शुक्रवार, १३ मे, २०२२

केंद्र-राज्य संघर्ष (भाग ३) - दिल्ली


गेल्या मार्च महिन्याच्या २८, तारखेला केंद्र-राज्य संघर्ष भाग१ आणि भाग २ पब्लीश केले आहेत. त्यातील पहिल्या भागात पंजाब मध्ये सत्ता मिळाल्यानंतर आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा केजरीवाल केंद्र सरकारशी पुन्हा एकदा तंटा उभा करण्याचे निमित्त शोधतील असा अंदाज मी व्यक्त केला होता तो खरा ठरला. महाराष्ट्र, दिल्ली, पश्चीम बंगाल आणि पंजाब राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या कारभारात लोकहिताची कामें करण्यापेक्षा पंतप्रधान मोदीं आणि केंद्र सरकार विरोधात कारस्थानांना प्राधान्य दिले जात आहे.  देशातील विद्यमान राजकरण केंद्र - राज्य संघर्षाच्या घटनांनी व्यापलं आहे. कधी पश्चीम बंगाल , कधी महाराष्ट्र तर कधी दिल्ली राज्यात, केद्र सरकारवर कुरघूडी करण्याच्या घटना होत आहेत. आता तर पंजाब राज्य ही या तिन राज्यांच्या कळपात जाऊन बसले आहे.


काल परवाच दिल्लीचे मुख्यमंत्री, जे पंजाब राज्याचे रिमोट कंट्रोलर आहेत असे केजरीवाल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांना न्यायालयातर्फे चपराक बसली आहे. घटना तशा क्षुल्लकच होत्या. आजच्या सोशल मिडीयाच्या युगात पंतप्रधान आणि मुख्यमंत्री या पदावरील व्यक्तींवर असंसदीय शब्दात शेरेबाजी होणे नित्याचे झाले आहे. पंतप्रधान पदावर विराजमान झाल्यापासून नरेंद्र मोदी अशा प्रकारच्या टिकेचे पहिले लक्ष्य ठरले. नंतर राहूल गांधीचा नंबर लागला. स्वतः राहूल गांधीनी दोन तीनवेळा नरेंद्र मोदीवर तशाच प्रकारची टिका केली आहे. परंतु पंतप्रधान मोदींनी फारसे मनावर घेतले नाही, हा नरेंद्र मोदींचा मोठेपणा आहे. परंतु केजरीवाल, उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी या मुख्यमंत्र्यांच्या ' हम करेसो कायदा ' या वृत्तीमुळे  त्यांना न्यायालयाचे फटके खावे लागतात.

पंजाब मधील पोलिसांनी दिल्लीत येऊन भाजपा दिल्लीचे प्रवक्ते तेजंदरसिंग बग्गा यांना अटक केली. गुन्हा काय तर दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याबाबत ट्वीटरवर काही शेरे मारले हा. हे केजरीवाल महाशय अनेक नेत्यांवर बेधडक भ्रष्टाचारांचे आरोप करीत आले आहेत, आणि शेवटी बदनामी खटला उभा राहिला त्या त्या वेळी निर्लज्जपणे क्षमायाचना करीत प्रकरणे मिटविली. मला आता असे वाटते की ज्या राजकीय नेत्यांनी केजरीवालांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता त्यांच्यापैकी एकाने तरी तो खटला पुढे न्यावयास हवा होता आणि मानहानी केस मधून करोडो रूपयाची भरपाई वसूल करावयास हवी होती. म्हणजे भारतीय राजकारणातलं हे काटेरी झुडूपं कायमचं छाटून टाकले गेले असते. 

केजरीवाल महाशह  पंजाब राज्याचे मुख्यमंत्री नाहीत. पण आप चे सर्वेसर्वा नेते. म्हणून पंजाब राज्याचे रीमोट कंट्रोलर. बस पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना आदेश दिला. मग पंजाबच्या पोलीसांनी दिल्लीत जाऊन तेजंदरसिंग बग्गा यांना अटक केले. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना केजरीवालांनी आदेश दिले ते  संविधानाच्या कुठल्या कलमाद्वारें दिले? केजरीवाल पंजाबचे गव्हरनर लागून गेले काय? दिल्लीतून तेजंदरसिंग बाग्गा यांना अटक करावयाची होती तर तेथील स्थानिक पोलीस कचेरीला कळवावयास हवे होते की नाही ! तसे कळविण्याची तसदी पंजाब पोलीसानी निश्चीतपणे  घेतली असती. कारण पोलीसाचं हे रूटीन काम आहे. पंजाबचे पोलीस शिकाऊ पोलीस नव्हते. याचा अर्थ तेजंदरसिंग बाग्गावर सूड उगविण्यासाठी केजरीवालांनी पोलीसाना
' जिथे असेल तेथून तेजंदरसिंगा बाग्गांना उचलावे ' असा आदेशच दिला असावा. पंजाब पोलिसांनी दिल्ली पोलिसाना न कळविता जेसंदरसिंग बाग्गांना घाईघाईत अटक केली.  त्यांना डोक्यावर पगडी घालून दिली नाही. त्यांच्या वडीलांनाही ढकलून दिले. यावरून केजरीवाल किती हलकट वृत्तीचे आहेत हे कळते.  देशाच्या प्रशासनात काम केलेल्या केजरीवालांना बाग्गांना अटक करते वेळी दिल्ली पोलीसांशी सल्लामसलत करण्याचे साध ज्ञान नाही असे ना कोर्ट मानणार ना कोणी राजकारण जाणणारा आम आदमी. पण  सुडबुद्धीने राजकारण करण्याची खोड या महाशहाला लागली आहे. हीच खोड केजरीवालांना भोवणार आहे. 

अशीच खोड महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लागली आहे. मला वाटतं उद्धव ठाकरे केजरीवालांचा सल्ला घेत असावेत. पण या दोहोंना हे ठाऊक नाही की योग्य वेळ आणि योग्य संधी मिळते तेव्हा गृहमंत्री अमीत शहा विरोधी पक्षांच्या नेत्यांची खोड मोडून टाकतात. श्री अमीत शहांनी पश्चीम बंगालच्या दौर्यावर असताना बाग्गाच्या अटके नंतर लागलीच संधी टिपली असावी. पाच मिनिटात मोबाईल वरून चक्र फिरविले, पंजाब पोलिसांनी बाग्गांना उचलले तेव्हा लागलीच दिल्ली पोलिसांनी तेजंदरसिंग बाग्गाना पंजाब पोलीसांनी किडनॅप केल्याची केस नोंदवून हरियाणा पोलिसाना बाग्गाची सुटका करून घ्यावे असा संदेश पाठविला असावा. चिदंबरम  प्रणव मुखर्जी, सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील सारख्या धुरंधर गृहमंत्र्याना गुजरातचे गृहमंत्री अमीत शहा पुरून उरले आहेत. कपील सिब्बल, अभिषेक मनु संघवी आणि सलमान खुर्शीद सारख्या काॅग्रेसची चतूर तल्लख वकील मंडळींना ही अमीत शहा काय चीज आहे हे कळून चुकले आहे. केजरीवालांना या प्रकरणात न्यायालयाने चपराक दिली आहेच पण अमीत शहांनी धोबी पछाड केल्याचे दुःख अधिक झाले असावे. तेजंदरसिंग बाग्गा दिल्लीतील केजरीवाल सरकार मधील भ्रष्टाचाराच्या केसेस उघड करण्याचे काम करतात. केजरीवाल सरकारच्या प्रशासकीय चूका शोधतात. तेजंदरसिंग बाग्गा भाजपाचा एक मोठा तोफखाना म्हणून ओळखले जातात. म्हणून केजरीवालानी सुड उगाविण्याची संधी साधली पण शेवटी अमीत शहांच्या शहाणपणा पुढे  केजरीवालांचा टिकाव लागला नाही.  

शीख धर्मात पुरूषांच्या वेशभूषेत पगडीला धार्मिक महत्व आहे. म्हणून दिल्लीत शीख समाज केजरीवालांच्या विरोधात निदर्शन करीत आहे. पंजाब मध्ये ही भाजपा सोबत कॅप्टन अरमिंदरसिंग पंजाब सरकार विरोधी निदर्शने करीत आहेत. घटना तर मामूली होती पण जी कारवाई केली ती केजरीवालांच्या अंगावर शेकली गेली. पंजाब निवडणूकीत जिंकला पण आता पुर्णपणे गमावून बसण्याची स्थिती केजरीवालांनी स्वतःहून ओढवून घेतली.  आता तर केंद्र सरकराने दिल्ली महानगरपालिकेची रचना मोडीत काढली आहे. कालपासून शाहीनबागवर बूलडोझर फिरवावयाला सुरूवात केली आहे.  दिल्लीतील दंगलीत आप च्या नेत्यांचा ही हात असल्याची बातमी आली आहे. कोरोनेच्या साथीत केजरीवाल सरकारने ऑक्सीजनचा केलेला काळाबाजार उघडकीस येईल. थोड्या दिवसानंतर प्रजासत्ताक दिनी किसान आंदोलनात केलेल्या धुडघूसावर कारवाई हाती घेतली जाईल त्यातही आप पक्षांच्या नेत्यांची चौकशी सुरू होणार आहे. खलिस्तान चळवळ पुनरूज्जीत संबंधी चौकशी सुरू होत आहे. तिथे ही केजरीवाल अडकले जाण्याची शक्यता आहे. केंद्र-राज्य संघर्ष मधील रंणागंणावरील लढाईला केंद्र सरकार सज्ज झाले असल्याचा हा शंखनाद असावा.

केजरीवाल यांना पंजाब तर सोडाच पण दिल्लीतील सत्ता चालवितांनाच घाम फुटणार आहे. पंजाब मधील निवडणूकीतल्या विजयाने त्यांचा उन्माद इतका वाढला आहे की भाजपा आणि पंतप्रधान मोदींशी मीच टक्कर देऊ शकतो हे दाखविण्यात ते दंग झाले आहेत. देशांतर्गत राजकारणात पंतप्रधान मोदी शांत दिसत आहेत. कारण ते जागतिक राजकारणात भारताचा वरचष्मा वाढविण्याच्या कामात गर्क आहेत. पण गृहमंत्री अमित शहा प्रोॲक्टीव झाले आहेत असे तेजंदरसिंगच्या अटके प्रकारणात जी शिताफी दाखविली त्यावरून स्पष्ट दिसत आहेत. संसदेतील प्रश्नोत्तरात एकदा तर त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना  ' यदी हमारे सामने कोई ऑखोमें आँख डालके बात करता है, तो मैं उनके आँखोमे आँख डालकर उसे जबाब दुंगा ' अशी  चक्क धमकीच दिली आहे. अशाच पद्धतीने अमित शहांनी आम आदमी पार्टीचे संजयसिंह यांना ' स्वपक्षाच्या विजयाची नशा आणि दुसर्या पक्षाच्या विजयाचा फोबीया कोणाला होत आहे असे भर संसदेत सुनावून संजयसिंहाची बोलती बंद केली. मला वाटतं केजरीवाल यांना बजेट सत्रात त्यांचेच खासदार संजयसिंहाची बोलती बंद केली ही माहिती मिळाली नसावी. अमीत शहांनी पश्चीम बंगालचा दौरा करून तेथील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला आहे. याचा अर्थ केंद्रीय गृहमंत्री अमीत शहां पुढील दोन वर्षासाठी राजकारणात शठं प्रती शाठ्यम चे धोरण अवलंबविणार आहेत असे स्पष्टपणे दिसू लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...