बुधवार, ६ फेब्रुवारी, २०१९

बंगाल मधील बखेडा



सीबाआयचे अधिकारी बंगालमधील पोलीस महा आयुक्त राजीवकुमारांच्या घरी चिटफंडासबंधीच्या फसवणूक व भ्रष्टाचार झालेल्या केस सदर्भात  तपास करण्यासाठी गेले असता ह्या महाशयानी सीबीआयच्या अधिकार्यांना  कुठलेही सहकार्य न करता उलट त्यांचीच मानहानी केली. ही बातमी  बंगालच्या मुख्यमत्री ममता बॅनर्जींना कळली तेव्हा त्यांनी धरणे धरले ते ही उपोषणाचे अस्त्र घेऊन. कोणा विरूद्ध तर न्यायव्यवस्थेविरूध्द , सीबिआय विरूध्द, व पर्यायने केंद्र सरकार विरूध्द  निषेध नोंदविण्यासाठी. नंतर थोड्याच अवधीत हे पोलीस आयुक्त महाशय  आपल्या सहकारी व कर्मचार्यांसकट ममता बॅनर्जी जिथे उपोषणाला बसल्या होत्या तिथे जाऊन बसले. तृणमूल काॅग्रेसचे नेते, कार्यकर्ते आपल्या नेत्याच्या उपोषणाला समर्थन करण्यासाठी जागोजागी लोकशाही बचाओ, संविधान बचाओ अशा घोषणा देत निदर्शने करू लागले.  मिडीयातून बंगालमध्ये राजकीय पेचप्रंसग उभा राहिल्याची ब्रेकींग न्यूज झळकली. रात्रभर बंगाल व देश जागा राहीला. कोर्टाच्या आदेशानेच सीबायचे तपास पथक  बंगालच्या पोलीस आयुक्त राजीवकुमारांच्या घरी गेले होते. दुसर्या दिवशी सीबीआयने कोर्टात धाव घेतली. कोर्टाने निवाडा दिला. बंगालच्या पोलीस महाआयुक्ताने सीबीआयच्या अधिकार्याना तपास कार्यात सहकार्य करण्याचा आदेश न्यायालयाने श्री राजीवकुमारानां दिला. तसेच बंगालच्या पोलीस आयुक्तांनी संबधित खटल्याचे   पुरावे नष्ट केले आहेत त्यांबंधीची रितसर पुरावे देऊन  फिर्याद नोंदवावी असा आदेशही सीबिआयला दिला आहे. त्यावर भाजपाने आपला विजय साजरा केला तर ममताने तृणमूल काॅग्रेसचा नैतिक विजय मानला, लोकशाहीचा विजय मानला, आणि संविधानाचा विजय मानला. 

देशातील सर्वोच्च तपास यंत्रणा म्हणून मानले जाते त्या  सीबाआयच्या तपास कार्यात दादागिरी करून अडथळे निर्माण करून ममता बॅनर्जीने कोर्टाचाही अवमान केला. ही  दोन्ही कृत्यें प्रथमदर्शनी देशद्रोहाइतकी गुन्हेगारी स्वरूपाची  आहेत. तृणमूल काॅग्रेसच्या सर्वेसर्वा व बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निर्लज्जपणे देश बचाओ, संविधान बचाओ च्या घोषणा देत बसल्या. हे म्हणजे उलटा चोर कोतवालको डाॅटे असाच प्रकार म्हणावयास हवा. ह्या नाट्यमय घटेनेपाठीमागील रहस्य शोधणे अवघड नाही. त्यासाठी ह्या घटनेच्या पाठीमागील मुळ कारण कोणते हे पहावयाचे असल्यास सुप्रिम कोर्टात सुरू असलेल्या त्या खटल्याबाबतचा तपशिल संक्षिप्तपणे मांडावा लागतो.

काही वर्षापूर्वी बंगालमध्ये चिटफंडाच्या नावाखाली अनेक नागरिकांची फसवणूक झाली. मोठाली अमिषे दाखवून ठेवी गोळा केल्या. त्यातून हा फंड गोळा करणार्यांनी मलिदा खाल्ल्याचा तर तृणमूल काॅग्रेसच्या नेत्यांवर फंड गोळा करणार्या टोळीला संरक्षण दिल्याचा आरोप आहे. त्या बदल्यात तृणमूल काॅग्रेसला म्हणजेच पर्यायाने सर्वसर्वा तृणमूल काॅग्रेसच्या अध्यक्षा व मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना प्रचंड अर्थ सहाय्य मिळाले आणि त्याच जोरावर ममता बॅनर्जीनी बंगाल मधील सत्ता काबीज केली आहे.  सुप्रिम कोर्टात जो खटला चालू आहे त्यासंबंधी फिर्याद ही एका मुस्लिम समाज बांधवानी केलेली आहे. हा गुन्हा व खटला मोदी सरकार केंद्रात आरूढ होण्यापुर्वीचा आहे. असे असूनही भाजपा आणि पंतप्रधान मोदींच्या विरोधात ममता बॅनर्जी का आक्रोश करीत आहेत ह्या पाठीमागचे राजकारण पाहू या. 

नुकताच ' आपण व आपला अर्थसंकल्प ' ह्या लेखात केंद्रात भाजपा सरकार आरूढ झाल्यानंतर सर्व विरोधी पक्षांचे महागठबंधन होऊ घातले आहे त्यासंबंधी लोकशाही सदृढ होण्यास मदत होईल अशी आशा मी व्यक्त केलेली आहे. पण ती आशा फलद्रूप होण्याची शक्यता दुरवरची आहे.  ममता बॅनर्जी व  भाजपेतर पक्षांच्या नेत्यांची भ्रष्टाचारांची अनेक प्रकरणे वेगवेगळ्या न्यायालयात दाखल झालेली आहेत. त्या संबंधित सीबीआय तर्फे हालचालींना वेग येऊ लागला असल्यामूळे सर्व पक्ष भाजपावर व  विशेषकरून पंतप्रधान मोदीवर जोरदार टिका करीत आहेत. मोदी सरकार आरूढ झाल्यापासून असहिष्णूता वाढली आहे,  मोदींनी सर्व स्वायस्थ संस्था खलास केल्याचा सपाटा चालविला आहे, पंतप्रधान मोदी हुकूमशहा आहेत इत्यादी प्रकारची टिका करणारे  नेते कलावंत, राजकीय अभ्यासक, विचारवंत, पावसाळ्यातील कुतर छपरासारखे भारताच्या गल्लोगल्लीत वाढत का आहेत ह्याचे उत्तर वरील घटनेवरून लक्षात आले आहे. विरोधी पक्षांच्या महागठबंधनात फार मोठ्या अडचणी आहेत. ममता बॅनर्जींना स्वतःहाचे महत्त्व वाढवायाचे आहे. धरणे धरण्याचे नाटक ह्या हेतूने केले होते की केंद्र सरकारला संविधानाच्या ३५६ कलमान्वये बंगालमध्ये राष्टपती राजवट आणण्या पलिकडे पर्याय ठेवायचा नव्हता. परंतु पंतप्रधान मोदी कुठलीही कृती राजकीय हिशोब लक्षात ठेवूनच करतात. ममता बॅनर्जीचे सरकार बरखास्त करून उगीचच ममतांना हुतात्माचा दर्जा मोदीजी का व कसा देणार? काॅग्रेसलाही पंतप्रधान मोदींनी ह्या प्रकरणात सबूरीचे धोरण ठेवले ह्याचा मनोमन आनंद वाटला असणारच. आणखिन दोन नेते पंतप्रधानपदाचे बांशिग बांधून तयार असलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा श्री  शरद पवार,  तेलगू दसमचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू, व बसपाच्या मायावती ह्यांनाही आनंद झाला असणारच.  ह्या नेत्यांची तळी उतरणार्या राजकीय अभ्यासक, मिडीयातील संपादक मंडळींना ही आनंद झाला असणार. मोदी विरूद्धची लाॅबी संघटीत असू शकत नाही कारण मोदींचा द्वेष करणार्या मिडीयावाल्यांचे राजकीय व आर्थिक हितसंबंध भिन्न आहेत. मुलतः विरोधी पक्षांचे बहूतांश नेते भ्रष्ट आहेतच, सोबत हुकूमशाही प्रवृत्तीचे आहेत हे एव्हांना भारतीय जनतेला समजले आहे.  सोशल मिडीयावर हातात गन घेऊन मोदी विरूद्ध ममता असे व्हायरल झालेले चित्र ही पाहावयास मिळाले. सोशल मिडीया सुद्धा भाजपा, संघ, मोदी ह्यांचे समर्थक व संघपरिवार विरूद्ध भाजपेतर काही पक्ष अशी विभागणी झालेली दिसते. गंमतीचा भाग असा आहे कि सोशल मिडीयावर मोदी विरूद्धची बहुतांश मंडळी घराणेशाही व हुकूमशाही पक्षांच्या नेत्यांची भाट मंडळी आहे. त्यांना मोदी हुकूमशहा वाटणे स्वाभाविक आहे. पण आपण काय करतोय ह्याचे भानच विरोधी पक्षांची समर्थक मंडळी जी मिडीयात, चित्रपट- जगतात, साहित्य-जगतात, धार्मिक क्षेत्रात वावरत आहे, तिला राहिले नसावे . कारण भाजपेतर पक्षांचे नेतेच सैरभैर होताना दिसत आहेत. ममता बॅनर्जींचे धरणे व सीबीआयच्या अधिकार्याचा व सुप्रीम कोर्टाचा अवमान करणार्या घटना पाहता आपण कुठला निष्कर्ष काढू शकतो ? थोड्या दिवसात डाव्या  पक्षांकडूनही  आगतिकपणा झालेला पाहायला मिळेल. काॅग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधीचा ह्या बाबतीत क्रमांक पहीला आहे. सपा, बसपाचे नेते  ह्यांची जडण-घडणच आगतिकतेत झाली आहे. तेलगू दसमचे चंद्राबाबू नायडूचांही तोल जाऊ शकतो. राष्ट्रवादी काॅग्रेसकडे अतिरेकी माथ्याचा जितेंद्र आव्हाड आहेच की. काॅग्रेसमध्ये मणीशंकर अय्यर, दिग्विजय सिंह ही आगळीक करू शकणारी जोडी आहेच.  

एकंदरीत देशाची सद्य राजकीय स्थिती बीबीसीचे भारतिय राजकारणाचा अभ्यास असलेले जेष्ठ पत्रकार मार्क टूली ह्यांनी भाकीत केल्याप्रमाणे झालेले दिसत आहे.  विरोधी पक्ष मोदींच्या वाटेत भितीपोटी हर प्रकारचे अडथळे निर्माण करीत आहेत आणि अजुनही करीत राहतील.  पंतप्रधानपदासाठी आतूर असलेले विरोधी पक्षांचे नेते बेडक्या प्रमाणे आपली छाती फुगवित राहणार. कारण  विरोधी पक्षांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामूळे आगामी लोकसभेच्या निवडणूक प्रचार भडकाऊ भाषणांनी ओतप्रत भरलेला दिसणार हे स्पष्ट झाले आहे. विरोधी पक्षांनी कितीही आकडतांडव केले तरी  भाजपा सर्वाधिक खासदाराची संख्या असलेला पक्ष पुढील लोकसभेत राहील असे दिसते कारण  ममता बॅनर्जीने केलेला उताविळपणा भाजपाला बंगालमधील जागा वाढविण्यास मदत करील. तामिळनाडू मध्ये एएमडीएमके विरूद्ध ॲन्टीइन्कम्बनसी असली तरी जयललीतेच्या निधनामूळे  त्या  पक्षाला सहानुभूती मिळू शकते. डीएमके पक्षात बंडाळी होऊ शकते. सुपर स्टार रजनीकांतचा राजकीय प्रवेशाने तेथील राजकारणाची भाकीते अनिश्चित केली असली  काॅग्रेसच्या मित्र पक्षाची म्हणजे डीएमकेची स्थिती बळकट होणार नाही असेच दिसते. रजनीकांत असो वा एएमडीएमके ह्यांची भाजपाशी सलगी आहे. केरळ मध्ये शबरीमाला प्रकरणामुळे साम्यवादी हबकलेले दिसतात. कर्नाटकातील विद्यमान सत्ताधारी आघाडीत कधीही स्पोट घडू शकतो . त्यामूळे काही विरोधी पक्षांचे नेते निकाला नंतर टणकन बेडक्याप्रमाणे भाजपाच्या गोटात उड्या मारतील इतके भाकीत बहूतांश लोकांनीही काढलेले असणार.

1 टिप्पणी:

  1. अगदी बरोबर ! या प्रकरणातुन ममतांचच वस्त्रहरण होताना दिसतय, त्याचा मोदिंना फायदा व ममतांना तोटा येत्या निवडणुकी दिसेलच. हे एकदा लक्षात घेतल कि, CBI 1917 पासुन काय करत होत, मुकुल राॕय, हेमंत बिस्वा यांच्यावरील कारवाई सौम्य का झाली, असले प्रश्न गैरलागु ठरतात . शेवटी निवडणुक हि भ्रष्टांबरोबर लढाई आहृ व ती जिंकल्याशिवाय आपल निस्वार्थ देशविमोचक उद्दिष्ट साध्य होणार नाही.

    उत्तर द्याहटवा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...