्यान संपल्यावर उपस्थितांकडून प्रश्न घेत समर्पक उत्तरे दिली. त्यामुळे चार-चौघात सहजपणे या संबंधी चर्चा करू शकतो असा आत्मविश्वास श्रोत्यांना नक्कीच आला असावा. समान नागरी संहीता ही बाब विवाह, घटस्पोट, दत्तक विधान, धार्मिक कायद्यातील तफावत, वारस हक्क, सोशल वेलफेअर इत्यादी बाबीशी निगडीत आहे. त्यावर लाॅ कमीशन कडून जनमत घेतले जात आहे. त्यासंबंधी स्वतंत्रपणे आपण चर्चा करणार आहोत. पण ---
स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या संकल्पना आपण उसन्या घेतल्या आहेत हे तितकसं पटत नाही. आपल्या देशात वैदिक काळापासून समानो मंत्रः समितीः, समानी व आकृतिः आणि ओम सहनाववतु इत्यादी प्रार्थना स्वरूपात आज ही म्हटल्या जातात. वसुधैव कुटुम्बकम् हे संस्कृत बोधवचनाचा आपल्या येथे किर्तन प्रवचनांपासून तसेच सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात मुक्त कंठाने उपयोग केला जातो. इतकेच नव्हे तर राजकीय पक्षांच्या प्रचारसभांत ही उपयोग होत असतो. वसुधैव कुटुम्बकम् या संस्कृत वचनाचा मूळ संदर्भ स्त्रोत हा महाउपनिषद् नावाच्या उपनिषादात येतो. या वचनाचा श्लोक असा आहे - अयं बन्धुरयन्नेति गणना लघु चेतसाम् उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ||याचा अर्थ आहे " हा माझा बंधू आणि हा नाही असा विचार संकुचित किंवा क्षुद्र बुद्धीचे लोक करतात. उदार चारित्र्याचे लोक (अर्थातच हिंदू) संपूर्ण पृथ्वी(वसुधा) हेच कुटुम्ब मानतात.
कायद्यापुढे सर्व समान असे बोल आपल्या मुखीं आणि आपल्या कानीं सहजपणे आणि सराईतपणे येतात. आपल्या संस्कृतीत आपण सारें ईश्वराची लेंकरे आहोत अशी धारणा वैदिक काळापासून प्रचलीत आहे. समान नागरी संहिता हे जितकं लोकशाही व्यवस्थेचं व्यवच्छेदक लक्षण आहे तितकचं ते एक मानवी जीवनमूल्य आहे अशी आपली धारणा आहे. म्हणून शाळेत प्रार्थना सोबत जीवनमुल्यावरील कथा आणि चर्चेसाठी वेळ ठेवण्याचा प्रघात सुरू झालेला असावा.
रविवार १२ ऑगस्टच्या रात्री विश्व संवाद केंद्राच्या साईट वरून अखंड भारत या विषयावरचा लेख वाचला. लेख इतका अभ्यासपुर्ण आहे की वाचताना हा एक अप्रतिम ऐताहासीक दस्तऐवज आहे अशी पदोपदी धारणा होते. या तिन्ही गोष्टी म्हणा वा प्रसंगातून मला लिखाण करण्याची प्रेरणा मिळाली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त काही लिखाण केले नाही अशी माझ्या मनात खंत निर्माण झाली होती. तीच उफळून येत आहे असे जाणवले. त्यातून स्वातंत्र्य आणि लोकशाही या दोन मोठ्या जीवनमुल्यांवर चर्चा करता करता छोट्या छोट्या जीवनमुल्यांचे ही उकल होईल असा मी अंदाज बांधला. अर्थात यात कितीपत यश मिळेल हे या घडीला सांगता येत नाही. पण प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. आपण वाचक मित्र सांभाळून घेतील आशा बाळगुन आपल्या समोर आलो आहे.
सोमवार १४ ऑगस्ट २०२३ चा दिवस उजाडला. पण माझी संभ्रम अवस्था संपली नाही. ७६ वर्षापुर्वी मध्यरात्री पर्यंत आपला देश अखंड हिंदुस्थान होता. दिनाक १५ ऑगस्ट १९४७ साली मध्यरात्री दिल्लीतील लाल किल्ल्यावरून ब्रिटीश राजवटीचा युनियन जॅक खाली उतरविला आणि स्वतंत्र भारताचा तिरंगा ध्वजाहोरण झाले. आपल्या दुर्दैवाने देशाची फाळणी झाली होती. फाळणीचे शल्य टोचत होते. मुस्लीम बहूल प्रान्ताचं पश्चिमेला आणि पुर्वेला बंगाल प्रान्ताला जोडून इस्लामिक रिपब्लीक पाकिस्तान नावाचा देश उदयास आला. दुसर्या महायुद्धात पराभूत झालेल्या जर्मन देशाची फाळणी झाली होती. पण दोन्ही जर्मनी देश एकत्र आले. आपला देश पुन्हा अखंड स्वरूपात पाहावयास मिळेल का ? या प्रश्नाने मन पुन्हा अस्वस्थ झाले.
मंगळवार १५ ऑगस्ट २०२३ उजाडला. आपल्या देशाचा ७७ वा स्वातंत्र्यदिन ! सर्वत्र आनंदाने साजरा झाला. सकाळी आमच्या आनंदराव पवार शाळेत स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात गेलो होतो. दर वर्षी आमच्या शाळेतून शालान्त परीक्षेत ज्याने पहिला क्रमांक पटकाविला त्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण होत असते. या वर्षी अमृता कांबळे या विद्यार्थीनीच्या हस्ते ध्वजारोहण झाले. अमृता कांबळे शाळेतून पहिली आलीच पण शालान्त परीक्षा बोर्डाच्या बोरीवली-कांदिवली मराठी माध्यमाच्या विभागात ही तिने ९७-७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमाक पटकाविला आहे. ध्वजारोहणा नंतर एका पाठोपाठ एक डोळ्याचे पारणे फिटावे असे कार्यक्रम विद्यार्थ्यानी सादर केले. आजी-माजी विद्यार्थी आणि पालक वर्ग सकाळी ७ वाजल्यापासून उपस्थित होते. उशीर झाला होता. शेवटी उपस्थित विद्यार्थी- पालक वर्गाला शुभेच्छा देऊन कार्यक्रम संपला. संध्याकाळी घरी देशभक्तीपर गाणी ऐकत होतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांची ' जयोस्तु ते श्रीमहान्मंगले शिवास्पदे शुभदे | स्वतंत्रते भगवति त्वामंहम् यशोयुतां वंदे || ' ही कविता ऐकली आणि या लेखाचं शिर्षक गवसले. "||ओम् स्वतंत्रते भगवती नमः ||"
या लेखाचे नाव बोलण्यासाठी आणि ऐकण्यासाठी सोपे आहे. पण इतिहासातून या देवतेचं यथार्थ स्वरूप मांडणे हे माझ्यासाठी अशक्यप्राय आहे. याची मला जाणीव आहे. पण गेल्या काही महिन्यात देशात विशेषतः आपल्या महाराष्ट्र राज्यात रोज घडणार्या तथाकथीत राजकीय भूकंप, व दोन्ही पवारांची पाॅवर संबंधीत झालेल्या घालमेलाच्या बातम्यामुळे तो विषय सोडून वेगळ्या विषयावर लिहावे असा पर्याय शोधत होतो, तो प्राप्त झाला. हा पर्याय साधासुधा नाही. प्रयत्न सुरू केले की थोडंफार यश पदरात पडेल अशी आशा आहे. अशा लेखांत राजकारणातल्या दैनंदिन घटना, तसेच सामाजिक, आर्थिक, कला- क्रिडा इत्यादी क्षेत्रातील घडामोडीचा समावेश नसेल. तसेच हा विषय गहन ही आहे. पुर्णपणे अभ्यास करून लेख लिहावे लागतील. म्हणून या मालिकेत जे लेख पब्लीश होतील ते सलगतेने होणार नाहीत. हे प्रांजळपणे कबूल करून ठेवतो. आपण नेहमीप्रमाणे अशा लेखांना ही आपलेसे करून घ्याल अशी आशा आहे.
स्वतंत्रता ही प्रायः सर्व प्राणीमात्रांना प्रिय असते. कुठल्याही पक्षी वा पशूला मानवाने तयार केलेल्या पिंजरात अडकण्याची भिती असतेच. बालपणी आकाशात उडणारे पक्षी पाहून आपल्याला ही पंख असते तर आपण ही आकाशात स्वैरपणे विहार केला असता असे वाटत असे.जंगलात वाघ, सिंह सारखे हिस्त्र पशू स्वैरपणे हिंडत आपल्या ताकदीच्या जोरावर भक्ष्य मिळवित असल्याच्या कथा ऐकताना किंवा वाचताना, अशा प्राण्यांचा ही हेवा वाटत असे. शाळा नाही, होमवर्क नाही, आई-वडील शिक्षकांचा धाक नाही, अशी स्वतंत्रता आपल्याला असती तर, पण--
जसे आपण मोठे होत जातो तेव्हा लक्षात येते की या पशू-पक्ष्यांपाशी बुद्धी नाही. त्यांच्याकडे उद्यासाठीचं भक्ष्य वा अन्न साठविण्यासाठी फ्रिज नसतात. तिथे कोणी राजा नसतो आणि प्रजा नसते. बळी तो कान पिळी हाच जीवनाचा धर्म. अनेक पक्ष्यांना आणि प्राण्यांना सतत मरण्याची भिती सतावत असते. कारण ' जीवो जिवस्य जीवनम् ' हा या मानवेतर जगातला मुख्य नियम आहे. तिथे पक्षी आपल्या पिल्लूंना आकाशात कसे उड्डाण करावे असे शिकवित नसतात. सिंह आपल्या छाव्याला शिकार कशी करावी याचे शिक्षण देत नसतो. गुरू-शिष्य व्यवस्था फक्त माणसात असते. पशु-पक्षांचा कळप व थवा असतो. तर माणसासाठी समाज व्यवस्था असते. पशु-पक्षांचे जीवन सामुदायिक असते तर माणसाचे जीवन सामाजिक असते. माॅन्टेस्क नावाच्या पाश्चात्य विचारवंताने म्हटले आहे की Man is a social being formed to enjoy in society. " मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे. तो समाजात असला म्हणजे त्याला प्रसन्न वाटते. सुखाचा खरा आनंद त्याला समाजातच मिळतो. हा मनुष्य स्वभाव आहे. हाच माॅन्टेस्क यांच्या व्याख्याचा भावार्थ आहे ". म्हणून त्यांच्या व्याखेला अधिक मान्यता मिळाली.
इतर अनेक पाश्चात्य विचारवंतानी समाज या शब्दाच्या आपआपल्या परीने अनेक उपपत्ती सांगितल्या आहेत. त्या बहुतांशी भौतिक सुखाला केंद्रस्थानी ठेवून केलेल्या आहेत. त्यात गैर काही नाही पण स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार माजतो. सुख, मग हव्यास पुढे नशा त्यातून नैसर्गिक संपत्तीचे नुकसान, शेवटी व्यक्ती बेताल, समष्टी गोंधळात आणि सृष्टी प्रदुषणात, शेवटी सर्वनाश मग उरते काय? नरेची केला नर किती हीन ! हिंदी चित्रपटातले एक गीत आठवले. " देख तेरे संसारकी हालत क्या हो गयी भगवान | कितना बदल गया इन्सान."
आपल्या भारतवर्षातील ऋषीमुनींनी समाज म्हणजे ईश्वर आणि ईश्वराचे वर्णन करतांना प्रचंड विराट पुरूषाचे चित्र रेखाटले आहे :--
ओम सहस्त्रशिर्षः पुरूषः सहस्त्राक्षः सहस्त्रपात् || स भुमीं विश्वतो वृत्वात्य-तिष्ठद्दशांगुलम् || " याचा असा अर्थ -- त्याला हजारो मस्तके आहेत, हजारो डोळे आहेत आणि हजारो चरण आहेत. सकलप्राणी रूपाने अनंतशः अनंत अवयव धारण करणारा विराटसंज्ञक पुरूष ब्रह्मांडास सर्व भागी व्यापून दहा अंगुळे उरलाच आहे असा तो परमेश्वर सर्वभूतांतरात्मा आहे. म्हणून माझा आणि सगळ्या समाजाचा, संपुर्ण सृष्टीचा अत्यंत आत्मियतेचा संबंध आहे. सगळं जग माझे आहे व मी सगळ्या जगाचा आहे. ही भावना आपल्याकडे अनादी काळापासून जोपासली जात आहे, त्यांत खंड पडला नाही. आपल्या संस्कृतीच्या या अभूतपुर्व वैशिष्ट्याचं जगातील बहुतांश विचारवंतांनी कौतूक केले आहे.
ग्राम पातळीवर ग्रामपंचायत नावाची राजकीय व्यवस्था आणि समाज व्यवस्था असते, तर शहरात महापालिका असते व हाऊसिंग सोसायट्या असतात. राज्य पातळीवर राजकीय व्यवस्था म्हणजे विधानसभा आणि राज्य सरकार असते तर देशपातळीवर लोकसभा आणि केंद्र सरकार असते. या शिवाय न्यायालय आणि अनेक एजन्सीस असतात. मी स्वतंत्र आहे पण इतका नाही की ग्रामपंचायतने केलेल्या नियमाची मी पायमल्ली करेन; मी ज्या शहरात राहतो तेथील महापालिकीचे नियम मला पाळणे आवश्यक असते; राज्यस्तरावर राज्य सरकार ने तसेच देशपातळीवर केंद्र सरकारचे नियम आपल्या पाळावे लागतात. यातच स्वातंत्र्याचा आनंद सामावलेला असतो.
स्वातंत्र्य दिन असो वा प्रजासत्ताक दिन हे दोन्ही राष्ट्रीय उत्सव आहेत. आपल्याला स्वांतत्र्यचा व्यापक अर्थ कळावा व त्याचे भान ठेवून प्रत्येक नागरिकाने आपले आचारण ठेवावे हा हेतू साध्य व्हावा म्हणून हे उत्सव आपण साजरे करीत असतो.
तसेच अहिंसा व सत्याग्रह ही दोन शस्त्रे हाती घेतलेली नेतेमंडळी, सशस्त्र क्रान्तीमार्ग स्विकारून प्राणाची आहूती देणारे स्वातंत्र्यसैनिक आणि ज्यांनी देशाचे संविधान तयार केले त्या घटना समितीचे सदस्य, संत मंडळी इत्यादी थोर पुरूषांच्या प्रती कृतज्ञता कायम राहावी आणि त्यातून देशाचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याची क्षमता आपल्यात कायम राहावी इत्यादी हेतू ही या दोन्ही उत्सवाच्या माध्यमातून साध्य होत असतात.
वस्तुतः आपला देश हजार वर्षे परवशतेच्या पाशात अडकलेला होता. म्हणून मध्ययुगात वेळोवेळी परकीय आक्रमकांशी कडवी झुंज ज्यांनी दिली ते ही स्वातंत्र्यसैनिकच होत. त्यात काही ठिकाणी पराभव झाला, तर काही ठिकाणी विजय मिळविला. तो आपल्या समाजाचा होता असे मानून ते ही राष्ट्रपुरूषच होते असे प्रान्त, भाषा, जात व धर्म असा भेद सोडून मानणे हा आपला स्वभावधर्म व्हावा, हा ही स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक साजरा करण्याचा आणखिन एक उद्देश असतो. देशातील थोर पुरूषांनी आपआपल्या क्षेत्रात दाखविलेल्या पराक्रमाची केवळ थोरवी गाऊन आपले कार्य वा कर्तव्य संपले असे मानून चालणार नाही.त्यासाठी --
प्रत्येक नागरिकाने आपले शरीर कणखर बनविणे आवश्यक आहे. बलोपसनेची गरज असते. बलोपसना म्हणजे दैनंदिन जीवनात काही यम-नियम आहेत ते ही पाळणे आवश्यक असते. शरीर सुदृढ तर मन, व बुद्धी सुदृढ मगच खरे स्वातंत्र्य उपभोगता येते. स्वतंत्रतेची व्याख्या फार व्यापक आहे. त्यावर जसजशी आपली चर्चा पुढे जात जाईल तशतशी तिचे दर्शन अधिकाधिक भव्य होत जाईल. स्वतंत्रता असली की माणसाच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते. हे आधुनिक शरीर -विज्ञान आणि मानसशास्त्राने मान्य केले आहे. विख्यात शास्त्रज्ञ आईन्स्टाईन एके ठिकाणी म्हणतात की Imagination is more important than knowledge. याचा अर्थ नव्याचा ध्यास घेतला, की नवे उपयोगी ज्ञान म्हणजेच नवीन तंत्रज्ञान जन्मास येते. आजच्या युगात नवीन तंत्रज्ञानाचा साह्याने देशाच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक शस्त्रे निर्माण करता येतात. अशा शस्त्रांची निर्मिती स्वबळावर आपल्या देशात सुरू झालेली आहे . स्वतंत्रते तून हाती आलेली ही देशाची मोठी संपदा आहे.
स्वतंत्रता, सुरक्षता व समता यांचा संगम झाला की अंतर्गत दुही, भेदाभेद लयास पावतात. त्यातूनच इतर व्यवस्था सुद्धा ओघाने सक्षम होत जातात. हजार वर्षाच्या परवशतेच्या पाशातूनच आपल्या देशातील अनेक प्रकारच्या संपदा आक्रमकाने लुटल्या. आणि नको ती मानसिक व वैचारीक गुलामी आपल्यात जडली गेली. दुर्दैवाने ती आजही आहे. जो पर्यंत तिचे उच्चाटन होत नाही तो पर्यंत संपुर्ण स्वतंत्रता अनुभवयास येणार नाही.
मानसिक व वैचारीक गुलामी दूर करण्यासाठी सांघिक प्रयत्न व्हावेत तसेच सतत दक्षतेने राहण्याची इच्छा अबाधित ठेवणे गरजेचं आहे. यालाच जन जागृती वा जनजागरण म्हटले जाते. सरकार मग ते केंद्रातले असो वा राज्यातले असो जनजागृतीचे कार्यक्रम करीत असते याबाबत दुमत नाही. असे असले तरी जनजागरणाचे कार्यक्रम सरकारच्या कायदा व सुव्यवस्था, तसेच सांस्कृतिक व क्रिडा खात्यांच्या मार्फत होत असताना त्यावर थोडी-फार राजकारण नावाचे एक ग्रहण आहे त्याची छाया पडते. या उलट काही सांस्कृतिक संस्थां व शैक्षणिक संस्थां तर्फे एखाद्या विषयावर वा समस्यावर जनजागृतीचे कार्यक्रम राबविले जातात ते मोठ्या प्रमाणात स्मरणीय ठरतात, असा आपला सार्वत्रिक अनुभव आहे. कारण अशा संस्थाच्या द्वारें बालवयातच विद्यार्थावर चांगले संस्कार होऊ शकतात. मुलांवर शिशु अवस्थेत चांगले संस्कार झाले की पुढे तेच चारीत्र्यवान नागरिक होतात.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक पुज्यनीय श्री गोलवलकर गुरूजींनी आपल्या विचारधन या पुस्तकात छोटीसी कथा मांडली आहे. ' सामर्थ्य हेच जीवन आणि दुर्बलता म्हणजे मृत्यू ' हेच आपल्या सर्व धर्मग्रंथाचे सार आहे असे म्हणत शरीर बलवान असणे किती आवश्यक आहे हा मुद्दा श्री गुरूजींनी एका कथेतून समजावून दिलेला आहे. त्या कथेत चारित्र्याचे महत्व पटवून दिले आहे. ती कथा भक्त प्रल्हादाच्या चरित्रातील आहे. ती अशी आहे --
'' पुण्य कर्माच्या बळावर इंद्राला पदच्युत करून प्रल्हाद स्वतः देवेंद्र बनला. तेव्हा देवांचे गुरू बृहस्पती यांच्याकडे जाऊन इंद्र म्हणाला, 'महाराज, माझी दयनीय अवस्था आपल्याला माहिती आहे. काय केले म्हणजे माझे सिंहासन मला परत मिळेल?' बृहस्पती म्हणाले, ' एखाद्या सामान्य अतिथीचा वेष धारण करून तू प्रल्हदाच्या दरबारीं इच्छादानाच्या वेळी जावे. याचक जे मागेल ते प्रल्हाद देतो. त्यावेळी तु जा आणि त्याच्यापाशी त्याचे शील माग. इंद्राने ते मानले आणि अथितीच्या वेषात प्रल्हादापाशी जाऊन त्याचे शील मागतो.
प्रल्हादाने अतिथीला (अर्थातच इंद्र देवाला) विचारले ' माझ्या केवळ शीलावर तू संतुष्ट आहेस हे कसे ? ' अतिथीने उत्तर दिले, ' मला एवढेच पुरेसे आहे. ' प्रल्हाद म्हणाला, ' हे माझे शील तुला दिले.' त्याने असे म्हणताक्षणीच त्याच्या शरीरातून एक आकृती बाहेर पडली आणि अतिथीच्या शरीरात प्रविष्ट झाली. प्रल्हादाने त्या आकृतीला विचारले, ' तु कोण आहेस ? माझे शरीर सोडून अतिथीच्या शरीरात का प्रवेश करीत आहेस?' त्या तेजस्वी आकृतीने उत्तर दिले, ' मी तुझे शील आहे. मला तू या अतिथीला देऊन टाकले आहेस. त्यामुळे मला आता त्याच्या शरीरात प्रवेश करणे भाग आहे.' क्षणार्धात आणखी एक तेजस्वी आकृती प्रल्हादाच्या शरीरातून बाहेर पडली. प्रल्हादाने त्या आकृतीस विचारले ' तू कोण आहेस ? माझे शरीर सोडून तू बाहेर का जात आहेस? ' त्या आकृतीने उत्तर दिले, ' मी तुझे शौर्य आहे. मी शीलाचा सेवक आहे. तुझ्यापाशी जे शील होते तो पर्यंत मी तुझ्या शरीरात होतो आणि तो पर्यंत मी तुझी सेवा केली, आता शील निघून गेले आहे. त्यामुळे त्याच्या मागोमाग मी ही जात आहे.' अशा प्रकारे आणखिन आकृती प्रल्हादाच्या शरीरातून बाहेर पडल्या. शेवटी अतितेजस्वी अशी एक स्त्रीरूपी आकृती प्रल्हादाच्या शरीरातून बाहेर पडली. ती म्हणाली, ' मी तुझी राज्यश्री आहे. मी ही शीलाचीच सेवक आहे. तू तुझ्या शीलाचा त्याग केला असल्यामूळे आता मी ही निघून जात आहे. अशा प्रकारे प्रल्हाद आपली सर्व सत्ता व वैभव गमावून बसला आणि इंद्राला त्याचे सिंहासन परत मिळाले. तात्पर्य शील असेल तर कोणतेही गोष्ट सहज होऊ शकते. ही गोष्ट जितकी व्यक्तीच्या बाबतीत खरी आहे तितकीच राष्ट्राच्या बाबतीत ही खरी आहे. "
वाचक मित्र हो, वरील कथेवरून मला एक वाक्य आठवले. चर्चेच्या ओघात जिथे आवश्यक वाटते तिथे माझ्या वाचनात आलेले ते वाक्य रेफरन्स म्हणून मी देत असतो. ते वाक्य माझ्या वाचनात २४ ऑगस्ट सन १९७३ ला आले होते. ते आज ही स्मरणात आहे. त्यावेळी दक्षिण मुंबईच्या हुतात्मा चौकातील (फोर्ट सर्कल) अकबरअलीज् स्टोअरच्या समोर एलआयसीची शाखा क्रमांक ९०१ चे ऑफीस डॅडी हाऊस या इमारतीत होते. तो नोकरीतील माझा पहीला दिवस होता. लंच ब्रेक झाले. डब्बा खाल्यानंतर जिथे विकास अधिकारी बसतात त्यांचा परिचय करून घ्यावा या उद्देशाने मी त्या विंग मध्ये गेलो. प्रथम श्री माधव बर्वे या जेष्ठ विकास अधिकारीशी ओळख करून घेतली. त्यांच्या टेबलावर छोटेसे ग्रिटीग कार्ड लॅमिनेट करून त्यावर प्रिन्ट केलेलं एक वाक्य मी पाहीले आणि वाचले. त्या वाक्याच्या खाली उद्गाता कोण हे लिहीलेलं नव्हतं. मी माधवजींना विचारले तर त्यांना ही ते वाक्य कोणी म्हटले हे ठाऊक नव्हते. मला वाटतं त्या वाक्याचा उगम भक्त प्रल्हादाच्या कथेतुनच झाला असावा. ते वाक्य असे आहे--
' Progress of the nation is far less depend upon form of it's institution rather than character of it's own men.' (अर्थ-- कुठल्या ही देशाचा विकास हा तेथे कुठल्या प्रकारची राज्यव्यवस्था आहे या पेक्षा त्या देशातील नागरिकांच्या चारित्र्यावर अधिक अवलंबून असते.)
वाचक मित्र हो, पुजनीय गोलवलकर गुरूजींनी अनेक जीवनमुल्यांची मांडणी विचारधन या पुस्तकात केली आहे. आपल्या धर्मशास्त्रांच्या बहुतांश पुस्तकातून मानवी जीवनमुल्यांवर आधारीत कथा असतात. त्या कथा छोट्याशा असल्या तरी गगनाला गवसण घालण्याइतकी प्रेरणा त्यातून मिळत असते. चराचर स्षृष्टीतील पहीलं वाहीलं जीवनमूल्य म्हणजे 'स्व' हे होय. एक चैतन्य रुपी शीवाला अनेक व्हावयासं वाटले आणि त्यातून हे विश्व अवतरलेले आहे. त्यात सहस्त्र आकाशगंगा आहेत, सहस्त्र सूर्य आहेत, अगणीत ग्रह-तारे नक्षत्र आहेत. प्रा पु ग सहस्त्रबुद्धे म्हणतात, स्व म्हणजे स्वतःच्या तंत्राने वागणे. यातील स्व आणि तंत्र हे दोन्ही शब्द अत्याधिक महत्वाचे आहे. स्व म्हणजे मी, स्वतः आपण, स्व म्हणजे अस्मिता, स्व म्हणजे सर्व शरीराचे अधिष्ठान, स्व म्हणजे कर्तृत्वशक्तीचे मूळपीठ.' या संबंधी सविस्तर चर्चा आपण पुढील लेखात करणार आहोत. लेखाचा विस्तार वाढला आहे म्हणून मी आता या लेखाच्या समाप्ती कडे जात आहे.
In political science it is said, ' the Government is a machinery of the state. Demoncrcy is a form of government of the people, for the people and by the people.' In social studies, ' Liberty means to have the spirit of togetherness.' In civic science ' Liberty means to have a civic sense. It is not just about keeping the roads, gardens, public property clean. Civic sense is more than that. It has to do with law abiding, respect for fellow men and maintaining decorum in public places. In true sense ' Liberyh means to know, What we owe to our nation and be a part of nation building activities in any form which is acceptable in general.'
थोडक्यात राष्ट्र निर्माणात, गरजू देशबंधु भगिनींना मदत करण्यात, चक्रीवादळ, भूकंप, पूर अपघात इत्यादी आपात्तीत मदत करण्यात आपले योगदान असावे. याचेच नाव आहे सामाजिक बांधिलकी. त्यातूनच पुढे सेवा परमो धर्मः हे वचन जन्मास आले असावे. बंधनाशिवाय स्वातंत्र्याला ही अर्थ नसतो. प्रत्येक क्षेत्रात एक व्यवस्था असते. त्या व्यवस्थेत असलेले नियम पाळणे नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे. आपल्या देशात प्राचीन काळापासून गणराज्ये व राजेशाही एकत्र नांदत असल्याचे दाखले आहेत. त्यासंबंधी आपण सवड मिळेल तशी चर्चा पुढे करीत राहू. वैदिक काळापासून देशात होऊन गेलेले ऋषीमुनी, वैज्ञानिक, समाज सेवक , साहित्यिक, आणि स्वातंत्र्य सैनिक इत्यादी थोर पुरूषांनी तपस्या आणि त्यागातून अनेक ज्ञानगंगा निर्माण केल्या आहेत. त्यातील एक एक थेंब म्हणजे तीर्थ आहे. ते आपण अधुन मधून घेत राहू या. आपले सहकार्य मला लाभत राहील अशी आशा व्यक्त करून मी येथे थांबतो. धन्यवाद !
भारत माताकी जय !
शनिवार, २२ जुलै, २०२३
राष्ट्रवादी काँग्रेस मधील फूट आणि घराणेशाही पक्षांची पडझड (भाग -४)

राष्ट्रवादी काँग्रेस मधील फूट आणि घराणेशाही पक्षांची पडझड (भाग -३)
राष्ट्रवादी काँग्रेस मधील फूट आणि घराणेशाही पक्षांची पडझड (भाग -२)
कुठला ही राजकीय पक्ष असो, वा कुठलिही संस्था असो शिर्षस्थ नेत्यांत हुकूमशाहीची वृत्ती वाढू शकते. कारण सत्ता ही मुलतः नशा आणि अहंकार निर्मितीची अदृष्य फॅक्टरी असते. त्यातच पक्ष घराणेशाहीचा असेल तर पक्षाची सुत्रे आपल्या वंशाला मिळावीत असा लोभ पक्षाच्या शिर्षस्थ नेत्याला जडतो. हे आपल्या देशाच्या राजकीय इतिहासातून प्रत्ययास आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष घराणेशाहीचे आहेत. मग आपण म्हणाल की या दोन्ही पक्षात केंद्रात मोदी सरकार आल्यानंतरच का फूट पडली ? प्रश्न रास्त आहे. पण उत्तर ही तितकेच रास्त आहे.
स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान मोदींच्या अगोदर सामान्यजनातील पंतप्रधानपदी खर्या अर्थाने विराजमान झालेले पहीले पंतप्रधान म्हणजे स्वर्गीय लालबहादूर शास्त्री हे होत. त्यांचे अकस्मात आणि संशयास्पद रित्या मृत्यु झाला. त्यानंतर विराजमान झालेल्या पंतप्रधान इंदिरा गांधीं ह्या देशाचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या होत्या. तत्कालीन काँग्रेस वर्कींग कमिटीतील सदस्य तसेच संसद सदस्यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी नेहरूंच्या कन्या होत्या, म्हणूनच त्यांची पंतप्रधानपदासाठी निवड केली. त्यावेळी काँग्रेसच्या संसंद सदस्यांमध्ये स्वर्गीय इंदिरा गांधी पेक्षा अधिक कुवतीचे, अनुभवी आणि जेष्ठ नेते होते जे पंतप्रधान होऊ शकले असते. इंदिरा गांधीमुळे काँग्रेसमध्ये फुट पडली. त्यावेळी इंदिरा गांधीनी Collective Wisdom चा उपयोग करीत सरकारचा कारभार हाकला असता तर काँग्रेस पक्ष आजच्या इतका दुबळा झाला नसता.
सन १९७१ च्या लोकसभा निवडणूकात मिळालेल्या प्रचंड यशातुन इंदिरा गांधींना सत्तेचा कैफ जडला. त्यांनी निवडणूक प्रचारात सत्तेचा गैरवापर केला हे सिद्ध झाल्यामूळे त्यांची निवडणूक अलाहाबाद उच्च न्यायालयाने रद्दबदल ठरविली. इंदिरा गांधीनी न्यायालयाचा अवमान करीत देशात आणिबाणी आणून देशाच्या घटनेत बदल केला आणि पंतप्रधानपद कायम राखले. त्याच काळात काँग्रेसची सुत्रे इंदिराजीचे पुत्र संजय गांधींकडे आले होतेच. नंतर पक्षाची सुत्रे राजीव गांधींकडे, पुढे सोनिया गांधी, आणि आता राहूल गांधी आणि प्रियंका वड्रा-गांधी हा इतिहास सर्वांना ठाऊक आहे. स्वर्गीय इंदिरा गांधी नंतर नेहरू-गांधी घराण्यात कर्तबगार व प्रभावशाली नेता झाला नाही. विद्यमान नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी -वड्रा या दोन्ही नेत्यांची राजकीय जाण कामचलाऊ पेक्षा कमी आहे. प्रत्येक प्रांतातील काॅगेसजनांना पक्षात आपले भवितव्य अंधूक वाटू लागले आणि ती मंडळी काँग्रेस मधून बाहेर पडली व स्वतःचे पक्ष निर्माण करीत गेले. शेवटी काँग्रेस विकलांग झाली.
वरील इतिहासातून असा अर्थ निघतो की मोदी सरकार केद्रात सत्तेवर नसते तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडणार होतीच. या उलट घराणेशाही नसलेल्या भाजपा पक्षात एक गरीब घराण्यातील नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकतात, ही बाब सामान्य मतदारांना कुतूहूलाची तशीच कौतुकास्पद वाटते. स्वच्छ व तत्पर प्रशासनाच्या बळावर देश सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर जात आहे. म्हणून दोन टर्म मोदींनी पुरी केलीच आणि तिसर्या टर्मसाठी ही तेच पंतप्रधान होतील असे दिसत आहे. त्यामुळे घराणेशाही पक्षात उच्च स्थान तर सोडाच पण तुच्छतेची वागणूक मिळत राहील्यामुळे जेष्ठ नेत्यांना आपला पक्ष सोडून भाजपात जाण्याचा एकमेव पर्याय राहिला आहे. त्यात मोदी सरकारने जनहिताची अनेक कामें केली आहेत. या शिवाय आपले राजकीय करिअर फक्त भाजपा सोबत गेल्याने शाबूत राहील असे आमदार-खासदारांना वाटत आहे. हेच महत्वाचे कारण आहे ज्यामुळे भाजपात आयारामाची संख्या वाढते आहे.
दुसरे असे की विरोधी पक्षांचे अल्पसंख्याकांचे लांगुनचालन हे धोरण मतदारांना फारसे पसंत पडत नाही. त्याऐवजी मतदार भाजपाचा सांस्कृतिक राष्ट्रवाद स्विकारीत आहेत. ज्या काही राजकीय चाली मोदी सरकार खेळत आहेत, त्यात ही देशहीत आहे अशी मतदारांना खात्री वाटत आहे. विरोधी पक्ष काही विधायक कार्य करीत आहेत असे दिसत नाही. कर्नाटकात भाजपाला पडलेल्या मतदानात घट झाली नाही. जी काही घट झाली ती देवेगौडाच्या पक्षाची झाली. कर्नाटकात काँग्रेस श्रेष्ठींनी स्थानिक नेत्यांवर निवडणूक प्रचाराची व्युहरचनेचे पुर्ण स्वातंत्र्य दिले. म्हणून काँग्रेस पक्षाचा विजय झाला. अर्थात भाजपा सरकार विरूद्ध नाराजी होती तसेच नव्या दमाचा नेता भाजपाकडे नव्हता. या दोन गोष्टीची काॅगसला मोठं यश देण्यात मदत झाली. केवळ कर्नाटकातल्या विजयामूळे काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना लोकसभेच्या निवडणूकीत सर्वच प्रान्तात विजय मिळेल असे बिलकूल संभवत नाही. हे सन २०१९ च्या लोकसभेच्या निकालातून सिद्ध झाले आहे.
क्रमशः
शुक्रवार, २१ जुलै, २०२३
राष्ट्रवादी काँग्रेस मधील फूट आणि घराणेशाही पक्षांची पडझड (भाग -१)
मंगळवार, १६ मे, २०२३
महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आणि न्यायालयाचा निकाल
शनिवार, २९ एप्रिल, २०२३
मोदी सरकार × विरोधी पक्ष + विरोधी मिडीया + विदेशी शक्ती ( भाग - २ )
मोदीजींनी आत्मनिर्भर भारत अशी घोषणा केली तेव्हापासून मिडीया मधील पुरोगामी मंडळींना अधून मधून वांतीचा विकार होत असावा असे वाटते. ज्यांना मोदी सरकारच्या कारकिर्दीत भारताची होत असलेली प्रगती पाहावत नाही, अशांपैकी जगावर राज्य केलेल्या इंग्लंडच्या बीबीसीनेच पूढाकर घेतला व आपल्या पंतप्रधानांची खोटी-नाटी डाॅक्युमेन्टरी बनविली. सोबत राहूल गांधी नावाचा पंतप्रधान पदाच्या उमेदवाराची मुलाखत जी मोदींवरील टिकाने भरलेली होती ती पब्लिश केली.
विरोधी पक्षांना एखाद्या परदेशाने भाजपा सरकार विरूद्ध काही टिप्पणी केली की ते त्याचे स्वागत करून त्याचा राजकीय अजेंडा बनवितात. राहूल गांधी म्हणाले होते की भारतात मोदींची हुकूमशाही आहे. आपल्याच पक्षाच्या पंतप्रधानांच्या (मनमोहन सिंग) निर्णयाचे कागद भर रस्त्यात फाडणारे राहूल गांधी हे रक्ताने हुकूमशाही वृत्तीचेच आहेत. ही घटना बीबीसीला माहित होती. मग बीबीसी ने त्या घटनेची आठवण करून राहूल गांधींना त्यांची ती कृती हुकूमशाही वृत्तीची नव्हती का असा उलटा प्रश्न विचारला का नाही ? पण त्या पत्रकार परिषदेचा उद्देश मोदींना हुकूमशहां म्हणण्यासाठीच होता. त्यामुळे भारतात बीबीसीची जी काही पत होती ती घसरली आहे आणि पुढे आणखिन घसरत जाईल.
दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)
गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...
-
मंडळी, मागील लेखात आपण असुरक्षिततेच्या भावनेपोटी, मनुष्य समूहात राहू लागला आणि नंतर समाज व्यवस्था उभी राहीली, हे पाहिलं. त्याच लेखात स...
-
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाली तरीही अधूनमधून नवीन चित्रपट येऊ घातला कि समाजातील एखाद्या वर्गाच्या भावना दुखावल्या जाण...
-
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकाचा निकाल लागला. महायुतीचा प्रचंड विजय झाला. असा एकतर्फी निकाल महाराष्ट्रात आजपावेतो आला नव्हता हे सत्य आहे ...