जम्मु आणि काश्मीर राज्यातील पुलवामा येथे पाक पुरस्कृत दशहतवाद्याच्या आत्मघातकी बाॅम्ब हल्ल्यात केंद्रीय राखीव दलाच्या जवानांच्या दुर्दैवी मृत्युनंतर देशभरात पाकिस्तान बाबत संतापाची लाट उसळली. त्या घटनेला बारा दिवस झाले आणि काल मंगळवारी मध्यरात्री ३ वाजून ५३ मिनिट झाली असता भारतीय हवाई दलाने पाक व्याप्त काश्मिरमधील बालाकोट, येथील दशहतवाद्यांचा अड्ड्यावर १००० किलोग्रॅम वजनाचे बाॅम्ब फेकून तीनशेहून अधिक दशहतवाद्यांना यमसदनी पाठविले. पुलवामा येथे ४४ भारतीय जवानांना भ्याड आत्मघातकी बाॅम्ब हल्ल्यात ठार मारले त्याचा बदला घेऊन भारताने पाकिस्तानला , आंतरराष्ट्रीय कमिन्युटी तसेच मोदी सरकार पाडण्यासाठी पाकिस्तानकडे मदतीची याचना करणार्या हरामखोर मणीशंकर अय्यर सारख्या नेत्यांना इशारा दिला आहे की बस पुरे झाले आता ! भारत आता केवळ जशास तसे उत्तर देऊन थांबणार नाही. पाकिस्तानने लष्कर बळाचा वापर केला तर भारत पाकिस्तानला पाच पटीने प्रत्युत्तर देईल असे सध्याची स्थिती पाहता अंदाज बांधता येतो.
अंदाज हे अंदाजच असतात हे खरे असले तरी युद्धजन्य स्थितीत अंदाज बांधुनच रणनीती ठरवावी लागते. पण ती चौफेर स्वरूपाची ठेवावी लागते. पाकिस्तानची आजची स्थिती जागतिक पातळीवर ना घरका ना घाटका अशी आहे. पुलवामा येथे आपल्या जवांनावर जो भ्याड हल्ला केला गेला तो कागदावर आजच्या घडीला जैश-ए-मोहब्बत दशहतवाद्यांनी केला असेच गृहीत धरले जाते. त्यामुळे आपल्या देशाला पाकिस्तानमधील दशहतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून जितके दशहतवादी मारता येतील ते टप्प्याटप्याने मारण्याची रणनीती अवलंबावी लागणार आहे. पाकिस्तान गेली कित्येक वर्षे भारताविरूद्ध छुपे हल्ले करीत आहे हे जगाला ही कळले आहे. २६/११ च्या मुबंई वर झालेल्या हल्ल्यानंतर तत्कालीन सरकारतर्फे फ्री हॅन्ड मिळेल अशी भारतीय सेनादल आशा बाळगून होते अशी माहिती नुकताच उघड झाली आहे. तत्कालीन मनमोहनसिंग सरकारने अशाच प्रकारचे सडतोड उत्तर त्यावेळी दिले असते, तर पाकिस्तानला जरब बसली असती. दुर्दैवाने मनमोहनसिंग सरकारने ती संधी दवडली. संधी दवडली त्याबद्दलही भारतीय जनतेने काॅग्रेस सरकारला माफ केले. त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील आपल्या कपड्याची इस्त्री सांभाळीत बसले. नंतर कसल्याच प्रकारचे गांभीर्य नसलेले, सर्वच गोष्टी हसण्यावरून नेण्याची घृणास्पद सवय लागलेले गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि सरकारमधील मोठा दरोडेखोर पी चिदंम्बरम ह्या मंत्रीद्वयींनी भगवा आतंकवादाचे काल्पनिक भूत निर्माण करून मालेगाव येथे झालेल्या बाॅम्ब स्पोटात कर्नल पुरोहीत आणि साध्वी प्रज्ञांना गोवण्याचे कारस्थान केले आणि त्यांना जेलमध्ये पाठविले. देशाचा खरा शत्रू कोण ह्याचे निकष युपीए सरकारने जनतेला विश्वासात न घेताच ठरविल्यामुळे युपीए मधील सर्व घटक पक्षांना किंमत चुकावी लागली आहे. परंतु ती पुरेशी आहे की नाही हे सध्याच्या युद्धजन्य स्थितीतील त्यांच्या व्यवहारावर तसेच लोकसभेच्या निवडणूक प्रचाराची पातळी ते कुठल्या स्तरावर ठेवतील ह्यावर अवलंबून असेल.
केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर दशहतवाद्यांच्या हल्ल्याला भारताने आक्टोबर२०१६ ला सर्जिकल स्ट्राईक करून चोख प्रत्युत्तर दिले. सर्जिकल स्ट्राईक सुद्धा दशहतवाद्यांचे कंबरडे मोडण्यापुरता मर्यादित ठेवावा लागला हे आपण जाणत आहात. असे असले तरी सर्जिकल स्ट्राईक असो वा नुकताच पाकमधील दशहतवाद्यांना यमसदनास पाठवून दशहतवाद्यांचे अड्डे उडविण्याचा भारताने केलेला स्ट्राईक ही पाकिस्तान विरूद्ध युद्ध पुकारल्याची सुरवात नाही. अत्यंत गुप्तपणे कुठलीही नागरी वस्तीवासीयांची जीवीतहानी न करता, पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दशहतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. सुमारे ३५० दशहतवाद्यांना यमसदनास पाठवून पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या मृत्युचा बदला भारताने घेतला आहे. पाकिस्तान पुरस्कृत दशहतवादाबद्दल प्रत्येक भारतवासींयाच्या मनात प्रंचड संताप आहे. त्यामुळे भारतीय वायुसेनेने केलेल्या पराक्रमाचा आनंद प्रत्येक नागरिकाला झाला. दशहतवादासंबंधी मोदी सरकारने आखलेले आक्रमक धोरण भारतीय जनतेला भावले आहे ह्याबद्दल कुठलाही संदेह नाही.
भारतीय वायुसेनादलाने पाकव्याप्त काश्मीरच्याही पलीकडे पाकच्या हद्दीत जाऊन केलेल्या कारवाईवर पाकिस्तान प्रत्युत्तर देऊ शकत नाही. कारण भारताची लढाई दशहतवादा विरूद्धची आहे हे जगाने मान्य केले आहे. काल घडलेल्या घटनेमुळे पाकिस्तानची स्थिती Between Deep Sea and Devil (इकडे आड तिकडे विहीर) अशी आहे. केंद्रीय राखीव जवानांवर जैश ए महमंद ह्या दशहतवादी गटाने केलेल्या हल्ल्याला भारतीय वायुसेनाने जे उत्तर दिले आहे त्याबाबत जगभरातील देशांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पाकिस्तानने जर भारताच्या ह्या कारवाईला प्रत्तुतर दिले तर युद्धाची सुरूवात करण्याचा दोष पाकिस्तानवर जाणार आहे. शिवाय पाकिस्तान दशहतवाद्यांना पोसतो आहे हे जगाला ठाऊक असल्यामुळे पाकिस्तानला जागतिक स्तरावरून कडवी टिका सहन करावी लागेल. पाकिस्तानने भारत विरोधी सरळ युद्ध पुकारले तरीही दशहतवाद्यांचा खात्मा केला म्हणून पाकिस्तानने युद्ध पुकारले असा संदेश जगभर जाईल. पाकिस्तान बर्यापैकी एकटा पडलेला आहेच, त्यातून तो देश अधिक एकटा पडण्याची शक्यता आहे .ह्यातुन पंतप्रधान मोदींनी आखलेले परराष्ट्रीय धोरण कमालीचे यशस्वी ठरले आहे हे ही स्पष्ट दिसते. त्यामुळे कोणी मानो वा ना मानो परवा झालेल्या लष्करी कारवाईसंबंधीचे श्रेय पंतप्राधान मोदींनाही जातेच. टिव्ही वरील चर्चेत ह्या दोन दिवसात ज्या माजी सेनाधिकार्यांनी भाग घेतला त्यांनी ही आपल्यावरील शत्रुचा मोठ्या प्रमाणावर हल्ल्याला प्रत्युत्तर सेनादले देत असले तरी निर्णय हा सरकारचा असतो हे स्पष्टपणे मांडले आहे.
आता पुढे काय? पाकिस्तान किती प्रमाणात, कोठे आणि कशी आगळीक करणार ह्यावर आपली पुढील रणनीती अवलंबून आहे. तिन्ही सेनादलाच्या प्रमुखांची पंतप्रधानासोबत बैठक झाली. सर्वपक्षीय बैठक परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज ह्यांच्या अध्यक्षतेत झाली आहे. ह्या दोन्ही बैठकीतील चर्चा स्वाभाविकपणे सामान्यजनांपुढे संपुर्णतया येण्याची शक्यता नाही. पाकिस्तानचा आजपर्यंतचा व्यवहार पाहता त्या देशाचा व्यवहार सुंभेच्या पिळासारखाच राहणार हे सांगावयाची गरज नाही. पाकिस्तान खोटे विडीओज् पाठवित शौर्याचा आणि सभ्यतेचा सदरा घालून मिरविणार. खुले युद्ध खेळण्याची हिंमत नाही पण दशहतवाद्यांना हाताशी धरून हल्ले सुरू ठेवण्याचा प्रयत्न करीत राहील हे नक्की. मग देश म्हणून आपण काय करावे? तिन्ही सेनादले आणि सरकारच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे. कारण युद्धजन्य स्थितीत निर्णय घेण्याचा प्रश्न राजकीय आहे. मग सेनादला सोबत देशाच्या पंतप्रधानांनाही पाठींबा दर्शवयास हवा. तसा पाठींबा पाकिस्तानाशी आतापर्यंत झालेल्या युद्धात भाजपाने विरोधी पक्ष म्हणून सदैव दिलेला आहे. मग काही विरोधी पक्ष पंतप्रधानांचे अभिनंदन करण्यात कंजुषी का दाखवित आहेत? ह्या लेखाची मी इथेच समाप्ती करावयाचे ठरविले होते. पण हा लेख लिहीत असताना विरोधी पक्ष त्यांची बैठक संपवून पुन्हा सवयी प्रमाणे पंतप्रधान मोदी राजकीय फायदा घेत आहे असा आरोप करावयास सुरवात केली आहे. टिव्हीवर विरोधी पक्षांचे प्रवक्ते आणि त्यांनी पोसलेले पत्रकार मंडळी पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षांशी चर्चा करावयास हवी होती असा बाल हट्ट धरावयास सुरवात केली आहे. आपण पाकिस्तानशी युद्ध सुरू केलेले नाही आणि आणिबाणी घोषित केलेली नाही. परराष्ट्र खात्याचे मंत्री आणि गृहमंत्र्याच्या उपस्थितीत बैठक होऊन ही विरोधी पक्षांचे समाधान का होत नाही हे कळत नाही. सोशल मिडीयावर विरोधी पक्षांचे चेले पुलवामा मध्ये शहीद झालेल्या जवानांसंबंधी श्रद्धांजली अर्पण करण्याऐवजी पंतप्रधान मोदीची छाती किती इंच आहे हे मोजण्यात गुंतले. माझा अंदाज असा आहे की नोटाबंदीमुळे ज्यांच्याकडे असलेला काळा पैसा कागदासमान ठरला अशी मंडळी माथेफिरू सारखी वागत असलेली दिसतात. युद्धजन्य स्थिती आहे ह्याचे भान विरोधी पक्षांचे नेतेच ठेवत नाहीत तर त्यांचे चेलेमंडळी तरी कसे भान ठेवतील? टाईम्स नाॅऊ ह्या चॅनेलवर आता सुरू असलेल्या चर्चेत सेनादलाचे निवृत्त प्रमुख जनरल मलिकांनी विरोधी पक्षांच्या अशा पद्धतीच्या वर्तनावर नाराजी व्यक्त करीत असताना म्हटले की पाक पुरस्कृत मुंबई वरील २६/११ हल्ल्याच्या वेळी तेव्हाचे विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाच्या पाठीशी पुर्णपणे उभे होते असा दाखला दिला. आता सर्वच चॅनेलवर विरोधी पक्षांचे नेते आणि त्यांची पत्रकार मंडळी टाहो फोडू लागले आहेत. पंतप्रधान म्हणून भारत सरकारच्या वतीने पुलवामा येथील हल्ल्याची निंदा करताना जैश ए मोहब्बत आणि पाकिस्तानला कठोर शब्दात नरेद्र मोदी इशारा देत असतील तर त्यात काय चुकले ? पाकिस्तानात विरोधी पक्षांचे जावई बसले आहेत का?
काॅग्रेस पक्षात मणीशंकर अय्यर सारखे नेते पाकमध्ये जाऊन टिव्हीवरून ' मोदी सरकारको आप हटाओ ' अशी मागणी करण्याचा हट्ट सोडीत नाहीत, राहुल गांधी सारखा नेता डोकलाम येथे चीनची अरेरावी वाढत असताना गुप्तपणे चीनच्या राजदुतांशी भेट घेणे सोडत नाहीत, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख आयएसचे निवृत्त अधिकार्यसोबत दिल्लीत मणीशंकर अय्यरच्या घरी आयोजित केलेल्या बैठकीत जात राहणे सोडणार नाहीत, कन्हैयासारखे साम्यवादी देशके टुकडे करो अशा घोषणा करण्याचे सोडत नाहीत, मेवाणी सारखे जातीय विखार पसरून हिंदू समाजाची विभागणी करण्याचे कृष्णकृत्य सोडत नाहीत आणि अशाच मेवाणीला ख्रिस्ती बांधवांची संस्था आणि चर्च व्यवस्थापन एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे आणण्याचा घाट सोडत नाहीत, ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मगुरू राष्ट्रवाद्यांचा निवडणूकीत पराभव करण्याची पत्रके काढणे थांबवित नाहीत, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल, पश्चीम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू धरणे आणि उपोषणाची नौटंकी सोडत नाहीत, मायावती, अखिलेश, शरद पवार सारखे नेते जातीयवादाला खतपाणी घालण्याचे सोडणार नाहीत तोपर्यंत पाकिस्तानला शहाणपण येणार नाही. पाकिस्तान्यांच्या रक्तात भारतद्वेष भरलेला संपत नाही तो पर्यंत ते दशहतवाद्यांतर्फे भारतात हल्ले करण्याचे सोडेल अशी आशा करता येत नाही. नक्षलवाद्यांच्या बाबतीतही असेच म्हणता येईल. कारण भारतातील साम्यवादी पक्ष नावापुरता भारतीय शब्द लावतात पण धोरणे चीनमधील माओवादी नेत्याकडून घेणे सोडत नाहीत तो पर्यंत नक्षलवाद्यांनाही शहाणपण येईल असे दिसत नाही. आज सारे भारतीय एक होताना दिसत आहेत पण विरोधी पक्षातील नेते त्यांच्या एकीची आणि लोकसभेच्या निवडणूकीतील अस्तीत्वाची चिंता करीत आहेत. ही सारी मंडळी स्वतःभोवती फिरतात आणि इतकी वर्षे त्यांच्याभोवती फिरत मालदार झालेले पत्रकार, संपादक, दलाल, चमचे, मोदींच्या छातीची मोजणी सोडत नाहीत. पंतप्रधान मोदींना श्रेय देण्याचे ही मंडळी टाळत राहणार असतील तर त्यात त्यांचे नुकसान आहे. कारण भारतीय जनता युद्धजन्य स्थितीत सदैव देशहिताला प्राधान्य देत असते. त्यामुळे विरोधी पक्षांच्या भुमिकेमुळे ना मोदीं सरकारला फरक पडणार ना भारतीय सेनादलाला पडणार. कारण दोन्ही संस्थांच्या पाठीमागे करोडो भारतीयांची शक्ती आहे.
म्हात्रेजी,सणसणीत ! सुंभाचा पीळ व कुत्र्याच शेपुट सारखच, मेहबुबा मुफ्ती, सिध्दु,यांचाही समावेष हवा. शिवाय शौरी, दोन्ही सिन्हा व भुषण यांची पोटदुखी व त्यांचा बोलवता धनी ?सगळ आकलनेच्या बाहेरच. समाधान एकच, सामान्य जन या नौटंकीला ओळखुन आहेत अस वाटत. लेख खरोखर पोटतिडिकेतन उतरलाय. धन्यवाद.
उत्तर द्याहटवाबिवलकरजी, धन्यवाद! मेहबुबा मुफ्ती, सिद्धु, मानवतावादी जार्ज, सिताराम येच्युरी अशा मंडळीची नावे घ्यावयास विसरलो पण तुम्ही आठवण करून दिली ते बरे झाले. त्यांचा समाचार पुढील लेखात घेईन.युद्धजन्य स्थितीत घटनाचा वेग वाढतो. रोज नवीन विषय येणार म्हणून फक्त पंधरा मिनिटात हा लेख लिहीला. तातडीने पब्लीश करणेही गरजेचे होते. पुन्हा एकदा धन्यवाद!
उत्तर द्याहटवा