
नमस्कार वाचक मित्रहो,
मी तब्बल दोन महिन्यानंतर ब्लाॅगवर आज आलो आहे. या संबंधीचे कारण प्रथम आपल्या समोर ठेवतो आणि मग लेखाच्या विषयावर चर्चा करू या.
डिसेंबर २०२२ मध्ये बाहेरगावी. नंतर परतलो तर सलग तीन दिवस डायरियाने सतावले. त्यातून पुढे अशक्तपणा. पुढे माझा उजवा खांदा दुखायला लागला. फ्रोजन शोल्डरचं दुखणं ते ! दिर्घ काळ टिकतं म्हणे ! डाॅक्टराकडून तपासणी झाली; उपाय झाले; रक्त तपासणी झाली; फिजिओ-थेरपी झाली; पण खांदादुखी काही कमी होत नाही; मोबाईलवरील सॅमसंग नोट्सवर लेख टाईप करण्याची मनाई ; पण आता स्वस्थ बसणे म्हणजे लेख लिहीण्याची सवय मोडीत निघेल असे वाटू लागले. म्हणून मी आलो आपल्या समोर. खांदादुखी वाढली तर पुढे लेखांऐवजी विडीओचा पर्याय स्वीकारावा लागेल असे दिसते. ते कितपत जमेल या बद्दल मी सांशक आहे.
गेल्या दोन महिन्यापासून देशाच्या राजकीय पटलावर अनेक घटना घडत आहेत. त्या सर्वांचा इथे आढावा घेणे अशक्य आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षा संबंधित सुप्रिम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीवर लेख लिहिण्यास सुरूवात करण्यासाठी बसलो तेव्हा त्या संघर्षाचे स्वरूप कसे आहे त्यातील राजकीय शह -प्रतिशह, सोबत केंद्र सरकारशी मविआ सरकारचे संबंध व मंत्र्यांशी गाठी-भेटी इत्यादी गोष्टी आणि राष्ट्रीय स्तरावरील काही राजकीय घटनांचा संदर्भ घ्यावा लागेल असे वाटले. त्यातून लेखाचा विस्तार वाढेल हे ध्यानात आले. म्हणून राष्ट्रीय स्तरावरील राजकारण या विषयावर धावता आढावा घेण्यासाठी हा स्वतंत्र लेख प्रथम आपल्या समोर ठेवत आहे. सोबत महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष (स्वरूप आणि सुनावणी) स्वतंत्र लेख जोडला आहे.
देशांतर्गत मोदी-हटाव मोहीम सुरू झाली आहे. त्यात नवल असे काही नाही. या मोहिमेत अमेरिकेतील कोट्याधीश जार्ज सोरस तसेच बीबीसी, न्यूयॉर्क टाईम्स सारख्या विदेशी मिडीया, चीन, पाक इत्यादी देश व अनेक विदेशी एनजीओ, व लिबरल लाॅब्यांचे आपल्या येथील विरोधी पक्षांना साहाय्य आहे. अदानी ग्रुप कंपन्यांचे शेअर्स कृत्रीम रित्या पाडून देशाची आर्थिक स्थिती खालावली असल्याची बोंबाबोंब करून भारतात अस्थिरता यावी असा प्रयत्न विदेशी शक्ती करीत आहे. त्याला काही विरोधी पक्ष आपल्या स्वभावानुसार साहाय्य करीत आहेत. राष्ट्रपती महोदयांच्या अभिभाषणा वरील चर्चा सत्रात तसेच बजेट सत्रात ही विरोधी पक्षांनी धुडघूस घातला हे आपण पाहिले आहे.
राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही संपली. पण त्यातही त्यांनी एके ठिकाणी चौकीदार चोर है म्हणत पंतप्रधान मोदी वर टिका केली, तर महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टिका केली. तिसर्या ठिकाणी नथुराम गोडसेंचं नाव घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला गांधी हत्यारा असे हिणविले. राहूल गांधी राजकारणात आल्यापासून फक्त या तीन वाक्याचा उपयोग करीत असतात. या पलिकडे त्यांना राजकारणाची काही जाण नसावी असेच मला वाटू लागले आहे. आजचं तंत्रज्ञान असे आहे की माणसाच्या आवाजात अनेक खेळणी ही बोलतात, हसतात. पुष्कळदा अशी खेळणी निर्माण करताना (म्हणजे Inbuilt) काही दोष, बिघाड असला की ते खेळणं सतत एकच वाक्य म्हणत राहते. मानवी मेंदूतही कुत्रिम बुद्धीची चिप्स बसवता येत असावी का आणि त्यात काही बिघाड झाला की माणूस अशाच प्रकारे बरळगतो का, एकच चूक वारंवार करीत असावा का असा तर्क मनात उद्भवला ! बस राहूल गांधी विषयी अधिक काही मत प्रदर्शन करावे ही इच्छाच संपली. या संबंधित अलिकडे वाचनात आलेले एक वाक्य आहे, ते सारं काही सांगून जाते. ते असे आहे , ' Success does not consist in never making a mistake but consist in making one mistake again and again. ' जो चुकतो तो माणूस; आपली चूक सुधारतो तो यशस्वी माणूस; एकच चूक सतत करीत राहतो त्याला काय म्हणावं ?
संसदेतही राहूल गांधींची काही छाप पडली नाही. खोटं ठरत असलेलं काॅग्रेसचं हे नाणं कितपत निवडणूकीच्या प्रचारात उपयोगी पडेल या संबंधीत काॅग्रेस समर्थक आणि राजकीय अभ्यासक ही सांशक आहेत.
असे असले तरी मोदी सरकार विरूद्ध हवा निर्माण करण्याचा देशातील विरोधी पक्ष आणि विदेशी शक्तीचा प्रयत्न जोरात सुरू आहे. पंतप्रधान मोदींची कृपा नव्हे तर महाकृपा उद्योगपती अदानी यांच्यावर आहे असा बिनदिक्कत आरोपाचा सिलसिला सुरू झाला आहे. या संबंधित विरोधी पक्षाकडे पुरावा आहे असे दिसत नाही. अनेक मातब्बर शेअर बाजार आणि अर्थशास्त्राचे अभ्यासकांचे म्हणणे आहे की अदानी ग्रुप कंपन्यांची दिवाळखोरी झालेली नाही. कोण्या एका विदेशी प्रायव्हेट रिसर्च करणार्या कंपनीचे हे कृत्यं, त्यामुळे पॅनिक होण्याची गरज नाही.
एकंदरीत २०२४ च्या लोकसभेच्या निवडणूकीच्या प्रचाराला सुरूवात झालेली दिसत आहे. पंतप्रधान मोदीवर सन २०१९ च्या लोकसभा निवडणूकाच्या एक वर्ष अगोदर राफेल विमानाच्या खरेदीत तथाकथित भ्रष्टाचाराचा आरोप होता तसाच काहीसा हा प्रकार वा प्रयोग आहे. चालू वर्षाच्या काही राज्यातील विधानसभा निवडणूका आणि २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकांच्या प्रचारात विरोधी पक्ष अदानी ग्रुपच्या शेअर्स संबंधी पंतप्रधान मोदी वर जोरदार हल्ला करतील हे स्पष्ट दिसते आहे.
अदानी यांच्या उद्योग समुहाच्या शेअर्स चा भाव खाली उतरविण्याचे काम भारत विरोधी विदेशी शक्तींनी केले आहे ही बाब बहुतांश मतदारांना समजली आहे. म्हणूनच पंतप्रधान मोदी स्वतःहून आत्मविश्वासाने आणि अधिक आक्रमकतेने विरोधी पक्षांच्या आरोपाला सामोरे जात आहेत. दुसरे असे आहे की सन २००४ ते सन २०१४ पर्यंतच्या यूपीए सरकारने पाकिस्तानात आपल्या नोटा छापण्याचे षडयंत्र केले. त्याचा पुरावा मोदी सरकारच्या हाती लागला आहे. अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यातून युपीए सरकारची दहा वर्षाची कारकीर्द ' काळी ' म्हणूनच इतिहासात गणली जाईल. त्यामूळे पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी विरूद्ध दाही दिशांना तोंड असलेले, नरेंद मोदीच्या तोडीचा नेता नसलेले विरोधी पक्ष असाच सामना सुरू झालेला दिसेल. त्या सामन्याचा निकाल ही सन २०१९ च्या लोकसभा निवडणूका सारखाच येईल असे दिसते.
विष्णुजी
उत्तर द्याहटवाआपली तब्येत लवकर पुर्व व्रत होवो, यासाठी आपणास मन: पुर्वक सदिच्छा.
ओघवत्या भाषेत आपण सद्य राजकीय स्थितीचा उत्तम आढावा घेतलाय.
या संपुर्ण वर्षात, देश विघातक शक्ती सतत कार्यरत रहातील, पण देश जागरुक होत आहे, त्यामुळे २०२४ मध्येही मोदीजी/भाजप, अधिक बहुमतांनी विजयी होतील यांत शंका नाही. ही जागरुकता निर्माण करण्यात , आपण व सम विचारी असंख्य ब्लाॅगर्स/यु ट्युब व्हीडीओ मेकर्स हातभार लावत आहेतच.
धन्यवाद
बिवलकरजी धन्यवाद !
उत्तर द्याहटवा