सोमवार, १० फेब्रुवारी, २०२५

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भाजपाच्या विजया संबंधीत भाजपाच्या समर्थकांना फारसे आश्चर्य वाटले नसावे. कारण असे आहे की लोकसभेच्या निवडणूकांच्या निकालातून घटलेल्या संसद सदस्यांच्या संख्यातून भारतीय जनता पक्षाला अतिआत्मविश्वासामूळे पराभव होऊ शकतो असा धडा मिळाला होता. त्यातून भाजप बरेच काही शिकला आहे. हरियाणा व महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूकात ज्या पद्धतीने यश प्राप्त केले तशीच पद्धत दिल्ली विधानसभेच्या निवडणूकांच्या प्रचारात वापरली. राजकारणातील डावपेंच आखून ते पुर्णात्वास पोहचण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते विश्रांती न घेता अधिकाधिक मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क व संवाद साधत असतात. सोबत मतदारांच्या समस्यांची कशी उकल करणार आहोत, याची अभ्यासपूर्ण  माहिती मतदारांकडे पोहचण्यासाठी केंद्र-राज्य स्तरावरील मंत्री, खासदार-आमदार व संघटन मंत्री सुद्धा थेट बूथ लेवलचे कार्यकर्त्यांना मदत करीत  असतात. यालाच संघपरिवार मध्ये जनजागरण म्हटले जाते. हरियाणा व महाराष्ट्र या दोन राज्यांतील विधानसभा निवडणूकात भाजपाला मिळालेल्या यशाचे गमक हेच होते. हे आपण बहुतांश न्यूज चॅनेल्सवरून ऐकले आहे. पण---

काही न्यूज चॅनेल्स जे इंडी नावाच्या आघाडीच्या नेत्यांची तसेच जागतिक लिबरल मंडळीची गुलामी स्विकारली आहे अशा चॅनेल्सवरून दिल्लीत भाजपाचा विजय होईल असे भाकीत ऐकावयास मिळाले नाही. उलटपक्षी भाजपाला निवडणूक आयोगाचा पाठींबा आहे, भाजपा विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना अमिष दाखवून त्यांचे पक्ष फोडतात, एवीएम मशीनची करामत, इत्यादी कारणें प्रचार काळातच म्हणजे मतदान दिवसाच्या अगोदरच मांडत असताना दिसले. आपला पराभव होणार असे स्पष्ट दिसत असताना भाजपाच्या संभाव्य विजयाबद्दल मतदारांची फसवणूक करण्यातच विरोधी पक्षांची नेते मंडळी व त्यांचे समर्थक मिडीया मंडळी रमत असते. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर  वानखेडे, प्रसून वाजपेयी, रवीशकुमार इत्यादी संपादक मंडळीं 'आम आदमी पक्षच जिंकणार होता, भाजपाचा विजय काॅग्रेस मूळे झाला, एव्हीम मशीनची करामत ' इत्यादी मुद्दे विश्लेषणात मांडत आहेत. भाजपाचा विजय झाला की काॅग्रेसचा नैतिक विजय झाला अशी बडबड करण्याची टूम ही लिबरल लाॅबीने काढली आहे.  अशी टिका आता मतदारांच्या अंगवळणी झाली आहे. यावर उगीच चर्चा का करावी?

निकाल कुठल्याही निवडणूकातला असो, भारतिय जनता पार्टी केंद्रातील सत्तेचा गैरवापर कसे करते यासाठी खोट्या पुराव्यांची यादी सुद्धा विरोधी पक्षांकडे तयार असतेच. विरोधी पक्षांकडे भाजपा, संघ परिवार व सनातन संस्थावर सतत खालच्या पातळीवर टिका करीत राहणे ही एकच स्ट्रॅटेजी शिल्लक आहे. याच स्ट्रॅटेजीचा सततचा वापर लिबरल संपादक मंडळी, इंडी पक्षांची नेतेमंडळी, व विरोधी पक्षांचे समर्थक व कार्यकर्ते मिडीयातून करीत राहणार असेल तर देशातील प्रत्येक प्रान्तात भाजपाचे  प्रभूत्व वाढत राहील हेच आपल्या देशांतील निवडणूक निकालांच्या विश्लेषणातला केंद्र बिंदू राहील असे मला वाटते. 

विविध भाषा, विविध वेष, विविध आहार-विहार, विविध भौगोलिक वैशिष्ट्यांनी नटलेल्या या भारतभूमी चे हिंदू संस्कृतीमूळे एकतेचे जे विलोभनीय दर्शन होत असते त्याचा लाभ विरोधी पक्षांना ही होऊ शकतो. पण विरोधी पक्षांना भाजपा वर टिका करीत सनातन संस्कृतीवर हल्ला होत असतो याचे भान राहत नाही.  कदाचीत सनातन संस्कृतीच मोडीस निघावी हाच या मंडळीचा उद्देश असावा. या संबंधीत अलिकडील ताजे उदाहरण मी आपल्या समोर ठेवून या लेखाच्या समाप्तीकडे वळतो. 

प्रयाग येथील महाकुंभातून सनातन संस्कृतीतील एकात्मतेचे जे विलोभनीय दर्शन झाले त्या संबंधीत  विरोधी पक्षांनी व त्यांच्या समर्थक संपादक मंडळींनी फारसे कौतूक केले नाही. अंतःकरणात ओतप्रोत वाहात असलेल्या भक्तीभावाने महाकूंभात भक्तांची प्रचंड गर्दी झाली. ती गर्दी आटोक्यात न आल्यामूळे काही भाविक आपल्या प्राणास मूकले ही दुखःद घटना आहे. त्यासंबंधीत मी येथे प्रशासनाची पाठराखण करीत नाही. अशा प्रकाराच्या दुर्घटनेला जे कोणी प्रशासकीय अधिकारी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत अशी खबरदारी प्रशासनाने सतत घ्यावी असे माझे ठाम मत आहे. 

आजपावेतो वारकर्यांच्या दिंडीत,  प्रख्यात मंदिरातल्या महायात्रेत,  इतकेच नव्हे तर सिझन प्रमाणे होणार्या पर्यटन यात्रेत ही सामील न होणार्यांची संख्या ही मोठी असते. या पाठिमागील कारणें बहुतांशी व्यक्तीगत स्वरूपातली असतात. असे असले तरी यातील बहुतांश लोक यात्रा, दिंडी, वा महाकुंभासारखे नैमित्तिक उत्सवाचे लाईव प्रसारण हटकून पाहात असतात. दुसर्या बाजूला यात्रा, महोत्सव, दिंडी, या सार्या गोष्टी फाजील आहेत, त्यावर बंधने असावीत अशी धारणा व्यक्त करणार्यांची संख्या ही मोठी आहे. ही मंडळी मूलतः मेकाॅलेच्या शिक्षण पद्धतीतून तयार झालेल्या गुलामी मानसिकतेचे रूग्ण असावेत. यांचाच भरणा लिबरल नावाच्या मंडळीत असतो.

देव-देवतांच्या पालख्या, पदयात्रा, विख्यात मंदिरातील महोत्सवातून अनेक छोट्या-मोठ्या लोकांना रोजगार मिळत असतो, सरकारचा महसूल वाढतो. उद्योगजगताला गती प्राप्त होते हे सत्य प्रत्येकांने स्विकारावयास हवे. कारण One man's expenditure is another man's income हे अर्थशास्त्रातील मूळ तत्व आहे. शेवटी Economics is a science of human behaviour between scare means and unlimited wants.  ही विदेशी व्याख्या तरी लिबरल मंडळींनी ध्यानात ठेवावयास हवी की नाही ? मानवाचा व्यवहार हा मनाच्या चंचलता नावाच्या वैशिष्ट्यावर अवलंबून असतो. अर्थव्यवस्थेचा जन्मच या वैशिष्ट्यातून अस्तित्वात आला आहे. मानवी मनाची चंचलता अध्यात्मिक अनुष्ठानातून नियंत्रित राहते असे आधूनिक विज्ञानाने ही मान्य केले आहे. ही सनातन संस्कृतिची मानव जातीला मिळालेली देणगी आहे.

महाकुभांच्या महोत्सवात ज्या काही चूका घडल्या त्यावर मोदी व योगी सरकारवर विरोधी पक्षांनी टिका केली. त्याबाबत आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण इंदिरा गांधीच्या हत्यानंतर दिल्लीत निर्दोष शीख बांधवांची काॅग्रेस कार्यकर्त्यांनी  निर्घूण हत्या केली होती, त्यावर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधीनी दिलेली प्रतिक्रीया काय होती याचे स्मरण विरोधी पक्षांच्या नेत्यांनी करावे. राजीव गांधीची प्रतिक्रिया 
' मोठा वृक्ष पडला तर त्याखालील छोटी मोठी झाडे मोडणारच ' ही होती. हा तर निर्लज्जपणाचा कळस होता. माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीची हत्या झाली तेव्हा त्यांच्या सरकारतले गृहखाते झोपले होते का,  हत्या व यात्रेत भगदड होऊन निष्पापाचे प्राण जाणे यात मूलभूत फरक आहे की नाही ? अशा प्रश्नांवर लिबरल मंडळी मौन पाळते. विरोधी पक्षांची मोदी सरकारवरील टिका ही विरोधी पक्षांची खोड आहे व तीचे स्वरूप सूंभ जळला तरी पीळ जात नाही असेच आहे. त्यामूळे त्यावर अधिक चर्चा करण्याची इथे गरज नाही. 

महाकूंभात जे भाविक सामिल झाले ते सारे भाविक स्वतःच्या खिशातील पैशातून. महाकुंभात स्नान करून घरी परतलेल्या अनेक भाविकांनी प्रयाग येथील सोयी-सुविधांची भरभरून स्तुती केली आहे. या उलट दर वर्षी साजरा होणार्या हज यात्रेत आपल्या देशातील मुस्लिम बांधव  केंद्र सरकारकडून आर्थिक मदत घेऊनच जात होते ना ! त्या हज यात्रेत ही प्रचंड गर्दीत मुस्लीम बांधवांनी प्राण गमाविले नव्हेत का ? यावर आपल्या येथील लिबरल मंडळींनी हज यात्राच्या आयोजकांवर टिका कधी केली आहे का? उत्तर नाही हेच होय. याबाबत धर्म न मानणार्या लिबरल मंडळींनी तरी आवाज उठवयाला हवा होता की नाही ? पण तसे ते करीत नाहीत. याचा अर्थ असा आहे की या मंडळींच्या दरबारात ख्रिस्ती व इस्लाम सारख्या एकेश्वरी धर्मातील लोकांच्या भावना पवित्र मानल्या जातात पण सनातन संस्कृतीत सारे काही अतार्किक व अंधश्रद्धां मानले जाते. कारण यांना सातासमुद्राच्या पलिकडील देशांकडून भरपूर पैसे मिळत असतात.

असा विषारी प्रचार जितक्या त्वेषाने जागतिक लिबरल मंडळी करीत असते त्याहून अधिक त्वेषाने आपले येथील विरोधी पक्ष व त्यांचे गल्लीबोळातील कार्यकर्ते करीत असतात. या लिबरल मंडळीत सर्वात मोठ्या शक्तीमध्ये चीन सरकारची मिडीया व अमेराकेतील जार्ज सोराॅस आणि तेथील एनजीओज् आहेत. अशा एनजीओज् मध्ये तेथील मिडीयाचा ही समावेश आहे. त्यांच्याच मदतीने जम्मू- काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत, कच्छ ते ईशान्य भारताच्या टोकापर्यंत पर्यंत विरोधी पक्षांचे नेते-कार्यकर्ते सनातन संस्कृतीवर टिका करीत असतात. विरोधी पक्ष सनातन संस्कृतीवर जितकी अधिक टिका करेल तितकी त्यांची शक्ती क्षीण होत राहील असे मला वाटते.

वाचक मित्र हो, दिल्लीतील निवडणूकांच्या निकालाचे विश्लेषण करीत असताना महाकुंभातील घडलेली घटना व त्यासंबंधीत विरोधी पक्षांचे वर्तन व त्यांची वक्तव्ये यावर जी चर्चा मी केली ती औचीत्याला धरून नाही असे वाटू शकते पण तसे काही नाही. महाकुंभाचे छायाचित्रे, तसेच लाईव्ह प्रसारण, बातम्या व माहिती  इलेक्ट्रानिक्स मिडीया व वर्तमानपत्रासारखे प्रिन्ट मिडीया, युट्यब, वाॅट्सॲप सारख्या सोशल मिडीयावर ही घरी बसून आपण जशी पाहिली तशी दिल्लीतल्या मतदारांनी पाहिली आहे. दिल्लीत देशातल्या सर्व प्रान्तातले नागरिक राहतात. त्यांचे दूर वर असलेले नातेवाईक महाकुंभात सामिल झालेले असणारच. त्यांच्या द्वारें आयोजकांची स्तुती दिल्लीतील मतदारांनी ऐकली असणारच. महाकुंभाच्या पर्वावर दिल्लीतील बहुतांश मतदारांना उत्तर प्रदेश सरकार व केंद्र सरकार मधील उच्च श्रेणीच्या समन्वयाचे दर्शन घडले असणारच. त्यातून भले मिडीयात  याबाबत वाच्चता झाली नसली तरी भाजपाच्या पारड्यात थोडी-फार मते पडली असावीत असा माझा कयास आहे.

वाचक मित्र हो,  दिल्ली हे छोटे राज्य आहे. त्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळालेला नाही हे आपणास ठाऊक आहे. असे असले तरी दिल्लीतील विजयाने भाजपाचा देशभराच्या राजकारणावर तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणावर प्रभाव वाढत जाणार असे मला वाटते. मी लेखाच्या  शिर्षकाच्या जोडीला ' केजरीवाल भस्मसात ' हे  पोटशिर्षक ठेवले. याचे कारण केजरीवाल हे जागतिक लिबरल लाॅबीने भारताच्या राजकारणात रूजविलेले भलं मोठं काटेरी झुडूपं आहे. त्यावरील चर्चा मोघम नसेल. कारण केजरीवाल हे नाव प्रातिनिधीक आहे. राहूल गांधी, कन्हैयाकुमार, स्टॅलीन, नक्षलवादी, दशहतवादी,  सारखी अनेक काटेरी झुडपें देशाच्या राजकीय पंटागंणावर विदेशी धनशक्तीच्या पांठीब्यातून रूजली आहेत. त्यावरील चर्चा वाढत जाणार आहे. त्यासंबंधीत वेळोवेळी चर्चा स्वतंत्र रित्या होत राहणार आहे. दिल्ली राज्यातील आप चा पराभव कसा झाला यावरील अनेक राजकीय अभ्यासकांनी मांडलेले विश्लेषण माध्यमाद्वारें आपण ऐकले आहे. त्यावर अधिक काही लिहण्यापेक्षा  या लेखाच्या भाग- २ मध्ये देशाच्या राजकीय पटांगणावर विदेशी शक्तीच्या साह्याने केजरीवाल नावाचे प्रचंड काटेरी झुडूपं कसे झटपट रूजले याचा शोध घेण्याचा प्रयत्न मी करू इच्छीतो. पण त्यासाठी त्या बाळाची (काटेरी झूडपाची) कुंडली  पाहावी लागेल. त्यातूनच त्याची वाढ आणि लयाची चिन्हे शोधता येतील असे मला वाटते. त्यावरील चर्चा  लेखाचा भाग-२ आपण करणार आहोत. म्हणून मी इथे थांबतो.                          धन्यवाद !
                                क्रमशः --

३ टिप्पण्या:

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...