संजीवनी ही एक विद्या आहे. शब्दशः अर्थ मृत्यु पावलेल्या माणसाला पुन्हा जिवंत करण्याची विद्या. असूरांचे गुरू शुक्राचार्य ह्या विद्येचे जनक समजले जातात. ह्यापेक्षा अधिक काही ह्या संजीवनी विद्ये संबंधी मला ठाऊक नाही. नालासोपारा (प ) येथे 'संजीवनी परिवार' नावाची एक समाजसेवी संस्था गेली अनेक वर्षे खंड न पाडता अनेक लोकोपयोगी कामें करीत आहे. आपल्या देशात शहरी, निमशहरी व ग्रामीण भागात अनेक स्वयंसेवी संघटना आहेत. अशा संस्थाच्या कार्यांत संजीवनी विद्या आहे असे मला सतत वाटत आले आहे आणि त्यांच्या कार्यासंबंधी व्यक्त व्हावे असे प्रकर्षाने मला जाणवत होते. संजीवनी परिवार नालासोपारा (प) ही संस्था माझ्या परिवारातील आहे, माझ्या गावातील आहे. प्रत्येक कार्यक्रमासाठी संजीवनी परिवारातले कार्यकर्ते मला आग्रहाचे आमंत्रण देत असतात. ती संस्था येत्या रविवारी ७ जूलै ला आपल्या वृक्षरोहणाच्या मोहीमेचा चौदावा वाढदिवस साजरा करीत आहे. परिवाराचा एक आगळा वेगळा वाढदिवस. नालासोपारा (प )निर्मळ स्थित श्रीमत् आद्य शंकराचार्य मंदिराचा परिसर आज संजीवनी वनराई म्हणून ओळखला जातो. त्या निमित्ताने ब्लाॅगवर एक लेख संजीवनी विद्या नावाच्या देवतेच्या चरणी वाहावा असे वाटले म्हणून हा लेख प्रपंच.
संजीवनी म्हणजे 'मृत्युने कवटाळलेल्या माणसास जीवंत करण्याची विद्या' ही वैदिक काळातील. 'जीवदान देणारी विद्या' ही आजच्या युगातील संजीवनी. कुठले ही लोकोपयोगी कार्य आपल्या जीवनाचे व्रत आहे असे समजून कोणी व्यक्ती, वा संस्था खंड न पडता दरवर्षी करीत असेल तर ते कार्य 'कार्यक्रम ' म्हणून राहात नाही. त्या कार्यक्रमाचे रूपातंर मोहीमेत होत असते. त्यातही ते वृक्षारोहणाचे कार्य. हवेतील प्रदुषण दूर करून सृष्टीतील जीवनास आवश्यक असणार्या ऑक्सीजनचा साठा वाढविण्याचे कार्य. अनियमीत आणि बेभरवशाचा झालेल्या पावसाळ्याला नियमित आणण्याचे हे कार्य. पाणी म्हणजेच जीवन. शुध्द हवा आणि पाणी ह्याचा पुरवठा वाढविणे ह्या नवसंजीवनी विद्या आहेत. मागे Whatsapp वर एक पोस्ट आली होती. ती अशी आहे, " The most precious thing u can give some one is the gift of ur time and attention ." ह्या पोस्ट वरून मी सेवाभाव आणि कर्मयोग असा एक सविस्तर लेख लिहीला आहे. त्यात मी जे म्हटले आहे, ते थोडक्या शब्दात मांडतो. "वृक्षारोपण, नद्या स्वच्छ ठेवणे, संयमित जीवनशैली ठेवणे, वन्य प्राण्यांची शिकार न करणे, पशू- पक्षांच्या स्वैर विहारावर प्रतिबंद न लावणे, इत्यादी कार्ये म्हणजे निसर्गाप्रती वाहलेली कृतज्ञता होय. एका परिने आपण आपल्या धरणीमातेला दिलेली Precious gift of time and attention होय." धरणीमातेच्या उपकाराची परतफेड करण्याचे आपल्याला जमत नसेल तर ते ही एक वेळ चालू शकते पण निसर्गाची हानी का करावी? निसर्गाने निर्माण केलेले आपले मन निसर्गाच्या परिसरात अत्यंत प्रभावी बनते त्यामूळे ते स्थिर होते. स्थिर मनाची शक्ती अवाढव्य असते. ऋषीमूनी, तत्ववेत्ते, शास्त्रज्ञ, साहित्यिक इत्यादींनी शाश्वत सत्ये शोधली, महाकाव्ये लिहीली ती निसर्गाच्या सानिध्यात राहूनच. ह्या मंडळींचे मानव जातीवर अनंत उपकार आहेत.
आपल्या विज्ञान निबंधात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तर निसर्गाला देवाची उमपा दिली आहे. गायित्री उपासक स. कृ. देवधर म्हणतात, "उपजे तें नाशे हे विश्वाचे जीवनसूत्र असले तरी अविनाशी अवस्थेशी एकरूपता साधण्यामध्ये मानवी जीवनाचा खरा परमोच्च बिंदू आहे. निसर्ग हा प्राणीमात्रांचा मित्र आहे. मानवाखेरीज इतर पशू पक्षी सर्वस्वी निसर्गाच्या सानिध्यात राहातात त्यामूळे त्यांच्यात निरोगिता अधिक असते. निसर्गाच्या विरूध्द जाऊन मनुष्य जेव्हा जगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे मन दुबळे बनते." शरीर विज्ञानाचेही असेच मत आहे. वस्तूतः निसर्गामध्ये प्राणीजीवन समतोल राखण्याचे उपजत सामर्थ्य आहे. आपणच नाही तिथे आपले नाक खुपसले आहे.
विख्यात विचारवंत बर्टाड रसेलने एका ठिकाणी म्हटले आहे, "मानवाचा मुलभूत विकास झाल्याशिवाय वैज्ञानिक प्रगती त्याच्या पचनी पडणार नाही." आपले महात्मा गांधीजी म्हणत असत की "आपली धरणीमाता आपल्या सर्वांच्या गरजा भागवू शकते पण आपली लालसा नव्हे." आज प्रदुषणाचा भस्मासूर जगाला विळखा घालत असताना दिसतो. हे आपणहून आणलेले आपले मरण होय. अशा वेळी स्वयंसेवी संघटना जे काही कार्य करीत आहेत त्या सार्या एका परिने संजीवनी विद्याच आहेत. देवाची व्याख्या अनंत आहे, कारण तो चराचरात व्यापलेला आहे. जे चांगले, जे हितकारक, जे कल्याणप्रद, ते सारे देव असे आपण म्हणतो. त्या अर्थाने ' जीवदानाची ' ही संजीवनी विद्या सुद्धा चराचरात सामावलेली आहे. भगवंताने गीतेत म्हटले आहे (' ईश्वरः सर्व भूतानां हृदेशेऽर्जन तिष्ठती | ') सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात मी स्थिर असतो. त्या अर्थी जीवदानाच्या विद्या आपल्यातही आहेत. जी व्यक्ती, संस्था, समाज, देश जाणीवपुर्वक ती शोधेल त्यांना हि विद्या गवसणार. शेवटी मानवाने जी प्रगती केली त्यासंबंधीचा इतिहास आपल्याला ह्या पेक्षा वेगळे काही सांगत नाही. जे काही विज्ञानाने शोधले ते ह्या विश्वातीलच ना ! पण बर्टाड रसेल ह्यांनी दिलेला धोक्याचा इशारावर आपण दुर्लक्ष केले. आपण निसर्गाला ओरबाडले. Global Warming ची चर्चा सुरू झाली आहे खरी पण चंगळवाद, ऐशबाजी, शस्त्रात्रे आणि साम्राज्यवादाची भूक शमलेली दिसतेय कुठे? त्यामूळे जीवदाना संबंधीच्या नाना तर्हेच्या विद्यांचा प्रसार करण्यासाठी स्वयंसेवी संघटना आज पुढे येत आहेत. ही एक केवळ समाधानाची बाब नसून ती आजच्या युगातील मानवाकडे असलेली सर्वात महत्वाची शक्ती आहे असे मला वाटते.
स्वयंसेवी संघटनामुळेच आजच्या युगात विभिन्न संजीवनी विद्यांची आपल्याला ओळख होऊ लागली, आणि ती केवळ वृक्षरोपणापुरता सिमीत नाही. शिक्षणाचा प्रसार सर्वत्र झाला आहे; सर्वत्र संशोधन, तत्रंज्ञानात अपूर्व क्रान्ती होत असलेली आपण पाहातो. पण जोडीला महासंहारक शस्त्रेही तयार होत आहेत. मुल्याधिष्ठीत शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. मानव म्हणजे पशूत्व आणि देवत्व ह्यामधील जीवप्राणी आहे. आपल्या ठायी केवळ पाशवी शक्तीच विराजमान आहेत असे नाही. दैवी शक्ती ही आपल्यापाशी आहेत. त्याचेंच प्रगट रूप म्हणजे संजीवनी विद्या. त्यातील वृक्षरोपणासंबंधी आपण चर्चा वरती केली आहे. ते कार्य महान आहे तरी लेखाच्या विस्तार भिती मूळे आपण थोडक्यात चर्चा मांडली आहे. आता आणखिन काही संजीवनी विद्यांची थोडक्यात ओळख करून घेऊ या. थोडक्यात अशासाठी म्हणतो, की ह्या संजीवनी विद्यांचा आवाका इतका मोठा आहे की ह्यातील प्रत्येक विद्येवर पुस्तक होऊ शकते. त्यातही विज्ञानामूळे एक नवीन सुविधा येते ती सोबत एका असूविधेला घेऊन येते. त्या असुविधेतून सूटका करून घेण्यासाठी नवी संजीवनी विद्या शोधावी लागते आणि उपलब्ध ही होणार. कारण आजही ह्या जगात सज्जन शक्ती कार्यरत आहे. अतः संजीवनी विद्यावर आपली चर्चा अधून मधून होत राहणार असेच दिसते.
विख्यात विचारवंत बर्टाड रसेलने एका ठिकाणी म्हटले आहे, "मानवाचा मुलभूत विकास झाल्याशिवाय वैज्ञानिक प्रगती त्याच्या पचनी पडणार नाही." आपले महात्मा गांधीजी म्हणत असत की "आपली धरणीमाता आपल्या सर्वांच्या गरजा भागवू शकते पण आपली लालसा नव्हे." आज प्रदुषणाचा भस्मासूर जगाला विळखा घालत असताना दिसतो. हे आपणहून आणलेले आपले मरण होय. अशा वेळी स्वयंसेवी संघटना जे काही कार्य करीत आहेत त्या सार्या एका परिने संजीवनी विद्याच आहेत. देवाची व्याख्या अनंत आहे, कारण तो चराचरात व्यापलेला आहे. जे चांगले, जे हितकारक, जे कल्याणप्रद, ते सारे देव असे आपण म्हणतो. त्या अर्थाने ' जीवदानाची ' ही संजीवनी विद्या सुद्धा चराचरात सामावलेली आहे. भगवंताने गीतेत म्हटले आहे (' ईश्वरः सर्व भूतानां हृदेशेऽर्जन तिष्ठती | ') सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात मी स्थिर असतो. त्या अर्थी जीवदानाच्या विद्या आपल्यातही आहेत. जी व्यक्ती, संस्था, समाज, देश जाणीवपुर्वक ती शोधेल त्यांना हि विद्या गवसणार. शेवटी मानवाने जी प्रगती केली त्यासंबंधीचा इतिहास आपल्याला ह्या पेक्षा वेगळे काही सांगत नाही. जे काही विज्ञानाने शोधले ते ह्या विश्वातीलच ना ! पण बर्टाड रसेल ह्यांनी दिलेला धोक्याचा इशारावर आपण दुर्लक्ष केले. आपण निसर्गाला ओरबाडले. Global Warming ची चर्चा सुरू झाली आहे खरी पण चंगळवाद, ऐशबाजी, शस्त्रात्रे आणि साम्राज्यवादाची भूक शमलेली दिसतेय कुठे? त्यामूळे जीवदाना संबंधीच्या नाना तर्हेच्या विद्यांचा प्रसार करण्यासाठी स्वयंसेवी संघटना आज पुढे येत आहेत. ही एक केवळ समाधानाची बाब नसून ती आजच्या युगातील मानवाकडे असलेली सर्वात महत्वाची शक्ती आहे असे मला वाटते.
स्वयंसेवी संघटनामुळेच आजच्या युगात विभिन्न संजीवनी विद्यांची आपल्याला ओळख होऊ लागली, आणि ती केवळ वृक्षरोपणापुरता सिमीत नाही. शिक्षणाचा प्रसार सर्वत्र झाला आहे; सर्वत्र संशोधन, तत्रंज्ञानात अपूर्व क्रान्ती होत असलेली आपण पाहातो. पण जोडीला महासंहारक शस्त्रेही तयार होत आहेत. मुल्याधिष्ठीत शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. मानव म्हणजे पशूत्व आणि देवत्व ह्यामधील जीवप्राणी आहे. आपल्या ठायी केवळ पाशवी शक्तीच विराजमान आहेत असे नाही. दैवी शक्ती ही आपल्यापाशी आहेत. त्याचेंच प्रगट रूप म्हणजे संजीवनी विद्या. त्यातील वृक्षरोपणासंबंधी आपण चर्चा वरती केली आहे. ते कार्य महान आहे तरी लेखाच्या विस्तार भिती मूळे आपण थोडक्यात चर्चा मांडली आहे. आता आणखिन काही संजीवनी विद्यांची थोडक्यात ओळख करून घेऊ या. थोडक्यात अशासाठी म्हणतो, की ह्या संजीवनी विद्यांचा आवाका इतका मोठा आहे की ह्यातील प्रत्येक विद्येवर पुस्तक होऊ शकते. त्यातही विज्ञानामूळे एक नवीन सुविधा येते ती सोबत एका असूविधेला घेऊन येते. त्या असुविधेतून सूटका करून घेण्यासाठी नवी संजीवनी विद्या शोधावी लागते आणि उपलब्ध ही होणार. कारण आजही ह्या जगात सज्जन शक्ती कार्यरत आहे. अतः संजीवनी विद्यावर आपली चर्चा अधून मधून होत राहणार असेच दिसते.
अलिकडे स्वयंसेवी संघटनांमार्फत नेत्रदान, अवयव दान, देहदानाची चळवळ हाती घेतली जात आहे त्या चळवळीला प्रतिसाद मिळू लागला आहे. अवयवदानातून एखाद्या रूग्णाचे आयुर्मान वाढते, दृष्टी मिळते ही एक आधूनिक नवसंजीवनी विद्याच आहे. वैद्यकीय क्षेत्रात होणार्या नव्या शोधांचे कौतूक सर्वत्र होत असते आणि व्हावयला हवेच, त्याच वेळी स्वयंसेवी संघटना जीवापाड मेहनत घेऊन ही चळवळ राबवित आहेत त्या संघटना ही एक प्रकारे डाॅक्टरांप्रमाणे आधूनिक शुक्राचार्य आहेत असेच मानणे उचीत ठरते.
आज अनेक स्वयंसेवी संघटना वाचन संस्कृती वाढवित आहेत. कोणी घरोदारी पुस्तके, तर कोणी फिरते वाचनालय, कुठे पुस्तकाचे गाव असे कार्यक्रम राबवितांना दिसतात. कोणी फिरता दवाखाना चालवितात तर कोणी विज्ञान कार्यशाळांचे आयोजन करतात. संजीवनी परिवार संस्था सुध्दा आपल्या स्थापनेपासून विद्यार्थ्यांमध्यें वाचनाची गोडी निर्माण करण्याचे कार्यक्रम राबवित आहे. वाढदिवस, विवाह, सत्कार, निवृत्ती इत्यादी समारोहात पुस्तके भेंट देण्याची मोहीम राबवीत आहे. वाचाल तर वाचाल असे म्हटले जाते ते काही खोटे नाही. 'वाचाल तर वाचाल ' ह्या उक्तीचा सोपा अर्थ साक्षर होणे. आजच्या जगात साक्षर नसणे म्हणजे जीवन जगत असतानाच मृतवत होण्यासारखी स्थिती होय. त्यातही नवीन तंत्रज्ञान शिकणे ही अपरिहार्य आहे. पण त्या तंत्रज्ञानामूळे आपण यांत्रीक तोता बनू नये अशी काळजी ही घ्यावी लागते. वाचण्याची गोडी वाढविणे म्हणजे एक प्रकारे जीवदानच की. क्रिकेट खेळात एखाद्या फलंदाजाचा झेल प्रतिपक्षाच्या खेळाडूने सोडला तर त्याला जीवदान मिळाले असे म्हणतात. पण त्याचबरोबर ज्याने झेल सोडला त्या खेळाडूला मरणप्राय यातना होत असतात. का तर तो ज्या संघाकडून खेळतो, त्या संघाचे लाखो समर्थक नुसती टिका करून थांबत नाहीत तर शिव्यांची लाखोली वाहतात. मग त्याने काय करावे? काही तरी धीर देणारे लेखन वाचावे. काही तरी संगीत ऐकावे. प्रापंचिक जीवनात अनेक दुखाःच्या प्रसंगांना सामोरे जावयास लागते, ज्यामूळे मनुष्य बेजार होतो. निराश होतो. आपण पराभूत झालो आहे, ही भावना सतत मनात घर करून बसते. सोबत ' लोक काय म्हणतील ' हे भूत आपल्या मनगूटीवर बसलेले असते. श्रीमंत व सर्व प्रकारच्या आधूनिक सुखसोयीने जगणार्यानांही नैराश्य येत असतेच की. उलट त्यांना तर जीवनच नकोसे होते अशी स्थिती निर्माण होते. आज उच्चभ्रू वस्तीतही आत्महत्येचे प्रमाण वाढत असलेले दिसते. एखाद्या कवीला ' जगण्यातही मरण भासते ' अशी कविता सुचू शकेल असे आजच्या कुटुंब व्यवस्थेची स्थिती आहे. नैराश्याच्या गर्तेत आपण जाणार असे भासताच आपल्याला आवडणारे पुस्तक वाचावयास घेतले की सारा तणाव दूर होतो. अनेक पुस्तके असतात ज्यातून आपली पराभूत वृत्तीतून सुटका होत असते. म्हणजे एक प्रकारे जीवदान नव्हे काय ? ही चर्चा फक्त क्रिकेट खेळातल्या झेल सोडणार्या खेळाडूच्या मनस्थिती पुरता मर्यादित नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती असे आपण म्हणतो, त्याच आधारे ' व्यक्ती तितकी साहित्याची रूची ' असे मानावयास हरकत नाही. साहित्याचे प्रकार अनेक आहेत ; त्यात साहित्यीकांची शैली वेगळी ; ज्याला जे आवडेल ते वाचावयास मिळते. म्हणजेच आनंद मिळतो. ' मन करा रे प्रसन्न सर्व सिध्दि कारण' असे तुकाराम महाराजाने म्हटले आहे. तुकाराम महाराजांची ही उक्ती अभंग नावाच्या साहित्य प्रकारातच मोडते. आनंदी मन म्हणजे निरोगी शरीर हे तर सर्वश्रूत सुत्र आहे. कारण आयुर्वेद असो वा ॲलोपथी, होमीयोपोथी वा नेचर क्युअर, सर्वांनी मांडलेले ते तत्व होय. कधी कधी मला वाटते की वाचन ही एक फक्त शारिरीक क्रिया नाही. वाचन सुध्दा एक प्रकारचा योगाभ्यास असावा. वाचणे हे क्रियापद 'वाचा' ह्यावरून झाले असावे का ? मला त्याबाबत ठोस उत्तर देता नाही पण आपल्याला चार प्रकारच्या वाचा (वाणी) आहेत असे वेदमूर्ती स कृ देवधरांनी त्यांच्या गायत्री उपासना नावाच्या पुस्तकात म्हटले आहे. जी जिभेच्या आघातातून उत्पन्न होते ती वैश्वरी; मध्यमा ही कंठात असते; पश्यन्ति हृदयाजवळ असते आणि परा ही अतिशय सुक्ष्म असते. वरील तिन्ही वाण्यांचे उत्पत्तीस्थान नाभी मध्ये असते. आपण जेव्हा वाचतो, म्हणजे एक प्रकारे आपण बोलत असतो. आपला मेंदू तात्काळ आपल्या कानांना आपले बोलणे ऐकावयाची आज्ञा देत असावा. एक अर्थी आपण बोलतो तेव्हा प्रथम आपणच ऐकत असतो. त्यामूळे आपल्यात संयम बळावत जातो. सततच्या वाचनाने उच्च पातळीवरचा संयम आपल्या अंगी बळावतो. त्यामूळे आपण दुसर्यांचे विचार शांतपणे ऐकून घेतो. त्यातून आपला विचार प्रगल्भ होतो. विचार प्रगल्भ झाला की विवेक सुचतो. विवेकांतून सन्मार्ग दिसतो. सन्मार्गावर होणारे कर्म सत्कृत्यच ठरते. त्यातून मिळालेले यश व समाधान हाच तो मोक्ष असावा.
अलीकडच्या काळात पुस्तके वाचणे हा फक्त कला शाखेतील विद्यार्थ्यांचा व प्राध्यापक वा प्रवचनकारांचा प्रांत आहे अशी खूळी समजूत रूढ झाली. साहित्य ही कलाकृती आहे. मानवाची वैज्ञानिक क्षेत्रातील वाटचाल सुद्धा शब्दात बांधावी लागतेच ना ! विख्यात शास्त्रज्ञ आईनस्टाईन म्हणतात Imaginatio is more important than knowledge. साहित्य हे कल्पनेने व सत्याने भरलेला खजिना आहे. त्याची ओढ लागणे आवश्यकच आहे. कारण ती ही अनादि काळापासून मानवाला तारून ठेवणारी संजीवनी विद्या आहे.
अनेक स्वयंसेवी संघटना दर वर्षी केंद्रिय अर्थसंकल्प झाला की, त्यावर चर्चा, प्रश्नोत्तरे असा कार्यक्रम राबवित असतात. त्या कार्यक्रमासाठी एखाद्या अर्थशास्त्रातील तज्ञाचे सहाय्य घेऊन जनसामान्यांना मार्गदर्शन होत असते. त्या अर्थसंकल्पात जनसामान्यांच्या जीवनावर अनेक दूरगामी परीणाम करणार्या तरतूदी असतात. त्या जनसामान्यांना जर समजल्याच नाहीत, तर त्यांना मिळणारे अर्थ सहाय्य दुसरेच कोणी लाटतील. म्हणजे आर्थिक निरक्षरता एक प्रकारे जीवावरच बेतते की नाही ? दुसरे असे की आपले प्रतिनिधी सरकारमध्ये बसले आहेत ते आपल्यासाठी काय करणार आहेत ते नागरिक म्हणून कळणे आवश्यकच आहे. पण त्यासाठी नागरिकांना अर्थ संकल्पासंबंधी जुजबी ज्ञान असणे गरजेचे आहे आणि ती गरज ही स्वयंसेवी संस्था भागवित असतात. माझ्या ब्लाॅगवर ' आपला अर्थसंकल्प व आपण ' ह्या शिर्षकाचा लेख आहे, त्यात आर्थिक साक्षरतेची कशी नितांत गरज आहे हे मी मांडले आहे. म्हणून ह्यासंबंधी अधिक काही मांडत नाही. संजीवनी परिवार हा कार्यक्रम दरवर्षी न चूकता राबवत आहे.
संजीवनी परिवार मेडीकल चेकअप चे कार्यक्रम आयोजीत करत असते. गरीब रूग्णाला आर्थिक मदत ही पुरविते. ही मोहीम तर प्रत्यक्ष जीव वाचविण्याचीच आहे, ह्यावर अधिक चर्चा करण्याची गरज नाही. दर वर्षी मेडीकल चेकअपचा अस कार्यक्रम घेणे हे सोपे नसते. त्यातही पुष्कळदा मेडीकल चेकअपच्या बाबतीत समाजबांधव हेडसाळपणा करीत असतात. त्यांना नियमित मेडीकल चेकअपच्या कार्यक्रमाची सवय लावणे हे ही संजीवनी विद्येचाच भाग आहेच की.
ज्ञान-विज्ञानाच्या कक्षा विस्तारत आहे. तंत्रज्ञानातील अपूर्व क्रान्तीमूळे जग जवळ आले असे आपण म्हणत असलो तरी मूलतः जग प्रसरण पावत आहे. त्यामूळे मानवी जीवनाच्या कक्षा वाढल्या आहेत. त्यामूळे प्रत्येक क्षेत्रातील तज्ञ मंडळीकडून समाजबांधवाना मार्गदर्शन मिळणे आवश्यक ठरले आहे. जग पुढे जात असेल तर आपला समाज का मागे राहावा. गती हा आजच्या काळातला मंत्र आहे. थाबंला तो संपला म्हणजे जीवन जगताना पदोपदी अडथळे येणार. त्यातून मार्ग काढणे म्हणजे व्याख्यानाचा कार्यक्रम राबविणे होय. अनेक स्वयंसेवी संघटना विशेषतः उन्हाळ्याच्या सुटीत असे कार्यक्रम आखतात. त्यात वक्ता प्रशिक्षण, नेतृत्व प्रशिक्षण, नृत्य, अभिनय, संस्कार, विविध कला, कोरीव कामें, व्यवसाय, लघु उद्योग इत्यादी विषयावर मार्गदर्शन मिळत असते. विद्यार्थ्यांना सूट्टी असते, मग पालकांना ही उसंत मिळते. त्यामूळे विद्यार्थ्यांसोबत पालकही अशा प्रबोधनपर कार्यक्रमांना उपस्थित राहतात. म्हणजे समाज जागरणाचा यज्ञच पार पाडत असतात.
प्राचीन काळातले आपण यज्ञ पाहीले नाहीत. त्या काळातही यज्ञाचे प्रयोजन हवा शुद्धीकरण, प्रजेचे रक्षण व विकाससाठी होतेच. शिवाय ज्ञानाचा प्रसार व दानधर्मही होता. आजच्या काळात व्याख्यानें म्हणजे ज्ञानयज्ञ. त्यातून अनेक संजीवनी विद्याची खैरात होत राहणार आहे. त्यात काळानूसार, वर्षालागी बदल होणार, सोबत वाढ ही होत राहणार आहे. पुष्कळदा अशा छोट्या छोट्या अभियानाचे, जागरणाचे महत्व लक्षात येत नसते कारण अशा स्वयंसेवी संस्था प्रसिद्धीच्या मागे लागत नाहीत. रात्रीच्या प्रशांत समयी दंव पडत असतांना त्यांचा यत्किंचित आवाज कोणाला ऐकू येत नाही परंतु सकाळी उठून पहावें तो त्या दंवाच्या थेंबांनी सर्व फुले प्रफुल्ल आणि विकसित झालेली आढळून येतात. स्वयंसेवी संघटनाचे कार्यही असेच गाजावाजा न होतां अत्यंत शांतपणे होत असते.
आजच्या घडीला सर्वांना ज्ञात असलेले बाबा आमटेंचे आनंदवन, सिंधूताई सकपाळांचे अनाथालय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराचे ग्रामीण भागात असणारे विविध आश्रम, सेवा प्रकल्प, संघ परिवारातील डाॅ. कुकडेंचे हाॅस्पीटल, भटक्या व विमूक्त जातींना स्थैर्य देणारे गिरीश प्रभूणे, व्यसन मूक्ताचा प्रचार करणारे डाॅ अभय बंग, नानाजी देशमूख ह्याचां चित्रकूट मधोल प्रकल्प , स्वाध्याय परिवार, दत्त संप्रदायातील सर्व सद्गुरूचे सेवा प्रकल्प ह्या सार्या संस्था संजीवनी विद्याचे आजची विद्यापीठे आहेत. ह्या विद्यापिठा कडून प्रेरणा घेत गावागावात पावसाचे पाणी अडवून शिवारं तयार करणारी मंडळे, शेती क्षेत्रात नवे प्रयोग करून यशस्वी होणारे शेतकरी, स्वच्छतेचं गाव, स्वावलंबी गाव, असे नावारूपास येणारी मंडळे, ही सारी संजीवनी विद्याचा प्रसार करणारे केंद्र आहेत, शाळा आहेत. उद्योगक्षेत्र, सेवा क्षेत्र, व्यापार क्षेत्र, दळणवळण, खनिजे, अन्न प्रक्रीया, औषधे, खतें, उर्जा, इलेक्ट्रानिक्स, माहीती व तंत्रज्ञान, पाककृती, नृत्य, नाटके, सिनेमा जगत, संगीत, मिडीया, क्रिडा इत्यादी क्षेत्रात अकंलकीत रित्या टिकून राहण्यासाठी आधूनिक संजीवनी विद्यांचे केंद्र (स्वयंसेवी संघटना) असंख्य आहेत. आणि संख्या ही वाढत राहणार. त्यामूळे अधून मधून ह्या विषयावर व्यक्त होत राहणे, परस्पर संवाद साधणे, हे आलेच. त्यातून आपली आंतरिक शक्ती तजेल राहील व संजीवनी विद्यांचा प्रसार करणार्यांचे बळ वाढत राहील. म्हणजे हे विश्व अस्तित्वात आहे तोपर्यंत आधूनिक काळातील संजीवनी विद्याचा अभ्यास आपल्या हाती विविध स्वयंसेवी संघटना देत राहणार. ह्याबद्दल त्यांचे कौतूक करण्यासाठी शब्द अपूरे पडतात. देशमुख आणि कंपनी पब्लिशर्स प्रा लि, पुणे ने प्रकाशित केलेले एक पुस्तक आहे, ज्याचे नाव आहे, वि स खांडेकर विचारधारा, संपादक वि वा शिरवाडकर . त्यातील प्रस्तावनेत ज्ञानपीठ विजेते वि वा शिरवाडकरांनी, ज्ञानपीठ विजेते वि स खांडेकरांच्या प्रस्तावनादी लेखनातील जीवनविषयक विचार काय होता ह्या विषयी जे काही म्हटले आहे, त्यानेच या लेखाची समाप्ती करीत आहे.
" यंत्र हे आजच्या युगात सर्वव्यापी आहे आणि असणार. पण या यंत्रयात्रेत माणसाने आपला आत्मा गमावला. ऐहिक प्रगतीच्या झंझेत नैतिक निष्ठा जर उन्मळून पडल्या, तर ती प्रगती, प्रगती राहणार नाही. अधोगतीकडे म्हणजे सर्वनाशाकडे जाणारा तो राजरस्ता ठरेल. यांत्रिकेमुळे पराक्रम वाढला त्याप्रमाणे सुखसोयी वाढल्या. शारीरिक आणि मानसिक सुखपभोगाच्या जागा शतगुणित झाल्या. अशा परिस्थितीत सर्वसाधारण माणसाचा ' ययाती ' होणे संभवनीय असते. हे माणसाचे ययातीकरण आज देशात आणि जगात मोठ्या प्रमाणावर होत आहे. ही खांडेकरांची खंत आहे. ' सुखाचा शोध ' हे तर माणसाच्या जीवनाचे आद्य उद्दिष्ट आहे. तो शोध घेण्यात , ते मिळविण्यात काहीही गैर नाही. पण हे सुख पावसाच्या पाण्यासारखे निर्मळ, अकलंकित असावे, ते गटारीच्या डबक्यासारखे अस्वच्छ, आंधळी वासना, अत्याचार, निर्दयता, आक्रमक स्वार्थ इत्यादींनी दूषित झालेले नसावे, हे खांडेकरांनी ययाती आणि अन्यत्रही वारंवार सांगितले आहे. मग या काळोखाच्या समुद्राला प्रकाशाचे किनारे कोठेच नसतात का ? असतात. ते असतात म्हणूनच माणसाची जात धरतीवरून अद्याप नष्ट झालेली नाही ; अथवा होणारही नाही. हजारो-लाखो ययाती निर्माण होतात ; पण या ययातीच्या जमावातूनच एखादा कचही निर्माण होतो. शतका-शतकातून निर्माण होणारे हे कचच माणसाचे, मानवी संस्कृतीचे, त्याच्या भौतिक, अध्यात्मिक विकासाचे प्रवर्तक आणि राखणदार असतात."
आज अनेक स्वयंसेवी संघटना वाचन संस्कृती वाढवित आहेत. कोणी घरोदारी पुस्तके, तर कोणी फिरते वाचनालय, कुठे पुस्तकाचे गाव असे कार्यक्रम राबवितांना दिसतात. कोणी फिरता दवाखाना चालवितात तर कोणी विज्ञान कार्यशाळांचे आयोजन करतात. संजीवनी परिवार संस्था सुध्दा आपल्या स्थापनेपासून विद्यार्थ्यांमध्यें वाचनाची गोडी निर्माण करण्याचे कार्यक्रम राबवित आहे. वाढदिवस, विवाह, सत्कार, निवृत्ती इत्यादी समारोहात पुस्तके भेंट देण्याची मोहीम राबवीत आहे. वाचाल तर वाचाल असे म्हटले जाते ते काही खोटे नाही. 'वाचाल तर वाचाल ' ह्या उक्तीचा सोपा अर्थ साक्षर होणे. आजच्या जगात साक्षर नसणे म्हणजे जीवन जगत असतानाच मृतवत होण्यासारखी स्थिती होय. त्यातही नवीन तंत्रज्ञान शिकणे ही अपरिहार्य आहे. पण त्या तंत्रज्ञानामूळे आपण यांत्रीक तोता बनू नये अशी काळजी ही घ्यावी लागते. वाचण्याची गोडी वाढविणे म्हणजे एक प्रकारे जीवदानच की. क्रिकेट खेळात एखाद्या फलंदाजाचा झेल प्रतिपक्षाच्या खेळाडूने सोडला तर त्याला जीवदान मिळाले असे म्हणतात. पण त्याचबरोबर ज्याने झेल सोडला त्या खेळाडूला मरणप्राय यातना होत असतात. का तर तो ज्या संघाकडून खेळतो, त्या संघाचे लाखो समर्थक नुसती टिका करून थांबत नाहीत तर शिव्यांची लाखोली वाहतात. मग त्याने काय करावे? काही तरी धीर देणारे लेखन वाचावे. काही तरी संगीत ऐकावे. प्रापंचिक जीवनात अनेक दुखाःच्या प्रसंगांना सामोरे जावयास लागते, ज्यामूळे मनुष्य बेजार होतो. निराश होतो. आपण पराभूत झालो आहे, ही भावना सतत मनात घर करून बसते. सोबत ' लोक काय म्हणतील ' हे भूत आपल्या मनगूटीवर बसलेले असते. श्रीमंत व सर्व प्रकारच्या आधूनिक सुखसोयीने जगणार्यानांही नैराश्य येत असतेच की. उलट त्यांना तर जीवनच नकोसे होते अशी स्थिती निर्माण होते. आज उच्चभ्रू वस्तीतही आत्महत्येचे प्रमाण वाढत असलेले दिसते. एखाद्या कवीला ' जगण्यातही मरण भासते ' अशी कविता सुचू शकेल असे आजच्या कुटुंब व्यवस्थेची स्थिती आहे. नैराश्याच्या गर्तेत आपण जाणार असे भासताच आपल्याला आवडणारे पुस्तक वाचावयास घेतले की सारा तणाव दूर होतो. अनेक पुस्तके असतात ज्यातून आपली पराभूत वृत्तीतून सुटका होत असते. म्हणजे एक प्रकारे जीवदान नव्हे काय ? ही चर्चा फक्त क्रिकेट खेळातल्या झेल सोडणार्या खेळाडूच्या मनस्थिती पुरता मर्यादित नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती असे आपण म्हणतो, त्याच आधारे ' व्यक्ती तितकी साहित्याची रूची ' असे मानावयास हरकत नाही. साहित्याचे प्रकार अनेक आहेत ; त्यात साहित्यीकांची शैली वेगळी ; ज्याला जे आवडेल ते वाचावयास मिळते. म्हणजेच आनंद मिळतो. ' मन करा रे प्रसन्न सर्व सिध्दि कारण' असे तुकाराम महाराजाने म्हटले आहे. तुकाराम महाराजांची ही उक्ती अभंग नावाच्या साहित्य प्रकारातच मोडते. आनंदी मन म्हणजे निरोगी शरीर हे तर सर्वश्रूत सुत्र आहे. कारण आयुर्वेद असो वा ॲलोपथी, होमीयोपोथी वा नेचर क्युअर, सर्वांनी मांडलेले ते तत्व होय. कधी कधी मला वाटते की वाचन ही एक फक्त शारिरीक क्रिया नाही. वाचन सुध्दा एक प्रकारचा योगाभ्यास असावा. वाचणे हे क्रियापद 'वाचा' ह्यावरून झाले असावे का ? मला त्याबाबत ठोस उत्तर देता नाही पण आपल्याला चार प्रकारच्या वाचा (वाणी) आहेत असे वेदमूर्ती स कृ देवधरांनी त्यांच्या गायत्री उपासना नावाच्या पुस्तकात म्हटले आहे. जी जिभेच्या आघातातून उत्पन्न होते ती वैश्वरी; मध्यमा ही कंठात असते; पश्यन्ति हृदयाजवळ असते आणि परा ही अतिशय सुक्ष्म असते. वरील तिन्ही वाण्यांचे उत्पत्तीस्थान नाभी मध्ये असते. आपण जेव्हा वाचतो, म्हणजे एक प्रकारे आपण बोलत असतो. आपला मेंदू तात्काळ आपल्या कानांना आपले बोलणे ऐकावयाची आज्ञा देत असावा. एक अर्थी आपण बोलतो तेव्हा प्रथम आपणच ऐकत असतो. त्यामूळे आपल्यात संयम बळावत जातो. सततच्या वाचनाने उच्च पातळीवरचा संयम आपल्या अंगी बळावतो. त्यामूळे आपण दुसर्यांचे विचार शांतपणे ऐकून घेतो. त्यातून आपला विचार प्रगल्भ होतो. विचार प्रगल्भ झाला की विवेक सुचतो. विवेकांतून सन्मार्ग दिसतो. सन्मार्गावर होणारे कर्म सत्कृत्यच ठरते. त्यातून मिळालेले यश व समाधान हाच तो मोक्ष असावा.
अलीकडच्या काळात पुस्तके वाचणे हा फक्त कला शाखेतील विद्यार्थ्यांचा व प्राध्यापक वा प्रवचनकारांचा प्रांत आहे अशी खूळी समजूत रूढ झाली. साहित्य ही कलाकृती आहे. मानवाची वैज्ञानिक क्षेत्रातील वाटचाल सुद्धा शब्दात बांधावी लागतेच ना ! विख्यात शास्त्रज्ञ आईनस्टाईन म्हणतात Imaginatio is more important than knowledge. साहित्य हे कल्पनेने व सत्याने भरलेला खजिना आहे. त्याची ओढ लागणे आवश्यकच आहे. कारण ती ही अनादि काळापासून मानवाला तारून ठेवणारी संजीवनी विद्या आहे.
अनेक स्वयंसेवी संघटना दर वर्षी केंद्रिय अर्थसंकल्प झाला की, त्यावर चर्चा, प्रश्नोत्तरे असा कार्यक्रम राबवित असतात. त्या कार्यक्रमासाठी एखाद्या अर्थशास्त्रातील तज्ञाचे सहाय्य घेऊन जनसामान्यांना मार्गदर्शन होत असते. त्या अर्थसंकल्पात जनसामान्यांच्या जीवनावर अनेक दूरगामी परीणाम करणार्या तरतूदी असतात. त्या जनसामान्यांना जर समजल्याच नाहीत, तर त्यांना मिळणारे अर्थ सहाय्य दुसरेच कोणी लाटतील. म्हणजे आर्थिक निरक्षरता एक प्रकारे जीवावरच बेतते की नाही ? दुसरे असे की आपले प्रतिनिधी सरकारमध्ये बसले आहेत ते आपल्यासाठी काय करणार आहेत ते नागरिक म्हणून कळणे आवश्यकच आहे. पण त्यासाठी नागरिकांना अर्थ संकल्पासंबंधी जुजबी ज्ञान असणे गरजेचे आहे आणि ती गरज ही स्वयंसेवी संस्था भागवित असतात. माझ्या ब्लाॅगवर ' आपला अर्थसंकल्प व आपण ' ह्या शिर्षकाचा लेख आहे, त्यात आर्थिक साक्षरतेची कशी नितांत गरज आहे हे मी मांडले आहे. म्हणून ह्यासंबंधी अधिक काही मांडत नाही. संजीवनी परिवार हा कार्यक्रम दरवर्षी न चूकता राबवत आहे.
संजीवनी परिवार मेडीकल चेकअप चे कार्यक्रम आयोजीत करत असते. गरीब रूग्णाला आर्थिक मदत ही पुरविते. ही मोहीम तर प्रत्यक्ष जीव वाचविण्याचीच आहे, ह्यावर अधिक चर्चा करण्याची गरज नाही. दर वर्षी मेडीकल चेकअपचा अस कार्यक्रम घेणे हे सोपे नसते. त्यातही पुष्कळदा मेडीकल चेकअपच्या बाबतीत समाजबांधव हेडसाळपणा करीत असतात. त्यांना नियमित मेडीकल चेकअपच्या कार्यक्रमाची सवय लावणे हे ही संजीवनी विद्येचाच भाग आहेच की.
ज्ञान-विज्ञानाच्या कक्षा विस्तारत आहे. तंत्रज्ञानातील अपूर्व क्रान्तीमूळे जग जवळ आले असे आपण म्हणत असलो तरी मूलतः जग प्रसरण पावत आहे. त्यामूळे मानवी जीवनाच्या कक्षा वाढल्या आहेत. त्यामूळे प्रत्येक क्षेत्रातील तज्ञ मंडळीकडून समाजबांधवाना मार्गदर्शन मिळणे आवश्यक ठरले आहे. जग पुढे जात असेल तर आपला समाज का मागे राहावा. गती हा आजच्या काळातला मंत्र आहे. थाबंला तो संपला म्हणजे जीवन जगताना पदोपदी अडथळे येणार. त्यातून मार्ग काढणे म्हणजे व्याख्यानाचा कार्यक्रम राबविणे होय. अनेक स्वयंसेवी संघटना विशेषतः उन्हाळ्याच्या सुटीत असे कार्यक्रम आखतात. त्यात वक्ता प्रशिक्षण, नेतृत्व प्रशिक्षण, नृत्य, अभिनय, संस्कार, विविध कला, कोरीव कामें, व्यवसाय, लघु उद्योग इत्यादी विषयावर मार्गदर्शन मिळत असते. विद्यार्थ्यांना सूट्टी असते, मग पालकांना ही उसंत मिळते. त्यामूळे विद्यार्थ्यांसोबत पालकही अशा प्रबोधनपर कार्यक्रमांना उपस्थित राहतात. म्हणजे समाज जागरणाचा यज्ञच पार पाडत असतात.
प्राचीन काळातले आपण यज्ञ पाहीले नाहीत. त्या काळातही यज्ञाचे प्रयोजन हवा शुद्धीकरण, प्रजेचे रक्षण व विकाससाठी होतेच. शिवाय ज्ञानाचा प्रसार व दानधर्मही होता. आजच्या काळात व्याख्यानें म्हणजे ज्ञानयज्ञ. त्यातून अनेक संजीवनी विद्याची खैरात होत राहणार आहे. त्यात काळानूसार, वर्षालागी बदल होणार, सोबत वाढ ही होत राहणार आहे. पुष्कळदा अशा छोट्या छोट्या अभियानाचे, जागरणाचे महत्व लक्षात येत नसते कारण अशा स्वयंसेवी संस्था प्रसिद्धीच्या मागे लागत नाहीत. रात्रीच्या प्रशांत समयी दंव पडत असतांना त्यांचा यत्किंचित आवाज कोणाला ऐकू येत नाही परंतु सकाळी उठून पहावें तो त्या दंवाच्या थेंबांनी सर्व फुले प्रफुल्ल आणि विकसित झालेली आढळून येतात. स्वयंसेवी संघटनाचे कार्यही असेच गाजावाजा न होतां अत्यंत शांतपणे होत असते.
आजच्या घडीला सर्वांना ज्ञात असलेले बाबा आमटेंचे आनंदवन, सिंधूताई सकपाळांचे अनाथालय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराचे ग्रामीण भागात असणारे विविध आश्रम, सेवा प्रकल्प, संघ परिवारातील डाॅ. कुकडेंचे हाॅस्पीटल, भटक्या व विमूक्त जातींना स्थैर्य देणारे गिरीश प्रभूणे, व्यसन मूक्ताचा प्रचार करणारे डाॅ अभय बंग, नानाजी देशमूख ह्याचां चित्रकूट मधोल प्रकल्प , स्वाध्याय परिवार, दत्त संप्रदायातील सर्व सद्गुरूचे सेवा प्रकल्प ह्या सार्या संस्था संजीवनी विद्याचे आजची विद्यापीठे आहेत. ह्या विद्यापिठा कडून प्रेरणा घेत गावागावात पावसाचे पाणी अडवून शिवारं तयार करणारी मंडळे, शेती क्षेत्रात नवे प्रयोग करून यशस्वी होणारे शेतकरी, स्वच्छतेचं गाव, स्वावलंबी गाव, असे नावारूपास येणारी मंडळे, ही सारी संजीवनी विद्याचा प्रसार करणारे केंद्र आहेत, शाळा आहेत. उद्योगक्षेत्र, सेवा क्षेत्र, व्यापार क्षेत्र, दळणवळण, खनिजे, अन्न प्रक्रीया, औषधे, खतें, उर्जा, इलेक्ट्रानिक्स, माहीती व तंत्रज्ञान, पाककृती, नृत्य, नाटके, सिनेमा जगत, संगीत, मिडीया, क्रिडा इत्यादी क्षेत्रात अकंलकीत रित्या टिकून राहण्यासाठी आधूनिक संजीवनी विद्यांचे केंद्र (स्वयंसेवी संघटना) असंख्य आहेत. आणि संख्या ही वाढत राहणार. त्यामूळे अधून मधून ह्या विषयावर व्यक्त होत राहणे, परस्पर संवाद साधणे, हे आलेच. त्यातून आपली आंतरिक शक्ती तजेल राहील व संजीवनी विद्यांचा प्रसार करणार्यांचे बळ वाढत राहील. म्हणजे हे विश्व अस्तित्वात आहे तोपर्यंत आधूनिक काळातील संजीवनी विद्याचा अभ्यास आपल्या हाती विविध स्वयंसेवी संघटना देत राहणार. ह्याबद्दल त्यांचे कौतूक करण्यासाठी शब्द अपूरे पडतात. देशमुख आणि कंपनी पब्लिशर्स प्रा लि, पुणे ने प्रकाशित केलेले एक पुस्तक आहे, ज्याचे नाव आहे, वि स खांडेकर विचारधारा, संपादक वि वा शिरवाडकर . त्यातील प्रस्तावनेत ज्ञानपीठ विजेते वि वा शिरवाडकरांनी, ज्ञानपीठ विजेते वि स खांडेकरांच्या प्रस्तावनादी लेखनातील जीवनविषयक विचार काय होता ह्या विषयी जे काही म्हटले आहे, त्यानेच या लेखाची समाप्ती करीत आहे.
" यंत्र हे आजच्या युगात सर्वव्यापी आहे आणि असणार. पण या यंत्रयात्रेत माणसाने आपला आत्मा गमावला. ऐहिक प्रगतीच्या झंझेत नैतिक निष्ठा जर उन्मळून पडल्या, तर ती प्रगती, प्रगती राहणार नाही. अधोगतीकडे म्हणजे सर्वनाशाकडे जाणारा तो राजरस्ता ठरेल. यांत्रिकेमुळे पराक्रम वाढला त्याप्रमाणे सुखसोयी वाढल्या. शारीरिक आणि मानसिक सुखपभोगाच्या जागा शतगुणित झाल्या. अशा परिस्थितीत सर्वसाधारण माणसाचा ' ययाती ' होणे संभवनीय असते. हे माणसाचे ययातीकरण आज देशात आणि जगात मोठ्या प्रमाणावर होत आहे. ही खांडेकरांची खंत आहे. ' सुखाचा शोध ' हे तर माणसाच्या जीवनाचे आद्य उद्दिष्ट आहे. तो शोध घेण्यात , ते मिळविण्यात काहीही गैर नाही. पण हे सुख पावसाच्या पाण्यासारखे निर्मळ, अकलंकित असावे, ते गटारीच्या डबक्यासारखे अस्वच्छ, आंधळी वासना, अत्याचार, निर्दयता, आक्रमक स्वार्थ इत्यादींनी दूषित झालेले नसावे, हे खांडेकरांनी ययाती आणि अन्यत्रही वारंवार सांगितले आहे. मग या काळोखाच्या समुद्राला प्रकाशाचे किनारे कोठेच नसतात का ? असतात. ते असतात म्हणूनच माणसाची जात धरतीवरून अद्याप नष्ट झालेली नाही ; अथवा होणारही नाही. हजारो-लाखो ययाती निर्माण होतात ; पण या ययातीच्या जमावातूनच एखादा कचही निर्माण होतो. शतका-शतकातून निर्माण होणारे हे कचच माणसाचे, मानवी संस्कृतीचे, त्याच्या भौतिक, अध्यात्मिक विकासाचे प्रवर्तक आणि राखणदार असतात."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा