पंतप्रधान मोदींनी वाराणसीत विराट रोड शो करून आपल्या राजकीय शक्तीचे प्रदर्शन केले. राजकारणात अशा प्रकारचे शक्ती प्रदर्शन आजकाल गल्लीबोळातील नेते ही करीत असतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय कार्यक्रम भव्य दिव्य असतात. दोन राष्ट्रांच्या प्रमूखां मधील शिखर परिषदेची मांडणी भव्य-दिव्यच असते. परंतु आज जिथे प्रगल्भ लोकशाही दिसते ते देश आर्थिक, सामरिक दृष्ट्या प्रगत आहेत. तिथे रस्त्यावरून वा रेल्वे स्टेशनवर सैनिक जाताना दिसला तर सारे नागरिक आपल्या जागी स्थिर राहात, त्या सैनिकाला टाळ्या वाजवून मानवंदना देतात आणि सैनिक दृष्टीआड झाला की आपआपली वाट धरतात. तिथे निवडणूकीतला प्रचार हा बहुतांशी ऑनलाईन असतो. तिथे रोड शो इत्यादी प्रकार अस्तगत झालेले दिसतात. तिथे पंतप्रधानपदांना वा राष्ट्राध्यक्षांना ते पायउतार झाले की सरकारी निवास सोडताना आपल्या घरातील सामान ते ही स्वतः खरेदी केलेले असते तेवढेच घेऊन घरातून बाहेर पडावे लागते. ब्रीक्स च्या जनादेशावरून पायउतार झालेले ब्रिटनचे पंतप्रधान आपले सामान खाजगी ट्रकमध्ये भरताना विडीओ द्वारे आपण पाहीले आहे. तेव्हा आपल्या मुखातून शब्द आले, ' असे दृश्य आपणांस कधी पाहावयास मिळेल !' राजेशाहीत ' जसा राजा तशी प्रजा ' तर लोकशाहीत जशी प्रजा तसे सरकार ' हे तत्व आधारभूत असते. त्यामूळे आपल्या राज्यव्यवस्थेत जे दोष आहेत त्याला आपणच सारे जबाबदार आहोत.
Bad politicians are not born, they are ceated
by those who DO NOT VOTE ,
by those who DO VOTE TO MAFIA,
by those who SELECT option of NOTA ,
Bad politicians are not born, they are ceated
by those who DO NOT VOTE ,
by those who DO VOTE TO MAFIA,
by those who SELECT option of NOTA ,
by those who support DYNASTY in
Democratic form of Goverenment
प्रथम समाजातील अभिजन वर्गाने मतदारांमध्ये जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. राजकीय मतभेद सोडून जेव्हा मतदार आपआपल्या नेत्यांकडे राष्ट्रीय दृष्टीकोनातून राजकीय विचार-आचाराचा आग्रह करू लागतील तेव्हा कुठे आपली लोकशाही प्रगल्भ होण्याच्या मार्गा वरून चालू लागेल. अलीकडे निवडणूक आयोगा सोबत मतदार जागृती मंच सारखे एनजीओ मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नातून हळूहळू का होईना निवडणूक प्रक्रीयेत व राज्यव्यवस्थेत सुधारणा होईल. तोपर्यंत आपण आहे त्या स्थितीत समाधान मानणे गरजेचे आहे. कारण संयम आणि सामंजस्य ह्या दोन बाबीवरच लोकशाहीचा डोलारा उभा असतो.
आपल्या देशात स्वातंत्र्यानंतर पहिला रोड शो अर्थातच पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू ह्यांचा झाला. स्वातंत्र्य मिळाल्याचा आंनद साजरा करावयाचा हा एक हेतू होता. त्यामूळे त्या रोड शो वर टिका झाली नाही. पंडीत नेहरूंचा ओपन जीप रूपी रथ उधळत जातो आहे, लोक त्या रथाने उडविलेल्या मातीच्या वादळात पाठीमागे धावत आहेत असे ते दृष्य बघून डाॅ राम मनोहर लोहियांच्या मुखातून शब्द बाहेर आले ते असे आहेत, " ह्याच साठी आपण स्वातंत्र्यासाठी लढा दिला का? " नंतर डाॅ लोहियांनी काँग्रेस पक्ष सोडला, व समाजवादी पक्ष स्थापन केला.
ब्रिटीश सत्तेच्या काळात भारतात येणारे व्हाईसराय, ब्रिटनचे युवराज, भारतसंबंधी खात्याचे प्रमूख, इंग्लडची राणी, इत्यादी मान्यवरांचे भारतात होणारे आगमन हे एक प्रकारचे रोड शोज होते. जगभरात जेव्हा राजेशाही होती त्या काळात राजा-महाराजांचे ही रोड शोज होत असत. त्यामूळे मोदींनी विराट रोड शो केला त्यात जसे आश्चर्य वाटले नाही, तसेच विरोधी पक्षांनी त्या शो वर टिका केली त्यातही आश्चर्य वाटले नाही. तरीही हा लेख लिहावयास वाटला. कारण अजूनही निवडणूकांचं स्वरूप म्हणजे सत्तेचा खेळ हेच आहे. तो कधी संपेल ह्याचे उत्तर मिळत नाही तो पर्यंत ह्या विषयावर अभिव्यक्त व्हावेसे वाटत राहणार. म्हणूनच हा लेख प्रपंच.
पंडीत नेहरू नंतर पंतप्रधान इंदिरा गांधींनी १९७८ साली एका दलीत बांधवावर हल्ला झाला त्यावेळी हत्तीवर बसून रोड शो केला होता. नंतर सार्याच पक्षांच्या नेतेमंडळीचे रोडशोज होऊ लागले व आपल्याला ते पाहण्याची सवय झाली. त्यामूळे पंतप्रधान मोदींचा रोड शो, गंगा आरती, निवडणूकीचा अर्ज भरताना सजवलेला सोहळा, इत्यादी बाबीवर विरोधकांनी विशेष करून काँग्रेस पक्षाने टिका केली असली, तरी त्याबद्दल भाजपा समर्थकांनी प्रती उत्तर देण्याची गरज नव्हती. कारण आज काँग्रेस कमकूवत आहे. विरोधी पक्षांकडे पंतप्रधान मोदींशी टक्कर देऊ शकेल असा नेता नाही. त्यामूळे मोदींच्या रोड शो इतका मोठा रोड शो ते आयोजित कसे करणार? पण असेही वाटते की राष्ट्रीय प्रतिमेचा नेता नाही म्हणून विरोधी पक्षांनी टिका करूच नये का? टिका केली नाही तर त्यांचे समर्थक लढाईसाठी पेटून उठणार कसे ? ह्यावर विचार करता विरोधी पक्षांचे काही चुकले असे मला वाटत नाही. फक्त विरोधी पक्षांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सभ्यतेच्या मर्यादाचे पालन करावयास हवे होते आणि इथेच विरोधी पक्ष गेली पाच वर्षे मार खात आलेले आहेत. मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासून विरोधी पक्षांनी मोदीवर टिका करावयास सुरूवात केली. त्यामूळे झाले असे की मतदारांना विरोधी पक्षाच्या प्रचार मोहीमेत नावीन्य दिसलेच नाही मग त्यांच्या विषयी लोकांना आकर्षण कसे वाटणार? एक गोष्ट विरोधी पक्षांच्या नेत्यांनी नरेंद्र मोदीपासून शिकायला हवी ती म्हणजे त्यांचे समर्पण आणि त्यांचा कामाचा झपाटा. मोदीं मधील हे दोन्ही गुण खरोखरच वाखाण्यासारखे आहेत. पंतप्रधान म्हणून प्रशासकीय कार्य व कूटनिती असो वा भाजपाचे स्टार प्रचारक ह्या नात्याने त्यांची झोकून घेण्याची वृत्ती लाजबाब आहे. ह्यालाच म्हणतात प्रामाणिकपणा व आपल्या जबाबदारी संबंधी जागरूकता. त्यांची राष्ट्रनिष्ठा आणि पक्षनिष्ठा उच्चतम श्रेणीची आहे. आपल्या येथील मनसेचे राज ठाकरे हे पावसळ्यात जसे कुतरमूत उगवते तसे निवडणूकीच्या हंगामात उगवतात. म्हणूनच त्यांना भाडोत्री तत्वावर भाषणे करण्याची आफत आली आहे. राज ठाकरेंनी मोदींवर टिका करण्याऐवजी मोदींची दिनचर्या न्याहाळून स्वतःमध्ये दोष काय आहेत ते शोधावेत. आपल्या कार्यकर्त्यांकडून उठसूठ बसेस फोडल्या, दुकाने फोडले, म्हणजे पक्ष चालविणे नाही हे लक्षात घ्यावे. सरकारवर टिका करताना मी अमकं चालू देणार नाही, तमकं चालू देणार नाही अशा धमक्या देत बसले पण उपयोग काय झाला? २०१४ मधे ह्यांचे मोदीप्रेम ऊतू जात होते. हे काय मतदारांना कळत नाही का? आता काॅग्रेस आघाडी सोबत आहेत मग विधानसेभेच्या निवडणूकीत काय करणार? भारतीय जनता पार्टीने कित्येक वर्षे एकला चलो रे चे धोरण आखत पक्ष वाढविला. पक्ष वाढविण्यासाठी उन्हा-तान्हात कष्ट उपसावे लागतात. आज काॅग्रेस व राष्ट्रवादी सोबत आहेत पण ते विधानसभेसाठी फारशा जागा मनसेच्या पदरात टाकतीलच असे नव्हे. उलट मुंबई महापालिकेच्या अधिक जागा देण्याचे अमिष दाखवतील व तोच करार राज ठाकरेंना स्विकारावा लागेल. कारण काॅग्रेस आघाडीशी नाते तोडले तर मतदारांसमोर राजकडे सांगण्यासाठी काही उरलेले नसणार. मग करीत बसा अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, इत्यादींच्या नकला.
पंतप्रधान मोदींनी नंतर एका प्रचार सभेत आपल्या सरकार संबंधी प्रो इन्कम्बन्सी वेव आहे असे म्हटले. हे कशाचे द्योतक आहे ? विरोधक म्हणतील हा पंतप्रधानाचा अंहकार पण सर्वसामान्य लोकांना काय वाटते ह्याचा विचार विरोधी पक्ष करतात का? निदान भाजपा कार्यकर्ते व समर्थकांना काय वाटते ह्याचा विचार विरोधी पक्ष नेत्यांनी करावयास हवा की नाही? उलट ते आपआपल्या कार्यकर्त्यांना पंतप्रधान मोदींची व समर्थकांचीही टर उडविण्यासाठी प्रोत्साहान देत आहेत. टिका करणे व टर उडविणे ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. टिका करतेवेळी आपला स्वाध्याय होऊ शकतो पण टर उडविण्याची सवय लागली की आपले पतन होत असते. ह्याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे राज ठाकरे.
पंतप्रधान मोदी 'आज प्रो इन्कम्बन्सी वेव आहे ' असे म्हणतात तेव्हा त्यातून त्यांचा आत्मविश्वास प्रगट होत आहे असे वाटते. आपल्याला हे पटत नसले तरी मोंदीच्या वक्तव्याचे विश्लेषण सत्तेच्या शह- प्रतीशह ह्या नियमानुसार केले तर आपल्याला इतक तरी मान्य करावयास लागेल कि मोदींच्या त्या वक्तव्याने विरोधी पक्षांवर मानसिक दबाव आलेला असणारच हे तरी मान्य करावेच लागेल. मागील लेखात उल्लेख केलेला महाकाळ विरोधी पक्षासमोर उभा ठाकला आहे हे ही दिसू लागले आहे. सतत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अर्धी चड्डीवाले, भाजपा व पंतप्रधान मोदीवर खोटारडे, सांप्रादायिक, हिंदु आंतकवादी असे आरोप करीत राहावयाचे. पण आपले पक्ष सरंजमशाही पद्धतीने चालवित राहावयाचे, मग लोकांची पसंती विरोधी पक्षांना कशी मिळणार ? भोगा आपल्या कर्माची फळे ! ह्यापेक्षा अधिक काय बोलावे ?