रविवार, २१ नोव्हेंबर, २०२१

त्रिपुरात अफवा पण महाराष्ट्रात धुडघूस कसा ? (भाग-१)


भाजपा शासित त्रिपुरा राज्यात मुस्लीम धर्मियांची प्रार्थनास्थळे उध्वस्त केली, तेथील मुस्लीम बांधवांना मारहाण केली, त्यांची दुकाने जाळली अशा फेक न्यूज पसरल्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. अमरावती, नागपूर, नांदेड , धुळे इत्यादी ठिकाणी रजा ॲकेडमेने आखलेल्या बंद, मोर्चा, धरणं अशा कार्यक्रमात मुस्लीम बांधवांनी  हिंदु बांधवांच्या दुकानांची, वाहनांची, मोडतोड करून हिंदु बांधवाना मारहाण केली. त्यामूळे भाजपाने अशा ठिकाणी दुसर्या दिवशी निषेध व्यक्त करण्यासाठी बंद आणि मोर्चे आखले. विरोधी पक्षांचा तो हक्क असतो.  म्हणून असा निषेध हा ही एक प्रकारे Every action has reaction या सृष्टीच्या नियमानुसार आहे. या घटनेने महाराष्ट्र हादरला असे न्यूज चॅनेल म्हणत आहेत. महाराष्ट्र हादरला पण महाराष्ट्र सरकार कोडगे बनले असल्याकारणाने ते हादरले नसावे. त्यातच या घटनेचे मास्टर माईन्ड मविआ सरकारचे नेते मंडळी आहे अशा काही न्यूज चॅनेलवरून जनतेला कळले आहे. तसेच या घटने नंतर  ' शांतता राखा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका ' असे जनतेला आवाहन केले तेव्हा कुठे जनसामान्यांना कळले असावे, की श्री दिलीप वळसे पाटील हे महाराष्ट्राचे नवीन गृहमंत्री आहेत.


दिलीप वळसे पाटील यांचा केलेला उल्लेख थोडासा उपहासत्मक आहे पण तितका पुरेसा आहे. कारण राजकारणातले ते एक सौजन्यशील आणि आपले काम आणि आपण बरे अशा गटात मोडणारे दिसतात.  मविआ सरकारने केंद्र सरकारशी जी बंडखोरी निर्माण केली आहे त्या संबधित राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांच्या इतर नेत्यांप्रमांणे उगीच फुटकळ आणि फटकळ वक्तव्ये करीत नाहीत. मविआ सरकार स्थापन झाले तेव्हा ते गृहमंत्री होणार अशी चर्चा सुरू होती. पण माशी कुठे शिंकली कोण जाणे पण त्यांचे नाव मागे पडले आणि आपल्या बोडक्यावर अनिल देशमूख गृहमंत्री म्हणून बसले. नंतर ऐकू आले की दिलीप वळसे पाटील यांनी प्रकृती अस्वास्थ्यामूळे गृहखाते नाकारले. पण महाराष्ट्राच्या गृहखात्याचीच प्रकृती वसूली कांड, मंत्र्याकडून महिलांचा विनयभंग, भ्रष्टाचार, कलाकारांच्या हत्त्या, साधूंच्या हत्त्या इत्यादी दुष्कृत्यांनी ढासळली असताना त्यांनी ते खाते का स्विकारले असा प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहिला असावा. पण त्यावर अधिक चर्चा करण्याची गरज नाही. कारण स्वभावाने ते मवाळ असल्याने आपल्या बाॅसची आज्ञा पाळली आहे.

वस्तुस्थिती अशी आहे की श्री उद्वव ठाकरे आणि शरद पवार यांच्या हातात सर्व खात्यांचा कारभार आहे.  त्यांच्या पाठीशी दोन शत्रु देशांच्या लाॅब्यां भक्कमपणे उभ्या आहेत असे म्हटले जाते.  त्यातील एका देशात भारताला हवा असलेला आणि भारतात आंतकवाद, लव जिहादी , ड्रग्ज चे जाळे निर्माण करून काळा पैसा पांढरा करणारा, धार्मिक दंगली आणि बाॅम्ब स्पोट घडविणारा अन्डरवर्ल्डचा डाॅन राहातो. तो देश म्हणञे पाकिस्तान. तर दुसरा देश जिथे लोकशाहीचा अंश नाही पण भारतात मात्र आजादीचे खोटे नारे मिरविणारी  उनाडटप्पू युवकांची टोळी निर्माण करणारा, सतत हिटलरच्या गोबेल्स तंत्राला आज सत्तर वर्षाहून अधिक काळ लोटला तरी जो शिव्यांची लाखोली वाहतो आहे आणि तेच तंत्र अद्यायावत स्वरूपात आपल्या येथील मिडीयाला लाच देऊन  वापरीत आहे, तसेच आपल्या देशाच्या काही भागात ज्याने प्रत्यक्ष रक्तरंजीत क्रान्ती घडविणार्या नक्षलवाद्यांचे जाळे निर्माण केले आहे तो देश म्हणजे चीन. अशा या दोन देशांचा लाब्यांचा प्रभाव २०१४ पासून आपल्या येथील बहुतांश विरोधी पक्षांवर सतत पडत आला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील शिवसेनेवर अधिक पडल्याचे दिसते. हा एक असा मुद्दा आहे , ज्यावर चर्चा केली की त्रिपुरा येथेच का फेक न्यूजचे तंत्र अवलंबिले गेले आणि त्यातून फक्त महाराष्ट्रात दंगली का घडल्या आणि त्यासाठी रजा ॲकेडेमीचा वापर का झाला इत्यादी प्रश्नांचे उत्तर शोधण्यात मदत होईल असे वाटते. म्हणून प्रथम त्यावर चर्चा करू या.

आपल्या देशाच्या ईशान्य सिमेवरील राज्यें स्वातंत्र्या नंतरही बराच काळ दुर्लक्षित राहिली. त्यामूळे ती राज्यें एक प्रकारे ख्रिस्ती मिशनरी, डाव्या विचारसरणीचे पक्ष आणि बांगला देशातील जिहादी विचारसरणीच्या संस्था आणि संघटनांना जणू काही आंदण देल्यासारखी होती. त्यातून तेथील जनतेचे भले काही झाले नाही. त्यांच्या वाटेला सतरा विघ्ने दारीद्र्य आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विधायक कार्यामूळे तेथील जनतेला आपल्या संस्कृतीची जी विस्मृती झाली होती ती नष्ट झाली आणि आपल्यावर माया करणारी मंडळी आपल्या देशात आहे याचा अनुभव आला. सन २०१४ नंतर केंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर ईशान्य कडील राज्यांच्या विकास साठी भरीव आर्थिक मदतीची तरतूद केली आणि  या राज्यांचा विकास होऊ लागला. संघाची माया आणि केंद्रातील भाजपा सरकारचा आधार या दोन गोष्टीमूळे या भागातील बहुतांश राज्यातील मिशनरी, डावे, आणि जिहादी लोकांच्या हातातून प्रत्येक क्षेत्रातील सत्ता गेली. मी मुद्दामहून प्रत्येक क्षेत्राची सत्ता असा शब्द प्रयोग केला. याचे कारण तिथे मालक काॅग्रेस, डावे पक्ष, त्यांच्या टोळ्या, त्यांचे गट आणि मिशनरी इत्यादी मंडळी आणि जनता वेठबिगारी अशी स्थिती होती. पण या मालक मंडळीची सत्ता गेली आणि नशा उतरली.  त्यामूळे ही मंडळी सैरभैर झाली आहे. जसे की पाण्यातून मासे बाहेर काढले की कसे तडफडतात तशी अवस्था या तिन्ही गटांची झाली. पण मृत झाली नाहीत. कारण यांना जिवंत राहण्यासाठी मदत शत्रू देशांनी केली आहे. त्रिपुरा हे ईशान्य भारतातील महत्वाचे राज्य. तिथे भाजपाचे सरकार आहे. म्हणून सोशल मिडीयावर फेक न्युज प्रसारीत करण्याचे तंत्र चीनला चांगले अवगत आहे. त्याने त्रिपूरात आपले थोडे फार शिष्य शिल्लक आहेत त्यांच्या कडून अफवा पसरविण्याचे  काम पार पाडले असावे.

आता दंगली कुठे घडवयाच्या हा प्रश्न त्या तिन्ही गटांना पडला असावा. पण तो ही प्रश्न सुटला. कारण या तिन्ही गटांचे प्रतिनिधीत्व करणारे तीन पक्षांचे मविआ सरकार आयते मिळाले आहेच.  महाराष्ट्रातील या सरकारने स्थापनेपासूनच केंद्र सरकारशी संघर्ष कसा करावा याच्या तालमी केल्या आहेत. म्हणून महाराष्ट्राची निवड झाली असावी. आणखिन एक कारण असे आहे की, महाराष्ट्रातला प्रयोग देशभर करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांचा आहे. पण तो सफल होणार नाही. कारण हे सरकार प्रचंडपणे गोत्यात आले आहे. त्यावर चर्चा लेखाच्या सामारोपात होईल.

नंतर दंगल घडविण्याचे काम कोणाकडे द्यावयाचे हा प्रश्न उभा राहिला असावा. दशहतवादी दंगल घडविण्यात माहिर आहेत. पण कॅमेरा फूटेज तंत्र फार अद्यावत झाले आहे. त्यामूळे दंगल घडविण्याचे काम दशहतवाद्यांकडे सोपविले तर गुन्हाचा शोध, तपास केंद्रीय एजन्सीकडे जाईल. अलिकडेच मविआ सरकार स्वतःच्या चूकांवर पांघरूण घालण्यासाठी केंद्र सरकारवर प्रतिहल्ला करीत राहीले, त्यामूळे प्रतिहल्याचा तपास केंद्रीय एजन्सीकडे जात राहीला आणि सरकार चिखलात रूतत गेले हा अनुभव गाठीशी असल्यामूळे दशहतवाद्यांचा वापर करण्याचा बेत रहीत झाला असावा.

मग मोर्चा, बंद आणि फोडतोडीच्या कृत्यात तीन वेळा यशस्वी झालेल्या अशा शिक्षण आणि सेवा याचे व्रत घेतलेल्या रजा ॲकेडमीला दंगल करण्याची जबाबदारी दिली.  रजा ॲकेडमीने मोर्चा आणि बंद, यशस्वी करण्यासाठी  १५ वर्षाखालील विद्यार्थ्यांना सामावून घेतले आणि  दगडफेक, हिंसक कृत्ये, आणि सपंत्तीच्या नासाडीचे काम त्यांच्या हस्ते फस्त केले. कारण हे की  कॅमेरा फूटेज मधून या विद्यार्थ्यानी तोडफोड केली हे दिसले आणि गुन्हा सिद्ध झाला तरी जेलची हवा खाण्याची शिक्षा न होता Child Rehabilation गृहात त्यांची रवानगी होईल.

एकंदरीत त्रिपुरात अफवा, आणि मोर्चा, बंद, दंगल, हिंदु समाजावर हल्ले  महाराष्ट्रात करावयाची ही योजना पुर्वनियोजित होती. या निष्कर्षाप्रत आपण आलो आहोत. या निष्कर्षात किती तथ्य आहे हे आपण या लेखाच्या भाग २ मध्ये पाहू या.
(या लेखाचा भाग २ सोबत खाली जोडला आहे )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...