पंजाब मध्ये घडलेल्या या घटनेने देश हादरून गेला. ही घटना आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चेत राहात आहे. या घटनेचे पडसाद कसे आणि किती काळ उमटत राहतील हे राजकीय पक्षांच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांची वक्त्व्यें आणि परस्परांमधील व्यवहार, तसेच प्रिन्ट, इलेक्ट्राॅनिक्स आणि सोशल मिडीयाचा रोल कसा राहील यावर अवलंबून राहील. सर्वात महत्वाचं म्हणजे देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या मानसिकतेवर अधिक अवलंबून आहे. या संदर्भात इथे भूतपुर्व पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयींचा राजकारण संबंधीतला दृष्टीकोन आणि व्यवहार कसा होता याबाबतचा प्रसंग आपल्या समोर ठेवतो.
प्रसंग आहे सन १९९०-९१ चा. सन १९८९च्या लोकसभेच्या निवडणूकीत काॅग्रेसचे पंतप्रधान राजीव गांधीच्या सरकारचा पराभव झाला. केंद्रात विश्वनाथ प्रतापसिंगचे विरोधी पक्षांच्या आघाडीतून तयार झालेले सरकार होते. ते सरकार पडले. नंतर श्री चंद्रशेखर यांचे काॅग्रेसच्या पाठींब्यातून सरकाल आले. काॅग्रेसने आपल्या सोयीनूसार चंद्रशेखरच्या सरकारचा पाठींबा काढून घेतल्या. लोकसभेच्या निवडणूका जाहीर झाल्या. प्रचार सुरू झाला. ऐन प्रचाराच्या धामधुमीत माजी पंतप्रधान- विरोधी पक्षाचे नेते राजीव गांधी यांची तामिळनाडूत एका प्रचारसभेत हत्या झाली. देश हादरला. निवडणूक प्रचार स्थगित झाला. काही दिवसानंतर निवडणूक प्रचार सुरू झाला. भाजपा तर्फे बोरीवलीत भाजी मार्केटच्या गल्लीत रामलिला मैदानावर माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयीची जाहीर सभा होती. सभास्थानी वाजपेयींचे आगमन होत असल्याचे माईक वरून घोषित झाले. कार्यकर्ते उठून उभे राहीले आणि देशका नेता कैसा हो, अटलबिहारी अटलबिहारी अशा जोरदार घोषणा सुरू झाल्या आणि वाजपेयीजी मंचावर विराजमान होईपर्यंत चालू होत्या. नंतर वाजपेयींनी भाषणाची सुरूवातच गंभीर आवाजात केली, ' देवी और सज्जनों , सवाल देशका नेता कैसा हो यह नही है, सवाल देश कैसा हो, यह है | सवाल चुनाव प्रचारका नही, सवाल राजनिती कैसी हो, सवाल समाज कैसा हो यह है | सभेत निरव शांतता पसरली. देशाच्या माजी पंतप्रधान राजीव गांधींना एक यथोचित श्रद्धांजली अर्पण झाली. ती ही निवडणूकीच्या प्रचार सभेत. भले पंजाब मध्ये अनिष्ट घटना घडली नसेल पण जे काही घडले त्या संबंधीत राजकीय पक्षांनी आणि मिडीया हाऊसेसांनी कसा व्यवहार ठेवावा, याहून अधिक आदर्श आणि मोलाचं सल्ला राजकीय नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कुठला आसावा?
वरील सल्ला फक्त मोदी विरोधकांसाठी नाही तर तो मोदीच्या समर्थकासाठी ही आहे. संकट पंतप्रधानपदावरील व्यक्तीवर असले तरी ते देशावरचे संकट असते. परकीय आक्रमण होवो किंवा नैसर्गिक आपत्ती आणि करोना सारख्या महामारीचे होवो ते आपल्या सर्वांवर आहे. संकट समयी सारे भेद विसरून महाभारतात युधिष्ठीरांनी सांगितलेला
वयं पंचाधिकम शतम् | हाच आपला धर्म होय !
पंजाब मधील अनपेक्षित तितकीच भयावय घटनेने पाच राज्यांतील निवडणूकांचा प्रचार, मतदान सुरळीत पडेल का, तिथल्या गल्ली-गल्लीत मिडीयातील पत्रकार कॅमेरामन, जात-पात, धर्म-पंथ, शेतकरी- कष्टकरी , दुकानदार, युवक-महिला इत्यादी घटकांच्या घोळख्या घोळख्याने मुलाखती घेतांना काही दुर्घटना, घातपात जाळपोळ होणार नाही ना असे असंख्य प्रश्न तेथील मतदारांच्या मनात तसेच इतर राज्यातील लोकाच्या मनात उभे असणारच की ! चॅनल्सवर होत असलेल्या मोकाट चर्चासत्रांच्या ट्रॅफिकतून आरोप-प्रत्यारोप, शिव्या-शाप हे ही एक प्रकारचे मानसिक आघात-अपघातच नव्हे काय? देशातील प्रत्येक राज्यात, प्रत्येक घटनेवर मग ती घटना मामूली असली तरी त्यात राजकारण घूसवून केंद्र सरकाराला अडचणीत कसे आणावे हाच बहुतांश विरोधी पक्षांचा एजंडा राहिला आहे. मग केंद्र सरकार कडून प्रत्युत्तर दिले जाते हे ही खरें आहे. पण सोशल मिडीयावर पंतप्रधानांवर खालच्या पातळीवरून टिका होते यावर आळा कसा बसेल, यावर मिडीयात कधी चर्चा होत नाही त्याचे काय?
देश कैसा हों, समाज कैसा हों, राजनिती कैसी हों अटलजींचे हे बोल आजही कानात गुंजत असतात. यावर गंभीर विचार होऊन समाजाला मार्गदर्शन कोण देणार? बरं मार्गदर्शन देण्यासाठी कोणी पुढे आले तर त्यांना तुम्ही कोण आम्हांला शिकविणारे असे उत्तर येणं हे ही नित्याचं झालं आहे. जगभरातील राजकारणाचा दर्जा खालावला आहे . शेवटी नव्या तंत्रज्ञान युगाचे म्हणा वा आर्थिक उदारिकरणाचे म्हणा हे सारे खेळ असावेत आर्य चाणक्यांनी म्हटले आहे हर एक नई सुविधा असुविधाको जन्म देती है | हेच खरें.
पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या पंजाब दौर्यातील घटनेची रितसर चौकशी सुरू झाली आहे. त्यासंबंधी अधिक भाष्यं करणे योग्य नाही. पण देशातील काही राज्य सरकारांनी केंद्र सरकारशी उभा केलेल्या ' उभ्या बखेडांचे ' लोण पंजाब सारख्या सिमावर्ती राज्यात पोहचू लागले ही बाब देशाच्या सार्वभौमत्वला आव्हान तयार झाले आहे. या बखेडाची व्याप्ती (ज्याला आपण रूंदी म्हणतो) तीन-चार राज्यापुरता सिमीत आहे. हे खरे पण दोन सिमावर्ती राज्यात. त्यातील एक पश्चीम बंगाल, दुसरा पंजाब. कालच पंजाबाच्या मुख्यमंत्र्याच्या नातेवाईकाच्या घरावर ईडीने छापा टाकला त्यावर मुख्यमंत्री चरणजीतसिंगनी त्यावर प्रतिक्रीया दिली त्यात ईडीच्या छाप्यातून मिळालेली करोडो रूपयांची बंडले हाती लागली याचा उल्लेख केला नाही. अशीच धाड पश्चीम बंगालच्या मुख्यमंत्र्याच्या नातेवाईकाच्या घरावर पडली होती असे म्हणत आमच्यावर दबाब आणत आहेत असे चन्नीने म्हटले. महाराष्ट्रातील ईडीच्या धाडीवर काही उल्लेख केला नाही .फक्त पश्चीम बंगालचा उल्लेख केला यावरून चन्नीना या दोन्ही राज्याच्या सिमा दोन इस्लामी देशांना जोडलेली आहे त्यामूळेच आमच्यावर दबाव वाढविला आहे असे अप्रत्यक्ष सुचविले आहे असे दिसते. चार राज्यांनी उभा केलेला उभ्या बखेडाची खोली वाढती आहे. हे भिमा-कोरेगाव, सीसीए कायद्या विरोधी झालेला धुमाकूळ, शाहीनबाग धरणं, आंदोलक शेतकर्यांनी प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर फडकाविलेला खलिस्थान वाद्यांचा झेंडा आणि आता पंजाबात घडलेल्या घटनेवरून सिद्ध होते. ही बखेडाची खोली विशेषतः मोदी आणि मोदी सरकारच्या द्वेषांनी भरलेली आहे.
या सर्व घटनांच्या मुळाशी जाऊन अभ्यास केला की आपल्याला मूळ कारण हाती मिळते. सन २०१४ सालच्या ही अगोदर नरेंद्र मोदीनी गुजरातमधून काॅग्रेस नामशेष करण्याचे काम हाती घेतल्याचं शल्य जे सोनिया गांधीना टोचत होते ते त्यांनी जाहिर सभेत मौतका सौदागर अशा टिप्पणीतून व्यक्त केलं. त्या दिवसा पासून सार्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनात नरेंद्र मोदी संबंधी पराकोटीचा द्वेष निर्माण झाला आहे. त्याचं रूपातंर विषात झाले आहे. त्यासाठी काही मिडीया हाऊसेस, विदेशी शक्ती, बाॅलिवूड शक्ती, अन्डरवर्ल्ड, सो काॅल्ड लिबरल विचारवंताचा हातभार लागला. सन २०१७ पासून ब्लाॅगवरील बहुतांश राजकीय विषयावरील लेखात मांडत आलो आहे. दिले आहे. १५ जूलै २०१७ रोजी म्हणजे मोदीजी पंतप्रधान झालेल्या फक्त तीन वर्षच पुर्ण झालेली असताना भाजपा आणि विरोधी पक्षातील धुमचक्री का वाढली जाते, या संबंधीचा उहापोह ' युद्ध मोदी समर्थक आणि विरोधकात ' या लेखात विस्ताराने मांडलेलं आहे. त्या लेखाचा सारांश म्हणा वा विरोधी पक्षाचां मोदीं विषयींचा प्रचंड द्वेषाचं कारण थोडक्यात खाली मांडतो आणि या लेखाच्या भाग १ ची समाप्ती करतो.
सन २०१४ च्या लोकसभेतील भाजपाचा प्रचंड विजय विरोधी पक्षांच्या नेते - कार्यकर्ते त्यांचे समर्थक मिडीया, विचारवंत आणि काही कलाकार साहित्यिक मंडळींना पचला नाही. बहुतांश पत्रकार, संपादक मंडळींनी तो विजय मोदींच्या जाहिरातबाजीचा मानला. ही मंडळी मोदींची लाट ओसरणार आणि २०१९ ला परिवर्तन होणारच अशा थाटात वावरत राहीली. वस्तुतः विरोधी पक्षांचे मुख्यमंत्री जेव्हा झोपा काढत होते तेव्हा प्रतिकूल परिस्थितीत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून मोदी गुजरातच्या विकासाचे स्वप्न साकारण्यासाठी अहोरात्र मेहनत करीत होते. पारंपारीक निवडणूका जिंकण्याच्या क्लृप्त्या कालबाह्य ठरण्याचे युग सुरू झाले होते. तरीही विरोधी पक्षांचे मुत्सुद्धी नेते मोदींना भगवा दशहतवादी ठरविण्यातच गुंतले आणि भ्रष्ट्राचारातून आपल्या थैली भरत होते. कुठे गेले सी चिदबंरम्, कुठे गेले सुशील कुमार शिंदे, मणिशंकर अय्यर ? सोनिया गांधी आणि राहूल गांधी काॅग्रेसचे सर्वेसर्वा होते म्हणून नावाने तरी टिकले आहेत. आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जुनी झालेलं शेंडी-जानवं हिंदुत्वावर टिका करीत आहेत. महाराष्ट्रातील नवमतदार इतके खुळे नाहीत. शरद पवार गेल्या शताब्दीच्या सत्तरच्या दशकातील संघावर अर्धी चड्डी वरून टिका करतात जणू काही शरद पवार जन्मतः फुल पॅन्ट आणि हाफ बुशशर्ट अशा वेषात भूतलावर आले आहेत की काय?
महाराष्ट्र टाईम्सने २०१४ च्या निवडणूक प्रचारा दरम्यान 'मोदी एक जाहिरातबाजीचा चेहरा 'असा प्रताब आसबेंनी लिहलेला लेख पब्लीश केला होता. तेव्हा मी उत्तरादाखल एक लेख (त्याची काॅपी अजूनही मी ठेवली आहे) मटा च्या मेलवर पाठविला. पण त्यांनी पब्लीश केला नाही. प्रताब आसबे प्रकाश बाळ सारखे देशभरातील लिबरल आणि पुरोगामी संपादक मंडळी तसेच असहिष्णूतेची बोंब उठवून देश सोडून जाणार असे म्हणणारी कलाकार मंडळी,, साहित्यिक सन २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूकीच्या निकालानंतर पुर्णपणे गप्प झाली आहे. तात्पर्य हे आहे की जो पर्यंत विरोधी पक्ष मोदी, संघ , आणि भाजपाचा द्वेष करीत राहतील तो पर्यंत त्यांना विजयाची वाट दिसणार नाही. मोदी समर्थकांना अंधभक्त म्हणता म्हणता यांना विजयाची वाट दिसणे बंद झाले आहे.
(या लेखाच्या दुसर्या भागात केंद्र सरकार विरूद्ध महाराष्ट्र, पश्चीम बंगाल दिल्ली, आणि पंजाब सरकारने जो बखेडा उभा केला त्याचे स्वरूप आणि इतर राज्यातून त्याला पाठींबा कितपर्यंत मिळतो यावर आपण चर्चा करू .)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा