आता आपण लेट्स-अप युट्युब चॅनेलवर ४ डिसेंबर रोजी राजकीय अभ्यासक हेंमत देसाई यांच्या मुलाखती वर चर्चा करणार आहोत. हेमंत देसाई हे मराठी माध्यमातील चॅनेल्सवर राजकीय अभ्यासक म्हणून अवतरत असतात. त्यांचे राजकीय घडामोडी वरील विश्लेषण लिबरल मंडळी सारखेच असते. अलिकडील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालासंबंधी हेमंत दैसाई यांनी केलेलं विश्लेषण थोडक्यात आपल्या समोर ठेवतो.
१) सुरवातीसच हेंमत देसाई यांनी राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड च्या निवडणूकात काँग्रेसचा झालेल्या पराभवचे वर्णन अत्यंत त्वेषाने ' दारूण पराभव 'असे केले. विरोधी पक्षांनी ओबीसींच्या जनगणनेची केलेल्या मागणीची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खिल्ली उडविली. ' मी किसान, गरीब आणि महिला यांचे कल्याण पाहतो. हाच माझा धर्म आहे. मी जात-पात बघत नाही.' हे पंतप्रधान मोदींचे जाहीर भाषणातले उद्गार हेमंत देसाईने स्वतः म्हणून दाखविले.
२) भारत जोडो कुठे आहे ? त्या यात्रेतून झालेला संपर्क टिकून राहावा यासाठी काही प्रयत्नच झाले नाहीत.
३) काँग्रेसला मध्यप्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड येथे घवघवीत यश कधीच मिळाले नाही.
४) भाजपाकडे ४० लाख समर्पित कार्यकर्ते आहेत. गुजरात पेक्षा ही मध्यप्रदेशमध्ये भाजपाची ताकद अधिक आहे. संघाचे आणि वनवासी कल्याण आश्रमचे कार्य गुजरात पेक्षा कितीतरी वर्षे अगोदर पासून मध्यप्रदेशात सुरू आहे.
५) अयोध्येत फुकट वारी करून देण्याची, सर्वत्र हनुमानाची मंदिरे, कौसल्यामातेची मंदिर बाधण्याच्या कमलनाथाच्या घोषणा हवेत विरल्या.
६) भाजपा संकल्प यात्रा काढणार
७) राजस्थान मध्ये सती जोहर मध्ये गेली पण सतीचे मंदिरे बांधली आहेत.
८) राजस्थान मध्ये एका हिंदुची निर्घूण हत्या. गेहलोतचे सरकार निष्क्रीय. भाजपाने फायदा घेतला.
९) राजस्थान मध्ये भाजपाने निष्क्रीय आमदारांना घरी बसविले.
१०) मोदींची इमेज व मोदींची गॅरेन्टी
११) गेहलोत यांच्या ओबीसी, आर्थिक दृष्ट्या गरीब, महिलांचा उत्कर्ष अशा रेवडी योजनांचा फज्जा उडाला
१२) महाराष्ट्रात तर मविआ सरकारची credibilty संपली आहे.
१३) भाजपा पराभवाने खच्चीत होत नाही.
१४) आता तर काँग्रेसला इंडी आघाडीत अधिक जागा मागण्याची संधी हूकली आहे.
१५) राजकारण एकांगी होत आहे. ही धोक्याची सूचना आहे. लोकशाही संविधान धोक्यात आले आहे.
१६) गेहलोत आणि सचिन पायलट मधील वैर कमी करण्याची ताकद काॅग्रेस पक्षांच्या श्रेष्ठींकडे राहिली नाही.
संपुर्ण मुलाखतीतुन तीन राज्यातील काँग्रेसचा दारूण पराभव हा जणू काही हेमंत देसाई यांचा स्वतःचा पराभव झाला की काय हे पदोपदी जाणवले आहे. मोदी, भाजपा व संघाची ज्यांना कावीळ झाली आहे अशापैकी हेमंत देसाई एक राजकीय अभ्यासक आहेत. विरोधी पक्षांची ओबीसीच्या जनजणनेच्या मागणीवर नरेंद्र मोदींनी जाहीर सभेत खिल्ली उडविली आणि ती पाहिली तेव्हा हेमंत देसाई गर्भगळीत झालेले असावेत असा माझा अंदाज आहे. लिबरल मंडळींचं एकच ध्येय असते ते म्हणजे हिंदू समाजाला वेगवेगळ्या जाती-पंथात विभक्त करणे. ही त्यांची राजकीय चाल तलवारीच्या एका फटक्याने ते ही जाहीर सभेत मोदींनी कापून टाकली. त्याच्या वेदना सर्वच लिबरल राजकीय अभ्यासकांना सहन कराव्या लागत असतील. भाजपाच्या संकल्पित संकल्प यात्रेने सर्व विरोधी पक्षांना संपुर्णपणे उखडून फेकून दिले जाणार असे चित्र हेमंत देसाईच्या यांच्या प्रतिक्रीयेतून स्पष्ट दिसले. नैराश्याने ग्रासलेले असुनही हेमंत देसाई यांनी शेवटी आपली लोकशाही आणि संविधान धोक्यात येईल असा शेरा मारलाच. म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, तशातली ही गत. अशी गत फक्त हेमंत देसाईं, गिरीश कुबेर आणि कुमार केतकर यांचीच झाली आहे असे नाही. हिन्दी, इंग्रजी तसेच इतर प्रांतीय भाषेतील न्यूज चॅनेल्स आणि वृत्तपत्रातील लिबरल पत्रकार-संपादक मंडळीची हीच गत आहे. म्हणून त्या मंडळींनी चार राज्यातील निवडणूक निकालाचे जे विश्लषण केले आहे ते सादर न करता या भागाची समाप्ती करतो.
दोन्ही पोस्ट अत्यंत अभ्यासपूर्ण आणि सखोल विचारांती लिहिलेल्या. एका झटक्यात वाचून झाल्यावर यासंदर्भात पुढच्या पोस्टची उत्कंठा वाढली. धन्यवाद विष्णू. असाच लिहित रहा.
उत्तर द्याहटवा[12/31/2023, 23:37] Dattabiwalkar: दोनीही लेख आताच वाचले, केतकर व हेमंत देसाई यांच्या भाष्याचा मतितार्थ आपण दोन्ही लेखांत सविस्तरपणे मांडला आहे, पण या राजकीय भाटांकडुन वेगळी अपेक्षा नाही, नेहेमीच्या तुलनेंत त्यांना जहाल टीकेसाठी, या निकालांनी वावच ठेवला नवहता, ना नेहेमीच ईव्हीएम तुणंतुणं वाजवायला.
उत्तर द्याहटवा[12/31/2023, 23:48] Dattabiwalkar: आपल्या लेखांसाठी धन्यवाद ! ही लेखमाला या वर्षी तुम्हाला विश्रांती घेऊ देणार नाही, कारण या विघ्नसंतोषींची ही मळमळ आता सुरुच राहिल. हे वर्ष भारतीय राजकारणात क्रांतीकारी ठरेल, २२ जानेवारीला श्री रामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर सर्व भारत राममय होईल, नंतर लगेचच सार्वत्रिक निवडणूक, भाजपचा अपरिहार्य विजय व नंतर उर्वरित कामांची भाजपकडुन पुर्तता, फक्त, मोदीजी तीसरी टर्म पुर्ण करु शकतील की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल, कारण अलिखित मानदंडाप्रमाणे ७५ पुर्ण केल्यानंतर, सक्रीय राजकारणांतून निवृत्ती.