बुधवार, २७ एप्रिल, २०२२

शिवसेनेने गमाविलेल्या संधी


काॅग्रेचे नेते मणी शंकर अय्यरने पाकिस्तान टि व्ही वरून केलेल्या विधानाने त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला होऊ शकला असता पण पंतप्रधान मोदींनी दुर्लक्ष केले. इथे मराठीचये नगरीत माननीय मुख्यमंत्री, जणू काही स्वबळाने सत्तेवर आल्यागत आपल्या हातातील पोलीस शक्तीचा उठसूठ वापर करीत आहेत. काल परवाचा तो ड्रामा आपण पाहिला. राणा दापत्यचं मातोश्री समोर हनुमान चालिसाचं काय ते आव्हान होतं ? तो एक मोठा नौटंगीचाच प्रकार मी मानतो. पण शिवसैनिकांनी त्याहून मोठी नौटंकी केली. तीन दिवस अगोदरच मोतोश्री समोर शिवसैनिक जमा झाले. स्वतःहून जमले की कोणाचा तरी आदेशातून ? कशासाठी ? आपल्या नेत्याच्या प्रति निष्ठा, की नेत्याचं संरक्षण करायला, की राणा दापत्यावर पोलीसा सोबत दशहत बसविण्यासाठी ?  याबाबत चे उत्तर मुख्यमंत्र्याच्या ऑफीस मधून किंवा त्यांच्या पक्षाकडून मिळाले नाही. संजय राऊत यांना आता कोणी सिरीयसली घेत नाहीत. परंतु झाले ते ठिक नाही. राणा दापंत्याला त्यांच्या घरी सुखरूप पोहचविण्यात येईल अशी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रीया दिली. वर्तमान  राजकारणातील आशेचं आणि प्रगल्भतेचं एक मोठं उदाहरण पाहावयास मिळालं. त्याबद्दल अजितदादाचे हार्दिक अभिनंदन ! राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वाचाळवीर नेत्यांनी त्यात जंयत पाटील ते मटकरी  शिवसेनेचे संजय राऊत ते विभाग स्तरावरील नेत्यांनी, आणि काॅग्रेसचे नाना पाटोळे सारख्यांनी अजितदादा सारखा शिष्टाचार अंगिकार करावयास हवा.

राणा दापत्य गुपचूप मुंबईत दाखल झाल्याची बातमी आली. शेवटी मातोश्री समोर शिवसैनिकांचा तो जमाव शनिवारी राणा दापत्याच्या सांताक्रुझ येथील घरासमोर दिसला. तेव्हाच कळून आले की तो जमाव पोलीसांच्या सोबत राणा दापत्यावर दशहत बसण्यासाठी होता हे सिध्द झाले. ही आमची ठोकशाही स्टाईल आहे असे सतत अभिमानाने  बोलणार्या संजय राऊतामुळे सत्तारूढ पक्षाची प्रतिमा अगोदरच धुळीस मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांनी संजय राऊतांना आवरावयास हवे असे भाजपा तर्फे सतत सांगण्यात येत असते. पण मुख्यमंत्री दुर्लक्ष करतात. या कारणामूळे दुर्दैवाने  मुख्यमंत्री खलनायक होऊ लागल्याचे  दिसू लागले आहेत. नंतर राणा दापत्याला पोलीसा करवें अटक झाली. म्हणे हा मोठा राजद्रोह ! कोर्टात पुन्हा एक केस दाखल. मविआ सरकारवर न्यायालयाचे  प्रत्येक केसवर फटके पडत असतांना राणा दापत्याचे आव्हान शांतपणे हाताळण्याची संधी वाया घालविली. कदाचीत न्यायालय मविआ सरकारच्या कारभाराला कंटाळून एखाद्या क्षणी  केद्र सरकारलाच सल्ला देईल की, मविआ सरकारशी चाललेल्या संघर्षावर उपाय शोधा. 

राणा दापत्यावरील राजद्रोहाचा आरोप सिद्ध होईल की नाही या संबधीत आता काही सांगणे घाईचे ठरते. पण ही केस सुप्रिम कोर्टात ही जाऊ शकते म्हणजे मविआ सरकारचा वेळ खाणार आहे. यातून मविआ सरकारने एक मोठी संधी गमाविली आहे. ती कोणती यासंबधीतील माहिती खाली देत आहे. 

तसे पाहता राणा दापत्यांला हनुमान चालीसाच्या पठणासाठी येऊ द्यावयास हवे होते. पोलीस बंदोबस्त अगदी नावापूरता ठेवला असता आणि हनुमान चालिसाचा पाठ झाला असता तर सरकार पक्षाचे काही नुकसान होणार नव्हतेच. नंतर त्या दापत्याला चहा-नाश्ता देऊन हसत हसत आभार मानले असते तर तो उद्धव ठाकरेंचा मोठा विजय ठरला असता. आपले हिंदुत्वाचे नाणे खणखणीत आहे हे दाखविता आले असते आणि महाराष्ट्रातील राजकारणाच्या प्रगल्भतेचे देशालाच नव्हे तर जगाला दर्शन झाले असते. 

प्रथम कोरोना संकट, नंतर अफगणिस्तान प्रकरण आता युक्रेन प्रकरणातून जग आर्थिक मंदीच्या विळख्यात जाण्याच्या मार्गावर आहे. त्यातून त्याला आर्थिक गुंतवणूकसाठी भारत सरस वाटतो आहे. या आर्थिक जगतात सर्वनाश होण्याचे भय जगातील सर्वच देशांना आहे

म्हणून तिसरे महायुद्ध होणार नाही. ते परवडणारे नाही. जी काही थोडीफार युद्ध होतात ती आपआपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बड्या शक्ती करीत आहेत. मोदी सरकारचे रशिया-युक्रेन मधील युद्धात जे धोरण अवलंबिले ते लाजवाब ठरले. आज सारं जग आशेने भारतातकडे पाहात आहे. बड्या राष्ट्राचे नेते भारतात येत आहेत. पण नेमकी याच वेळी भारताची आर्थिक राजधानी अशांत दिसली.  

गुंतवणूकीसाठी विदेशातून भारत भेटी साठी येणार्यामध्ये काॅर्पोरेटचे सिइओ, परराष्ट्र खात्याचे मंत्री, राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान तसेच त्या त्या देशाचे उद्योग, अर्थ आणि व्यापार खात्याचे सेक्रटरी इत्यादींचा समावेश असतो. गेले दोन महिने विदेशी नेत्यांच्या भारत भेटी सुरू आहेत. विदेशी शिष्टमंडळातील नेते मुंबईतल्या राजकीय घडामोडी वाचत असतात. आपल्या देशाच्या शिष्टमंडळांशी चर्चा करीत असणारच. शेवटी ते गुंतवणूक जिथे शांतता आणि स्थैर्य अशा राज्यातच करणार. फार तर काॅर्पोरेट ऑफीस फक्त मुंबईत ठेवतील. गेली आठ वर्षे सतत शिवसेना आणि मनसें केंद्र सरकार  ' महाराष्ट्र द्वेषी आहे ' असा आरोप करीत राहीले त्याचा उलटा परिणाम महाराष्ट्राला भोगावा लागतो आहे. डाॅ अनिल काकोडकर सारख्या वैज्ञानिकाने जैतापूरला अणू ऊर्जा प्रकल्पाला संमती दिली असताना ही उद्धव ठाकरेंनी विरोध केला. मेट्रोच्या कारशेड मध्ये आडकाठी घातली. भाजपा समवेत सरकारमध्ये असूनही विकासाच्या प्रोजेक्ट मध्ये खो घातला.  मविआ सरकारला मला सांगावेसे वाटते की  केरळ, तेलंगण, ओरिसा, आणि तामीळनाडू इत्यादी राज्यात विरोधी पक्षांची सरकार आहेत पण केंद्र सरकारशी उघड संघर्ष करीत नाहीत, याचे कारण काय आहे हे तेथील प्रशासनाकडून घ्यावे. आपले सरकार प्रशासनाचा  ही केंद्र सरकार विरूद्ध लढण्यासाठी उपयोग करीत आहे. आमची मुंबई आणि आम्ही मुबंईकर असे अभिमानाने घोषणा देतो पण आर्थिक जगतातील एक मोठी संधी गमावून बसलो आहोत. असे म्हटले जाते की एखादी आपत्ती मग ती कुठल्याही क्षेत्रातली असो ती सोबत आपल्यासाठी यशाची संधी घेऊन येत असते. इंग्रजी भाषेत म्हटले जाते की " An opportunity is a course of action which is immediately possible ." 

ही मुंबई तर सर्वांना संधी देणारी आहे. कारण आपली मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे. ती अंशात झाली की इथले उद्योग दुसर्या राज्यात जातात. असे का झाले यावर विचार करता मागचा इतिहास धुंडाळावा लागतो. लाल बावटावाल्यांची मुंबई अशांत ठेवण्याची नीती का यशस्वी झाली?  गिरणी कामगार का देशोधडीला गेला. कोण होते ते कामगार? मुंबईत फक्त लाल बावट्याच्याच युनियन्स होत्या का? मराठी कामगारांच्या अस्सल मराठी नेत्यांच्या युनियन्स होत्याच की ! गिरणी कामगार तर सारेच मराठी  होते की ! मराठी माणसाला घर घेणे मुंबईत अशक्य का झाले ? का मराठी माणसे विरार, नालासोपारा, ठाणे कल्याण मध्ये स्थालंतर झाला तेव्हा तर BJP was no where in power. मुंबई आणि देशावर ज्यांची सत्ता होती त्याच्यांशीच शिवसेना आता सत्तेतील भागिदार झाली आहे ना ! 

महाराष्ट्रातील तत्कालीन सरकार कडे दुरदृष्टी होती हे मी नाकारत नाही. पंरतु जमीनचे भाव बांधकाम व्यवसायामूळे वाढत जाऊ लागले. बांधकाम व्यवसायात भरपूर पैसा मिळतो हे चाणाक्ष सरकार मधील अतिचाणाक्ष नेत्यांना कळले होते. अशी नेते मंडळी करामती करून बिल्डर्स झालेले दिसतात. याच धंद्यात ज्याचे अनेक वेळा नाव ऐकतो तो डाॅन इथलाच. लाल बावट्यांना हाकलून लावण्यासाठी निर्माण झालेली शिवसेना ही त्यात सामील झाली. मराठी माणूस आणि गिरणी कामगार मुंबईच्या बाहेर फेकला गेला. मुंबईचा आधुनिक रित्या विकास होणे गरजेचं होतं पण अनेक उद्योग धंदे महाराष्ट्राच्या बाहेर गेले ते कायमचे. अजूनही वेळ गेलेली नाही. कारण सर्व कंपन्यांची हेडक्वार्टस् मुबंईत आहेत पण राजकारणातील सुडाची भावना कधी संपणार? आपल्या दारात जागतिक नेते गुंतवणूकी साठी येतात पण आपल्या सरकारचे लक्ष जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही कामानिमित्त महाराष्ट्रात येतात तेव्हा आपले मुख्यमंत्री पंतप्रधानाच्या भेटीला जात नाहीत. महाराष्ट्र राज्य ही पवार आणि ठाकरे घराण्याची जहागिरी आहे काय ? 

सुडाचे राजकारण असेच चालू राहीले तर ज्या  बिहार आणि उत्तरप्रदेश राज्यांना आपण बिमारू राज्यें म्हणून हिणवीत आहोत, ती आमच्या महाराष्ट्रापेक्षा पुढे गेलेली दिसतील. उत्तर प्रदेशमध्ये फिल्म इन्डस्ट्री ची उभारणी होत आहे. आपण बाॅलीवूड जगताशी सोबती झालो. पण आपली मूलं  बाॅलीवूड च्या फिल्म्स पाहून ड्रग्ज, मद्यपान, इझी मनी इत्यादी खतरनाक सर्पाच्या विळख्यात अडकत चालली आहेत. बाॅलिवुड मंडळी ' मुबंईने आम्हांला मोठं केलं ' असे गोड गोड बोलतात पण  कोरोना साथीत बाॅलिवूडने मदत केली आहे का, कोंकणातील पूरग्रस्तांना मदत केली आहे का? बाॅलीवुड जगताच्या डाॅनने देशात, मुबंईत बाॅम्बस्पोट घडविले तेव्हा बाॅम्बस्पोटात आपली माणसं अंपग झाली, काही कुटुंब आपला कर्ता गमाविल्यामुळे  उध्वस्त झाली. बाॅलीवूड मधील निर्माते, दिग्ददर्शक कलाकार मंडळीनी बाॅम्ब स्पोटात जी कुटंबे रस्त्यावर आली, त्यासाठी काही मदत केली आहे का? आपल्याच सरकारमधील मंत्री ज्यांचे संबंध डाॅनशी आहेत, ते जेलमध्ये आहेत तरी  राजीनामा देत नाहीत आणि आपण त्यांना बडतर्फ केलं नाही. डाॅनचा माणूस म्हणून आपण गप्प बसावे ? कुठे गेली आपली हिम्मत? हिम्मत चं सोडा, ती तर सत्ताधारी पक्षाकडे असतेच पण ती वापरण्यासाठी जी लागते ती आपली मती का मंद व्हावी?  बडतर्फ करा नवाब मलिकांना. वाट कसली पाहता आहात ? मविआ सत्तेवर येऊन अडीच वर्षे झाली. कोरोना मूळे प्रगती खुंटली हे मान्य आहे पण कोरोना ची सबब किती वर्षे वापरणार? 

महाराष्ट्र सरकाडून वीज पुरवठा कंपनीची थकबाकी वाढली, त्यामूळे विज निर्मिती कंपनीला कोळसा खरेदी करता येत नाही. याचा अर्थ महाराष्ट्राला अंधारात जाण्याची पाळी आली आहे. त्यावर मात्र मविआ सरकारचं दुर्लक्ष होत आहे. हे आपलं अत्यंत मोठं दुर्दैव. फक्त मानापनाच्या नाटकात शरद पवार आणि मुख्यमंत्री गुंतले आहेत. तर त्यांचे समर्थक त्यांच्या प्रती निष्ठा आणि शक्तीचे प्रदर्शन करण्याच्या नौटंकीत गुंतले आहेत. जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर म्हणतात '' काय ती शरद पवारांची संकल्प सभा ! उद्धव ठाकरेनीं राणा दापत्याला अटक करून मिडीयाचे लक्ष आपल्यावर केंद्रीत केले. शरद पवारांच्या संकल्प सभेबद्दल कुठे चर्चा ही झाली नाही." मला वाटतं शरद पवार आपले दोन्ही हात कपाळावर घेऊन बसले असावेत. प्रश्न हा आहे की या घटना आहेत की ही नाटकं ? की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यामध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धातले डावपेंचाचे खेळ ? 

नेत्यांच्या भ्रष्टाचारा संबंधीत राजकारणात जो काही  अलिखित करार आहे त्याचा भंग प्रथम भाजपा विरोधी पक्षांनीच केला तोही राष्ट्रीय स्तरावरून. तेथूनच राजकारणात शाब्दीक चकमकी वाढत गेल्या. त्याचे लोण काही राज्यात पसरत गेले. महाराष्ट्र आणि पश्चीम बंगाल मधील सरकारनी त्याला हिंसक स्वरूप दिले. तरी ही केंद्र सरकार संयम पाळत आहे. हळूहळू भाजपाचा संयम च सामर्थ्य बनते आहे. ज्यातून भाजपा प्रत्येक निवडणूकीत इतर पक्षांना वरचढ होत आहे. महाराष्ट्रात ही भाजपाच वरचढ राहणार आहे.

केंद्रात मोदी सरकार आरूढ झाल्यानंतर आयटी, ईडी, सिबीया, एनआयए इत्यादी केसेस फार वाढल्या आहेत अशी ओरड सारे विरोधी पक्ष करीत आहेत. ही वस्तुस्थिती आहे आणि मान्य आहे. पण त्या केसेस खोट्या  नाहीत. देशावर सतत काॅग्रेसनेच राज्य केले आहे. त्यामूळे भाजपा नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या केसेस असल्या तरी त्या किती असणार हो !  बहुतांश मिडीया मोदी सरकारच्या विरोधात असूनही मोदी सरकारमधील मंत्र्याच्या भ्रष्टाचाराच्या केसेस उघड करू शकली नाहीत. शिवसेनेचे वाचाळ नेते व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत म्हणत आहेत की, आमची सत्ता येईल तेव्हा आम्ही भाजपा नेत्यांवर खटले सुरू करू.' हा झाला निव्वळ पोरकटपणा. संजयजी, भाजपा नेत्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे असतील तर तुमच्या हाती केंद्रातील सत्ता येई तो पर्यंत का वाट पाहाता आहात? महाराष्ट्राची सत्ता वापरता आहातच ना? न्यायालयाने भाजपा नेत्यांच्या केसेस दाखल करण्यासाठी मनाई केली आहे का ? केंद्रात काॅग्रेस आणि काॅग्रेस प्रणित आघाडीचे सरकार असताना झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणाची संख्या आणि रक्कमेचा आकडा मोजता येऊ न शकणारा इतका अमाप आहे. मग अशी सर्व प्रकरणें दया किंवा अलिखीत करार दाखवून सोडून द्यावयाची का? आग लागो त्या अलिखीत कराराला आणि लग्न समारंभातील ती राजकारण्यांच्या मैत्रीची शोभाला !

एका संकटातून दुसर्या मोठ्या संकटात पडल्यावर आगीतून फोपाट्यात जाणे असा वाक्प्रचार आहे. तोच प्रकार महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना प्रत्यक्षात अनुभवयास मिळू लागला आहे. सन २०१९ च्या लोकसभेत पुन्हा भाजपा सत्तेतवर आल्यानंतर उद्धव ठाकरेंना कळावयास हवे होते की आणखिन पाच वर्षे युतीत राहणे श्रेयस्कर होते. त्यांच्या पक्षाला मंत्रीपदे अधिक मिळाली असती. भले ते महाराष्ट्रतल्या युती सरकारचे मुख्यमंत्री नसते तरी, ही ते निश्चीतच पणे टेन्शन फ्री असते. म्हणजे त्यांच्या अवती-भोवती आग तर निश्चीतच नसती. आग नसेल तिथे फोपाटा तरी कुठे उत्पन्न होतो ? मविआ सरकारच मुळी जनादेशाच्या भंगातून निर्माण झालेल्या अग्नीच्या विखारांवरून चालते झाले आहे. त्यामूळे आगीतून फोपाटा निर्माण होणार आणि  मविआचा  कुठला तरी एक घटक पक्ष फोफाट्यात सापडणार आहे. शेवटी त्या फोफाट्यात शिवसेना अडकली आहे. राजकारणात यशस्वी होणे हे एक फार कठीण काम असते. मोठे यश मिळण्यासाठी फार मोठा संयम असावा लागतो. तो नसेल तर दिलदारपणा तरी असावा लागतो. स्वर्गीय बाळासाहेबांनी आपल्या पेक्षा किती तरी वर्षाने लहान म्हणजे जवळपास पुत्र शोभेल इतक्या वर्षाच्या स्वर्गीय प्रमोद महाजनांचा युतीचा प्रस्ताव कसा आहे तो जाणून ही महाजनांकडूनच घेतला आणि युती जाहीर केली. शिवसेनेचा कुठला ही जेष्ठ नेता उपस्थित नसताना. असा बाळासाहेबांचा असा दिलदारपणा होता. म्हणून ते वंदनिय ठरले.

स्वर्गीय बाळासाहेबांच्या निधना नंतरच्या म्हणजे सन २०१४ च्या निवडणूकीत युती तोडून शिवसेनेने स्वतंत्र रित्या निवडणूक लढविण्याची फार मोठी चूक केली. त्या निवडणूकीत युती केली असती तर कदाचीत शिवसेनेला भाजपा पेक्षा अधिक जागा जिंकता आल्या असत्या. कारण बाळासाहेबांचं निधन आणि मोदींची लाट या दोन जमेच्या बाजू होत्या. शिवाय निवडणूकीतल्या जागांच्या वाटपातील हिस्सा ही शिवसेनेला अधिक देऊ केला होता. सन २०१९ च्या निवडणूकीतही शिवसेनेला जागा ही अधिक दिल्या होत्या. दोन्ही वेळा भाजपा शंभराच्या वर आणि शिवसेना ५५ ते ६० वर अडकली. भाजपाचा स्ट्राईक रेट शिवसेनेहून अधिक होता. सन २०१४ च्या निवडणूकीतील उद्धव ठाकरें यांनी प्रचारा साठी आपल्याहून वयाने जेष्ठ आणि अनुभव असलेल्या नेत्यांचा ही उपयोग करावयास हवा होता. जेष्ठ शिवसैनिकांशी सल्ला मसलत करून सभेतील भाषणाचे मुद्दे आणि उमेदवारांची योग्य निवड झाली असती तर अपेक्षित यश नक्कीच मिळाले असते. ज्या पक्षाला निवडणूकीत अधिक जागा मिळतील, त्या पक्षाचा मुख्यमंत्री असा सार्वजनिक रित्या केलेला करार होता. शिवसैनिकांच्या दृष्टीने मुख्यमंत्री शिवसेनेचा म्हणजेच विधानसभेवर भगवा फडकाविला अशीच भावना मनोहर जोशी आणि नारायण राणेंच्या काळात होती. पण आज मविआचे सरकार चे मुख्यमंत्री खुद्द पक्षप्रमूख उद्धव ठाकरें आहेत. तरी सामान्य शिवसेनेच्या समर्थकांमध्ये तशी भावना असली तरी ती पुर्वी सारखी उचंबळून येतेय असे जाणवत नाही.

केंद्र सरकार विरोधात जो संघर्ष उद्धव सरकारने मांडला आहे. त्यामध्यें शिवसेना चक्रव्युहात अडकली आहे. त्यातून बाहेर पडण्याच्या मार्ग तिला दिसत नाही. आता तर मनसे कात टाकून नव्या अवतारात आलेला आहे. मनसेने हिंदुत्व स्विकारले असले तरी महाराष्ट्रातील अमराठी मतदारांचा पाठींबा किती मिळू शकेल याबाबत शंका आहे. परंतु नाराज शिवसैनिक मनसेत परतणार आहेत. मविआने एकत्रितपणे विधानसभेच्या निवडणूका लढविण्याचे ठरले तर प्रत्येक पक्षांचा हिस्सा एकूण जागेच्या एक तृतीयांश होईल. त्यामूळे शिवसेनेत आणखिन नाराजी वाढेल. त्यातील काही माजी आमदार-खासदारांची मूले मनसे इतके भाजपाला ही पसंत करू शकतील. मराठी मताचा वाटा मिळावा असे एकूण चार मोठे पक्ष आहेत. त्यात मनसेची भर पडली आहे. शिवसेना आणि मनसे यांची ग्रामिण भागात फार खोलवर मूळे गेली आहेत असे नाही. शहरी भागात अमराठी लोकांची वस्ती मोठ्या संख्येने झाली आहे. अशांचा कल भाजपाकडे अधिक आहे. काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेसमधील नाराज असलेली मंडळी स्वाभाविकपणे भाजपात जातील. भाजपाकडील नेते इतर पक्षात जाणार नाहीत. कारण भाजपा महाराष्ट्रात सत्तेवर नाही. जनमानसात  निराशा सत्ताधारी पक्षासंबंधीची असते. त्यामूळे कधी ही विधानसभेच्या निवडणूका झाल्या तरी भाजपा महाराष्ष्ट्रात  प्रथम क्रमांकावर राहील ते ही अधिक जागा पटकावून. राष्ट्रवादी काॅग्रेस दुसर्या स्थानावर राहील. पण तो पक्ष ही शरद पवार आहेत तोपर्यंत एकसंघ राहील. तिसर्या स्थानावर शिवसेना, मनसे व काॅग्रेस मध्ये शर्यंत राहील. अर्थात हा एक चर्चेच्या ओघाने मांडलेला अंदाज आहे. दुसरा अंदाज असा आहे की जिथे विरोधी पक्षांची सत्ता आहे, तिथे केंद्र सरकार राष्ट्रपती राजवट लावणार नाही. कारण तेथील सत्ताधार्यांना उगीच जनतेची सहानुभूती मिळण्याची शक्यता असते हे मोदी-शहा जोडीला पक्के ठाऊक आहे. पण ----

एखाद्या राज्यातील कायदा व सुव्यवस्था फारच हाता बाहेर गेली तर मोदी सरकार अशा राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्याचा निर्णय घेईल सुध्दा. परंतु या घटकेला केंद्र सरकार संसदेत जी बिल्स पास करीत आहे त्याचा अभ्यास करता, बुलडोझरचे सुरू केलेले सत्र, मातब्बर खासदारांनी बळकाविलेल्या दिल्लीतील पाॅश सरकारी बंगल्यावर सुरू झालेली कारवाई , काल परवाच गुन्हेगारी, दंगली घडविण्यावर कडक उपायाचे क्रिमिनल आयडेन्टीफिकेशन प्रोसिजर नावाचे संसदेत मंजूर झालेले बील, भ्रष्टचार तसेच देशाची आंतर-बाह्य सुरक्षेसाठी ईडी, सिबिया, एनआयए इत्यादी यंत्रणा ज्या अर्थी प्रो-ॲक्टीव झाल्याला दिसतात  त्याअर्थी नवीन कायदे करीत विरोधी पक्षांना विशेषतः देशहीतात बाधा आणणार्या पक्षांना नेस्ताबूत करण्याचा केंद्र सरकारचा निर्धार असावा, हे स्पष्टपणे जाणवू लागले आहे. 

शिवसेना खलनायक ठरतेय का ?





महाराष्ट्रातील केंद्र -राज्य संघर्षाचे खरे सुत्रधार शरद पवार आहेत परंतु पवारांच्या खेळीमूळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खलनायक ठरण्याची शक्यता वाढत असल्याचे दिसत आहे. भाजपाशी युती करून केंद्र आणि राज्यातील सत्ता उपभोगून  मोदी- शहा जोडीवर गुजराती म्हणून हेटाळणी करण्याची उद्धव ठाकरेंची खाज हे संघर्षाचं मूळ कारण ठरलं आहे. राज ठाकरेंनी ही मागे असेच नॅरॅटिव्ह वापरून स्वतःच्या पक्षाचे नुकसान करून घेतले आहे. शरद पवार पंतप्रधान मोदीशी आजही सख्य ठेवून आहेत. यावर लक्ष केंद्रीत करून विचार मंथन करण्याची तसदी ठाकरे घराण्यातील उद्धव आणि राज या नेत्यांनी घेतली नाही.  

इतर विरोधी पक्ष मोदी-शहांवर टिका करतात. त्याचे कारण ते दोन्ही नेते गुजराती आहेत म्हणून नव्हे तर भाजपाचे नेते आहेत म्हणून. पंतप्रधान आणि गृहमंत्री पदावर अनुक्रमे नरेंद्र मोदी आणि अमित शहा, भारतिय संविधानाच्या कुठल्याही कलमाचं उल्लंघन न करता बसले आहेत. ही वस्तुस्थिती देशातील सर्व प्रांतीय लोकांनी स्विकारली आहे. त्यात बहुतांश मराठी जनता सुद्धा आहे. इतका काॅमन सेन्स भाजपाशी २५ वर्षाहून अधिक वर्षे मित्रत्वचे नातें ठेवणार्या उद्धव ठाकरेंकडें नसावा? हे त्यांना दैवत मानणार्या शिवसैनिकांचं दुर्दैव आहे. कारण पत्रकार-संपादक मंडळींची  विशेषतः उत्तर भारत आणि दाक्षिणात्य, मविआ सरकारचे शिल्पकार शरद पवार अधून-मधून पंतप्रधान मोदींची भेट घेत असतात त्यावर टिका करीत असतात.  शरद पवारांना पंतप्रधान मोंदींशी भेट मिळणे हे कठीण नसते. पंतप्रधान मोदी मनाने मोठे आहेत. सरकारी कामातला वेळ काढून सर्व पक्षांच्या नेत्यांना मोदीशी भेटायला मिळते. यात मोदींचा मोठेपणा आहे. मग मोदींच्या मोठेपणाचा आदर करीत युती सरकारात भागिदार राहण्यात उद्धव ठाकरेंना अडचणीचे का वाटलें ?  दस्तूरखुद्द स्वर्गीय बाळासाहेब आज हयात असते तर त्यांना ही पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी बसलेले पाहून आनंद झाला असता.

उद्धव ठाकरेंच्या स्वभावात काही तरी उणीव आहे. म्हणून मुख्यमंत्रीपद हाती असुन ही शिवसेनेच्या भवितव्यावर चर्चा होऊ लागली आहे. याची मुख्य कारणे तीन आहेत. एक काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेसची वारंवार करावी लागणारी मनधारणी. यातून बरीच मानसिक शक्ती खर्च होते. मन खचले की राजकीय डावपेचात धरसोड वृत्ती बळावते. दुसरे कारण शक्तीवान भाजपाशी आमने-सामने करावी लागणारी लढाई आणि तिसरे कारण राज ठाकरेंच्या नव्या अवतारातलं पुनरागमन, ही आहेत. शिवसेनेची अशी चोहोबाजूने कोंडी झाली आहे. त्यातून  झालेल्या स्थितीसाठी प्रामुख्याने पक्षप्रमूख उद्धव ठाकरें जबाबदार आहेत. 

शिवसेनेचे विद्यमान आमदार आणि मंत्रीच मविआ सरकारवर नाराज आहेत. मुबंई महानगर पालिकेत सेनेच्या जवळपास भाजपाचे नगरसेवक असूनही भाजपाने संपूर्ण सत्ता शिवसेनेला बहाल केली. हा फडणविसांचा मोठेपणा आहे. पण तोच भाजपाला महागात पडला. निवडणूकीच्या निकालानंतर लागलीच भाजपाने मुबंई महापालिकेची सत्ता काबीज केली असती तर शिवसेना सन २०१४ प्रमाणे २०१९ साली भाजपा सोबत राज्यात सत्तेत आली असती. उद्धव ठाकरेंना देंवेंद्र फडणवीसाच्या मोठेपणाचे भान ठेवणे गरजेचे वाटले नाही. कारण उद्धव ठाकरें बद्दल नितीन वागळेनी वर्णन केलेला कद्रुपणा असावा. पण मराठी मिडीयांनी या विषयातील देवेंद्र फडणवीसाच्या मोठेपणाबद्दल कौतूक तर सोडाच पण साधी बातमी सुद्धा दिली नाही. म्हणूनच मला सतत असे वाटते की मविआ सरकारची पेरणी सन २०१९ च्या विधानसभेच्या निवडणूकीच्या अगोदरच शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी केलेली होती आणि त्याला काही मिडीयांनी खत-पाणी पुरविले असावे. हा भारतीय राजकारणातला सर्वात मोठा दगाफटका आहे. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना ही असाच दगाफटका दिला. म्हणून राज ठाकरेंनी मनसे स्थापन केली. 

बजेट अधिवेशनातील सामारोपाच्या भाषणाच्या वेळी जेव्हा उद्धव ठाकरेनीं त्यांच्या कुटुंबियांच्या बेनामी संपत्ती जप्त केल्या संबधी  ' माझ्या कुटुंबियाना त्रास का देता, मला अटक करा ' असे म्हटले, त्यावर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हटले  ' आपल्या कुटुंबियांना बिएमसीत पाठवता कशाला? भोगा आता आपल्या कर्माची फळे ! '  यात राज ठाकरेंची स्पष्टोक्ती नव्हे, ठाकरें कुटुंबावर त्यांचे असलेले निस्सीम प्रेम आणि सच्च्या निष्ठेतून दिसलेली ती तळमळ आहे. म्हणूनच तर राज ठाकरे हे बाळासाहेबांसारखे दिलदार आहेत असे जेष्ठ पत्रकार निखील वागळे वारंवार कौतूक करीत असतात.

त्याच मुंबई महापालिकेच्या निवडणूका आता येत आहेत आणि नेमक्या याच वेळी ' राज ठाकरे आक्रमक हिंदुत्व घेऊन उद्धव ठाकरेंच्या सरकार विरूद्ध लढाईसाठी तयार झाले. हा योगायोग नाही. हे एक राजकीय डावपेचाचे अचूक टायमिंग आहे. ते राज ठाकरेंचेच असावे. या संबंधीत राजना भाजपाची फूस आहे हो, मनसे भाजपाची बी टीम आहे हो, अशी ओरड मविआ सरकारचे नेते कार्यकर्ते आणि समर्थक मिडीया करीत आहेत, ते केवळ त्यांची मतें राज ठाकरे फोडणार आहेत या भयापोटी. ते अचूक टायमिंग राज ठाकरेंचे असो की भाजपाचे, ते इतकं महत्वाचं नाही. परंतु  दोन काॅग्रेस पक्षांच्या मधोमध बसली आहे, ती कोण आहे? तिचं नातं काय या दोघांशी ? सध्या ती काय करते ? या प्रश्नाचे उत्तर मविआ मधील कुठला पक्ष देणार ? मुख्यमंत्र्यानींच आपल्या कामातून उत्तर दाखवावयास हवे होते. सारा वेळ विरोधी पक्षांच्या टिकावरील उत्तरे देण्यात का वाया घालवित आहेत? विरोधी पक्षांचा टिका करण्याचा हक्क आहे. तो तुम्ही केंद्र सरकार विरूद्ध वापरत नाहीत का ? सत्ताधार्यांनी विरोधी बाकावर बसलेल्यांच्या टिका-टिपणीचा आदर अधून मधून व्यक्त करण्याची गरज असते.

शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना भाजपा विरूद्ध उसकावून मागच्या दरवाजातून सत्ता हस्तगत केली. ती मात्र शरद पवाराची चाणक्य नीती असे कौतूक हेच मिडीयावाले करतात. पण मनसे भाजपाची बी टीम आहे हे मात्र आग्रहाने मांडत आहेत. काहीही पुरावे नसताना. द्वि वा तीन पक्षीय बखेडात ज्या पक्षाला आणि मिडीयाला जनतेनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाही, तो पक्ष आणि त्याचे समर्थक मिडीया वाद-विवादात पराभूत होतात. पण तसा पराभव मान्य न करण्याच्या अट्टाहासामूळे तो पक्ष निवडणूक मैदानात ही पराभूत होतो. आणि त्याचे समर्थक मिडीयावाले ही पराभूत होतात. काय स्थिती आज काॅग्रेसची. कुठे आहेत पत्रकार प्रताप आसबे आणि प्रकाश बाळ? भाजपा महाराष्ट्र द्रोही आहे असे मविआतील घटक पक्षासोबत मिडीयावाले ही सतत गेली आठ वर्षे घसा फूटेपर्यंत आरोप करीत आहेत. काय उपयोग झाला? काय उखडले मोदी-शहांचे तुम्ही? विना पुरावा तुम्हाला मते द्यायला जनता खूळी आहे का? उलट भाजपा विधानसभेत दोन्ही वेळा सिंगल लार्जेस्ट पार्टी राहीली.

केंद्र सरकार ईडी आणि सिबीया द्वारें ज्या केसेस उभ्या करीत आहेत, त्या खोट्या असतील तर मग मविआच्या समर्थक मिडीयांनी शोध वृत्ती डब्यात बंद करून ठेवली आहे का?  ज्यांची बेनामी संपत्ती जप्त होत आहेत, ती मंडळी केंद्र सरकार विरूद्ध कोर्टात का जात नाहीत? बहुतांश मराठी मिडीया सतत भाजपावर टिका करीत असतात. त्यामूळे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद काबीज केल्यापासून भाजपाची कशी जिरविली यात आनंद मानण्यात आपली अडीच वर्षे घालविली. पण ती केवळ मुख्यमंत्र्यांचीच नव्हे तर संपुर्ण मविआ सरकार आणि समर्थक मिडीयाची सुद्धा खर्ची झाली आहे. याचा प्रत्यय पुढे येणार्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणूकीच्या प्रचारात मविआला दिसेल.

आता उद्धव ठाकरेंना आपल्या मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात गृहखाते हवे आहे. का तर म्हणे मला भाजपाच्या नेते-आमदारांवर हव्या तितक्या केसेस टाकता येतील. ही काय इतकी सोपी गोष्ट आहे का? दुकाने, गाड्या, बसेस फोडणे सोपे आहे पण सरकार चालविणे सोपे नाही. तेथे पाहीजेत जातीचे. ईडी, सिबीआय, आयटी, आणि एनआयए व एनसीबीं इत्यादी संस्थांचे अधिकार पोलिस खात्यापेक्षा किती मोठे असतात हे उद्धव ठाकरेंना ठाऊक नसावे. ईडींना एखाद्या व्यक्तीकडे बेनामी संपत्तीची खात्री पटली की ते सरळ जप्त करतात. खटला दाखल करू शकतात. न्यायालयला सुद्धा आरोपीला इडीची कस्टडी द्यावी लागते.

असे एकैवात आले आहे की भ्रष्टाचाराच्या केसेस च्या बाबतीत राजकीय पक्ष परस्पर औदार्य दाखवित असतात ; आपआपल्या कुटुंबिय आणि नातेवाईकांना त्रास होईल अशी शेरेबाजी आणि कायद्यात अडकविण्याचे प्रयत्न टोकापर्यंत होऊ द्यावयाचे नाही ; एकमेकांच्या घरी लग्न वा गृहप्रवेशाच्या समारंभात सर्व पक्षीय मंडळी हजर व्हावीत, असा अलिखीत करार असतो. म्हणून तर माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधीच्या काळातले नगरवाला प्रकरण, रेल्वेमंत्री ललीत नारायणाचा संशयास्पद मृत्यु, माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधीच्या काळातील बोफर्स प्रकरण, वा माजी पंतप्रधान नरसिंहरावाच्या काळातील शेअर्स बाजारातील हर्षद मेहता प्रकरण, मायावती अखिलेष, मुलायमसिंग, चिंदंबरम, भुजबळ, खडसे यांच्यावर चाललेल्या केसेस गाजल्या आणि थंड झाल्या आणि होत जातील असे आपण अनुभवत आहोत. परंतु आपण मात्र राजकीय अभिनिवेशात सोशल मिडीयांवर एकमेकांशी भांडतो. का? कारण आपली बुद्धी आणि मन हे दोन अदृश्य अवयव जोश आणि नशा चे गुलाम आहेत.

महाराष्ट्रातील राजकारणात वर नमूद केलेला अलिखीत करार प्रथम कोणी मोडला या प्रश्नाचे उत्तर  ' न्यूज मुंबईतक  ' या चॅनेलवरून अभ्यासू पत्रकार, आणि विश्लेषक श्री सहिल जोशीनी एका चर्चेत मांडलेले मी ऐकले आहे. साहिल जोशी म्हणतात की, ' प्रथम मविआच्या नेते व कार्यकर्त्यानी देवेंद्र फडणविसच्या पत्नी संबंधीत अपशब्द वापरले आणि त्या अलिखीत कराराचा भंग केला. नवाब मलिक आणि संजय राऊत या दोन वाचाळवीरांनी,  सुर्य उगवला की  फडणवीस वर टिका करू लागले ते अगदी थेट रात्री पर्यंत.  धनंजय मूडें, जितेंद्र आव्हाड,,मटकरी, यांनी फडणविसावर टिका करतांना पुष्कळदा पातळी सुद्धा सोडली. जंयत पाटील वरून दिसतात सरळ पण अधिवेशनात फडणविसाची चेष्टा करण्यात आपले भाषण खर्ची घालतात. फडणविसांनी म्हणूनच पोल-खोल करावयास सुरूवात केली. ते विडीओ आणि पेनड्राईव्ह अधिवेशानात पेश करीत भाषण करीत होते तेव्हा तर राष्ट्रवादी, शिवसेना व काॅग्रेसचे रथी-महारथींचे चेहरे सुतकी झाले होते. 

भाजपा मध्ये वाचाळवीर नेते आहेत. चंद्रकांत दादां, राणे व त्यांचे पुत्र यांना अधून मधून मविआ सरकारच्या पाडण्याच्या तारखा देण्याची आणि प्रतिवाद करण्यात काय मौज वाटते देव जाणो ! नारायण राणे आणि उद्धव ठाकरें या नेत्यांमध्ये छत्तीसचा आकडा आहे. असे असले तरी मुख्यमंत्र्यांना अरे तुरे च्या भाषेतून टिकेचं लक्ष्य करणे हे फारच अती आहे. आपण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत याचे स्मरण राणेंनी ठेवणे गरजेचे आहे. शिवसेनेच्या नेत्यांना संयम ठेवता येत नाही. टिका करणार्यांना धोबी पछाड केल्याशिवाय त्यांना शांती मिळत नाही. परंतु विद्यमान मुख्यमंत्र्यांनी त्यांना आवर घालण्याचे कर्तव्य पार पाडण्याचे काम वार्यावर सोडून दिले आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ हा केवळ देखावा ठरतो. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे गोडवे गाणार्या पत्रकारांना ही काही पडले नाही असे दिसते.

दिल्लीतील राजकारणात काॅग्रेसच्या सुप्रिमो सोनिया गांधीनी प्रथम प्रचाराची पातळी खाली आणली. त्यांनी मोदींना ' मौतका सौदागर ' या शब्दात हिणविले. दुसरे एक नेते मणिशंकर अय्यरनी मोदींना 'चहावाला' असे तिरस्कार आवाजात हिणविले. काॅग्रेसचे आणखिन वाचाळ नेते दिग्विविजयसिंगने पंतप्रधान मोदींच्या पत्नी संबंधी आणि जाती संबंधी अभद्र उद्गार काढले. नंतर आम आदमी, तृणमूल काॅग्रेस आणि शिवसेना तसेच राष्ट्रवादी पक्षांच्या नेत्यांनी काॅग्रेसचा कित्ता गिरवयास सुरूवात केली. या संबंधी एक हिंदी भाषिक वृत्तपत्राचे संपादकांनी सन २०१७ साली म्हटले आहे , ' मजाक, तंज, अपमान इन सभीके बीच महीन रेखा होती है, जो दिखती तो नही लेकीन जरा सी भूल होनेपर भारी नुकसान की नींव रख देती है | काॅग्रेसने इस पर ध्यान नही दिया तो काॅग्रेसका नामोनिशाण मिट जायेगा |' आज काॅग्रेसची स्थिती किती दयनिय झाली आहे हे आपण पाहतो.

काॅग्रेसचे मणीशंकर अय्यरने तर पाकिस्तानात जाऊन तेथील टिव्हीवरून लाईव्ह कार्यक्रमात मोदी सरकारको आप हटाओ अशी विनंती केली होती. हे आपल्यापैकी अनेकांनी पाहिले असावे. हा खरा राजद्रोह आहे. तरी नरेंद्र मोदीनी त्यावर दुर्लक्ष केले. म्हणून तर ते खंडप्राय देशाचे लोकप्रिय पंतप्रधान शोभून दिसतात. कारण ते उद्धव ठाकरें सारखे वाड-वडीलांच्या राजकीय पुण्याईने नव्हे तर स्वकर्तृत्वाने पंतप्रधानपदावर पोहोचले आहेत. असे फक्त भाजपात च शक्य असते. पार्टी वुईथ डिफ्ररन्स ची टर उडविणार्यांनी (यात मिडीयांचा ही समावेश आहे) डोळे उघडून राजकीय पक्षांचा व्यवहार तपासावा. उगाच राजकीय नेत्यांची चमचेगिरी करण्यात आपली वाणी, लेखणी आणि वेळ वाया घालवू नये. लोकशाहीची विटंबना करण्यात जितके राजकीय नेते जबाबदार आहेत, तितकेच सरकारचं प्रत्येक घटनेत समर्थन करणारी मिडीया ही जबाबदार आहे. ' हमाम मे सब नंगे !' 



राज ठाकरे यांचा नवा अवतार - भाग २



मविआ सरकार बद्दल होणार्या ॲन्टी इन्कंबन्सीचा फटका शिवसेनेला तात्काळ पडून नेत्यासकट कार्यकर्ते ही मनसेकडे जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे भाजपा कडे परतीचे दोर कापले गेले आहेत. शिवसेनेने राष्ट्रवादी काॅग्रेस आणि काॅग्रेसशी घरोबा केला तेव्हा मनसे म्हणजे संपलेला पक्ष अशा शेखीत उद्धव ठाकरे वावरत होते. राज ठाकरेंच्या केवळ दोन सभांतून शिवसेनेची पुर्ण स्पेस घेऊ शकतो असे मनसेचे चित्र उभे झाले आहे. शरद पवारांना ही राज ठाकरेंनी केलेल्या टिकेवर उत्तर देण्यासाठी दोन वेळा पत्रकार परिषद घ्यावी लागली. मविआ सरकारचे दोन सर्वोच्च नेते हतबल झाल्यामूळे अजानसाठी लाॅऊड स्पिकरच्या उपयोगासाठी पोलीस खात्याच्या परवानगीची अट घालून तात्पुरता उपाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेला दिसतो. पण असे वेळोवेळी उपाय करीत बसणे मुख्यमंत्र्यांना अशक्य आहे. कारण मविआ मधील काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेस आपल्या मुस्लीम व्होट बँक गमाविण्याच्या कुरापती सहन करणार नाहीत. त्यातही शिवसेनेने सुद्धा अल्पसंख्याकांना गोंजारण्याचे काम सुरू केले आहे. पण त्यात शिवसेनेला यश फारसे मिळणार नसले तरी काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेसला शिवसेना हिंदुत्वाकडे झूकत आहे असे कारण सांगून सरकार मधून बाहेर पडण्याची संधी मिळेल. दोन्ही काॅग्रेस पक्ष अशा संधीची वाट पाहात आहेत. दुसरे असे की मुस्लीम जगतात पाकिस्तान तसेच भारतातील मुस्लीमांना जसे दुय्यम स्थान मिळते तसेच आपल्या येथील सेक्यूलर पक्षांच्या कळपात शिवसेनेला उपरे समजलेच जाणार.

सध्या आपल्या देशात अल्पसंख्याकांवर अन्याय होत आहे अशी आवई अमेरिका आणि काही युरोपियन देश उठवित आहेत. तशी आवई उठविणे अमेरिका, कॅनडा सारख्या देशांची जुनी खोड आहे. सध्या रशिया आणि युक्रेन मधील युद्धात मोदी सरकारने पश्चिमी देशांना साथ दिली नाही. त्यामूळे भारतविरोधी खोट्या-नाट्या आवई उठविण्याचे सत्र पश्चीमी देशांनी वाढविले आहे. अशा वेळी विदेशी शक्तींचा जो पाठींबा भाजपेतर पक्षांना मिळतो आहे, त्यातील आपला हिस्सा काॅग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांना गमाविणे अशक्य आहे. शिवसेनेने काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेसशी केलेला घरोबा म्हणजे असंगाशी केलेला संग असे भाजपाचे नेते म्हणत होते ते शिवसेनेच्या भल्यासाठी. यात भाजपाचे काही चूकले नाही. आम जनतेला ही हे आता पटत आहे.

अल्पसंख्याकांसंबंधीचे धोरण हा प्रश्न देशांतर्गतला आहे. वस्तुतः जे परकीय नागरिक इथे व्यवसायानिमीत्त इथे आले आणि राहिले अशांनाच अल्पसंख्याक मानण्यात यावे. आपल्या देशात ज्यांच्या शेकडो पिढ्या जन्मल्या, राहिल्या वाढल्या आणि वाढत जाणार आहे अशा सर्वजनांची भारत ही पितृभूमी आणि मातृभूमी आहे. उपासना पद्धत बदलेली असली तरीही. कुठल्याच प्रकारचा भेदभाव इथल्या मूळ समाजात नसावा आणि राजकीय फायद्यासाठी भेद निर्माण करून स्वतंत्र शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था निर्माण केलेल्या आहेत त्याही नवीन राष्ट्रीय शिक्षा नीती ज्या शैक्षणिक वर्षात सुरू होईल त्या वर्षापासून हळूहळू बंद करण्याची सुरूवात होणे गरजेचे आहे. तसेच उपासना पद्धती अंमलात आणताना हवा, पाणी, ध्वनीचे प्रदुषण होऊन सार्वजनिक आरोग्य बिघडत असेल तर ते थांबावयास हवे. उपासना पद्धतीमूळे समाजात भिन्नता अस्तित्वात आली आहे हे नाकारता येत नाही. त्यामूळे एखादा समाज देशाच्या, वा राज्याच्या वा शहराच्या भागात, जिल्ह्यात, एकाच उपासना पद्धतीचे लोक एकवटले दिसतात. मग तो भाग मुस्लीम बहूल झालेला किंवा ख्रिस्ती बहूल झालेला दिसतो. अशा भागात भाजपेतर पक्षांकडून राजकारण खेळले गेले, तेही पक्ष स्तरावरून आणि हातातल्या सत्तेतील प्रशासनाचा वापर करून. त्यांच्या उपासनेत कुठल्याही प्रकारचे निर्बंध नाहीत उलट प्रोत्साहन दिले गेले आहे आणि आज ही दिले जात आहे. अशा मुस्लीम बाहूल भागात हिंदू समाजाची स्थिती कशी झाली आहे हे आपण काश्मीर फाईल्स चित्रपटातून पाहिले आहे. याशिवाय हिंदु बाहूल विभागात तर मुस्लीम बांधवांना स्पेशल व्यवस्था आहे, कारण त्यांची संख्या कमी आहे म्हणून. म्हणूनच हिंदु समाज हनुमान चालीसाचे पठण सामुदायिक रित्या करण्याच्या मनस्थितीत आला आहे.  

शिवसेनेचे अनिल देसाई म्हणाले  'आम्ही भीमरूपी स्तोत्र म्हणणारे आहोत.'  प्रश्न भाषेचा नाही. देवाला कुठल्याही भाषेतलं स्तोत्र चालते.  इतकी वर्षे शिवसेनेचे नेता म्हणून काम करीत आहात तरी प्रकरण काय ते तरी समजून प्रतिक्रीया द्या की ! पण त्यांचा दोष नाही. कारण आपले मुख्यमंत्री म्हणतात  ' आम्ही गदावाले मारूतीचे फक्त आहोत, घंटा वाजविणारे नाहीत ' काय म्हणावं? आम्हीच ज्ञानी, आम्हीच शक्तीशाली, अशा तोर्यात म्हणता आहात, म्हणजे आख्खा डोंगर हातात घेऊन  संजीवनी वनस्पती आणणार्या मारूती पेक्षा अधिक शक्तीवान आहात का?  हनुमान मंदिरात घंटा फक्त शेंडी आणि जानवं वाले वाजवितात काय?  हीच ती कद्रु वृत्ती. हाच तो अहंकार ! घरात हनुमान चालिसा म्हणा, देवाची घरात पूजा करा,  हे मान्य आहे. देव सर्वत्र आहे म्हणून तो घरात आहे हे ही मान्य. मग प्रेषित महमंद पैगांबर आणि प्रभू येशु ख्रिस्त घरात असणारच ना ! त्यांना सांगा की चर्च आणि मशीदीत कशाला जाता?  तसा उपदेश देण्याची ताकद, हिम्मत उद्धव ठाकरे सरकारकडे आहे का? 

एकं सत् विप्रः बहुधा वदन्ती | (देव वा परमेश्वर एकच आहे. फक्त अनेक नावाने ओळखला जातो.)
ईशावास्यम इदं सर्व | , ईश्वर सर्वत्र आहे
आकाशाम् पतीतं तोयं यथा गच्छति सागरम् |
सर्व देवं नमस्कारः केशवं प्रतिगच्छति || (आकाशातून पडणार्या पावसाचे पाणी शेवटी समुद्राला जाऊन मिळते तद्वत अनेक असे देव आपण मानतो, त्या सर्वांना केलेला नमस्कार शेवटी केशवं म्हणजे विष्णू देवालाच पोहचतो.) तोच ब्रह्म, तोच विष्णू आणि तोच शिव. म्हणजेच जन्म देणारा, पालन पोषण करणारा आणि मृत्यूची व्यवस्था करणारा शीव. म्हणून आपल्या संस्कृतीत एखाद्याचा मृत्यु झाला तर जीव शिवाला भेटावयास गेला असे म्हणण्याचा प्रघात आहे. The God म्हणजे Ganerator, Observance and Distruction उत्पत्ती स्थिती आणि लय. हेच ते शाश्वत सत्य भारत वर्षात स्विकारले गेले आहे, तेही जगातल्या इतर संस्कृती जन्मल्या ही नव्हत्या तेव्हापासून म्हणजेच अनादी कालापासून. हे सत्य अमेरिकेतील ख्यातनाम इतिहासकार ड्युरांट, आपल्या राष्ट्रीय काॅग्रेसचे अध्यक्ष ॲनी बेंझट, आणि भारतातले ब्रिटीश व्हाॅईसराय लार्ड कर्झन इत्यादीं पाश्चीमात्य विचारवंतानी मान्य केले आहे.  आणि हेच ते सत्य भाजपा सोडून इतर पक्षाचे नेते विदेशी शक्तींच्या दडपणामुळे आणि राजकीय फायद्यासाठी मान्य करण्याची हिंमत दाखवित नाही. आपल्या देशाचा सर्वांगिण विकास फक्त आणि फक्त सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि विज्ञान निष्ठा जोपासल्या तरच होऊ शकतो. भारतीय जनता पार्टीचा प्रवास त्या मार्गावरून जात आहे असे निदान दिसते आहे. म्हणूनच तो पक्ष बलवान झाला आहे. अर्थात आपल्या पैकी काही जणांचे या संबंधी दुमत असू शकते. ते मी स्विकारतो.

स्वातंत्र्यानंतर सरकारच्या फाजील लाडामूळे अल्पसंख्याकांची मानसिकता अशी झाली आहे की ते इथल्या मूळ प्रवाहात येऊ इच्छीत नाही. विरोधी पक्षांच्या कचखाऊ धोरणामूळे किंवा लाचारीमूळे तसेच विदेशी शक्तीच्या दुसर्या देशांतर्गत ढवळा-ढवळ करण्याची जी खोड जडली आहे त्यामूळे अल्पसंख्याकांचा प्रश्न आंतरराष्ट्रीय झाल्याचा दिसतोय. पण तो त्यांच्या दृष्टीकोनातून. 

दुसर्या बाजूला केंद्र सरकार आपली विदेश नीती राबवित असताना विदेशी दडपणाला चोख उत्तर देत आहे. हे आपण रशिया- युक्रेन युद्धा संबंधीतला पंतप्रधानांनी दाखविलेल्या कणखरपणातून पाहिले आहे. तसाच कणखरपणा परराष्ट्र खात्याचे मंत्री एस जयशंकर यांनी मानवाधिकारांवर अमेरिका सारख्या बलाढ्य देशाला तडाखा देताना वापरला आहे. श्री जयशंकर यांच्या विदेशातील पत्रकार परिषदा यु ट्युब वरून पाहिल्या आणि ऐकल्या तर आपली विदेश नीती किती मजबूत झाली आहे हे कळून येते. म्हणून भारतीय जनतेचा मोदी सरकारच्या धोरणास प्रचंड पाठींबा मिळत आहे.

मोदी सरकारच्या धोरणांना मराठी जनतेचा ही चांगला पाठींबा मिळतो आहे. हे आपण लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूकीतून सलग दोनदा अनुभवला आहे. हा अंत्यंत महत्वाचा मुद्दा शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते, समर्थक संपादक आणि विचारवंत मंडळी लक्षात घेत नाहीत. राडा करण्यासाठी अनेक शिवसैनिक गोळा करता येतात. तसे मतदार गोळा करता येत नाहीत हे सत्य शिवसेनेने स्विकारून राजकीय व्यवहार ठेवला असता तर शिवसेना महाराष्ट्रात सिंगल लार्जेस्ट पार्टी नव्वदच्या दशकातच दिसली असती.

विद्यमान सरकारची स्थिती अशी आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राज्यातील ग्राऊंड रियाॅलीटी दिसेनासी झाली आहे. मतदार बदलत आहे म्हणजेच समाज बदलत आहे. म्हणजे राजकारण बदलत आहे. कदाचीत उद्धव ठाकरें समोर शरद पवारांनी देशपातळीवर विरोधी पक्षांच्या ऐक्याचे जे चित्र रंगविले त्यातून आपली प्रतिमा राष्ट्रीय पातळीवरील नेता अशी होऊ शकते या आशावादाने किंवा राजकीय प्रगल्भतेच्या अभावाने किंवा अहंकाराने उद्धव ठाकरेंना भाजपा पासून दूर नेले असावे. शरद पवारांचे वाढते वय आणि त्यांची घसरती प्रतिमा उपयोगी पडणार नव्हती. खुद्द शरद पवारांनी पंतप्रधान नरसिंहरावांना आव्हान देण्याचा जो प्रयत्न केला होता तो त्यांच्यावरच उलटला गेला. पंतप्रधान नरसिंहरावांनी संरक्षण मंत्रीपदावरून हटविले आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदी पाठविले. शेवटी राहिले फक्त राष्ट्रवादी काॅग्रेसचे अध्यक्ष ते ही दोन स्तरावर.एक अखिल भारतीय स्तरावर आणि महाराष्ट्र राज्यस्तरावर ही तेच आहेत. बाकी ते जयंत पाटील महाराष्ट्रातलया राष्ट्रवादी काॅग्रैसचे अध्यक्ष फक्त नावापुरता आणि सरकारात फक्त मान डोलावयाला. पत्रकार परिषदेत मविआ सरकार आणि पक्षातर्फे काही मांडावयाचे असेल तर अजीतदादा मांडत असतात.

आता तर राज ठाकरे नव्या वेषात अवतरले आहेत. त्यातून नुकसान शिवसेनेचेच होणार. काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेसला याचे बिलकूल सोयर-सुतक नसणार. कारण महाराष्ट्रात त्यांनी शिवसेनेला सत्तेत घेतले असले तरी त्यांची प्रतिमा हिंदुत्वाची होणार नाही. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव, तर  हिंदुत्व म्हणजे सर्वधर्मसमभावातल्या धोरणातील त्रूटी दूर करणे हे होय. या त्रुटी दूर करण्यास विरोध करणे म्हणजे अंधाराचा स्विकार करणे हे होय. अंधाराचा स्विकार म्हणजे ' विनाशकाले विपरीत बुद्धी '  याहून अधिक काही सांगण्यासारखं शिल्लक राहिलेलं नाही.

राज ठाकरे यांचा नवा अवतार - भाग १



मविआ सरकार विरूद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा श्री राज ठाकरें यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी मुबंईतील शिवाजी पार्क येथे तसेच चैत्र नवमीला ठाणे येथे अशा दोन जंगी सभा घेऊन मविआ सरकार विरूद्ध रणशिंग फूंकले. दोन्ही ठिकाणी मविआ सरकारचे बाभाडे तर काढलेच पण मविआचे शिल्पकार शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वाचाळ नेता संजय राऊत यांचा ठाकरी भाषेत समाचार घेतला.  मुस्लीम बांधवांच्या प्रार्थना स्थळावरून भोंग्याच्या आवाजात होणारं अजान हा सार्वजनिक रित्या उपद्रव ठरत असल्याचा न्यायालयाने दिलेल्या निवाडाच्या पाश्वर्भूमीवर त्या निकालाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला ३ मेची मुदत देऊन राज ठाकरें यांनी एक प्रकारे कडक इशारा दिला. या इशारामुळे उद्धव ठाकरे सरकारला बॅकफूटवर जावे लागले आणि पोलिस खात्याच्या परवानगी शिवाय लाॅऊडस्पिकर चा वापर करता येणार नाही असे फर्मान काढावे लागले. शरद पवारांना राज ठाकरेंनी केलेल्या टिकेवर दोन वेळा पत्रकार परिषेद घ्याव्या लागल्या. संजय राऊत यांची तर बोबडी वळाली. शेंडी आणि जानवेच्या हिंदुत्वाने शरद पवार उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांची इतकी घबरगुंडी होईल असे वाटले नव्हते. तरीही मविआ घटक पक्षांची नेते मंडळी उसनं अवसान आणत राज ठाकरेंच्या सभा म्हणजे फक्त करमणूक तर त्यांच्या चेले मंडळींनी आम्ही संपलेल्या पक्षाबद्दल प्रतिक्रीया देत नाहीत असे पोरकट विधान केलं.

राज ठाकरेंच्या या कडव्या हिंदुत्वाच्या नव्या अवताराने शिवसेना हादरूनच गेली आहे. राज ठाकरे अयोध्याला जाणार आहेत असे जाहीर झाले तेव्हा शिवसेनेतर्फे आदित्य ठाकरे अयोध्याला जाणार असे शिवसेनेने घोषित केले. कसे का असेना पण मविआंला शेवटी राम आठवला हे ही नसे थोडके. तसे पाहता ध्यान, जप आणि पुजा-अर्चा न करता आपल्या मुखातून रामनाम बाहेर येत असते. रस्त्यात कोणी ओळखीचे भेटले की रामराम म्हणतो, का तर प्रत्येकाच्या हृदयी राम बसला आहे. समोरच्या व्यक्तीला आणि स्वतःला श्रीरामाचा पराक्रम, परम कोटीची शालीनता आणि क्षमाशिलता, सज्जनता, इत्यादी दैवी गुणसंपत्तीचा आपल्याला विसर पडू नये म्हणून आपण जय श्रीराम म्हणतो. एखाद्या व्यवसायात प्रगती खुंटली तर त्या व्यवसायात राम राहिला नाही असे म्हणतो. कोणी मृत झाला की अमक्याने अखेरचा राम म्हटला असे कळवितो. का तर त्या मृत व्यक्तीच्या आत्म्याला शाती प्राप्ती व्हावी अशी विनासायास ईश्वराकडे प्रार्थना करतो.

आदित्य ठाकरे खरोखरीच अयोध्याला जाणार आहेत तर त्यांनी अवश्य जावे पण ' हिंदु देव कोरोनाला घाबरले अशी टिका करणारे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत आणि देव-धर्माचे मी अवडंबन माजवत नाही असे म्हणणारे शरद पवार यांना प्रथम भेटून सल्ला घेतला तर बरें होईल. तसेच आपल्या पिताश्रींना ही अयोध्येतील मंदिरात शेंडी आणि जानवे घातलेले ब्राह्मणी हिंदुत्व पचेल का हे विचारून अयोध्या साठी प्रयाण करावे.  त्यांच्या उत्तरातून महाराष्ट्रतल्या जनतेला केंद्र सरकारशी जो संघर्ष सुरू झाला आहे त्याचे कारण काय हे कळण्यास मदत होईल. कारण सध्या न्यूज चॅनेल्स आणि वर्तमान पत्रातून जे कळते त्याबाबत आमचा संभ्रम होतो आहे म्हणून हा सल्ला. पण लागलीच मनात आले की  आदित्यजींनी या तीन महनीय व्यक्तीकडून मार्गदर्शन घेण्याची तशी गरज नाही म्हणा, फक्त आशिर्वाद घेऊन अयोध्येच्या प्रवासाला निघावे असे वाटते. कारण या भौतिक जगातल्या राजकीय विचारसरणीची बंधनं श्रीरामाच्या दर्शनाला जाताना आपसूक गळून पडतात. श्रीराम माहात्म्यात तसे म्हटले आहे ---
" कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानाम | "
(श्रीरामाचे नाव कल्याणकारक वस्तूंचा साठा आहे. श्रीरामाचे नाव हे कलियुगातील सर्व दोषांचा नाश करणारे आहे. अपिवत्र वस्तूंनासुद्धा पवित्र करणारे आहे.)
शेवटी म्हटले आहे ---
" बीजं धर्मद्रुमस्य भवतां भूतये रामनाम || "
(श्रीराम नाव हे धर्मरूपी वृक्षाचे बीज आहे. असे हे श्रीराम नाव तुम्हाला वैभव प्रदान करो.)
इथे धर्म ही संज्ञा फार व्यापक आहे. तसे पाहता आपल्या धर्माचे खरे नाव शाश्वत धर्म म्हणजेच सनातन धर्म असे आहे. श्रीराम नाव हे धर्म वृक्षाचे असे बीज आहे की ते मानवतेच्या ही पुढे जात चराचर सृष्टी मधील सर्व प्राणीमात्रांच्या तसेच वृक्षवेलींच्या ही कल्याणाचा विचार समाविष्ट आहे. म्हणून समर्थ रामदास स्वामीनी दासबोधात म्हटले आहे, ' प्राणीमात्रा जीवें लागे बर्या शब्दे | ' आता  अयोध्येला श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिर होत आहे, तिथे आदित्यजी जात आहेत म्हणजे परमात्म पद प्राप्त साठीचा हा प्रवास आहे आणि या प्रवासात श्रीरामाचे नाव ही एक शिदोरी असते.  श्रीराम माहात्म्य मध्ये म्हटले आहे, 
 पाथेयं यन्मुमुक्षोः सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य | म्हणून आम्हांला ही आनंद आहे. आदित्य ठाकरेंना हार्दिक शुभेच्छा ! जय श्रीराम !

राज ठाकरे यांनी अजान संबंधीच्या इशाराचं स्वरूप कसे असेल याची प्रात्यक्षिके काही ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसाचं लाॅऊड स्पिकर वरून पारायणं करून दाखविली आहेत. दादरच्या शिवसेना भवनाच्या समोर हनुमान चालीसाची लाॅऊड स्पिकर वरून पारायणं केली. हा एक प्रकारे मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेवर केलेला हल्लाच आहे, असे मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वाटलं तर त्यात नवल वाटू नये. कारण मूलतः शिवसेनेचा पिंड हल्ला-गुल्ला करण्याचा आहे असे तिच्या स्थापनेपासूनच अनुभवयास येत राहिला आहे. शिवसेनेत उभी फूट पडली आणि राज ठाकरेंनी मनसे पक्ष स्थापन केला. मविआ सरकारचे प्रमूख थोरले बंधु उद्धव ठाकरे असले तरी राज ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरें प्रमाणे भगव्या रंगाची शाल अंगावर घेऊन राज्य सरकारशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

राज ठाकरे यांचा असा अवतार कोणाला टोचल्यासारखं वाटत असेल तरी अजान संबंधीतल्या तक्रारीत तथ्य नाही असे कोणी मानू नये. तसेच तक्रार ही प्रतिक्रीयात्मक नसावी. पण हजार वर्षे आपल्या पुर्वाजांनी या देशावर राज्य केले म्हणून आपले सर्व लाड, हट्ट पुरे व्हावेत अशा गुर्मीत मुस्लीम समाजाने राहू नये असे वाटते.  वस्तुतः ते जे राज्यकर्ते होते ते आपल्या देशावर आक्रमण करून राज्यकर्ते झाले. जे कोणी आपले बांधव कोण्या मुस्लीम किंवा ख्रिस्ती आक्रमकांच्या जबरदस्तीने धर्मांतर झाले आहेत त्यांचे पुर्वज हिंदुच होते. इडोनिशिया सारखा देश मुस्लीम असूनही श्रीराम आमचे दैवत आहे असे अभिमानाने म्हणतात. तसा भाव मुस्लीम बांधवाकडून अपेक्षित आहे आणि ते रास्त आहे. याचे कारण आपल्या देशाची धर्माच्या नावाने फाळणी झाली आहे. परंतु असे असूनही हिंदु समाजाला स्वराज्यात ही सापत्न वागणूक मिळत राहीले हे एक शल्य ज्यांना टोचते आहे त्यांचा ही विचार राज्यकर्त्याने करायला हवा होता. तो आता केंद्र सरकार टप्प्या टप्प्याने घेत असल्याचे दिसते  आहे. त्यामूळे विरोधी पक्षांचा थयथयाट होत आहे. त्यातूनच केंद्र-राज्य संघर्षाने राजकारण लिप्त झालेलं दिसते आहे. भाजपा सरकार आपल्या निवडणूक जाहिरनाम्यातील वचनाची पुर्तता करीत आहे. या पलिकडे या मुद्यावर चर्चेची गरज नाही.

उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू कधी तरी एकत्र येतील अशी आशा असलेला वर्ग महाराष्ट्रात आहे. परंतु ती आशा हवेत विरून गेली आहे. कारण  उद्धव ठाकरें यांनीच शिवसेनेला स्युडो सेक्युलरिस्ट  कळपात बांधले आहे. मनसेने सुद्धा सन २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूकीत काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेस च्या प्रचार सभेत मदत केली होती. पण त्याचा उपयोग झाला नाही. यात राज ठाकरेंचा दोष नाही. पंतप्रधान मोदींचा करिष्मा तसेच मोदी सरकारने केलेल्या लोकहिताच्या कामाच्या बळावर सन २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूकात पुन्हा एकदा सोकाॅल्ड सेक्युलरीस्ट पक्षांचा दारूण पराभव झाला. त्यात राज ठाकरेंच्या पक्षाचे  फारसे नुकसान झाले नाही. कारण मनसेने लोकसभेच्या निवडणूकात उमेदवार उभे केले नव्हते. पाच राज्याच्या विधानसभेतील निवडणूकात भाजपाने  चार राज्यात विजय मिळविला. हे पाहून भाजपा २०२४ च्या लोकसभेच्या निवडणूकीत ही मोदी सरकार विजयी होणार असा अंदाज राज ठाकरेंने ही बांधला असावा. दुसर्या बाजूला शिवसेनेला सेक्युलर पक्षांसोबत जाण्याची अवदसा आठवली. मधल्या रस्त्यावर मविआ सरकारच्या कारभारा बाबत नाराज असलेले शिवसैनिकाचे मंत्री, आमदार आणि कार्यकर्ते हताश पणे उभे आहेत. हीच ती संधी आहे, आणि हीच ती वेळ आहे, शिवसेनेला खिंडार पाडण्याची असा विचार करून  मविआ सरकारच्या तिन्ही घटक पक्षांवर टिका करावयाची असे धोरण राज ठाकरेंनी स्विकारलेले  आहे. त्यात गैर काही नाही.

आता सन २०२२ सुरू आहे. तीन वर्षात महाराष्ट्रातील राजकारणात बरीच उलथापालथ झाली आहे. आता मनसेने मविआ सरकार विरूद्ध रणशिंग पुकारल्या मूळे मराठी माणसाच्या हितासाठी पण सोबत कट्टर हिंदुत्वाची जोड देत स्थापन झालेल्या शिवसेनेचे दोन बंधू एकमेकासमोर लढाई करण्याच्या पावित्र्यात असल्यामूळे चौका-चौकात चर्चा होणे स्वाभाविक आहे. संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच शिवसेनेत उभी फूट पडली होती. मविआ सरकार अस्तित्वात आल्यानंतर त्या शिवसेनेला कोणी शरदसेना म्हणतात तर कोणी सोनिया सेना म्हणत आहेत. त्यामूळे आता खरी शिवसेना कुठली? शिवसेना की मनसे? स्वर्गीय बाळासाहेबांचे खरे वारदसार उद्धव ठाकरे की राज ठाकरे ? इतपर्यंत ही चर्चा येऊन ठेपली आहे. 

स्वर्गीय बाळासाहेबांचे खरे वारसदार कोणीच नाही. पण बाळासाहेबांची आठवण करून देण्याची शक्ती राज ठाकरे कडेच आहे हे शिवसैनिक कबूल करीत असतात. त्यामूळे दस्तूरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ही मनसेचे आव्हान मामूली समजून दुर्लक्षित करता येणार नाही. मविआ सरकारची अवस्था अशी आहे की केंद्र सरकार विरूद्ध लढता लढता ते थकले आहे. बजेट सत्रातल्या भाषणातून भाजपा किती आक्रमक झाला आहे याची जाणीव मुख्यमंत्र्यांना झाली असल्याचे दिसले आहे. त्यातच मनसेची अप्रत्यक्ष रित्या सोबत भाजपाला होत असल्यामूळे शिवसेनला काॅग्रेस, साम्यवादी पक्ष, आणि इतर प्रांतिय पक्षांप्रमाणे भाजपावर विशेषतः केंद्र सरकारवर टिका करणे आता परवडणारं नाही. कारण भाजपावर आरोप न करणे म्हणजेच शिवसेना पुन्हा हिंदुत्वकडे वळू लागली आहे असा संदेश जनमनास जाऊ शकतो. असा संदेश जनमानसात गेला तर, काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेसला मुस्लीम समाजाची मतें गमाविण्याची आफत ओढवेल. तीच सबब सांगून दोन्ही काँग्रेस पक्षांना सरकारचा पाठींबा काढून घेण्याची आयती संधी धावून येईल. तसे ते दोन्ही पक्ष मविआ सरकारचा पाठींबा काढून घेण्यासाठी संधीची वाट पाहात आहेत. सरकार पडलं तर शिवसेनेच्या पदरात इतिहासातील सर्वात मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागेल. एका परीने राज ठाकरे यांनी शिवसेने कडून हिंदुत्व आपल्याकडे खेचून घेतले आहे. मनसे हा शिवसेनेतून तयार झालेला पक्ष असल्यामूळे तोच शिवसेनेचा स्पर्धक होईल. म्हणजे शिवसेनेची कायमची कोंडी होऊ शकते. 

( या लेकाचा भाग २ खाली सोबत जोडला आहे तो कृपया वाचावा. धन्यनाद ! )

मंगळवार, १२ एप्रिल, २०२२

श्री शरद पवारांच्या घराकडे आलेला मोर्चा आणि त्यावरील चर्चा

अलिकडे राष्ट्रवादी काॅग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानावर एस टी कामगारांनी नेलेल्या धडक मोर्चावर सर्वत्र चर्चा सुरू आहे. एखाद्या राजकीय नेत्याच्या घरावर कामगारांचा मोर्चा गेला की राजकीय जगत कसं खडबडून जागं होते याची प्रचिती आली. समाजाच्या कुठल्याही घटकाला आपल्यावर अन्याय झाला आहे असे वाटते तेव्हा त्या अन्यायाच्या विरोधात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्या समाज घटकाचा नेता मोर्चा संबंधीची जाहीर सभेत तशी घोषणा करतो. त्यामूळे सरकारी यंत्रणा सावध होते आणि अशा मोर्चाला परवानगी कशी द्यावयाची, कुठे मोर्चाला अडवायचे या संबंधीचा निर्णय घेतला जातो. त्या निर्णयाची माहिती मिडीया मार्फत जनतेला तसेच आंदोलन करणार्या समुहाला व त्यांच्या नेत्यांना मिळत असते. मुंबईत येणार्या मोर्चा संबंधीचा इतिसास असा आहे की,  बहुतांश असे मोर्चे आझाद मैदानावर पोलीस यंत्रणेतर्फे अडविले जातात. मग सरकार तर्फे एखादा मंत्री येतो आणि आंदोलनकर्त्यांच्ये शिष्टमंडळाशी चर्चा होते. पुढे चर्चेच्या फेर्या सुरू होतात आणि त्या आंदोलनाच्या दिव्यातील तेल ही संपते. पुढे आंदोलनकर्त्यांची नेते मंडळी विजय साजरा करतात आणि सरकारतर्फ पत्रकार परिषद होते,  कामगाराच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे जाहीर करते आणि त्या आंदोलनाची सांगता होते. एस टी कर्मचार्यांच्या मागण्या पूर्ण केल्याचा दावा सरकार मांडत असले तरी सरकारने संप काळात कडक कारवाईचे इशारे देण्याचे जे सत्र सुरू केले होते, ते अवाजवी झाल्याची भावना एसटी कर्मचार्यांच्यांच नव्हे तर सर्वसामान्य जनतेच्या मनात झाली होती. संप काळात कर्मचार्यांच्या कुटुंबांचे प्रचंड हाल झाले. त्यातच सरकारने आमदारांना घरे देण्याची घोषणा केली. चोहोकडून सरकारवर टिका होऊ लागली. अगोदरच कर्मचार्यांच्या मनात राग होताच त्यात तेल ओतले गेले. त्यातून भडका उडाला असण्याची शक्यता असावी. त्यामूळे अनपेक्षितपणे शरद पवारांच्या मुंबईतील घरावर मोर्चा गेला असावा. मग पोलीस खात्याच्या हेरांना मोर्चाचा सुगावा का लागला नाही,  मोर्चाचा मास्टर मांईड कोण होता,  इत्यादीं संबंधीची चर्चा सुरू झाली, आणि ती अजुनही थांबलेली नाही. 

तपास यंत्रणा कामाला लागली आहे. मोर्च्यातील कामगारांची अटक, गुणवंत सदावर्ते यांची अटक आणि चौकशीचा सिलसिला सुरू झाला आहे. आता तर या चौकशीवर ही चर्चा सुरू झालेली दिसते. अशी घटना महाराष्ट्र राज्यात प्रथमच घडली आहे. त्यातून या घटनेवर मला ही व्यक्त व्हावेसे वाटले. म्हणून हा लेख प्रपंच.

जशी महाराष्ट्रातील ही पहिली घटना, तशी महाराष्ट्रात तीन मुख्य पक्षांच्या आघाडीचे सरकार सत्तेवर आहे ही सुद्धा पहिलीच घटना आहे. पुर्वी शरद पवारांनी महाराष्ट्रात जनता पक्षाच्या साह्याने पुरोगामी लोक दल असे सरकार अस्तित्वात आणले होते. ते सरकार महाराष्ट्रातील काॅग्रेस सरकाराला उलथावून अस्तित्वात आले होते.  त्यावेळी जनता पक्षात हिंदुत्ववादी  (सध्याच्या भाजपाची) मंडळी होती. मविआ सरकारचे शिल्पकार ही शरद पवारच आहेत. या सरकारात  ही एक हिंदुत्ववादी पक्ष शिवसेना आहे. पण सोबत काॅग्रेस पक्ष आहे. पुलोद सरकार स्थापन करताना जनमताचा आदर न करता शरद पवार काॅग्रेस मधून बाहेर पडले. पण शरद पवारासोबत काॅग्रेस मधून बाहेर पडणार्या आमदारांची संख्या कमी होती. ते सरकार शरद पवारांनी बंड करून स्थापन केले असेच म्हटले गेले होते. मविआ सरकारात संपुर्ण शिवसेना पक्षच दाखल झाला. म्हणून खरे तर शिवसेनेने जनादेश धाब्यावर बसविला असे मानणे जाणे आवश्यक होते. परंतु तसे मिडीयात मानले गेले नाही. याचे कारण  मिडीयाला असलेली भाजपाची ॲलर्जी हे आहेच पण सोबत तीच मिडीया मविआ समर्थक झाली आहे हे ही कारण आहे. पुलोद सरकारचा प्रयोग केला, तेव्हा शरद पवार तरूण होते. त्यावेळी मुख्यमंत्रीपदावर सहकारी क्षेत्रातले लोकप्रिय नेते स्वर्गीय वसंतदादा पाटील होते. म्हणून त्या वेळी शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला असे मिडीयाने वर्णन केलेले आज ही स्मरणात आहे. पण तसे मविआ सरकार स्थापन झाल्यानंतर पवार आणि उद्धव ठाकरेनी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला असे वर्णन मिडीयाने का केलं नाही, हा एक तसा लोकशाही मुल्यांशी सुसंगत असलेला प्रश्न. पण मिडीयाला असा विचारण्यात अर्थच राहिला नाही. मराठी मिडीया मग ती प्रिन्ट असो वा इलेक्ट्राॅनिक्स, शरद पवार आणि मुख्यमंत्र्यां वर  इतकी मेहरबान का झाली आहे याच्या उत्तरात ' अर्थ ' दडला आहे. म्हणजेच 
' अर्थस्य पुरूषो दासः | '

वर्तमान मविआ सरकाराचे एक वैशिष्ट्य हे आहे की त्यात काॅग्रेस पक्ष ही सामील झालेला आहे. काॅग्रेस पक्ष सन २०१४ पासून कमकुवत झालेला आहे. देशभर काॅग्रेसची जागा भाजपा घेत आहे. त्यामूळे काॅग्रेसचे समर्थक मिडीया आणि  कार्यकर्ते, सेना आणि राष्ट्रवादी सोबत भाजपावर सतत टिका करीत असतात.  श्री अमित शहा आणि उद्धव ठाकरें मध्यें एका बंद खोलीत काय चर्चा झाली होती असा पुरावा नसताना ही महाराष्ट्रातील काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेसचे नेते मंडळी आणि कार्यकर्ते मंडळीनी शिवसेनेची बाजू घेतली. सध्याचा मविआ सरकारचा कारभार पाहता मला आता वाटते की सन २०१९ च्या निवडणूकीच्या प्रचाराच्या अगोदरच शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा गुप्त करार झाला असावा. परंतु माझ्याकडे तसा पुरावा नाही. पुरावा नसला म्हणून काय झाले, आपल्याला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. पण म्हणून आपण पलटी मारणे योग्य आहे का असा प्रश्न राजकारणावर चर्चा करणार्यानी म्हणजेच  प्रिन्ट, इलेक्ट्राॅनिक्स आणि सोशल मिडीयावर आपल्या सारख्यांनी स्वतःलाच विचारण्याची वेळ आली आहे. इतकी महाराष्ट्रातील राजकीय स्थिती खालावलेली आहे. शिवसेनेने दगा दिला म्हणून भाजपा शिवसेनेवर हल्ला करत आहे हे स्वाभाविक आहे.  त्याला ही मर्यादा हवी आहे असे मला मनापासून वाटते. पण शिवसेनेच्या जागी भाजपा असता तर शिवसेनेने किती धुमाकूळ घातला असता यासंबंधीत प्रिन्ट, इलेट्राॅनिक्स आणि सोशल मिडीयात चर्चा होताना दिसत नाही. राजकारणात फार शुचिता पाळल्यामूळे भाजपाला  गाव पातळी पासून ते दिल्लीपर्यंत अत्यंत खालच्या पातळीवर अनेक वर्षे टिका सहन करावी लागलेली आहे. या इतिहासातून धडा घेत भाजपाने आपल्या कार्यशैलीत बदल केलेला दिसतो. मुद्दा हा आहे की पुलोद  सरकार आणि मविआ सरकाराच्या जन्मात म्हणजे स्वरूपात जो विलक्षण फरक दिसतो आहे तो सर्व राजकीय अभ्यासकांनी न्याहाळून पाहावा आणि नंतरच आज घडत असलेल्या राजकीय घटनेवर आपआपली प्रतिक्रीया द्यावी असे मला वाटते. पुलोदच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना किती यातना झाल्या होत्या हे आमच्या वाचनात आल्या आहेत. पण सध्याच्या भाजपाच्या नेते मंडळींचा आणि कार्यकर्त्यांच्या यातनांचा विचार कुठल्याही मुख्य मिडीयातून दिसत नाही. त्यामूळेच विद्यमान मविआ सरकारच्या काळात अनेक घटना महाराष्ट्रात प्रथमच घडत असल्याचे दिसत आहेत. मराठी मिडीयाचा मिळणारा पाठींबा आणि हाती आलेल्या सत्तेचा माज म्हणजे काय हे मविआ सरकारच्या काळात अधिक दिसतो आहे. तुलनेने मविआच्या इतर दोन घटक पक्षांपेक्षा शिवसेनेचाच माज अधिक दिसतो आहे. म्हणून पुलोद सरकारात जनता पक्षातील हिंदुत्ववादी मंडळीचा व्यवहार दुःस्वासाचा नव्हता, हे शिवसेनेच्या समर्थक मिडीयांनी शिवसेनेला पटवून द्यावे असे मला वाटते. अन्यथा शिवसेनेचे नुकसान इतर घटक पक्षांपेक्षा अधिक होत जाईल.

शरद पवारांच्या घराकडे जो मोर्चा झाला त्या संबंधी पोलीस यंत्रणेला सुगावा लागला नाही. यावर विरोधी पक्षाने किती मोठे रान उठवावयाला हवे होते ? पण फडणवीस आणि इतर भाजपा नेत्यांनी संयम पाळला आहे.  ही घटना घडली तेव्हा जर शरद पवार आपल्या घरीच असते तर त्यांना काय वाटले असते असा विचार केला तर या घटनेचे गांभिर्य आपल्या लक्षात येऊ शकते. ही घटना निश्चीतच दुर्दैवी आहे. अशी घटना घडावयास नको होती. मविआ सरकारच्या पोलीस यंत्रणेला पवारांच्या घराकडे मोर्चा होणार आहे याचा सुगावा लागला नाही. म्हणूनच त्या घटनेवर अनेक तर्क काढले जात आहेत. आता गृहखाते म्हणत आहे, की मास्टर माईन्ड कोण आहे याचा शोध घेत आहोत. मोर्चात सामील झालेले लोक एसटी कामगार आहेत, मग एसटी कामगारांच्या युनियनच्या नेत्यांचाच हात आहे हे प्रथम दर्शनी मानावे लागते. कुठल्याही युनियनमध्ये ही राजकारण असतेच हे काही नव्याने मांडण्याची गरज नाही. युनियनमधील दोन नेत्यांमधील गुप्त सत्तास्पर्धा नसेल असे ठामपणे आपण म्हणू शकत नाही. ही घटना घडली याचे मूळ कारण, मविआ सरकारने एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनात तोडगा काढण्यात प्रंचड विलंब लावला हे आहे. जेव्हा सरकार संपवाल्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहात बसते तेव्हा उद्रेक होतो हा सार्वत्रिक अनुभव आहे. यात नवल ते काय ? पण मोर्चा शरद पवारांच्या घराकडे गेला म्हणून चर्चा अधिक होत आहे. ही या घटनेतील खरी मेख असावी.

या घटनेसंबंधी अनेक तर्क लढविले जात असल्याचे आपण चॅनेल्स वरून ऐकतो आणि पाहात आहोत. कोणी म्हणतं अर्बन नक्षलवाद्यांची फूस असावी. नक्षलवाद्यांचा इतिहासच घातापाताचा आहे. आपल्या देशात अस्थिरता माजावी असे साम्यवाद्यांचे एकमेव धोरण आहे. जर या घटनेत नक्षलवाद्यांचा हात असेल असे दिसले तर सरकारने त्या दिशेने तपास यंत्रणेला कामाला लावावे. पण प्रश्न हा आहे की साम्यवादी पक्ष आणि संघटनांशी मविआ सरकारची मैत्री वाढली असतांना मविआ सरकार त्या दिशेने पाऊल उचलेल का? मोर्चाच्या दिवशी काही मिडियांना असा मोर्चा होणार अशी माहिती सकाळीच मिळाली होती. या बाबत नागपूर मधून आलेल्या फोन काॅल आणि वाॅट्स-ॲपवरील मेसेजच्या  आधारे तपास यंत्रणेने दुजोरा दिल्याचे ऐकीवात आले आहे. आता नागपूरात भाजपांचे दोन मोठे नेते केंद्रिय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणविसांचा मोठा प्रभाव आहे. म्हणून भाजपाला विशेषतः देवेंद्र फडणविसांना टार्गेट करण्याचा मोह मविआ सरकारला होऊ शकतो. तसेच नागपूर हे शहर डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दिक्षा घेतल्याचे स्थान आहे. म्हणून आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांवर ही आरोप केले जाण्याची शक्यता आहे. या जगात सर्वात सहज आणि सोपी गोष्ट म्हणजे इतरांवर आरोप करणे ही होय. म्हणून या संबंधी अधिक तर्क लढविणे योग्य नाही असे मला वाटते. पण - - - -

राजकारणात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील भांडणापेक्षा पुष्कळदा सरकार मधील घटक पक्षांच्या सत्तास्पर्धेतून जे परस्परांवर शह-कटशहाच्या खेळी होतात, त्यापैकीच ही घटना असू शकते. महाराष्ट्रातल्या मविआ सरकार मधील राष्ट्रवादी काॅग्रेस आणि शिवसेना या दोन घटकांमध्ये एक प्रकारचे शीत युद्ध सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात गृहखाते हवे आहे अशी चर्चा उघडपणे होत आहे. यावर तर्क लावायचा म्हणजे राष्ट्रवादी काॅग्रेसचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या खात्यावर ताशोरे ओढण्यासाठी शिवसेनेने हे घडवून आणलेले कारस्थान आहे असे मानावे लागते. तर दुसर्या बाजूला राष्ट्रीय पातळीवर राजकारणाची सुत्रे आपल्याकडे यावीत अशी आत्यंतिक गरज शरद पवार यांना झाली असावी. त्यातून सहानुभूतीची थोडी फार लाट निर्माण करण्यासाठी आपल्या घराकडे  मोर्चाची कल्पना दस्तूरखुद्द शरद पवारांनी कृतीत आणली असावी. असा ही अंदाज काढला जातो  याचे कारण शरद पवार ही पंतप्रधानाच्या स्पर्धेत आहेत. शरद पवारांनी निवडणूक जिंकून देण्याचे कसब ज्यांच्याकडे आहे अशा प्रशांत किशोरांना आपल्या घरी बोलावून चर्चा केल्याचे आपण ऐकले आहे. याच प्रशांत किशोरांनी ममता बॅनर्जीना आणि जगन रेड्डींना विधानसभेच्या निवडणूकीच्या ऐन धामाधूमित  खोट्या कारणाचे निमित्त दाखवून व्हिल चेअरवरून प्रचार करण्याचे  नाटक करवून घेतले होते. त्यात ममता बॅनर्जी आणि जगन रेड्डींना भला मोठा फायदा झाला हे दिसून आले आहे. मग शरद पवारांना ही असा मोह झाला नसावा असे धरून कसे चालेल? 

अलिकडे शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यावर ही माध्यमात बरीच चर्चा झाली. अशा प्रकारे माध्यमात चर्चेत राहण्याचा जसा फायदा होतो तसा तोटा ही होऊ शकतो. उत्तर भारतातील काही चॅनेल्सवरील राजकीय अभ्यासक जे भाजपा विरोधी आहेत त्यापैकी एक विनोद शर्मा. ते म्हणतात,  ' लेकीन शरद पवार इस तरह पंतप्रधान मोदींसे क्यों मिलते हैं ? किस कॅपॅसिटीमें शरद पवार मोंदीसें  मिलते है ? आप ना लोकसभाके विरोधी दल नेता है , ना राज्यसभाके विरोधी दल के नेता है | इससे राष्ट्रीय स्तरपर विरोधी दलकी एकताको बाधा पहुंचतीं है | ' विनोद शर्मानी शरद पवार पंतप्रधान मोदींशी अधून मधून घेत असलेली भेट हे निव्वळ नाटक आहे असे स्पष्टपणे मांडले नसले तरी त्यांच्या देहबोलीतून मला तसे जाणवले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमूख निर्मळ मनाने, हसत हसत म्हणत असत की  ' आम्ही राजकारणातील मंडळी रंगमंचावरील  किंवा सिनेमातल्या नटा सारखे कलाकार आहोत. ' ते महाराष्ट्रात लोकप्रिय झाले. याचे कारण त्यांची प्रतिमा लोकांना स्वच्छ वाटली. या उलट शरद पवार कोणत्या राजकीय खेळी करतील हे सांगता येत नाही असे अनेक राजकीय अभ्यासक म्हणत आहेत. यातील बहुतांश अभ्यासक, पत्रकार आणि संपादक मंडळींना वश करून घेतल्यामूळे ती मंडळी शरद पवारांचा हा गुण मानतात. वस्तुतः मिडीयाला मॅनेज करण्याची सवय हा दुर्गूण आहे. लोकांच्या नजरेत असा दुर्गूण वा सवय येते तेव्हा त्या नेत्याची विश्वासहर्ता कमी होत जाते. म्हणूनच एखादी राजकीय घटना सामान्यजनांच्या आकलना पलीकडची असली तर त्या पाठीमागे हमखास शरद पवार आहेत अशी चर्चा सुरू होते. 

हिंदी भाषिक प्रदेशातील राजकीय अभ्यासक आणि राजकीय नेत्यांना विशेषतः काॅग्रेसच्या समर्थक मंडळींना शरद पवारांबद्दल जितका आदर वाटावयास हवा होता तितका नाही. याचे कारण महाराष्ट्रात पुलोद सरकारचा केलेला प्रयोग. दुसरे कारण सिताराम केसरी सारख्या बुजूर्ग नेत्याबद्दल दाखविलेला अनादार हे होय. तिसरे कारण सोनिया गांधीच्या वर्मावर हातोडा मारून राष्ट्रवादी काॅग्रेसचा संसार मांडला. शरद पवारांची ही घोडचूक ठरली.  चौथे अतिशय महत्वाचे कारण मी सतत मांडत आलो आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील विधान सभेच्या निवडणूकीच्या प्रचार सभेतील त्यांचे आवडते वाक्य ' आम्ही महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश आणि बिहार होऊ देणार नाही ' हे होय. मुंबईतील हिंदी भाषिक समाज राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षापासून दूर का आहे याचे कारण हेच होय. आपण हिंदी भाषिक राज्यातील चॅनेल्सवर फेरपटका मारला तर शरद पवारांच्या राजकारणाच्या पद्धतीबद्दल फारसे चांगले ऐकू येत नाही. दक्षिणेतील भाषा अवगत नसल्याने तेथील चॅनल्सवर फेरपटका मारणे शक्य होत नाही. पण तेथील राजकीय अभ्यासक जे इंग्रजी वृत्तपत्रात वा चॅनेल्सवर असतात ते ही शरद पवारां संबंधी फारसे चांगलं म्हणत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे शरद पवारांनी पंतप्रधान कै नरसिंहरावांशी तंटा उभा केला होता हे होय. त्या चूकी मूळेच शरद पवारांनी पंतप्रधान पदावर विराजमान होण्याची संधी कायमची गमाविली. आता म्हणे त्यांना राष्ट्रपती पदावर बसायचे आहे असे मिडीयातून ऐकू आले आहे. 

शरद पवारांचे मविआ सरकारात वाढते वजन कमी करण्यासाठी त्यांच्या घराकडे गेलेला एसटी कामगारांचा मोर्चा हे  काॅग्रेसने घडविलेले कारस्थान असावे का असा ही एक तर्क ऐकू येतो.  पण सध्या देश पातळीवर काॅग्रेस संकटात आहे. शिवाय काॅग्रेसला अनासायाने सत्तेत बसायला मिळाले आहे. या कारणांमूळे काॅग्रेसने असे कारस्थान केले असेल हे बिलकूल संभवत नाही.

एकंदरीत  मविआ सरकारच्या काळात उद्योगपती मुकेश अंबानीच्या घरासमोर ते ही मुबंई सारख्या महानगरीत, दशहतवाद्यांची कार उभी केलेलं नाट्य घडते, पालघर मधील साधूंना चोर समजून कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून हत्या होते, सुशांतसिंग, दिशा सॅलियान, इत्यादींचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे आपण पाहिले आहे. मविआ सरकार हे विविध  कट कारस्थानांनी भरलेले, कायदा-सुव्यवस्थेचा वापर राजकीय सूडबुद्धीने होत असलेले तसेच खंडणी वसुलीने माखलेले, घटक पक्षांतर्गत स्पर्धा, अविश्वास, आणि त्यामूळे कल्याणकारी योजनांचा उडालेला बोजवारा, मंत्र्याच्या भ्रष्टांचारांच्या प्रकरणांनी तुडूंब भरत आलेले, प्रशासनात सावळा गोंधळ, विकासाची कामे ठप्प इत्यादी  रोगांनी दिवसेंदिवस अधिक जर्जर होत आहे. त्यामूळे  बहुमताच्या दृष्टीने मोठे पण कार्यक्षमतेच्या दृष्टीने सर्वात कमकुवत, केंद्र सरकारशी भांडत राहून थकलेले, न्यायालयांकडून आलेल्या तिक्ष्ण अशा असंख्य बाणाने रक्तबंबाळ झालेले, अशी मविआ सरकारची इतिहासात नोंद होईल असे दिसते. अनाकलनिय घटना आणि चमत्कारीक तर्क-वितर्कांनी वेढलेल्या या मविआ सरकारच्या मंत्र्यावर आणि नेत्यांवर ईडी, आयटी, सिबीआय इत्यादी संस्थांच्या होणार्या धाडी पासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी सरकारचे दोन शिल्पकार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सहमतीने पवारांच्या घरावर चालून आलेला मोर्चा  हा एक बनाव असू शकतो आणि अशी चर्चा ऐकू आली तरी नवल वाटणार नाही. या घटनेचा हा शेवटचा तर्क आहे. खरंखोटं काय हे फक्त तो ईश्वरच जाणो !  

 

 


दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...