बुधवार, २७ एप्रिल, २०२२

राज ठाकरे यांचा नवा अवतार - भाग २



मविआ सरकार बद्दल होणार्या ॲन्टी इन्कंबन्सीचा फटका शिवसेनेला तात्काळ पडून नेत्यासकट कार्यकर्ते ही मनसेकडे जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे भाजपा कडे परतीचे दोर कापले गेले आहेत. शिवसेनेने राष्ट्रवादी काॅग्रेस आणि काॅग्रेसशी घरोबा केला तेव्हा मनसे म्हणजे संपलेला पक्ष अशा शेखीत उद्धव ठाकरे वावरत होते. राज ठाकरेंच्या केवळ दोन सभांतून शिवसेनेची पुर्ण स्पेस घेऊ शकतो असे मनसेचे चित्र उभे झाले आहे. शरद पवारांना ही राज ठाकरेंनी केलेल्या टिकेवर उत्तर देण्यासाठी दोन वेळा पत्रकार परिषद घ्यावी लागली. मविआ सरकारचे दोन सर्वोच्च नेते हतबल झाल्यामूळे अजानसाठी लाॅऊड स्पिकरच्या उपयोगासाठी पोलीस खात्याच्या परवानगीची अट घालून तात्पुरता उपाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेला दिसतो. पण असे वेळोवेळी उपाय करीत बसणे मुख्यमंत्र्यांना अशक्य आहे. कारण मविआ मधील काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेस आपल्या मुस्लीम व्होट बँक गमाविण्याच्या कुरापती सहन करणार नाहीत. त्यातही शिवसेनेने सुद्धा अल्पसंख्याकांना गोंजारण्याचे काम सुरू केले आहे. पण त्यात शिवसेनेला यश फारसे मिळणार नसले तरी काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेसला शिवसेना हिंदुत्वाकडे झूकत आहे असे कारण सांगून सरकार मधून बाहेर पडण्याची संधी मिळेल. दोन्ही काॅग्रेस पक्ष अशा संधीची वाट पाहात आहेत. दुसरे असे की मुस्लीम जगतात पाकिस्तान तसेच भारतातील मुस्लीमांना जसे दुय्यम स्थान मिळते तसेच आपल्या येथील सेक्यूलर पक्षांच्या कळपात शिवसेनेला उपरे समजलेच जाणार.

सध्या आपल्या देशात अल्पसंख्याकांवर अन्याय होत आहे अशी आवई अमेरिका आणि काही युरोपियन देश उठवित आहेत. तशी आवई उठविणे अमेरिका, कॅनडा सारख्या देशांची जुनी खोड आहे. सध्या रशिया आणि युक्रेन मधील युद्धात मोदी सरकारने पश्चिमी देशांना साथ दिली नाही. त्यामूळे भारतविरोधी खोट्या-नाट्या आवई उठविण्याचे सत्र पश्चीमी देशांनी वाढविले आहे. अशा वेळी विदेशी शक्तींचा जो पाठींबा भाजपेतर पक्षांना मिळतो आहे, त्यातील आपला हिस्सा काॅग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांना गमाविणे अशक्य आहे. शिवसेनेने काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेसशी केलेला घरोबा म्हणजे असंगाशी केलेला संग असे भाजपाचे नेते म्हणत होते ते शिवसेनेच्या भल्यासाठी. यात भाजपाचे काही चूकले नाही. आम जनतेला ही हे आता पटत आहे.

अल्पसंख्याकांसंबंधीचे धोरण हा प्रश्न देशांतर्गतला आहे. वस्तुतः जे परकीय नागरिक इथे व्यवसायानिमीत्त इथे आले आणि राहिले अशांनाच अल्पसंख्याक मानण्यात यावे. आपल्या देशात ज्यांच्या शेकडो पिढ्या जन्मल्या, राहिल्या वाढल्या आणि वाढत जाणार आहे अशा सर्वजनांची भारत ही पितृभूमी आणि मातृभूमी आहे. उपासना पद्धत बदलेली असली तरीही. कुठल्याच प्रकारचा भेदभाव इथल्या मूळ समाजात नसावा आणि राजकीय फायद्यासाठी भेद निर्माण करून स्वतंत्र शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था निर्माण केलेल्या आहेत त्याही नवीन राष्ट्रीय शिक्षा नीती ज्या शैक्षणिक वर्षात सुरू होईल त्या वर्षापासून हळूहळू बंद करण्याची सुरूवात होणे गरजेचे आहे. तसेच उपासना पद्धती अंमलात आणताना हवा, पाणी, ध्वनीचे प्रदुषण होऊन सार्वजनिक आरोग्य बिघडत असेल तर ते थांबावयास हवे. उपासना पद्धतीमूळे समाजात भिन्नता अस्तित्वात आली आहे हे नाकारता येत नाही. त्यामूळे एखादा समाज देशाच्या, वा राज्याच्या वा शहराच्या भागात, जिल्ह्यात, एकाच उपासना पद्धतीचे लोक एकवटले दिसतात. मग तो भाग मुस्लीम बहूल झालेला किंवा ख्रिस्ती बहूल झालेला दिसतो. अशा भागात भाजपेतर पक्षांकडून राजकारण खेळले गेले, तेही पक्ष स्तरावरून आणि हातातल्या सत्तेतील प्रशासनाचा वापर करून. त्यांच्या उपासनेत कुठल्याही प्रकारचे निर्बंध नाहीत उलट प्रोत्साहन दिले गेले आहे आणि आज ही दिले जात आहे. अशा मुस्लीम बाहूल भागात हिंदू समाजाची स्थिती कशी झाली आहे हे आपण काश्मीर फाईल्स चित्रपटातून पाहिले आहे. याशिवाय हिंदु बाहूल विभागात तर मुस्लीम बांधवांना स्पेशल व्यवस्था आहे, कारण त्यांची संख्या कमी आहे म्हणून. म्हणूनच हिंदु समाज हनुमान चालीसाचे पठण सामुदायिक रित्या करण्याच्या मनस्थितीत आला आहे.  

शिवसेनेचे अनिल देसाई म्हणाले  'आम्ही भीमरूपी स्तोत्र म्हणणारे आहोत.'  प्रश्न भाषेचा नाही. देवाला कुठल्याही भाषेतलं स्तोत्र चालते.  इतकी वर्षे शिवसेनेचे नेता म्हणून काम करीत आहात तरी प्रकरण काय ते तरी समजून प्रतिक्रीया द्या की ! पण त्यांचा दोष नाही. कारण आपले मुख्यमंत्री म्हणतात  ' आम्ही गदावाले मारूतीचे फक्त आहोत, घंटा वाजविणारे नाहीत ' काय म्हणावं? आम्हीच ज्ञानी, आम्हीच शक्तीशाली, अशा तोर्यात म्हणता आहात, म्हणजे आख्खा डोंगर हातात घेऊन  संजीवनी वनस्पती आणणार्या मारूती पेक्षा अधिक शक्तीवान आहात का?  हनुमान मंदिरात घंटा फक्त शेंडी आणि जानवं वाले वाजवितात काय?  हीच ती कद्रु वृत्ती. हाच तो अहंकार ! घरात हनुमान चालिसा म्हणा, देवाची घरात पूजा करा,  हे मान्य आहे. देव सर्वत्र आहे म्हणून तो घरात आहे हे ही मान्य. मग प्रेषित महमंद पैगांबर आणि प्रभू येशु ख्रिस्त घरात असणारच ना ! त्यांना सांगा की चर्च आणि मशीदीत कशाला जाता?  तसा उपदेश देण्याची ताकद, हिम्मत उद्धव ठाकरे सरकारकडे आहे का? 

एकं सत् विप्रः बहुधा वदन्ती | (देव वा परमेश्वर एकच आहे. फक्त अनेक नावाने ओळखला जातो.)
ईशावास्यम इदं सर्व | , ईश्वर सर्वत्र आहे
आकाशाम् पतीतं तोयं यथा गच्छति सागरम् |
सर्व देवं नमस्कारः केशवं प्रतिगच्छति || (आकाशातून पडणार्या पावसाचे पाणी शेवटी समुद्राला जाऊन मिळते तद्वत अनेक असे देव आपण मानतो, त्या सर्वांना केलेला नमस्कार शेवटी केशवं म्हणजे विष्णू देवालाच पोहचतो.) तोच ब्रह्म, तोच विष्णू आणि तोच शिव. म्हणजेच जन्म देणारा, पालन पोषण करणारा आणि मृत्यूची व्यवस्था करणारा शीव. म्हणून आपल्या संस्कृतीत एखाद्याचा मृत्यु झाला तर जीव शिवाला भेटावयास गेला असे म्हणण्याचा प्रघात आहे. The God म्हणजे Ganerator, Observance and Distruction उत्पत्ती स्थिती आणि लय. हेच ते शाश्वत सत्य भारत वर्षात स्विकारले गेले आहे, तेही जगातल्या इतर संस्कृती जन्मल्या ही नव्हत्या तेव्हापासून म्हणजेच अनादी कालापासून. हे सत्य अमेरिकेतील ख्यातनाम इतिहासकार ड्युरांट, आपल्या राष्ट्रीय काॅग्रेसचे अध्यक्ष ॲनी बेंझट, आणि भारतातले ब्रिटीश व्हाॅईसराय लार्ड कर्झन इत्यादीं पाश्चीमात्य विचारवंतानी मान्य केले आहे.  आणि हेच ते सत्य भाजपा सोडून इतर पक्षाचे नेते विदेशी शक्तींच्या दडपणामुळे आणि राजकीय फायद्यासाठी मान्य करण्याची हिंमत दाखवित नाही. आपल्या देशाचा सर्वांगिण विकास फक्त आणि फक्त सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि विज्ञान निष्ठा जोपासल्या तरच होऊ शकतो. भारतीय जनता पार्टीचा प्रवास त्या मार्गावरून जात आहे असे निदान दिसते आहे. म्हणूनच तो पक्ष बलवान झाला आहे. अर्थात आपल्या पैकी काही जणांचे या संबंधी दुमत असू शकते. ते मी स्विकारतो.

स्वातंत्र्यानंतर सरकारच्या फाजील लाडामूळे अल्पसंख्याकांची मानसिकता अशी झाली आहे की ते इथल्या मूळ प्रवाहात येऊ इच्छीत नाही. विरोधी पक्षांच्या कचखाऊ धोरणामूळे किंवा लाचारीमूळे तसेच विदेशी शक्तीच्या दुसर्या देशांतर्गत ढवळा-ढवळ करण्याची जी खोड जडली आहे त्यामूळे अल्पसंख्याकांचा प्रश्न आंतरराष्ट्रीय झाल्याचा दिसतोय. पण तो त्यांच्या दृष्टीकोनातून. 

दुसर्या बाजूला केंद्र सरकार आपली विदेश नीती राबवित असताना विदेशी दडपणाला चोख उत्तर देत आहे. हे आपण रशिया- युक्रेन युद्धा संबंधीतला पंतप्रधानांनी दाखविलेल्या कणखरपणातून पाहिले आहे. तसाच कणखरपणा परराष्ट्र खात्याचे मंत्री एस जयशंकर यांनी मानवाधिकारांवर अमेरिका सारख्या बलाढ्य देशाला तडाखा देताना वापरला आहे. श्री जयशंकर यांच्या विदेशातील पत्रकार परिषदा यु ट्युब वरून पाहिल्या आणि ऐकल्या तर आपली विदेश नीती किती मजबूत झाली आहे हे कळून येते. म्हणून भारतीय जनतेचा मोदी सरकारच्या धोरणास प्रचंड पाठींबा मिळत आहे.

मोदी सरकारच्या धोरणांना मराठी जनतेचा ही चांगला पाठींबा मिळतो आहे. हे आपण लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूकीतून सलग दोनदा अनुभवला आहे. हा अंत्यंत महत्वाचा मुद्दा शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते, समर्थक संपादक आणि विचारवंत मंडळी लक्षात घेत नाहीत. राडा करण्यासाठी अनेक शिवसैनिक गोळा करता येतात. तसे मतदार गोळा करता येत नाहीत हे सत्य शिवसेनेने स्विकारून राजकीय व्यवहार ठेवला असता तर शिवसेना महाराष्ट्रात सिंगल लार्जेस्ट पार्टी नव्वदच्या दशकातच दिसली असती.

विद्यमान सरकारची स्थिती अशी आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राज्यातील ग्राऊंड रियाॅलीटी दिसेनासी झाली आहे. मतदार बदलत आहे म्हणजेच समाज बदलत आहे. म्हणजे राजकारण बदलत आहे. कदाचीत उद्धव ठाकरें समोर शरद पवारांनी देशपातळीवर विरोधी पक्षांच्या ऐक्याचे जे चित्र रंगविले त्यातून आपली प्रतिमा राष्ट्रीय पातळीवरील नेता अशी होऊ शकते या आशावादाने किंवा राजकीय प्रगल्भतेच्या अभावाने किंवा अहंकाराने उद्धव ठाकरेंना भाजपा पासून दूर नेले असावे. शरद पवारांचे वाढते वय आणि त्यांची घसरती प्रतिमा उपयोगी पडणार नव्हती. खुद्द शरद पवारांनी पंतप्रधान नरसिंहरावांना आव्हान देण्याचा जो प्रयत्न केला होता तो त्यांच्यावरच उलटला गेला. पंतप्रधान नरसिंहरावांनी संरक्षण मंत्रीपदावरून हटविले आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदी पाठविले. शेवटी राहिले फक्त राष्ट्रवादी काॅग्रेसचे अध्यक्ष ते ही दोन स्तरावर.एक अखिल भारतीय स्तरावर आणि महाराष्ट्र राज्यस्तरावर ही तेच आहेत. बाकी ते जयंत पाटील महाराष्ट्रातलया राष्ट्रवादी काॅग्रैसचे अध्यक्ष फक्त नावापुरता आणि सरकारात फक्त मान डोलावयाला. पत्रकार परिषदेत मविआ सरकार आणि पक्षातर्फे काही मांडावयाचे असेल तर अजीतदादा मांडत असतात.

आता तर राज ठाकरे नव्या वेषात अवतरले आहेत. त्यातून नुकसान शिवसेनेचेच होणार. काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेसला याचे बिलकूल सोयर-सुतक नसणार. कारण महाराष्ट्रात त्यांनी शिवसेनेला सत्तेत घेतले असले तरी त्यांची प्रतिमा हिंदुत्वाची होणार नाही. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव, तर  हिंदुत्व म्हणजे सर्वधर्मसमभावातल्या धोरणातील त्रूटी दूर करणे हे होय. या त्रुटी दूर करण्यास विरोध करणे म्हणजे अंधाराचा स्विकार करणे हे होय. अंधाराचा स्विकार म्हणजे ' विनाशकाले विपरीत बुद्धी '  याहून अधिक काही सांगण्यासारखं शिल्लक राहिलेलं नाही.

२ टिप्पण्या:

  1. विष्णु जी,
    दोन्ही लेखांमधुन आपण,
    शिवसेनेची मविआ मधली हतबल परीस्थिती
    मनसेने विचारपुर्वक केलेला चेहरा बदल
    सनातन धर्म व सार्थ रामनाम
    या सर्व मुद्द्यांवर सखोल व स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे, भाषाही समतोल आहे.
    वरील पार्श्वभूमीवर आज उत्तर प्रदेशातुन योगीजींच्या अनधिकृत भोंगे व अतिक्रमण यासंबंधात केलेली अबोल पण निर्णायक कार्यवाही ऊठुन दिसते.
    असेच समयोचीत व समतोल लेखन करत रहा, धन्यवाद व नमस्कार.

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद दत्ताजी. माझ्या लेखन प्रवासात आपण सदैव प्रोत्साहन देता, मार्गदर्शन करता व सुचना देत असता तीच माझ्यासाठी अशी शिदोरी आहे ते रिक्त होणार नाही. पुन्हा एकदा धन्यवाद !

    उत्तर द्याहटवा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...