
महाराष्ट्रातील केंद्र -राज्य संघर्षाचे खरे सुत्रधार शरद पवार आहेत परंतु पवारांच्या खेळीमूळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खलनायक ठरण्याची शक्यता वाढत असल्याचे दिसत आहे. भाजपाशी युती करून केंद्र आणि राज्यातील सत्ता उपभोगून मोदी- शहा जोडीवर गुजराती म्हणून हेटाळणी करण्याची उद्धव ठाकरेंची खाज हे संघर्षाचं मूळ कारण ठरलं आहे. राज ठाकरेंनी ही मागे असेच नॅरॅटिव्ह वापरून स्वतःच्या पक्षाचे नुकसान करून घेतले आहे. शरद पवार पंतप्रधान मोदीशी आजही सख्य ठेवून आहेत. यावर लक्ष केंद्रीत करून विचार मंथन करण्याची तसदी ठाकरे घराण्यातील उद्धव आणि राज या नेत्यांनी घेतली नाही.
इतर विरोधी पक्ष मोदी-शहांवर टिका करतात. त्याचे कारण ते दोन्ही नेते गुजराती आहेत म्हणून नव्हे तर भाजपाचे नेते आहेत म्हणून. पंतप्रधान आणि गृहमंत्री पदावर अनुक्रमे नरेंद्र मोदी आणि अमित शहा, भारतिय संविधानाच्या कुठल्याही कलमाचं उल्लंघन न करता बसले आहेत. ही वस्तुस्थिती देशातील सर्व प्रांतीय लोकांनी स्विकारली आहे. त्यात बहुतांश मराठी जनता सुद्धा आहे. इतका काॅमन सेन्स भाजपाशी २५ वर्षाहून अधिक वर्षे मित्रत्वचे नातें ठेवणार्या उद्धव ठाकरेंकडें नसावा? हे त्यांना दैवत मानणार्या शिवसैनिकांचं दुर्दैव आहे. कारण पत्रकार-संपादक मंडळींची विशेषतः उत्तर भारत आणि दाक्षिणात्य, मविआ सरकारचे शिल्पकार शरद पवार अधून-मधून पंतप्रधान मोदींची भेट घेत असतात त्यावर टिका करीत असतात. शरद पवारांना पंतप्रधान मोंदींशी भेट मिळणे हे कठीण नसते. पंतप्रधान मोदी मनाने मोठे आहेत. सरकारी कामातला वेळ काढून सर्व पक्षांच्या नेत्यांना मोदीशी भेटायला मिळते. यात मोदींचा मोठेपणा आहे. मग मोदींच्या मोठेपणाचा आदर करीत युती सरकारात भागिदार राहण्यात उद्धव ठाकरेंना अडचणीचे का वाटलें ? दस्तूरखुद्द स्वर्गीय बाळासाहेब आज हयात असते तर त्यांना ही पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी बसलेले पाहून आनंद झाला असता.
उद्धव ठाकरेंच्या स्वभावात काही तरी उणीव आहे. म्हणून मुख्यमंत्रीपद हाती असुन ही शिवसेनेच्या भवितव्यावर चर्चा होऊ लागली आहे. याची मुख्य कारणे तीन आहेत. एक काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेसची वारंवार करावी लागणारी मनधारणी. यातून बरीच मानसिक शक्ती खर्च होते. मन खचले की राजकीय डावपेचात धरसोड वृत्ती बळावते. दुसरे कारण शक्तीवान भाजपाशी आमने-सामने करावी लागणारी लढाई आणि तिसरे कारण राज ठाकरेंच्या नव्या अवतारातलं पुनरागमन, ही आहेत. शिवसेनेची अशी चोहोबाजूने कोंडी झाली आहे. त्यातून झालेल्या स्थितीसाठी प्रामुख्याने पक्षप्रमूख उद्धव ठाकरें जबाबदार आहेत.
शिवसेनेचे विद्यमान आमदार आणि मंत्रीच मविआ सरकारवर नाराज आहेत. मुबंई महानगर पालिकेत सेनेच्या जवळपास भाजपाचे नगरसेवक असूनही भाजपाने संपूर्ण सत्ता शिवसेनेला बहाल केली. हा फडणविसांचा मोठेपणा आहे. पण तोच भाजपाला महागात पडला. निवडणूकीच्या निकालानंतर लागलीच भाजपाने मुबंई महापालिकेची सत्ता काबीज केली असती तर शिवसेना सन २०१४ प्रमाणे २०१९ साली भाजपा सोबत राज्यात सत्तेत आली असती. उद्धव ठाकरेंना देंवेंद्र फडणवीसाच्या मोठेपणाचे भान ठेवणे गरजेचे वाटले नाही. कारण उद्धव ठाकरें बद्दल नितीन वागळेनी वर्णन केलेला कद्रुपणा असावा. पण मराठी मिडीयांनी या विषयातील देवेंद्र फडणवीसाच्या मोठेपणाबद्दल कौतूक तर सोडाच पण साधी बातमी सुद्धा दिली नाही. म्हणूनच मला सतत असे वाटते की मविआ सरकारची पेरणी सन २०१९ च्या विधानसभेच्या निवडणूकीच्या अगोदरच शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी केलेली होती आणि त्याला काही मिडीयांनी खत-पाणी पुरविले असावे. हा भारतीय राजकारणातला सर्वात मोठा दगाफटका आहे. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना ही असाच दगाफटका दिला. म्हणून राज ठाकरेंनी मनसे स्थापन केली.
बजेट अधिवेशनातील सामारोपाच्या भाषणाच्या वेळी जेव्हा उद्धव ठाकरेनीं त्यांच्या कुटुंबियांच्या बेनामी संपत्ती जप्त केल्या संबधी ' माझ्या कुटुंबियाना त्रास का देता, मला अटक करा ' असे म्हटले, त्यावर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हटले ' आपल्या कुटुंबियांना बिएमसीत पाठवता कशाला? भोगा आता आपल्या कर्माची फळे ! ' यात राज ठाकरेंची स्पष्टोक्ती नव्हे, ठाकरें कुटुंबावर त्यांचे असलेले निस्सीम प्रेम आणि सच्च्या निष्ठेतून दिसलेली ती तळमळ आहे. म्हणूनच तर राज ठाकरे हे बाळासाहेबांसारखे दिलदार आहेत असे जेष्ठ पत्रकार निखील वागळे वारंवार कौतूक करीत असतात.
त्याच मुंबई महापालिकेच्या निवडणूका आता येत आहेत आणि नेमक्या याच वेळी ' राज ठाकरे आक्रमक हिंदुत्व घेऊन उद्धव ठाकरेंच्या सरकार विरूद्ध लढाईसाठी तयार झाले. हा योगायोग नाही. हे एक राजकीय डावपेचाचे अचूक टायमिंग आहे. ते राज ठाकरेंचेच असावे. या संबंधीत राजना भाजपाची फूस आहे हो, मनसे भाजपाची बी टीम आहे हो, अशी ओरड मविआ सरकारचे नेते कार्यकर्ते आणि समर्थक मिडीया करीत आहेत, ते केवळ त्यांची मतें राज ठाकरे फोडणार आहेत या भयापोटी. ते अचूक टायमिंग राज ठाकरेंचे असो की भाजपाचे, ते इतकं महत्वाचं नाही. परंतु दोन काॅग्रेस पक्षांच्या मधोमध बसली आहे, ती कोण आहे? तिचं नातं काय या दोघांशी ? सध्या ती काय करते ? या प्रश्नाचे उत्तर मविआ मधील कुठला पक्ष देणार ? मुख्यमंत्र्यानींच आपल्या कामातून उत्तर दाखवावयास हवे होते. सारा वेळ विरोधी पक्षांच्या टिकावरील उत्तरे देण्यात का वाया घालवित आहेत? विरोधी पक्षांचा टिका करण्याचा हक्क आहे. तो तुम्ही केंद्र सरकार विरूद्ध वापरत नाहीत का ? सत्ताधार्यांनी विरोधी बाकावर बसलेल्यांच्या टिका-टिपणीचा आदर अधून मधून व्यक्त करण्याची गरज असते.
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना भाजपा विरूद्ध उसकावून मागच्या दरवाजातून सत्ता हस्तगत केली. ती मात्र शरद पवाराची चाणक्य नीती असे कौतूक हेच मिडीयावाले करतात. पण मनसे भाजपाची बी टीम आहे हे मात्र आग्रहाने मांडत आहेत. काहीही पुरावे नसताना. द्वि वा तीन पक्षीय बखेडात ज्या पक्षाला आणि मिडीयाला जनतेनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाही, तो पक्ष आणि त्याचे समर्थक मिडीया वाद-विवादात पराभूत होतात. पण तसा पराभव मान्य न करण्याच्या अट्टाहासामूळे तो पक्ष निवडणूक मैदानात ही पराभूत होतो. आणि त्याचे समर्थक मिडीयावाले ही पराभूत होतात. काय स्थिती आज काॅग्रेसची. कुठे आहेत पत्रकार प्रताप आसबे आणि प्रकाश बाळ? भाजपा महाराष्ट्र द्रोही आहे असे मविआतील घटक पक्षासोबत मिडीयावाले ही सतत गेली आठ वर्षे घसा फूटेपर्यंत आरोप करीत आहेत. काय उपयोग झाला? काय उखडले मोदी-शहांचे तुम्ही? विना पुरावा तुम्हाला मते द्यायला जनता खूळी आहे का? उलट भाजपा विधानसभेत दोन्ही वेळा सिंगल लार्जेस्ट पार्टी राहीली.
केंद्र सरकार ईडी आणि सिबीया द्वारें ज्या केसेस उभ्या करीत आहेत, त्या खोट्या असतील तर मग मविआच्या समर्थक मिडीयांनी शोध वृत्ती डब्यात बंद करून ठेवली आहे का? ज्यांची बेनामी संपत्ती जप्त होत आहेत, ती मंडळी केंद्र सरकार विरूद्ध कोर्टात का जात नाहीत? बहुतांश मराठी मिडीया सतत भाजपावर टिका करीत असतात. त्यामूळे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद काबीज केल्यापासून भाजपाची कशी जिरविली यात आनंद मानण्यात आपली अडीच वर्षे घालविली. पण ती केवळ मुख्यमंत्र्यांचीच नव्हे तर संपुर्ण मविआ सरकार आणि समर्थक मिडीयाची सुद्धा खर्ची झाली आहे. याचा प्रत्यय पुढे येणार्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणूकीच्या प्रचारात मविआला दिसेल.
आता उद्धव ठाकरेंना आपल्या मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात गृहखाते हवे आहे. का तर म्हणे मला भाजपाच्या नेते-आमदारांवर हव्या तितक्या केसेस टाकता येतील. ही काय इतकी सोपी गोष्ट आहे का? दुकाने, गाड्या, बसेस फोडणे सोपे आहे पण सरकार चालविणे सोपे नाही. तेथे पाहीजेत जातीचे. ईडी, सिबीआय, आयटी, आणि एनआयए व एनसीबीं इत्यादी संस्थांचे अधिकार पोलिस खात्यापेक्षा किती मोठे असतात हे उद्धव ठाकरेंना ठाऊक नसावे. ईडींना एखाद्या व्यक्तीकडे बेनामी संपत्तीची खात्री पटली की ते सरळ जप्त करतात. खटला दाखल करू शकतात. न्यायालयला सुद्धा आरोपीला इडीची कस्टडी द्यावी लागते.
असे एकैवात आले आहे की भ्रष्टाचाराच्या केसेस च्या बाबतीत राजकीय पक्ष परस्पर औदार्य दाखवित असतात ; आपआपल्या कुटुंबिय आणि नातेवाईकांना त्रास होईल अशी शेरेबाजी आणि कायद्यात अडकविण्याचे प्रयत्न टोकापर्यंत होऊ द्यावयाचे नाही ; एकमेकांच्या घरी लग्न वा गृहप्रवेशाच्या समारंभात सर्व पक्षीय मंडळी हजर व्हावीत, असा अलिखीत करार असतो. म्हणून तर माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधीच्या काळातले नगरवाला प्रकरण, रेल्वेमंत्री ललीत नारायणाचा संशयास्पद मृत्यु, माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधीच्या काळातील बोफर्स प्रकरण, वा माजी पंतप्रधान नरसिंहरावाच्या काळातील शेअर्स बाजारातील हर्षद मेहता प्रकरण, मायावती अखिलेष, मुलायमसिंग, चिंदंबरम, भुजबळ, खडसे यांच्यावर चाललेल्या केसेस गाजल्या आणि थंड झाल्या आणि होत जातील असे आपण अनुभवत आहोत. परंतु आपण मात्र राजकीय अभिनिवेशात सोशल मिडीयांवर एकमेकांशी भांडतो. का? कारण आपली बुद्धी आणि मन हे दोन अदृश्य अवयव जोश आणि नशा चे गुलाम आहेत.
महाराष्ट्रातील राजकारणात वर नमूद केलेला अलिखीत करार प्रथम कोणी मोडला या प्रश्नाचे उत्तर ' न्यूज मुंबईतक ' या चॅनेलवरून अभ्यासू पत्रकार, आणि विश्लेषक श्री सहिल जोशीनी एका चर्चेत मांडलेले मी ऐकले आहे. साहिल जोशी म्हणतात की, ' प्रथम मविआच्या नेते व कार्यकर्त्यानी देवेंद्र फडणविसच्या पत्नी संबंधीत अपशब्द वापरले आणि त्या अलिखीत कराराचा भंग केला. नवाब मलिक आणि संजय राऊत या दोन वाचाळवीरांनी, सुर्य उगवला की फडणवीस वर टिका करू लागले ते अगदी थेट रात्री पर्यंत. धनंजय मूडें, जितेंद्र आव्हाड,,मटकरी, यांनी फडणविसावर टिका करतांना पुष्कळदा पातळी सुद्धा सोडली. जंयत पाटील वरून दिसतात सरळ पण अधिवेशनात फडणविसाची चेष्टा करण्यात आपले भाषण खर्ची घालतात. फडणविसांनी म्हणूनच पोल-खोल करावयास सुरूवात केली. ते विडीओ आणि पेनड्राईव्ह अधिवेशानात पेश करीत भाषण करीत होते तेव्हा तर राष्ट्रवादी, शिवसेना व काॅग्रेसचे रथी-महारथींचे चेहरे सुतकी झाले होते.
भाजपा मध्ये वाचाळवीर नेते आहेत. चंद्रकांत दादां, राणे व त्यांचे पुत्र यांना अधून मधून मविआ सरकारच्या पाडण्याच्या तारखा देण्याची आणि प्रतिवाद करण्यात काय मौज वाटते देव जाणो ! नारायण राणे आणि उद्धव ठाकरें या नेत्यांमध्ये छत्तीसचा आकडा आहे. असे असले तरी मुख्यमंत्र्यांना अरे तुरे च्या भाषेतून टिकेचं लक्ष्य करणे हे फारच अती आहे. आपण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत याचे स्मरण राणेंनी ठेवणे गरजेचे आहे. शिवसेनेच्या नेत्यांना संयम ठेवता येत नाही. टिका करणार्यांना धोबी पछाड केल्याशिवाय त्यांना शांती मिळत नाही. परंतु विद्यमान मुख्यमंत्र्यांनी त्यांना आवर घालण्याचे कर्तव्य पार पाडण्याचे काम वार्यावर सोडून दिले आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ हा केवळ देखावा ठरतो. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे गोडवे गाणार्या पत्रकारांना ही काही पडले नाही असे दिसते.
दिल्लीतील राजकारणात काॅग्रेसच्या सुप्रिमो सोनिया गांधीनी प्रथम प्रचाराची पातळी खाली आणली. त्यांनी मोदींना ' मौतका सौदागर ' या शब्दात हिणविले. दुसरे एक नेते मणिशंकर अय्यरनी मोदींना 'चहावाला' असे तिरस्कार आवाजात हिणविले. काॅग्रेसचे आणखिन वाचाळ नेते दिग्विविजयसिंगने पंतप्रधान मोदींच्या पत्नी संबंधी आणि जाती संबंधी अभद्र उद्गार काढले. नंतर आम आदमी, तृणमूल काॅग्रेस आणि शिवसेना तसेच राष्ट्रवादी पक्षांच्या नेत्यांनी काॅग्रेसचा कित्ता गिरवयास सुरूवात केली. या संबंधी एक हिंदी भाषिक वृत्तपत्राचे संपादकांनी सन २०१७ साली म्हटले आहे , ' मजाक, तंज, अपमान इन सभीके बीच महीन रेखा होती है, जो दिखती तो नही लेकीन जरा सी भूल होनेपर भारी नुकसान की नींव रख देती है | काॅग्रेसने इस पर ध्यान नही दिया तो काॅग्रेसका नामोनिशाण मिट जायेगा |' आज काॅग्रेसची स्थिती किती दयनिय झाली आहे हे आपण पाहतो.
काॅग्रेसचे मणीशंकर अय्यरने तर पाकिस्तानात जाऊन तेथील टिव्हीवरून लाईव्ह कार्यक्रमात मोदी सरकारको आप हटाओ अशी विनंती केली होती. हे आपल्यापैकी अनेकांनी पाहिले असावे. हा खरा राजद्रोह आहे. तरी नरेंद्र मोदीनी त्यावर दुर्लक्ष केले. म्हणून तर ते खंडप्राय देशाचे लोकप्रिय पंतप्रधान शोभून दिसतात. कारण ते उद्धव ठाकरें सारखे वाड-वडीलांच्या राजकीय पुण्याईने नव्हे तर स्वकर्तृत्वाने पंतप्रधानपदावर पोहोचले आहेत. असे फक्त भाजपात च शक्य असते. पार्टी वुईथ डिफ्ररन्स ची टर उडविणार्यांनी (यात मिडीयांचा ही समावेश आहे) डोळे उघडून राजकीय पक्षांचा व्यवहार तपासावा. उगाच राजकीय नेत्यांची चमचेगिरी करण्यात आपली वाणी, लेखणी आणि वेळ वाया घालवू नये. लोकशाहीची विटंबना करण्यात जितके राजकीय नेते जबाबदार आहेत, तितकेच सरकारचं प्रत्येक घटनेत समर्थन करणारी मिडीया ही जबाबदार आहे. ' हमाम मे सब नंगे !'
नमस्कार,
उत्तर द्याहटवाआपण हा लेखाद्वारे वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे असे लेख वाचल्यानंतर जाणवते. आपणास धन्यवाद.
मा.श्री.उध्दवसाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची जागा मा. श्री. राजसाहेब ठाकरेंची मनसे घेईल व आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांत भाजपा बरोबर सहभागी होऊन सत्तेची भागीदारी करेल असे मला वाटते.
मी भाजपा / मनसेला मनापासुन शुभेच्छा देतो.
नेहेमीप्रमाणेच, मार्मिक पण वस्तुस्थिती दर्शक विश्लेषण ! आगामी घटनांबद्दल निश्चित अंदाज वर्तविणे कठीण, प्रामाणिक मत असं आहे की भाजपने मनपा तसेच आगामी विधानसभा स्वबळावरच लढवाव्यात. जनता सर्व पहात आहे, धन्यवाद.
उत्तर द्याहटवाHINDUTVA CHI VAT LAVLI THE
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवा