मविआ सरकार विरूद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा श्री राज ठाकरें यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी मुबंईतील शिवाजी पार्क येथे तसेच चैत्र नवमीला ठाणे येथे अशा दोन जंगी सभा घेऊन मविआ सरकार विरूद्ध रणशिंग फूंकले. दोन्ही ठिकाणी मविआ सरकारचे बाभाडे तर काढलेच पण मविआचे शिल्पकार शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वाचाळ नेता संजय राऊत यांचा ठाकरी भाषेत समाचार घेतला. मुस्लीम बांधवांच्या प्रार्थना स्थळावरून भोंग्याच्या आवाजात होणारं अजान हा सार्वजनिक रित्या उपद्रव ठरत असल्याचा न्यायालयाने दिलेल्या निवाडाच्या पाश्वर्भूमीवर त्या निकालाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला ३ मेची मुदत देऊन राज ठाकरें यांनी एक प्रकारे कडक इशारा दिला. या इशारामुळे उद्धव ठाकरे सरकारला बॅकफूटवर जावे लागले आणि पोलिस खात्याच्या परवानगी शिवाय लाॅऊडस्पिकर चा वापर करता येणार नाही असे फर्मान काढावे लागले. शरद पवारांना राज ठाकरेंनी केलेल्या टिकेवर दोन वेळा पत्रकार परिषेद घ्याव्या लागल्या. संजय राऊत यांची तर बोबडी वळाली. शेंडी आणि जानवेच्या हिंदुत्वाने शरद पवार उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांची इतकी घबरगुंडी होईल असे वाटले नव्हते. तरीही मविआ घटक पक्षांची नेते मंडळी उसनं अवसान आणत राज ठाकरेंच्या सभा म्हणजे फक्त करमणूक तर त्यांच्या चेले मंडळींनी आम्ही संपलेल्या पक्षाबद्दल प्रतिक्रीया देत नाहीत असे पोरकट विधान केलं.
राज ठाकरेंच्या या कडव्या हिंदुत्वाच्या नव्या अवताराने शिवसेना हादरूनच गेली आहे. राज ठाकरे अयोध्याला जाणार आहेत असे जाहीर झाले तेव्हा शिवसेनेतर्फे आदित्य ठाकरे अयोध्याला जाणार असे शिवसेनेने घोषित केले. कसे का असेना पण मविआंला शेवटी राम आठवला हे ही नसे थोडके. तसे पाहता ध्यान, जप आणि पुजा-अर्चा न करता आपल्या मुखातून रामनाम बाहेर येत असते. रस्त्यात कोणी ओळखीचे भेटले की रामराम म्हणतो, का तर प्रत्येकाच्या हृदयी राम बसला आहे. समोरच्या व्यक्तीला आणि स्वतःला श्रीरामाचा पराक्रम, परम कोटीची शालीनता आणि क्षमाशिलता, सज्जनता, इत्यादी दैवी गुणसंपत्तीचा आपल्याला विसर पडू नये म्हणून आपण जय श्रीराम म्हणतो. एखाद्या व्यवसायात प्रगती खुंटली तर त्या व्यवसायात राम राहिला नाही असे म्हणतो. कोणी मृत झाला की अमक्याने अखेरचा राम म्हटला असे कळवितो. का तर त्या मृत व्यक्तीच्या आत्म्याला शाती प्राप्ती व्हावी अशी विनासायास ईश्वराकडे प्रार्थना करतो.
आदित्य ठाकरे खरोखरीच अयोध्याला जाणार आहेत तर त्यांनी अवश्य जावे पण ' हिंदु देव कोरोनाला घाबरले अशी टिका करणारे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत आणि देव-धर्माचे मी अवडंबन माजवत नाही असे म्हणणारे शरद पवार यांना प्रथम भेटून सल्ला घेतला तर बरें होईल. तसेच आपल्या पिताश्रींना ही अयोध्येतील मंदिरात शेंडी आणि जानवे घातलेले ब्राह्मणी हिंदुत्व पचेल का हे विचारून अयोध्या साठी प्रयाण करावे. त्यांच्या उत्तरातून महाराष्ट्रतल्या जनतेला केंद्र सरकारशी जो संघर्ष सुरू झाला आहे त्याचे कारण काय हे कळण्यास मदत होईल. कारण सध्या न्यूज चॅनेल्स आणि वर्तमान पत्रातून जे कळते त्याबाबत आमचा संभ्रम होतो आहे म्हणून हा सल्ला. पण लागलीच मनात आले की आदित्यजींनी या तीन महनीय व्यक्तीकडून मार्गदर्शन घेण्याची तशी गरज नाही म्हणा, फक्त आशिर्वाद घेऊन अयोध्येच्या प्रवासाला निघावे असे वाटते. कारण या भौतिक जगातल्या राजकीय विचारसरणीची बंधनं श्रीरामाच्या दर्शनाला जाताना आपसूक गळून पडतात. श्रीराम माहात्म्यात तसे म्हटले आहे ---
" कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानाम | "
(श्रीरामाचे नाव कल्याणकारक वस्तूंचा साठा आहे. श्रीरामाचे नाव हे कलियुगातील सर्व दोषांचा नाश करणारे आहे. अपिवत्र वस्तूंनासुद्धा पवित्र करणारे आहे.)
शेवटी म्हटले आहे ---
" बीजं धर्मद्रुमस्य भवतां भूतये रामनाम || "
(श्रीराम नाव हे धर्मरूपी वृक्षाचे बीज आहे. असे हे श्रीराम नाव तुम्हाला वैभव प्रदान करो.)
इथे धर्म ही संज्ञा फार व्यापक आहे. तसे पाहता आपल्या धर्माचे खरे नाव शाश्वत धर्म म्हणजेच सनातन धर्म असे आहे. श्रीराम नाव हे धर्म वृक्षाचे असे बीज आहे की ते मानवतेच्या ही पुढे जात चराचर सृष्टी मधील सर्व प्राणीमात्रांच्या तसेच वृक्षवेलींच्या ही कल्याणाचा विचार समाविष्ट आहे. म्हणून समर्थ रामदास स्वामीनी दासबोधात म्हटले आहे, ' प्राणीमात्रा जीवें लागे बर्या शब्दे | ' आता अयोध्येला श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिर होत आहे, तिथे आदित्यजी जात आहेत म्हणजे परमात्म पद प्राप्त साठीचा हा प्रवास आहे आणि या प्रवासात श्रीरामाचे नाव ही एक शिदोरी असते. श्रीराम माहात्म्य मध्ये म्हटले आहे,
पाथेयं यन्मुमुक्षोः सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य | म्हणून आम्हांला ही आनंद आहे. आदित्य ठाकरेंना हार्दिक शुभेच्छा ! जय श्रीराम !
राज ठाकरे यांनी अजान संबंधीच्या इशाराचं स्वरूप कसे असेल याची प्रात्यक्षिके काही ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसाचं लाॅऊड स्पिकर वरून पारायणं करून दाखविली आहेत. दादरच्या शिवसेना भवनाच्या समोर हनुमान चालीसाची लाॅऊड स्पिकर वरून पारायणं केली. हा एक प्रकारे मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेवर केलेला हल्लाच आहे, असे मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वाटलं तर त्यात नवल वाटू नये. कारण मूलतः शिवसेनेचा पिंड हल्ला-गुल्ला करण्याचा आहे असे तिच्या स्थापनेपासूनच अनुभवयास येत राहिला आहे. शिवसेनेत उभी फूट पडली आणि राज ठाकरेंनी मनसे पक्ष स्थापन केला. मविआ सरकारचे प्रमूख थोरले बंधु उद्धव ठाकरे असले तरी राज ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरें प्रमाणे भगव्या रंगाची शाल अंगावर घेऊन राज्य सरकारशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
राज ठाकरे यांचा असा अवतार कोणाला टोचल्यासारखं वाटत असेल तरी अजान संबंधीतल्या तक्रारीत तथ्य नाही असे कोणी मानू नये. तसेच तक्रार ही प्रतिक्रीयात्मक नसावी. पण हजार वर्षे आपल्या पुर्वाजांनी या देशावर राज्य केले म्हणून आपले सर्व लाड, हट्ट पुरे व्हावेत अशा गुर्मीत मुस्लीम समाजाने राहू नये असे वाटते. वस्तुतः ते जे राज्यकर्ते होते ते आपल्या देशावर आक्रमण करून राज्यकर्ते झाले. जे कोणी आपले बांधव कोण्या मुस्लीम किंवा ख्रिस्ती आक्रमकांच्या जबरदस्तीने धर्मांतर झाले आहेत त्यांचे पुर्वज हिंदुच होते. इडोनिशिया सारखा देश मुस्लीम असूनही श्रीराम आमचे दैवत आहे असे अभिमानाने म्हणतात. तसा भाव मुस्लीम बांधवाकडून अपेक्षित आहे आणि ते रास्त आहे. याचे कारण आपल्या देशाची धर्माच्या नावाने फाळणी झाली आहे. परंतु असे असूनही हिंदु समाजाला स्वराज्यात ही सापत्न वागणूक मिळत राहीले हे एक शल्य ज्यांना टोचते आहे त्यांचा ही विचार राज्यकर्त्याने करायला हवा होता. तो आता केंद्र सरकार टप्प्या टप्प्याने घेत असल्याचे दिसते आहे. त्यामूळे विरोधी पक्षांचा थयथयाट होत आहे. त्यातूनच केंद्र-राज्य संघर्षाने राजकारण लिप्त झालेलं दिसते आहे. भाजपा सरकार आपल्या निवडणूक जाहिरनाम्यातील वचनाची पुर्तता करीत आहे. या पलिकडे या मुद्यावर चर्चेची गरज नाही.
उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू कधी तरी एकत्र येतील अशी आशा असलेला वर्ग महाराष्ट्रात आहे. परंतु ती आशा हवेत विरून गेली आहे. कारण उद्धव ठाकरें यांनीच शिवसेनेला स्युडो सेक्युलरिस्ट कळपात बांधले आहे. मनसेने सुद्धा सन २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूकीत काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेस च्या प्रचार सभेत मदत केली होती. पण त्याचा उपयोग झाला नाही. यात राज ठाकरेंचा दोष नाही. पंतप्रधान मोदींचा करिष्मा तसेच मोदी सरकारने केलेल्या लोकहिताच्या कामाच्या बळावर सन २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूकात पुन्हा एकदा सोकाॅल्ड सेक्युलरीस्ट पक्षांचा दारूण पराभव झाला. त्यात राज ठाकरेंच्या पक्षाचे फारसे नुकसान झाले नाही. कारण मनसेने लोकसभेच्या निवडणूकात उमेदवार उभे केले नव्हते. पाच राज्याच्या विधानसभेतील निवडणूकात भाजपाने चार राज्यात विजय मिळविला. हे पाहून भाजपा २०२४ च्या लोकसभेच्या निवडणूकीत ही मोदी सरकार विजयी होणार असा अंदाज राज ठाकरेंने ही बांधला असावा. दुसर्या बाजूला शिवसेनेला सेक्युलर पक्षांसोबत जाण्याची अवदसा आठवली. मधल्या रस्त्यावर मविआ सरकारच्या कारभारा बाबत नाराज असलेले शिवसैनिकाचे मंत्री, आमदार आणि कार्यकर्ते हताश पणे उभे आहेत. हीच ती संधी आहे, आणि हीच ती वेळ आहे, शिवसेनेला खिंडार पाडण्याची असा विचार करून मविआ सरकारच्या तिन्ही घटक पक्षांवर टिका करावयाची असे धोरण राज ठाकरेंनी स्विकारलेले आहे. त्यात गैर काही नाही.
आता सन २०२२ सुरू आहे. तीन वर्षात महाराष्ट्रातील राजकारणात बरीच उलथापालथ झाली आहे. आता मनसेने मविआ सरकार विरूद्ध रणशिंग पुकारल्या मूळे मराठी माणसाच्या हितासाठी पण सोबत कट्टर हिंदुत्वाची जोड देत स्थापन झालेल्या शिवसेनेचे दोन बंधू एकमेकासमोर लढाई करण्याच्या पावित्र्यात असल्यामूळे चौका-चौकात चर्चा होणे स्वाभाविक आहे. संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच शिवसेनेत उभी फूट पडली होती. मविआ सरकार अस्तित्वात आल्यानंतर त्या शिवसेनेला कोणी शरदसेना म्हणतात तर कोणी सोनिया सेना म्हणत आहेत. त्यामूळे आता खरी शिवसेना कुठली? शिवसेना की मनसे? स्वर्गीय बाळासाहेबांचे खरे वारदसार उद्धव ठाकरे की राज ठाकरे ? इतपर्यंत ही चर्चा येऊन ठेपली आहे.
स्वर्गीय बाळासाहेबांचे खरे वारसदार कोणीच नाही. पण बाळासाहेबांची आठवण करून देण्याची शक्ती राज ठाकरे कडेच आहे हे शिवसैनिक कबूल करीत असतात. त्यामूळे दस्तूरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ही मनसेचे आव्हान मामूली समजून दुर्लक्षित करता येणार नाही. मविआ सरकारची अवस्था अशी आहे की केंद्र सरकार विरूद्ध लढता लढता ते थकले आहे. बजेट सत्रातल्या भाषणातून भाजपा किती आक्रमक झाला आहे याची जाणीव मुख्यमंत्र्यांना झाली असल्याचे दिसले आहे. त्यातच मनसेची अप्रत्यक्ष रित्या सोबत भाजपाला होत असल्यामूळे शिवसेनला काॅग्रेस, साम्यवादी पक्ष, आणि इतर प्रांतिय पक्षांप्रमाणे भाजपावर विशेषतः केंद्र सरकारवर टिका करणे आता परवडणारं नाही. कारण भाजपावर आरोप न करणे म्हणजेच शिवसेना पुन्हा हिंदुत्वकडे वळू लागली आहे असा संदेश जनमनास जाऊ शकतो. असा संदेश जनमानसात गेला तर, काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेसला मुस्लीम समाजाची मतें गमाविण्याची आफत ओढवेल. तीच सबब सांगून दोन्ही काँग्रेस पक्षांना सरकारचा पाठींबा काढून घेण्याची आयती संधी धावून येईल. तसे ते दोन्ही पक्ष मविआ सरकारचा पाठींबा काढून घेण्यासाठी संधीची वाट पाहात आहेत. सरकार पडलं तर शिवसेनेच्या पदरात इतिहासातील सर्वात मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागेल. एका परीने राज ठाकरे यांनी शिवसेने कडून हिंदुत्व आपल्याकडे खेचून घेतले आहे. मनसे हा शिवसेनेतून तयार झालेला पक्ष असल्यामूळे तोच शिवसेनेचा स्पर्धक होईल. म्हणजे शिवसेनेची कायमची कोंडी होऊ शकते.
( या लेकाचा भाग २ खाली सोबत जोडला आहे तो कृपया वाचावा. धन्यनाद ! )
अति सटीक विश्लेषण
उत्तर द्याहटवाधन्यवाद !
उत्तर द्याहटवा