बुधवार, १९ एप्रिल, २०१७

मौल्यवान शिक्षण कोणतं?


आपले शिक्षण पूर्ण होते, आणि आपण जस जसे नोकरी -धंद्यात स्थिरावत जातो, तेव्हा आपल्याला एक स्पष्ट जाणीव होऊ लागते कि, आपलं शिक्षण अपुरं आहे. अनुभव हाच खरा गुरू हे पटू लागते. अनुभवाने आपण शहाणे होत जातो and I think that is ever lasting learning process. अर्थ हाच कि जीवनाच्या शाळेत आपण कायमचेच विद्यार्थी असतो. त्यामुळे सतत शिकत रहावे लागते, आणि त्या शिवाय पर्याय नाही. कारण The moment you stop learning, you become obsolete. असं कोणीतरी म्हटल्याचं आठवलं. विद्यार्थी दशेत आपण असतो, तेव्हा एक ठराविक अभ्यासक्रम असतो. तो आपल्याला शिकवला जातो आणि मग परीक्षा होते. पंरतु नोकरी-धंद्यात शिरतो, तेव्हा लक्षांत येते कि, जीवनाच्या शाळेत पावलो-पावली परीक्षा असते. त्यातून अभ्यासक्रमाची ओळख होत जाते. हा अभ्यासक्रम दिवसेंदिवस वाढत जातो. तो विविधांगी होत जातो. आता मी या घटकेला हा लेख लिहीत बसलो आहे, बघा, माझी येथेच चूक झाली. अगदी अचूक सांगायचं तर मी हा लेख सेलफोनवरील सॅमसंग नोट्सवर "टाईप" करीत आहे. मला ही ठाऊक नव्हते कि मी कधीकाळी अशाप्रकारची लिखाणाची पद्धत आत्मसात करीन. शेवटी काय, कालय तस्मै नमः| याहून अधिक काय  ?

कुंतल देशावर कुशलसेन नावाचा राजा राज्य करीत होता. एकदा दरबारात त्याने प्रश्न विचारला, शिक्षण कशासाठी हवं असतं? शिक्षणाची गरज काय? दरबारातील विद्वानांनी आपआपल्या परिने उत्तरं दिली. एक म्हणाला, शिक्षणामूळे मान मिळतो. "विद्या सर्वत्र पूज्यते |" दुसर्याने सांगितले, विद्येतून रोजगार उपलब्ध होतात. तिसर्याने उत्तर दिले, विद्येतूनच आपल्याला ह्या विश्वातील अनेक रहस्यं समजली. पंरतु राजाचं काही समाधान झाले नाही. मग दरबारातील एक विदूषक उभा राहिला, आणि म्हणाला, महाराज मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देतो, पंरतु माझी अट अशी आहे कि, उत्तर दिल्यानंतर आपण मला शिक्षा करणार नाहीत अशी हमी द्या. राजाने शिक्षा देणार नाही अशी हमी दिली. मग तो विदूषक म्हणाला, महाराज, असले फालतू प्रश्न कोणाच्याही मनात येऊ नये आणि आले तरी ते विचारून लोकांना सतावू नये. ह्यासाठीच शिक्षणाची गरज आहे. राजा निरूत्तर झाला. केवळ निरूत्तरच नव्हे तर जणू काही एखाद्या लढाईत पराभूत होऊन परतल्यावर जसा चेहरा होतो, तसा त्याचा चेहरा झाला होता. जवळजवळ पंधरा मिनिटभर दरबारात स्थब्धता पसरली होती. राजा भानावर आला, आणि लागलीच त्या विदूषकाला जवळ बोलावून शाबासकी दिली. मोठ्या मनाने विदूषकाचा गौरव केला. तेव्हा दरबारातील विद्वानांनी आणि सरदारांनी टाळ्या वाजविल्या. आता प्रश्न असा, कि राजाने विदूषकाचा गौरव करीपर्यंत दरबारातील विद्वान आणि सरदार गप्प का होते? खरं पाहता विदूषकाच्या उत्तराने राजा निरूत्तर झाला, तेव्हाच त्यांनी टाळ्या वाजवयाला हव्या होत्या. परंतु आपल्या राजाला दुखवावयाचं कसं ही भीती. ह्याचा अर्थ राजाची भाटगिरी करण्याची सवय जडली होती आणि तोच त्यांचा धर्म झाला होता. विदूषकाने दिलेल्या उत्तरामूळे "विद्येमूळे भीती नष्ट होते" ह्या शाश्वत सत्यावर शिक्कामोर्तब झाले. काळ बदलत गेला. राजेशाही नष्ट झाली. प्रजेच राज्य आले, तरीही राजापेक्षाही राजनिष्ठ असे विद्वान आजही पहावयास मिळतात. विशेषतः घराणेशाही लादणारे पक्ष जेव्हा सत्तेवर असतात, तेव्हा अशा प्रकारच्या विद्वानांची सारी मती, "आम्ही खरे निष्ठावंत" हे दाखविण्यात खर्ची पडते. असो.

आज शिक्षणाचं महत्व सर्वाना कळलं आहे. ज्ञानाच्या कक्षा दिवसेंदिवस वाढत आहेत. शिक्षणाच्या पारंपारिक शाखा म्हणजे, विज्ञान, कला,आणि वाणिज्य. ह्यांचा अगणित विस्तार झाला आहे आणि भरीस भर, रोज बदलत जाणारे तंत्रज्ञान, खगोलशास्त्र, जीवशास्त्र इत्यादी विषयांसंबंधीची नुसती यादी द्यावयाची म्हटलं तरी घाम येईल. सुदैवाने आज विद्येच्या विस्तारित जाणार्या शाखां संबंधीचं मार्गदर्शन करणार्या संस्था ही उपलब्ध आहेत. शिक्षणाची गरज काय, हा प्रश्न संपलाय. आपल्या पाल्यांनी दहावी वा बारावी नंतर कूठच्या शाखेत प्रवेश घ्यावयास हवा, ह्या प्रश्नाचं उत्तर आपली मूलंच शोधतात. आता मला पडलेला प्रश्न हा आहे कि कूठलं शिक्षण सर्वात मौल्यवान? आपण म्हणाल ,हा काय प्रश्न झाला? कूठलं शिक्षण मौल्यवान हे कसे ठरविणार? विद्येच्या जितक्या म्हणून शाखा आहेत,त्या सर्व मौल्यवान आहेत म्हणून कूठल्याही एका शाखेतील शिक्षण सर्वात मौल्यवान असं मानताच येत नाही. कूशलसेन राजाचा प्रश्न जसा कालबाह्य, तसाच हा प्रश्न ही कालबाह्य आहे. आपलं म्हणणं उचित आहे. पण जरासा विचार केला तर माझ्या प्रश्नाला उत्तर असावं, असे वाटते. आजचा काळ फार गतिमान आहे. रोज विज्ञान बदलत आहे. सर्वच क्षेत्रात जलदगतीने बदल होत आहेत. त्यामुळे आपल्यालाही बदलून घ्यावे लागतेच. ह्या बाबतीत कूणाच दूमत नसावे. आपल्या सार्यांच्या ह्या सहमतीतच, मौल्यवान शिक्षण कोणते,ह्या प्रश्नाचे उत्तर दडलयं. आपण शोध घेण्याचा प्रयत्न करू या.

एकदा एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी जात असताना नायकाच्या गाडीला खोपोली येथे अपघात झाला. शूटिंग कोल्हापुरात होतं. राजवाडाचा सेट निर्माण केला होता आणि त्यासाठी संपूर्ण यूनिट पूर्ण तयारीत होतं. नायकाचा रोल भिकार्याचा होता. बहूतांश चित्रपटात नायक गरीब, दाखविलेला असतो. त्या शिवाय शेवट गोड कसा दाखविता येणार? असो, तर प्रसंग असा होता, कि त्या भिकार्याला राजाकडे कैफियत मांडायला प्रत्यक्ष राजाला भेटायचे होते. तो भिकारी दारू प्यालेला होता. व्यक्ती कोणीही असो, मद्याची कैफ असली कि त्याला कैफियती सूचतात. तो भिकारी नशेत राजमहालात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो आणि राजमहालाचा द्वारपाल प्रत्येक वेळी त्याला अडवितो. त्या झटापटीत तो जखमी होतो. इतक्या भागाचं शूटिंग करावयाचे होते. कोल्हापुरात शूटिंग स्थळी दिग्दर्शकाला नायकाच्या सेक्रेटरीचा फोन येतो आणि अपघाताची माहिती मिळते. चित्रपटातील नायकाच्या पायाला मार लागला आहे आणि चार दिवस खोपोली येथील रूग्णालयात उपचार घ्यावे लागणार आहेत. फोनवरील बोलणं संपलं.  मुंबई येथून संपूर्ण यूनिट पूर्ण तयारीनिशी आलेलं असताना, शूटिंग रद्द करणे परवरडणारं नव्हत. काय करावे ह्या चितेंत असतानाच रस्त्यावरून दोन इसम एकत्र जात होते, ते दिग्दर्शकांनी पाहिले. त्यातील एका इसमाची शरीरयष्टी नायकाच्या शरीरयष्टीशी जूळत होती. दिग्दर्शकाने त्या दोघांना बोलावून घेतले. ज्या इसमाची शरीरयष्टी आपल्या नायकाच्या शरीरयष्टीशी जूळत होती, त्याला भिकार्याचा रोल करण्याविषयी गळ घातली. त्याला प्रसंग समाजावून दिला. तो इसम क्षणार्धात तयार ही झाला. त्याला मेकअप रूममध्ये नेऊन जरूरीप्रमाणे मेकअप करून घेतला. आता प्रत्यक्ष शूटिंग सूरू झालं. भिकार्याची मद्याच्या झिंगेतून द्वारपालाशी हूज्जत सूरू झाली. द्वारपालानी त्याला लोटले. पून्हा ऊठून तो राजमहालात जाण्याचा प्रयत्न करतो, यावेळी द्वारपालाने त्याला जोरात मागे लोटले. तो पून्हा कसाबसा उठत पून्हा हूज्जत घालीत राजमहालात जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा द्वारपालाला प्रचंड राग येतो आणि भिकार्याला लाथ मारून तूडवतो. भिकारी दोन फूटांवर उताणा पडून त्याच्या कपाळातून रक्त वाहू लागले. Scene ओके झाला आणि तो ही retake न करता. यूनिटमधील सर्वांनी जोरजोरात टाळ्या वाजवून त्या भिकार्याचा जयघोष केला. त्याला आपल्या हाताचा आधार देत स्वतः दिग्दर्शकांनी उठविले आणि त्याच्या पाठीवर शाब्बासकी दिली. त्या इसमाचं मेकअप काढून त्याच्या जखमेवर जरूरी मलमपट्टी केली. नायकाच्या गैरहजेरीत शूटिंग पूर्ण झाल्यामूळे संभावित आर्थिक नूकसान टळलं. मनस्ताप टळला. वेळ वाचला आणि त्यातही नायकाची भूमिका करणार्या अनोळखी इसमाने रिटेक न करता शूटिंग पूर्ण केलं. त्यामुळे दिग्दर्शक महाशय फार खुषीत होते. चहापानाच्या वेळी दिग्दर्शक आपल्या सर्व स्टाफ च्या देखत त्या इसमाचं कौतुक करताना म्हणाले, "महाशय, आपण आज जो अभिनय केला,तो आमच्या ह्या सिनेमातील नायकाच्या तोडीचा आहे. त्यामुळे तुमचे आम्हांवर फार उपकार झाले. आहेत. Hats Off To You". दिग्दर्शकांनी त्याला विचारले, "महाशय, आपण या पूर्वी कधी अभिनय केला आहे कां? आपल्याला अभिनयाचा अनुभव आहे कां? तूम्ही फारच सूदंर रित्या अभिनय केला". त्या इसमाने उत्तर दिले, "सर, तसा काही अनुभव नाही. मी शाळा-काॅलेजमधील गॅदरींगमध्येही कधी भाग घेतला नाही". दिग्दर्शकांनी विचारले, " By the way, तूम्ही करता काय?, I mean your profession?" त्याने शांतपणे उत्तर दिले, "मी Lic चा एजंट आहे. आम्ही संयम शिकलो आहोत. आम्हाला दरवाज्यावरून प्रत्यक्ष असे ढकललेले नसले, तरी विम्यासाठी नकारघंटा फार वेळा अनुभवली आहे". दिग्दर्शकांने स्वतः त्या एजंट कडून विम्याची पाॅलीसी घेण्याचे ठोस आश्वासन दिले आणि अधूनमधून सिनेमात छोटे छोटे रोल देईन असं ही सागिंतले.

वरील उदाहरणवरून मौल्यवान शिक्षण कोणते, ह्या प्रश्नाचं उत्तर मिळाले आहे. काय बरं उत्तर असेल?विद्याच्या कोणत्या शाखेतील शिक्षण सर्वात मौल्यवान आहे? Are you still guessing? उत्तर एका साहित्यिकाच्या (बहुधा बेन्जामिन फ्रॅन्क्लीन) मूखातून ऐकू या. "The best valuable of all the education is to make yourself to do a job which u have to do and when it is ought to be done, whether you like it or not". "आपल्याला जेव्हा एखादं काम पार पाडायचं आहे, आणि ते आपल्या हातूनच व्हावे अशी नियतीची इच्छा असेल तर ते काम वा जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण पूर्णपणे त्या कामात झोकून घ्यावे. आपल्याला ते काम वा जबाबदारी आवडो वा ना आवडो, हेच खरे मौल्यवान शिक्षण आहे".

मंडळी, आजच्या काळात आपल्याला आवडणारं काम मिळेलच ह्याची शाश्वती नाही, आणि मिळालं तरी आपण ज्या पध्दतीने ते काम करतो, ती पद्धत बदललेली असू शकते. तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत आहेत. त्या बदलाला सामोरे जाण्यासाठी तयारी करणे आवश्यक होत आहे. क्षेत्र कूठलेही असो, काळाबरोबर चालण्याची वा धावण्याची कला आत्मसात करणे हीच बाब महत्वाची होत आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विख्यात तज्ञ, लेखक, अर्थतज्ञ, आणि सार्या मराठी समाजाला ज्यांचा अभिमान वाटतो असे अष्टपैलू व्यक्तीमत्व अच्युत गोडबोले ह्यांचा कळकळीचा आणि मोलाचा सल्ला आहे "सतत बदला, नाहितर नष्ट व्हा". येत्या काही दशकात आपल्या भोवतालचं जग कसे बदलत जाणार आहे, या विषयी अभ्यासपूर्ण आणि सविस्तर माहिती असलेला लेख सकाळ ह्या दैनिकाच्या संकेतस्थळावर वाचावयास मिळेल - http://beta1.esakal.com/saptarang/achyut-godbole-write-article-saptarang-38009. कृपया तो लेख आपण वाचावा आणि इतरानांही वाचण्यासाठी आग्रह धरावा. त्यातून एका परिने आपल्या हातून थोडसा का होईना डाॅ अच्चुत गोडबोले ह्यांच्या समाज प्रबोधनाच्या कार्याला हातभार लागेल.

मंगळवार, ११ एप्रिल, २०१७

आपली वाणी, आपले यश

आपल्या साधू- सतांनी नेहमी चांगले बोलावे, मृदू बोलावे असा उपदेश केलेला आहे. सांजवेळी देवाला दिवा लावतो त्यावेळी आपण प्रार्थना म्हणतो, त्यात संतांनी दिलेला उपदेश आपण जाणीव पुर्वक गात असतो.

"उपासनेला दृढ चालवावें|भूदेव संतांसी सदा नमावे|
सत्कर्मेयोगें वय घालवावे| सर्वां मूखी मंगल बोलवावे|"

समर्थ रामदास स्वामी म्हणतात,

"कठीण शब्दें वाईट वाटतें| हे तो प्रत्ययास येतें|
तरी मग वाईट बोलावे तें| काय निमित्य|
आपणांस चिमोटा घेतला| तेणे कासावीस जाला
आपणावरून दुसर्यास| राखीत जावें|
जे दुसर्यास दुःख करी| ते अपवित्र बैखरी|
आपणास घात करी| कोणेयेके प्रसंगी|"

आजच्या काळातील प्रथितयश मॅनेजमेंट गुरूही दासबोधाचा आधार घेतात. अशा रामदास स्वामींचा उपदेश जीवनातील प्रत्येक पायरीवर, प्रत्येक क्षेत्रात, त्रिकाल सत्याइतका उपयोगी पडतो. ह्यात नवल ते काय. आपण एका कथेच्या आधारे रामदास स्वामीच्या "आपणास घात करी!कोणेयेके प्रसंगी"या उपदेशाची प्रचिती कोणासं कशी व का येते?ते पाहू या.

एकदा एका राजाला आपल्या हस्तमूद्रिकावरून भविष्य जाणून घ्यावयाची इच्छा झाली. राजदरबारातल्या ज्योतिषीना  बोलाविण्यात आले. ज्योतिषीबूवा आले. राजाच्या बाजूला त्यांच्यासाठी ठेवलेल्या आसनावर बसले. राजाने आपला उजव्या हाताचा तळवा पुढे करीत म्हटले, बूवा सुरवात करा, आपली भविष्यवाणी! ज्योतिषीबूवा राजाचा हात न्याहाळत म्हणाले, "अहाहा!  किती सूदंर हात आहे आपला. आपल्या तळव्यावरील पराक्रमाची रेषा इतकी स्पष्ट आणि अखंडीत आहे कि, आपण युध्दात बलाढ्य राजांनांही पराभूत करणार आहात; अनेक राजे युद्ध न करतांच मांडलिकत्व स्विकारतील; खर्या अर्थाने चक्रवर्ती होण्याचा हा योग आहे". राजा म्हणाला, "व्वा छान! पुढे चला". जोतिषीबूवांनी रेषा पाहात म्हटले, "हातावरील ही विद्या रेषा गडद आहे; देश-विदेशातील विद्वान आपल्या आश्रायास येऊन आपल्या राज्यात विद्यालय सूरू करतील". "आणि ही धनरेषा, हीचं वर्णन शब्दांत करता येत नाही; आपल्या राज्याचा खजिना कधीच रिक्त होणार नाही; आपल्या राज्यात सगळी प्रजा सूखाने आणि शांततेने गुजराण करील". " महाराज, ही आयुष्य रेषा पहा, कूठे खंडित आहे, असे दिसत नाही; आपल्याला दिर्घ आयुष्य लाभणार आहे". पण---ज्योतिषीबूवा पुढे काही बोलणार, इतक्यांत महाराजांनी विचारले, "बूवा काही अपघात आणि शारीरिक इजा दर्शवित आहे कां?". ज्योतिषीबूवा म्हणाले, "तसं काही नाही, परंतु आपल्याला पूत्रशोक दिसतोय." महाराज गरजले, "खामोश! प्रधानजी, ह्या जोतिषीबूवांना नजरकैदेत ठेवा आणि जो पर्यंत दूसर्या ज्योतिषीबूवांकडून भविष्य कथन आम्हांस ऐकैवात येत नाही, तोपर्यंत ह्यांची सूटका नाही". सारा दरबार हबकला. आपण युवराजाला गमावणार; ही कल्पनाच अंत्यत  क्लेश देऊ लागली. राजदरबारातल्या ज्योतिषबुुुवांच्या ज्ञानासंबंधी कुणालाच शंंका नव्हती त्यामुळे सर्वानांच ज्योतिषीबूवांप्रति दया उत्पन्न झाली. परंतु दूसर्या बाजूला आपण युवराज गमावितो, हे दूःख. करावे तरी काय? महाराजांचं  सांत्वनही  करता येत नव्हतं; आणि  ज्योतिषीबुुुवा  प्रती  सहानुभूती दाखविता येत नव्हती. त्यामुळे महाराजांचा आदेश मोठ्या दूःखद अंतःकरणाने पाळावा लागला. ही वार्ता राज्यभर वार्यासारखी पसरली. प्रजाजनांना ही धक्का बसला. लोक आपआपसांत चावडीवर चर्चा करीत होते.आपल्या आदर्श आणि न्यायी राजासमोर काय हा दुःखाचा पहाड  येऊन  ठेपला आहे; अधूनमधून दबक्या आवाजात ज्योतिषी  बुवावर अन्याय होतो, अशी कुजबुज ही होऊ लागली. थोड्या दिवसानंतर 'आपल्या राजाला हातावरील रेषावरून भविष्य कथनासाठी राज्यातील  ज्योतिषींनी दरबारात यावे आणि जो कोणी अचूक शब्दात अचूक भविष्य वर्तवेल, त्याला मोठ्यात मोठं ईनाम देण्यात येईल'. अशी दवंडी राज्यभर फिरविली गेली. एकदा नव्हे, महिन्याभरात चारवेळा फिरवली. परंतु कोणी ज्योतिषी पुढे येण्यास धजेना.

एके दिवशी राजधानी च्या जवळील गावातील एका ज्योतिषीने हे आव्हान स्विकारण्याचे ठरविले. त्याचे आई-वडील, पत्नी,नातेवाईक, मित्रमंडळी गावकरी सर्वानांच धक्का बसला. सर्वच लोक आपआपल्या परीने या ना त्या प्रकारे त्याची समजूत काढीत होते. कोणी म्हणाले, "अरे राजदरबारातील इतका मोठा विद्वान ज्योतिषीबूवा, त्याला तू काय खोटे ठरविणार?" कोणी वेड्यात काढीत त्याला म्हणत होतं, "अरे, तूझ्या त्या वृद्ध आई- वडीलांकडे बघ, ती तूझी पत्नी, कच्चीबच्ची मूलं सोडून, स्वतःहून मरणाच्या दारात कां जातोस? तूझा काय मोठा ज्योतिषशास्त्रावरील अभ्यास?" बायको तर अक्षरशः पाया पडून रडत होती. रडून रडून तिचे डोळे सूजले. पण तो ऐकायला तयारच नव्हता. आई-वडील व पत्नीने देव पाण्यात ठेवले. त्याने आपले ज्योतिषी पोषाख अंगावर चढवला. कपाळावर चदंनाचा मोठा टिक्का लावला, गळ्यात रूद्राक्ष माळ, काखेवर मोठी झोळी, त्यात पंचाग आणि ज्योतिष शास्त्रवरील एक मोठा ग्रंथ टाकून स्वारी राजमहालाकडे निघाली. राजमहालाच्या द्वारापाशी येतांच रखवालदाराने त्याचा तो पेहराव पाहून त्याला ओळखले आणि प्रधानांकडे ज्योतिषिबूवा आल्याची वर्दी दिली. प्रधानाने राजाच्या आज्ञेप्रमाणे दरबार भरविला आणि त्या ज्योतिषिबूवांना दरबारात आणले. राजाच्या शेजारीच त्यांची आसन व्यवस्था केली. राजाने आपला हात पुढे केला आणि ज्योतिष कथनास सुरूवात झाली. "अहाहा! महाराज, किती सुंदर आहे, आपला हात!" एका मागोमाग एक रेषेवरील दिसत असलेले भविष्यकथन पुढे सरकत होते. आतापर्यत ज्या ज्या रेषांसंबंधीचं भविष्य वर्तवले गेले, त्यातील बरेच राजदरबारांतील ज्योतिषीने वर्णिले होते, त्याच्याशी तंतोतंत जूळत होतं. शेवटी त्या बूवांचे भविष्यकथन आयुष्य रेषेवर येऊन ठेपले. दरबारातील सारेजण तसेच दरबाराच्या वरील दालनात बसलेल्या राजमाता आणि राणीमहाराज ह्यांच्या छातीतील धडधड वाढू लागली. ज्योतिषी बूवा म्हणाले, "राजन, आपल्याला दिर्घ आयुष्य लाभलेले आहे आणि ते ही पूर्णतया निरोगी. ही रेषा आणखिन एक मोठं भाग्य दर्शवित आहे". सर्वांनी कान टवकारले. ज्योतिषी म्हणाले, "महाराज, जे भाग्य, अजूनही कोणत्याही राजाच्या वाटेला आले नाही, ते तुम्हाला लाभलयं. ते म्हणजे तूम्ही आपल्या नातवाला स्वतःच्या हाताने राज्याभिषेक करणार आहात". महाराज पाच मिनिटे स्थब्ध झाले. दरबारात  शांतता पसरली. नंतर राजानी म्हटलं," शाब्बास! ज्योतिषीबूवा! हेच ते, अचूक ज्योतिष,अचूक शब्दांत!" असे म्हणत राजाने ज्योतिषिबूवांना चक्क आपल्या मिठीत घेतले.(वाचकांच्या लक्षात आले असावे,कि ह्या ज्योतिषीबूवांनी अत्यंत खूबीने यूवराजाचा अपमृत्यूच्या भाकिताला बगल दिली). टाळ्यांच्या कडकडाट दरबारात घूमला. नंतर राजाने ज्योतिष बूवांना प्रश्न केला, बूवा तूमचा गूरू कोण? ज्योतिषी म्हणाले, "महाराज, क्षमा असावी, मला या क्षेत्रात कोणी गूरू नाही. ज्योतिषशास्त्र मी थोडेफार जाणतो आणि ते ही पूस्तक वाचूनच शिकलो आहे. मला माफ करा. ज्योतिष कथन हा माझा व्यवसाय नव्हे". राजाने चकित होऊन प्रतिप्रश्न केला, "मग तूमचा व्यवसाय कूठला?" बूवांनी ऊत्तर दिले, "महाराज, मी, एक सामान्य वाणी आहे". नंतर राजाने घोषित केलेल्याहून अधिक मोठ बक्षीस देऊन त्या ज्योतिषींचा सत्कार केला. राजाश्रय प्राप्त असलेले ज्योतिषी निर्विवादपणे ज्योतिष विषयात ज्ञानाने आणि अभ्यासाने सर्वश्रेष्ठ होते. या उलट साधारण प्रतीचं ज्ञान असूनही नंतर आलेल्या ज्योतिषीचा राजाकडून गौरव झाला. राजाने दरबारातील ज्योतिषिमहाराजाची सूटका केली आणि नंतर राजेमहाराज आपल्या विद्वान ज्योतिषीला म्हणाले, "सत्यम् बृयात्, प्रियम् बृयात् | न बृयात् सत्यम् अप्रियम्|" नेहमी सत्य बोलावे आणि जे प्रिय आहे तेच सांगावे. सत्य कडू असले, तर ते सांगू नये आणि तसे बोलणे भाग असले तर ते अशारितीने मांडावे कि ते ऐकणार्याला कडवट वाटू नये. त्या वाण्याचे स्वतःच्या वाणीवर पूर्ण नियंत्रण होते. नेहमी मृदू बोलण्याचा जाणिवपूर्वक सराव केला कि, आपोआप आपला स्वभाव मृदू बनतो. ही संतांची शिकवण त्याच्या वाचनात आली होती, ती त्याने आत्मसात केली. त्यामूळे राजाश्रय लाभलेल्या ज्योतिषबुवांची कूठे चूक झाली होती ही बाब त्याला उमगली होती. म्हणूनच त्याने आत्मविश्वासाने राजाचं भविष्य सांगण्याचं आव्हान स्विकारले होते आणि शेवटी तो यशस्वी झाला.

कठोर वागणे किंवा कठोर बोलणे अधिक परिणामकारक ठरते व तसे केल्याने आपल्या मोठेपणाची छाप पडते अशी आपली समजूत असते. तीच मूळी चुकीची असते. अगदी थोडासा विचार आणि प्रयोग केला तर आपल्या ध्यानात येते कि, सतत कठोर बोलण्यापेक्षा मृदु बोलणे अधिक प्रभावकारी ठरते. हे वरील उदाहरण वरुन आपल्या प्रत्ययास आले. म्हणून समर्थ रामदास स्वामी पुढे म्हणतात

"दुसर्याच्यां दुःखे दुखवावे| परसंतोषे सुखी व्हावे|
प्राणीमात्रांस मिळवूनी घ्यावे| बर्या शब्दें|"

मंगळवार, ४ एप्रिल, २०१७

देशभक्ती नारेबाजीत नव्हे,अंतःकरणात हवी


सध्या आपल्या देशात देशभक्ती वरून राजकारण गाजत आहे. आपल्या देशात कूठल्या विषयांवर राजकारण होईल याचा नेम नसतो. कोणी राजकरणात धर्म आणतात तर कोणी धर्मावरून राजकारण करतात. कोणी खेळात राजकरण करतात तर कोणी राजकरणाचा खेळखंडोबा करतात. कोणी शिक्षण क्षेत्रात राजकारण करतात, तर कोणी शिक्षण संस्था काढून राजकारण करतात. मिडीया हा लोकशाहीचा चौथा स्थंभ पण तिथेही Pro Govt and Anti Govt असे चित्र असते. मोठमोठ्या उद्योगसमूहातही राजकारण असते. असे एक ही क्षेत्र नसेल कि जिथे राजकरण दृष्टीस पडत नाही. शिक्षण संस्था, देवस्थाने, स्पोर्टस् क्लब, सहकारी बॅंका, सहकारी साखर कारखाने, विविध सहकारी संस्था या राजकारण नावाच्या अजगराच्या विळख्यात अडकलेल्या आहेत. एकदा का लोकशाही स्विकारली कि तिच्यातील गूणदोषांसकट स्विकारणे क्रमप्राप्त ठरते आणि आपण ती स्विकारली आहे. आपल्या लोकशाहीची वाटचाल ही समाधानकारक सुरू आहे. ह्याचं श्रेय अहिंसेच्या वाटेवरील तसेच क्रांतीच्या मार्गावरील सर्व स्वातंत्र्यसेनानीकडे जाते. अनेक समाजसेवक,स्वयंसेवी संघटना, प्रबोधनकार ह्यांचही मोलाचं योगदान आहे. त्या योगदानातून आपल्याला स्वातंत्र्य आणि महत्वाचे म्हणजे जोडीला एक भक्कम सविंधान मिळाले. संविधानाने प्राप्त झालेल्या सार्वभौमत्वाला टिकवण्यासाठी अहोरात्र कटिबध्द असणार्या सेना व पोलीस दलांच्या बलिदानासही विसरून चालणार नाही.

सध्या बहूचर्चित देशभक्तीच्या विषयासाठी, मी ही प्रस्तावना का मांडली असा प्रश्न पडू शकतो. पंरतु या प्रस्तावनेवरून चर्चेची मांडणी केली कि आपण एका समाधानकारक उत्तरापर्यत पोहचू असे वाटते. स्वातंत्र्योत्तर काळानंतर बहूतांश काळ काॅग्रेसचीच सत्ता देशभर राहीली. त्यातील आणिबाणीचा काळ हा सविंधनावर आणि आपल्या स्वातंत्र्यावर घाला होता. पंरतु आपल्या जनतेने तोही परतवून लावला आणि त्या नंतर पून्हा काॅग्रेसला सत्तेवरही बसविले. हा इतिहास आहे. आणि हा इतिहास मान्य केला तर आपला मतदार सूजाण आणि जागरूक आहे हे ही मान्य करावे लागते. भाजप केंद्रातील सत्तेपाठोपाठ एक एक राज्य काबीज करू लागलाय ही बाब काॅग्रेस तसेच इतर पक्षांना फारसं रूचलेलं दिसत नाही. म्हणूनच वंदे मातरम्, गोहत्या बंदी आणि देशभक्ती सारख्या विषयांवर राजकारण होतय असं प्रथमदर्शनी दिसते. स्वातंत्र्योत्तर काळातील काॅंग्रेसच्या राजवटीविरूद्ध विरोधी पक्षांतर्फे अनेक अंदोलनं छेडली गेली. त्यात भाजप ही सामील होता आणि काही अदोंलने भाजपने स्वतंत्र रित्या छेडली परंतू पाकिस्तान जिदांबाद सारख्या घोषणा (जशा जेएनयू मध्ये झाल्या) कधीही झाल्या नाहीत तसेच पंतप्रधानांवर खालच्या पातळीवर टिकाही झाली नाही. आज आपण काय पाहतोय? अरविंद केजरीवाल, लालूप्रसाद, राहूल गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेष यादव, दिग्विजयसिंह, मणीशंकर ऐय्यर इत्यादी नेते आणि आश्चर्यकारक म्हणजे सत्तेत सामील असलेल्या शिवसेनेचे संजय राऊत आणि पक्षप्रमूख ऊद्धव ठाकरे ही वारंवार पातळी सोडून पंतप्रधान मोदींबाबत गरळ ओकत असतात.

वरील सर्व नेत्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करू या. काॅंग्रेस मग ती सोनिया काॅंग्रेस असो, वा राष्ट्रवादी वा तृणमूल, या पक्षांच्या नेत्यांच्या कूटुंबातील दोन चार अगोदरच्या पिढीतील सदस्याने कधीकाळी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला असल्यामूळे ही सारी मंडळी जन्मजात सत्ताधारी म्हणून जन्मले अशी समजूत करून घेत आहेत. लालूप्रसाद यादव तसेच अखिलेश यादव, मायावती आणि इतर जनता दल सारखे पक्ष सत्तेसाठी काॅग्रेस मधून बाहेर पडलेल्या लोकांनी स्थापन केलेल्या पक्षांचे नेते. त्यांची ही मानसिकता काॅंग्रेसच्या नेतेमंडळी सारखीच. तामीळनाडूतील पक्ष भले प्रादेशिक, ते ही काॅंग्रेस गोतावळीतील. कम्युनिस्ट पक्षांची नाळ रशिया आणि चीनशी जूळलेली. फक्त शिवसेनेचा इतिहास वेगळा आहे. तरीही तिच्या जन्मापासून काही काळ ती काॅंग्रेसधर्जिणी राहिली. वरील पक्षांपैकी कम्युनिस्ट सोडता सर्व पक्षांची नाळ देशाशी जोडली आहे. ह्याचा अर्थ असा नव्हे कि कम्युनिस्ट उपरे आहेत, पंरतु जगातील कामगारांनो एक व्हा असे म्हणत म्हणत ज्या देशांत या पक्षांचा जन्म झाला ते देश सूद्धा इतर देशांनी आपल्या अंकित रहावे असा प्रयत्न करीत साम्राज्यवादी बनले आणि परिस्थितीनुरूप त्यांनी आर्थिक उदारिकरणही स्विकारले. असे असूनही आपल्या येथील कम्युनिस्ट पक्ष कूठच्या काळात वावरतात ते फक्त त्यानांच ठाऊक. पोथीनिष्ठपणा ज्यांच्या अंगात भिनलाय अशा कम्युनिस्ट पक्षांना भाजपचा राष्ट्रवाद भावणारा नसतो. भाजपशी आगळिक करण्यात ही मंडळी सर्वात पुढे असते. जेएनयू, दिल्ली विद्यापीठ वा कर्नाटकातील रोहित इत्यादी प्रकरणांचा अभ्यास केल्यानंतर भारतातील विद्यार्थ्यांचं ब्रेनवाॅश कसे करता येईल हाच त्यांचा अंजेडा राहात आला आहे. प.बंगाल मधून भूईसपाट झाले तरी त्यांना शहाणपण येत नाही. भाजपेतर पक्षांच्या सरकारला कम्युनिस्ट पक्षांनी वेळोवेळी समर्थन दिलेलं आहे आणि तसे करता करता ते मृत्यूशय्येवर येऊन पडले. सांराश हा कि राष्ट्रवाद आणि देशभक्ती ह्या विषयांवरील ह्यांच्या मताला भारतीय मतदार किंमत देत नाही. वरीलपैकी इतर पक्षांचं अल्पसंख्याकांच्या मतपेटी कडे भारी लक्ष. त्यामूळे दशहतवाद्यांना आपल्या सैनिकांनी उडवले तरी अशा घटना मानव आयोगा कडे कसे नेता येईल, या प्रयत्नांत ते आपली शक्ती खर्च करतात. मूळात ह्या सगळ्या पक्षांमध्ये अल्पसंख्याकांचे मसीहा होण्यासाठी अंतर्गत स्पर्धा असते. म्हणून भाजपला टारगेट करीत असतात. त्यातून बहूसंख्यक दुखावतो हे त्यांच्या लक्षांत येत नाही. देशभक्ती असो वा गोहत्या ह्यावर जे राजकारण चालू आहे हे अशोभनीय आहे यात काही वाद नाही. परंतु हा वाद आताच का उफाळून आला? यामागचे कारण काय? निःसंदिग्धपणे यात राजकारण आहे. काॅग्रेसच्या राजवटीत काही अमंगल घडले कि यामागे विदेशी शक्ती आहे, नाहीतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात आहे असे म्हणण्याची फॅशनच होती. त्यावेळी असे काही अकलेचे कांदे सोलले की विरोधी पक्षांची एकजूट मृगजळ बनत असे आणि त्यामुळेच काॅग्रेसला फार काळ सत्ता भोगता आली. परंतु आता परिस्थिती उलट आहे.

संघ आणि भाजप ह्यांच्यावर सतत टिका करीत असूनही भाजप दिवसेंदिवस शक्तीशाली बनत चाललाय. ह्याचा अर्थ भाजपची विचारसरणी लोकांच्या पंसतीला येत आहे. भारतीय समाज गोहत्या बंदीला, कधी नव्हे इतकं समर्थन सोशल मिडीया वरून करताना दिसतोय. ह्याच कारण केवळ श्रद्धा म्हणून नव्हे तर गाईच दुध, मूत्र, शेण इत्यादीची उपयुक्तता तिही आधूनिक विज्ञानाच्या निकषावरून दाखविलेली लोकांच्या वाचनात येत आहे. वंदे मातरम् गायला आमच्या उपासनेत मान्यता नाही, म्हणून आम्ही गाणार नाही असे सतत बोलत राहिल्याने आपल्याला स्पेशल दर्जा मिळतो असा समज भाजपेतर पक्षांच्या सरकारांनी जोपासला आणि त्यातून तयार झालेल्या मानसिकतेतून बाहेर पडणे, मुस्लिम बांधवांना फार जड होत आहे. परंतु आता केंद्रात तसेच इतर राज्यात भाजपची सरकारं आहेत आणि त्या सरकारांचा कारभार "सबका साथ, सबका विकास‍| ना किसी एकके उपर मेहरबान!" ह्या तत्वावर चालणार. बहुमताने निवडून स्थापन झालेल्या सरकारची धोरणे पटत नसली तर सरकारशी चर्चा करणे हा सर्वमान्य उपाय आहे. सरकारचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेण्यासाठी मुस्लिम समाज उत्सूक असूही शकतो. परंतु त्याचं वकीलपत्र मिळाल्याप्रमाणे झाडून सर्व विरोधी पक्ष आणि मिडीयातील तथाकथित बुद्धीवादी आक्रास्ताळेपणा करीत आहेत. आपल्या उपासनेत जे आहे, तेच मानायचे आणि विज्ञानातील संशोधन आणि त्याची उपयुक्तता स्विकारू नये असे थोडेच असते. तीनदा तलाक, तलाक तलाक, म्हणावयाचे आणि धर्माचा आडोसा घ्यावयाचा. कुटूंब नियोजनही स्विकारायचं नाही हे कूठवर चालणार? नवीन युगात वावरायच असेल तर आपण काळानुसार बदलायला हवे. हे अल्पसंख्याकांना समाजावून देण्यासाठी भाजपेतर पक्ष कंबर कसतील कां? अल्पसंख्याक असा दर्जा आणि अनुदानही घेणार, त्यातून काढलेल्या शाळांमधून आधूनिक शिक्षण मात्र घ्यायचे नाही, आपल्या शाळांना ह्या भूमीत जन्मलेल्या संताची नावे द्यावयाची नाही हे कितपत योग्य? यावर अल्पसंख्याक समाजाचे नेते मंडळी विचार कधी करणार? पतंप्रधान मोदींनी "सबका साथ सबका विकास" हाच मंत्र घेउन गुजरातचा कायापालट केला. ही केवळ घोषणा राहिली नाही, तर ही वस्तुस्थिती आहे आणि देशाला त्याच वाटेवरून ते नेत आहेत. याची खात्री लोकांना पटत आहे हे नाकारून कसे चालेल? कूठल्याही समस्येवर खात्रीलायक उपाय म्हणजे संवाद. त्यातून सहमती, पुढे सहकार्य आणि शेवटी सख्य. लोकशाहीचा कारभार हा कायद्यापेक्षा सामंजस्याने चालणे अधिक हितकारक असते.असे जगभरातील राज्यशास्त्रांवरील अभ्यासकांचे म्हणणे आहे.पण त्यासाठी अंतःकरणी एक ध्यास हवा. 

"मी स्वतंत्र आहे,पण इतका नाही कि मी संविधानाचां सन्मान करू नये. मी स्वतंत्र आहे, पण इतका नाही कि जी नैसर्गिक संसाधनं, पाणी, वीज, ह्यांच वारेमाप उपयोग करीन. मी स्वतंत्र आहे, पण इतका नाही कि पेट्राल, डिझेल सारख्या इंधनाची उधळपट्टी करीन. मी स्वतंत्र आहे पण इतका नाही कि, माझ्या मागण्यांसाठी सरकारी मालमत्तेचे नूकसान करीन. मी स्वतंत्र आहे पण इतका नाही कि अपघात, दूष्काळ, भूकंप, अवर्षण, नदीचा पूर , इत्यादी आपत्ती मध्ये सापडलेल्या देशबांधवांना मदत करू नये. मी स्वतंत्र आहे पण इतका नाही कि मी काही समाज घटकाशी तूसडेपणाने वागेन किंवा एखाद्या घटकावर सोशल मिडीयात सभ्यता ओलांडून विनोद वा चूटके शेअर करीन. मी स्वतंत्र आहे परंतू इतका नाही कि, सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा सरकार कडून मागत फिरेन. मी स्वतंत्र आहे परंतु इतका नाही कि सरकार मधील पदाचा दूरूपोयग करून माझी व माझ्या कुटुंबीयांच्या संपत्तीत सतत वाढ करीत राहीन. मी स्वतंत्र आहे, पण इतका नाही कि सरकारमध्ये रहावयाचे आणि केवळ सत्तेत वाटा कमी मिळाला म्हणून सरकारवर टिकाही करायची. मी स्वतंत्र आहे पण इतका नाही कि माझ्या उद्योगधंद्यातून मिळणार्या उत्पन्नातून काॅरपोरेट सोशल रीस्पाॅन्सिबीलीटीकडे पाठ फिरवीन. मी स्वतंत्र आहे परंतु इतका नाही कि मी माझ्या मनात येईल त्या पद्धतीने आसपास घड़णार्या घटनांचा विपर्यास करून त्यावर बोलेन वा छापून आणिन. मी स्वतंत्र आहे परंतु इतका नाही कि समाजाच्या कुठल्याही वर्गाच्या भावनांना ठेच पोहचेल असे बोलत राहिन वा तसे कृत्य करीन". या सार्या बाबी देशभक्तीच्या कसोट्या आहेत. त्या अल्पसंख्याक तसेच बहूसख्यांकांनाही लागू आहेत. मग ते मंत्री, आमदार, खासदार, इतर जनप्रतिनिधी असोत वा राजकिय पक्षांचे प्रमूख असोत. देशभक्ती ही केवळ नारेबाजीत नसते. ती अंतःकरणी असावी लागते. सार्वजनिक या शब्दातील सर्वजन मध्ये आपण असतो तेव्हा मी कूठल्या जातीचा, पंथाचा नसतो. मी असतो फक्त आणि फक्त या प्रजासत्ताक भारतातील एक नागरिक. आणि म्हणून सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ राहतील हे मी पाहीन. किमान मी ती बिघवडणार नाही. माझ्यालेखी देशभक्ती ची हीच सोपी व्याख्या असू शकते. 

भाजप सत्तेवर आलेला आहे आणि निवडणूकां मागून निवडणूका जिकंत आहे, त्यावरून विरोधी पक्षांनी हे ही समजावयास हवे कि मतदारांना भाजपची धोरणं माहित आहेत. केवळ भावनेच्या आहारी जाऊन मतदार मतं देतात या भ्रमातून विरोधी पक्ष, तसेच त्यांची पाठराखण करीत असणार्या न्यूज चॅनेल आणि वर्तमानपत्रवाल्यांनी बाहेर येणं आवश्यक आहे. अलीकडे मार्क टूली, ह्या बीबीसीच्या प्रथितयश संपादकांनी, भारत मोदींच्या नेतृत्वाखाली बदलत आहे असे आपल्या लेखात म्हटले आहे. इतकंच नव्हे तर मोदी सरकार अस्थिर करण्यासाठी अनेक प्रकारच्या क्लृप्त्या काढण्याचे प्रकार घडत आहेत असेही सूतोवाच करायला विसरले नाहीत. एक शाश्वत सिद्धांत माझ्या वाचनात आला आहे, तो मांडून या लेखाची समाप्ती करतो. There are some eternal principles which never change even with the time. One of them is that, when there is a conflict between individual and a group, then group's interest must prevail. When a conflict is between group and organisation, then organisation's interest must prevail and when there is a conflict between organisation and nation, nation's intrest has to be prevailed at any cost". "काही शाश्वत सिद्धांत असे असतात ते काळ बदलला तरी बदलत नाहीत. त्यापैकी एक असा आहे, कि व्यक्ती आणि समूहामध्ये बखेडा उभा राहिला, तर समूहाच्या हिताला प्राधान्य द्यावे. समूह आणि संस्थेमध्ये बखेडा असला तर संस्थेच्या हिताला, आणि संस्था व देश ह्यांच्यात बखेडा असला तर निःसंदिग्धपणे देशाचेच हित जपलं पाहिजे". वंदे मातरम् ||

शनिवार, १ एप्रिल, २०१७

महाराष्ट्र सरकार किती स्थिर किती अस्थिर



महाराष्ट्रातील सरकार शपथविधी झाल्यापासून अस्थिरच आहे. याबाबत कोणाचेही दूमत नसावे. कारण भाजप आणि शिवसेनेने निवडणूक स्वतंत्र रित्या लढविली. स्वतंत्र रित्या लढविण्यात काही गैर नव्हते. त्या निमित्ताने या दोन्ही पक्षांना स्वतःची ताकद अजमवण्याची संधी प्राप्त झाली होती. अगोदरच लोकसभेच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांच्या पदरात भरभरून यश पडले होते. त्याशिवाय राज्यातील आघाडी सरकाराबद्दल जनतेत असंतोष होता. परिणामी विधानसभेच्या निवडणूका स्वतंत्र लढवून अधिक जागा पदरात पाडण्यासाठी विजयश्रीही खूणावत होती. लोकसभेच्या निवडणुकीत मोदी लाटेचा प्रभाव होता हे सिद्ध झाले होते. म्हणून भाजपचे नेते अधिक जागा मागत होते. यासंबंधीचा निवाडा होत नव्हता. शेवटी जनतेच्या दरबारात निकाल लागला.

निवडणूकीतील प्रचारात ह्या दोन्ही पक्षांनी स्ट्रॅटेजी म्हणून परस्परांवर चिखलफेक केली असावी असे सुरूवातीला वाटत होते. कारण दोन्ही काॅगेस पक्ष पूरते निष्प्रभ झाले होते. जसे उत्तर प्रदेशमध्ये मायावती आणि मूलायमसिंगनी काॅग्रेस आणि भाजपला प्रसिद्धी मिळू नये यासाठी जी रणनीती वापरली तीच या दोन्ही पक्षांनी वापरली. ती रणनीती शिवसेनेच्या कामी फारसी आली नाही. भाजपाचे स्टार प्रचारक पंतप्रधान मोदींनी प्रचारात शिवसेनेवर थेट टिका केली नाही. एकूणच भाजपचा प्रचार सत्ता परिवर्तनासाठी होता असे मतदारांना वाटले. याउलट सेनेचा प्रचार आघाडी सरकारच्याऐवजी मोदी- शहा या जोडगोळी विरूद्धच राहीला. त्यामुळे शिवसेनेचे यश मनसेच्या जागा मिळण्यापर्यंत सिमीत राहिले. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेनां अधिक पंसती प्रचार काळात मिळत होती. रोज प्रचार सभेच्या व्यतिरिक्त सामना मधून सेनेची भाजपवर टिका सूरू होती आणि त्या टिकेची प्रसिद्धी जवळजवळ सर्व मराठी न्यूज चॅनेल वरून होत होती. म्हणजे शिवसेनाला प्रचारासाठी दूहेरी साधन मिळत होते. तरीही भाजपला शिवसेनेपेक्षा दूप्पट जागा मिळाल्या आणि ते ही बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतरच्या पहिल्या वहिल्या निवडणुकीत. भ्रष्टाचारी लोकांना हाकलून द्या, बाळासाहेबांच्या हाकेला साद द्या, शिवसेनेला साथ द्या. हे घोष वाक्य ठेवून प्रचार केला असता, तर शिवसेनेला थोड्या फार जागा अधिक मिळाल्या असत्या. मराठी कार्ड स्वतःच्या हातात ठेवणे ही शिवसेनेची गरज होती आणि राहणार आहे. कारण मनसेच्या रूपाने एक स्पर्धक कायम राहणार आहे. परंतु प्रत्यक्ष प्रचारात, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान आहे, असे म्हणत, दोन्ही काॅग्रेसही मोदी-शहा जोडीवर दारूगोळा संपलेल्या तोफा उडवू लागले. एकंदरीत शिवसेना नव्हे भाजप एकाकी लढली होती. असे असूनही भाजप सत्तेच्या जवळपास येती झाली. यावरून नरेंद्र मोदींचा झंझावात किती जबरदस्त होता ह्याचा अंदाज आपण बांधू शकतो. शिवसेनेला ज्या अधिक जागा मिळाल्या त्या मनसेच्याच होत्या असे स्पष्ट झाले होते. कारण तितक्याच जागा मनसेच्या कमी झाल्या. असे असूनही आम्ही मोदींचा झंझावात रोखला असे मुबंई महापालिकेच्या निवडणूकीतल्या प्रचारात राणा भीमदेवीच्या थाटात ऊद्धव बोलत राहिले. प्रत्यक्षात प्रचारादरम्यान त्यांच्या नाकाला फेस आला होता आणि तोही आणला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी. विधानसभेच्या निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान ऊद्धव ठाकरेंना भावी मुख्यमंत्री म्हणून पंसती मिळाली होती. परंतु महापालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान 'आम्ही वाघ, कोथळा काढू' तेच तेच शब्द भाषणात ऐकून सोशल मिडीयावर, लोकांनी त्यांची टर उडविली. आपण किती जागा लढवितो, किती जागेवर विजय मिळवितो,आपला विजयाचा स्ट्राईक रेट किती, प्रत्यक्षात जागा किती वाढल्या, ह्या सार्या गोष्टी समोर दिसून सुद्धा आणि सत्तेत राहून सरकार वर टिका करीत राहणार असाल तर काय म्हणावं? विनाशकाले विपरित बुध्दी !! 

आता पूढे काय? शिवसेना स्वतःहून सरकारचा पाठिंबा काढून घेणार नाही असे समजण्यास वाव आहे. कारण संजय राऊत अलीकडेच म्हणाले कि भाजपने आमचा पाठिंबा मागितला, आम्ही द्यायला गेलो नव्हतो. वस्तुस्थिती ही आहे कि प्रत्यक्ष मध्यावधी निवडणूका आल्या तर जसं मायावतीला ना राज्यसभेवर, ना विधान परिषदेवर जाता येणार तीच अवस्था संजय राऊतची होऊन राज्यसभेच कामकाज टिव्ही वरून बघायची वेळ येईल. निवडणूक निकालाने शिवसेनेला छोटा भाऊ ठरविले आणि संजय राऊतने शिवसेनेला आणखिन छोटा करण्याचा विडा उचलेला दिसतो. विधानसभेच्या निवडणुकीतील  मतमोजणी सूरू असतांनाच मतदारांचा कौल दिसत  होता त्या वेळीच ऊद्धव ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला असता तर मंत्रीमंडळातील महत्वाची खाती हाती लागली असती. आता विधानसभा बरखास्त केव्हा करायची किंवा भाजप मध्ये येणार्या आमदारांना राजीनामा द्यायला लावून पून्हा त्यांना निवडूण आणायचे, हे दोन्ही पर्याय भाजपच्या हातातच राहणार. हा लेख लिहित असताना सेनेने पून्हा मुख्यमंत्र्यांसमोर गूढघे टेकविल्याची बातमी न्यूज चॅनेल्स वरून झळकली. गुढघे टेकविले ही भाषा चॅनेलवाल्याची, माझी नाही. तरीही सरकार स्थिर झालं असे मानण्याच कारण नाही. उलट मध्यावधी निवडणूकीची शक्यताच वाढली आहे. केवळ मध्यावधी निवडणूकीची हूल ऊठविली तर सेना नेत्यांना घाम आला. ही बाब पंतप्रधान मोदीजी आणि शहांच्या नजरेतून सूटणार थोडीच. भाजप आता मध्यावधी निवडणूकीचा पर्याय स्विकारणार हे निश्चीत. भाजप योग्य वेळ साधत आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा ह्यांना धोके पत्करण्याची नीती भावते आणि एव्हाना विरोधी पक्षांना ही त्यांची रित समजली आहे. तरीही मोदी-शहा जोडी कधी धोका घेऊन बाजी उलटवतील हेच समजणं कठीण झालं आहे.

भाजप मध्यावधी निवडणूकीचा पर्याय स्विकारील यामागे सात कारणे आहेत. एक सत्तेत राहून विरोधी पक्षासारखी टिका शिवसेना करते ह्या गोष्टीचा तिटकारा लोकांना येत आहे हे मोदींजीसारख्या मूरब्बी नेत्याला निश्चीत माहीत आहे. दूसरं असे कि महाराष्ट्रत मध्यावधी निवडणूकीचं खापर शिवसेनेच्या माथी मारण्याइतकी मर्यादा शिवसेनेने ओलांडली आहे. याशिवाय मुंबई महापालिकेचा कारभार सेनेकडे देऊन भाजपने मोठेपणा दाखविला, असे लोकांच्या गळी उतरविण्यात भाजपला सोपे जाणार असे दिसते. चौथ कारण, निवडणूका आल्या तर मनसे शिवसेनेची मते खाण्यासाठी तयार राहणार. शिवसैनिकांनाही पालिकेच्या (विशेष करून मुबंई महापालिकेची) निवडणूकीत मनसे बरोबर यूती हवी होती. मनसेने अधिकृत रित्या प्रस्ताव पाठवूनही सेनेने त्यांना धूडकावून लावले. त्या मूळे आता मराठी कार्ड खेळण्याचा आपलाच हक्क आहे हे सांगण्यात शिवसेना आपोआप कमजोर राहणार. त्यातही मनसेही शिवसेनेवर मध्यावधी निवडणूकीच खापर फोडण्याची आयती मिळालेली संधी सोडेल असे दिसत नाही. ना घर का ना घाटका अशी शिवसेनेची स्थिती होणार असेच वाटते. पाचव कारण, काॅग्रेसला संजीवनी प्राप्त व्हायला बराच वेळ लागणार असे दिसते. सोनिया गांधीना माहित आहे कि राहूल गांधीचा नरेंद्र मोदींच्या करीष्म्यापूढे टिकाव लागणार नाही. परंतु त्यांना घाई नाही. कारण राहूल गांधीच वय. राहूल गांधीला सतत काॅग्रेसचा नेता म्हणून थेट मोदींवर टिका करण्याची स्ट्रॅटेजी आखून मिडीयात आणि लोकांत चर्चेत ठेवणे इतकं त्यांना  सध्या तरी  पुरेसं आहे. त्या स्वतः आता संसदेतही आक्रमक भूमिकेत दिसत नाही. यामागील कारण त्यांच्या तब्ब्येतसंबंधीत आहे असे म्हटलं जात असलं तरी आणखिन कारणही असू शकते. सहावं कारण, हे कि  शरद पवारांची स्थिती सोनिया गांधी हून वेगळी नाही. त्यांचा पक्ष महाराष्ट्रापूरता आहे आणि संघटन दृष्टया कमकवूत झाला आहे. त्यातही राष्ट्रवादीच्या काही बड्या नेत्यांवर अटकेची टांगती तलवार आहे. सर्व विरोधी पक्षांना सोबत घेण्यासाठी धडपड आणि प्रवास करण्याइतकं वय आता त्यांच राहिलं नाही. सातव कारण भाजपतेर पक्षांची मूळ समस्या ही आहे कि, नरेंद्र मोदींचा राष्ट्रीय स्तरावरील राजकारणातला उदय इतका झंझावात निर्माण करील हा अंदाजच कोणाला आला नाही. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचा कारभार संस्थानिकांसारखा राहिला होता, तो बदलायलाही अपेक्षापेक्षा जास्त वेळ लागणार. सद्य राजकीय स्थितीचं वर्णन एका वाक्यात मांडायचं म्हटल तर "राजकरणातील लाट म्हणून काय असते ती स्वर्गीय इंदिरा गांधी नंतर आता मोदीं संदर्भात आपण अनूभवत आहोत". अर्थात ही स्थिती लोकशाहीला मारक ठरते, असे असले तरी वस्तूस्थितीत बदल होणार नाही. राजकरणातील लाट ही कशी निर्माण होते या संबंधीचा नैसर्गिक नियम मी माझ्या या अगोदरच्या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेने आता छोट्या भावाची भूमिका,जी मतदारांनी दिली आहे ती मोठ्या मनाने स्विकारावी. केवळ विरोधासाठी विरोध करून आपली विध्वंसक प्रतिमा उभी राहणार नाही याबाबत काळजी घ्यावी. कारण राजकारणातही काही वेळा माघार घेणे हे मूत्सदीपणाचं समजले जाते. आता सत्तेत आहात तर जबाबदार सत्ताधारी सारखे वागून महाराष्ट्राला प्रगती पथावर नेण्याची ऐतिहासिक जबाबदारी पार पाडावी हयातच शिवसेनेचं हित आहे. नाही तर" बापने कमाया और बच्चेने गवायां"!

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...