मंगळवार, २३ एप्रिल, २०१९

" चौकीदार चोर है " घोषणेचं भूत खल्लास !



राहूल गांधी गेल्या वर्षभरापासून सतत एक वाक्य  म्हणत आले आहेत. ते  म्हणजे " चौकीदार चोर है | "  राफेल विमान खरेदीवरून पंतप्रधान मोदीवर आरोप करताना हे एकच वाक्य काय ते राहूल गांधीना बोलता येते. राफेल व्यवहारासंबंधीची माहिती राहिली दूर,  त्यांनी राफेल विमानांच्या किंमतीबाबत सुद्धा लोकांच्या मनात घोळ घातला. ते सर्वत्र भिन्न किंमती मांडत आले आहेत. त्यामूळे त्यांना राफेल प्रकरणावर एक तास सलग चर्चा करावयास सांगितली, तर त्या चर्चेतही तासभर ते फक्त ' चौकीदार चोर आहे ' इतकेच म्हणत राहतील.  पिंजर्यातल्या पोपटाला जसे एखादे वाक्य म्हणावयास सांगितले तर तो पोपट ते वाक्य सतत बोलू लागतो,  तसाच प्रकार राफेलच्या बाबतीत मोदीवर टिका करताना राहूल गांधीचा झालेला दिसतो. भरपूर मद्य पिऊन तर्रार झालेल्या मद्यपीच्या कानाखाली वाजविली तर त्याची नशा उतरते, तशीच भाजपाच्या नेत्या ॲडव्होकेट मिनाक्षी लेखी ह्यांनी राहूल गांधीच्या विरूद्ध न्यायालयात याचिका दाखल केली आणि राहूल गांधीची नशा उतरली आणि म्हणाले " निवडणूकीतील तापलेल्या वातावरणात मी बोललो, मला माफ करा." पण सुंभ जळाले, तरी पिळ जात नाही असे म्हणतात ते खोटे नाही आणि मद्यपी मद्य घेत पुन्हा नशेत जातोच ना ! राहूल गांधी पुन्हा तेच वाक्य बडबडत आहेत. 

आपण एखाद्या मानसशास्त्रज्ञांकडे जाऊन त्यांना विचारले की,  राहूल गांधी गेले वर्षभर ' चौकीदार चोर आहे ' हे वाक्य सतत का म्हणत आहेत, तर मला वाटतं मी जो वर अंदाज वर्तवला आहे तो खरा ठरू शकेल. मूळात राहूल गांधीना पप्पू अशी उपाधी सोशल मिडीयावर कां मांडली गेली, ह्यासंबंधी खोल विचार केला तर सोशल मिडीयाला दोष देत हा विषय संपणारा नाही. राहूल गांधी राजकारणात आल्यानंतर त्यांची राजकीय जाण बरीच कच्ची असल्याची समाजाची पक्की खात्री झाली त्यातूनच त्यांना पप्पू म्हणून लोक हिणवू लागले. अर्थात सोशल मिडीयावर अशा प्रकारची टिप्पणी एखाद्या नेत्यांविषयीं होणे हे मला  पटत नाही. त्यासंबंधी काहीतरी उपाय शोधावा लागेल, त्यातून आपली लोकशाही प्रगल्भ होऊ शकेल असे माझे प्रांजळ मत आहे. सोशल मिडीयावर पंतप्रधान मोदींवर ' फेकू ' अशी हिणावणी आज ही होत आहे. मोदी पंतप्रधान आहेत म्हणून त्यांना ' फेकू '  हिणवू नये असे मांडण्याचा माझा हेतू आहे असेही समजू नये. तसे पाहता कुठच्याही राजकीय नेत्यावर  खालच्या पातळीवर जाऊन टिका होऊ नये कारण त्यातून जाती-जमातीत विभागलेल्या आपल्या समाजात राजकीय विचारसरणीच्या आणखिन जमाती निर्माण होत आहेत, त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. परंतू राजकीय नेतेच एकमेकांवर टिका करते वेळी खालची पातळी गाठतात त्यामुळे आपल्यासारख्या सामान्य नागरिकांना काय वाटते ह्यावर विचार कोण करणार ? म्हणून ह्यावर इथे अधिक चर्चा करू नको या. मोंदीच्या समर्थकांनाही अंध भक्त म्हणून हिणविले जात आहे. ह्या संबंधी  ' युद्ध मोदी समर्थक आणि विरोधक ह्यांच्यात ' ह्या शिर्षकाच्या लेखात मी एक रोखठोक  सवाल मांडला आहे की, " आज समाजात दृष्टीहीन बांधव अनेक क्षेत्रात प्राविण्य मिळवित असताना  त्या बाधवांचा काही ही अपराध नसताना राजकीय पक्षांच्या आपआपसांतील भांडणात त्यांच्यावर आपण अन्याय का करावा ? "  समाजबांधवांच्या शरीर अवयवासंबंधी हीन भावना व्यक्त होणारे शब्दप्रयोग सर्वच भाषेतून रद्दबादल करावेत अशी सूचना मी केलेली आहे. तसेच अशा शब्दांमूळे भाषेचं सौदर्य खुलते आहे असेही नाही म्हणून ह्या संबंधीत साहित्यिक आणि भाषातज्ञांनी पुढाकार घ्यावा असेही मी सुचविले आहे.  मोदींना फेकू म्हणून हिणवित येत असले तरी फेकू ही उपाधी राजकारणातील कालचे ,आजचे अशा जगभरातील सर्वच पक्षातल्या नेत्यांना लागू पडते.  एका इंग्रजी साहित्यिकने म्हटले आहेच, ' Politician can promise to build a bridge even where there is no river '.थोडेसे विषयातंर झाले, पण निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहचला असताना ह्या संबंधी विचार मांडणे कमप्राप्त ठरते हे आपण मान्य कराल अशी आशा आहे.

राहूल गांधींनी मोदीवर केलेला आरोप गंभीर आहे. न्यायालयात राफेल संबंधीची जी काही याचिका आहे , ती काॅग्रेस पक्षाच्या वतीने दाखल केलेली नाही. भाजपाचे तसेच भाजपा समर्थकांचे मत हेच आहे की,  विरोधी पक्षांनी विशेष करून राहूल गांधीच्यांच पक्षाने न्यायालयात पुराव्यानीशी याचिका दाखल करण्याचा पर्याय अजून स्विकारलेला का नाही ?  सरकारचे म्हणणे असे आहे की ह्या संबंधीची काही माहीती देशाच्या सुरक्षेशी निगडीत असल्यामूळे मांडता येत नाही. आणि न्यायालयाने ह्यासंबंधी खोलवर न जाणे पसंत केलेले आहेच. मग राहूल गांधी  ' चौकीदार चोर आहे '  असे सतत का म्हणत आहेत ? आधुनिक मानसशास्त्रात हिप्टोनिझम नावाची एक पद्धत माझ्या वाचनात आली आहे. त्यातून विचार करता राहूल गांधीवर असे प्रयोग केले गेले आहेत का? राहूल गांधी एक यांत्रीक तोता झाला आहे का? असे प्रश्न माझ्या मनात येतात. त्याचे कारण असे आहे की,  राहूल गांधी तसेच सोनिया गांधी अधून मधून परदेश वारी करतात व त्यासंबंधीची देशवासियांना काहीही माहिती देण्यात येत नाही. आपली राज्यव्यवस्था एक पक्षीय साम्यवादी राजवट नाही वा हुकूमशाही नाही. एक खरीखूरी लोकशाही आहे . म्हणून प्रमूख राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या परदेशवारी संबंधीची माहिती प्रजेला कळायला हवीच ना ! ठीक आहे, नको कळू द्या. पण मी म्हणतोय, ' तोंडावर आपटण्याची वेळ येईपर्यंत दुसर्या पक्षाच्या नेत्यावर आरोप करावेच कशाला ? '  काॅग्रेस पक्षांची धोरण आखण्यार्यांची जी समिती आहे, त्या समितीतील सर्वच नेत्यांच्या बुद्धीची दिवाळखोरी झाली आहे का ? भाजपाच्या प्रचार समितीने ' मै चौकीदार हूँ 'अशी टॅग लाईन काढून काॅग्रेसच्या प्रचाराला चोख उत्तर दिले आहे. मला वाटतं पुढील उरला सुरला  प्रचार ' मै चौकादार हूँ ' ह्या वाक्यानेच व्यापला जाणार आहे.  

भाजपाच्या नेत्या मिनाक्षी लेखींनी कोर्टात राहूल गांधीवर याचिका दाखल केल्यामूळे काॅग्रेस व मित्र पक्ष बॅकफूटवर आले आहेत हे तर मानावेच लागेल. ' चौकीदार चोर है '  हे वाक्य राहूल गांधींनी आता कितीही वापरले तरी  मतदानावर फारसा फरक पडेल असे वाटत नाही. धार नसलेल्या शस्त्रांनी हल्ला करण्याने लढाई जिंकता येत नाही. हा लेख लिहीत असतानाच आता सुप्रीम कोर्टाने न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस राहूल गांधींना दिली असल्याची बातमी प्रसारीत झाली आहे. एकंदरीत हे प्रकरण राहूल गांधीवर शेकणार असे दिसते. 

२०१४ च्या निवडणूकीत मोदींनी १५ लाख रूपये सामान्यजनांच्या बँकेत येतील असे जाहीर केल्याचा जो आरोप विरोधी पक्ष करीत आहेत, ते ही वस्तूस्थितीला धरून नाही. पंधरा लाख रूपये तुमच्या अकाॅऊट मध्ये आले आहेत का ? असा प्रश्न काॅग्रेसचे नेते दिग्विजयसिंग ह्यांनी भोपाळ येथील प्रचार सभेत विचारला आणि एका मतदाराला व्यासपिठावर बोलाविले, त्यावर तो युवक व्यासपिठावर येऊन माईकवर सर्व श्रोत्यांच्या देखत म्हणाला, " मोदींनी सर्जिकल स्ट्राईक करून दशहतवादी उडविले ". ह्यावरूनच काॅग्रेस आणि मित्र पक्षांच्या नेत्यांना मतदार  किती गांभीर्याने घेत आहेत हे टिव्हीवर काल दिसले आहे. गांधी घराण्याच्या निष्ठावंतापैकी तसेच काॅग्रेसची स्ट्रॅटेजी आखण्यात माहीर असलेले, तसेच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्रीपद भुषविलेले दिग्विजयसिंग जिथे तोंडावर आपटले आहेत तिथे काॅग्रेसच्या वतीने प्रचारात उतरलेले, महाराष्ट्रातील जनतेने अडगळीत टाकलेल्या  राज ठाकरेंना मतदार किती गांभीर्याने घेत असतील ह्यांचा अंदाज आपणास सहज मांडता येईल. जी राज ठाकरेंची अवस्था तीच शरद पवारांची, तीच अवस्था तेलगू दसमचे चंद्राबाबू नायडूचीं,  तिच अवस्था केजरी, माया, ममता, आणि अखिलेश इत्यादींची. 

जाती-जमातीची अस्मिता जागी करा, भाषावाद व प्रांतवाद वाढवा, हिंदू आंतकवाद्याचं खोटे भूत उभे करा, अल्पसंख्यांकाच्या मनात भिती उत्पन्न करा,  गुंडाच्या मदतीने मतदारांना धाक दाखवा, पैशाचे प्रलोभन दाखवा, उलट-सुलट विडीओ दाखवा, खोटी-नाटी कात्रणे दाखवा, असे प्रकार विरोधी पक्ष करीत राहणार ह्यात बिलकूल शंका नाही. पण मतदारांना राष्ट्रीय सुरक्षा महत्वाची वाटत असल्यामूळे, उठसुठ सार्वजनिक मालमत्तेची तोड-फोड करणारी, माया-ममता, अखिलेश-लालू, राज ठाकरे-मेवाणी, डावे- हिरवे, शरद-चंद्राबाबू,  इत्यादी मंडळींच्या  पारड्यात मते किती पडू शकतील ह्याबाबत राजकीय निरीक्षक सांशक आहेत.  पुढील चरणाच्या मतदानासाठी होणार्या प्रचारात विरोधकांची उरली सुरली विश्वासहर्ता घसरत जाणार हे स्पष्ट दिसू लागले आहे.

२ टिप्पण्या:

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...