गुजरात मधील निवडणूकीत भाजपाचा न भूतो न भविष्य असा जो विजय झाला त्याचे विश्लेषण करणे इतके सोपे आहे की ते एका वाक्यात मांडता येईल. महत्वाचा मुद्दा हा आहे की गुजरात मधील भाजपाला मिळालेला मोठा विजय देशातील राजकारणावर दुरगामी परिणाम करणारा आहे. यावर बहुतांश मिडीया हाऊसेसनी विशेषतः लिबरल लाॅबींनी मौन पाळलेले दिसते. त्याबद्दलची चर्चा करणे त्यांना अडचणीचे ठरू शकते. यावर ही आपण चर्चा करणार आहोत. गुजरात हे आपल्या महाराष्ट्राच्या शेजारचे राज्य आहे. म्हणून तेथील विजयाचं विश्लेषण करताना महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा करीत तौलानिक बाबी मांडण्याचा प्रयत्न करावा असे मला वाटते. तशी तुलना करण्याची गरज काय आहे, असा आपल्याला प्रश्न पडला असावा. पण लेख वाचत आपण पुढे सरकत असताना आपल्याला पडलेल्या शंकाचं निरसन होईल अशी मी आशा बाळगतो.
अलिकडे गुजरात विरोध हे आपल्या येथील विरोधी पक्षांचं आणि त्यांच्या समर्थक मिडीयांचं दुर्दैवाने हत्यार बनले आहे. गुजरात मध्ये भाजपाचा जो विजय झाला त्याचे श्रेय जितके मोदी-शहा जोडीला जाते तितकेच देशभरातील विरोधी पक्षांना आणि त्यांच्या समर्थक मिडीयांनी ही जाते. सन २०१७ च्या विधानसभेच्या निवडणूकीत काँग्रेसने इतकी चांगली कामगिरी केली होती, की भाजपाला ही घाम फुटला होता. पण ती धूळीला मिळाली. पाच वर्षाच्या कालावधीत काॅग्रेस पक्षांत राष्ट्रीय स्तरावर जे घमासान माजले त्यावर काॅग्रेस समर्थक मिडीयांनी गांधी परिवाराचीच तळी उचलून धरली. त्यामुळे गांधी घराण्याची मिजास वाढत गेली. राष्ट्रीय स्तरावर सुरू झालेल्या पक्षांतर्गत धुसफूसीचे परीणाम गुजरात प्रदेश काॅग्रेस वर होणारच होते. It is theory of karma and Law of Nature too.
सन २०१७ च्या निवडणूकीत राहूल गांधींनी मेवाणी, अल्पश ठाकूर आणि हार्दिक पटेल यांना हाताशी धरून जातीयतेचं कार्ड खेळत अत्यंत नीच पातळी गाठली. पाच वर्षं सरली. पण राहूल गांधी गुजरातमध्ये फिरकले नाहीत. आपले आमदार गुजराती जनतेने दिलेल्या मतांशी इमान राखतात की नाही हे पाहण्याचे कर्तव्य सर्वेसर्वा राहूल गांधींचं होतं. ते त्यांनी पार पाडले नाही. राहूल गांधी कडून प्रथम जातीभेद केल्याचं पाप आणि नंतर मतदारांना वार्यावर सोडण्याचं पाप घडले. पापाचा घडा भरला. पण काॅग्रेस समर्थक मिडीयांनी राहूल गांधीना खडे बोल सुनावले नाहीत. भिंतीवर चेंडू वाकडा टाकला तर तो आपल्या हातात सरळ येत नसतो.
आपल्या महाराष्ट्रातील मिडीयांना, व विरोधी पक्षांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मस्तकात गुजरात विरोध इतका भिनला की ही मंडळी बेभान झाली की काय अशी शंका येते. लोकसत्तेचे संपादक गिरीष कुबेर, कुमार केतकर, निखील वागळे, खांडेकर इत्यादी पत्रकार मंडळी वृत्तपत्र जगताच्या मैदानातून बाद होत चाललेली नाणी आहेत. मराठी मतदारांवर यांचा प्रभाव पडेनासा झाला आहे. मला त्यांना सुचवायचे आहे की विरोधी पक्षांच्या नेत्यांची तळी उचलण्याचे बंद करा. इतकी वर्षे आपण तेच कार्य करीत राहिल्यामुळे त्या मंडळींना ब्रह्मपद मिळाल्याचा भास होऊ लागल्याचे दिसत आहे. प्रगतीशील महाराष्ट्रात जातीयतेच्या राजकारणाचे समर्थन करू नका. भाजपाला विरोध करा पण तो विधायक स्वरूपाचा ठेवा.
गुजरातचा विकास झाला हे अमान्य करण्यात विरोधी पक्ष आणि त्यांच्या समर्थक मिडीयांनी आपली शक्ती खर्ची केली. जेव्हा इतर प्रांतातले मुख्यमंत्री पारंपरिक राजकारण करत बसत होते तेव्हा गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदीं Vibrant Gujarat ची कल्पना मांडून दिवस-रात्र मेहनत करीत होते. त्या कल्पनेने गुजराती जनता भारावून गेली. तिने मनापासून मोदींना साथ दिली ती आजही कायम आहे.
अलिकडील निवडणुकांच्या प्रचार काळात पत्रकार मंडळी गुजरातच्या कानाकोपर्यात केजरीवालच्या Freebies संबंधी मतदारांना विचारत असत तेव्हा ' हमें मुफ्त कुछ नही चाहिये, हमें याचक बनना पसंद नही है | ' अशी उत्तरें मतदारांकडून मिळत गेली. केजरीवाल यांच्या Freebies गप्पांचा गुजरातच्या मतदारांनी एक प्रकारे वचपा काढला. भाजपा चा गुजरात मधील प्रचंड विजयाचे दुरगामी परिणाम होतील असे मी म्हणतो आहे, त्याचं रहस्य इथेच उलगडले आहे. नरेंद्र मोदींना टक्कर देऊ शकेल असे केजरीवाल नावाचं मिडीयाचं हत्यार कायमचं बोथट झालं आहे.
महाराष्ट्राचे वर्तमान विरोधी पक्षांचे नेते जातीयतेचं राजकारण करीत आहेत. ब्राह्मण- ब्राह्मणेतर वाद वाढवावा अशा क्लृप्त्या वाढवित बसतात. मी दुपारी मासांहार केला म्हणून दगडूशेठ गणपतीचं दर्शन बाहेरून घेतलं अशी बाजू सावरण्याची वेळ शरद पवारांना आली. तेव्हाच मविआ सरकारच्या पतनाची घंटा वाजली होती. तिचा आवाज महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेते आणि समर्थक मिडीयांना ऐकू आली नाही. मराठी राजकीय अभ्यासकांची दृष्टी आणि श्रवणशक्ती क्षीण झाली असावी असे जाणवते. महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी ब्राह्मण- ब्राह्मणेतर वाद काँग्रेसने करू नये असे स्पष्टपणे म्हटले असल्याचे माझ्या वाचनात आले आहे. दिल्लीहून संयुक्त महाराष्ट्राचा कलश घेऊन यशवंतराव चव्हाण मुंबईत आले, तेव्हा त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता, ' हे राज्य मराठांचे असेल का? त्यावर त्यांनी शांत आणि शालिनतेने उत्तर दिले, ' हे मराठी भाषकांचे राज्य आहे.'
सन २०१७ चे गुजरात काँग्रेसचे दोन शिलेदार अल्पेश ठाकूर आणि हार्दिक पंड्या भाजपात दाखल झाले. तरीही भाजपा इतर पक्षांच्या नेत्यांना आमिष दाखवून आपली ताकद वाढवते अशी बालिश टिका देशभरातील काॅग्रेस समर्थक मंडळी करीत असतात. संपुर्ण मंत्रिमंडळ बरखास्त करून भाजपाने गुजरातमध्ये पक्षाची पुनर्बांधणी केली यासंबंधीचं कौतूक तर सोडाच पण भाजपाकडून काहीतरी शिकण्यासारखे आहे यावर विचार मंथन करण्याचे कष्ट घेतले जात नाही तर यश कसे मिळणार ?
गुजरात मधील भाजपाच्या विजयाबद्दल आपले शरद पवार म्हणतात की महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातमध्ये नेले म्हणून गुजरातमध्यें भाजपाला मोठा विजय मिळाला. असा आमचा हा जाणता राजा ! अहो हा विषय कायमचा बाद झाला आहे. गुजरात विकासाच्या मार्गावर नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतानाच आला होता. तुमचे पंधरा वर्षे आणि अलिकडील अडीच वर्षे मविआ सरकार होते तेव्हा तुम्ही काय दिवे लावलेत, हे जनतेने पाहिले आहे. सन २०१९ साली लोकसभेत विरोधी पक्षांचा दारूण पराभव झाला. त्यानंतर तब्बल तीन वर्षे विरोधी पक्षांना भाजपाशी टक्कर देण्याइतकी आघाडी निर्माण करता आली नाही. मग निवडणूका लढविता तरी कशाला? घरी बसा आणि आपली घरं सांभाळा की ! मी मराठी आहे, मला ही मराठी असल्याचा अभिमान आहे. अटकेपार झेंडा रोवणार्या मराठी योद्धयांचे रक्त माझ्यातही आहे. म्हणून मी शरद पवार व उद्धव ठाकरें यांच्यावर टिका करतो. अटकेपार झेंडा लावणारे पेशवे होते ; जातीने ते ब्राह्मण होते, म्हणून ब्राह्मणांचा द्वेष करीत राजकारण किती वर्षे करणार हो? ब्राह्मण मतदारांची संख्या ती कीती हो ! दुसरे असे की सन २०१४ आणि २०१९ च्या विधानसभेच्या निवडणूकीच्या निकालातून ब्राह्मण विरोध हे राजकारणातले हळूहळू निकामी होत असलेलं शस्त्र आहे. पण याची जाणीव महाराष्ट्रातल्या राजकीय अभ्यासकांना झालेली नाही. आमची काही साहित्यिक आणि विचारवंत मंडळी ही अशा नेत्यांची आरती ओवाळीत असतात.
गुजरातमध्ये भाजपा आणि काॅग्रेस हे दोनच प्रमूख पक्ष आहेत. काॅग्रेस कमकुवत झाल्यामुळे भाजपाला प्रचंड विजय मिळाला आहे. या एका वाक्यातच गुजरात मधील निवडणूकांच विश्लेषण संपते. तिथे गुजराती अस्मिता हीच राष्ट्रीय अस्मिता आहे. आपल्या महाराष्ट्रात डझनभर पक्ष आहेत. कुठे मराठी अस्मिता, तर कुठे मराठा अस्मिता, कुठे आंबेडकर अस्मिता तर कुठे गांधीजी अस्मिता, कुठे काॅम्रेड अस्मिता तर कुठे रझाकत अस्मिता, कुठे भीमसेना तर कुठे शिवसेना , कुठे आगरी सेना तर कुठे कुणबी सेना, कुठे बहुजन तर कुठे मागास वर्ग इत्यादी अस्मितेवर राजकारण करण्यार्या नेत्यांचं व त्यांच्या घराण्यांचं फक्त भले झाले आहे. ' हटाव लुंगी - हटाव बिहारी, हटाव भटजी - हटाव गुजराती, हटाव मारवाडी- हटाव सिंधी आणि जवळ करा फक्त इस्लामी ' अशा धोरणाने विकासाचे प्रकल्प व उद्योगधंदे महाराष्ट्रातून कधीच बाहेर गेले आहेत. गिरणी कामगार जेव्हा देशोधडीला लागला, तेव्हा महाराष्ट्रात आणि केंद्रात मोदी सरकार नव्हते. आता त्या गिरणी गावात टोलेजंग इमारती झालेल्या दिसतात. याला मोदी सरकारला दोषी मानता येते का? आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर, डाॅ बाबासाहेब आंबेडकर व जगातील सर्वात मोठी सांस्कृतिक संघटनांची स्थापना करणारे डाॅ केशव बळीराम हेडगेवारांवर टिका करीत असतो. ते राष्ट्रीय नेते होते ही बाब गुजराती लोकांनी आनंदाने स्विकारली आहे. त्याची चांगली फळे त्यांना लाभली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आमचे प्रेरणास्थान म्हणून संघात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ' हिंदु साम्राज्य दिन ' साजरा होतो. तो ही देशभर ! आमचे शरद पवार संघाची हाफ चड्डीवाले अशी टवाळी करतात. जणू काही शरद पवार जन्मतः फूल पॅन्टसह जन्मले होते.
देशातीलच नव्हे तर जगातील एक मोठे व्यापार केंद्र मुंबई हे आपल्या राज्यात आहे. तिथेच आम्ही कामगार युनियनचे जाळे विणण्यास प्रोत्साहन दिले. त्यातून अनेक उद्योगात वाम मार्गियांच्या कामगारांनी हरताळ, बंद, मोर्चे ही शस्त्रे युवकांच्या हातात दिली शिवसेनेही सरकारच्या एखाद्या धोरणावर विरोध करण्यासाठी बंद आणि सार्वजनीक मालमत्तेची फोडतोड करण्याचा धंदा उभा केला. शिवसेनेला जन्माला घातले काॅग्रेसने. कामगार युनीयन डाव्या विचारांच्या; त्यांना देशात अस्थिरता माजवायची असते. उत्पादन, निर्मीती ढासळत गेली. शिवसेनेच्या फोडतोडतून सार्वजनिक मालमत्तेचं झालेलं नुकसान ! त्यामुळे बरेच उद्योगधंदे बंद पडले. अशा उद्योजकांनी आपले बस्तान गुंडाळून इतर राज्यात उद्योग बसविले. अशा अवस्थेत राज्याचा महसूल घटत गेला. त्याचे खापर भाजपाच्या डोक्यावर मारून महाराष्ट्राची उन्नती होणार आहे का ? त्यात ही महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची गुन्हेगार आणि दशहतवादी संघटनांशी असलेली जवळीक भाजपाच्या पथ्यावर पडली आहे. आजवरच्या सरकारांनी युवकांना स्वरोजगार पुरविण्याऐवजी नोकर्या देण्याचे आश्वासन देण्याचा धंदा केला. नोकर्या दिल्या नाहीच उलट विकासाच्या प्रकल्पांना विरोध करण्यासाठी प्यादे उभे केले. मग गुजरातचा विकास होतो म्हणून हाताची बोटे मोजण्यात काय हशील ? आपले राज्य पिछाडीवर पडले आहे याला आपणच जबाबदार आहोत. गुजरातमध्ये कामगार वर्ग देशाच्या कानाकोपर्यातला आहे. तिथे उद्योगधंदे चालण्यासाठी पूरक सामाजिक आणि राजकीय वातावरण आहे. हे लक्षात कोण घेणार ?
आता मविआ अस्तित्वात नाही. त्या सरकारच्या पतनास घटक पक्षांतर्गत शह-काटशहाचं राजकारण कारणीभूत आहे. आता सरकार विरोधात मोर्चा काढून काय उपयोग होणार? अडीच वर्षे खंडणी, आणि वसुली करीत बसलात. आज ही जेल मध्ये सडत असलेल्या नवाब मलीकांचा राजीनामा घेण्याची हिम्मत न दाखविलेल्या मुळे उद्धव ठाकरेंना नियतीने पुर्ण मंत्रीमंडळाचा राजीनामा द्यावयास भाग पाडले. इथे कुठेतरी वाचनात आलेलं वाक्य मी सेव केलं होते, ते मांडतो आहे. ' The wheel of the fortune keeps on revolving eternally. As the potter mould the clay according to his own pattern, so does destiny with human lives.' उद्धव ठाकरे सन २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकाल आल्यानंतर एकापाठोपाठ चूका करीत गेले, तरी ते भानावर आले नाहीत. म्हणून इथे नियतीच्या खेळाचं स्वरूप मांडले.
गुजरात मधील विजयाची नशा मोदी-शहा या जोडीला कधी आली नाही. म्हणून त्यांचे गुजरात माॅडेल यशस्वी होत गेले. आम्ही ऊस वाजवी पेक्षा जास्त पिकविला. इतर पिकाकडे दुर्लक्ष केले. साखर कारखान्यातील सहकाराचं ही निर्लज्जपणे थडगं बांधले. गव्हाच्या लाॅबीने पंजाबला लुटले. तसेच ऊस लाॅबीने महाराष्ट्राला लुटले. अनेक राज्यातील भाजपेतर सरकारांनी केलेल्या लुटीवर केंद्र सरकार कारवाई करताना दिसेल, हेच ते बळ गुजरात विधानसभेच्या प्रचंड विजयातून मोदी सरकारला मिळाले आहे असे मला वाटते. डावे विचारवंत शेखर गुप्ता यांनी त्यांच्या प्रिन्ट चॅनेलवर Modi moves politics from freebies to infra या विडीओ द्वारें स्पष्ट केले आहे. याहून अधिक चर्चा वाढवावी कशाला? उगीच आपणच आपला रक्तदाब वाढण्यास कारणीभूत ठरण्यातही काही अर्थ नाही. कारण नियती आपले कार्य करते. तिथे राजकीय क्षेत्र वगळले जात नाही.
सुप्रभात, विष्णुजी.
उत्तर द्याहटवाआज आपला चौथा लेख वाचला, विवेचन यथा योग्य आहेच, व महाराष्ट्राशी केलेली तुलनाही उचित आहे.
मात्र इथल्या सद्य, दर्जाहीन व गलीच्छ राजकारणामुळे तसेच, राष्ट्र/ हिंदुत्ववादाच्या अभावाने, आपण गुजरातच्या मागेच आहोत. आणी याच कारणामुळे व गेली २० वर्षाच्या विकास पुर्ण वाटचालीमुळे, ॲंटी ऐवजी प्रो चा फायदा तिथे भाजपाला मिळाला व अभुत पुर्व १५६ चा ७ व्यांदा विजय मिळाला, यांत सिंहाचा वाटा मोदीजींच्या झंझावाती प्रचाराचा आहेच.
त्यामुळे आपच्या रेवडी कल्चरची डाळ शिजली नाही, अन्यथा पंजाबसारखी परिस्थिती झाली असती. पण गुजराती जनता सुज्ञ आहे. इथली परिस्थिती केव्हा सुधारणार ते सांगता येत नाही, कालच देवेंद्रजी म्हणाले आमच्याकडे भरपुर बाॅंब आहेत, योग्य वेळी फोडु, योग्य वेळ केव्हा येणार कुणास ठाऊक, असो.
बरत एकदा आपल अभिनंदन व धन्यवाद,🙏
धन्यवाद बिवलकरजी !
उत्तर द्याहटवाआपण गुजरात निवडणुकीचे यथार्थ विवेचन केले आहे. मात्र ह्या लेखामध्ये स्व. वकील साहेब अर्थात लक्ष्मणराव इनामदार आणि महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी ह्यांचा उल्लेख केला असता तर अधिक योग्य आणि समयोचित ठरले असते. गुजरातमध्ये संघ रोवण्यात लक्ष्मणराव इनामदार ह्यांचे मोठे योगदान आहे. तसेच श्री देवेंद्र फडणवीस ह्यानी ह्या निवडणुकीत खुप मेहनत घेतली होती. धन्यवाद
उत्तर द्याहटवा